➖➖➖➖✍️⚜️✍️➖➖➖➖
*🚦सोमवारीय 'त्रिवेणी काव्यस्पर्धा*🚦
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*✍️परीक्षणीय मनोगत*
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*🎋“यथावकाश या शब्दातच संयमाचा अंतर्भाव”; वृंदा करमरकर*
*🔹सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण*
*🌹“यथावकाश” म्हणजे योग्य वेळ आल्यावर, क्रमाने किंवा नैसर्गिक गतीने घडणारी प्रक्रिया. प्रत्येक गोष्ट तात्काळ घडत नाही; काही गोष्टींना वेळ, संयम आणि सातत्य आवश्यक असते. जीवनातील अनेक घटना यथावकाश घडत असतात. रात्री नंतरच दिवस उगवतो. ओहोटी नंतर ठराविक कालावधीने सागराला भरती येते. शिशिराची पानगळ झाल्यावर, धरणीचा दाह झाल्यानंतरच वसंताचा बहार येतो. एका ऋतूनंतर दुसरा ऋतू ठराविक काळाने येतो. निसर्ग मानवाला संयम, सोशिकपणा शिकवतो.*
*🔻मानवी जीवनातही यथावकाश या तत्त्वाचे महत्त्व फार मोठे आहे. शिक्षण घेतल्यानंतर अनुभव मिळतो, अनुभवातून प्रगल्भता येते आणि त्या नंतर यश प्राप्त होते. एका दिवसात कोणीही महान होत नाही. सततचा प्रयत्न, धैर्य आणि वेळ यांच्या साहाय्याने माणूस प्रगती करतो. विवाह ठरण्याचे उदाहरणही यथावकाश या संकल्पनेला समर्पक आहे. योग्य वेळ येईपर्यंत अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. स्वभाव, विचार, कुटुंब, पत्रिका परिस्थिती आणि परस्पर समजूत. घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा अडचणी निर्माण करतात, यथावकाश घडणारे नाते अधिक दृढ आणि टिकाऊ ठरते.*
*🔻समाजातील बदलसुद्धा एका क्षणात होत नाहीत. जुन्या विचारांना बदलण्यासाठी काळ जावा लागतो. सुधारणा, प्रगती आणि परिवर्तन यांना संयमाची जोड आवश्यक असते. म्हणूनच “यथावकाश” हा शब्द केवळ वेळेचा नाही, तर संयम, विश्वास आणि सातत्य यांचा संदेश देतो. आजच्या वेगवान युगात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते. कारण हा “इन्स्टंट” चा जमाना आहे. पण घाईमुळे अनेकदा चुकाही होतात. यथावकाश घडणाऱ्या गोष्टी अधिक स्थिर, सुंदर आणि परिणामकारक असतात. त्यामुळे जीवनात संयम ठेवून योग्य वेळेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.*
*📗काही वेळा चांगले शिक्षण घेतले असले, तरी नोकरी लगेच लागत नाही. त्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागते. जर संयम नसेल तर कधीकधी नैराश्य आल्याची उदाहरणे असतात. पण धैर्य, आत्मविश्वास असेल तर योग्य वेळेस संधी चालत येते. शेवटी असे म्हणता येईल की, यथावकाश घडणाऱ्या प्रक्रियेतच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे. योग्य वेळआल्यावरच फुल उमलते, फळ पिकते आणि माणसाचे स्वप्नही पूर्णत्वाला जाते. बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही. प्रथम बी मातीमध्ये शांतपणे रुजते. त्यानंतर छोटासा अंकुर बाहेर येतो, हळूहळू त्याचे रोप बनते. योग्य प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश व खत मिळाल्यावर ते रोप वाढू लागते. कालांतराने त्याला फुले येतात आणि पुढे फळधारणाही होते. ही संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात घडत नाही; ती सर्व यथावकाश म्हण जे योग्य वेळेनुसारच घडते.*
*〽️निसर्ग आपल्याला संयमाचा मोठा धडा शिकवतो. शेतकरी बी पेरल्यानंतर दररोज मेहनत करतो. पण त्याला माहिती असते की, पीक योग्य ऋतू आणि वेळ आल्यावरच तयार होणार. जर त्याने घाई केली, तर अपेक्षित फळ मिळणार नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो.मानवी जीवनही याच नियमाने चालते. शिक्षण, अनुभव, नाती, यश किंवा स्वप्न सर्व गोष्टी हळूहळू विकसित होतात. जसे बीजापासून वृक्ष तयार होतो, तसेच माणूसही प्रयत्न, संयम आणि काळ यांच्या साहाय्याने घडत जातो. त्यामुळे “यथावकाश” हा शब्द केवळ वेळ दर्शवत नाही, तर जीवनातील नैसर्गिक वाढ, परिपक्वता आणि योग्य क्षणाची जाणीव करून देतो.*
*💥आजच्या 'सोमवारीय काव्यत्रिवेणी' स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी 'यथावकाश' हा वैचारिक विषय दिला आहे. शिलेदारांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला. मला या काव्य स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल सरांची मनापासून आभारी आहे.*
➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.वृंदा (चित्रा) करमरकर*
*ता.सांगली,जि.सांगली*
*मुख्य मार्गदर्शक /सहप्रशासक/परीक्षक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
https://pratilipi.app.link/SybbQiHl42b #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
➖➖➖➖✍️📕✍️➖➖➖➖

