🔥अंगात नाही बळ अन् चिमटा घेऊन पळ..😂🤣😂
सन १७६१ मध्ये अफगाण शासक अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांमध्ये पानिपतचे तिसरे युद्ध लढले गेले. मराठे प्राणपणाने लढले, पण पेशव्यांच्या हाराकिरीमुळे आणि कचखाऊ, भ्याड वृत्तीमुळे या युद्धात त्यांचा दारुण पराभव झाला. मराठ्यांची एक अख्खी पिढी पानिपतावर शहीद झाली. पेशव्यांचे काय झाले याचा इतिहासाला अजूनही पत्ता लागला नाही, पण ते पानिपतावरून पळाले आणि परांगदा झाल्याचे अनेक इतिहासकारांनी लिहिले आहे. काही इतिहास संशोधक अक्कलकोटचा ’भिऊ नकोस मी पाठीमागे आहे’ वाला स्वामी समर्थ पेशवा सदाशिवराव भाऊ असल्याचे सांगतात. सदाशिवराव भाऊच्या नेतृत्वात पानिपतचे हे युद्ध लढले गेले होते.
पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी ज्याला ’अर्धा शहाणा’ मानला जातो तो नाना फडणविसही या युद्धात होता. त्याला अर्धा शहाणा यासाठी म्हणतात की, तो फक्त कलम (लेखणी) चालवण्यात हुशार होता. तलवार चालवणे उसके बसकी बात नहीं थी.. थोडक्यात ’तोंडात बळ आणि हातात केळ’ अशी अवस्था..! या कलमेच्या बळावर या बहाद्दराने पुढे मराठ्यांच्याच माना चराचरा कापल्या. शूरवीर महादजी शिंदे यांना दगाबाजीने जहर पाजून मारण्यात त्याचाच वाटा होता. नाना फडणवीस अत्यंत बाईलवेडा इसम होता. पुढच्या काळात पुण्यात त्याने आपल्या या वेडापायी कहर केला होता. पुण्यातली एकही बरी दिसणारी ब्राम्हण बाई व कलावंतीण नानाच्या तडाख्यातून सुटली नव्हती म्हणतात. विजय तेंडुलकर यांनी ऐतिहासिक घटनांवर लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकात नानाच्या या विशेष प्राविण्याविषयी सविस्तर वर्णन आले आहे. नानाचा हा बाईलवारसा पुढे दुसऱ्या बाजीरावाने पुण्याच्या पार्वतीएवढ्या उंचीवर नेला; तर नानाचे स्त्रियांविषयीचे हे विशेष प्राविण्य लक्षात घेऊन पानिपतच्या युद्धभूमीवर पेशव्यांनी सोबत नेलेल्या बाया- बटक्या व नाटकशाळा (रखेल्या ) यांना सांभाळण्याचे काम नानाकडे देण्यात आले होते. युद्धातल्या भयंकर पराभवाची खबर कानावर आली, तेव्हा हा नाना लुंगीवर होता म्हणे. पराभवाचे वृत्त ऐकून तो इतका घाबरला की, त्याला दिलेले बाया - बटक्यांच्या संरक्षणाचे काम सोडून तो नेसत्या लुंगीसकट महाराष्ट्राकडे पळत सुटला. लपतछपत, रडतपडत कसाबसा हा नाना फडणवीस शेवटी पुण्यात येऊन पोहचला. भटांच्या या पूर्वजांच्या शौर्याचा काय महिमा वर्णावा..! शब्द अपुरे पडतात हो..!
आता येथे काहीजण प्रश्न उपस्थित करतील की, ’सगळेच भट पेशवे असे नव्हते. पहिला बाजीराव पेशवा तर शूरवीर होता. त्याने स्वतः रणमैदानात समशेर हाती घेऊन युद्ध केले आहे आणि तो जीवनात एकही युद्ध हरलेला नाही. तुम्ही त्याबद्दल का नाही बोलत?’
मित्रांनो, सन १९२०च्या दशकात रामचंद्र लाड यांनी लिहिलेल्या ’पायपोस किमतीचे पेशवे’ या पुस्तकात यासंदर्भात महत्वाची माहिती आली आहे. पहिल्या ’बाजीराव पेशव्याचा खरा बाप हा बाळाजी विश्वनाथ नसून मराठा सेनापती धनाजी जाधव असल्या’चा दावा यात करण्यात आला आहे, यावर आपली विशेष टिपणी देतांना इतिहासाचार्य मा. म. देशमुख आपल्या ’रामदास आणि पेशवाई’ या संशोधनात्मक ग्रंथात लिहितात, ’त्यामुळेच पेशवा बाजीराव हा चित्पावन ब्राह्मणांप्रमाणे घाऱ्या डोळ्याचा व गौर वर्णाचा नसून मराठ्यांप्रमाणे सावळ्या वर्णाचा आणि काळ्या डोळ्यांचा होता.’
आता इथे काही अंधभक्त कडमडतील की, ’ब्राम्हण जर पळपुटेच आहेत, तर बाजीप्रभु देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याबद्दल काय म्हणाल?’ तर यासंदर्भात आमचे म्हणणे असे की, बाजीप्रभु आणि मुरारबाजी हे ब्राम्हण नसून सीकेपी अर्थात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू संक्षेपात कायस्थ आहेत. ब्राम्हणधर्मानुसार कायस्थ कोणत्या वर्णात येतात ते पहा. व्यास आपल्या स्मृतीग्रंथात म्हणतात,
▪️
’वर्धकी नापितो गोप आशापः कुम्भकारकः ।
वाणिक् किरात कायस्थ मालाकार कुटुम्बिनः ॥
चर्मकारो भटो भिल्लो रजकः पुष्करो नटः ।
एतेऽन्त्यजाः समाख्याता ये चान्ये च ग्वाशनाः ॥
एषा सम्भाषणात्स्नानं दर्शनादर्कवीक्षणम् ॥’
(अर्थ: सुतार, नापित, गवळी, कुंभार, व्यापारी, किरात (वनवासी/शिकारी), कायस्थ, माळी, घरगुती सेवक, चर्मकार, भट (निम्न दर्जाचा सैनिक किंवा भाट/चारण), भिल्ल, धोबी, पुष्कर, नट (अभिनेता) हे सर्व अंत्यज (बाह्यजाति / सर्वात निच / अस्पृश्य समूह) म्हणून ओळखले जातात. याशिवाय इतर जे कुत्र्याचे मांस खाणारे (श्वपच/ग्वाशन) आहेत तेही यातच मोजावे. यांच्याशी बोलणे (सम्भाषण) झाल्यास स्नान करावे आणि यांना पाहिल्यास (प्रायश्चित्त म्हणून) सूर्याचे दर्शन (अर्कवीक्षण) करावे.
(व्यासस्मृती, अध्याय ०१, श्लोक १०,११, १२)
▪️
अर्थात, ब्राम्हणधर्मानुसार कायस्थ हे अस्पृश्य मानल्या जात होते. काही ब्राम्हणग्रंथ त्यांना शूद्र संबोधतात. कायस्थांचे वर्णजाती व्यवस्थेत काळानुसार हळूहळू उन्नयन (प्रगती) झाल्याचे दिसते. आज मात्र कायस्थांना ब्राम्हणांनी आपल्या जातीत समाविष्ट करून टाकले आहे, पण इतिहासात ब्राम्हण आणि कायस्थ एकमेकांचे कट्टर वैरी राहिलेले आहेत हे येथे उल्लेखनीय..! असो.
तर पळपुट्या भटभडगुंज्यांचा हा इतिहास सविस्तर सांगण्याचे कारण हे की, माझ्या fb wall वर येऊन बरेच भट आणि भटभक्त मला मारहाण करण्याच्या वा ठार करण्याच्या धमक्या देतात. ज्यांच्या पूर्वजांचा इतिहास असा पळपुटा आहे, त्यांनी अशा धमक्या देणे किती हास्यास्पद आहे. ’अंगात नाही बळ अन् चिमटा घेऊन पळ’ अशी यांची अवस्था.. आणि हे काळ्या टोप्या घालून आणि जोरजोरात बांबू फिरवून आम्हाला मारण्याच्या गप्पा ठोकतात.
चल निघ इथून..!
जय भारत..!
✍🏼 बाळासाहेब गरुड (BG)
०१. Nana Fadanvis & The External Affairs Of The Maratha Empire - Y N Deodhar
०२. व्यास स्मृती
०३. पायपोस किमतीचे पेशवे - रामचंद्र लाड
०४. रामदास आणि पेशवाई - इतिहासाचार्य मा. म. देशमुख
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️राजकारण #👌प्रेरणादायी स्टेट्स #👌हृदयस्पर्शी फोटो


