राजुरा उपविभागाअंतर्गत येणा-या कोरपना तालुक्यातील मानिकगड सिमेंट कंपनी ( अल्ट्राटेक ) च्या माईन्स मध्ये कुसुंबी येथील कोलाम व आदिवासी च्या जमिनीचा मोबदला कींवा मोबदला न मिळाल्यास जमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी गेल्या १५ वर्षांपासून या आदिवासींचा लढा प्रशासकीय पातळीवर आणि मानिकगड सिमेंट कंपनी सोबत सुरू आहे. मात्र सतत पाठपुरावा करूनही हा वाद निकाली न निघाल्याने अखेर पाच आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांचे कार्यालयात विष घेतले.

