❤🚩शिवभक्त🚩❤
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२७ जुलै इ.स.१६६६*
*"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना "महासिंह शेखावत" याने सोबतच्या इतर राजपुत सरदारांना महाराजांच्या पराक्रमाविषयी माहीती सांगुन कौतुक केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ जुलै इ.स.१६७३*
*मराठ्यांनी सातारा जिंकले.*
*साताऱ्यास प्राप्त झालेली प्रचंड लूट अनेक बैलांवर लादून ते किल्ले रायगडी परतले. किल्ले अजिंक्यतारा विजापूरच्या आदिलशहाकडे असताना* *इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते.* *शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला महाराजांनी जिंकून घेतला.*
*या किल्ल्यावर महाराजांना अंगी ज्वर आल्याने २, दोन महिने विश्रांती घ्यावी लागली.श्रावण वद्य ९, नवमी, वार रविवार,*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ जुलै इ.स.१६७७*
*कर्नाटक मोहिमेवर असता महाराजांनी ९ मे रोजी ५००० स्वार कांचीवरवरून जिंजीवर रवाना केले. त्यानंतर स्वारी कावेरी तिरावर मुक्कामास आली तिथून त्यांनी आपला सावत्र भाऊ एकोजीराजे यांस पत्रे लिहिली. तेव्हा महाराजांच्या भेटीस एकोजीराजे यांनी आपल्यातर्फे काही पोक्त लोक पाठविले. या मंडळीशी महाराजांनी व्यवहाराची योग्यतीच बोलणी केली. “कैलासवासी शहाजी महाराजांच्या कष्टाच्या धनदौलतीत जसा एकोजीराजांचा वाटा आहे तसाच आपलाही वाटा आहे. तेव्हा अर्धावाटा बऱ्या बोलाने द्या” असे महाराजांनी सांगून पाठविले. आणि हा निरोप त्यांनी एकोजीराजांची जी माणसे भेटावयास आली त्याज बरोबर एकोजीराजांच्या भेटीस आपलेकडील थोर माणसे, बाळंभट, कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी सखोजी अशी तिघेजण पाठविले. त्याजबरोबर महाराजांनी एकोजी राजांस पत्र दिले व त्यात लिहिले की शहाजी राजांच्या जहागिरीचा अर्धा वाटा एकोजी राजे यानी संभाजी (शिवरायांचे बंधू) पुत्र उमाजी यास द्यावयास हवा आणि त्यांना आपल्या भेटीस बोलाविले. शिवाजी महाराजांचा मुक्काम तिरूमल वाडी येथे जुलै १६७७ पासून होता. तिथे एकोजी राजे दोन हजार स्वार घेऊन भेटण्याकरिता आले. मुकामावर आल्यानंतर भेटी जहाल्या. नित्य एकेताटी भोजन एकांती बसोन भाषण वाद जाले, आठवडा झाला. दिनांक २० जुलै ते २७ जुलै तरी खुलासवार बोलणे काहीच न करता मनात कुढत राहिले व छत्रपती शिवाजी महाराज आपणास अटक करतील अशी भीती वाटून एके दिवशी रात्री गुप्तपणे कावेरी नदीत तराफ्यावर चढून पुरांतून पलीकडे तंजावरास निघून गेले. शिवाजी महाराजांस ही बातमी समजतांच वाईट वाटले. एकोजी राजांचे कारभारी शामजी नाईक कान्हेरपंत व शिवाजी शंकर हे महाराजांचे छावणीत होते. त्यांस वस्त्रे भूषणे देऊन रवाना केले व एकोजीरावांस सांगून पाठविले की “तुम्ही व आम्ही वाटे करून घेऊन परस्परे समाधाने राहू.” पण यावर काही उपयोग झाला नाही. मात्र महाराजांचे एक सापत्न बंधू संताजीराजे भोसले हे महाराजांना येऊन मिळाले. महाराजांनी त्यांना हजार स्वाराची सरदारी देऊन फौजेत ठेविले. शिवाजी महाराजांनी दौलतीचा हिस्सा मागितल्यावर एकोजी राजे यांनी प्रत्यक्ष भेटीत न बोलता आपला मनोदय आपल्या माणसांकरवी महाराजांस ऐकविला. वडील असता शिवाजी महाराजांनी बंडपणा पातशहापाशी केला. तमाम मुलूख घेतला, त्यामुळे वडिलांस कित्येक प्रकारे इजा झाली. आम्ही वडिलांजवळ तंत्र देऊन राहिलो,*
*त्यामुळे बादशहाची दौलत रक्षिली गेली. वाटा देणे ही वतनदारी तरी नाहीच. वतन बाब असेल त्याचा वाटा घ्यावा. चाकरीची दौलत सर्व विजापूरचे शहाची, आम्ही शहाचे चाकर. त्यांचे हुकूमाचे मालक, यांत तुमचा संबंध नाही. अशा प्रकारे पत्र लिहिण्यास मदुरा व म्हैसूर नायकांनी व मुसलमान सल्लागारांनी एकोजीराजांस भाग पाडले. एकोजीराजे यांनी जे महाराजांस लिहिले त्याची प्रत विजापूर दरबारास त्याची संमती मिळण्यासाठी पाठविली. विजापूर दरबारने एकोजीस सबुरीचा सल्ला दिला. दरम्यान मुक्काम हालवून महाराजांची स्वारी वलिगुंडपुरमुला आली तिथून त्यांनी रघुनाथ पंतास मदुरेच्या नायकाबरोबर तह करण्यास रवाना केले. त्यांनी ६ लक्ष होनांचा करार करून महाराजांनी आपले सैन्य परत घ्यावे असे ठरले. तद्नंतर महाराजांनी मुक्काम हलवून वलिगड पुराहून तुंदम गुत्तीला (तोरगड) २७ जुलैस आले. तेथे महाराजांस असे समजले की एकोजीराजे मुसलमान लोकांच्या नादी लागून शिवाजी महाराजांशी झगड करावा या हेतूने महाराजांवर सैन्य पाठवीत आहे. हे ऐकताच महाराजांनी जनार्दन पंतास सैन्य देऊन एकोजीच्या सैन्याशी सामना देण्यास पाठविले. दोन्ही सैन्याचा थोर झगडा झाला.एकोजीराजांचे लोक पराजय पावले, कित्येक मारिले गेले, कित्येक पळून गेले. अशा रीतीने वलिगुंड पुरच्या लढाईत एकोजीराजेंच्या सैन्याची दाणादण उडाली. तरी देखील एकोजीराजे सलोख्यास तयार झाले नाहीत हे महाराजांच्या लक्षात आल्यावर महाराजांनी शहाजीराजांची बंगळूर, होसपेट, सिरे वगैरे ठाणी व त्याशेजारची राज्ये जिंकून घेतली. महाराजांचा हा पराक्रम पाहून एकोजीराजांस सुबुद्धी सुचली. त्यांनी शिवाजी महाराजांचे कर्नाटकातील मुख्य कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांच्या मार्फत महाराजांशी बोलणी लाविली. त्यास यश येऊन भावाभावांमध्ये समजुतीचा तह झाला. महाराजांनी एकोजीराजांस त्याचा बहुतेक मुलूख व थोडा अधिकच त्याचेकडे लावून दिला आणि एकोजीराजांबरोबरचे भांडणे मिटविले. महाराजांनी कर्नाटक प्रांत जिंकल्यावर कर्नाटकांतील शहाजीराजांच्या जहागिरीपैकी दोन लाख उत्पन्नाचा प्रदेश भावजयीला चोळी बांगडीसाठी आणि जिंजीप्रातां पैकी सात लाख होनांचे महाल एकोजीराजांस दूधभातासाठी म्हणून लावून दिले. अशारीतीने घरगुतीसंबंध महाराजांनी सांभाळले व मे महिन्यांत (१६७८) उर्वरित कामगिरी सरदारांवर सोपवून ते रायगडी परतले. महाराजांनी एकोजीराजांस धीर देण्यासाठी एक पत्र लिहिले आणि सांगितले की पुरुषार्थ आणि कीर्ती करून दाखविण्याचे हे दिवस आहेत त्याप्रमाणे वागावे. महाराजांच्या कर्नाटक स्वारीत रघुनाथ नारायण हणमंते महाराजांच्या सेवेस बरोबर होते. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांताचा बंदोबस्त रघुनाथ हणमंते यांनी केला. महाराजांनी त्यास दसऱ्याच्या सुमारास (२६ सप्टेंबर १६७७) दक्षिणची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार दिले आणि त्याजवर कर्नाटकातील सर्व व्यवहार सोपवून महाराज इ. स. १६७८ च्या मे-जून मध्ये रायगडास परत आले. दक्षिण दिग्विजयामुळे स्वराज्याची हद्द दक्षिण समुद्राला मिळाली. कुतुबशाही नमली. अपार संपत्ती मिळाली. दक्षिणेकडे हिंदवी सत्तेचे पुनरुज्जीवन झाले. वेलूर आणि जिंजीमुळे स्वराज्य बळकट झाले. मराठ्यांच्या मर्दुमकीला नवे कार्यक्षेत्र मिळाले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ जुलै इ.स.१६८४*
*शहजादा अकबराचे कवी कलश यांना पत्र !*
*"तुम्ही पाठविलेले पत्र मिळाले, त्यात छत्रपती संभाजी महाराज पाचवड (पाचाड) मुक्कामी पोहोचले आणि त्यांची तुमची भेट झाली असा मजकूर आहे. महंमद आझम (शहजादा) यांचा वकिल येथे आला असे समजले. तो कशासाठी येथे आला आणि त्याच्या बरोबर काय बोलणी झाली आहेत हे कळले नाही. तुम्हाला तह करणे योग्य वाटत असेल तर तह करा. पण माझ्याबद्दल म्हणावयाचे तर मी काही तहाला अनुकूल नाही. पण पत्रव्यवहार करण्यास हरकत नाही. तुम्ही इकडे येणे आवश्यक आहे. ते सोईचे होईल. अनेक राजकारणे तडीस जातील. तुम्ही जाणावे की, राजकारणाच्या मसलतीसाठी पावसाळ्याचा मौसम अनुकूल असतो. तहाच्या गोष्टीवर अवलंबून बेखबर (गाफिल) राहू नका. कारण उभय पक्षांत खरा तह असे नाही. पावसाळ्यानंतर भीमगडचे प्रकरण समोर येईल. आपले पुढिल हित कशात आहे. हे तुमचे तुम्हाला चांगले समजेल.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜