ShareChat
click to see wallet page
search
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_जुलै_१६६३ छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील "वेंगुर्ला" हे बंदर ताब्यात घेतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_जुलै_१६९३ #छत्रपती_संभाजीराजांच्या_मृत्यूनंतर_मोघलांकडे_गेलेला_सिंहगड #पुन्हा_स्वराज्यात_सामील📯 २५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले, पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठी रान तुडवत सिंहगड नजीकच्या जंगलात येउन पोहोचले आणि योग्य संधीची वाट पाहत ५ दिवस दबा धरुन बसले. मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले, अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यावर मोगलान्चे गस्त सुरु होती आणि पहरेकरी सावध होते, त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला...🌄 तेंव्हा किल्ल्यवरील गस्तवाले वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले..⚔️ या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले..मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले.⚔️ अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली. मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता. पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.. पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते. नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला, ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते..⚔️ हर हर महादेव च्या गजरात सिंहगड परत एकदा स्वराज्यात सामील झाला. या पराक्रमाची दखल घेत स्वतः राजाराम महाराज यांनी पत्राद्वारे दखल घेऊन नावजी बलकवडे यांच्यावर कौतुकाची थाप दिली👌 सिंहगडाच्या दुसऱ्या सिंहाने गड पुन्हा स्वराज्यात आणला, मराठ्यांची पुन्हा आस्मानी फत्ते झाली🗡️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_जुलै_१९०९ क्रांतिकारी मदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - आज्जाचै ऐतिहासिक दिनविशेष जुलै १६९३ 9 शभूराजांच्या मृत्यूनंतर मोघलांकडे गेलेला सिंहगड स्वुराज्यात् ढाखुल " नावजी लखमाजी बलकवडे" आणि "विढोच्ी कारकेंच्या" पराक्रमाने सिंहगडाने हर हर महादैवृच्या गजरात पुन्हा एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांढला! SC@history of chhatrapati आज्जाचै ऐतिहासिक दिनविशेष जुलै १६९३ 9 शभूराजांच्या मृत्यूनंतर मोघलांकडे गेलेला सिंहगड स्वुराज्यात् ढाखुल " नावजी लखमाजी बलकवडे" आणि "विढोच्ी कारकेंच्या" पराक्रमाने सिंहगडाने हर हर महादैवृच्या गजरात पुन्हा एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांढला! SC@history of chhatrapati - ShareChat