त्या महिलेने मंत्र्यांना सुनावले तर भाजप समर्थक तिला,किंवा ज्यांनी तिला समर्थन दिले त्यांना ट्रोल करत आहे! मुंबईकर आणि नागरिक म्हणून सांगते पण मुंबईत प्रवास करणे मग ते लोकल ट्रेन असो, रिक्षा असो बस असो,टॅक्सी असो प्रचंड मानसिकदृष्ट्या थकवणारे झाले आहे!
बेस्ट बस वेळेत येत नाही,आल्या तर एसी बस मध्ये कधी एसी नसतो..असला तर त्यातून पाणी गळते..काही बस चालक तर स्पोर्ट कार चालवत असल्यागत बस चालवतात.. कधी ट्रॅफिक कधी खड्डे...कधी सहप्रवासी, कधी कंडक्टर,कधी ड्रायव्हर कोणी न कोणी भांडत असतं...ऑफिस संपून घरी जाई पर्यंत डोक्याची वाट लागली असते! लोकल ट्रेन प्रवास म्हटलं तर आता धडकी भरते...आई वडील ट्रेनने प्रवास करतात तेव्हा जीव टांगणीला असतो..कोण धक्का मारेल,कोण भांडेल,गर्दीत पडले तर...आपण एकवेळ स्वतःला सावरू पण ज्येष्ठ नागरिक असले तरी आज लोकल ट्रेन प्रवासात प्रत्येकाचा संयम सुटला आहे..घरचे,ऑफिसचे सगळे टेन्शन, भांडण सगळी तिथे निघतात..या सगळ्यात reel करणारी मूर्ख लोक भेटतात..
मुंबईत ट्रॅफिक होण्याची तर काहीच कारणे उरली नाही..कधी खड्डे,कधी कुणाची गाडी बंद पडली, कधी दोन लोक भांडत आहेत. कधी कुठली मिरवणूक आहे.. लोक इतके हॉर्न मारतात की रिक्षात , टॅक्सीत तुम्ही बसले असाल तर त्या गाडीवाल्याला शिव्या घालायची इच्छा होते...इतकी घाई आहे तर उडून जा बाबा पण हॉर्न मारू नको!
त्यात आजकाल नवीन फॅड आले आहे ..प्रत्येक गोष्टीत फटाके, डिजे वाजवणे... खरं सांगते एका वयानंतर हा जोरात आवाज, नको तिकडे हॉर्न, गर्दी याने घुसमट होते. इतका आवाज, इतकी गर्दी हा गोंगाट सहन होत नाही... यात कुठला धर्म, जात हा प्रश्न पण डोक्यात येत नाही..माणूस म्हणून साधी अपेक्षा असते काम झालं की घरी वेळेत पोहचून शांत बसणे!
पण आसपासची वाहतूक व्यवस्था ,इतरांचे बेशिस्त वागणे सगळे आजकाल overwhelming झालं आहे... घरच्या बाहेर पडल की वाटतं प्रत्येक प्रवास हा फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेतो! त्या महिलेचा संताप सामान्य मुंबईकर खरच समजू शकतो... आजकाल सगळ सहनशक्ती पलीकडे सुरू आहे..तुमची चूक नसताना तुम्ही अनेक गोष्टीची शिक्षा भोगतात... #त्रस्तमुंबईकर
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️राजकारण #😍Marathi Status King #👌प्रेरणादायी स्टेट्स #😏मतलबी दुनिया


