ShareChat
click to see wallet page
search
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_जून_१६६५ "छत्रपती शिवाजी महाराज" आणि "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या बोलनीतून इतिहास प्रसिद्ध "पुरंदरचा तह" झाला. १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ ते १३ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. या तहान्वये महाराजांनी आग्राला भेट देण्याचे तसेच दक्षिणेकडील मुघलांना मदत करण्याचे मान्य केले व २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. १. लोहगड २. तुंग – कठीणगड ३. तिकोना – वितंडगड ४. कोंढाणा – सिंहगड ५. स्वरूपगड – कर्नाळा ६. टंका – माणिकगड ७. किल्ले अत्रा – मृगगड ८. खेडटक्का – खेडदुर्ग – सागरगड ९. मानगड १०. सोनगड ११. किल्ले कुर्ड – कुर्डूचा किल्ला – विश्रामगड १२. मुरंजन – प्रबळगड १३. नरटक्का – सिद्धगड १४. पळसखोल – पळसगड १५. गड माहुली १६. भांडारटक्का – भंडारगड १७. विसागड – विसापूर – संबळगड १८. किल्ले कोह-अज – कोहोजचा किल्ला – रूपगड १९. खडकाला – पुरंदरचा उपदुर्ग २०. पेब – बिकटगड २१. किल्ले येकोला – एकोल्याचा किल्ला – घनगड २२. किल्ले रोहिडा – विचित्रगड २३. किल्ले पुरंदर 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_जून_१६७४ छत्रपति शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर ५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडनला भेटण्याची परवानगी दिली. मुंबईकरांची तहाची बोलणी इ. स. १६७४ मध्ये चालू राहिली. शिवाजीराजांच्या कोकणच्या प्रदेशात व्यापार वाढवणे, राजापूरचे झालेले नुकसान भरून काढणे व नव्या सवलती मिळवणे, पूर्वी झालेल्या तहावर शिवरायांनी शिक्कामोर्तब करून तो कायम केला नव्हता, त्यास कराराचे स्वरूप आणणे, हें इंग्रजांचे उद्दिष्ठ होते. इ. स. १६७४ च्या मार्चमध्ये मुंबईच्या सल्लागार मंडळाने एक ठराव केला, कि पूर्वी शिवाजीराजांबरोबर झालेला तह पुरा करण्यासाठी नारायण शेणवी यास पाठवावे व त्याचेबरोबर मुखत्यार वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडन यास रायगडावर धाडावे. राज्याभिषेक झाल्यावर ऑक्झेंडनने निराजीपंतांच्या पाठीशी लकडा लावला की तहासाठी राजाची संमतीदर्शक सही घ्या. तहाच्या कलामांचे कागद त्याने सतत आपल्याजवळ बाळगले होते. ता. ११ जून रोजी शिवाजीराजे यांनी तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 l
इतिहास छत्रपतींचा - 58 srcN4@history of chhatrapali आजचै ऐतिहासिक दिनविशेष ११ ज्ून १६६७ "छत्रपती शिवाजीराजे" आणि " मिर्झाराजे ज्जयसिंग " यांच्यात इतिहास प्रसिद्ध " पुरंदरचा तह" , तहात २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. 58 srcN4@history of chhatrapali आजचै ऐतिहासिक दिनविशेष ११ ज्ून १६६७ "छत्रपती शिवाजीराजे" आणि " मिर्झाराजे ज्जयसिंग " यांच्यात इतिहास प्रसिद्ध " पुरंदरचा तह" , तहात २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. - ShareChat