pankaj
565 views • 3 months ago
कधीकाळी वाटायचं… अभ्यास केला, नोकरी मिळाली की आयुष्य सेट होईल.
पण आज १५ हजार रुपयांची नोकरी करताना स्वतःलाच विचारतोय – इतकी वर्ष कोणासाठी घालवली?
ज्या स्वप्नांसाठी रात्रभर जागलो, ज्या पुस्तकांसाठी आयुष्याचं तरुणपण दिलं… आज त्या सगळ्याची किंमत महिन्याला १५ हजार?
मनात एकच पश्चाताप आहे…
त्या वेळी थोडा धोका घेतला असता, छोटा व्यवसाय सुरू केला असता, तर कदाचित आज दुसऱ्याच्या ऑर्डरवर नाही तर स्वतःच्या नावावर जगत असतो.
पण आता समजलंय…
वाया गेलेली वर्ष परत येत नाहीत, पण उरलेलं आयुष्य अजूनही आपल्या हातात आहे.
उशीर झाला आहे… पण संपलं नाही.
आज नोकरी करतोय, पण उद्या स्वतःचं काहीतरी उभं करणार.
कारण पश्चातापापेक्षा प्रयत्न मोठा असतो. #🏃🏻माझी भटकंती
13 likes
11 shares