Dr Amol Melage
3K views 4 days ago
#🙏शिवदिनविशेष📜 *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *३ ऑगस्ट इ.स.१३४७* *दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत* *जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ आगस्ट इ.स.१६६४* *(श्रावण वद्य षष्ठी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार बुधवार)* *महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १० गलबतांचा ताफा रवाना !* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराने हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १०, दहा गलबतांचा ताफा रवाना केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ ऑगस्ट इ.स‌१६७७* *छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले.* *इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
33 likes
51 shares

More like this