꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
ShareChat
click to see wallet page
@1097273866
1097273866
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
@1097273866
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩१०फेब्रुवारी १६५९ पोर्तुगीजांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करून मैत्रीचा हात पुढे केला. शिवरायांनच्या वाढत्या प्रभावाचा पोर्तुगीजांनी धसका घेतला आणि शिवाजी राजेशी तह करून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला.* *🚩१० फेब्रुवारी १६७१ सिद्दी कासीमने आणि सिद्दी खैरात यांनी दंडा राजपूरी मराठ्यांकडून जिंकून घेतली. या दिवशी होळी पौर्णिमा होती.* *महाशिवरात्र – प्रताप राव गुजर पुण्यतिथी सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणास धर्मवाट दिली.महाराजांना ही बातमी समजताच.त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले –“बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. भावनेत बाव भरून केल्या वर्तनावर दिखाऊ दिलदारीचा वर्ख लावू नका. सेनापती विवेकशून्य असेल तर तो शेवटी रांगडा शिपाईच ठरतो राव !शिपाईगिरीच्या दांडगाईवर फसव्या मुत्सद्देगिरीचा मुखवटा चढवू नका बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.” तोच सल मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजर जगत होते. अन् एक दिवस उगवला – बळीचा दिवस. (दि.२४ फेब्रुवारी १६७४) या दिवशी महाशिवरात्र होती. प्रताप राव गुजर आपल्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बहलोल खान ४०,००० फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय. काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होणार होता.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - श्जचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६५९ 0 ಶಲಿ शिवरायच्या चढन्या प्रयावाचा पोर्तुगीजांनी एसका घैतला आणि शिवाजीराजांशी तह கனி Ha 57 53 க श्जचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६५९ 0 ಶಲಿ शिवरायच्या चढन्या प्रयावाचा पोर्तुगीजांनी एसका घैतला आणि शिवाजीराजांशी तह கனி Ha 57 53 க - ShareChat
*🚩शिवविचार प्रतिष्ठान १० फेब्रुवारी इ.स.१६६५ सिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडुन जिंकली व या दिवशी होळी पोर्णिमा होती. शिवरायांनी १६९५मध्ये शामरावपंत पेशवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सिद्दीला नामशेष करण्यासाठी मोठी फौज पाठविली मात्र या मोहिमेत मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. १६६१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत* *कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली. १० फेब्रुवारी इ.स.१७६१ पानिपत युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला जातो. पानिपतावर प्रत्यक्षात झालेल्या युध्दानंतर विजयी ठरलेल्या अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला होता ते पहा.. तह करण्यास अहमदशाह अब्दाली आतुर होता. त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्याच्या आत म्हणजेच नानासाहेबांस वकीला मार्फत पोषाख पाठवून दिला होता. सदरचे दिनांक १० फेब्रुवारी सन १७६१ रोजीचे पत्र छायाचित्रात दिले आहे. आता यातूनच लक्षात येते की पानिपतावरील पराभावानंतरही* *मराठ्यांचा उत्तरेत किती प्रभाव होता ते...अनेकदा दिल्ली लुटणारा, बादशहास पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्याने डगमगला हे निश्चितच. सरदारक्या आणि जहागीरी वाचविण्यासाठी बायका - मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठे नाहीत. उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणाक्ष अब्दालीस चांगलेच उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तात्काळ हालचाल केली. १० फेब्रुवारी इ.स.१७७१ हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहण्यासारखा दिवस आहे या दिवशी महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे ) यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला आणि छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले. १० फेब्रुवारी इ.स.१८१८ अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यता यातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - 203 शिवविचर प्रतिष्ठान 203 शिवविचर प्रतिष्ठान - ShareChat
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩९फेब्रुवारी १६५८‌ १६५८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुगं-तिकोना किल्लाजिंकून परत स्वराज्यात आणला.* *🚩९ फेब्रुवारी १६८९ औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर रायगडच्या किल्ल्यावर महाराणी येसूबाई व किल्ल्यावरील मराठे सरदारांच्या सल्ल्याने राजाराम- महाराजांनी मंचकारोहण केले.* *🚩९ फेब्रुवारी १६६५‌ छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे 'बसनूर' छापा घालून लूटले. महाराजांनी बसनूरवरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली. राजाने नौकाप्रवास करून सागर उलंघू नये ही हिंदू धर्मातील खूळचट रूढी उडवून लावली.‌शिवराय किंवा सावरकर काय! दोघेही हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव गाणारे होते, पण धर्मातील खूळचट रूढींना दोघांनिही आपल्या चरित्रात मूळीच थारा दिला नाही.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐनिहासिक दिनविशीष् फेब्रुवारी १६८९ @) छत्रपती संभाजी थहाराजांच्या कैदै्दनर राजारामयहाराजाचे मंचकारोहण ٤٤١٩٢ आजचे ऐनिहासिक दिनविशीष् फेब्रुवारी १६८९ @) छत्रपती संभाजी थहाराजांच्या कैदै्दनर राजारामयहाराजाचे मंचकारोहण ٤٤١٩٢ - ShareChat
*🚩शिवविचार प्रतिष्ठान ९ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदीलशहाचे "बिदनूर" शहरावर छापा टाकला महाराजांनी बिदनूरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली होती. राजांनी नौकानयन करून सागर उल्लंघू नये ही हिंदू धर्माची खुळचट रूढी उधळून लावली. शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मान करत होते पण धर्मातील खुळचट रूढी परंपरांना आपल्या चरीत्रात मुळीच थारा दिला नाही. ९ फेब्रुवारी इ.स.१६७० छत्रपती शिवराय" व "पोर्तुगीज" याच्यात तह झाला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविदार प्रतिष्ठान शिवविदार प्रतिष्ठान - ShareChat
*🚩शिवविचार‌ प्रतिष्ठान ६ फेब्रुवारी इ.स.१६८१ छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर खान जहान बहादुरने दारूगोळा व् सैन्याची बादशहाकडे मागणी केली. किल्ले रामसेज घेण्यासाठी. ६ फेब्रुवारी इ.स.१९३९ सामाजिक भान असलेले भारतातील शेवटचे राजे खरा खुरा लोकराजा लोकपाळ सयाजीराजे गायकवाड यांच्या स्मृतिदिनानीमित्त अभिवादन* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - रिचिविदार प्तिष्ठान रिचिविदार प्तिष्ठान - ShareChat
*🚩शिवविचार प्रतिष्ठान ३ फेब्रुवारी इ.स.१६६१ छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव करून राजगडावरुन कोकणाकडे प्रस्थान केले. ३ फेब्रुवारी इ.स.१६८९ मुघल सरदार मुकर्रबखान कोकणातील संगमेश्वरला पोचला व स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे त्याच्या कैदेत आले.३ फेब्रुवारी इ.स.१८३२ नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणा-या या आद्य क्रांतीवीराला त्रिवार मुजरा."* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - शिवविचार प्रतिष्ठान शिवविचार प्रतिष्ठान - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६६१ 3 छत्रपती शिवाजीराजांनी मुठभर मावळ्यांच्या   सोबतीने कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६६१ 3 छत्रपती शिवाजीराजांनी मुठभर मावळ्यांच्या   सोबतीने कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला - ShareChat
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🚩२ फेब्रुवारी इ.स.१६८२ छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील रामशेज किल्ल्यावर जोरदार हल्ला.मात्र मराठा किल्लेदार रंभाजी पवार यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला.* *२ फेब्रुवारी इ.स.१६५२ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊसाहेब यांचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे* *🚩२ फेब्रुवारी सन १६५२ रोजीचे एक दुर्मिळ पत्र. छत्रपती संभाजी राजे हे शहाजीराजे सोबतच असे. पत्रातून व्यक्तिचा स्वभाव, धोरणं समजण्यास बहुमोल मदत होते. न्यायी स्वभाव हा भोसले घराण्याच्या अनुवंशिकतेनेच येतो असे पत्र वाचल्यावर समजते.न्यायनिवाडा कसा करावा हे या पत्रातून शिकता येते.* *🚩२ फ़ेब्रुवारी इ.स.१६६१ शिवरायांनी उंबरखिंडित कारतलबखानाचा पराभव केला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६६१ 3 छत्रपती शिवाजीराजांनी मुठभर मावळ्यांच्या   सोबतीने कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६६१ 3 छत्रपती शिवाजीराजांनी मुठभर मावळ्यांच्या   सोबतीने कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला - ShareChat
*🚩शिवविचार प्रतिष्ठान २ फेब्रुवारी इ.स.१६६१‌मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे चौल पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहीस्तेखानाच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी छत्रपती शिवरायांनामिळाली कारतलबखान हा उंबरखिंडीतून नागोठण्याला उतरणार होता खानासोबत माहूरची प्रख्यात देशमुखीन "सावित्रीबाई उदारामउर्फ पंडीता रायबागन" ही शूर स्त्री देखील होती महाराज मावळ्यांना घेऊन आधीच उंबर खिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहीले. खान आला पण त्याने शिवरायांचा परत जायचा आदेश धुडकावून लावला मग मराठ्यांनी मुघलांवर हल्ला चढवला मुघलांची भयंकर लंगडतोड चालू झालीत्यांना त्या घोर जंगलात लढताही येईना व पळताही येईना, या अरण्याचे नाव "तुंगारण्य". अखेर खान शरण आला, त्याचा प्रचंड पराभव झाला. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलबखान कसाबसा जीव वाचवून पुण्यात परतला. २ फेब्रुवारी इ.स.१६८२ छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदारांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - RLE प्रतिष्ठान RLE प्रतिष्ठान - ShareChat