▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩२३ फेब्रुवारी १७३९ चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला. चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला. वसईच्या लढाईत विजय प्राप्त करून*
*🚩(२३ मे १७३९)पोर्तुगीजांचे त्या परिसरातील वर्चस्व नष्ट करण्याच्या महापराक्रमामुळे चिमाजींचे नाव लोकमानसात रुजले आहे. या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या भल्याथोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात. मराठी भाषेत वाक्प्रचाराच्या रूपाने ती कायमची विराजमान झालेली आहे! पण याव्यतिरिक्तसुद्धा चिमाजींचे कर्तृत्व किती मोठे होते. थोरले बंधू बाजीराव पेशवे । (पेशवेकाल १७२०-४०) यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजीआप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा निर्देश काही वेळा 'राम-लक्ष्मण' असा केला जातो, यातच काय ते आले. अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते, तसेच चिमाजींबाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंध व सखा होता. बाजीराव चिमाजीआप्पा यांच्या कर्तृत्वाबाबतचे हे मर्म ध्यानी घेतल्याशिवाय त्यांच्या श्रेष्ठत्वाचा पैस समजू शकत नाही. पिता बाळाजी विश्वनाथ यांनी घातलेल्या पायावरून कर्तत्वाचे भलेमोठे उडाण बाजीरावाने घेतले आणि या उड्डाणात त्याच्यासह झेपावलेला उपग्रह म्हणजे चिमाजीआप्पा!स्वराज्याचे संस्थापक आणि मराठयांच्या अस्मितेची प्रेरक शक्ती असणाऱ्या शिवछत्रपतींची पुण्याई आणि छत्रपती शाहमहाराज यांची छत्रछाया अशा दुहेरी आधारशिळेमुळे हे उड्डाण शक्य झाले. नव्या दमाच्या नेतृत्वाची एक बहुजातीय फळी बाजीरावाने उभी केली. मराठयांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा । साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩शिवविचार प्रतिष्ठान २३ फेब्रुवारी इ.स.१६२३*
*२३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस. राजे दत्ताजीराव जाधवराव यांचा मृत्यु*
*२३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला.त्यांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड व उमरद रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,करणखेड,वडाळी व सारवडी या होत....*
*२३ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवुन ती नजराण्याच्या स्वरुपात महाराजांसमोर हजर केली.*
*२३फेब्रुवारी इ.स.१७३९ चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*- ॥ धर्मवीर बलिदान मास ॥*
*श्लोक क्रमांक.६*
🌸आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा सहावा दिवस आजच्या या सहाव्या🌸श्लोकाचा अर्थ :~ज्याप्रमाणे शंभूछत्रपतींनी मोघल , इंग्रज , सिद्दी व पोर्तुगीज यांसारख्या म्लेंच्छशत्रूंना आपल्या पराक्रमाने , शौर्याने जाळून राख केले त्याचप्रमाणे\nआपल्याला जर आज आपल्या आयुष्यातील शत्रूंना तसेच देशाचा नाश करु पाहणाऱ्या पाकिस्तान , चीन ,बांगलादेश यांसारख्या शत्रूंना जर धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयांच्या मनात शिवपुत्र शंभूराजे नावाची\nज्वाला प्रज्वलित करणे गरजेचे आहे , जर आपण हे म्लेंच्छवीष वेळीच उखडून फेकले नाही तर आपला हिंदुस्थान जगी कधीही टिकू शकणार नाही जर आपल्याला हिंदुस्थान टिकवायचा असेल तर केवळ शिवशंभूराजे यांच्या विचारांनीच तो टिकवू शकतो. #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩२१ फेब्रुवारी इ.स१६६० छत्रपती शिवरायांनी अकोला जिंकले.*
*🚩२१ फेब्रुवारी १६६५ (रात्री) कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत शिवराय छापा घालणार असल्याची खबर. इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवराय ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहेत. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान .हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला शिवरायांच्या छाप्याची खबर मिळाली.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*🚩शिवविचार प्रतिष्ठान २१ फेब्रुवारी इ.स.१६६२ इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंटशिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे.".. २१ फेब्रुवारी इ.स.१६६५ कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली. २१ फेब्रुवारी इ.स.१६८७ मोअज्जमला बादशहाने कैद केले.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*॥ धर्मवीर बलिदान मास ॥ श्लोक क्रमांक.३🚩⛳️*
*धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा तिसरा दिवस, आजच्या या तिसऱ्या श्लोकाचा अर्थ :~*
ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसेल , तर ते निर्जीव समजले जाते , त्याच प्रमाणे राष्ट्रात धर्म नसणे हेही निर्जीव पणाचे प्रतिक समजले जाते , हिं भावना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रज्वलित
केली , शंभूराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या खडतर कारकिर्दीत मुघलांसारख्या म्लेंच्छ शत्रूंचा , तसेच सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय शत्रूंचा नायनाट केला आणि शेवटी या शत्रूंशी लढत लढत त्यांनी देव , देश आणि धर्मासाठी आपले बलिदान दिले , त्यांनी आपल्या देहाचा त्यांनी देव , देश धर्मासाठी त्याग केला. आणि शंभूराजे त्यांच्या बलिदानाने भगव्या ध्वजाच्या रुपात आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात वास करत आहेत. #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
*🚩शिवविचार प्रतिष्ठान १५ फेब्रुवारी इ.स.१६६७ "प्रतिशिवाजी" अशी ओळख असलेले "सरसेनापती नेताजी पालकर" यांचं औरंजेबने जबरदस्तीने धर्मांतर केले,आणि त्यांचे "महंमद कुली खान" असे नामांतरण केले. १५ फेब्रुवारी इ.स.१६८४ छत्रपती संभाजीराजेंवर चालून आलेला मुघल शहजादा मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो वैतागून परत निघून गेला. १५ फेब्रुवारी इ.स.१६८९ १ फेब्रुवारी १६८९ रोजी "छत्रपती संभाजीराजे" व "कवी कलश" हे मुघल सरदार "मुकर्रबखान" याच्या कैदेत सापडले होते.आज त्यांना औरंगजेब बादशहापुढे हजर करण्यात आले आणि इथूनच संभाजीराजेंवर अमानुष अत्त्याचार सुरू झाले. १५ फेब्रुवारी इ.स.१७३८ धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधकाम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांनीही दोन वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण रागरंग पहाता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांजकडे सोपविला. त्यांच्या मदतीस खंडोजी माणकर यांचेकडील अडीच हजार माणूस ठेवीला. रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवीले. दिनांक १५ फेब्रुवारी सन १७३८ रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
*छंद नव्हता शिवरायांना रक्ताने होळी खेळण्याचा तर एक ध्यास होता मनात सगळीकडे भगवा फड़कविन्याचा...*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🚩शिवराय
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६३० मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला.*
*🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६५९ छत्रपती शिवरायांसमोर भास्कर गोसावी भिक्षेसाठी हजर .*
*🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६६० राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने*
*🚩१३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.. छत्रपती "शिवाजी महाराज हिंदुसेनाधीपती" म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.*
*🚩१३ फेब्रुवारी इ.स.१६६ शिवरायांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली.*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜










