सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
ShareChat
click to see wallet page
@159107303
159107303
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
@159107303
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष⛳ 📜 १२ मार्च इ.स.१६६४ सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठविले ते असे : "...महाराजांची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते... आज त्याच्या ताब्यात काही नाही तरी आठ नऊ महत्त्वाची बंदरे आली आहेत. या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान दोन तीन गलबते व्यापारानिमित्त बाहेर पडतात...." या व्यापारार्थ बाहेर पडणाय्रा महाराजांच्या गलबतांना पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लूटीची भरपाई करुन घ्यायची होती त्यासाठी टपून बसले होते. महाराजांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते त्यानुसार फेब्रुवारी १६६५ रोजी महाराज मालवण येथील सिंधुदूर्गाहून ८५ लहान गलबते व ३ मोठी गलबते घेऊन बार्सिलोर ( बसनूर ) वर निघाले त्यांच्या बरोबर ४००० सैन्य होते. बसनूर हे शहर महाराजांनी लुटले. या स्वारीचे वर्णन सभासद बखरकार करतो - " शहरांचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजांतून मराठे उतरले, शहर मारिले एक दिवस शहर लुटून फन्ना केले. जैशी सुरत मारुन मालमत्ता आणली त्याप्रमाणे बसनूरची मालमत्ता, अगणित माल, जडजवाहीर, कापड जिन्नस घेऊन देशास आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/ewbFVO7NyyE 📜 १२ मार्च इ.स.१६८५ विजापुरवर हल्ला! सर्जा वगैरे विजापुरी लोक आणि छत्रपती संभाजी महाराजांचे लोक यांनी लष्करापासून ३० (सुमारे ५० कि.मी.) मैल अंतरावर येऊन ठाण मांडले आहे व लढाईचा हेतू आहे. म्हणून शहजाद्याने रात्री हल्ला केला. लढाई झाली. त्याने अनेकांना ठार मारले. मोगल लोक कामास आले. बादशहाने बक्षिसे दिली. विजापुरच्या किल्ल्याला वेढा पडला. रसलपुरच्या बाजूने (पश्चिमेकडून) बहादुरखान, शहापुरच्या बाजूने राहुल्लाखान बक्षी, नागठाण विजापुरपासूनचे ८ मैलांवरील (सुमारे १३, कि. मी. वरिल) ठिकाणी बहादुरखानाचा तळ पडला. लढाईची सर्व सुत्रे शहजादा आज्जमच्या हातात होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७०१ स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराऊसाहेब बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मत केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा हि रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव डाळपात बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील. दिलासा असो देणे." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७०१ स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराबाईंवर बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मात केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा ही रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव डाळपात बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील. दिलासा असो देणे." १२ मार्च १७०१. बादशहा विशाळगडाकडे येतोय हे समजताच ताराराणी व शिवाजीराजे प्रतापगडावर पोहचल्या. या प्रसंगी ताराराणींनी मराठा सरदार प्रतापराव मोरे यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे ज्यावरून त्यांचे लढाईचे धोरण, सरदारांशी वागणूक, शत्रूशी लढण्याचा निर्धार दिसून येतो. त्यातील एक वाक्य असे "औरंगजेब विशाळगडास बिलगला याजकरिता त्याचे कविलावाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावेत, तरीच तो बलकुबल राहतो. याजकरिता तुम्ही लोक आपले अवघे एकदील होऊन औरंगजेबास जडून राहणे. तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७६६ दुसरे संभाजीराजे (करवीर) व त्यांची पत्नी राणी जिजाबाई यांनी बुद्धिपुरस्सर पेशव्यांशी (बाळाजी बाजीराव) सलोख्याचे संबंध ठेवण्याच्या दृष्टीने करवीर सरकारकडून सतत पत्रव्यवहार चालू ठेवला होता. हेतू असा की पेशव्यांनी गुप्तरीत्या केलेल्या कराराचा त्यांना विसर पडू नये. याच संदर्भात छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर (१७४९) जिजाबाईंनी सदाशिवरावभाऊंना लिहिलेल्या पत्रात कराराची आठवण देऊन त्वरा करण्याचे सुचीविले आहे. त्या लिहितात, ‘‘अविलंबे कार्ये दृष्टीस पडावे, लौकिक उत्तम दिसोन, यशास पात्र तुम्ही व्हावे. साहेबी सर्वाविसी येख्तयारी आपणावर टाकावी, ऐसे कित्येक मनोदय साहेबी कल्पून गत वर्षांपासून वेदशास्त्रसंपन्न राजश्री भटजीस लागोपाठ रवाना केले. ऐसे असता साहेबाचे प्रत्ययास गोष्ट दिसू नये. तेव्हा साहेब मध्यस्थ होऊन हुजूर वचन गुंतविले, याचा लौकिक कोणा प्रकारचा होणार? हा अर्थ चित्तात आणून तदनुरूप या उपरी पूर्व संदर्भाच्या (गुप्त कराराच्या) विचारानरूप अंगेजणी करून स्वराज्यकर्तव्यार्थ.’’ जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे. एखाद्या सेवकाने गैरकृत्य केले वा टंगळमंगळ केली आणि कामास नकार दिला, तर त्या त्यास योग्य धडा देत. पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी काही तरी कुरापत काढून सिंधुदुर्ग मे १७६५ रोजी घेतला. करवीर राज्याचा हा किनाऱ्यावरील प्रमुख किल्ला पडल्यानंतर इंग्रजांना पायबंद घलण्यासाठी जिजाबाईंनी आपल्या परीने अथक प्रयत्न केले. कोंकणातील अन्य किल्लेदारांना पत्रे लिहून सावधनतेचा इशारा दिला; तरीसुद्धा यानंतर इंग्रजांनी पुन्हा एक किल्ला यशवंतगडही ताब्यात घेतला. या घटनेबद्दल जिजाबाईंनी सावंतवाडीकरांचा कारभारी जिवाजी विश्राम यास दि. १२ मार्च १७६६ रोजी एक पत्र पाठवून नापसंती व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी ‘कोवळा मोड आहे तो मोडल्याने उत्तम, भारी जाहलेने सर्वाचे वाईट होईल,’ असा इशारा दिला आहे. इंग्रजी सत्ता पुढे वरचढ होईल, याची जाण त्यांना होती; म्हणून त्यांनी हा इशारा त्या वेळी दिला. https://youtu.be/ewbFVO7NyyE 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७७३ समशेर बहाद्दर सरदार खंडेराव बर्गे यांनी १२ मार्च १७७३ रोजी राजधानी रायगड किल्ला जिंकून स्वराज्यात आणला .छत्रपती महाराज यांनी ही जबाबदारी जुने विश्वासू, लढवय्ये सरदार म्हणून खंडेराव यांचे वर सोपवली होती . त्या बद्दल सातारा चे छत्रपती महाराज यांनी समशेर बहाद्दर हा खिताब दिला तसेच इनाम वतन त्यांना दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१७९५ दुसऱ्या दिवशी दि. १२ मार्च १७९५ रोजी मराठी फौजांनी खाला वेढा घातला आणि किल्ल्यावर तोफांचा जबरदस्त मारा सुरू केला. मराठ्यांच्या या भयंकर हल्ल्यामुळे मुळातच भेदरलेल्या निजामाने पेशव्यांकडे तहाची बोलणी करण्यासाठी विनंती केली. वास्तविक पाहता, निजामाच्या आतापर्यंतच्या सर्व कृत्यांना लक्षात घेता त्याला जिवंत ठेवू नये, असेच सर्वांचे मत होते. परंतु नानांनी दूरदर्शीपणा दाखवून त्याला जीवदान देण्याचे ठरवले. मागे जशी इंग्रजांविरुद्ध एकी घडवून आणण्यात निजामाने सहकार्य केले होते, तशीच वेळ पुन्हा आली तर असा विचार यामागे होता. शेवटी निजामाचा दिवाण गुलाम सय्यद याला ताब्यात देण्याची अट घालून नाना फडणवीसांनी तहाकरता मंजुरी दिली. एकूण तह ठरला तो असा- १) मैनुद्दौला गुलाम सय्यद हा पेशव्यांच्या बंदोबस्तात राहील. २) यापूर्वीचे चौथ व सरदेशमुखीचे तीन कोट रु. आणि या मसलतीची भरपाई म्हणून दोन कोट असे एकूण पाच कोट रु. रक्कम तीन वर्षांत सरकारात भरणा करावी. ३) तीस लक्षांचा मुलुख व दौलताबादेचा किल्ला सरकारात द्यावा. ४) नागपूरकर भोसल्यांचे जे महाल व ऐवज घेतला असेल तो परत करावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १२ मार्च इ.स.१८३३ वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य यांचा जन्म मोलमपल्लीचा जमीनदार बाबूराव सेडमाके (शेडमाके) यांचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावात १२ मार्च १८३३ रोजी झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🗿शिवकालीन पुराणवस्तू - IILMIUI( {ೆ EsePEAT MARATHA WAFTOR SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | शिवदिनविशेष मार्च इ.स. १६६४ 82 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुरतकरांनी इंग्रजांना पत्र पाठवले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors IILMIUI( {ೆ EsePEAT MARATHA WAFTOR SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil | शिवदिनविशेष मार्च इ.स. १६६४ 82 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुरतकरांनी इंग्रजांना पत्र पाठवले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat marathauarriors - ShareChat
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - ShareChat
00:25
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 ११ मार्च इ.स.१६७७ दक्षिणदिग्विजय मोहिम दि. ११ मार्च १६७७ रोजी, राजे हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी, वेलोर, यमन गोंडा, आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले. कुतुबशहाने १ हजार घोडदळ, ४ हजार पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/toB9kcah57Q 📜 ११ मार्च इ.स.१६७९ (चैत्र शुद्ध दशमी, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार,) आनंदरावांनी कोप्पल पाठोपाठ विजापुरकरांकडून दोड्डा बाळापुर जिंकले. किल्ले पन्हाळा प्रांतापासून जिंजीपर्यंत सलग भुमी स्वराज्यात दाखल करण्याच्या उद्देशाने सतत मोहीमा आखण्यात आल्या होत्या. कुठे हंबीरराव, कुठे मोरोपंत, कुठे आनंदराव यांनी स्वराज्य हेच स्वकार्य मानून यज्ञ आरंभला होता. कोप्पल पाठोपाठ आनंदरावांनी विजापुरकरांकडून दोड्डा बाळापुर जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ मार्च इ.स.१६८९ (फाल्गुन वद्य अमावस्या शके १६१० सवंस्तर विभव वार सोमवार) #छत्रपती_संभाजी_महाराज_बलिदानदिन... औरंगजेबाची अखेरंची सजा, "छत्रपती संभाजीराज्यांचं मस्तक कलम करा". आणि छत्रपति संभाजीराज्यांचं मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि ""गुढीपाडव्याच् या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजीराज्यांच्या मस्तकाची गुढी उभारंली". निघाली वाजत...गाजत! आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी - भीमेच्या" पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी - भीमा"" अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं" पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळंलेलं "छत्रपती संभाजीराज्यांचं" ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा" छत्रपती संभाजीराज्यांच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी - भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय! खरा "सर्जा संभाजीराजा" अजून कळंलाच नाही. "छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं... कसं जगावं !!! आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवंल... कसं मरावं !!!... ती "इंद्रायणी - भीमा" आजही सांगतेय........ या स्वराज्याच्या धाकल धन्यास त्रिवार मानाचा मुजरा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ मार्च इ.स.१८१८ कोरीगड किल्ला इंग्रजांकडे ११ मार्च इ.स. १८१८ रोजी इंग्रज कर्नल प्राथरने लूट करण्याच्या उद्देशाने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ११ मार्च इ.स.१९२४ क्रांतिकारक हुतात्मा हेमू कलाणी जन्मदिन जन्म : ११ मार्च १९२४ (मृत्यू : २१ जानेवारी १९४५) हेमू कलाणी यांचा जन्म ११ मार्च १९२४ रोजी कलानी कुटुंबात सक्कर येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षण टिळक हायस्कूलमधून घेतले. तिथेच त्यांनी राष्ट्रप्रेमाची दीक्षा घेतली. डॉ. मेघाराम कलानी यांनी कराची येथे स्वराज्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेमार्फत तरुणांनी स्वराज्य सेना सक्करमध्ये उभारली. या संघटनेचे नेतृत्व हेमू कलाणींकडे होते. आपल्या शाळेतील मित्रांना एकत्र करून हिंदूस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची शपथ घेतली. २३ ऑक्टोबर १९४२ रोजी लष्करी सैन्य घेऊन रेल्वेगाडी उडविण्याची योजना केली. योजनेप्रमाणे हेमू व त्यांच्या मित्रांनी रेल्वे रुळाच्या फिश प्लेट्स काढण्याच्या कामास सुरुवात केली. एवढ्यात संरक्षण पथकाचे शिपाई तेथे आले. हेमू कलाणींनी सर्व सहकार्‍यांना पळण्यास सांगितले. कोणीही पळण्यास तयार नव्हते. तरी हेमू कलाणींनी त्यांना दरडावून पळवून लावले. पण हेमू एकटेच शिपायांच्या हाती सापडले. लष्करी कोर्टापुढे त्यांना आणण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ करूनही त्यांनी आपल्या सहकार्‍यांची नावे सांगितली नाहीत. हेमू कलाणींनी कोर्टाच्या कामात सहभागी होण्याचे नाकारले. बचावासाठी वकीलही दिला नाही. त्यांनी लष्करी कोर्टाला एकच उत्तर दिले, "गुलामी आणि दडपशाही यांचा प्रतिकार करण्याचा मला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी मी जे काही केले त्याचा मला खेद वाटत नाही. लष्कराची सैनिक गाडी पाडण्यात मला अपयश आल्याने दुःख होत आहे." https://youtu.be/toB9kcah57Q लष्करी कोर्टाने हेमू कलाणींना आजन्म कारावासाची शिक्षा फर्मावली. पण लष्करी कमांडर लॉर्ड रिचर्डसन याने ती बदलून हेमू कलाणींना फाशी देण्याचे फर्मान काढले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - I (IVIII  -00~ TD GREATMARATHA WARRIORS SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिव वशण मार्च इ॰स. १६८९ 99 शिवपुत्र "छत्रपति संभाजी महाराजांची व कवि कलश" यांची वढु - तूळापूर संगमावर औरंगजेब कडून अमानुष हत्या करण्यात आली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors I (IVIII  -00~ TD GREATMARATHA WARRIORS SHVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिव वशण मार्च इ॰स. १६८९ 99 शिवपुत्र "छत्रपति संभाजी महाराजांची व कवि कलश" यांची वढु - तूळापूर संगमावर औरंगजेब कडून अमानुष हत्या करण्यात आली. the_great_maratha_warriors the great marathawarriors the great marathawarriors - ShareChat
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
🗿शिवकालीन पुराणवस्तू - ShareChat
00:15
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 १० मार्च इ.स.१६४९ (चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५७१, संवत्सर विरोधी, वार शनिवार) स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे यांना झोपेत बेसावध असताना अटक! एकेकाळी निजामशाही स्वतःच्या खांद्यावर पेलून मोगलांना खडे चारणार्‍या राजे शहाजीराजे यांच्यावर अटकेची वेळ यावी हे दुर्दैवी होते. दिलावरखान, बेहलोलखान, अंबरखान, याकुतखान, खैरातखान, मसुदखान, आजमखान या खानावळीसोबतच बाळाजी हैबतराव, सिधोजी पवार, मंबाजी पवार, मंबाजी भोसले, मालोजी पवार, तुळोजी भोसले, बाजी घोरपडे, खंडोजी, मानाजी आणि अंबाजी घोरपडे बंधू यांनी मुस्तफाखानाच्या आज्ञेवरून एका बेसावध क्षणी, झोपेत राजे शहाजीराजे यांना अटक केली. या सर्व घटनेत बाजी घोरपडे याने पुढाकार घेतला होता. त्यानेच महाराजांना बेड्या ठोकल्या. तो दिवस होता. २५ जुलै इ.स.१६४८ जिंजीनजीक राजे शहाजीराजे यांना अटक झाली. सुमारे ६ महिने राजे शहाजीराजे अटकेत होते. पुढे अफजलखानाने बंदोबस्तात राजे शहाजीराजे यांना विजापुर दरबारात पेश करायची जबाबदारी घेतली. यावरून राजे शहाजीराजे यांचे महत्वही लक्षात येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/ZSu1RkHXqY0 📜 १० मार्च इ.स.१६५९ (फाल्गुन वद्य त्रयोदशी, शके १५८०, संवत्सर विकारी नाम, वार गुरुवार) महाराजांनी सिवापट्टण गाव वसविले! महाराज किल्ले राजगडावरून सिवापट्टण येथे आल्याची नोंद आहे. याच दिवशी हे गाव वसविण्याचे कार्य पूर्ण झाले.‌ तसेच वर्षे प्रतिपदा येथेच साजरी करण्याचे महाराजांनी ठरविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१६७७ ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटोपून छत्रपती शिवाजी महाराजांचे दक्षिण दिग्विजयसाठी दक्षिणेकडे प्रस्थान. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१६७९ मुंबईकर इंग्रजांचे सुरतेला पत्र दिलेर ने दिलेरपणे छत्रपती संभाजीराजांचे स्वागत करताना एक हत्ती, तीन घोडे, पोशाख, तलवार, चौघडा हा नजराना दिला. शिवाय छत्रपती संभाजीराजांना ७००० स्वार आणि ७००० जातीच्या मनसबीचे आलमगीर बादशहाचे फर्मान हाती दिले. छत्रपती संभाजीराजे दिलेरच्या छावनित आल्याने दिलेरला निम्मा दक्षिण देश फत्ते केल्याचा आनंद झाला होता. छत्रपती संभाजीराजांच्या दिलेरखानाला जावून मिळन्याच्या या नवीन आणि अनपेक्षित खेळीने सिद्धिमसूद आणि दिलेरची ८० हजार फौज जी चालून येण्यास तयारच होती, त्या प्रयत्नांच खिळ बसली गेली. याचे वर्णन प्रत्यक्ष इंग्रजांनी करून ठेवले हे बरे. मुंबईहुन सुरतला गेलेले हे पत्र असे होते. " शहजादा दक्षिणेस येवून २ महीने झाले आणि छत्रपती शिवाजींचा मुलगा छत्रपती संभाजी दिलेरखानाकडे पळून गेला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यामध्ये ठाणे धरून बसलेले असून मोगल अन आदिलशहा या दोघांनाही ते मोजीत नाहीत. किंवा यापैकी कोणीही त्यांच्यावर चालून जात नाही." या पत्राची तारीख आहे १० मार्च १६७९. आता आपणच विचार करा हे कसे घडले. छत्रपती संभाजीराजे १३ डिसेंबरला दिलेरच्या छावनित गेले. तेव्हा पासून म्हणजे १० मार्च हे पत्र लिहालेले गेले. तोवर सगळे स्तब्ध कसे. ना विजापरकरांनी स्वराज्यावर हमला केला ना दिलेरने स्वराज्याविरोधात मोहिम उघडली या दोन्ही शत्रूंना जागच्या जागी खिळवुन ठेवण्याचे यशस्वी राजकारण कोणी केले! याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजीराजे अन छत्रपती संभाजीराजांच्या या अभूतपूर्व खेळीने. छत्रपती संभाजीराजे विशिष्ट उद्देशाने दिलेरला मिळाले असावेत यावर परमानंद यानेही चांगला प्रकाश टाकला आहे. छत्रपती संभाजी राजांनी दिलेरला बहुत किल्ले व बाकीचा मुलुख हस्तगत करून देतो अशी आश्वासने देऊन चांगलेच प्रेरित केले आणि आश्चर्य म्हणजे दिलेरनेही लगेच विश्वास ठेवून विजापुरकरांच्या दिशेने आपला मोर्चा वळवीला. पहा याला म्हणतात की नाही खरा गनिमिकावा?? कालपर्यंत स्वराज्यावर एकत्र चालून जाणारे दोन मित्र छत्रपती संभाजी राजांच्या या वचनामुळे एकमेकांविरुद्ध लढायला तयार झाले. अन हो अजुन एक छत्रपती शिवाजीमहाराजांनी हंबीरमामांना आदेश दिला पाठलाग करा अन पाहा, "छत्रपती संभाजीस वाटेतच पकडून इकडे आणावा. बहुत दौडिने फौजेने पाठलाग करवा." आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाटक पहा कसे बेमालुम. छत्रपती संभाजीराजांच्या जवळ फक्त ३०० स्वार आणि पाठलाग करणार्‍या हंबीरमामा यांच्या जवळ २५००० फौज. हंबीररावांनी महाराजांच्या आदेशाप्रमाने अत्यंत वेगाने पाठलाग केला दरम्यान छत्रपती संभाजी राजांनी वाटेत दोन दिवस मुक्काम केला तरी तरी मोहिते त्यांना पकडू शकले नाही ??? खरोखरच हंबीरराव मोहित्यांनी जर कसूर केली असती तर महाराजांनी त्यांनी कान उघडनी नसती केली का???? बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मोहित्यांनी वर्षभर दरम्यान कोणतीच मोहिम हातात घेतली नाही का?? म्हणजे फक्त छत्रपती संभाजीराजांचा नुसता पाठलाग करत होते का?? अहो खुळे आहोत आपण सगळे, राजे होते ते छत्रपती शिवाजीराजे. पाठलाग करण्याच्या बहान्याने ते छत्रपती संभाजीराजानां बाहेरून संरक्षण पुरवत होते जेव्हा छत्रपती शिवाजीराजांचा आदेश आला अन कामगिरी फत्ते झाली की छत्रपती संभाजीराजांना सुखरूप स्वराज्यात आनने. मला वाटते हे वाचल्यावर तुमच्या डोक्यातले बरेच प्रश्न कायमचे मेले असतील. अहो आम्हाला आमचा इतिहास कधी कळला नाही तेथे छत्रपती शिवाजीराजे अन छत्रपती संभाजीराजे काय डांबले कळणार ? 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१६७९ छत्रपती शिवरायांचे सरदार "थोरले आनंदराव" यांनी विजापूरच्या आदीलशहाकडून "बाळापूर" जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१६८८ (फाल्गुन वद्य तृतीया, शके १६०९, प्रभव संवत्सर, शनिवार) केसो त्रिमल यांचे सरदार सुंदर सुभेदार गड सोडून पळाले आजच्या दिवशी म्हणजे १० मार्च १६८८ रोजी केसो त्रिमल यांचे एक सरदार सुंदर बालाजी सुभेदार कोनिमेरला तैनात होते. त्यास आवश्यक ती कुमक वेळेवर मिळाली नाही. त्यातच मराखान हा मोठी मोगल सेना घेऊन आपल्यावर चाल करून येईल या भीतीने सुंदर बालाजी गड सोडून पळाले. https://youtu.be/ZSu1RkHXqY0 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१७३७ १० मार्च १७३७ मध्ये, उत्तरेत मोहीम करत असताना, शिंदे-होळकर यांच्या फौजेचा, मोगल सरदार सादतखान यांच्यासोबत आग्र्याजवळ सामना झाला. अचानक घडलेल्या या चकमकीमध्ये, नुकसान टाळण्यासाठी मराठा फौजेने माघार घेतली. खरे तर यामध्ये सादतखानाच्या शौर्यापेक्षा, मराठ्यांचा बचावात्मक पवित्राच जास्त होता पण सादतखानाने मोगली सवयीनुसार "आपण मराठ्यांना हरवले" अश्या आशयाचे पत्र लिहिले आणि सर्वजण "फते मुबारकचा जश्न मनवण्यात मग्न झाले." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१७३९ मानाजी आंग्रेंनी द्रोणागिरी उर्फ उरणचा किल्ला जिंकला उरण शहर हे स्थापन झाल्यापासुन चंद्रगुप्त मौर्य व समुद्रगुप्त मौर्य यांची दिर्घकाल राजवट. देवगिरिचे यादव, पोर्तुगीज, आदिलशाह, इंग्रज व १० मार्च १७३९ ला मानजी आंग्रे यांनी उरणचा कोट, द्रोणागिरी किल्ला व उरणचा परिसर जिंकून घेतला. उरण शहर वसन्यापूर्वी येथे जंगल होते. हे जंगल केगाव, नागांव, द्रोणगिरी, करंजा ते जासई, खोपटे खाडी पर्यंत पसरलेले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १० मार्च इ.स.१८९७ सावित्री, क्रांतिज्योति, सावित्रीबाई फ़ुले यांची पुण्यतिथी आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करता आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाट आहे. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारणेचे काम करण्यात आयुष्य खर्ची केले. ज्या काळात स्त्रीला चूल व मुल या बंधनात अडकवून ठेवले होते, त्या काळात जात, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्तीचा व स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. १ मे, १८४७ साली त्यांनी दलितवस्तीत शाळा चालू केली व सगुणाऊला शाळा चालवण्यास नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - iIt VIITLII  +-- 0 R FHAWARRIORS FEEEREA SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष १० मार्च इ.स. १६४९ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांना मुस्तफाखानाच्या आज्ञेवरून एका बेसावध क्षणी झोपेत 3য়নানা 3কে কলী the qreat maratha worriors the qreat maratha warriors the great marathawarriors iIt VIITLII  +-- 0 R FHAWARRIORS FEEEREA SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil शिवदिनविशेष १० मार्च इ.स. १६४९ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांना मुस्तफाखानाच्या आज्ञेवरून एका बेसावध क्षणी झोपेत 3য়নানা 3কে কলী the qreat maratha worriors the qreat maratha warriors the great marathawarriors - ShareChat
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय
🗿शिवकालीन पुराणवस्तू - ShareChat
00:22
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 ९ मार्च इ.स.१६६० ( चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, शुक्रवार ) आपलेच स्वराज्यद्रोही :- महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना स्वराज्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मायमूलखातले कपाळकरंटे वळवळू लागले. केदार खोपडे, गोंदाजी पासलकर यांनी वतन मिळाले तर मदत करू आशा पत्रांना उत्तर देणारी फर्मान आदिलशहाकडून मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/dxumuI7fzw4 📜 ९ मार्च इ.स. १६६८ (चैत्र शुध्द सप्तमी शके १५९० संवत्सर किलक,सोमवार) औरंगजेबाकडून शिवरायांना 'राजा' हा किताब. मोगलांच्या पंचहजारी मनसबदारीवर औरंगजेबाकडून मान्यता घेऊन संभाजी महाराज राजगडावर परतले होते. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन राजे आग्य्राहून निसटले होते. सगळीकडी ही बातमी पसरल्यामुळे औरंगजेबाचे हसू झाले होते. त्यामुळे किमान पुरंदर तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी तो आग्रही होता. ज्या वेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी पुरंदरचा तह केला त्या वेळी त्यांनी औरंगजेबाला, 'राजा' हा किताब शिवरायांना घ्यावा अशी गळ घातली होती. जी औरंगजेबने सपशेल फेटाळून लावली होती. मात्र आता संधिसाधू औरंगजेबाने काळाची पावले ओळखून, छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे मुअज्जम याच्या मध्यस्थीने याच दिवशी शिवरायांना 'राजा' हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ मार्च इ.स.१६६८ (चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५९०, संवत्सर किलक, सोमवार) छत्रपती संभाजी महाराज नव्याने मोगली मनसबदार मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी संभाजीमहाराज राजगडावरुन निघाले. २७ ऑक्टोबर १६६७ ला ते औरंगाबादेला पोहचले. तेथे त्यांची व जसवंतसिंहाची भेट झाली. मोगली मनसबदारीबद्दल विचारविनिमय झाला आणि ४ नोव्हेंबर १६६७ रोजी शहजादा मुअज्जमकडून संभाजीराजांनी मनसब स्वीकारली. या मनसबीबद्दल त्यांना वऱ्हाडात जहांगिरी देण्यात आली, एक दागिन्यांनी मढवलेला हत्ती, रत्नजडित तलवार, पोषाख या गोष्टी भेट म्हणून देण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर संभाजीराजांना राजगडाला परत जाण्याची परवानगी देण्यात आली. राजे सफाईने वागत होते याचवेळी संभाजीराजांच्याबरोबर निराजी रावजी व प्रतापराव गुजरदेखील होते. त्यांच्या वतीने निराजी व प्रतापराव कारभार पाहतील असे ठरविण्यात आले होते. त्यामुळे पुढे जसवंतसिंहाच्या एका सैन्य तुकडीबरोबर संभाजीराजांची रवानगी राजगडी करण्यात आली व बादशहाकडे मनसब पक्की होण्याचे फर्मान पाठविण्यात आले.आजच्याच दिवशी म्हणजे ९ मार्च १६६८ रोजी संभाजीराजांच्या नव्या मनसबीवर शाही फर्मानाने शिक्कामोर्तब झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ मार्च इ.स.१६८९ (फाल्गुन वद्य त्रयोदशी, शके १६१०, संवत्सर विभव, शनिवार) संभाजीमहाराजांना पकडल्याची हरजीराजांना बातमी! मराठ्यांच्या धामधुमीत महाराष्ट्रात हाहा:कार उडालेला असताना तिकडे कर्नाटकात संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी नव्हती. उलट हरजीराजे महाडीक यांनी कर्नाटकात संभाजीमहाराजांच्या सल्ल्यानुसार १६८९ सालापासून फ्रेंच व डचांशी चांगले संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती! हरजीराजे महाडीक हे फ्रेंच व डचांवर चांगले वजन ठेवून वागत होते. मात्र युरोपात त्याच सुमारास डच व फ्रेंचांचे लिग ऑफ औरंगाबादचे युद्ध सुरु होण्यास फ्रेंचांविरुद्ध मदत मागण्यासाठी डचांनी आता हरजीराजांशी बोलणी सुरूकेली होती. मात्र याच सुमारास वज्राघात झाला, याच सुमास आजच्याच दिवशी म्हणजे ९ मार्च १६८९ रोजी महाराष्ट्रात संभाजीमहाराजांना मोगलांनी अटककेल्याची बातमी आली. या बातमीने हरजीराजे महाडीक मानसिकदृष्ट्या फार खचले! जीवनावरची त्यांची आसक्ती उडाली. कारण संभाजीमहाराजांचा फार मोठा आधार त्यांना होता. केवळ कर्तव्यभावनेने म्हणूनच ते स्वराज्यांची सेवा करीत होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/dxumuI7fzw4 📜 ९ मार्च इ.स.१७३१ १७३१ साली मराठ्यांनी फिरंग्यांना(पोर्तुगीज) उत्तर फिरंगाणत(वसई प्रांत) हल्ले करून जेरीस आणले होते. मराठ्यांच्या उत्पातामुळे पोर्तुगीज पुरते वैतागले होते. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी काय योजना केल्या आहेत त्याबद्दल ९ मार्च १७३१ रोजी उत्तर फिरंगाणच्या अधिकाऱ्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयला पत्र लिहिले. तो पत्रात लिहितो, 'मराठ्यांनी आपल्या मुलखातून पुरता पाय काढलेला नसला तरी त्यांची चढाई थांबली आहे. उलटपक्षी आम्ही मात्र त्यांच्या मुलुखात जाळपोळ करण्याचा क्रम चालू ठेवला आहे. लढाईच्या दंग्यामुळे मराठ्यांच्या व्यापारउदिमाला मोठाच धक्का बसून त्यांची नुकसानी झाली आहे. बहुधा ते आता तहास यावेत आम्ही त्यांची शेकडो बायकापोरे पकडली आहेत. त्यांना आम्ही लवकरच बाटविणार आहोत. तेही त्यांना(मराठ्यांना) मोठे भयच आहे. इंग्रज आपल्याशी(पोर्तुगीज) मिळून आहेत. साष्टीच्या वेळी त्यांच्याच मदतीमुळे निभाव लागला. पुढेही ते मदत खचित करतील. पेशव्यांचे मोगलांशी वैमनस्य आहे. पण मोगल मराठ्यांसारखा विश्वासघातकी आहे. कदाचित तो पेश्व्यासही सामील व्हावयाचा. आंग्र्याशी आपला बिघाड आहे. शिद्दीही बिघडला आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ मार्च इ.स.१७४७ नानासाहेब पेशवे इकडे मोहिमांमध्ये गुंतले असताना सातारा दरबारातील पेशव्यांचे प्रतिनिधी बाबूजी नाईक बारामतीकर, नागपूरचे रघूजी भोसले, श्रीपतराव प्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, यमाजी शिवदेव दाभाडे, गायकवाड इ. मंडळींनी शाहूमहाराजांच्या कानाशी एकच कुजबूज सुरू केली आणि शाहूराजांचे नानासाहेबांविरोधात कान फुकले. म्हणून या कटकटीला वैतागून दि. ९ मार्च १७४७ रोजी 'शिक्के कट्यार व जरी पटका हुजुरे पाठवून जामदारखान्यात दाखल करविले' आणि नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर केले. बाजीरावांच्या काळात दौलतीला झालेले प्रचंड कर्ज नानासाहेब फेडू शकणार नाहीत ही शंका आसपासच्या मंडळींनी शाहूमहाराजांच्या मनात निर्माण केल्याने त्यांना ते खरे वाटून नानासाहेबांना पदच्युत केले. आता नानासाहेब एकतर पुन्हा पेशवेपद मिळवण्यासाठी झोळी पसरतील अथवा शाहूमहाराजांविरुद्ध बंड करतील असे दरबारातील प्रतिस्पर्धांचे डावपेच होते. परंतु, नानासाहेबही राजकारणात मुरलेले होते. त्यांना विनातक्रार पेशवेपद सोडून उलट, "सर्वस्वी अपराधी अपत्य आहे. पायाशी कोणती सेवा (घडावी ते) सांगणे, (परंतु) आज्ञा होऊन (या) पायांचा वियोग न व्हावा..." अशी अर्जदास्त नानासाहेबांनी शाहूमहाराजांकडे केली. शिवाय पेशवेपदाच्या (नानासाहेबांच्या!) तोलामोलाचा एकही मनुष्य न दिसल्याने दि. १३ एप्रिल रोजी शाहूमहाराजांनी नानासाहेबांनाच पुन्हा पेशवेपदाची वस्त्रे दिली. यानंतर नानासाहेब लगेच कोकणात पुन्हा जम बसवू पाहणाऱ्या पोर्तुगीजांवर चालून गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ९ मार्च इ.स.१७४९ ( चैत्र शुद्ध द्वितीया शके १६७१, शुक्लनाम संवत्सरात गुरुवार) दि. ९ मार्च १७४९ या दिवशी नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव यांची मुंज करण्यात आली. विश्वासरावांच्या मुंजीनंतर लगेचच नानासाहेबांचे सावत्र बंधू, मस्तानी आणि श्रीमंत बाजीरावपुत्र समशेरबहाद्दर यांचे लग्न पेठ संस्थानचे संस्थानिक लक्षधीर दलपतराय पवार यांची मुलगी लालकुंवर हिच्याशी करण्यात आले. (एप्रिल १७४९). 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू
🚩शिवराय - u |ill ' 'RAIMOr  ~ TIHE GREAT MARAYA IVARRIORS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil मार्च इ॰स. १६६८ छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने राजा ही पदवी सन्मानाने बहाल केली. the_great_marathawarriors the great marathawarriors the qreat marathauarriors u |ill ' 'RAIMOr  ~ TIHE GREAT MARAYA IVARRIORS SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil मार्च इ॰स. १६६८ छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने राजा ही पदवी सन्मानाने बहाल केली. the_great_marathawarriors the great marathawarriors the qreat marathauarriors - ShareChat
#🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
🗿शिवकालीन पुराणवस्तू - ShareChat
00:15
💐👑🔥❤️🎆🎊🎇🥳 #भारत #भारत जिंकला #जय भारत #मेरा भारत #भारत सेमिफाइनलमध्ये
भारत - ICC टी२० वर्ल्डकप २०२६ मधील विजयाबद्दल टीम इंडियाचे मनःपूर्वक अभिनंदन 191ಗ DIA MENISI4 M ICC टी२० वर्ल्डकप २०२६ मधील विजयाबद्दल टीम इंडियाचे मनःपूर्वक अभिनंदन 191ಗ DIA MENISI4 M - ShareChat
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ 📜 ८ मार्च इ.स.१६७० ( फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, मंगळवार ) किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल :- आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर सुमारे तीन वर्षे महाराजांनी कोणतीही हालचाल केली नाही. मात्र १६७० नंतर तहात गेलेले सर्व किल्ले परत घेण्याचा निश्चय केला व सिंहगडापाठोपाठ आजच्या दिवशी पुरंदर स्वराज्यात दाखल झाला. किल्ले पुरंदर पुन्हा जिंकला तो निळोपंत काकांनी! व्हय पासष्टी-सत्तरीच्या घरात पण मावळी मनगट अजूनही पोलादी असलेलं. ह्या वयातही काकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमावर महाराज बेहद्द खुश झाले! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/aTXiwGaM8mQ 📜 ८ मार्च इ.स.१६७३ नरवीर कोंडाजी फर्जंद...🚩 इ.स ८ मार्च १६७३ रोजी रायगड येथे कोंडाजींनी पन्हाळा फत्ते केल्याची बातमी जासुदामार्फत कळाली कोंडाजींच्या शूरत्वाची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर दाखल झाले कोंडाजींची पन्हाळगडावरील तीन दरवाजा नजीक असलेल्या तुपाच्या विहिरी जवळ त्यांनी गळाभेट घेतली छत्रपतींनी कोंडाजींचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोंडाजींनी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांना मोलाची साथ दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१६८९ मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी छत्रपती राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१६९४ औरंगजेबने शहाजादा मुअज्जमचा मुलगा शहाजादा मुइजुद्दीन याला नोव्हेंबर, १६९२ त पन्हाळगडाविरुद्ध रवाना केले. शहाजादा मुइजुद्दीन याने पन्हाळ्याला वेढा घातला. पण किल्ला जिंकून घेण्याचे त्याला जमेना. ऑक्टोबर १६९३ मध्ये रामचंद्रपंत, शंकराजी आणि धनाजी जाधव हे पन्हाळगडाला मदत करण्यासाठी चालून आले. २० ऑक्टोबरपासून चकमकी सुरू होऊन त्या काही दिवस चालू राहिल्या. मराठ्यांनी किल्ल्यात रसद आणि कुमक पोहचविली. याच वर्षी बारामतीचा, मोगलांतर्फे असलेला ठाणेदार हणमंतराव निंबाळकर हे मराठ्यांना येऊन मिळाले. इ. स. १७०४ मध्ये याचा मृत्यू होईपर्यंत याने मोगलांस सळो की पळो करून सोडले. इ. स. १६९४ त पन्हाळगडचा वेढा मोगलांकडून चालूच होता. औरंगजेबाने ७ मार्च १६९४ रोजी पन्हाळ्याकरिता मोगलांना आणखी ६ हजार सैन्याची कुमक पाठविली. पण ती पोचण्यापूर्वीच शहाजादा मुइजुद्दीन हा पन्हाळा सोडून ८ मार्च १६९४ रोजी निघाला होता. हे समजल्याबरोबर औरंगजेबाने शहाजादा अज्जमचा मुलगा बेदारबख्त, यास पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी पाठविले. तरीही मोगलांस पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही. म्हणून औरंगजेबने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यास ३१ ऑक्टोबर १६९९त ताकीदवरपत्र लिहिले, ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक याने भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असता धनाजी जाधवांनी बाहेरून मोगलांचा अतिशय उच्छेद केला. https://youtu.be/aTXiwGaM8mQ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१७३५ राधाबाईंनी १४ फेब्रुवारी १७३५ ला काशीविशेश्वराच्या यात्रेकरिता पुणे सोडले आणि त्या ८ मार्चला बु-हाणपूरला आल्या. त्यांच्याजवळ काही खास फौज वगैरे नव्हती. शे-पन्नास लोक असतील त्याहून जास्त नाही. बुन्हाणपूर सोडताना येथील मुघल सुभेदाराने प्रवासखर्चासाठी काही रक्कम, तसेच वाटेत रक्षणाकरिता २०० स्वार दिले, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हिंदुस्थानात आपल्या पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या प्रतापसूर्य श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आईसाहेबांचा पाहुणचार करण्याची आलेली संधी उदेपूरच्या महाराणा प्रतापच्या गादीवरील त्याचा वंशज जगतसिंग याने वाया जाऊ दिली नाही, बाईंचा खूप आदरसत्कार केला. त्यांचे आशीर्वाद मिळवले. प्रवासासाठी रोख रक्कम, तसेच हत्ती, घोडे, सोने-नाणे देऊ केले. उदेपूरचा दिवाण बहिरदास यानेदेखील राधाबाईंना प्रवासासाठी काही रोख रक्कम नजर केली. शाही उमरावांनीदेखील वाटेत जागोजागी राधाबाई यांना नजराणे, आहेर दिले, मेजवान्या दिल्या आणि आपल्या हद्दीतून त्यांना सुखरूप जाऊ दिले. या सर्व यात्रेत बादशाहकडून किंवा कोणत्याही शाही अंमलदारांकडून, सरदारांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही. किंबहुना त्यांच्याकडून राधाबाईंची चांगली बडदास्त ठेवण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१७५८ मल्हारराव कुंजपुऱ्यावर चालून गेले. तेव्हा बरोबर कुरुक्षेत्र यात्रेसाठी जनानखाना व परिवार होता पलिकडे सरहिंद येथें अबदालीच्या तर्फेने अदुसमदखान बंदोबस्तास होता, त्याने होळकराच्या मंडळीवर चाल करून अटकावून ठेविले पण होळकराच्या संरक्षकांनी अफगाण पहारेकऱ्यास कापून बायकास सोडवून परत नेले. नंतर एक दिड महिना आपले बेत ठरविण्यास घेऊन रघुनाथराव, मल्हारराव वगैरे पुढे चाल करून गेले. ते तारीख ८ मार्च स. १७५८ ला सरहिंद येथे पोचले. तेथे त्यांना अलाजाठची शीख फौज सामील झाली. त्यांनी सरहिंदला वेढा घातला. लढाई चालू झाली. अब्दालीचे सरदार अब्दुस्समदखान व जंगबाजखान यास जखमा लागल्या धरून आणून वस्र भूषणे देऊन आपल्यापाशी ठेविले. शहर लुटून घेतलें. श्रीमंतांनी अबदालीची दहा हजार फौज बुडविली. त्याचा सूड घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ मार्च इ.स.१७७९ इष्टुर फाकड्यास मारून तळेगावावर इंग्रजांस जेर करणारा शूर पुरुष भिवराव पानसे तोफखान्याचा कामदार थोडा ताप येऊन एकाएकी मरण पावला.......`` मराठेशाहीत तीन व्यक्तींचा फाकडा ( पराक्रमी,शूर,वीर) म्हणून उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात केलेला आढळतो.इष्टुर शिवाय मानाजी शिंदे व कोन्हेर त्रिंबक एकबोटे हे अन्य फाकडे आहेत जेम्स स्तुअर्ट ला त्याच्या पराक्रमामुळे कौतुकाने फाकडा म्हटले जाते. रणांगणात शत्रूने दाखविलेल्या पराक्रमाला दिलदारपणे दिलेली ति दाद आहे अण कि शत्रूचे कौतुक ! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - IILHILII   sa AAKT O (EX REATMARRA SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil ८ मार्च इःस.१६७० छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका केल्यानंतर निळोपंत काकांनी सिंहगडा पाठोपाठ किल्ले पुरंदर पुन्हा स्वराज्यात दाखल केला. the qreat maratha warriors the qreat maratha warriors the qreat maratha warriors IILHILII   sa AAKT O (EX REATMARRA SHIVDINVISHESH CREATED BY शिवदिनविशेष Rahul Borse Patil ८ मार्च इःस.१६७० छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका केल्यानंतर निळोपंत काकांनी सिंहगडा पाठोपाठ किल्ले पुरंदर पुन्हा स्वराज्यात दाखल केला. the qreat maratha warriors the qreat maratha warriors the qreat maratha warriors - ShareChat