दिल की बात
ShareChat
click to see wallet page
@186564851
186564851
दिल की बात
@186564851
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
भारताच्या राजकारणात फुकटखाऊ योजनेचा जो उच्छाद सध्या चालू आहे, तो केवळ निवडणुकीचा भाग नाही—तो देश उध्वस्त करण्याचा सरकारी ब्लूप्रिंट आहे. बिहारमध्ये मोफत वीज, मोफत भत्ता, मोफत दान, मोफत सुविधा— हा जो तमाशा लावला गेला ,तो लोककल्याण नाही. तो मतांची होणारी लिलावबाजी आहे. नोटा बदलल्या—आता नव्या नोटा म्हणजे मोफत योजना. आणि ही नवीन चलननीती आहे: “जोडा मत, मोडून काढा अर्थव्यवस्था.” हा देश स्वतःच्या पायावर उभा राहावा असा संघर्ष करतोय. पण प्रत्येक निवडणूक हीच देशाला मागे ओढणारी नवी साखळी बनतेय. भारताचा आर्थिक भविष्योन्मुख प्रवास जणू एखाद्या ट्रेनला कोणी ब्रेक लावून, नंतर हाताने मागे ढकलत असल्यासारखा झाला आहे. या मोफत उधळपट्टीमुळे सरकारांनी आपल्या तिजोरीत एकापेक्षा एक मोठे खड्डे करून ठेवले आहेत. हे खड्डे भविष्यात भरून निघणार नाहीत. हे खड्डे म्हणजे आर्थिक कबर आहेत. अजून स्पष्ट सांगायचं तर— हा देश अर्थव्यवस्थेच्या शवपेटीत स्वतःच स्वतःला ठेवतो आहे…तेही निवडणूक जिंकण्यासाठी. बेरोजगारी एवढी भयानक पातळीवर आहे की युवा वर्गाच्या डोळ्यात आज स्वप्न नाही—केवळ एक फॉर्म आणि त्यावर फुकट काही मिळेल का याची वाट. हा युवा भारत आहे की सरकारी अनुदानाचा “ ग्राहक”? आपण स्वावलंबी पिढी घडवतो आहोत की फुकटाकडे बघणारी भिक्षेकरी मानसिकता? जो देश रोजगार निर्माण करायला हवाय, तो देश अनुदान निर्माण करतो आहे. जो देश उद्योग आणायला हवाय, तो देश फुकट योजना लावत बसलाय. जो देश उत्पादन वाढवायला हवाय, तो देश मतांसाठी खालच्या पातळीवर उतरून “वोट बदल्यात लाभ” देत बसलाय. ही अर्थव्यवस्था चालते कशी? ती रक्तातून चालते—कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, करदात्यांच्या, उद्योगांच्या रक्तातून. पण भारताला आता हे रक्तकारक ज्ञान विसरायला लावले जात आहे. त्याऐवजी दिलं जातंय “मोफत” नावाचा एक धोकादायक नशा. हो, ही नशा आहे. ही नशा लोकांना काम करण्यापासून दूर नेते. ही नशा लोकांच्या पाठीवर कर्जाची पोती बांधून देते. ही नशा उद्योगांना भारताबाहेर पळायला भाग पाडते. ही नशा ग्रामीण भागाला कायमच्या अंधारात ठेवते. आणि ही नशा देशाची अर्थव्यवस्था “लाईफ-सपोर्टवर ठेवलेले रुग्ण” बनवते. ग्रामीण भारत सर्वाधिक जळतो आहे. रस्ता नाही, आरोग्य केंद्र नाही, शाळा नाही. पण निवडणूक आली की अनुदानाचा धबधबा. हा धबधबा विकासाचा नाही—तो फसवणूक करण्याचा सोयीचा पाऊस आहे. पाऊस थांबला की जमीन कोरडी. मोफत योजना थांबली की घरात उपासमार. असा विकास म्हणजे फसवणुकीचा फजितीचा फार्स. EVM असो, आयोग असो, न्याय संस्था असोत— या देशाच्या लोकशाहीचा प्रत्येक आधारस्तंभ संशयाच्या भोवऱ्यात आहे. लोकशाहीचा देवळात ठेवलेल्या विश्वासाला आता तडा जातोय. म्हणूनच फुकटखाऊ राजकारण पुढचे पाऊल उचलू शकते. विश्वास मोडला की जनता विकत घेणे सोपे होते. आणि हे सगळं करताना राजकारणी एवढ्या धिटाईने,बेमुर्वतखोर वागतात जणू विचारतात: “देशाचं काय होतंय? आम्हाला काय?” त्यांचा उद्देश स्पष्ट— मत मिळाले की त्यांच्या गाड्या पुढे जातात; देश आर्थिक अंधारात गडप झाला तरी त्यांना फरक पडत नाही. फरक पडायला हवा—जनतेला. पण जनता जशी अनुदानाच्या व्यसनात अडकते, तसा प्रश्न विचारण्याचा स्वभाव मरतो. “काम नाही, पण मोफत मिळतंयना!” या एका वाक्यातूनच देशाचा विनाश सुरू होतो. भारत अतिशय मोठ्या आर्थिक भूकंपाच्या उंबरठ्यावर आहे. एक धक्का पुरेल… आणि तो धक्का म्हणजे फुकटखाऊ निवडणूक संस्कृती. विकासापेक्षा मोफतपणाला महत्त्व देणारा देश टिकत नाही— तो हळूहळू आतून कोसळतो. आज बिहारमध्ये दिसतंय ते उद्या भारताच्या हाडांमध्ये मुरेल. आणि त्या दिवशी ना रोजगार उरेल, ना उद्योग उरेल, ना विकास उरेल, ना अर्थव्यवस्था उरेल. उरेल फक्त एक देश— कर्जात बुडालेला, फुकटात जगणारा, आणि भविष्याविना. जर हा देश वाचायचा असेल, तर फुकटखाऊ राजकारणाचा अंत झाला पाहिजे. नाही तर भारताचा अंत फक्त तारीख बाकी आहे #🙏 प्रेरणादायक बॅनर
* हे शाळेत शिकवायला हवे.* 1. 52 पत्ते म्हणजे, *52 आठवडे.* 2. 4 प्रकारचे पत्ते म्हणजे, *4 ऋतु.* 3. प्रत्येकी 13 पत्ते म्हणजे, *13 आठवडे.* 4. या सर्व 52 पत्त्याची बेरीज, *364.* 5. एक जोकर धरला, तर 365 म्हणजे *1 वर्ष.* 6. 2 जोकर धरले, तर 366 म्हणजे *लीप वर्ष.* 7. 52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे *12 महिने* 8. लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.* *पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ.* 1. दुर्री - पृथ्वी आणि आकाश. 2. तिर्री - ब्रम्हा,विष्णू आणि महेश. 3. चौकी - चार वेद. (अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेवेद) 4. पंजी - पंच प्राण. (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान) 5. छक्की - षड रिपू. (काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ) 6. सत्ती - सात सागर. 7. अठ्ठी - आठ सिद्धी. 8. नववी - नऊ ग्रह. 9. दसशी - दहा इंद्रिये. 10. गुलाम - मनातील वासना. 11. राणी - माया. 12. राजा - सर्वांचा शासक. 13. एक्का - मनुष्याचा विवेक. 14. समोरचा भिडू - प्रारब्ध. पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते.... 🙏😊 #🙏 प्रेरणादायक बॅनर
*✍️"राजनंदिनी" च्या लेखणीतून कथा बहीण भावाची* *बहिणींनी सख्ख्या भावावर संपत्तीसाठी कोर्टात केस टाकली, पण जेव्हा भावाने कोर्टात ती एक डायरी उघडली, तेव्हा न्यायाधीशांनी सुनावलेला निर्णय ऐकून अख्खं कोर्टरूम सुन्न झालं..* *ठिकाण : लातूरचे जिल्हा न्यायालय.* *लातूर जिल्हा कोर्टाच्या बाहेर नेहमीसारखीच गर्दी होती, पण आज एका केसची कोर्टरूममध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. समोरच्या बाकावर ३५ वर्षांचा 'माधव' शांतपणे मान खाली घालून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर राग वनव्हता, तर सख्ख्या नात्यांनी दिलेल्या धोक्याची एक अगतिकता होती. त्याच्या विरुद्ध बाजूला त्याच्या दोन सख्ख्या बहिणी, 'सुनीता आणि कविता', त्यांच्या नवऱ्यांसोबत (माधवच्या दाजीं सोबत) उभ्या होत्या.* *माधवचे वडील, 'आप्पासाहेब' लातूरच्या एका साध्या शाळेत क्लार्क qहोते. आयुष्यभर काटकसर करून त्यांनी लातूरात एक छोटंसं तीन खोल्यांचं घर आणि गावाकडे दीड एकर शेती एवढीच ३०-४० लाखांची पुंजी कमवली होती. आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर वर्षभरातच, दाजींच्या (बहिणींच्या नवऱ्यांच्या) चिथावणीवरून सुनीता आणि कविता यांनी वडिलांच्या संपत्तीत 'समान वाटा' (Equal Share) मिळावा म्हणून स्वतःच्या सख्ख्या भावावर, माधववर कोर्टात दावा ठोकला होता.* *कोर्टाची सुनावणी आणि तो भावनिक प्रसंग,* *न्यायाधीश देशमुख साहेब आपल्या खुर्चीवर बसले. बहिणींच्या वकिलांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद सुरू केला, "माय लॉर्ड, हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर मुलाएवढाच समान हक्क आहे. माधवने हे घर स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्या अशिलांना या घराचा आणि शेतीचा प्रत्येकी एक तृतीयांश (१/३) वाटा मिळावा!"* *न्यायाधीशांनी माधवकडे पाहिले. माधवने स्वतःसाठी कोणताही वकील दिला नव्हता. तो शांतपणे कठड्यात उभा राहिला. न्यायाधीशांनी विचारले, "माधव, तुला यावर काय सांगायचंय? तुला तुझ्या बहिणींना संपत्तीत वाटा द्यायचा नाहीये का?"* *माधवचे डोळे पाणावले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत शांत आवाजात तो म्हणाला,* *"साहेब, त्या माझ्या सख्ख्या बहिणी आहेत. त्यांनी माझ्याकडे प्रेमाने जीव मागितला असता, तर मी तोही दिला असता, तिथे या विटा-मातीच्या घराची काय किंमत? त्यांचा वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण हक्क आहे आणि मला तो त्यांना द्यायचा आहे... पण माझी एक छोटीशी अट आहे."* *ती 'जुनी डायरी' आणि सत्याचा स्फोट :* *माधवने आपल्या पिशवीतून एक अत्यंत जुनी, जिर्ण झालेली 'लाल डायरी' आणि काही हॉस्पिटलच्या फाईल्स काढल्या आणि त्या न्यायाधीशांच्या टेबलवर ठेवल्या.* *माधव रडत म्हणाला, "साहेब, हे घर आणि शेती नक्की तिघांत समान वाटा. पण संपत्ती वाटताना वडिलांनी मागे ठेवलेलं 'कर्ज आणि जबाबदारी' सुद्धा समान वाटली पाहिजे ना? या फाईलमध्ये वडिलांच्या कॅन्सरच्या उपचारांचे ९ लाखांचे बिल आहे, जे मी आजही माझ्या पगारातून हप्ते भरून फेडतोय. या लाल डायरीत दोन्ही बहिणींच्या लग्नासाठी वडिलांनी काढलेल्या ५ लाखांच्या कर्जाचा हिशोब आहे, ज्यासाठी मी माझं शिक्षण अर्धवट सोडून नोकरीला लागलो."* *माधव तिथेच थांबला नाही. त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या बहिणींकडे बघितले आणि म्हणाला, "आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट... साहेब, माझी ७० वर्षांची आई गेल्या तीन वर्षांपासून पॅरालिसिसमुळे (Paralysis) अंथरुणाला खिळून आहे. तिची मलमूत्राची घाण माझी बायको रोज काढते. जर वडिलांच्या संपत्तीचे तीन समान वाटे होत असतील, तर आज या कोर्टात माझ्या आईच्या जबाबदारीचे आणि या १३ लाखांच्या कर्जाचेही तीन 'समान वाटे' करून द्या! मी आजच घराची चावी त्यांना देतो!"* *कोर्टातील सन्नाटा आणि न्यायाधीशांचा तो ऐतिहासिक निर्णय* *अख्ख्या कोर्टरूममध्ये एकदम स्मशानशांतता पसरली. सुनीता आणि कविताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या नवऱ्यांनी (दाजींनी) एकमेकांकडे पाहिले आणि ते हळूच बहिणींच्या कानात पुटपुटले, "आपल्याला हे घर नको आणि ती म्हातारीची जबाबदारी आणि कर्जही नको! तू केस मागे घे." बहिणींनी खाली मान घातली. त्यांना आपली चूक समजली होती.* *हे सगळं बघून न्यायाधीश देशमुख साहेबांनी चष्मा काढला आणि ते अत्यंत कडक आणि भावूक आवाजात म्हणाले, "आजकालच्या आधुनिक समाजाची हीच मोठी शोकांतिका आहे! कायद्याने तुम्हाला संपत्तीत समान 'हक्क' दिला आहे, पण आई-बापाची सेवा करण्याचं आणि जबाबदारी पेलण्याचं 'कर्तव्य' मात्र तुम्ही विसरलात! ज्या भावाने स्वतःचं आयुष्य जाळून बहिणींचे संसार उभे केले, त्या भावाला तुम्ही कोर्टाची पायरी चढायला लावलीत."* *न्यायाधीशांनी बहिणींना उद्देशून पुढे म्हटले, "जर तुम्हाला खरोखरच तुमचा कायदेशीर वाटा हवा असेल, तर आधी या कर्जाचे पैसे कोर्टात जमा करा आणि आईला पुढचे ४ महिने सांभाळण्याची लेखी हमी द्या, तरच मी संपत्तीच्या वाटपाचा आदेश देईन!"* *सुनीता आणि कविता ढसाढसा रडत कोर्टाच्या कठड्यातून बाहेर आल्या आणि त्यांनी थेट माधवचे पाय धरले!* *"दादा.. आम्हाला माफ कर! लोकांच्या सांगण्यावरून आम्ही पैशांसाठी आंधळ्या झालो होतो. ज्या घराने आम्हाला लहानाचं मोठं केलं, ते घर तोडायला निघालो होतो. आम्हाला संपत्तीतली एक कवडीही नकोय, आम्हाला फक्त आमचा जुना 'दादा' हवाय!"* *माधवने आपल्या दोन्ही बहिणींना उठवून घट्ट मिठी मारली. कोर्टातील उपस्थित लोकांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आज पैशांचा अहंकार हरला होता आणि रक्ताच्या नात्याचा, एका भावाच्या कष्टाचा विजय झाला होता!* *आई-वडिलांच्या संपत्तीसाठी हव्यासापोटी नाती विसरणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा-"राजनंदिनी"* #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
01:35
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - & घायल इसलिए মলনেকচুঁ GHAYAL HU ISLIYE GHATAT HU INVEST BEFORE | RECOVERIL & घायल इसलिए মলনেকচুঁ GHAYAL HU ISLIYE GHATAT HU INVEST BEFORE | RECOVERIL - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
00:25
#🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜
🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 - ShareChat
01:08
#🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜
🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 - Food Get Your Cooked GOOD MORNING New Start-up Idea Food Get Your Cooked GOOD MORNING New Start-up Idea - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - नात्यातील गोडव्याला அனிகி, स्वार्थाची मुंगी वर्तमानाच्या बाजारात भविष्याचा मेळ आणि खेळ दोन्ही बिघडतात. नात्यातील गोडव्याला அனிகி, स्वार्थाची मुंगी वर्तमानाच्या बाजारात भविष्याचा मेळ आणि खेळ दोन्ही बिघडतात. - ShareChat