१)
_*भिंतीमधल्या सगळ्या विटा जेंव्हा एकमेंकात एकरूप होतात. तेंव्हाच ती भिंत भक्कम आणि मजबूत बनते. एखाद्या विटेला जरी गर्व झाला की माझ्यामुळे भिंत उभी आहे पण ते चुकीचं आहे. प्रत्येक वीट महत्वाची असते. तसंच तुम्ही जेंव्हा एखाद्या प्रवाहात, समूहात काम करता. तेंव्हा सुद्धा प्रत्येकाने समर्पण केलं तरच ते काम यशस्वी होतं. माझ्यामुळं हे चाललय असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. संघटनेपेक्षा व्यक्ती कधीच मोठा नसतो. किंमत एकीला असते एकाला नाही.*_
२)
*_जीवनभर 'अहंकाराला' मोठा करून 'रागाला' जन्माला घालण्यापेक्षा, 'संयमाला' शांतीचे 'खुराक' घाला, सु विचाराने 'धष्टपुष्ट' करून 'आनंदाला' जन्माला घाला. मग 'आयुष्य' नावाच्या मैदानात, 'नातं' नावाचा खेळ, कोणीही 'उध्वस्त' करण्याची हिम्मत करणार नाही..._*
३)
*"रात्र म्हणजे कालचा काळा फळा,सकाळ म्हणजे लख्ख करणारं डस्टर!त्याच डस्टर ने तो काळा फळा पुसून स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे लिहायचे का?*
*"नव्या दिवसाला को-या मनाने सामोरे जाऊन त्या फळ्यावर नवा मजकूर लिहावा.*
४)
*"सोडलेल्या" दोन हातांपेक्षा "जोडलेल्या " दोन हातांमध्ये खुप "सामर्थ्य" असतें ...*
*"परिस्थिती" हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा "मनस्थिती बदलेल व परिस्थितीही ..* #🙏 प्रेरणादायक बॅनर