🌹🌹 निस्वार्थ प्रेम 🌹🌹
"बहिणींनी सख्ख्या भावावर संपत्तीसाठी कोर्टात केस टाकली! पण जेव्हा भावाने कोर्टात 'ती' एक डायरी उघडली, तेव्हा न्यायाधीशांनी सुनावलेला निर्णय ऐकून अख्खं कोर्टरूम सुन्न झालं..."
ठिकाण: साताऱ्याचे जिल्हा न्यायालय.
कोर्टाच्या बाहेर नेहमीसारखीच गर्दी होती, पण आज एका केसची कोर्टरूममध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. समोरच्या बाकावर ३५ वर्षांचा 'माधव' शांतपणे मान खाली घालून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर सख्ख्या नात्यांनी दिलेल्या धोक्याची एक अगतिकता होती. त्याच्या विरुद्ध बाजूला त्याच्या दोन सख्ख्या बहिणी, 'सुनीता आणि कविता', त्यांच्या नवऱ्यांसोबत (माधवच्या दाजींसोबत) उभ्या होत्या.
माधवचे वडील, 'आप्पासाहेब' साताऱ्यात एका साध्या शाळेत क्लार्क होते. आयुष्यभर काटकसर करून त्यांनी साताऱ्यात एक छोटंसं तीन खोल्यांचं घर आणि गावाकडे दीड एकर शेती एवढीच ३०-४० लाखांची पुंजी कमवली होती. आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर वर्षभरातच, दाजींच्या (बहिणींच्या नवऱ्यांच्या) चिथावणीवरून सुनीता आणि कविता यांनी वडिलांच्या संपत्तीत 'समान वाटा' (Equal Share) मिळावा म्हणून स्वतःच्या सख्ख्या भावावर, माधववर कोर्टात दावा ठोकला होता.
कोर्टाची सुनावणी आणि तो भावनिक प्रसंग:
न्यायाधीश देशमुख साहेब आपल्या खुर्चीवर बसले. बहिणींच्या वकिलांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद सुरू केला, "माय लॉर्ड, हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर मुलाएवढाच समान हक्क आहे. माधवने हे घर स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्या अशिलांना या घराचा आणि शेतीचा प्रत्येकी एक तृतीयांश (१/३) वाटा मिळावा!"
न्यायाधीशांनी माधवकडे पाहिले. माधवने स्वतःसाठी कोणताही वकील दिला नव्हता. तो शांतपणे कठड्यात उभा राहिला. न्यायाधीशांनी विचारले, "माधव, तुला यावर काय सांगायचंय? तुला तुझ्या बहिणींना संपत्तीत वाटा द्यायचा नाहीये का?"
माधवचे डोळे पाणावले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत शांत आवाजात तो म्हणाला,
"साहेब, त्या माझ्या सख्ख्या बहिणी आहेत. त्यांनी माझ्याकडे प्रेमाने जीव मागितला असता, तर मी तोही दिला असता, तिथे या विटा-मातीच्या घराची काय किंमत? त्यांचा वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण हक्क आहे आणि मला तो त्यांना द्यायचा आहे... पण माझी एक छोटीशी अट आहे."
ती 'जुनी डायरी' आणि सत्याचा स्फोट:
माधवने आपल्या पिशवीतून एक अत्यंत जुनी, जिर्ण झालेली 'लाल डायरी' आणि काही हॉस्पिटलच्या फाईल्स काढल्या आणि त्या न्यायाधीशांच्या टेबलवर ठेवल्या.
माधव रडत म्हणाला, "साहेब, हे घर आणि शेती नक्की तिघांत समान वाटा. पण संपत्ती वाटताना वडिलांनी मागे ठेवलेलं 'कर्ज आणि जबाबदारी' सुद्धा समान वाटली पाहिजे ना? या फाईलमध्ये वडिलांच्या कॅन्सरच्या उपचारांचे ९ लाखांचे बिल आहे, जे मी आजही माझ्या पगारातून हप्ते भरून फेडतोय. या लाल डायरीत दोन्ही बहिणींच्या लग्नासाठी वडिलांनी काढलेल्या ५ लाखांच्या कर्जाचा हिशोब आहे, ज्यासाठी मी माझं शिक्षण अर्धवट सोडून नोकरीला लागलो."
माधव तिथेच थांबला नाही. त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या बहिणींकडे बघितले आणि म्हणाला,
"आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट... साहेब, माझी ७० वर्षांची आई गेल्या तीन वर्षांपासून पॅरालिसिसमुळे (Paralysis) अंथरुणाला खिळून आहे. तिची मलमूत्राची घाण माझी बायको रोज काढते. जर वडिलांच्या संपत्तीचे तीन समान वाटे होत असतील, तर आज या कोर्टात माझ्या आईच्या जबाबदारीचे आणि या १३ लाखांच्या कर्जाचेही तीन 'समान वाटे' करून द्या! मी आजच घराची चावी त्यांना देतो!"
कोर्टातील सन्नाटा आणि न्यायाधीशांचा तो ऐतिहासिक निर्णय:
अख्ख्या कोर्टरूममध्ये एकदम स्मशानशांतता पसरली. सुनीता आणि कविताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या नवऱ्यांनी (दाजींनी) एकमेकांकडे पाहिले आणि ते हळूच बहिणींच्या कानात पुटपुटले, "आपल्याला हे घर नको आणि ती म्हातारीची जबाबदारी आणि कर्जही नको! तू केस मागे घे." बहिणींनी खाली मान घातली. त्यांना आपली चूक समजली होती.
हे सगळं बघून न्यायाधीश देशमुख साहेबांनी चष्मा काढला आणि ते अत्यंत कडक आणि भावूक आवाजात म्हणाले,
"आजकालच्या आधुनिक समाजाची हीच मोठी शोकांतिका आहे! कायद्याने तुम्हाला संपत्तीत समान 'हक्क' दिला आहे, पण आई-बापाची सेवा करण्याचं आणि जबाबदारी पेलण्याचं 'कर्तव्य' मात्र तुम्ही विसरलात! ज्या भावाने स्वतःचं आयुष्य जाळून बहिणींचे संसार उभे केले, त्या भावाला तुम्ही कोर्टाची पायरी चढायला लावलीत."
न्यायाधीशांनी बहिणींना उद्देशून पुढे म्हटले, "जर तुम्हाला खरोखरच तुमचा कायदेशीर वाटा हवा असेल, तर आधी या कर्जाचे पैसे कोर्टात जमा करा आणि आईला पुढचे ४ महिने सांभाळण्याची लेखी हमी द्या, तरच मी संपत्तीच्या वाटपाचा आदेश देईन!"
सुनीता आणि कविता ढसाढसा रडत कोर्टाच्या कठड्यातून बाहेर आल्या आणि त्यांनी थेट माधवचे पाय धरले!
"दादा... आम्हाला माफ कर! लोकांच्या सांगण्यावरून आम्ही पैशांसाठी आंधळ्या झालो होतो. ज्या घराने आम्हाला लहानाचं मोठं केलं, ते घर तोडायला निघालो होतो. आम्हाला संपत्तीतली एक कवडीही नकोय, आम्हाला फक्त आमचा जुना 'दादा' हवाय!"
माधवने आपल्या दोन्ही बहिणींना उठवून घट्ट मिठी मारली. कोर्टातील उपस्थित लोकांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आज पैशांचा अहंकार हरला होता आणि रक्ताच्या नात्याचा, एका भावाच्या कष्टाचा विजय झाला होता!
आई-वडिलांच्या संपत्तीसाठी हव्यासापोटी नाती विसरणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही भावा बहिणींच्या निस्वार्थ प्रेमाची कथा तुम्हाला कशी वाटली?🙏🙏🙏🙏
#☀️गुड मॉर्निंग☀️ #✨मंगळवार स्पेशल✨ #भाऊ बहिण #नातं #👫नात बहिण भावाचं
🌹 अक्षय तृतीया 🌹
अक्षय तृतीया बोली भाषेत आखिती. मला हेच नाव खूप आवडते कारण आख्खी तिज हे या शब्दाचं मूळ . आख्खी म्हणजे अखंड जी कधी सरत नाही ती. मनुष्याला हे कायम सगळ्या चांगल्या गोष्टी अखंड हव्या असतात. म्हणूनच या तीजेला महत्व आहे. खरतर ही तृतीया जशी देवांची तशीच पितरांची त्याहून अधिक सर्वांच्या तृप्तीची. वैशाख वणव्यात पोळणाऱ्या प्रत्येकाला शांत करण्यासाठी. म्हणूनच आजच्या दिवशी महत्व असतं ते थंडावा देणाऱ्या वस्तूंच्या दानाचं त्याच बरोबर शेतकरी बांधवांसाठी पहिल्या पेरणीचं . ही पेरणी शेतातली नाही तर परसातल्या भाजीपाल्याची. आळ्यातल्या वेलांची.
याच दिवशी कोल्हापूरकर आतुरतेने वाट बघतात ती संध्याकाळ ची. आज आमची आई अंबाबाई झुल्यावर बसणार ! संध्याकाळी चार वाजले की देवीचे चोपदार वाजंत्री आईला बोलावण करायला गाभाऱ्यात जातात. तोवर इकडे गरुड मंडपात चांदीनं मढवलेलं सिंहासन फुलांनी सजवून चारी बाजूंनी दोऱ्या बांधून गरुड मंडपाच्या लाकडी छताला ( याला तख्तपोशी म्हणतात) बांधल जातं. साधं खणाच वस्त्र नेसून आई साहेब पुजाऱ्यांच्या हातातून सनई ताशाच्या नादात मंडपात येतात. रथोत्सवा प्रमाणे हवालदार खांडेकर दागिने घेऊन हजर होतात. आज अंबाबाई जगन्माता म्हणून नाही तर एखाद्या नवपरिणीते प्रमाणं सगळ कोडकौतुक करून घेते. साज ,चाफेकळी, मोहनमाळ, तन्मणी अशा अनेक पारंपरिक दागिन्यांबरोबर तीचा खास रत्नजडीत किरीट कुंडलं असे दागिने घालते. देवीचा शृंगार पूर्ण झाला की पुजाऱ्यांच्या घरच्या स्त्रीयां , देवीच्या शागिर्दाने देवस्थानच्या स्वयंपाकघरातला तसेच आपल्या घरुन आणलेली कैरीची डाळ, पन्हं पानसुपारी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ला देऊन गरुड मंडपात येतात. मग सुरू होतो करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी च्या चैत्री हळदीकुंकवाचा सोहळा. चोपदार झोके देतायत आणि आई अंबाबाई सनई चौघड्याच्या तालावर मंद झुलतेय. रात्री आठ वाजेपर्यंत हा सोहळा असाच रंगतो. महिला येतात हळदीकुंकू करतात. दरवर्षी च हे दृश्य .
हा दोलोत्सव अर्थात हिंदोळा हे प्रतिक आहे बदलत्या सृष्टी चक्राचं . झोपाळ्यावर बसून झुलणारी जगदंबा मूर्त रुप आहे या सृष्टीचं जिला वसंत ऋतू च्या रुपानं नवनिर्मिती ची चाहूल लागली आहे.तिचा सृजनाचा सोहळा चैत्राला सुरू झाला. म्हणून एखाद्या नवयुवती प्रमाणे ती झोपाळ्यावर बसून झुलतेय. हा नवनिर्मिती चा सोहळा पूर्ण होईल अश्विनाला जेव्हा भरलेल्या पिकासह ती आपलं जगन्माता हे नाव सार्थ करेल. पण आज ती कुणाची स्वामिनी नाही असुर मर्दिनी नाही तर आज ती आहे एक सृजनाला आतुर मुग्धा, आपल्याच विश्वात रमलेली सौंदर्यवती मानिनी . आज खरतर तिला काहीच मागू नये कारण ती तिच्या आनंदात रममाण आहे.
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः
#अक्षय तृतीया #अक्षय तृतीया #🚩जय श्री राम🌹 #आध्यात्मिक माहिती #धर्म आध्यात्मिक
🙏भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
भावपूर्ण निरोप आशाजी...😪😪
काही आवाज असे असतात, जे कधीच मरत नाहीत…
ते कायम आपल्या मनात, आठवणीत आणि प्रत्येक सुरात जिवंत राहतात… ❤️
आशा भोसले म्हणजे असाच एक जादुई आवाज…
“पिया तू अब तो आजा…” म्हणत त्यांनी दिलेली अदा,
“दम मारो दम…” मधली मोकळीक,
“चुरा लिया है तुमने…” मधलं प्रेम,
“ये मेरा दिल…” मधली खोडकर झलक,
“इन आँखों की मस्ती…” मधली नजाकत,
“राधा कैसे न जले…” मधली भावूकता,
आणि “दिल चीज़ क्या है…” मधली शायरी…
प्रत्येक गाणं म्हणजे एक वेगळी दुनिया… 🎶
त्यांच्या आवाजात कधी प्रेम आहे, कधी विरह आहे,
कधी खोडकरपणा आहे, तर कधी एकटेपणाची हळवी जाणीव…
अशा या सुरांच्या राणीला शब्दात बांधणं अशक्य आहे…
कारण त्या फक्त गात नाहीत… त्या प्रत्येक गाणं जगतात… ❤️
आपण नशीबवान आहोत की आपण त्यांच्या काळात जन्मलो
आणि त्यांचा आवाज अनुभवू शकलो… 🙏भावपूर्ण निरोप आशाजी...😪😪
काही आवाज असे असतात, जे कधीच मरत नाहीत…
ते कायम आपल्या मनात, आठवणीत आणि प्रत्येक सुरात जिवंत राहतात… ❤️
आशा भोसले म्हणजे असाच एक जादुई आवाज…
“पिया तू अब तो आजा…” म्हणत त्यांनी दिलेली अदा,
“दम मारो दम…” मधली मोकळीक,
“चुरा लिया है तुमने…” मधलं प्रेम,
“ये मेरा दिल…” मधली खोडकर झलक,
“इन आँखों की मस्ती…” मधली नजाकत,
“राधा कैसे न जले…” मधली भावूकता,
आणि “दिल चीज़ क्या है…” मधली शायरी…
प्रत्येक गाणं म्हणजे एक वेगळी दुनिया… 🎶
त्यांच्या आवाजात कधी प्रेम आहे, कधी विरह आहे,
कधी खोडकरपणा आहे, तर कधी एकटेपणाची हळवी जाणीव…
अशा या सुरांच्या राणीला शब्दात बांधणं अशक्य आहे…
कारण त्या फक्त गात नाहीत… त्या प्रत्येक गाणं जगतात… ❤️
आपण नशीबवान आहोत की आपण त्यांच्या काळात जन्मलो
आणि त्यांचा आवाज अनुभवू शकलो… 🙏
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🤗 जुन्या आठवणी #🎑जीवन प्रवास #आशा भोसले #आशा भोसले महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर🙏
🌹🌹आपलंच आयुष्य 🌹🌹महातारांगण
आयुष्याच्या या वळणावर,
दिसू लागले दिवे मिणमिणते,
दिवसेंदिवस होत चालले कमी आयुष्य,
बोनस लाभला आजचा दिन....
भूतकाळ विसरून गेले,
भविष्याची चिंता नुरली,
वर्तमानी आनंद लुटत,
बालकासम स्वच्छंद हुंदडते....
तरीही कधीकधी कानी येते,
वयोमर्यादा संभाळावी लागते,
हाड मोडले,लचक भरली,
पुन्हा न राहू शकेन उभी.....
थोडा व्यायाम, थोडा आराम,
मोजका आहार, थोडा विहार,
एकांत सराव, ईश्वराचे नाम,
जीवन जगणे शांत निरामय....
मनी वसावी तृप्ती समाधान,
अंतरी फुलवावे आनंदवन,
सावधान, जागृत,कार्यरत,
बुध्दीने वेचावे ज्ञानकण......
मनमोकळे मनात हसावे,
नाचगाणे मनानेच करावे,
अंत:करण हिरवेगार असावे,
आयुष्यात मनाला फुलवावे....
सावकाश करावी हालचाल,
मोजूनच बोलावे बोल,
चाल चालावी मंद मंद,
आयुष्याच्या या वळणावर...
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🤗 जुन्या आठवणी #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #आयुष्य
🌹🌹 मातृ पितृ देवो भव 🌹🌹
"आई + वडील हेच जीवन "
आई वडिल म्हणजे नक्की काय असत १ आयुष्य जगण्यासाठी देवान दिलेल ॲडव्हान्स पाठबशळ असत . तुमच्या प्रत्येक दिवसात त्यांनी आपल स्वप्न पाहिलेले असत तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरना पर्यंत त्यांनी आपल आयुष्य खर्च केलेल असत . आई तुमच्या आयुष्याच्या गाडीच योग्य दिशा देणार स्टिअरिंग असत ., तर अचानक आलेल्या संकटात सावरायला "वडील " म्हणजे अर्जट ब्रेकचा पर्याय असतो . आईच प्रेम हे रोजच्या कामाला येणार "बँक बॅलन्स " असत, तर वडील म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा व्हेरिएबल पेमेंट असते, आई म्हणजे तुम्हाला सतत जोडणार मोबाईल नेटवर्क असत, आणि कधी ते नेटवर्क थकल तर वडील अर्जट Sms असत .
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातल ॲन्टीव्हायरस असत, तर शोधून काढलेले व्हायरस संपवायच वडील हे "क्वॉरनटाईन" बटण असत . आई म्हणजं तुमच्या आयुष्यातल शिक्षणाच विद्यापीठ असत, तर वडील म्हणजे तुमच्या आयुष्यातील चालती बोलती अनुभवाची फॅक्टरी असते, आई न्हणजे तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई असते, तर वरील म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळविलेली कमाई असते,, आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला मार्गदर्शक गुरु असते . तर दाखविलेल्या वाटेवर वडील हा जवळचा मित्र असतो ., आई म्हणजे साक्षात भगवंत " परमेश्वर असतो, तर परमेश्वरा पर्यंत पोहचवायला वडील एक संत असतो आईम्हणज तुमचे शरीर / मेंदू / काळीज ' आणि मन असत, तर वडील म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरबळ . / हाड न हाड असत .
कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य आई sss असत,, आणि भले मोठे संकट आले की उच्चारात बापरे बाप असत ., परमेश्वर समोर आला तरी विट फेकणाऱ्या पुंडलीकाच मन असत, त्याच्या आई बापाच्या रूपात विठ्ठलाने स्वतःलाच तिथे पाहिलेल असत .
म्हणून म्हणतो परमेश्वर ' अध्यात्म . भगवंत हे सगळ अजब गणित असत, त्या सगळ्या पर्यंत पोहचवणार " आईवडील " हे कनेक्शन असत,, आईवडील म्हणजे न कळत मागे आलेली मायेची सावलीअसते. उगाच नाही आपल्या संस्कृतीत "मातृ देवोभव " पितृ देवोभव " असे म्हणतात .
आईवडील असून सुद्धा जर ते आपल्या सोबत रहात नसतील, तर या जगातील तुम्ही नतदृष्ठ आहात, सर्वांत महान सुख ' शांती " समाधान व आनंदा पासून वंचित आहात
खरच आईवडिलांच्या सेवेसाठी कधीही नाही म्हणू नका . कारण आपण हे जग पहातोय ते आईवडीला मुळे च .🙏🙏
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #👨👩👧👦आई-बाबा #आई #आई थोर तुझे उपकार #आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही
🌹🌹भोगी🌹🌹
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा 'भोगी' हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या सणाचे महत्त्व, परंपरा आणि त्यानिमित्ताने बनवल्या जाणाऱ्या विशेष खाद्यपदार्थांची आणि या सणाची माहिती देणारा लेख. दरवर्षीप्रमाणे यंदा १३ जानेवारी रोजी अर्थात मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करायची आहे आणि १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा करायचा आहे.
'भोगी' म्हणजे उपभोगाचा सण. 'नको रे ओढू, नको रे ताणू, आनंदाने भोगी मांडू' असे म्हणत हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
भोगीची विशेष भाजी (खेंगट)
भोगीची विशेष भाजी (खेंगट)
भोगीच्या दिवशी घराघरात एक विशेष मिश्र भाजी बनवली जाते, ज्याला 'खेंगट' किंवा 'भोगीची भाजी' म्हणतात. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्यांचा वापर केला जातोः
घटकः ओले हरभरे, पावटा, वांगी, घेवडा, गाजर, वाटाणा आणि शेंगदाणे.
तिळाचे महत्त्वः या भाजीत भरपूर प्रमाणात तीळ वापरले जातात. तीळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
तिळाची बाजरीची भाकरी
भोगीला केवळ भाजीच नाही, तर तिळाची बाजरीची भाकरी आणि लोणी या जोडिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात. या दिवशी मुगाची डाळ घातलेली मऊ खिचडी देखील अनेक ठिकाणी बनवली जाते.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
१. इंद्राची पूजाः पौराणिक कथेनुसार, हा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली, म्हणून त्यांचे आभार मानले जातात. २. साफसफाई आणि मंगल स्नानः भोगीच्या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. अभ्यंगस्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान केले जातात. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. ३. कचरा जाळण्याची परंपरा (कचरा टाळा, नकारात्मकता जाळा): काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे. याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे असा होतो.
"भोगी न्हावा आणि नशिबी यावा"
ग्रामीण भागात अशी म्हण आहे की, जो भोगीचा सण आनंदात साजरा करतो, त्याचे पूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण आणि समृद्ध जाते. निसर्गातून जे मिळते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची ही पद्धत आपली कृषी संस्कृती दर्शवते.
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #भोगी शुभेच्छा #भोगी #भोगी आणि मकर संक्रांत #मकर संक्रात तिळगुळ घ्या गोड गोड बोला
🌹🌹बेंदुर🌹🌹
पूर्वी सणवार म्हटले की बाजारपेठा या आल्याच आल्या. बाजारपेठांशिवाय सणवार साजरे तरी कसे होणार. बरं आजच्या सारखी वाहन व्यवस्था तेव्हा समृद्ध नसल्यानं गावखेडी हि शहरापासून खूप दूर असायची. शहराला सगळ्यांनाच जायला जमेलच असे ही नाही. मग अश्यावेळी पंचक्रोशीतीलच एखादे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी बाजारपेठ असलेले गाव सगळ्यांना उपयोगी पडायचे.
याच धर्तीवर आमच्या खटाव तालुक्यातील औंध हे बाजारपेठ असलेले संस्थानी गाव होते. त्यामुळे औंध आणि त्याच्या परिसरातील गावे ही बाजारपेठ दृष्ट्या औंधशी जोडलेली होती. औंधचा आठवडी बाजार हा मंगळवारी भरत असे. विशेष असे की दसरा दिवाळी सण असो की आपला देशी बेंदूर. प्रत्येक सणाच्या अगोदर दोन तीन दिवसांच्या फरकाने मंगळवार हा आठवडी बाजार म्हणून अगोदरच भरत असे. त्यासाठी व्यापारी मंडळी सणासुदीला लागणारे लहानमोठे रंगांचे डब्बे, सुक्के रंग, विविधरंगी बेगड, गळयातील घुंगरमाळा, लहान मोठे सुती कासरे, वेसणी, झुली, जे जे म्हणून असेल ते ते साहित्य मोठ्या प्रमाणात भरून बाजारपेठा सजवून ठेवत. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीला लागणारे साहित्य हे शेतकरी वर्गाकडून अगोदरच खरेदी करून ठेवले जायचे. मनाजोगी खरेदी करून शेतकरी हा आपल्या कामात मग्न राहून येणाऱ्या सणाची आतुरतरने वाट पहात आपली कामे हातावेगळी करत असे.
शेतकऱ्यांना बेंदूर सण हा अतिशय प्रिय असे. कारण याच बेंदूर सणानिमित्त आपल्या शेतात वर्षभरापासून राबणाऱ्या आणि पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळ केलेल्या बैलांचा बेंदूर हा खास सण असे. वेळेत पाऊसपाणी पडल्यामुळे सारं शिवार हिरवेगार झालेले असे. पिके वाऱ्याच्या झोकावर डुलत असतात. आनंदाने पानातून आवाज काढत असतात. मध्येच एखादी पावसाची सर येऊन जायची. दूर वारूळ किंवा टेकडीवर बसून चितुर पक्षी आपल्या कर्णकर्कश आवाजात सारे वातावरण सावध करून टाकत. तर मोर ही क्याह क्याह ओरडत असे. अश्या आनंदी वातावरणात बेंदुर हा मुळाचा सण येऊन ठेपत असे.
आमच्या गणेशवाडीमध्ये ही बेंदराची जोरदार तयारी असे. सणानिमित्त गावी येण्यासाठी पुण्या मुंबईत पोटापाण्यासाठी राहिलेल्या आपल्या मुलाबाळांना आठवडाभरापूर्वीच सांगावा, चिठ्ठ्या, पत्रे गेलेली असायची. त्याप्रमाणे एकेक करून पुणे मुंबईकर मिळेल त्या वाहनाने गावी गणेशवाडीला हजर व्हायचा.
औंधमध्ये उगम पावलेल्या नांदणी नदीच्या पाण्याचा चोरटा प्रवाह छोट्या मोठ्या ओढ्याने वाहत करांडेवाडी आणि खरशींगे यांच्या नजीक असलेल्या सरकारी मळ्यातील पाण्याच्या मोठ्या डोहात समाविष्ट होतो. याच डोहाला नांन्नीचा डोह म्हटले जायचे. याच नांदणीच्या डोहावर जनावरे धुण्यासाठी गणेशवाडीकरांची मोठी गर्दी व्हायची. त्यासाठी खास मुंबईवरून आणलेला गोदरेजचा वारंवार चावीबार असलेला 501 बार साबण आणि घरातल्या वाळक्या दोडक्याच्या घासणीने बैलं बळीच्या पकावानी म्हणजे बगळ्या सारखी पांढरी शुभ्र धुवून काढली जात. गाई म्हैशी रेडकं, वासरे धुवून झाल्यावर स्वतःही वाहत्या डोहात मनसोक्त डुबक्या मारून सारा लवाजमा माळाच्या नागमोडी वळणाच्या पाऊलवाटेने डुलत डुलत जाताना पाहून वाटे कुण्या राजाचाच लवाजमा जात आहे.
सारी जनावरे परड्यात स्वच्छ जागेत बांधून त्यांना खायला वैरण टाकून पोरं घरी जेवायला धावत. दीड दोन किलोमीटरच्या तकाट्याने, जनावरे धुवून शिवाय डोहात मस्तपैकी पोहोण्याने पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात. मग काय गरमागरम भाकरी आणि कालवणाचा काला करून जेवणावर आडवा हात मारला जाई.
बेंदराची तयारी म्हणून अगोदरच माळ्यावर ठेवलेल्या घुंगराच्या माळांची डागडुजी करून त्या धुवून सजवून सोप्यातील खुटीला टांगलेल्या असायच्या. बैतेकरी मांगांनी सकाळीच आंब्याच्या पानांची तोरण माळ घरात आणून दिलेल्या असतात. त्या तोरणमाळ घराभोवती बांधून परड्यात शेणाने सारवून ठेवलेल्या कुरी, कुळव, रासणी, डूबी, कोळपी, काढवान अश्या छोट्या मोठ्या औतकाठीला बांधली जाई. संध्याकाळी खांदेमळणीसाठी गरम मिठाच्या पाण्याने शेक देऊन नंतर कडविलेल्या तेलात हळद टाकून त्या तेलाने बैलांच्या खांद्यांचा चांगलाच चोळून मोळून मशाज केला जाई. सर्व लहान मोठ्या जनावरांची खांदमळणी झाल्यावर त्यांना घमेले भरून घुगरया खायला घातल्या जात. तेल पाजले जाई. नंतर सर्व जनावरांना खायला वैरण टाकून परड्याचा झाप लावून गडी माणसं घरी जेवायला येत. गरमगरम गुळवण्यात बाजरीचे उकडलेले उंडे कुस्करून त्यावर ताव मारला जात असे. जेवण झाल्यावर लहान मुले सोप्यात झोपून जात. तर गडी माणसं देवळाकडे गप्पा मारायला जात.
उद्या सणाचा दिवस म्हणून बायका तांबडं फुटायच्या आणि कोंबडं आरवायच्या आतच उठून चुली पेटवायच्या. अंगुळा पांगुळा उरकून बायकांनी पुरण शिजवून पोळ्यांचे नैवद्य तयार केलेले असायचे. तोवर गडी माणसं, पोरं ही तयार झालेली असायची. ज्यांची बैलं धुवायची राहिलेली असायची. अशी माणसं आपली बैलं धुण्यासाठी आडावर गर्दी करायची. सगळ्यांची नुसती धांदल उडून जायची. अंडील बैलांच्या डरकाळ्यानी सारा परिसर दुमदुमून जायचा.
तोपर्यंत स्त्रियांनी नैवेद्य तयार करून ठेवलेला असायचा. पोरांची नैवेद्य घेऊन जाण्यासाठी चढाओढ लागायची. मग एकाने हातात पाण्याचा तांब्या घ्यायचा. तर दुसऱ्याने नैवेद्याचे ताट घेऊन ते नैवद्य सगळ्या शिवारात, गणेश मंदिर, मारूती मंदिर, लक्ष्मी मंदिर, म्हसोबा, यताळबा, आडाला या सगळ्या ठिकाणी नेवून दाखवायचा. बैलांच्या, गाईंच्या अंगाला पिवळ्या रंगाने रंगवून त्यावर पणती, वाटीचे ठसे विविध रंगामध्ये बुडवून ते गाई बैलांच्या अंगावर उठवले जात. अशी काढलेली मेहंदी पांढया शुभ्र जनावरांच्या अंगावर उठून दिसायची. वाडीत सकाळी सकाळीच मांगांच्या हलगीने आरोळी दिलेली असायची. पुरण पोळीवर बेत मारून ते देखील आरामासाठी मारुतीच्या देवळात बसलेले असायचे. बेंदूर सण प्रत्येक घराघरातला मातीचा, शेतीचा, बळीराजाचा आणि त्याच्या सर्जा राजाचा सगळं वातावरण आनंदानं भरलेले असायचं. चाकरमान्यानी पुण्या मुंबईहुन येताना हौसेने आणलेल्या झुली, बाशिंगे, गळ्यातील घाटया आज बैलांच्या अंगावर चढणार होत्या. हक्कानं त्यांना पुरणपोळीचा नैवद्य मिळणार होता. बैलं कधी रंगवायची ? म्हणून लहान लहान मुले मागे लागली असायची. त्यांना रंगवून राहिलेला रंग आपल्या घरातील देव्हाऱ्यात पुजलेला बैलांना, शेरडांना, लहान वासरं, रेडकांच्या इवल्या इवल्याश्या शिंगांना लावायचा होता. उलीसा रंग ठेवावा. म्हणून पोरं मोठया माणसांना अगदी भंडावून सोडत असायची.
प्रत्येक परड्यात जनावरांच्या रंगरंगोटीची लगबग उसळलेली दिसे. लोहाराकडून बैलांच्या नख्या खुडून घेतल्या जात. पत्र्या मारल्या जात. तर शिंगे घोळून घेतली जात. बैलांच्या पायाला रंगीत पट्ट ओढलेले असायचं. त्यावर काळा गोप बांधला जायचा. शिंगाना भगवा, लाल, पिवळा, निळा, हिंगूळ लावून त्यावर रंगीबिरंगी बेगड चिटकवली जाई. एखाद्या नवऱ्याला मेकअप करून नटवावा तशी बैलं नटवली जायची. बैलांच्या शिंगामध्ये पितळी शेंब्या घातल्या जायच्या. शेंब्यामध्ये कुडबळी अडकविली जायची. कपाळावर आरश्याची नक्षी असलेली बाशिंगे बांधली जायची. त्यावर विविधरंगी रेबणीची फुले बांधली जायची. एवढा सगळा नट्टापट्टा झाल्यावर बैलांना कोणाची नजर लागू नये. म्हणून त्यांच्या दोन्ही शिंगाच्या मधोमध काळ्या गोपात लिंबू ओवून ते शिंगांना बांधले जायचं.
दुपारच्या सुमारास एकेक करून साऱ्या वाडीतील बैलं श्री मारुती मंदिरासमोर जमायला सुरुवात व्हायची. एखादया फुलाच्या बागेत रंगीबेरंगी फुलपाखरे जमा व्हावीत. त्याप्रमाणे रंगवून सजविलेली बैलं भासत असायची. एकदाची मिरवणुकीला सुरुवात व्हायची. मिरवणूक पहाण्यासाठी सभोवताली माणसांची गर्दी जमलेली. मारुती आणि लक्ष्मीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून ढोल, तासें, सनई, चौघडयाच्या गजरात, फटाक्यांच्या आवाजात बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघायची. यावेळी मुंबईकर मंडळी आणि वाडीतील तरूण मंडळी आपापल्या तालात नाच धरायची. अधून मधून पावसाच्या जलधारा बळीराजाच्या नंदिवर पावसाचा अभिषेक करायच्या. आपल्या बैलाचा रूबाब पाहून शेतकरी राजा जाम खुष व्हायचा. आणि वर्षभर केलेल्या ढोर मेहनतीला विसरून जायचा.
मिरवणूक संपल्यावर बैलजोड्या आपापल्या घरापुढे अंगणात यायच्या. मग घराची मालकीण ओवाळणीचे ताट घेऊन ओसरीवर उभी असायची. तिच्या डोळ्यात आनंदाचं पाणी उभे राहायचे. बैलांची पूजा करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जाई. अशीच आमच्या संसारात आम्हाला साथ ध्या. म्हणून बैलांना प्रार्थना केली जायची. मुकी जनावरं ही आपल्या मालकीणीच्या डोळ्यातले पाणी पाहून हंबरून आवाज द्यायची. नकळतपणे त्याच्याही डोळ्यात पाणी यायचं. सणच आहे तसा. मुक्या प्राण्याचा जीव आपल्यासारख्या कळत्या सवरत्या माणसावर लागतो तेव्हा फक्त भाषा ही संवादाची नसते. तेव्हा आपणही मूक होवून जातो. हा प्रसंग सगळ्यांच पारणे फेडणारा असतो.
तर असा हा सार्वजनिकरित्या साजरा केला जाणारा बेंदूर सण शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा असतो.
इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. आपल्या पूर्वजांना ठाऊक असावे, कि आपली पुढची पिढी ही आपले सणवार, रीतिरिवाज, व्यवस्थित साजरे करील की नाही. जितराबं पाळणे त्यांना जमेल की नाही. आणि म्हणूनच त्यांनी दावणीच्या जिवंत बैलांबरोबरच निर्जीव असणाऱ्या कुंभारी बैलांची पूजा ही आपल्या देव्हाऱ्यात करायला सुरुवात केली असावी. जेणेकरून दावणीला जिवंत बैल राहिले नसले तरी निदान कुंभारी बैलांची तरी पूजा देव्हाऱ्यात केली जावी. आणि पूर्वजांचे भाकीत आज सत्यात उतरताना दिसते आहे. आज दावणीला बैलं राहिली नाहीत. अपवाद सोडले तर कित्येकांनी कुंभारी बैलं आपल्या देव्हाऱ्यात पूजलेत की नाहीत. ही शंकाच आहे. एकवेळ अशी होती. ज्यांना जमीन जुमला नव्हता ते भूमिहीन लोकं ही मोठ्या श्रद्देने बेंदरासारखे सण साजरे करत असंत. कारण त्यांना चांगलेच ठाऊक होते. की शेतकरी जगला तरच आपण ही जगू. कारण त्याने पिकविले तरच आपणास खायला मिळणार आहे. त्यासाठी शेती बरोबरच शेतकरी ही टिकला पाहिजे. एवढेच बेंदूर सणाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.
#🌹☕️ गुड मॉर्निंग स्पेशल ☕️🌹 #बेंदूर# महाराष्ट्रीयन बेंदूर# बैलपोळा
#💐महाराष्ट्रीय बेंदुर सणाच्या खूप खुप शुभेच्छा💐 #आपली संस्कृति आपले संस्कार #☞★Post आवडल्यास नक्की लाइक❤❤
☞★➡️ फाॅलो करा 🙏🏻
☞★❤ लाईक ☑ कॉमेंट्स
☞★*⃣ टॅग 👍
☞★🔃 share करा










