श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
ShareChat
click to see wallet page
@266210066
266210066
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
@266210066
शेतकर्‍यांसाठीचा माहितीचा खजिना👌
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓 *🍇भविष्यात शेतीसाठी मोठा धोका-जमीनीची उत्पादकता कमी होणे🍇* *🌽दरवर्षी जमीनीची उत्पादकता सतत कमी होत आहे.व त्यामुळे आपण सतत रासायनिक खतांचा वापर वाढवत आहोत.त्यामुळे आपला रासायनिक खतांचा खर्च वाढत आहे.आता तर रासायनिक खतांच्या किंमती जास्त वाढल्याने आपल्या उत्पादन खर्चात जास्त वाढ झाली आहे.✅😢😢रासायनिक खतांच्या असंतुलीत वापरामुळे व जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने रासायनिक खतांची उपलब्धता फारच कमी होत आहे.त्यामुळे जास्त खर्च करूनही उत्पादन वाढत नाही.याउलट रासायनिक खते पिकांना उपलब्ध न झाल्याने जमिनीत अन् उपलब्ध स्वरुपात पडुन आहेत.त्यामुळे आपली जमिनीची प्रत खराब होत आहे.जमीन कडक होत आहे,जमिनीचा पाण्याचा निचरा कमी होत आहे.जमिनीचा सा मु वाढत आहे.शेतीचा उत्पादन खर्च वाढुन उत्पादन कमी होत आहे,"उत्पन्न"कमी होत आहे.जमिन खराब होत आहे.असा सर्व बाजुंनी शेतकऱ्यांना नुकसान होत आहे.त्यावर उपाय योजना करण्यापेक्षा जास्त उत्पादन घेणेसाठी स्पर्धा लागली आहे.याबाबत शेतकरी जागृत नाही.इतकेच काय शासन,कृषी विद्यापीठे,कृषी शास्त्रज्ञ जागृत नाहीत.जमिनीचा महत्वाचा घटक असलेली जमिनीची माती,त्याची प्रत यावर सर्वांचे दुर्लक्ष आहे.व शेतकरी दिवसेंदिवस जास्त उत्पादन घेणेसाठी या दुष्टचक्रात फसत आहे.बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही.किंबहुना बाहेर पडण्याचा विचारही करत नाही.🌻* *🌾जमिनीत पिके घेतांना कोणतेच पिक, आपण दिलेली रासायनिक खते,सेंद्रिय खते अन्न म्हणुन घेत नाहीत.त्याचे रुपांतर झाले तरच ती खते पिक घेऊ शकते.जसे आपण गहु,ज्यारी, बाजरी, तांदुळ, भाजीपाला पिकवितो,तो आपण सरळ खाऊ शकत नाहीत.ज्यारी बाजरी,गहु दळुन भाकर, पोळी बनवावी लागते.भाता पासुन तांदुळ तयार करुन भात,खिचडी तयार करुन आपण खाऊ शकतो.भाजीपाला पासुन भाजी तयार करुन,आपण जेवन करतो.तसाच प्रकार पिकांचा आहे.जमिनीत आपण दिलेली सर्व प्रकारची खते पिकांना उपलब्ध करुन ध्यावयाचे काम जमिनीत असलेली जिवाणु करतात.ते पिकांचे स्वयंपाकी आहेत.त्यांनी जेवन तयार करुन दिले,तरच पिके खाऊ शकतील.अन्यथा आपण दिलेली खते जमिनीतच पडुन राहुन आपले नुकसान करत राहतात.🌻* *🌾जमीनीत जिवाणुंची उपलब्धता ही जमीनीच्या"सेंद्रिय कर्बावर"अवलंबुन आहे.व नेमका आपला सेंद्रिय कर्ब दरवर्षी कमी होत आहे.जिवाणुंचे खाद्य सेंद्रिय कर्ब आहे.ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त आहे (१%पेक्षा जास्त),त्या जमिनीत जिवाणुंची संख्या जास्त असते.व त्या जमिनीची सुपीकता जास्त.ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी,त्या जमिनीत जिवाणुंची संख्या कमी व त्यामुळे त्या जमिनीची सुपीकता कमी.🌻* *🌾पुर्वीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांकडे गुरे ढोरे जास्त प्रमाणात होते.त्यामुळे शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर होता.सहसा वर्षातुन एकच पिक घेतले जावयाचे.जमिन पडीत ठेवली जावयाची.यामुळे जमीनीचा सेंद्रिय कर्ब जास्त राहावयाचा.जमिनीची उत्पादकता चांगली राहावयाची.आता सेंद्रिय खतांचे प्रमाण कमी झाले आहे.वर्षातुन दोन,तीन पिके घेतली जातात.जास्त उत्पादनाची संकरीत पिके घेतली जातात,जमीनीला विश्रांती नाही.यामुळे जमीनीचा सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे.व हे उलटे चक्र सतत सुरू आहे.याचे विपरीत परिणाम आपल्याला मिळत आहेत.व हे प्रमाण भविष्यात कमी होण्याऐवजी जास्त होणार आहे.😢😢* *🌾जमीनीचा सेंद्रिय कर्ब वाढविणयाचा उपाय मी एक वर्षापुर्वी टाकलेल्या पोस्ट मध्ये दिलेला होता.तो सोबत जोडलेल्या लिंक नुसार आहे.* https://m.facebook.com/story.php?story_fbid=750897505875474&id=100028656939266 #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी 🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
#🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ !! पिकांच्या संतुलित पोषणातील महत्त्वाचे घटक व विद्राव्य खतांचा योग्य वापर !! :- अन्नद्रव्ये पिकांना पुरेशी आहे‏त किंवा नाहीत हे‏ पाह‏ण्यासाठी मातीचे रासायनिक पृथ:करण गरजेचे आहे‏. पानांचे, खोडांचे किंवा मुळांचे पृथ:करण करून अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेविषयी माहि‏ती मिळ‎वता येते. या माहि‏तीच्या आधारे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्याने पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये पुरविली जाऊ शकतात. माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास संतुलित पीक पोषण करता येते. वनस्पती, पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण केवळ मुळांद्वारे करते. मोठ्या मुळांचा उपयोग झाडाला आधार देण्यासाठी तसेच झाडाने तयार केलेल्या अन्नाचा आणि पाण्याचा साठा करण्यासाठी होतो. जमिनीच्या गुणमधर्मानुसार अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेमध्ये बदल होत असतो. प्रामुख्याने अन्नद्रव्यांचे वर्गीकरण मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या दोन विभागांमध्ये केले जाते. अ) मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये :- A) मुख्य अन्नद्रव्ये :- १) कर्ब २) नत्र ३) स्फुरद ४) पालाश ५) कॅल्शिअम ६) मॅग्नेशिअम ७) गंधक B) सूक्ष्म अन्नद्रव्ये :- १) लोह २) मँगनीज ३) जस्त ४) तांबे ५) बोरॉन ६) क्लोरीन ७) मोलाब्द ८) निकेल ब) अन्नद्रव्यांचे संतुलन :- १) पिके निरोगी राह‏ण्यासाठी १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी एखादे जरी अन्नद्रव कमी असले तरी पिकांची वाढ निरोगीपणे होऊ शकत नाही. पिकांना सर्व अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होत असेल, पुरेसा सूर्यप्रकाश आणि जमिनीमध्ये योग्य ओलावा असेल तर पिकांची वाढ पूर्णत: होऊन पिके हि‏रवीगार दिसतात. २) पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांमधून (कंपोस्ट, गांडूळ‎ खत, हि‏रवळीचे खत, वेगवेळ्या प्रकारच्या पेंडी, मासळीचे खत इ.) आणि असेंद्रिय/रासायनिक खतांद्वारे केला जातो. रासायनिक खतांमध्ये मोजकेच (एक, दोन, तीन) अन्नद्रव्ये असतात. परंतु त्यांचे प्रमाण जास्त असते. ३) सेंद्रिय खते जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये चांगले परिणाम घडवून आणतात. ४) रासायनिक खते खरेदी करताना खतांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण पिकांच्या अवस्थेमध्ये गरज असलेले अन्नद्रव्ये आणि किंमत यांचा विचार करावा. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खते उपलब्ध असतात. त्यामध्ये १७:१७:१७ किंवा २०:२०:२० किंवा १९:१९:१९ असे अंक असतात. हे‏ अंक अन्नद्रव्यांचे खतामध्ये असलेले शेकडा प्रमाण दर्शवितात, म्ह‏णजे अनुक्रमे १७ टक्के नत्र, १७ टक्के स्फुरद व १७ टक्के पालाश किंवा २० टक्के नत्र, २० टक्के स्फुरद व शून्य टक्के पालाश. त्याचप्रमाणे इतरही बरीच रासायनिक खते बाजारामध्ये उपलब्ध आहे‏त. ५) विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे किंवा तुषार सिंचन किंवा पाण्यासोबत विरघळून दिली जातात. भाजीपाल्यासाठी पूर्वलागवडीच्या वेळेस विद्राव्य खतांच्या द्रावणात रोपांची मुळे बुडवून लावली जातात. जस्त व लोह पानाद्वारे शोषली जातात. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिल्यास लगेचच फवारणी केल्यास विद्राव्य खते प्रभावीपणे कार्य करतात. रासायनिक खते प्रामुख्याणे दाणेदार आणि द्रवरूप स्वरूपात मिळ‎तात. ६) दाणेदार खते जमिनीमध्ये दिली जातात. खते देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे‏त, उदा. बांगडी पद्धत, ओळीतून किंवा फेकुनही दिली जातात. खते दिल्याबरोबर ती जमिनीमध्ये मिसळ‎ली गेली पाहि‏जेत, त्यावेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा अन्यथा खतांची उपयोगीता कमी होते. ७) दाणेदार खतामधील काही खते पूर्णत: पाण्यात विद्राव्य असतात, उदा. युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश इ. अशी खते ठिबक संचाद्वारे दिली जातात. ८) काही खते अविद्राव्य असतात. अशी खते ठिबक सिंचनाद्वारे देऊ नयेत. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त खते देऊ नयेत. पिकांच्या उत्तम वाढीसाठी विद्राव्य खतांचा योग्य वापर :- पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. विद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण्यायोग्य खतांचे द्रावण तयार केले जाते. ही खते पाण्यामध्ये १०० टक्के विरघळणारी असतात. विद्राव्य खते ही घनरुपाप्रमाणे द्रव्ररूपातसुद्धा उपलब्ध आहेत. पिकांना ठिबक संचाद्वारे विद्राव्य खतांचे द्रावण पाण्याबरोबर दिले जाते. या पद्धतीत पिकांच्या मुळांशी गरजेप्रमाणे रोज किंवा दिवसाआड खते दिली जातात. विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे, सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळवून दिली जातात. भाजीपाल्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांची मुळे विद्राव्य खतांच्या द्रावणात बुडवून लावली जातात. अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात. A) प्रमुख विद्राव्य खते :- १) १९:१९:१९ व २०:२०:२० :- वरील ग्रेडच्या खतांना स्टार्टरग्रेड म्हणतात. यात नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो. २) १२:६१:०० :- वरील ग्रेडच्या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यात अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढ, फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो. ३) ००:५२:३८ :- वरील ग्रेडच्या खतास मोनो पोेटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापुर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते. ४) १३:००:४५ :- वरील ग्रेडच्या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्या नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात. ५) ००:००:५०:१८ :- वरील ग्रेडच्या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरुपातील गंधकही असतो. पक्वतेच्या हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचे नियंत्रण होऊ शकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते. ६) १३:४०:१३ :- पिकांला पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फूलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते. ७) कॅल्शियम नायट्रेट :- मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो. ८) २४:२८:०० :- यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो. ​ B) फर्टिगेशनचे फायदे :- १) मजूर, यंत्रसामग्री, इंधन, वीज, पाणी व खतांची बचत होते. २) पिकाच्या गरजेनुसार योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्य वेळी देता येते. ३) विद्राव्य द्रवरूप खते बहुतांशी आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी, सोडियम व क्लोरीन मुक्त असल्याने जमिनीच्या पाण्याचा व खतांचा कार्यक्षमतेने वापर झाल्याने जमिनीची सुपीकता टिकते, उत्पादनात चांगली वाढ होते. ४) विद्राव्य खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात दिल्यामुळे त्यांचे शोषण कार्यक्षमरीत्या होते. ५) पिकांची वाढ जोमाने होते, रोगास बळी पडत नाही, साहजिकच बुरशीनाशकावरील खर्च कमी होतो. ६) पिकाच्या वाढीनुसार खते देता येतात. खतांची कार्यक्षमता वाढल्याने उत्पादनात वाढ होते. ७) खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात. ८) विद्राव्य खते ठिबक सिंचन आणि फवारणीद्वारे देता येतात. C) विद्राव्य खतांची फवारणी :- १) पाण्यात विद्राव्य खतांचा वापर फवारणीसाठी करता येतो. साधारणत: पानांत असलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवर पिकांची उत्पादन क्षमता ठरते. योग्य उत्पादनासाठी पानांतील अन्नद्रव्याची ही पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. त्यासाठी संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पीकवाढीच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेच्या गरजेनुसार मिळणे गरजेचे आहे. २) शिफारशीत मात्रेत फवारणीमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन फळांचे वजन, आकार व प्रतीमध्ये चांगली वाढ होते. साठवणुकीत तसेच निर्यातक्षम उत्पादन राहिल्याने उत्पन्नातही वाढ होते. ३) विद्राव्य खते घन व द्रवरूप स्वरूपात उपलब्ध असून त्यांची वाहतूक, साठवणूक आणि वापर सोयीचा आहे. D) फवारणीतून विद्राव्य खते देण्याचा उद्देश :- १) पिकांना उदिप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढविण्याकरिता वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारणी केली असता उत्पादनात वाढ होते. २) अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊसमानामुळे जमिनीतील खते वाहून जातात. तसेच पाणी साचल्यामुळे मुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणी मधून खते दिल्यास ती पिकांना ताबडतोब उपलब्ध होतात. ३) जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे सायंकाळी खते दिल्यास पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात. पिके अवर्षण स्थितीत तग धरू शकतात. ४) किडी-रोगांमुळे पाने कुरतडली, खाल्ली जातात. पानांची जाळी होते. अशा वेळी फवारणीतून खते दिली असता नवीन पालवी फुटून पिके कार्यरत होऊ शकतात. ५) फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. परंतु अचानक निर्माण झालेल्या पानातील पोषण द्रव्यांची कमतरता भरून काढतात. ६) फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फलधारणा, त्यानंतर फळांची वाढ होण्यसाठी जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागातात अशावेळी फवारणीद्वारे दिलेली खते उपयोगी पडतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. E) फवारणीसाठी द्रावण तयार करताना घ्यावयाची काळजी :- १) पाण्यामध्ये खत विरघळवावे. खत पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे. २) कॅल्शियम जास्त असलेल्या पाण्यात थोडे गरम पाणी किंवा आम्लयुक्त पाण्याचा वापर करावा. अशा कॅल्शियमयुक्त पाण्यात कीटकनाशके, बुरशीनाशके, खते वापरण्याचे टाळावे. ३) बोर्डो किंवा लाईम मिक्चर साठवलेल्या डब्यात द्रावण तयार करू नये. ४) फवारणी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत करावी. F) फळबागेमध्ये विद्राव्य खते वापरण्याचे फायदे :- १) तीन ते चार वर्षे वयाच्या झाडांना वर्षभरात दोन वेळा (डिसेंबर-जानेवारी किंवा मे-जून) त्यांच्या वयानुसार (१० ते ४० किलो) तर त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना वर्षात एकदा बहारानुसार ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति झाड द्यावे. तसेच एक किलो निंबोळी पेंड प्रति झाड दरवर्षी फळ बागेस देण्यात यावी. २) ठिबक सिंचनाद्वारे दर दिवशी गरजेपुरतेच पाणी दिले जाईल अशी व्यवस्था करावी, अति पाण्याचा वापर टाळावा. ३) खताचा वापर ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने त्याची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते. त्यामुळे फळ पिकाचे अधिक उत्पादन आणि गुणवत्ताही वाढते. ४) ब­ऱ्याच वेळा अन्नद्रव्यांची फळपिकांसाठी उपलब्धता ही जमिनीचे तापमान, ओलावा, हवामानातील बदल, सामू, चुनखडीचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इत्यादी बाबींवर अवलंबून असते. 🙏🙏
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी 🙏🙏 ✔️घनजिवामृत तयार करण्याची पहिली पद्धत : कृतीः घनजिवामृत तयार करताना एकरी शंभर किलो शेण घ्यावे. देशी गाय 50 कि.लो. अधिक बैलाचे 50 कि.लो. किंवा 50 किलो. देशी गाय अधिक 25 किलो बैल, 25 किलो म्हशीचे शेण किंवा 50 किलो देशी गायीचे शेण अधिक 50 किलो. बकर्‍या, मेंढयाच्या लेंडया यातील कोणताही एक प्रकार घेणे. (जर देशीगाईला नैसर्गिक चारा खाऊ घातला तर तिचे शेण 21 दिवस ताजे राहाते पण रासायनिक चारा खाऊ घातला तर तिचे शेण 7 दिवस ताजे राहाते) ओलाव्यासाठी पाणी वापरावे. वरील पैकी कोणत्याही शेणाच्या मिश्रणात 1 किलो. गुळ किंवा 2.लि.उसाचा रस, किंवा 1 किलो. पिकलेल्या गोड फळांचा गर 1 किलो.यातील कोणतेही एक. अधिक  बेसन पिठ, हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळावे व त्याचा ढिग सावलीत लावावा.तो (थंडी असेल तर गोणपाठाचे पोते झाकावे) 48 तास ठेवा. 48 तासानंतर उन्हात पातळ थर देऊन वाळवावा. दोन वेळा खालीवर करा. संपूर्ण वाळल्यावर ढेकळ मोगरीने फोडा. नंतर चाळणीने चाळावे. पोत्यात भरून ठेवावे. जमीनीवर ठेवू नये. ही पोती सावलीत ठेवावीत. हे तयार घणजिवामृत 1 वर्षापर्यत वापरता येते. ✔️.घनजिवामृत तयार करण्याची दुसरी पद्धत : कृती एकरी दोनशे किलो उन्हात चांगले वाळलेले शेण घ्या. ते मोगरीने फोडून बारीक करावे व चाळून घ्यावे. त्यावर द्रव जिवामृत 20 लि. शिंपडावे. नंतर फावडयाने त्याला चांगले मिसळावे. नंतर सावलीत त्याचा ढिग लावावा. (थंडीची लाट असेल तर बारदाण्याणे झाकावे.) पाऊस व सूर्य प्रकाश पडू नये अशा पद्धतीने 48 तास सावलीत ढिग ठेवावा. नंतर उन्हात वाळवावा. खालीवर करा. ढेकळे असल्यास बारी करा. व पोत्यात भरून सावलीत साठवून ठेवा. एक वर्ष वापरता येते. ✔️.घनजिवामृत करण्याची तिसरी पद्धत ः कृती ः- गोबर गॅस स्लरिचा उपयोग करून. गोबर गॅस स्लरीचा उपयोग जिवामृत करून नका. कारण गोबर गॅस स्लरीत हवेशिवाय जगणारे जिवाणू असतात. आपणास हवेवर जगणारे जिवाणू हवेत. पण घनजिवामृतात गोबर गॅस स्लरीचा उपयोग करायचा असेल तर त्यासाठी गोबर गॅस स्लरी उन्हात वाळवा. ढकेळ बारीक करा. आणि त्या पैकी 50 किलो. वाळलेल्या गोबर गॅस स्लरीचे पावडर 50 किलो देशी गायीचे शेण अधिक 1 किलो. गुळ अधिक 1 किलो बेसन पिठ यात टाकावे. जास्त घट्ट असेल तर थोडे गोमुत्र मिसळावे. व ढिग करून 48 तास सावलीत ढिग लावावा. 48 तास नंतर हे सर्व मिश्रण उन्हात वाळवावे, ढेकळ फोडून चाळणीने चाळुन पोत्यात भरून सावलीत ठेवावे. एक वर्षापर्यंत वापरता येईल. धन्यवाद. 🙏🙏
#🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा*. 1. दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा (नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५) (अमोनियम फॉस्फेट २८:२८:०) 2. स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट 3. डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट 4. स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा. 5. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा. (निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया). 6. हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात. 7. साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खत (बायो अर्थ कंपोस्ट) चा वापर करावा. *रासायनिक खते कशी द्यावीत::-* 1. साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत. 2. नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाच अवस्था लक्षात घेऊन २ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत. 3. चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत. 4. नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत. 5. पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी बागेची लागवड व निगा* भाज्यांचे ३ हंगामात वर्गीकरण करण्यात येते. 1.पावसाळी किंवा खरीप हंगाम - जून ते सप्टेंबर - सर्व पालेभाज्या, वाटाणा, श्रावण घेवडा, वाल, चवळी, तांबडा भोपळा, दुधीभोपळा, दोडका, पडवळ, कारली, गवार, घोसाळी, वांगी, टोमेटो, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, मुळा, गाजर, बटाटा 2.हिवाळी किंवा रब्बी हंगाम - ऑक्टोबर ते जानेवारी - कोबी, फ्लॉवर, नवलकोल, गाजर, पालक, टोमेटो, कोथिंबीर, मेथी, चाकवत, कांदा, लसूण, वाटाणा, मुळा, भेंडी, बटाटा 3.उन्हाळी हंगाम - फेब्रुवारी ते जून - भेंडी, गवार, कांदा, गाजर, मुळा, वांगी, मिरची, टोमेटो, घेवडा, दुधीभोपळा, तांबडा भोपळा, कारली, दोडका, काकडी, पालक, मेथी, कोथिंबीर, ढेमसे काही भाज्यांची लागवड रोपे तयार झाल्यावर कायम जागी स्थानांतरीत (transplant) करून केली जाते. साधारणपणे अश्या भाज्यांचे बी खूप बारीक असते उदा. वांगी, टोमेटो, मिरची, कांदा, कोबी, फ्लॉवर, मुळा, नवलकोल. पालेभाज्यांचे बी ओळीने पातळ पेरावे. कोथिंबीर बी पेरण्यापूर्वी १२ तास पाण्यात भिजवावे, नंतर काढून १२ तास उबदार जागेत ठेवावे म्हणजे उगवण चांगली व लवकर होते. पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची वरचेवर खुडणी करून बरेच दिवस पीक घेता येते. एका वाफ्यातून पालेभाजी संपूर्ण काढून घेतल्यावर परत खणून ८-१० दिवसांनी पुन्हा पालेभाजी घेता येईल. अशा वेळी मेथीशिवाय कोणत्याही प्रकारची भाजी काढून घेतल्यावर तेथे मेथी घ्यावी. मेथीच्या मुळावर हवेतील नायट्रोजन शोसून घेण्याच्या गाठी येत असल्याने जमिनीचा पोस सुधारण्याच्या कामी फार चांगला उपयोग होतो. धन्यवाद. 🙏🙏
#🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ या संदर्भात एक माहिती पाठवत आहे. कृपया चालत नसलेस डिलिट करू शकता, पण उपयोगी वाटते. *चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत!* *✒️सतीश खाडे* *🔹होय, बरोबर शीर्षक वाचलंत... ही काही जादू किंवा चमत्कार नाही. सध्या जगभरात चर्चेचा विषय झालेली नदी पुनरुज्जीवनाची ही सत्यकथा आहे. तर आज पाहूयात चौदा लांडग्यांनी कशी केली नदी जिवंत..* अमेरिकेतील येलो स्टोन नॅशनल पार्कमधली ही नदी गेल्या शंभर वर्षांत हळूहळू आटत गेली आणि आता ती फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडीच पडू लागली. भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती. शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत होती. बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याची कारणे आणि तिला पुन्हा वाहते करण्यासाठीच्या उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या. त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसांशी असल्याचे लक्षात आले. येलो स्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्‍चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यात विस्तारलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे अमेरिकाच नव्हे, तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मानले जाते. तेथील वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते. गेल्या शतकाअखेर म्हणजे १९०० पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते. लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क नदी आटली होती. पण तुम्ही म्हणाल 'हे कसं शक्य आहे?' तर हे रहस्य पुढे उलगडत जाईल.... *...अन् नदी जीवंत झाली* ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार १९९५ मध्ये येलो स्टोन पार्कच्या जंगलात फक्त १४ लांडगे आणून सोडण्यात आले. आणि पुढच्या पंचवीस वर्षांत परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलत गेली. २०१९ मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले. तिथे एक समृद्ध जैवविविधतेचा मोठा खजिनाच तयार झाला. तर त्याच झालं असं, की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली. अनेक वर्षे जंगलात हरणांचेच राज्य होते. हरणांना कुणीही भक्षक नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची संख्या बेसुमार वाढत होती. याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे, गवत फस्त करण्याचेच काम केले होते. गवताबरोबरच जंगली झाडे, त्यांना आलेली कोवळी पाने खाण्याचा सपाटाच लावला होता. थोडे थोडे करून पाणलोटातील सगळं जंगल त्यांनी बोडखं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं कारण होतं. कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण जवळपास शून्यच झाले होते. पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हरणांची संख्या फार कमी झाली नाही. परंतु या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या काही मर्यादित भागात राहू लागली. हळूहळू लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची पैदासही कमी होऊ लागली. जंगलातील ठरावीक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत्र भागातील गवत आणि झाडं खाणं थांबलं. त्यामुळे हरणे राहत असलेला जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थित सुरू झाली. अगदी सहा-सात वर्षांतच जंगल उत्तम फोफावलं. जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. मातीची धूपही थांबली. धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याच प्रमाण कमी झाले. मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचे खडक पाण्याने भरू लागले. पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले. हळूहळू चार महिन्यांवरून सहा महिने नदी वाहू लागली. पुढे हळूहळू सहा महिन्यांवरून आठ महिने आणि नंतर बारमाही वाहू लागली. नदी खळखळू लागली... आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळे काठांची झीज अन् पडझडही थांबली. *अन्नसाखळीचे महत्त्व...* आता जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले. त्यांना खाण्यासाठी बेडूक, सरडे आले. त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले. सरडे अन् सापांमुळे शिकारी पक्षीदेखील येण्यास सुरुवात झाली. अगदी सुवर्ण गरुडही तेथे आला. जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित पक्षीदेखील येऊ लागले. हजारो पक्षी इथे एकेका ऋतूत येऊन राहू लागले. या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्याची झाडं उगवली. या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली. नदीत शेवाळ आले, कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले, त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या. हळूहळू मासे आले. मासे आल्यामुळे मुंगसासारखा बिवरेज वा पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले. हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं, फांद्या टाकून बांध करू लागली. त्यांनी केलेल्या या सापळ्यांमध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली. अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच गेली. त्यामुळे बदकं आली, हेरॉन, बगळ्यांसारखी पक्षी आले. जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वलेदेखील आली. बेरीच फळे आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य. तिथे असलेल्या क्वायटीज या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं. त्यामुळे या रानकुत्र्यांचे भक्ष्य असलेले ससे आणि चिचुंदऱ्या यांची संख्या वाढत गेली. त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड, बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले. तसेच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावर ताव मारायला गिधाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी आले. हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे प्राणी. याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती अन् प्राणी सृष्टी पुनर्प्रस्थापित झाली. झाडं, गवतं, नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्नसाखळी तयार झाली. ती केवळ चौदा लांडग्यांमुळेच. हीच तर खरी गंमत आहे. म्हणजेच अन्न साखळीतील एक दुवा तुटल्यावर अगदी नदीसुद्धा आटू शकते. हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. ही गंमत जैवविविधता, निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे. नदीमुळे ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळे नदी, याचं उत्तर कोंबडी आधी की अंडे याच्या उत्तरासारखंच आहे, नाही का? निसर्गातल्या सगळ्यांच अन्नसाखळ्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत. माणसाच्या बेफाम अन् बेफिकीर वागण्याने पाणी प्रदूषणासोबतच विविध जल स्रोतांतील पाणी आटले आहे. यामुळे आपण अन्नसाखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केलेत, किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे (Food chain pyramid) नष्ट केलेत याची यादी मोठी आहे. यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाश ही ओढवून घेतला जात आहे. त्यातून वाचायचे असेल तर जैवविविधता, अन्नसाखळ्या यांचे आकलन आवश्यकच आहे. 🦋🦚🦃🐇🌳🌳🦜🦝🐟🐬 *(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या 'अभिनव जलनायक' पुस्तकाचे लेखक आहेत.)*
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी रोगा संभदीत जरा माहिती* हा रोग सर्व प्रथम एरोप मध्ये सन 1777 या कालखंडात प्रथम दिसला त्या नंतर हळू हळू सर्वत्र पसरत गेला. भारता मध्ये हा रोग सन 2006 पासून गहू आणि भात या पिका मध्ये दिसायला लागला. त्यानंतर सन 2017 पासून हा रोग भाजीपाला वर्गीय पिके जसे टोमॅटो यामधे दिसू लागला. हा रोग बुरशी जन्य असून त्यास इंग्रजी मध्ये yellow rust, brown rust, leaf rust असे ही म्हणतात याचा वर्ग Pucciniomycetes हा आहे.हा Pucciniaceae या बुरशी कुटुंबातील रोग असून यास बोटानिकल भाषेत Puccinia triticina असे म्हणतात.खरे तर या रोगावरती आपल्या भारतामध्ये 100% उपयोगी ठरेल असे एक पण बुरशीनाशक नाही आहे ही खर तर खुप चिंतेची गोष्ट आहे. United Kingdom या देशामध्ये या रोगा साठी bayer crop science चे AscraXpro हे परभावी बुरशी नाशक आले आहे तरी ते आपल्या भारत देशामध्ये कधी येणार ते आज सांगणे कठीण आहे. आपण हा रोग आल्या नंतर जास्त काही करू नाही शकत पण येण्या पासून नकीची वाचू शकतो त्या साठी काही उपायोजना खाली दिल्या आहेत. *गेरवा रोगवरती नियंत्रण* *1* योग लागवडीतील अंतर:- हा hybrid वाना मध्ये येणारा रोग असून दाट जागेवर खुप जलद गतीने पसरतो तरी या साठी लागवडी मधील अंतर 5 ft चा बेड आणि झाडानं मधील अंतर 2 ते 2.5 ft ठेवावे. *2* गेरवा या रोगा साठी प्रभावी अशी बुरशीनाशके :- या रोगावर 100% बुरशी नाशके आपल्या कडे नसली तरी triyzole या वर्गातील काही बुरशीनाशके 70% पर्यंत काम करण्यास सक्षम आहेत. जसे की पाहिले tebuconozole (folicure,nativo,bonus) दुसरे tricyclazole (sivic) तिसरे hexaconozol (contaf,taqat,avtar) आणि चौथे propiconozol (tilt) आणि पाचवे copper oxychloride(Blue copper) आणि copper hydroxide (kocide). *गेरवा रोगवरती काही फवारणी* पाऊस असतानाची फवारणी:- जसे सतत पाऊस असल्या मुळे अंतर प्रवाही बुरशीनाशके काम करत नाहीत अश्या परिस्थितीत दिवसामध्ये जेव्हा 1 तास 2 तास वेळ भेटेल तेव्हा *tilt 30मिली ते 50मिली+blue copper 400-500 ग्राम+silicon sticker* किंवा *indofil merger 300-400 ग्राम + tilt 30मिली ते 50मिली + slicon sticker* 200 लिटर मध्ये मिसळून फवारणी करावी. पाऊस नसतानाची फवारणी:- रोगाचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर आधी tilt ची फवारणी घावी नंतरच खालील फवारणी करावी. *1* bayer nativo 120 ग्राम + silicon mineral 300 ग्राम. *2* sivic 120 ग्राम + z78 किंवा antracol 500 ग्राम + silicon 300 ग्राम + steptrocyclin 24 ग्राम. *3* Bayer folicure 100-130 मिली + blue copper 500 ग्राम + steptocyclin 24 ग्राम. *4* syengenta filia 525se 250मिली + syengenta cuman L 500 मिली. 🙏🏻 जय जवान. जय किसान🙏🏻
#🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ वेगवेगळी रचना, जैव खतांचा वापर आणि मातीतील सूक्ष्मजीवांचा प्रतिसाद !अधोगती माती पर्यावरणाच्या ढासळत्या स्थितीमुळे नवीन फलन पद्धती वापरणे आवश्यक होते, ज्यामुळे जमिनीच्या जैविक कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. निकृष्ट मातीत विशेष लक्ष दिले पाहिजे. युरोपच्या दक्षिणेकडील आणि मध्य आग्नेय भागात एकूण क्षेत्रफळाच्या ~25% उच्च आणि ऱ्हासास अत्यंत उच्च संवेदनशीलता असलेल्या जमिनी आहेत. मातीची रचना जिवंत माती मायक्रोबायोटासाठी परिस्थिती निर्माण करते. वालुकामय माती आणि वालुकामय मातीचे सुपिकीकरण प्रयोगशाळेवर आधारित अभ्यासाने मक्याच्या लागवडीखालील दोन प्रकारच्या मातीच्या (वालुकामय माती आणि वालुकामय माती) जैविक माती आरोग्य निर्देशकांच्या (सूक्ष्म जैव पदार्थ आणि त्यांच्या एन्झाईमॅटिक क्रियाकलाप) प्रतिसादांची चाचणी केली: सूक्ष्म जैव खते (जीवाणू किंवा बुरशी) सह दुरुस्त केलेली 2 भिन्न खनिज खते, दोन डोसमध्ये (इष्टतम आणि कमी), दोन बिंदूंवर (अर्जानंतर एक आठवडा आणि सहा महिने). वेगवेगळ्या मातीच्या पोतांमधील सूक्ष्मजीव दोन्ही प्रकारच्या मातीत तपासलेल्या सूक्ष्मजीवशास्त्रीय निर्देशकांचा प्रतिसाद भिन्न होता. वालुकामय माती पेक्षा जास्त जैविक क्रियांनी वालुकामय मातीचे वैशिष्ट्य होते. जैव खतांसह खनिज खतांचा वापर केल्याने दोन्ही प्रकारच्या मातीत सूक्ष्मजीवशास्त्रीय क्रियाशीलता वाढली, जरी मिश्रित पदार्थांच्या कमी डोसमध्ये वापरण्यात आले, तथापि वेगवेगळ्या मातीच्या रचनांना डोस अनुकूल करणे आवश्यक आहे. फर्टिझेशनच्या प्रतिसादाची वेगवेगळी वेळ देखील विचारात घेतली पाहिजे. माती परिसंस्थेतील सूक्ष्मजीव समुदाय सेंद्रिय पदार्थांचे परिवर्तन आणि पोषक सायकलिंगमध्ये त्यांच्या भूमिकेमुळे मातीच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे आहेत. बायोट्रेक्स तंत्रज्ञान हे मातीच्या आरोग्यासाठी एक विश्वासार्ह जैविक सूचक आहे, ज्यामुळे एजी-इनपुटचा मातीच्या सूक्ष्मजीवांवर होणारा परिणाम दिसून येतो. 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🌱मी शेतकरी पेपर कसा वापरावा कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी बांधवांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील. मल्चिंग पेपर च्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपर च्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही.तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होते. दर्जेदार उत्पादन मिळते,यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो. मल्चिंग च्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणे शक्य आहे. यामध्ये भाजीपाला पिकांपासून ते फुल पिकांपर्यंत सगळी पिके मल्चिंग पेपर च्या मदतीने घेता येतात. मल्चिंग पेपर च्या मदतीने कोणत्या पिकांची शेती करता येऊ शकते? भाजीपाला पिके मिरची, वांगी, फ्लॉवर, बटाटा, टोमॅटो, भेंडी, मटार (ग्रीन पिज), ढोबळी मिरची, काकडी, दोडका, ढोबळी मिरची फळपिके पेरू, लिंब, किनोव, डाळिंब, केळी, सुपारी, आलुबुखार, जर्दाळू, पीच, संत्र, कलिंगड धान्य पिके मका, तांदूळ गळीत पिके शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन नगदी पिके ऊस, कापूस मसाला पिके हळद, काळी मिरी, आले फुल पिके झेंडू, जरबेरा, सोनचाफा, मोगरा, शेवंती, कार्नेशन, गुलाब, गुलछडी, ऑर्किड आणि इत्यादी पिकांनुसार मल्चिंग पेपर कसा वापरावा? पिके मल्चिंग पेपर अंथरण्याची पद्धत भेंडी ४ फुटांवर दोन ओळी बेड वांगे ५ फूट बेड टोमॅटो ८ फूट जोडओळ लागवड ढोबळी मिरची ५ फूट जोडओळ मिरची ५ फूट जोडओळ भुईमूग दोन ओळीतील अंतर-४ फूट कलिंगड ८ फूट अंतरावर अथवा जाडओळ अंतरावर दोन बेड मधले अंतर १५ फूट काकडी ५ ते ८ फूट बेड खरबूज ५ फूट सिंगल ओळ बेड, ८ फूट डबल ओळ बेड दोडका ५ ते ७ फूट मांडव मल्चिंग पेपरचे फायदे • बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते. • बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते. • खतांच्या वापरात बचत होते. कारण खतांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. • जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो. • वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही. • प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग दूर जातात. त्यांचे प्रमाण कमी होते. • जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. • आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते. • लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते. • पेपरखालील जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात. उगवण २-३ दिवस लवकर होते. • भुईमुगासारख्या पिकात मुळांवरील वरील गाठींचे प्रमाण वाढते. • सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते. पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.
#🌱मी शेतकरी #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ मशागत की नासधूस* शेती व्यवसायात सर्वात महत्त्वाची ही त्यासाठी लागणारी जमीन असते. मात्र या शेतजमिनीकडेच सातत्याने दुर्लक्ष होते. केवळ उत्पादनाकडे लक्ष दिल्याने काही वर्षांतच या जमिनी क्षारपड होऊन शेतीसाठी नापीक होतात. *जगभर वेगाने पसरत असलेल्या या समस्येविषयी..* हरितक्रांतीपूर्वी दोन बैल नांगराने जमीन कसायचे. आता ४५ हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरने हे काम केले जाते. निचऱ्यासाठी नांगराने चर खोदावे लागतात. ९० सेंटिमीटरवरील क्षारतळी सबसॉयलरने फोडतात. त्यासाठी ७० हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टर लागतो. अशा अवजाराने जमिनीतील सेंद्रीय कर्बाची वाट लागते. सूक्ष्म जिवाणूंचे ऊर्जा स्रोत सेंद्रीय कर्ब आहे. सूक्ष्म जिवाणू जमिनीत मूलद्रव्याचे स्थिरीकरण करतात. तसेच ती उपलब्धीकरणही करतात. परिणामी खताची कार्यक्षमता वाढते. यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. सबब सेंद्रीय पदार्थापासून तयार होणाऱ्या सेंद्रीय कार्बनला जमिनीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या जमिनीची विद्युतवाहकता चार डीसी सायमन प्रतिमीटरपेक्षा जास्त असते, मुक्त सोडिअमचे प्रमाण १५ टक्के असते. जमिनीचा सामू साडेआठपेक्षा कमी असतो. त्यांना क्षारयुक्त जमिनी असे संबोधले जाते. अशा जमिनीत पीक उत्पादनात घट येते. जगात २० टक्के लागवडयोग्य क्षेत्र क्षारपड आहे. बागायती क्षेत्रापैकी ते ३० टक्के आहे. प्रतिवर्ष त्यात दहा टक्के वाढ होत आहे. सन २०५० पर्यंत ५० टक्के क्षेत्र जगात क्षारपड बाधित होईल. याची प्रमुख कारणे कमी पर्जन्यमान, उष्णतेमुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन, जमीनअंतर्गत खडकापासून क्षार निर्माण करणारी क्रिया, क्षारपाड पाण्याचा सिंचनासाठी वापर, तसेच वारंवार जमीन उघडी करण्याची मशागतीय पद्धती ही आहेत. भारतात दर वर्षी १५ लाख हेक्टर बागायती क्षेत्र क्षारपड होते. कोरडवाहूत एक ते दोन टक्के क्षेत्र दर वर्षी क्षारपड होत आहे. भारतात ६.७४ मिलिअन हेक्टर क्षेत्र क्षारपड आहे. हे क्षेत्र पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, तसेच राजस्थानमध्ये विखुरलेले आहे. गुजरात व राज्यस्थानचा शुष्क प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या निम्न शुष्क प्रदेशातही क्षारपड जमिनी आहेत. हे क्षेत्र २०२५ पर्यंत ११.७ मिलिअन हेक्टर होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात १२ लाख हेक्टर क्षेत्र क्षारपड व चिबड आहे. देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात १७ जिल्हे क्षारपाडपणाने व्यापले आहेत. पश्चिम महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. ज्यातील सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव, वर्धा, अकोला, अमरावती, औरंगाबाद, परभणी, नांदेड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे हे जिल्हे क्षारपाडपणाने व्यापले आहेत. *क्षारपड होण्याची कारणे* १) सिंचनासाठी पाण्याचा अवास्तव वापर २) खरेदीची शाश्वतता असल्यामुळे उसासारखी बारमाही पाण्याचे (पाट पाण्याद्वारे) पीक घेणे ३) बदलत्या वातावरणामुळे पावसाचे कमी /जास्त प्रमाण ४) उष्ण व कोरडे हवामानामुळे बाष्पीभवनाचा वेग अधिक ५) निचरा प्रणालीचा वापर न करणे. ६) क्षारयुक्त पाण्याचा वापर ७) जमिनीत निचराप्रणाली सुधारणाऱ्या स्पेक्टाटाइट या खनिज मातीचा अभाव. ८) नैसर्गिक निचरप्रणालीस बाधा निर्माण होणे. ९) सेंद्रीय खताचा वापर न करणे. १०) मुक्त सोडिअमचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक होणे. ११) सेंद्रीय पदार्थाची कमतरता. *क्षारपडपणाचे दुष्परिणाम :* पिकाच्या मुळाभोवती आस्मोटिक दाब वाढतो. पिकाची वाढ खुंटते. मूळ अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थित शोषण करू शकत नाहीत. सेंद्रीय पदार्थाच्या कमतरतेमुळे जमिनीत कमी सेंद्रीय कर्ब तयार होतो. रायझोबिअम जिवाणूद्वारे निर्मित नायट्रोजनएज विकरावर विपरीत परिणाम होतो. परिणामी नत्र स्थिरीकरण व्यवस्थित होत नाही. त्यांच्या गाठीची संख्या वाढते. मात्र वाढ होत नाही. तसेच पूर्वी निर्माण झालेल्या गाठीची कार्यक्षमता घटते. ऑझेटोबॅक्टरसारखे नत्र स्थिर करणारे जिवाणू यास सहनशील असतात. ते निर्माण करत असलेल्या ऑक्झिन, जिबरलीन, सायटोकाइनिन या संप्रेरकामुळे क्षारपाडपणाचा विपरीत परिणाम पिकावर कमी होतो. क्षारपाडपणात जमिनीत फॉस्फरसची उपलब्धता कमी होते. तो द्रव स्वरूपातून घनस्वरूपात रूपांतरीत होतो. तसेच ज्या वेळेस क्लोराईड व सल्फेटचे क्षार अधिक असतात त्या वेळेस फॉस्फरसचे स्थिरीकरण होते. क्षारपडपणात पोटॅशिअमचे शोषण कमी होते. तसेच निचऱ्याद्वारे निघून जातो. परिणामी उपलब्धता कमी होते. या व्यतिरिक्त लोह, मंगल, झिंक, बोरॉन इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्ये उपलब्ध स्वरूपात मिळू शकत नाहीत. याचा विपरीत परिणाम वाढीवर, पक्वतेवर,फळधारणेवर, रंग व स्वाद, तसेच गोडीवर होतो. बियांची उगवणक्षमता क्षारपडपणामुळे कमी होते. बियाणे उगवणीचा कालावधी वाढतो. उगवलेली रोपे खुजी राहतात. पानावर निळसर छटा दिसते. काही प्रमाणात कडाही जळतात. पुंकेसर फिलामेंटच्या लांबीवर परिणाम होतो. लघुबीज गुणन होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. पेशीचे निर्जलीकरण होते आणि मरते. पानातील अन्नाचे वहन व्यवस्थित होत नाही. प्रथिने निर्मितीत पोटॅश कमतरतेमुळे बाधा येते. प्रथिनाच्या वहनावर मर्यादा येतात. वनस्पतीच्या विविध, जैव व रासायनिक प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. मुक्त सोडिअममुळे मातीचे सूक्ष्म कण विलग होतात. उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी शोषण करण्यास वनस्पतीला अधिक ऊर्जा लागते. जमिनीतील पाणी निचरा होणाऱ्या रेषा बंद होतात. परिणामी पाणी साचून मुळांना इजा होते. सोडिअमचे अयान मोठे असल्याने मातीच्या कणातील मोठय़ा छिद्रात बसतात व (मॅक्रो) छिद्र बंद होतात. यामुळे जमिनीतील हवेचे व्यवस्थापन बिघडते. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या क्षाराचे अयान लहान असल्याने विपरीत परिणाम तुलनेने कमी होतो. *क्षारपड जमीन सुधारण्याचे उपाय* जमीन सुधारण्यासाठी खालीलप्रमाणे विविध उपाय आहेत १) अपविष्ठ पदार्थाचा वापर २) जैविक पद्धती, ३) कृषी संजीवनी पद्धत, ४) निचरा व्यवस्था सुधारणे, ५) सेंद्रीय/ हिरवळीच्या खताचा वापर, ६) विद्युत चुंबकीय ऊर्जेचा वापर, ७) रासायनिक पद्धत, ८) क्षार सहनशील पिकाचा अंतर्भाव, ९) शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, १०) शेती पद्धतीत बदल.