#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी (हुताशनी पौर्णिमा)*
फाल्गुन पौणिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच 'होळी' असे म्हणतात. माघ महिना संपतात ऋतुंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते. धरतीमाता नवनवीन पानाफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा, उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गर्जत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशावेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो होळीचा सण.
उत्तर भारतात यालाच दोलायात्रा, होरी म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा म्हणतात याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरा केला जातो हे विशेष. यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते. हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात.
खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. संक्रमण म्हणजे बदल, विविध झाडांची पाने गळतात, वनश्रीची शोभा नाहिशी झालेली असते. सारे थंडीने बेजार झालेले असतात. आता या स्थितीत बदल होणार असतो, प्राणीमात्रात जोम उत्साह येणार असतो, ते सांगणारा हा सण थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंदोत्सव.
पानझडीने सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो. काड्याकुंड्या साठलेल्या असतात. त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार; याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल म्हणून पौर्णिमेच्या शुभदिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविले आहे. परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे.
* वैज्ञानिकदृष्टया महत्त्व उन्हाळाही सुरू होत असतो, जमीन भाजून निघते. - जमिनीतून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची कुजलेली पाण तशीच राहिली तर आरोग्याला हानीकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्रीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन, स्वागत !
* पावरा समाजातील होळी इतर आदिवासींप्रमाणे पावरा लोकांत होलिका दिवस - सगळ्यात मोठा सण असतो. होलिका देवीस पावरी भाषेत हुवी, हवावी, कली असेही म्हणतात. पावरा लोकांचा सर्वात मोठा सण होळी. ही देवी आपल्यावर कृपाछत्र ठेवते, आपली मनोकामना पूर्ण करते, अशी पावरा लोकांची श्रध्दा आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या सुमारास साजरा करतात. या काळात शेतीचा हंगाम संपलेला असतो. जंगल फळाफुलांनी बहरलेले असते. होलीका देवीच्या कृपेने आपण सुखीसमाधानी राहू अशी पावरा समाजाची श्रध्दा आहे.
उत्तरेत हा उत्सव भगवान श्रीकृष्णासाठी आहे असे मानतात. कृष्ण बालक असतांना त्यांना मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीला पाठविले होते. कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे दूध पितापिता तिचे प्राणही प्राशन केलेल्या पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले असे ते लोक मानतात. महाराष्ट्रात प्राचीन काळी ढुंठा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे. तिला हुसकावून लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता, त्यामुळे ती पळून गेली.
दक्षिण भारतात हा उत्सव कामदेवासाठी मानतात. भगवान शंकर आपल्या तपश्चर्येत मग्न होते. देवांनी शंकराचे लक्ष माता पार्वतीकडे वेधण्याचे काम कामदेवाला सांगितले. ते शंकराला समजताच ते रागावले, त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला किंवा मदनाला जाळून टाकले. त्याची आठवण म्हणून दक्षिणेत कामदेवाचा पुतळा तयार करून तो जाळण्याची प्रथा आहे. उद्देश एवढाच की, अनेक ठिकाणी उन्हाळ्याचे दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते तेव्हा अनीला शांत करण्याकरिता ही पौर्णिमा साजरी केली जाते.
हा सण कसा साजरा करतात या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात, एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्याभोवती लाकडे गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. सगळे गाव मिळुन गोवऱ्या लाकडे गोळा करून सावर्जनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात, नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात.
प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन 'मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो' असा संकल्प करावा त्यानंतर परातील विस्तवाने होळी पेटवावी. त्याची पंचोपचार पूजा करून नैवेद्य द्यावा. तसेच घरात उपद्रव देणाऱ्या किटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे जिवाणू नष्ट होतात. होळीला ३ प्रदक्षिणा घालाव्या. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. हाच या सणाचा संदेश.
वटसावित्री, नागपंचमी, हरतालिका हे जसे स्त्रियांचे सण आहेत त्याचप्रमाणे होळी हा पुरुषाचा सण आहे.
'जुने जाऊ द्या मरणालागुनी । जाळुनी किंवा पुरून टाका ।। " असे केशवसुतांनी म्हटले आहे. पाच दिवस हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा करतात. तर ५ व्या दिवशी रंगपंचमीला सर्वांशी वैमनस्य सोडुन देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. या सणाची महती सांगणारी कथा अशी आहे.
*कथा*
हिरण्यकश्यपुचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपुने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णांचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपुची बहीण म्हणाली 'मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही, मी जळणार नाही, मी प्रल्हादाला घेऊन अनीत बसते.' त्याप्रमाणे हिरण्यकश्यपुची बहीण हंठा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अनीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य वर मिळालेली हुंठा अग्नित जळून भस्म झाली तर भक्त प्रल्हाद मात्र अग्रीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुध्द बनले. प्रल्हादाची जणू ही अग्नीपरीक्षाच होती, त्याच प्रसंगाची आठवण म्हणून होळी पेटवली जाते म्हणून होळीचे महत्त्व आहे. सारांश- होळीचा सण, उत्सव, फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा,
वसंतातही संयमाची दिक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजविणारा व मानव मनात,
समाजात असलेल्या आसुरीवृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे. धुलीवंदन होळी हा सण पाच दिवसांचा असतो. दुसरे दिवशी 'धुलवड' हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. राख किंवा भस्म यात विद्युत, उष्णता विरोधक तत्त्व आहे. आपला प्रत्येक सण संधिकाळाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात, तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्म लेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे. मातीचे विशिष्ट गुण सुद्धा शरीराला पोषक आहेत. गोमय तर उष्णता विरोधक आहेच पण ते त्वचारोग दूर करणारेही आहे म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने सडासंमार्जन करीत असत. गोमयाने लिंपलेल्या मातीच्या परात उष्णता कमी भासते, शांतता, पावित्र्यता वाढते हा अनुभव आहे म्हणून आपल्या अनेक धार्मिक स्नानात, सचैल स्नानात, भरम स्नान, पंचगव्य स्नान, मृत्तिका स्नान, वायुस्नान, सूर्यस्नान यांचे महत्त्व आहे. त्याचे अद्भूत असे अनुभवही आपल्याला पहायला मिळतात. • श्रावणीच्या दिवशीसुद्धा असे सांगितले आहे. या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे
कपश्चितो हि शिशिरे बसन्ते रकाशु तापितः । हातवानि कुरुते रोगणतस्तं त्वस्य जायते । आयुर्वेदातील ऋषी सुश्रुत म्हणतात की खोकला शरद ऋतूमुळे होतो.
होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला आदी रोग होतात. ते निवारण्याकरीता मोठ्याने बोलणे, गाणे, बजावणे, नाचने पळणे इत्यादी व्यायाम प्रकाराने कफाचे विकार , होत नाहीत.
धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड राख फेकणे हा खेळ खेळतात पण त्याबरोबर होळीच्या धगीवर पाणी तापवून लहान मुलांना स्नान घालतात म्हणजे त्यांना उन्हाळा बाधत नाही. यानंतर ५व्या दिवशी 'रंगपंचमी' सण साजरा करतात. रंगपंचमी रंगपंचमी म्हणजे होळीचा ५ वा दिवस. या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात.
सृष्टीरुपी रंगमंचावर जीवनरुपी नाटकातील आपली भूमिका साकार करतांना आपल्याला अनेक भावरंगांना सामोरे जावे लागते. सुख, समाधान, स्वास्थ्य, शांती, यासोबतच दुःख, विषाद, उदासीनता, अशांती ही स्वाभाविकपणे आपल्या जीवनात (आत्मप्रवासात) येतात. परंतु खरे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपण त्याला न डगमगता दु:ख व संकटाला सामोरे गेले पाहिजे. प्रत्येकाने परस्परांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी सामील होऊन परस्पर सहकार्य व सामंजस्याने आपले जीवन व्यतीत करावे.
होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे. आपले शरीर सात धातूचे व सातरंगांचे बनले आहे म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटतो. सर्व रंगांचे मिश्रण होळीत रंग खेळण्याने होते पण रंग कोणते तर साग, पळस, शिंगाडयाच्या पिठापासून बनविलेला गुलाल, अबिर, चंदन अशा वस्तू सांगितल्या आहेत. पळस वृक्ष तर अत्यंत गुणकारी आहे. पळसाच्या समिधा यज्ञात मुद्दाम जाळतात कारण ती कठोरता, कठीणता याची. कसोटी आहे म्हणून आयुर्वेदात पळसाचा डिंक, साल, फळ, फुल, पान यांचा विविध औषधांत वापर करतात. अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहिले तर ते रंग शरीर रंध्रातून शोषण होऊन शरीरात स्नायुंना मिळतात व येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करतांना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो.
पण आज होलिकोत्सवाचे स्वरुप अत्यंत बीभत्स आहे. चोऱ्या करणे, आगी लावणे, शेण मातीचा मारा करणे, चांगल्या रंगांऐवजी आरोग्याला घातक अशी रसायने मिश्रीत रंग वापरणे या सर्वामुळे या शास्त्रोक्त पद्धतीवर असलेल्या सणाचा विपरीत परिणाम होतो. ऋतुसंधी काळात उत्पन्न होणाऱ्या सर्दी, पडसे, गोवर, कांजण्या, त्वचारोग यावर उपाय न होता अपाय होतात.
या सणाविषयीची एक कथा अशी - फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री-पुरुषांना एकत्र करून, रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता. जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे. ते आत्मविश्वास हीन नसावे, ते सप्तरंगांने, संगीताने व परस्पर प्रेमसंबंधांने खुलले पाहिजे. हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.