श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
ShareChat
click to see wallet page
@266210066
266210066
श्री स्वामी समर्थ अॅग्री सोलुशन
@266210066
शेतकर्‍यांसाठीचा माहितीचा खजिना👌
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती वरील मर रोगाला व उपाय* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण किंवा प्रादुर्भाव रोपवाटीकेमध्ये बिजलागवडी नंतर दुसर्‍या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत आढळून येतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि कोमेजतात रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोपे कोलमडतात व मारतात. उपाय मिरची बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशी नाशकांची प्रती किलोस बिजप्रक्रिया करावी. तसेच मिरची लागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेनखताबरोबर सरीतून मिसळावे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची लागवडीपासून दुसर्‍या आठवड्यात व तिसर्‍या आठवड्यात १० लीटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के मिसळून या द्रावनाची वाफ्यावर किंवा झाडाच्या बुडाला ड्रिंचिंग (आळवणी ) करावी.
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी मिरची* महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा या जिल्हांमध्ये ढोबळी मिरचीची जास्त प्रमाणात लागवड केली जाते. *हवामान* : ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तापमान 25 अंश से. व राञीचे 14 अंश से. पेक्षा कमी झाल्यास वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. *जमीन व हंगाम* ढोबळी मिरचीची लागवड जुन-जुलै, ऑगस्ट –सष्टेंबर तसेच जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात करतात. संपूर्ण वर्षभर सुद्धा शेडनेट किंवा ग्रीन हाऊसमधे आपण ढोबळी मिरचीचे उत्पादन घेऊ शकतो. फळांची काढणी लागवडी पासुन 04 महीन्याच्या कालावधीत करता येते. ढोबळी मिरचीला जमीन चांगली कसदार व सुपीक लागते. मध्यम ते भारी, काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पीकास योग्य आहे. *बियाण्याचे प्रमाण* दर हेक्टरी 03 किलो बियाणे लागते. एक किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 02 ग्रॅम शायरम चोळावे. *पूर्वमशागत* ढोबळी मिरचीची लागवड रोपे लावून करतात. यासाठी एक किंवा दोन आर क्षेञावर रोपवाटीका करावी. जमीन चांगली उभी आडवी नांगरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालावे. पूर्वीच्या पीकांचे धसकटे गोळा करून दोन कुळवाच्या पाळया घ्याव्यात. *लागवड* रोपे तयार करताना 3×1 मीटर चे गादी वाफे तयार करून त्यात बी पेरावे. वाफ्यातील रोपांना झारीने पाणी दयावे. रोपे 45 दिवसात (06 ते 08 आठवडयानंतर) पुर्नलागवडीसाठी तयार होतात.पुर्नलागवड करताना 60 सेंमी अंतराने स-या काढाव्यात. रोपी सरीच्या दोन्ही बाजून 30 सें.मी.अंतरावर लावावे व पुर्नलागवड झाल्यावर लगेच पाणी दयावे. *खते व पाणी व्यवस्थापन :* हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत व्यतीरिक्त 150 किलो नञ , 150किलो स्फुरद व 200किलो पालाश व स्फुरद चा पूर्ण व नञाचा अर्धा हफ्ता लागवडीच्यावेळी दयावा. नञाचा उरलेला हफ्ता लागवडीनंतर एक महिन्याने दयावा. ढोबळी मिरचीला लागवडीपासुन नियमित भरपूर पाणी दयावे. ठिबक सिंचनअसल्यास 55-60 पाण्याची बचत होते. *आंतरमशागत* ढोबळी मिरची चुरडा-मुरडा या रोगास बळी पडत असते. त्यासाठी शेतात नेहमी स्वच्छता ठेवावी. सुरूवातीला गरजेप्रमाणे 2-3 खुरपणी करून घ्याव्यात.झाडांच्या मुळांशी हवा खेळती राहिली पाहिजे. *काढणी व उत्पादन :* फळे हिरवीगार व संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी. साधारणत: दर आठ दिवसांनी फळांची काढणी करावी. प्रति हेक्टरी 17 ते 20 टन सरासरी उत्पन्न मिळते.
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती होळीच्या सणाचे महत्त्व* भारतीय शेतकरी हा निसर्गपुजक आहे त्या मधे होळी या सनाला हंगामात आलेल पिका बद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो.प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची होळीची पुजा करतात.महत्वाचे म्हणजे होळी चे दहन झाल्यावर जी राख शिल्लक राहते ती राख शेतकरी आपल्या बि बियाणे मध्ये टाकतं असतं त्या मागचे उद्दीष्ट की त्या बियाण्यास कीड लागत नव्हते.भारतीय शेती ही संस्कृती शी जुळली होती मराठी फाल्गुन महीण्याच्या पौर्णिमेला ही अमंगल, द्वेषरूपी विचारांची होळी पेटवून शेतकरी आनंद उत्सव साजरा करतात.शेतकर्यासाठी होळीचा सण हा महत्त्वाचा होता आता ही सण संस्कृती लृप्त होण्याच्या मार्गावर आहेत.कारण हा शेतकरी नापिकी,अस्मानी सुलतानी संकट,वातावरणात होणारा बदल अश्या या कचाट्यात सापडला आहे. आताची परीस्थिती अशी झाली की ज्याच्या हातात पैसा त्यांचा सण आहे.ही संस्कृती या आधुनिक जीवनशैली व शहरीकरणाच्या ओघात नष्ट होत आहेत त्याचं प्रमाणे पारंपरिक शेती ही तर काळाच्या ओघात नष्ट होत आहेत पण ग्रामीण भागात ही संस्कृती जिवंत आहे शेतकरी बांधव ही परंपरा आजही जपताना दिसतात.आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी की, ग्रामिन भागातले नागरिक स्वताचे शरीर निरोगी राहावे, म्हणून होळीची राख अंगाला लावून स्नान करतात. ही प्रथा मी स्वतः लहानपणा पासून बघत आहे. होळीच्या म्हणजे शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी रंग पंचमी सण साजरा केला जातो , या दिवशी लोक एकमेकांना गुलाल रंग लावून रंगांची उधळण करते... भारतीय शेतकरी हा निसर्गपुजक आहे त्या मधे होळी या सनाला हंगामात आलेल पिका बद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो.प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची होळीची पुजा करतात.महत्वाचे म्हणजे होळी चे दहन झाल्यावर जी राख शिल्लक राहते ती राख शेतकरी आपल्या बि बियाणे मध्ये टाकतं असतं त्या मागचे उद्दीष्ट की त्या बियाण्यास कीड लागत नव्हते.भारतीय शेती ही संस्कृती शी जुळली होती मराठी फाल्गुन महीण्याच्या पौर्णिमेला ही अमंगल, द्वेषरूपी विचारांची होळी पेटवून शेतकरी आनंद उत्सव साजरा करतात.शेतकर्यासाठी होळीचा सण हा महत्त्वाचा होता आता ही सण संस्कृती लृप्त होण्याच्या मार्गावर आहेत.कारण हा शेतकरी नापिकी,अस्मानी सुलतानी संकट,वातावरणात होणारा बदल अश्या या कचाट्यात सापडला आहे..... आताची परीस्थिती अशी झाली की ज्याच्या हातात पैसा त्यांचा सण आहे.ही संस्कृती या आधुनिक जीवनशैली व शहरीकरणाच्या ओघात नष्ट होत आहेत त्याचं प्रमाणे पारंपरिक शेती ही तर काळाच्या ओघात नष्ट होत आहेत पण ग्रामीण भागात ही संस्कृती जिवंत आहे शेतकरी बांधव ही परंपरा आजही जपताना दिसतात.आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी की, ग्रामिन भागातले नागरिक स्वताचे शरीर निरोगी राहावे, म्हणून होळीची राख अंगाला लावून स्नान करतात. ही प्रथा मी स्वतः लहानपणा पासून बघत आहे. होळीच्या म्हणजे शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी रंग पंचमी सण साजरा केला जातो , या दिवशी लोक एकमेकांना गुलाल रंग लावून रंगांची उधळण करतात. तरुण वर्ग व शेतकरी वर्ग हा सण उत्सहाने साजरा करतात , सर्वानी एकत्र येणे , बंधुभाव आणि एकतेने आनंद साजरा करणे हाच या मागचा उद्धेश असतों.हा सण फाल्गुन महिन्यात येणार असल्याने सर्व शेतीची कामे संपलेली असतात. शेतकरी याचा हा निवांत काळ असतो त्यामुळे हा सण साजरा होतो , होळी या सणाची भारताच्या बाहेर सुद्धा प्रसिद्धी आहे .आपन जेव्हा हरवलेल्या शेती संस्कृतीचा व सणा विचार करतो तेव्हा कधी लक्षात येते की, आपली पारंपरिक शेती आणि सेंद्रिय खतांचा व सुगंध ह्या गोष्टीचा ग्रामीण भागामधून केव्हा कमी झाला हे आपल्याला समजलेच नाही.आपन वर्तमानात हरवलेल्या नद्या, जलस्रोत, उजाड जंगले आणि शेती सभोवतालच्या नष्ट झालेल्या जैव विविधता शेतकर्‍यांशी जुळलेली कृषी संस्कृती... आणि तिला जोडलेले सण, वार, उत्सव ह्यांचे मजबूत धागे आज आधुनिकतेच्या ओघात कमी झाले आहे. त्यामधला एक जरी धागा जुळला तर आपल्या बळीराजाच्या या सणाला आनंदाच्या रंगोत्सवची रंगत पुन्हा त्यांच्या जिवनात चांगली येऊ शकते.... शेतकर्यासाठी होळीचा सण हा महत्त्वाचा होता आता ही सण संस्कृती लृप्त होण्याच्या मार्गावर आहेत.कारण हा शेतकरी नापिकी,अस्मानी सुलतानी संकट,वातावरणात होणारा बदल अश्या या कचाट्यात सापडला आहे.आताची परीस्थिती अशी झाली की ज्याच्या हातात पैसा त्यांचा सण आहे.ही संस्कृती या आधुनिक जीवनशैली व शहरीकरणाच्या ओघात नष्ट होत आहेत त्याचं प्रमाणे पारंपरिक शेती ही तर काळाच्या ओघात नष्ट होत आहेत पण ग्रामीण भागात ही संस्कृती जिवंत आहे शेतकरी बांधव ही परंपरा आजही जपताना दिसतात.आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी की, ग्रामिण भागातले नागरिक स्वताचे शरीर निरोगी राहावे..... शेतकरी वर्गात होळीचे खास महत्त्व आहे.. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे ..... आपली संस्कृती वाचली पाहिजे...
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी (हुताशनी पौर्णिमा)* फाल्गुन पौणिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच 'होळी' असे म्हणतात. माघ महिना संपतात ऋतुंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते. धरतीमाता नवनवीन पानाफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा, उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गर्जत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशावेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो होळीचा सण. उत्तर भारतात यालाच दोलायात्रा, होरी म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा म्हणतात याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरा केला जातो हे विशेष. यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते. हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात. खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. संक्रमण म्हणजे बदल, विविध झाडांची पाने गळतात, वनश्रीची शोभा नाहिशी झालेली असते. सारे थंडीने बेजार झालेले असतात. आता या स्थितीत बदल होणार असतो, प्राणीमात्रात जोम उत्साह येणार असतो, ते सांगणारा हा सण थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंदोत्सव. पानझडीने सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो. काड्याकुंड्या साठलेल्या असतात. त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार; याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल म्हणून पौर्णिमेच्या शुभदिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविले आहे. परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. * वैज्ञानिकदृष्टया महत्त्व उन्हाळाही सुरू होत असतो, जमीन भाजून निघते. - जमिनीतून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची कुजलेली पाण तशीच राहिली तर आरोग्याला हानीकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्रीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन, स्वागत ! * पावरा समाजातील होळी इतर आदिवासींप्रमाणे पावरा लोकांत होलिका दिवस - सगळ्यात मोठा सण असतो. होलिका देवीस पावरी भाषेत हुवी, हवावी, कली असेही म्हणतात. पावरा लोकांचा सर्वात मोठा सण होळी. ही देवी आपल्यावर कृपाछत्र ठेवते, आपली मनोकामना पूर्ण करते, अशी पावरा लोकांची श्रध्दा आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या सुमारास साजरा करतात. या काळात शेतीचा हंगाम संपलेला असतो. जंगल फळाफुलांनी बहरलेले असते. होलीका देवीच्या कृपेने आपण सुखीसमाधानी राहू अशी पावरा समाजाची श्रध्दा आहे. उत्तरेत हा उत्सव भगवान श्रीकृष्णासाठी आहे असे मानतात. कृष्ण बालक असतांना त्यांना मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीला पाठविले होते. कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे दूध पितापिता तिचे प्राणही प्राशन केलेल्या पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले असे ते लोक मानतात. महाराष्ट्रात प्राचीन काळी ढुंठा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे. तिला हुसकावून लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता, त्यामुळे ती पळून गेली. दक्षिण भारतात हा उत्सव कामदेवासाठी मानतात. भगवान शंकर आपल्या तपश्चर्येत मग्न होते. देवांनी शंकराचे लक्ष माता पार्वतीकडे वेधण्याचे काम कामदेवाला सांगितले. ते शंकराला समजताच ते रागावले, त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला किंवा मदनाला जाळून टाकले. त्याची आठवण म्हणून दक्षिणेत कामदेवाचा पुतळा तयार करून तो जाळण्याची प्रथा आहे. उद्देश एवढाच की, अनेक ठिकाणी उन्हाळ्याचे दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते तेव्हा अनीला शांत करण्याकरिता ही पौर्णिमा साजरी केली जाते. हा सण कसा साजरा करतात या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात, एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्याभोवती लाकडे गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. सगळे गाव मिळुन गोवऱ्या लाकडे गोळा करून सावर्जनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात, नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात. प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन 'मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो' असा संकल्प करावा त्यानंतर परातील विस्तवाने होळी पेटवावी. त्याची पंचोपचार पूजा करून नैवेद्य द्यावा. तसेच घरात उपद्रव देणाऱ्या किटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे जिवाणू नष्ट होतात. होळीला ३ प्रदक्षिणा घालाव्या. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. हाच या सणाचा संदेश. वटसावित्री, नागपंचमी, हरतालिका हे जसे स्त्रियांचे सण आहेत त्याचप्रमाणे होळी हा पुरुषाचा सण आहे. 'जुने जाऊ द्या मरणालागुनी । जाळुनी किंवा पुरून टाका ।। " असे केशवसुतांनी म्हटले आहे. पाच दिवस हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा करतात. तर ५ व्या दिवशी रंगपंचमीला सर्वांशी वैमनस्य सोडुन देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. या सणाची महती सांगणारी कथा अशी आहे. *कथा* हिरण्यकश्यपुचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपुने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णांचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपुची बहीण म्हणाली 'मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही, मी जळणार नाही, मी प्रल्हादाला घेऊन अनीत बसते.' त्याप्रमाणे हिरण्यकश्यपुची बहीण हंठा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अनीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य वर मिळालेली हुंठा अग्नित जळून भस्म झाली तर भक्त प्रल्हाद मात्र अग्रीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुध्द बनले. प्रल्हादाची जणू ही अग्नीपरीक्षाच होती, त्याच प्रसंगाची आठवण म्हणून होळी पेटवली जाते म्हणून होळीचे महत्त्व आहे. सारांश- होळीचा सण, उत्सव, फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा, वसंतातही संयमाची दिक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजविणारा व मानव मनात, समाजात असलेल्या आसुरीवृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे. धुलीवंदन होळी हा सण पाच दिवसांचा असतो. दुसरे दिवशी 'धुलवड' हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. राख किंवा भस्म यात विद्युत, उष्णता विरोधक तत्त्व आहे. आपला प्रत्येक सण संधिकाळाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात, तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्म लेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे. मातीचे विशिष्ट गुण सुद्धा शरीराला पोषक आहेत. गोमय तर उष्णता विरोधक आहेच पण ते त्वचारोग दूर करणारेही आहे म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने सडासंमार्जन करीत असत. गोमयाने लिंपलेल्या मातीच्या परात उष्णता कमी भासते, शांतता, पावित्र्यता वाढते हा अनुभव आहे म्हणून आपल्या अनेक धार्मिक स्नानात, सचैल स्नानात, भरम स्नान, पंचगव्य स्नान, मृत्तिका स्नान, वायुस्नान, सूर्यस्नान यांचे महत्त्व आहे. त्याचे अद्भूत असे अनुभवही आपल्याला पहायला मिळतात. • श्रावणीच्या दिवशीसुद्धा असे सांगितले आहे. या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे कपश्चितो हि शिशिरे बसन्ते रकाशु तापितः । हातवानि कुरुते रोगणतस्तं त्वस्य जायते । आयुर्वेदातील ऋषी सुश्रुत म्हणतात की खोकला शरद ऋतूमुळे होतो. होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला आदी रोग होतात. ते निवारण्याकरीता मोठ्याने बोलणे, गाणे, बजावणे, नाचने पळणे इत्यादी व्यायाम प्रकाराने कफाचे विकार , होत नाहीत. धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड राख फेकणे हा खेळ खेळतात पण त्याबरोबर होळीच्या धगीवर पाणी तापवून लहान मुलांना स्नान घालतात म्हणजे त्यांना उन्हाळा बाधत नाही. यानंतर ५व्या दिवशी 'रंगपंचमी' सण साजरा करतात. रंगपंचमी रंगपंचमी म्हणजे होळीचा ५ वा दिवस. या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. सृष्टीरुपी रंगमंचावर जीवनरुपी नाटकातील आपली भूमिका साकार करतांना आपल्याला अनेक भावरंगांना सामोरे जावे लागते. सुख, समाधान, स्वास्थ्य, शांती, यासोबतच दुःख, विषाद, उदासीनता, अशांती ही स्वाभाविकपणे आपल्या जीवनात (आत्मप्रवासात) येतात. परंतु खरे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपण त्याला न डगमगता दु:ख व संकटाला सामोरे गेले पाहिजे. प्रत्येकाने परस्परांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी सामील होऊन परस्पर सहकार्य व सामंजस्याने आपले जीवन व्यतीत करावे. होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे. आपले शरीर सात धातूचे व सातरंगांचे बनले आहे म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटतो. सर्व रंगांचे मिश्रण होळीत रंग खेळण्याने होते पण रंग कोणते तर साग, पळस, शिंगाडयाच्या पिठापासून बनविलेला गुलाल, अबिर, चंदन अशा वस्तू सांगितल्या आहेत. पळस वृक्ष तर अत्यंत गुणकारी आहे. पळसाच्या समिधा यज्ञात मुद्दाम जाळतात कारण ती कठोरता, कठीणता याची. कसोटी आहे म्हणून आयुर्वेदात पळसाचा डिंक, साल, फळ, फुल, पान यांचा विविध औषधांत वापर करतात. अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहिले तर ते रंग शरीर रंध्रातून शोषण होऊन शरीरात स्नायुंना मिळतात व येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करतांना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो. पण आज होलिकोत्सवाचे स्वरुप अत्यंत बीभत्स आहे. चोऱ्या करणे, आगी लावणे, शेण मातीचा मारा करणे, चांगल्या रंगांऐवजी आरोग्याला घातक अशी रसायने मिश्रीत रंग वापरणे या सर्वामुळे या शास्त्रोक्त पद्धतीवर असलेल्या सणाचा विपरीत परिणाम होतो. ऋतुसंधी काळात उत्पन्न होणाऱ्या सर्दी, पडसे, गोवर, कांजण्या, त्वचारोग यावर उपाय न होता अपाय होतात. या सणाविषयीची एक कथा अशी - फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री-पुरुषांना एकत्र करून, रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता. जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे. ते आत्मविश्वास हीन नसावे, ते सप्तरंगांने, संगीताने व परस्पर प्रेमसंबंधांने खुलले पाहिजे. हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती मनीषा मुणगेकर *होलिका कथा* हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने( हिरण्यकशिपूची बहीण ) एक युक्ती शोधली, होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही. पण या वराचा तिने अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो वर त्यावेळेस निष्फळ ठरेल. सूडाच्या भावनेने पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला, तर त्याला दिसले की आपली प्रिय बहीण होलिका आगीत भस्म होऊन गेली आहे, आणि प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत आहे. होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला. अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय आपण होळी म्हणून साजरा करतो .
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी व धुलिवंदन* *होळीची कथा* 2 मार्च 2026 हिरण्यकश्यपुचा मुुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णुचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपुने त्याचा छळ केला. प्रल्हादाने परमेश्वराचे नांव घेऊनये म्हणून हिरण्यकश्यपुने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपुची बहिण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही, मी जळणार नाही, मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपुची बहिण हुंठा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गोवऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य...! वर मिळालेली हुंठा अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतुन सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते. ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुध्द बनले. प्रल्हादाची जणू ही अग्नीपरिक्षाच होती. त्याची आठवण म्हणून होळी पेटविली जाते, तीच ही होळी. यासाठी होळीचे महत्व आहे. *सारांश :* होळीचा सण, उत्सव, फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा, वसंतातही संयमाची दिक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजविणारा व मानव मनात, समाजात असलेल्या आसुरी वृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे. *धुलीवंदन* *3 मार्च 2026 धुलिवंदन.* होळी हा सण पांच दिवसांचा असतो. दुसरे दिवशी 'धुलवड' हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. राख किंवा भस्म यात विद्युत, उष्णता विरोधक तत्व आहे. आपला प्रत्येक सण संधीकाळाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात, व उत्तरोत्तर जास्तवेळ राहाणार असतात. तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्म लेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे. मातीचे विशिष्ट गूण सुध्दा शरीराला पोषक आहेत. गोमय तर उष्णता विरोधक आहेच पण ते त्वचारोग दूर करणारेही आहे. म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने सडासंमार्जन करीत असत. गोमयाने लिंपलेल्या मातीच्या घरात उष्णता कमी भासते, शांतता, पावित्र्यता वाढते, हा अनुभव आहे. म्हणून आपल्या प्रत्येक धार्मिक स्नानात, सचैल स्नानात, भस्म-स्नान, पंचगव्य स्नान, मृत्तिका स्नान, वायुस्नान, सूर्यस्नान यांचे महत्त्व आहे. त्याचे अद्भूत असे अनुभवही आपल्याला पाहायला मिळतात. श्रावणीच्या दिवशी सुध्दा असे सांगितले आहे. या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे. कपश्चितो हि शिशिरे वसन्तेर्काशु तापित: । हत्वाग्नि कुरूते रोगनतस्तं त्वरया जयेत् ।। आयुर्वेदाचे ऋषी सुश्रुत सांगतात शिशिर ऋतुत झालेला कफ वसंत ऋतुत पातळ होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला आदी रोग होतात. ते निवारण्याकरिता मोठ्याने बोलणे, गाणे बजावणे, नाचणे, पळणे इत्यादी व्यायाम प्रकाराने कफाचे विकार होत नाहीत. धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड, राख फेकणे हा खेळ खेळतात पण त्या बरोबर होळीच्या धगीवर पाणी तापवून लहान मुलांना स्नान घालतात म्हणजे त्यांना उन्हाळा बाधत नाही. यानंतर पांचव्या दिवशी रंगपंचमी सण साजरा करतात. 🙏🙏
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती ||ऊस लागवड आणि ठीबक सिंचन || 🌺🌺🌺🌺 🟠ऊस लागवडीनंतर १५ दिवसांनी फर्टिगेशन सुरू करावे. 🟢रासायनिक खतांचा प्रभावी परिणाम मिळण्यासाठी हलक्या जमिनीत प्रत्येक चार दिवसांनी फर्टिगेशन करावे. मध्यम व भारी जमि नीसाठी प्रति आठवड्यास फर्टिगेशन करायचं. 🟠खतांचे द्रावण करीत असताना सर्वप्रथम पांढरा पोटॅश, त्यानंतर १२:६१:०० व सर्वात शेवटी अमोनियम सल्फेट, युरिया अनुक्रमे प्रति किलो खतांसाठी ५, ४ व ३ लिटर पाणी या प्रमाणात पूर्णपणे विरघळून घ्यावे. 🟢दिलेली रासायनिक खते जमिनीत सम प्रमाणात मिळण्यासाठी सुरवातीचे १२-१५ मिनिटे फर्टिगेशन करून नंतर खत सोडावे त्यानंतर १०-१५ मिनिटे परत पाणी द्यावे. 🟠ह्युमिक ॲसिड दर महिन्यास दोन लिटर प्रतिएकर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १२ महिन्यापर्यंत स्वतंत्ररीत्या वापरावे. 🟢एकरी ४० किलो मॅग्नेशियम सल्फेट दर महिन्यास ५ किलो किंवा १८० दिवसानंतर प्रति आठवडा २ किलो स्वतंत्ररीत्या याप्रमाणे फर्टिगेशन करावे. 🌹ठिबक सिंचन संचाची नियमित देखभाल व निगा : 🟠सबमेन व सबमेन दर ३ दिवसांनी फ्लश करावी (सब-सरफेस) 🟢ठिबक सिंचन योग्य दाबावरच चालवावा (किमान १.२५ ते १.५० किलो प्रति वर्ग सें.मी.) 🟠स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर दररोज स्वच्छ करावा. 🟢सँड फिल्टर दररोज बॅकवॉश करावा. 🟠सॅंड सेपरेटर किंवा हायड्रोसायक्लॉन फिल्टर दररोज साफ करावा. 🟢फर्टिगेशन झाल्यानंतर प्रत्येकवेळी फर्टिलायझर टँक साफ करावा. 🟠प्रक्रिया- पाण्याची क्षारता (Ec) (mm hos/cm) (विद्युत वाहकता) १ पेक्षा जास्त असल्यास तीन महिन्यांतून एकदा आणि क्षारता १ पेक्षा कमी असल्यास सहा महिन्यातून एकदा व ०.५ पेक्षा कमी असल्यास ॲसिड प्रक्रिया असल्यास वर्षातून एकदा करावी. 🟠क्लोरिन प्रक्रिया- किमान ६ महिन्यातून एकदा क्लोरीन ट्रिटमेंट करावी. 🟢महिन्यातून एकदा एन्डकॅप काढून ठिबक नळ्या साफ कराव्यात. यासाठी एकावेळेस फक्त ८ ते १० एन्डकॅप काढाव्यात. पाण्याचा दाब कमी न होता सफाई शक्य होईल. टीप  🟠 वरील लेखामध्ये दिलेल्या खतमात्रामध्ये ऊस लागवडीपूर्वी माती परीक्षण करून योग्य प्रमाणात कमी जास्त कराव्यात. ऊस पिकाचे उत्पादन हे खतासोबतच मातीतील सेंद्रीय कर्ब, पाण्याचे नियोजन, रोगकिडींचे वेळेवर नियंत्रण आणि हवामान यावरही अवलंबून असते. स्थानिक हवामानानुसार १० ते १५ टक्क्यापर्यंत फरक पडू शकतो, हे लक्षात घ्यावे. धन्यवाद 🌹🌹🌹 शेतकरी बांधवानो. M̤s̤g̤ṳr̤ṳ s̤ṳg̤a̤r̤c̤a̤n̤e̤ f̤a̤r̤m̤i̤n̤g̤ M̤ṳk̤ṳn̤d̤ s̤a̤b̤a̤l̤e̤ K̤o̤l̤h̤a̤p̤ṳr̤ 9022989442 🙏🙏🏻🙏🙏🏻🙏
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी स्वच्छ सूर्यप्रकाश जास्त काळ पडल्यास जास्त अन्नद्रव्ये तयार होतील अशी एकेकाळी माझीही कल्पना होती. याला सुद्धा काही मर्यादा आहेत. असे संदर्भ पुस्तकात मिळतात कि पानावर एकूण पडलेल्या सूर्यप्रकाशापैकी 15 % उर्जेचा वापर पाने करू शकतात. याचा अर्थ अर्घवट सावलीतील पानामघ्येही हे काम होऊ शकते. पानामघ्ये बाल, तरूण, व वृद्घ असा फरक असतो. अन्नद्रव्य निर्मितीचे काम फक्त तरूण पानात चालते. प्रत्येक अवस्थेतील काळ वनस्पती जाती नूरूप ठरलेला असतो. या संदर्भाचा उपयोग कसा करता येईल यावर चिंतन होणे गरजेचे वाटते. भात , गहू, ज्वारी, बाजरी, ऊस ही एकदल पिके खुप दाट असतात. त्यांची वरची थोडीच पाने पूर्ण सूर्यप्रकाशात असतात. तरीही उत्पादन चांगले मिळते. त्यांचे तरूण पानाना सूर्यप्रकाश पूर्ण क्षमतेने मिळतो. ऊस पिकात याचा अभ्यास केला आहे. वरून 1 2 बाल , 3 4 5 6 तरूण, तर त्या पुढील पाने वृद्घत्वाकडे झुकत निघालेली चिपळूणकर सर
#🌱मी शेतकरी #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती *⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱⊰⊱* *🌱सुर्यप्रकाश ठरवतो वनस्पतींची वाढ आणि विकास* *✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड* *🎯संदर्भ : ॲग्रोवन वृत्तसेवा :* *^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^* वनस्पतींना आपल्या वाढीसाठी सूर्यप्रकाश तर लागतोच, पण हा सूर्यप्रकाश किती प्रमाणात मिळतो, कधी मिळतो, दिवसातले किती तास मिळतो यांच्यावर वनस्पतींची केवळ वाढच नव्हे, तर विकासही अवलंबून असतो जर एखादे झाड घराच्या भिंतीजवळ वाढत असेल तर त्याला भिंतीच्या बाजूला फारच थोडी फुले व फळे लागतात. जास्त फुले फळे लागतात ती भिंतीच्या विरुद्ध बाजूला. या नेहमीच्या उदाहरणावरून दिसून येईल की वनस्पतींना ज्या बाजूने प्रकाश मिळतो त्याच बाजूला तिला फुले-फळे येतात. वनस्पतींना ज्या बाजूने प्रकाश मिळतो त्याच बाजूला तिला फुले फळे येतात. या गुणधर्माला अनुसरूनच पिकांच्या ओळी नेहमी दक्षिणोत्तर दिशेत असाव्यात असा दंडक घातला गेला, कारण पिकाच्या दक्षिणोत्तर ओळींना सकाळी पूर्वेकडून, दुपारी वरून, दुपारनंतर पश्चिमेकडून प्रकाश मिळतो. याउलट जर पिकाच्या ओळी पूर्व पश्चिम दिशेत असतील, तर अशा ओळींमधील वनस्पतींना ऋतुमानाप्रमाणे केवळ उत्तरेकडून किंवा केवळ दक्षिणेकडूनच सूर्यप्रकाश मिळेल. आणि त्यांना त्याच बाजूला फुले व फळे लागतील. ज्या बाजूने सूर्यप्रकाश मिळतो त्याची विरुद्ध बाजू ही काही पूर्ण अंधारात नसते, तर तिला मिळणारा प्रकाश हा त्याच वनस्पतीच्या पानांमधून गाळून आलेला प्रकाश असतो. आपल्यावर पडणारा प्रकाश हा थेट सूर्यप्रकाश आहे की वनस्पतींच्या पानांमधून गाळून आलेला प्रकाश आहे, हे वनस्पतींना फायटोक्रोम नावाच्या एका रंगद्रव्यामुळे समजते. थेट सूर्यप्रकाश मिळणाऱ्या वनस्पतीला फांद्या, फुले, फळे येतात. याउलट जिला पर्णसंभारातून गाळून आलेला प्रकाश मिळतो आहे अशी वनस्पती फांद्या, फुले किंवा फळे यांची निर्मिती न करता आपल्यावर ज्यांची सावली पडते अशा अन्य वनस्पतींच्या सावलीतून बाहेर पडण्यासाठी नुसतीच उंच वाढते. यातही गंमत अशी आहे की दिवसाच्या शेवटी, अंधार पडण्यापूर्वी मिळणारा शेवटचा प्रकाश हा थेट सूर्यप्रकाश आहे की पर्णसंभारातून गाळून आलेला प्रकाश आहे यावर फुले फळे निर्माण करावयाची की सावलीतून बाहेर पडण्यासाठी उंच वाढायचे हे ठरते. प्रकाशसंश्लेषणामुळे वनस्पती आपले अन्न मिळवतात, पण हे अन्न फुले फळे निर्माण करण्यासाठी वापरायचे की आपली उंची वाढविण्यासाठी वापरावयाचे हे फायटोक्रोम ठरविते. जर शेतात वनस्पतींची दाटी झाली असेल तर त्यांची एकमेकांवर सावली पडते. सावलीतील वनस्पतींमध्ये प्रकाशासाठी स्पर्धा सुरू होते. त्यांना फांद्या फुटत नाहीत, तर त्या फक्त आपली उंची वाढवून सावलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. अशी स्पर्धा टाळून वनस्पतींच्या सर्व अवयवांची नीट वाढ व्हावी यासाठी शेतातल्या प्रत्येक वनस्पतीभोवती काही विशिष्ट जागा मोकळी सोडावी लागते. वनस्पतींच्या शरीरव्यापारावरील बन्याच पाठ्यपुस्तकांमध्ये असे लिहिलेले आढळते, की प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमधून हायड्रोजनचे अयन आणि शिवाय अन्य जीवमात्रांना मारक ठरतील अशी रसायनेही मातीत सोडली जातात. त्यांचा दुष्परिणाम शेजारच्या वनस्पतींवर होऊ नये यासाठी शेतात लावलेल्या वनस्पतींच्या सभोवतालचा काही भाग मोकळा सोडून काही विशिष्ट अंतरावरच त्याशेजारची वनस्पती लागते. लावावी पण मी १९८० च्या दशकात केलेल्या संशोधनाद्वारे शेजार शेजारच्या वनस्पतीमधील अंतर हे परस्परांवरील सावली टाळण्यासाठीच ठेवावे लागते, हे दाखवून दिले. दोन वनस्पतींमध्ये किती अंतर असावे हे त्या वनस्पतीची सावली किती दाट आहे आणि तिचा पर्णसंभार किती क्षेत्रफळ व्यापतो यावर अवलंबून असते. आंब्यासारख्या वृक्षांची सावली दाट असते आणि त्यांच्या पर्णसंभाराचा विस्तार इतका मोठा असतो की दोन वृक्षांमध्ये १०-१० मीटर अंतर ठेवावे लागते. याउलट निलगिरी वृक्षाच्या आडव्या फांद्या तीन वर्षांच्या झाल्या की आपोआप गळून पडतात. त्यामुळे निलगिरी वृक्षांना केवळ मुख्य खोड आणि त्यावर १ ते २ वर्षे वयाच्या लहान आकाराच्या फांद्याच असतात. आंब्याच्या मानाने विरळ पर्णसंभार असल्याने निलगिरीचे वृक्ष परस्परांपासून १-१ मीटर अंतरावर लावले तरी चालतात. धान्यपिकांना येणारी कणसे ही त्यांच्या खोडांच्या अग्रभागी म्हणजेच पर्णसंभाराच्या वर लागतात, या भागाला दिवसभर सूर्यप्रकाश मिळत असल्याने धान्यपिके दाट लावली तरी सर्व घाटांना कणसे लागतात. याला अपवाद आहे तो मक्याचा, कारण मक्याची कणसे पर्णसंभाराच्या खाली लागतात. त्यामुळे जर मक्याचे पीक फार दाट लावले, तर त्याच्या खोडांना कणसेच लागत नाहीत पण मक्याच्या दाट लावलेल्या पिकात जमिनीवर विजेची ट्यूबलाइट ठेवून त्याच्या खोडांच्या खालच्या भागाला सूर्यास्तानंतर केवळ काही मिनिटे जरी प्रकाश दिला तरी या सर्व खोडांना कणसे लागतात. द्विदल वनस्पतींना सर्वसाधारणतः मुख्य खोडावरील पानांच्या बेचक्यात किंवा त्यापासून निघणाऱ्या आडव्या फांद्यावर फुले आणि फळे लागत असल्याने द्विदल पिकांच्या पर्णसंभाराखालील सर्व भागांना प्रकाश मिळणे आवश्यक असते. यामुळे धान्य पिकांच्या मानाने द्विदल वनस्पतींमधील अंतर अधिक ठेवावे लागते. पण याला अपवाद ठरतात त्या कडधान्य गटातल्या वनस्पती. या वनस्पती धान्यपिकांइतक्याच दाट लावल्या तरीही त्यांच्या पुष्पफलनिर्मितीवर काहीही परिणाम होत नाही. याचे कारण असे, की कडधान्य गटातल्या वनस्पती सूर्यास्तापूर्वी आपली पाने मिटून घेतात आणि त्यामुळे त्यांच्या संपूर्ण खोडाला सूर्यास्तापूर्वी संध्याकाळचा सूर्यप्रकाश मिळतो. आपल्यावर कोणाचीही सावली नाही असा संदेश मिळाल्याने या वनस्पती आपल्या संपूर्ण खोडावर फुले, शेंगा निर्माण करतात. हा आणि दाट लावलेल्या मक्याच्या प्रत्येक खोडावर कणीस निर्माण करणे हे शोध मी १९८४ मध्ये लावले होते. त्यांवर भाषण देण्यासाठी १९८७ मध्ये इंटरनॅशनल बोटॅनिकल कॉंग्रेसने मला खास आमंत्रण दिले होते. फायटोक्रोमद्वारा घडून येणारी आणखी एक क्रिया म्हणजे बियांचे रुजणे. शेतात वाढणान्या तणांच्या बियांना रुजण्यासाठी त्यांच्यावर थेट सूर्यप्रकाश पडावा लागतो. पेरणी झाल्यावर सुरुवातीला खुरपणी करावी लागते, पण एकदा पिकाने सर्व जमीन झाकली की त्या पिकात तण उगवत नाहीत, याचेही हेच कारण आहे. याउलट उगवून येण्यापूर्वीच पक्ष्यांनी बी खाऊन टाकू नये म्हणून पिकाचे बी मात्र मातीखाली पेरले जाते. त्यामुळे पीक म्हणून लावल्या जाणाऱ्या सर्व वनस्पतींमध्ये बीजे अंधारातही रुजून येण्याचा गुणधर्म निर्माण झाला, या गुणधर्माचा उपयोग करून फुकुओका नामक एका जपानी कृषिशास्त्रज्ञाने भातानंतर घेतल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिकातील तण कमी करण्याची एक युक्ती शोधून काढली. भाताचे पीक कापणीस तयार झाल्यावर त्याने भाताच्या फक्त ओंब्या कापून घेतल्या आणि शेतात मागे राहिलेल्या भाताच्या काडाच्या ओळींमध्ये गव्हाचे बी टाकले. काडाच्या सावलीमुळे तणाचे बी न उगवता तसेच राहिले, पण गव्हाचे बीज मात्र रुजून आले. गहू चांगला वाढीला लागल्यावर मग त्यांनी भाताचा सर्व पेंढा शेतातून काढला. तणांच्या बियांवरील भाताच्या पेंढ्याची सावली गेल्यानंतर तणांचे बी रुजून आले, पण चांगल्या प्रकारे वाढीस लागलेल्या गव्हाशी हे मागून उगवलेले तण स्पर्धा करू शकले नाही.*‼️संकलन : प्रविण सरवदे कराड‼️* ऋतुमानानुसार कमी-अधिक होणारी दिवसाची लांबी हा या लेखातला दुसरा मुद्दा आहे, कपाशी, तूर, एरंडी, घेवडा, तीळ, ज्वारी इ. अनेक पिकांची जुनी वाणे दीर्घ मुदतीची असत, ती पावसाळ्याच्या सुरुवातीला लावली जात, पण दिवस मोठा असल्याने पावसाळ्यात त्यांची फक्त शाकीय वाढ होई आणि दिवस लहान झाल्यावर, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरात त्यांना फुले येत आणि ती पिके जानेवारीत काढणीला येत. म्हणजे पावसाळ्यात जेव्हा जमिनीत पुरेसा ओलावा असतो, तेव्हा या वनस्पतींची केवळ शाकीय वाढच होई आणि पावसाळा संपून जेव्हा वातावरण आणि माती हे दोन्ही कोरडे होतात, तेव्हा यांचे फलोत्पादन होत असे. यामुळे पावसाळ्याच्या अखेरीस तयार होणाऱ्या कमी मुदतीच्या वाणांच्या मानाने जरी या वाणांचे उत्पादन कमी असले, तरीही नैसर्गिक शेतीसाठी असेच वाण योग्य ठरतात. याचे कारण असे की दिवस मोठा असताना, म्हणजेच पावसाळ्यात दर ३-३ आठवड्यांनी कीटकांची नवी पिढी जन्माला येत असल्याने या ऋतूत किड्यांची संख्या प्रचंड वाढते. ती आटोक्यात ठेवण्यासाठी सतत कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. याउलट दिवस लहान होऊ लागला की बरेचसे कीटक सुप्तावस्थेत जातात आणि ते पुढच्या पावसाळ्यातच सुप्तावस्थेतून बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ्याच्या मानाने हिवाळ्यात कीटकांची संख्या खूपच कमी असते आणि त्यामुळे कीटकनाशके न वापरता सुद्धा ही दीर्घ मुदतीची वाण बऱ्यापैकी उत्पादन देत असत. *✒️ डॉ.आनंद कर्वे* (लेखक आरतीचे (ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट - ARTI) संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत.) *_‼️संकलन : प्रविण सरवदे, कराड‼️_* *_▣▬▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▬▣_*
#🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌱मी शेतकरी माहिती विशेष करून कृषी विस्तार अधिकऱ्यांसाठी आहे.) *एखादे पीक आपले अन्न कसे खाते?* सर्वसाधारपणे आपण असा विचार करू कि एखाद्या पिकाला आपण बाहेरून रासायनिक अथवा सेंद्रिय खत टाकले, वरून पाणी दिले किंवा पाऊस पडला कि ते खत पाण्यात विरघळेल, पिकाची मुळे ते पाण्यात विरघळलेल्या खताचे द्रावण शोषून घेतील आणि पिकाच्या शरीरात जाऊन त्या पिकाला मिळेल. परंतु भुसूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास केला असता या सगळ्याचा उलघडा डोळ्यासमोर येतो. कोल्हापूरचे शास्त्रज्ञ शेतकरी श्री प्रताप चिपळूणकर यांनी *जमिनीची सुपीकता* या पुस्तकात याची मांडणी केली आहे. तर पीक नेमकं अन्न खाते कसे? पिकाला आवश्यक असलेली अन्नद्रव्ये खताच्या स्वरूपात बाहेरून जमिनीत टाकल्यानंतर वनस्पतीला त्याच स्वरूपात खाता येत नाहीत. पहिल्यांदा त्या खताचे जमिनीत स्थिरीकरण होते. स्थिरीकरण म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर. या रूपांतरामुळे अन्नद्रव्ये जमिनीत सुरक्षित साठवली जातात. हे स्थिरीकरण होणे अत्यंत आवश्यक असते. प्रथम *स्थिरीकरण* (Immobilization) झाले तरच पुढे त्या खताचे *उपलब्धीकरण* (Mineralisation) होणे शक्य आहे. यासाठी जमिनीतील सूक्ष्मजीवांमार्फत त्यावर अनेक प्रक्रिया होतात. त्यानंतरच गरजेनुसार ही अन्नद्रव्ये पिकाला खाण्याच्या अवस्थेत येतात. जमिनीमध्ये सूक्ष्मीजीवांचे वेगवगळे गट असतात. प्रत्येक गटाचे कार्य वेगवेगळे असते. त्यापॆकी जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजवणारा गट व पिकाला अन्नपुरवठा करणारा गट यांचा पीक अन्न कसे खाते याच्याशी थेट संबंध आहे. *शेतकऱ्याने शेतात टाकलेले रासायनिक अथवा सेंद्रिय खत हे पिकाला सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय खाता येत नाही.* टाकलेले खत व पिकाची मुळे यामध्ये *सूक्ष्मजीव* हा मध्यस्थी/दुवा आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत. बाल्य अवस्था, वाढीची अवस्था आणि पक्वतेची अस्वथा. या प्रत्येक अवस्थेमध्ये पिकाच्या गरजा वेगवगळ्या असतात त्याप्रमाणे पिकाला वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये लागतात. त्यामध्ये बाल्य अवस्थेत खताची गरज अत्यल्प असते, वाढीच्या अवस्थेत मात्र ती खूप जास्त असते तर प्रौढ/पक्वतेच्या अस्वस्थेत ती गरज पुन्हा कमी होते. या प्रत्येक अवस्थेत पिकाला खताची गरज भागवण्यासाठी वेगवेगळी जिवाणूसृष्टी काम करत असते. या प्रत्येक अस्वस्थेत पीक/झाड/रोप आपल्या मुळापाशी आपल्याला पाहिजे असलेले अन्नद्रव्याचे द्रावण सूक्ष्मीजीवांच्या मदतीने करून घेते. सूक्ष्मजीव व वाढणारी वनस्पती यांच्यामध्ये अंतर्गत सुसंवाद होऊन पीक त्याच्या गरजेनुसार आपल्या मुळांवाटे द्राव *(Root Exudes)* सोडून सूक्ष्मजीवांकडे उपलब्ध खताची मागणी करते. खताच्या मागणीचा संदेश मिळाल्यावर सूक्ष्मजीव पिकाच्या गरजेनुसार स्थिर साठ्यातून उपलब्ध (म्हणजे पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत) साठ्यात रूपांतर करतात. आपण बाहेरून टाकलेल्या खताचे (नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, इत्यादी) पिकाला उपलब्ध अवस्थेत रूपांतर करून सूक्ष्मजीव पिकाच्या अन्नाचा पुरवठा करत असतात. अशा पद्धतीने एखाद्या *पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन* होत असते. आता जमिनी नांगरून पारंपारिक पद्धतीने आपण शेती करत असू तर त्या जमिनीत नांगरणीमुळे सूक्ष्मजीवांचा ऱ्हास झालेला असतो. त्याचप्रमाणे जमिनीत आपण कोणताच पदार्थ जागेलाच कुजवत नाही. अगोदरच्या पिकाची शिल्लक राहिलेले अवशेष, मुळे, धसकटे, गोळा करून जाळून नष्ट करून शेत स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा शेतात वारंवार खते वापरावी लागतात. तरी सुद्धा पीक जसे यायला पाहिजे तसे जोमदार येत नाही. *SRT शून्य मशागत तंत्रामध्ये* जमिनी न नांगरल्यामुळे सूक्ष्मजीवांना अनुकूल वातावरण निर्मिती तयार होते. अगोदरच्या पिकाची मुळे व शिल्लक मृत अवशेष जागेलाच कुजण्यासाठी ठेवल्याने सेंद्रीय पदार्थ कुजवणाऱ्या गटाला मुबलक काम असते. त्यामुळे पिकाच्या वाढीनुसार व गरजेनुसार बाहेरून जे काही खत दिले जाते त्या खताचे पिकाला उपलब्ध अवस्थेत रूपांतरण करायचे काम अन्नपुवठा करणाऱ्या सूक्ष्मजीवांद्वारे अतिशय सुलभ होते. म्हणून SRT शून्य मशागत तंत्रामध्ये खताचे प्रमाण फार कमी वापरावे लागते. कमी खतामध्ये सुद्धा पिकाची गरज भागली जाते आणि पिके जोमदार येऊन उत्पादनात दुपटीने, तिपटीने झालेली वाढ SRT शेतकऱ्यांकडे दिसून येते. --------------------------------- अनिल निवळकर विशेष आभार @Pratap Chiplunkar @Shekhar Bhadsavle @Parshuram Agivale