#💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 नामजपाला कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही. सोवळ्या-ओवळ्याचा विचार न करता जाता-येता, उठता-बसता, कार्य करिता, वदनी वदता, घरी-दारी, घास गिळता, रतिसुखाचे अवसरी असे सर्वकाळ, केव्हाही नामस्मरण करावे, मग ते आपोआप होऊ लागले. फक्त मन पवित्र पाहिजे. प्रसन्न पाहिजे. म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा प्रवेश अंत:करणात व्हायला वेळ लागणार नाही. नाम किती घ्यावे, कुठवर घ्यावे याला मर्यादा नाही. प्रपंचातून जेवढा वेळ नामासाठी काढता येईल तेवढा काढून नामजप करावा.
जेवढा जास्तीत जास्त नामजप करता येईल तेवढे अधिक चांगले. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलकर महाराज म्हणतात, ‘‘आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो, तसे नाम सतत घेत राहावे. तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरते. पुढे देहांचे आणि मनाचे कणन्कण आपोआप नामजप करतात
!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
!! अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त !!
!! श्री गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!