#🙂Positive Thought #✍️सुविचार #🙂सत्य वचन कष्ट न घेता कोणत्या तरी योगायोगाने म्हणा किंवा आयत्या पिठावर जन्माला आलेली काही मंडळी भले ब्रँड वापरणारी असतात पण वैचारिक बुद्धीचा विकास न झाल्याने हीच माणसे वेळप्रसंगी वैचारिक माणसाकडे विचारांची भीक मागायला येताना पाहिलेली आहेत. पैशाने विचार विकत घेता येत नाहीत पण विचाराने/बुद्धीने पैसा विकत घेता येतो हे सत्य नाकारता येत नाही 💯 लक्ष्मी राहण्यासाठी आधी सरस्वती प्राप्त करावी लागते ✨
*नरवीर तान्हाजी मालुसरे लढता लढता धारातीर्थी पडले पण सिंहगडावर भगवा फडकावूनच ⚔️🚩*
राजांनी हा गड घेण्यासाठी तानाजीची निवड केली होती. तानाजीने पुरंदरचे युद्ध, प्रतापगडाचे युद्ध, राजांची कोकणातील मोहिम यावर चांगली कामगिरी केली होती. तो हजार पायदल हशमांचा सरदार होता. जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता. सिंहगडाची म्हणजेच तेव्हाच्या कोंढण्याची तानाजीला चांगलीच माहिती होती. त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची १६७० संध्याकाळ. या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी. चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता. त्या आधी मिट्ट अंधारच…!!
४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावळ् #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती यांसह राजगड सोडला. गुंजवणी नदी ओलांडली, सर्वजन विंडसई खिंडित पोचले. तोपर्यंत अंधार पडला होता. मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते. अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते. मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले. दोन मावळ्यांना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता. कमरेला दोर बांधून हे वीर झपा-झप कडा वर चढून गेले. मात्र यावेळी कडा चढताना सहा मावळे कड्यावरुन पडून मरण पावले. त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत. कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले. दोराच्या आधाराने सारे मावळे वर आले अन घात झाला. उदयभानला खबर लागली की, कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय. एकच गोंधळ उडाला. चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता. गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले. काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले. थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना भीषण सामना जुंपला. मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनच पर्याय उपलब्ध होते कारण स्वराज्यातील अनेक गडकोट मुघली ताब्यात गेले होते... सहाजिकच त्यांचा आवेश विलक्षण होता. तानाजी व् सूर्याजी सैनिकाना प्रोत्साहन देत सर्वत्र फिरत होते. उदयभानाने तानाजीला हेरले आणि तो तानाजीकडे धावला. दोघानाही जखमा होत होत्या. उदयभानच्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीने ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली. आता तानाजी मालुसरेंचा हात उघडा पडला आणि उदयभान जोशात आला. मर्मस्थानी वार बसून तानाजी घायाळ होवून खाली पडला पुन्हा उठला शेवटच्या श्वासापर्यंत लढला आणि काही वेळात वीर गतीला प्राप्त झाला. उदयभानही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता. थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला. तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चल बिचल झाली आणि त्यांचा धीर सुटतो की काय म्हणुन सूर्याजी पुढे झाला आणि त्याने त्याना धीर देवून युद्धास परावृत्त केले. परतीचे दोर कापण्यात आले आता लढा किंवा मरा अशी स्थिती मराठा सैन्यापुढे झाली मग …मग काय त्या स्थितीतही विलक्षण अशा जोशात सर्व मराठे लढले मोगली सैन्याचा धीर पुरता खचला आणि त्यानी शरणागती पत्करली……शेवटी काय *गड आला पण सिंह गेला……* आणि तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७० 🙏🚩
इतिहासातीलकाळा दिवस
१ फेब्रुवारी १६८९:- छत्रपती संभाजी राजांना संगमेशवर येथे मोगलांकडुन छापा घालून कैद करण्यात आले
आजचा दिनविशेष
१ फेब्रुवारी १६८९ :
१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी शेख निजामाने संगमेश्वर येथे अचानक छापा टाकला. त्यात छत्रपती संभाजी राजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले. त्या वेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता. त्याने तेथून हुकूम फर्माविला, की कैद्यांना पेडगाव येथील बहादूर गडाच्या छावणीत आणण्यात यावे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धसका, जेवढी भीती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्यांच्या सरदारांनी घेतली होती, तेवढाच धसका अगर भीती छत्रपती संभाजी महाराजांचीही औरंगजेब व त्याच्या पराक्रमी म्हणवल्या जाणा-या सेनापती व सरदारांनीही घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मराठयांचे राज्य आपण चुटकीसरशी सहजपणे जिंकतो. असे मुघल सम्राट औरंगजेबाला वाटत होते. त्यासाठी इ.स. १६८२ मध्ये मोठया इर्षेने ७ लाखांची फौज घेऊन तो महाराष्ट्रात आला होता. या लढयात त्याने आपले तीनही मुलगे शाहजादा मुअज्जम, शाहजादा आज्जम,सुल्ताना कामबक्ष,नातू तसेच अनेक अनुभवी मातब्बर सरदार उतरवले होते. त्यावेळी केवळ ५० हजाराचे सैन्यबळ असतानाही छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिमतीने मुघलांच्या त्या आक्रमणाशी झुंज दिली, ती अतुलनीय अशीच होती. छत्रपती संभाजी राजांना पराभूत करून हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी योजना आखण्यासाठी औरंगजेबाने शाही दरबार बोलवला. त्या दरबारात औरंगजेबाने आपल्या प्रमुख सरदारांकडे छत्रपती संभाजी राजांच्या विरोधात लढण्याची मोहिम त्या सरदारांकडून कोणीतरी स्वीकारावी यासाठी प्रस्ताव ठेवला. परंतु महापराक्रमी छत्रपती संभाजी राजांच्या विरोधात लढण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करायला औरंगजेबाच्या त्या शाही दरबारातील कोणीही सरदार पुढे आला नाही.त्यावेळी संताप अनावर झाल्याने औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमॉश (पगडी) काढून फेकून दिला आणि संभाला पकडल्याशिवाय डोक्यावर किमॉश चढविणार नाही अशा प्रतिज्ञा केली. ८ वर्षे ८ महिने छत्रपती संभाजी राजे कायम रणांगणावर मुघलांच्या सैन्याशी लढत होते. एवढा अद्भुत पराक्रम त्यांच्या अंगी होता. त्याकाळात ७ वर्षे औरंगजेब आपल्या दरबारात डोक्यावर किमॉश न घालता बोडका होऊन बसत असे. त्याकारणाने त्याच्या मनातील छत्रपती संभाजी राजांबद्दलचा द्वेष खदखदत होता.
इ.स. १६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून छत्रपती संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. धर्मवीर संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे घनघोर युद्ध करताना कैद केल्यानंतर कराड, वादुस, दहिवडी, फलटण, बारामती, कुरकुंभ, दौंड मार्गे पेडगाव, ता.श्रीगोंदा येथील किल्ल्यावर आणले. त्याच दरम्यान औरंगजेबाची छावाणीही अकलूज वरून ती किल्ल्या जवळील खंडोबाच्या माळावर सरस्वती नदीकाठी उभारण्यात आली या छावणीत सुमारे आठ लाख सैनिक व जनावरे असा लवाजमा संगती होता.औरंगझेबाला ही खबर देण्यात आली,”हुजुर,संभा कैद हो गया”
मात्र प्रथम औरंगझेब भडकला आणि आल्या हेराला औरंगझेब म्हणाला,”क्या बकते हो? पीके तो नहीं आये? संभा गिरफ्तार हो गया?”
“हां हुजुर,संगमेश्वरी मुकर्रबखानने दस्त कर लिया उन्हें……”
त्याच क्षणी औरंगझेबने फरमान सोडले,” लाया जाय उसे शानो शौकत से…..त्याला पोलादी साखल दंडानी जखडवा,उन्टाला बांधा,विदुशकी झबली घाला,घुंगर असलेली टोपी अड़कवा त्याच्या डोक्यात……आणि वाजत-गाजत धिंड काढा त्याची..! समजू द्या या महाराष्ट्राला की औरंगझेबाने कैद केलाय संभाजीला….! “
त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. १५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला’ म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्त केला. त्या वेळी छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल’, असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.
शेवटी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या’, असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्तीशाली साम्राज्याचा उदय झाला. २७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.
संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश. खरे तर कवी कलशांना बखरकारांनी खुपच बदनाम केलेले दिसते.शिवाजीराजांच्या अभिषेकासाठी महाराष्ट्रातील एकही भट ब्राह्मण पौरोहित्य करण्यास तयार झाले नाही. तेंव्हा राजांनी काशीवरुन गागा भट्टांना आणुन राज्याभिषेक पार पडला. सहाजिकच उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राग होता व पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त करत कवी कलशाचे बलिदान अडगळीत टाकुन त्यांना बदनाम करण्याची मोहिम सातत्याने चालुच ठेवली.संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणार्या अखेरच्या लढाईची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते.संभाजी राजांवर जो अमानुष प्रयोग केला जायचा त्याची रंगीत तालीम औरंग्या कवी कलशांवर करायचा जेणेकरुन कवी कलशांचे हाल पाहुन संभाजी राजे गहीवरुन शरण येतील परंतु जीवलग मित्रांना वेगळे करुन पाहिले, आमिषे दाखविली व शेवटी अनेक अन्वित अत्याचार केले गेले प्रसंगी जीव दिला परंतु कवी कलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्याशी व संभाजी राजांशी ईमान राखत आपल्या देहाचे बलिदान याच महाराष्ट्राच्या भुमीवर संभाजी राजांच्या अगोदर दिले. संभाजी राजांबरोबर एवढ्या हाल अपेष्टा भोगणारा प्रत्यक्ष मृत्युलाही सामोरे जाणार्या कवी कलशांचा हा महाराष्ट्र नेहमीच ऋणी राहील.
#🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
_*आयुष्यात हसायला आणि मोकळेपणाने जगायला शिका. कारण आयुष्यातले दुःख कधीच संपत नाही. म्हणून हसत रहा, हसवत रहा आणि आयुष्याचा आनंद घेत रहा.*_ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🌹प्रेमरंग
वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. कृषिप्रधान संस्कृती मधील अतिशय महत्त्वाचा असा हा सण पशुधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतो...
दिवाळीच्या या पवित्र सणानिमित्त पहिला दिवा लावून गोधनाची पूजा करीत प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येवो अशी गोमातेला प्रार्थना करुया.. बळीराजाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येवो अशी प्रार्थना करूया...!
आपणा सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा...💐
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
――――――――――――
#वसुबारस #कृषीप्रधान #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🚩शिवराय #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
✨शाही नवरात्र उत्सवातील सहावी माळ ✨
🌸 आजचे सकाळचे नवरात्र पूजा दर्शन - मुळस्थान 🌸
🕉️ दख्खनचा राजा जोतिबा 🕉️
✨ आज नाथाचा वार , २८ सप्टेंबर २०२५
🪔 अश्विन शुक्ल पक्ष षष्ठी व
नवरात्री विशेष महापूजा
महाराष्ट्राचे व विश्वातील असंख्य भक्तांचे
आराध्य व कुलदैवत
⚛️ श्री दख्खनचा राजा जोतिबा देवाची
🪷सोहन कमळ पुष्पातील खडी अलंकारिक
नवरात्र महापूजा संपन्न झाली! 🙏
‼ बोला जोतिबाच्या नावानं #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩
‼ चांगभल! चांगभल! चांगभल! ‼
📸 पोस्ट फ्रॉम:
@dakkhanacha_raja_jotiba_
#🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 🌺 आजचे सकाळचे पूजा दर्शन - मुळस्थान 🌺
🕉️ दख्खनचा राजा जोतिबा 🕉️
🌟 आज नाथाचा वार - रविवार
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२५
🕉️भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी निमित्ताने
आज महाराष्ट्राचे व विश्वातील असंख्य भक्तांचे
आराध्य व कुलदैवत
⚛️ श्री दख्खनचा राजा जोतिबा देवांची खडी
सालंकृत अलंकारिक महापूजा संपन्न झाली! ⚛️
‼ बोला जोतिबाच्या नावानं ‼
‼ चांगभल! चांगभल! चांगभल! ‼
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🤘मैत्री #🤩खरी मैत्री विटा रचून भिंत कधीच तयार होत नाही त्यासाठी वाळू, सिमेंट, पाणी याची आवश्यकता असते.! तसंच फक्त माणसं जोडून नाते तयार होत नाही त्यासाठी... आपुलकी, स्नेह, मित्रता, बंधुभावही असावा लागतो..!!*_
#🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 सकाळचे पूजा दर्शन - मुळस्थान 🌺
🕉️ दख्खनचा राजा जोतिबा 🕉️
🌟 आज नाथाचा वार - रविवार
दिनांक: १७ ऑगस्ट २०२५
🕉️श्रावण कृष्ण पक्ष नवमी निमित्ताने
आज महाराष्ट्राचे व विश्वातील असंख्य भक्तांचे
आराध्य व कुलदैवत
⚛️ श्री दख्खनचा राजा जोतिबा देवांची खडी
सालंकृत अलंकारिक महापूजा संपन्न झाली! ⚛️
‼ बोला जोतिबाच्या नावानं ‼
‼ चांगभल! चांगभल! चांगभल! ‼













