*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩२४ फेब्रुवारी १६७०*
*छत्रपति शिवरायांच्या द्वितीय पत्नी “सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब” यांना पुत्र लाभ झाला,” *रामराजे” नाव ठेवण्यात आले,रामराजे पालथे उपजले,राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले… राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले.“ रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालतील*
*🚩२४ फेब्रुवारी १६६५*
*मग मात्र *शिवरायांनी* *कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, ” आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !” नुकतीच होळी व *शिवरायांचा ३६ वा वाढदिवस “तिथीने” साजरा झालेला होता..”*
*🚩२४ फ़ेब्रुवारी १८१२*
*पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग*
*🚩२४ फ़ेब्रुवारी १६७४*
*प्रतापराव गुजर यांना नेसरी येथे वीरमरण (वेडात मराठे वीर दौडले सात)*
*🚩२४ फेब्रुवारी इ.स.१६७४*
*"महाशिवरात्र"*
*सरसेनैपती कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर पुण्यतिथी"*
*मराठ्यांच्या गनिमी काव्याने स्वराज्यावर चालून आलेला बेहलोलखान जेरीस आला.* *वेळ प्रसंग पाहुन तो मराठ्यांना शरण आला.* *आता शरण आलेल्याला मारू नये असा धर्म सांगतो, त्यामुळे "सरसेनापती प्रतापराव गुजर" या तत्वनिष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली व तो गनीम जिव वाचवून गेला. पण नंतर दगाबाज बेहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणाऱ्या बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांची पत्र पाठवून कानऊघडणी केली, "बहलोल खानास गर्दीस मिळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका*. *तोच सल मस्तकात घेऊन "सरनोबत प्रतापराव गुजर" जगत होते. महाशिवरात्रीचा दिवस उगवला, प्रतापराव गुजर हे त्यांच्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बेहलोल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय.* *काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राजाभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांना अष्टप्रधानांपैकी ७ प्रधानांचा मुजरा झडणार होता. मात्र सरसेनापतींचा मुजरा झडणार नव्हता, कारण "बेहलोल खानास गर्दीस मिळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका", असा प्रत्यक्ष महाराजांचाच हुकूम होता.* *बेहलोलखानाचं नाव ऐकून अंतरात धुमसत असलेल्या सुरूंगावर जणू शिलगावणीच पडली. डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या, विजेच्या चपळाईने प्रतापरावांनी घोड्याला टाच मारली आणि ते सहा शिलेदारही प्रतापरावांच्या मागे सुसाट दौडत निघाले.*
*फक्त सात, हो फक्त सातच वीर.*
*अन अचानक प्रतापराव बेहलोल खानावर तुटून पडले. त्यांच्यासोबत होते,*
*विसाजी बल्लाळ,*
*दीपोजी राउतराव,*
*विट्ठल पिलाजी अत्रे,*
*कृष्णाजी भास्कर,*
*सिद्दी हिलाल,*
*विठोजी शिंदे.*
*या आपल्या ६ जणांनी प्राणार्पण केले. स्वराज्यातील अजून एक खिंड पावन झाली.*
*नेसरी खिंडीचे तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले.*
*याच युद्धाचे वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात,*
*"म्यानातून उसळे तलवारीची पात,*
*वेडात मराठे वीर दौडले सात".*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩२३ फेब्रुवारी इ.स.१६२३*
*राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र दत्ताजीराव जाधवराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधु संभाजी भोसले यांचा स्मृती दिन.*
राजे दत्ताजीराव जाधवराव व संभाजी भोसले यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला. निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता .दरबाराचे काम संपवून सर्व सरदार मंडळी आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला व वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून तुडवू लागला. हत्तीवरती माहुत होता. तो हत्तीला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता. पण तो बिथरलेला गजराजा लोकांना तुडवीत चित्कार करीत धावत होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना ; त्या पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना.कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून उडवून दणादणा भुईवर आदळले व पायाखाली चिरडून मारले. दत्ताजीं जाधवरावांचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले .हा पराभव दत्ताजी जाधवराव यांना खुप झोंबला .दत्ताजी जाधवराव हत्तीहून जास्त पिसाळले व हत्तीवरच धावून गेले. स्वतः दत्ताजी जाधवराव हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळे केली. खूप गर्दी व गोंधळ, धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली. आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले. यावेळी मालोजीराजांचे बंधू विठोजी भोसले व त्यांची दोन मुले संभाजी भोसले व खेळोजी भोसले खंडागळे यांच्या मदतीला धावून आले.
खंडागळे हत्ती प्रकरण अनपेक्षितपणे घडलेली घटना होती. या प्रकरणामुळे जाधव-भोसले कुटुंबात तणावाचे वातावरण तयार झाले पण ते फार काळ टिकले नाही. मलिक अंबरने मात्र वरील प्रकरणाचा फायदा घेऊन लखुजी जाधवरावांना मात्र कायमचे दूर केले .मलिक अंबर लखुजीराजे यांचा कायमचा द्वेष करत होता. शहाजीराजे व लखुजीराजे यांच्यामध्ये कायमचे वितुष्ट निर्माण करण्याचे निजामाचे प्रयत्न होते; पण त्यात त्याला फारसे यश आले नाही.
आता काय म्हणायचे या दैवगतीला ? काय नाव द्यायचे ह्या यादवीला ? दत्ताजींच्या आणि संभाजीराजांच्या राण्यांचे ! दोघींच्याही भाळी वैधव्य आले.बांगड्या फुटल्या... कशासाठी ? काय कारण ?.. काही नाही ! काय तर म्हणे एक हत्ती बिथरला. पण म्हणून काय माणसाने एवढे बिथरायचे ?
जाधवरावांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड , उमरद , रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसरा व्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,कन्हेरखेड,वडाळी व सारवडी या होत...
*🚩२३ फेब्रुवारी इ.स.१६८१*
(फाल्गुन शुद्ध चतुर्दशी, शके १६०२, दुर्मती संवत्सर, वार शनिवार)
सरकारी खजिण्यातून मदतीचे औरंगजेबाचे आदेश!
मराठ्यांनी केलेल्या लुटीमुळे शहरात प्रचंड भितीचे वातावरण होते! जवळ जवळ महीना होत आला होता तरी नागरिक भयभीत होते. अशातच बु-हाणपुरच्या प्रतिष्ठित नागरिक, मुल्ला मौलवी, विद्वान मंडळीनी बादशहाकडे अर्ज केला की, "असाच काफरांचा जोर राहिला तर आमची वाताहत होईल. अब्रू व संपत्ती नष्ट झाली आहे." या अर्जाने औरंगजेब आपल्या नाका सरदारांवर अजुनच चिडला. त्याने खानजहानला कळविले की, दक्षिणेच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे. त्यानंतर औरंगजेबाने खानजहानची मनसब वाढविली होती ती कमी करून टाकली. औरंगजेबाने ज्यांची लुट झाली आहे त्यांना सरकारकडून खैरात म्हणून १० हजार रुपयांची मदत करण्याचे फर्मान सोडले. यावरून बुन्हाणपुरची काय अवस्था केली असेल महाराजांनी याची कल्पना येते.
*🚩२३ फेब्रुवारी इ.स.१६८५*
मराठ्यांनी बारदेशवर हल्ला चढविला!
त्यामुळे चिडून जाऊन दोन्ही वकिलांना नजरकैदेत ठेवले. मराठ्यांचे वकिल नाराज झाले व किल्ले रायगडला आलेल्या, पोर्तुगीज वकिल फ्रें. आंतोवियूद सांवजुसेफ यास त्याने या बाबतीत मध्यस्थी करणे किती गरजेचे आहे हे खडसावून सांगितले.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩२२ फेब्रुवारी इ.स १६६५*
*छञपती शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले. छञपती शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवरायांच्या समोर रूजू केली.*
*🚩२२ फेब्रुवारी इ.स.१६८४*
*केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्या पलतात ( Paltata पलते )*
*या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.*
*🚩२२ फेब्रुवारी इ.स.१७३९*
*सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी मोहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*२१ फेब्रुवारी १६६२*
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे."...
*२१ फेब्रुवारी १६६५*
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे.त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
२१ फेब्रुवारी १६८७
मोअज्जमला बादशहाने कैद केले.
२१ फेब्रुवारी १७०३
औरंगजेब विरुद्ध मराठे
औरंगजेब स्वतः सिंहगड वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे. असेच एकदा १८ फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते पण केवळ देव बलवत्तर म्हणून तो बचावला.
तरीही ह्या नवीन व्यवस्थेचा काही एक परिणाम मराठी पथकांवर न होता त्यांनी घासदाना आणण्यासाठी छावणीतून बाहेर गेलेल्या औरंगजेबाच्या पथकांवर हल्ला केल्याची नोंद २१ फेब्रुवारी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते. ह्यावरून मराठ्यांचे किल्ले घेण्यास निघालेले मोघलच उलट छावणी रुपी कारागृहात मराठ्यांद्वारे बंदिस्त झाल्याचे लक्षात येते. कारण संरक्षणा शिवाय एकटे दुखते कोणी बाहेर गेला की तोही मराठ्यांच्या तावडीत सापडला म्हणूनच समजा. आता मात्र बादशहा स्वतःच वेढा पुढे सरकत नसल्याने सरदारांवर राग राग करू लागला.
२१ फेब्रुवारी १८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले. त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या, परंतु त्यांचा पराभव झाला. संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीने झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा श्री शिवछत्रपती,*
*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*२१ फेब्रुवारी १६६२*
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती. भारतीयांकडे आरमार बांधणीचे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "जे इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे."...
*२१ फेब्रुवारी १६६५*
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द छत्रपती शिवाजी महाराज ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आले असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) ते कारवारवर येणार आहे.त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb #🌻आध्यात्म 🙏 #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🙏यळकोट यळकोट जय मल्हार #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
२१ फेब्रुवारी १६८७
मोअज्जमला बादशहाने कैद केले.
२१ फेब्रुवारी १७०३
औरंगजेब विरुद्ध मराठे
औरंगजेब स्वतः सिंहगड वेढ्यातील ठाण्यावर जाऊन मोर्चे तपासत असे. असेच एकदा १८ फेब्रुवारी रोजी मोर्चे तपासत असताना मराठ्यांनी वरून त्याच्या स्वारीवर तोफ गोळे उडवले होते पण केवळ देव बलवत्तर म्हणून तो बचावला.
तरीही ह्या नवीन व्यवस्थेचा काही एक परिणाम मराठी पथकांवर न होता त्यांनी घासदाना आणण्यासाठी छावणीतून बाहेर गेलेल्या औरंगजेबाच्या पथकांवर हल्ला केल्याची नोंद २१ फेब्रुवारी १७०३ च्या बतमीपत्रात मिळते. ह्यावरून मराठ्यांचे किल्ले घेण्यास निघालेले मोघलच उलट छावणी रुपी कारागृहात मराठ्यांद्वारे बंदिस्त झाल्याचे लक्षात येते. कारण संरक्षणा शिवाय एकटे दुखते कोणी बाहेर गेला की तोही मराठ्यांच्या तावडीत सापडला म्हणूनच समजा. आता मात्र बादशहा स्वतःच वेढा पुढे सरकत नसल्याने सरदारांवर राग राग करू लागला.
२१ फेब्रुवारी १८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले. त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या, परंतु त्यांचा पराभव झाला. संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीने झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा श्री शिवछत्रपती,*
*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩२० फेब्रुवारी इ.स १६६०*
*छत्रपती शिवरायांनी खारेपाटण जिंकुन स्वराज्यात सामील केले.*
*🚩२० फेब्रुवारी इ.स.१७०७*
*(काही ठिकाणी ३ मार्च १७०७ अशी तारीख आहे) रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेब *शिवराज्य* *संपवायला आला,आणि स्वताची कबर त्याला खोदावी लागली.महाराज म्हणायचे,"माझे छोटे-मोठे ३६० किल्ले आज दिमतीला आहेत,एक गड एक वर्ष जरी लढला तरी सर्व स्वराज्य* *जिंकायला ३६० वर्ष लागतील, मग इतक्या वर्ष आलमगीर तरी जगेल काय" ? अन ते खरे झाले, आलमगीराला याच भूमीत देह त्यागावा लागला.*
*आपण जेवडे औरंगजेबाचे मोठेपण मान्य करू तेवडे महाराज मोठे होतात.* *औरंगजेब म्हणायचा*," *माझे* *शहजादे, वजीर,सरदार, अमीर-उमराव, सैन्य याच्या पेक्षा एकटे *संभाजी राजे माझ्याकडे असते तर मी कधीच झालो असतो आलमगीर पुऱ्या दुनयेचा"..! महाराजांच्या वेळी राजकीय युद्धे होती हे आपण समजून घेतले कि खरे शिवचरित्र समजायला सुरवात होते.* *मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध *महाराणी ताराबाईंच नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले. औरंगजेबाच्या *पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या *औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏यळकोट यळकोट जय मल्हार #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🌻आध्यात्म 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*🚩२० फेब्रुवारी इ.स १६६०*
*छत्रपती शिवरायांनी खारेपाटण जिंकुन स्वराज्यात सामील केले.*
*🚩२० फेब्रुवारी इ.स.१७०७*
*(काही ठिकाणी ३ मार्च १७०७ अशी तारीख आहे) रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेब *शिवराज्य* *संपवायला आला,आणि स्वताची कबर त्याला खोदावी लागली.महाराज म्हणायचे,"माझे छोटे-मोठे ३६० किल्ले आज दिमतीला आहेत,एक गड एक वर्ष जरी लढला तरी सर्व स्वराज्य* *जिंकायला ३६० वर्ष लागतील, मग इतक्या वर्ष आलमगीर तरी जगेल काय" ? अन ते खरे झाले, आलमगीराला याच भूमीत देह त्यागावा लागला.*
*आपण जेवडे औरंगजेबाचे मोठेपण मान्य करू तेवडे महाराज मोठे होतात.* *औरंगजेब म्हणायचा*," *माझे* *शहजादे, वजीर,सरदार, अमीर-उमराव, सैन्य याच्या पेक्षा एकटे *संभाजी राजे माझ्याकडे असते तर मी कधीच झालो असतो आलमगीर पुऱ्या दुनयेचा"..! महाराजांच्या वेळी राजकीय युद्धे होती हे आपण समजून घेतले कि खरे शिवचरित्र समजायला सुरवात होते.* *मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध *महाराणी ताराबाईंच नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले. औरंगजेबाच्या *पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या *औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले*
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🙏आई एकविरा 🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*१९ फेब्रुवारी*
*#समस्त शिवभक्तांच्या दैवताचा जन्मदिन.*
*श्री शिवछत्रपती महाराज जन्मदिवस किल्ले शिवनेरी, (जुन्नर-पुणे), महाराष्ट्र.*
*(तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१).*
*शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १९ फेब्रुवारी १६३० मध्ये "शिवाजीराजे" यांचा जन्म झाला.*
*गडावरील शिवाईदेवीच्या मंदिरातील शिवाई देवीच्या नावावरून मुलाचे नाव ठेवले" शिवाजी".*
*शिवरायांच्या जन्माच्या तारखेवर वादविवाद होते परंतु महाराष्ट्र सरकारने २००१ साली*
*इतिहासकारांची समिती बनवुन संशोधन करत*
*१९ फेब्रुवारी १६३० ही तारीख शिवाजी महाराज*
*यांचा जन्मदिवस म्हणून जाहीर केली.*
*सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी!*
*हर हर महादेवाची घुमली गर्जना गड किल्याच्या ओठी!*
*रायगडावर तुम्ही ऊभारली ...शिवराष्ट्राची गुढी!*
*राजे तुम्ही नसता तर सडली असती हिंदुची मढी!*
*तुम्हा मुळे तर आम्ही पाहतो देवळाचे कळस, तुम्ही नसता तर नसती दिसली अंगनात तुळस!*
*||जय भवानी जय शिवराय ||*
*सर्वांना शिवजयंती च्या खुप खुप शुभेच्छा..🙏*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा श्री शिवछत्रपती,*
*इतिहास माझ्या राज्याचा.महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏यळकोट यळकोट जय मल्हार म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही; नेमके हेच महत्कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर मराठी माणसांच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळेच वळण लागले असते; हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.
*शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात 🚩* #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🌻आध्यात्म 🙏 #💥राज ठाकरे
#🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏आई एकविरा 🙏 म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही; नेमके हेच महत्कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर मराठी माणसांच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळेच वळण लागले असते; हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.
*शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात 🚩*












![🙏भक्तीमय सकाळ🎬 - 5I संपवण्या म्लेंच्छ असुरांचा खेळ दिली मराठी शस्त्रांना धार, सामर्थ्याचा इतिहास रचण्या घेतला शिवशंकराने अवतार!! FFF ्रज्याचे जगनी (धिपति शिवजन्मोत्सव RAJA SHREE SHIVCHHATRAPATI] 5I संपवण्या म्लेंच्छ असुरांचा खेळ दिली मराठी शस्त्रांना धार, सामर्थ्याचा इतिहास रचण्या घेतला शिवशंकराने अवतार!! FFF ्रज्याचे जगनी (धिपति शिवजन्मोत्सव RAJA SHREE SHIVCHHATRAPATI] - ShareChat 🙏भक्तीमय सकाळ🎬 - 5I संपवण्या म्लेंच्छ असुरांचा खेळ दिली मराठी शस्त्रांना धार, सामर्थ्याचा इतिहास रचण्या घेतला शिवशंकराने अवतार!! FFF ्रज्याचे जगनी (धिपति शिवजन्मोत्सव RAJA SHREE SHIVCHHATRAPATI] 5I संपवण्या म्लेंच्छ असुरांचा खेळ दिली मराठी शस्त्रांना धार, सामर्थ्याचा इतिहास रचण्या घेतला शिवशंकराने अवतार!! FFF ्रज्याचे जगनी (धिपति शिवजन्मोत्सव RAJA SHREE SHIVCHHATRAPATI] - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_731448_84f3547_1771452726233_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=233_sc.jpg)
![🙏शिवदिनविशेष📜 - 5I संपवण्या म्लेंच्छ असुरांचा खेळ दिली मराठी शस्त्रांना धार, सामर्थ्याचा इतिहास रचण्या घेतला शिवशंकराने अवतार!! FFF ्रज्याचे जगनी (धिपति शिवजन्मोत्सव RAJA SHREE SHIVCHHATRAPATI] 5I संपवण्या म्लेंच्छ असुरांचा खेळ दिली मराठी शस्त्रांना धार, सामर्थ्याचा इतिहास रचण्या घेतला शिवशंकराने अवतार!! FFF ्रज्याचे जगनी (धिपति शिवजन्मोत्सव RAJA SHREE SHIVCHHATRAPATI] - ShareChat 🙏शिवदिनविशेष📜 - 5I संपवण्या म्लेंच्छ असुरांचा खेळ दिली मराठी शस्त्रांना धार, सामर्थ्याचा इतिहास रचण्या घेतला शिवशंकराने अवतार!! FFF ्रज्याचे जगनी (धिपति शिवजन्मोत्सव RAJA SHREE SHIVCHHATRAPATI] 5I संपवण्या म्लेंच्छ असुरांचा खेळ दिली मराठी शस्त्रांना धार, सामर्थ्याचा इतिहास रचण्या घेतला शिवशंकराने अवतार!! FFF ्रज्याचे जगनी (धिपति शिवजन्मोत्सव RAJA SHREE SHIVCHHATRAPATI] - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_595946_32b96c61_1771452593200_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=200_sc.jpg)