'व्यापता न येणारं आस्तित्व आणि
मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व'
खरोखरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते,प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय हे आईकडेच जाते.आई शब्दातच तिचा खरा अर्थ दडलेला आहे आ.म्हणजे आत्मा आणि ई.म्हणजे ईश्र्वर आत्मा व ईश्र्वर यांचं एकत्रित रूप म्हणजे आई.
कठीण, मजेदार, दुःखी, आनंदी- प्रत्येक प्रसंगात आपल्याला एका व्यक्तीची आठवण येते ती व्यक्ती म्हणजे आई!
कोठेही न मागता,भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई...
विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान म्हणजे आई...
ममता आणि वात्सल्याची कमान आहेस तु ,
माझ्या अनमोल सदेहाची संचिती आहेस तु ,
तुझ्यासवे या देहाचे रूप माझे जाहिले
तुझ्यामुळे या जीवाणी पहिले पाऊल टाकिले ...
आईची भूमिका साकारणाऱ्या,जगणाऱ्या प्रत्येक आईला "मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!"💐🙏 #मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
धैर्य हा पराक्रमी पुरुषाचा सर्वात मोठा गुण असतो. ज्याच्या अंगी धैर्य आणि आत्मविश्वास आहे, तो माणूस आयुष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. महाराणा प्रताप यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्षात गेले, परंतु त्यांनी आपले धैर्य आणि आत्मविश्वास कधीही खचू दिला नाही. या उलट आयुष्यातील प्रत्येक संकटावर त्यांनी यशस्वी मात केली. त्यांचे जीवन हे सर्व क्षेत्रातील नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे.
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावून परकीय सत्तेच्या विरोधात निकराने झुंज देणाऱ्या वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या चरणी शतशः नमन!
महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त विनम्र अभिवादन 👑🌍🧡🚩 #महाराणा प्रताप जयंती💐
आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी, कर्मवीरांनी शिक्षणाची जी मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली त्याचे आज वटवृक्ष झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवलेल्या ह्या महापुरुषाने गरीब, होतकरू, दिन, दलित विद्यार्थ्याना 'कमवा आणि शिका' चा मंत्र दिला. ह्या महापुरुषाला जनतेने त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी कर्मयोगी किताब दिला आणि भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरवच केला. महात्मा फुले व शाहू महाराजांच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. महात्मा गांधींच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग तर घेतला. अशा कर्मयोगी भाऊराव पाटील त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!🙏 #कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी 💐
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजेला ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे...
कुठे व कसा पाहाल निकाल ?
पुढील वेबसाईटवर पाहता येईल निकाल :
1. https://mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://result.targetpublications.org
4. https://sscresult.mahahsscboard.in
5. https://result.digilocker.gov.in
#दहावीचा निकाल आज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेला ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे...
कुठे व कसा पाहाल निकाल ?
पुढील वेबसाईटवर पाहता येईल निकाल :
1. https://mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://result.targetpublications.org
4. https://sscresult.mahahsscboard.in
5. https://result.digilocker.gov.in
#दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर 💐
रविंद्रनाथ टागोर हे एक थोर साहित्यिक, कवी, नाटककार, संगीतकार व चित्रकार होते. त्यांचा साहित्य क्षेत्रात नोबेल या उच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला होता. बंगाली साहित्यावर विशेष प्रभुत्व ठेवणारे रविंद्रनाथ यांच्या “गीतांजली” व “जन – गण – मन” या रचना प्रसिद्ध आहेत. तसेच शांतिनिकेतनची उभारणी करणारे, सृजन साहित्यिक म्हणून ओळख असणारे आणि भारतीय आणि बांगलादेशी राष्ट्रगीताचे रचेते म्हणून देखील रविंद्रनाथ प्रसिद्ध आहेत.नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांना विनम्र अभिवादन ! #राष्ट्रगीताचे रचनाकार रविंद्रनाथ टागोर जयंती💐
बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. #छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिन💐
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वा. होणार जाहीर होईल . खाली दिलेल्या लिंकद्वारे निकाल पाहता येईल. सर्व परीक्षार्थींना निकालासाठी खूप खूप शुभेच्छा!
1. mahresult.nic.in
2. hsc.mahresults.org.in
3. hscresult.mkcl.org
4. https://results.digilocker.gov.in
#आज बारावीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या 2 मे रोजी दुपारी 1 वा. जाहीर करण्यात येईल. खाली दिलेल्या लिंकद्वारे निकाल पाहता येईल. सर्व परीक्षार्थींना निकालासाठी खूप खूप शुभेच्छा!
1. mahresult.nic.in
2. hsc.mahresults.org.in
3. hscresult.mkcl.org
4. https://results.digilocker.gov.in
#उद्या बारावी परिक्षेचा निकाल 💐
१ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा आपला महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अनेकांनी आपापले योगदान महाराष्ट्र, देशासाठी दिले. अशा या थोर पुरोगामी महापुरुषांची महाराष्ट्राला एक थोर परंपराच आहे.
🔸महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🔹🙏 #महाराष्ट्र दिन कामगार दिन शुभेच्छा💐









