#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 महाराष्ट्राने विदेशी शासनातील अंधश्रद्धा झुगारून प्राचीन महाराष्ट्राचा ज्ञान-विज्ञानाचा वारसा जोपासावा - वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य*
महाराष्ट्र राज्याची ख्याती युरोप पासून ते थेट चीन व ऋषीय (रशिया) देशापर्यंत पर्यंत पसरली होती. युवान श्वांग, अल मसुदी, मार्कोपोलो, निकोला मनूची, फ्रान्सिसको बर्नियर, जीन बाबतीस्ते तावेर्निअर, दायमाचस, मगस्धीनस्, फर्नाव नुनीस, फाईयान्, अब्दुर्रझाक, जॉन फ्रायर, आथानसीस् निकितिन्, निकोलो द काॅन्ती, डोमिनगो पायोस् वगैरे तब्बल 117 विदेशी प्रवाशांनी महाराष्ट्राची जवळून केलेली निरीक्षणे आपापल्या यात्रा वृत्तांतात लिहिली आहेत.
ह्या सर्व वृत्तांतांचा अभ्यास केला असता महाराष्ट्राची भूमी ही विद्या,कला, ज्ञान, विज्ञान, ऐश्वर्य, मानवता, भूतदया, स्त्री सन्मान, अशा अनेक उच्चतम जीवन मूल्यांनी भरलेली होती असे स्पष्ट दिसते.
याचे कारण महाराष्ट्र भूमीतील ऋषी, मुनी, राजे, महाराजे,संत,सत्पुरुष, साहित्यिक,कलाकार,गणितज्ञ, शिल्पी, तंत्रज्ञ, खलाशी, वनवासी व क्रांतिकारी होत. रावणाच्या अनेक अत्याचारांना सहन करूनही महाराष्ट्र भूमी मध्ये सहस्रावधी ऋषीमुनींचे वास्तव्य होते असे रामायणातून स्पष्ट दिसते. ऋषीमुनींच्या पत्नी सुद्धा दिव्य अलंकार व सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करीत व नितीज्ञ असून तपस्वी जीवन जगत असत. याचे अनेक दाखले रामायणात सापडतात.
महाराष्ट्रातीलच विदर्भ प्रांतातील राज कन्या रुक्मिणी ही युद्धकलेत पारंगत व उत्तम साहित्यिक असल्याचा पुरावा पुराणात सापडतो. दमयंती, महाराणी नागणिका, लीलावती, महादाईसा, मुक्ताबाई, जनाबाई, संत सखु, कान्होपात्रा अशा सर्व जातीतील स्त्रिया ज्ञानी असल्याचे दाखले आपल्याला प्राप्त होता.
प्राचीन महाराष्ट्र हा ज्ञानविज्ञानाने मंडित असल्याने येथे अंधश्रद्धेला यत्किंचितही थारा नव्हता. महाराष्ट्र कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा असल्याचा उल्लेख विदेशी यात्रेकरूंनी केलेला आढळत नाही. यावरून प्राचीन महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आपल्या लक्षात येते.
भारतीय वैदिक व त्याच्या अनुयायीं पासून उत्पन्न झालेले महाराष्ट्रातील बौद्ध व जैन यांमध्येही विज्ञानाधारित ज्ञानसंपन्न जीवनशैली असे.
परंतु गेल्या हजार वर्षांचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येते की महाराष्ट्रीय समाजामध्ये अनेक अनिष्ट रूढी, चुकीच्या समजुती व कुप्रथा प्रसृत झाल्या. यांनाच लोक जादूटोणा, टोटका, मन्नत, मिलागरी, मिरॅकल, नवस्, तावीज, ताईत, नजर बट्टा, मिरची धुरी, केस उपटणे, तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, अलीबाबा चालिस चोर प्रमाणे गुप्तधनाचा शोध घेणे, वगैरे रूपात अवलंबले गेले.
नीट निरीक्षण केले असता आपल्या सर्वांच्या लक्षात येते की यातील एकही शब्द संस्कृत, महाराष्ट्री, पाली किंवा अर्धमागधी या महाराष्ट्रातील प्राचीन भाषांमध्ये किंवा वैदिक, बौद्ध, जैन धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही.
श्रीराम, श्रीकृष्ण यांपासून ते वर्धमान महावीर गौतम बुद्ध व संत परंपरा यांपर्यंत कोणीही या अनिष्ट प्रथांचा आश्रय स्वतःच्या जीवनात घेतलेला दिसत नाही.
किंवा महाराष्ट्रातील सातवाहन, अमोघवर्ष पासून ते देवगिरीचे यादव व छत्रपती शिवराय यान पर्यंत कोणत्याही शासकाने अनिष्ट प्रथांचा अवलंब केलेला दिसत नाही.
हे प्रकार जर प्राचीन महाराष्ट्राच्या जीवनशैलीत कधीच नव्हते तर मग गेल्या हजार वर्षात या अनिष्ट प्रथा ज्यांनी आज महाराष्ट्रीय समाज गांजला आहे या आल्या तरी कुठून? या अनिष्ट प्रथांचा आपल्या संत सत्पुरुषांनी कडाडून विरोध केला तरी या आज ही चालू कशा राहिल्या ? याचा विचार करणे गरजेचे आहे.
इतिहास,समाजशास्त्र व पॉलिटिकल सायन्स नुसार विचार केला असता आपल्या लक्षात येते की यथा राजा तथा प्रजा हा नियम सर्वच शासक आणि शासितांच्या बाबत खरा ठरतो. शासक मंडळींच्या राहणीमानाचा प्रभाव हा जनतेवर पडतोच. अगदी साधे उदाहरण द्यायचे तर गेले बारा वर्षे
नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री आहेत, ते दाढी ठेवतात म्हणून आज आपण पाहतो की भारतातील अनेक तरुण अत्यंत रुचीने दाढी ठेवू लागले आहेत. एकेकाळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यांची केशभूषा ही त्या काळापासून अनेक महिलांनी धारण केलेली आपल्याला दिसते. तेव्हा दाढी व केसांचे जसे अनुकरण शासकांचे जनता करते तसेच भाषण शैली, वस्त्र परिधान, अन्न व्यवहार याबाबतही शासकांचे अनुकरण बहुसंख्य शासित करतात असे आपल्याला दिसते.
तसेच शासकांमध्ये असलेल्या कुप्रथांचे,अनिष्ट प्रथांचेही अनुकरण शासित करतात. त्यामुळे गेल्या हजार वर्षातील महाराष्ट्रातील लोकांमधील अनिष्ट प्रथा व कुप्रथांचे मूळ हिंदूधर्म नसून विदेशी शासकच आहेत हे आपण नीट निरीक्षण केल्यास लक्षात येते.
उदाहरणार्थ, जादूटोणा हे शब्दच मुळात भारतीय नाहीत. जादू शब्द पर्शियन आहे तर टोणा शब्द अरबी आहे. टोटका शब्द हा शुद्ध टर्किश शब्द आहे. त्यामुळे भारतातील पर्शियन राज्यकर्त्यांपासून जादू आली, अरबी राज्यकर्त्यांपासून टोना आला आणि तुरकान राज्यकर्त्यांपासून टोटका आला हे उघड आहे. शासक जर जादू-टोणा-टोटका यावर विश्वास ठेवत असतील तर कालांतराने प्रजाही ते करू लागली हे स्पष्ट आहे.
तसेच मन्नत हा शब्द पर्शियन सुफी पंथीय वापरतात. वायव्य कडून आलेल्या टोळधाडीतून आलेल्या शासनांबरोबर हा मन्नात प्रकार भारतात आला आणि तो भारतीय जीवनामध्ये प्रचलित झाला. मराठीतील नवस हा शब्द सुद्धा पर्शियन भाषेतील नवझ/नवज या शब्दापासून आलेला आहे.
याच मन्नत किंवा नवज म्हणजेच नवस या पर्शियन प्रथेच्या हिंदूंनी केलेल्या अनुकरणावर संत तुकोबांनी कडाडून प्रहार करीत जनजागृती करताना म्हटले-
"नवसे कन्या पुत्र होती तो का करणे लागे पती".
तुकोबांच्या काळी मोठे-मोठे हिंदू शासकही मुलाबाळांसाठी नवस करू लागले होते. नवसाला पावलेल्या फकीर बाबाच्या नावे स्वतःच्या मुलांची नावे देखील ठेवू लागले होते. हिंदूंमध्ये आलेली ही अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी तुकोबांनी वरील अभंग रचला. तुकोबांचा हा अभंग हिंदू धर्मावर टीका नव्हता तर इस्लामी शासकांमुळे आलेल्या मन्नत नवस या प्रथांवर होता, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
एक उदाहरण गंमतीशीर आहे. २८५ वर्षांपूर्वी पर्यंत साष्टी प्रांत (म्हणजे बांद्रा ते डहाणू) येथे पोर्तुगीजांचे फेथांध शासन होते. या पोर्तुगीजांच्या शासकां मध्ये एक अंधश्रद्धा होती त्याला ते म्हणत "सेईस् अझारादोस्", म्हणजे सहा हा अंक अशुभ. सहा अंक पोर्तुगीज अशुभ मानीत. याचा परिणाम वसई प्रांतातील स्थानिकांवरही झाला आणि "सेईस् अझारादोस्" चा स्थानिक जनतेच्या जीवनाशी मेळ होऊन "षष्ठी तो कष्टी" अशी म्हण प्रचलित झाली. तेव्हापासून वसईतील स्थानिकांमध्ये सहा अंक, षष्ठी तिथी, सहा तारीख हे अशुभ मागण्यात येऊ लागली. आज वसई प्रांतातील कोणताही स्थानिक हिंदू षष्ठीच्या दिवशी व सहा तारखेला कोणतेही शुभ कार्य करीत नाही. तसेच सहावा महिना जून त्यामध्ये येणारा हिंदू जेष्ठ मास देखील बरेच वसईतील स्थानिक जण अशुभ मानतात. मात्र वेद पुराण बौद्ध ग्रंथ किंवा जैन ग्रंथात सहा अंक अशुभ असल्याचे कुठेही म्हटले नाही.सहा हा अंक अशुभ मागण्याची अंधश्रद्धाळू प्रथा ही पोर्तुगीजांपासून साष्टीकर हिंदूंमध्ये आली.
तसेच, जिन्याखाली कोणती वस्तू ठेवणे अशुभ मानणे, दारामागे झाडू उभा ठेवणे हे शुभ मानले अशा अनेक भाबड्या प्रथा पोर्तुगीजांकडून वसईकर स्थानिक शिकले.
क्रूज दोस् मिलाग्रेस म्हणजे चमत्कारांचा क्रूस हा प्रकार पोर्तुगल मध्ये १६१९ पासून प्रसिद्ध झाला. पोर्तुगीज शासित गोवा वसई या प्रांतांमध्ये अशा चमत्कारी क्रूसांविषयी लोकभावना जागृत झाल्या. अगस्तिय पंथाच्या प्रिस्टांनी याचा फार प्रचार प्रसार केला. पण पुढे 1835 मध्ये पोर्तुगीज चा शासक फर्दिनांद च्या काळात हे सगळे प्रकार बंद करण्यात आले होते. परंतु पुढे आर्च बिशप सिलवा तोरे यांनी 1845 पासून पुन्हा या गोष्टींना प्रमाणित केले. आजही या चमत्कारी मानल्या जाणाऱ्या क्रुसांचा गौरव सदर प्रांतांमध्ये चालू आहे.
भारतीय समाजात अत्यंत वाईट म्हणून प्रसिद्ध असलेली दहेज (हुंडा) ही प्रथा पर्शियन राज्यकर्त्यांकडून भारतात आली. पर्शियन लोक जहेज देतात त्याचेच भारतीय रूप दहेज आहे. पूर्वी भारतीय धर्मांमध्ये लग्नाच्या वेळी कोणत्याही मंत्रामध्ये दहेज किंवा हुंडा हा प्रकार सापडत नाही. हा दुष्ट प्रकार विदेशी शासकांमुळे येथे आला.
इजिप्त चे व महाराष्ट्राचे फार जुने संबंध आहे. मांजरीने रस्ता आडवा पार केला की ते इजिप्त चे राजे फार अशुभ मानल. हीच इजिप्शियन खूप प्रथा अरबस्तांच्या मार्गे महाराष्ट्रा मध्येही पसरली असल्यास नवल नाही.
भुता प्रेतांच्या कॅटेगरीतील खवीस हा अरबी खबीस पासून आला आहे. भुता प्रेतांच्या हालचालींबाबत असलेल्या भासां विषयी छत्रपती शिवरायांचे गुरु समर्थ रामदासांनी विनोदी भाषेत ग्रंथराज दासबोधात खरपूस समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात नजर उतरवण्यासाठी वापरली जाणारी मिरचीची धुरी व मिरची लिंबाची माळ हा प्रकार हिंदू धर्मात बौद्ध किंवा जैन पंथातही सापडत नाही. मं हा आला कुठून ? मुळात महाराष्ट्राला मिरची या प्रकाराची ओळखच पोर्तुगीजांनी करून दिली. पोर्तुगीजांचे व पेनचे जवळचे राजकीय संबंध होते. या पेनच्या लोकांमध्ये "माल दे ओजो" ही एक कुप्रथा आहे. यात सैतानी नजर उतरविण्यासाठी मिरचीची धुरी करण्यात येते. निश्चितच मिरचीची धुरी करणे व लिंबू मिरचीची माळ लावणे हा प्रकार पोर्तुगीज शासकांमार्फतच महाराष्ट्रात आला हे मानायला वाव आहे.
कोणतेही चांगले कार्य घडले की टच वूड म्हणून लाकडाला स्पर्श करण्याची ही अंधश्रद्धा आधी युरोपात उद्भवली होती व यूरोपीय शासकां द्वारा महाराष्ट्रात आली.
महाराष्ट्रात एका फकीर बाबाच्या चमत्कारांचे पुस्तक हिंदू लोक आवडीने सात-सात दिवस वाचतात. यातील पाण्यावर ज्योत पेटविणे, गव्हाच्या पीठाने मुंग्या घालविणे वगैरे चमत्कार वाचायला मिळतात. पण अंधश्रद्धा निर्मूलन केंद्र यांनी हे चमत्कार नसल्याचे वैज्ञानिक आधारे स्पष्ट केले आहे.
विदेशी शासकाकडून आलेल्या अशा अंधश्रद्धा व खूप प्रधान ची गाथा फार मोठी आहे.
थोडक्यात सांगायचे तर महाराष्ट्रातील वर्तमान काळात प्रचलित असलेल्या सर्व अनिष्ट रूढी, कुप्रथा व अंधश्रद्धा या मुळात हिंदू धर्मातील प्राचीन महाराष्ट्रीय सांस्कृतीत नव्हत्या आजच्या महाराष्ट्र दिनी आपण संकल्प केला पाहिजे की पुरोगामी महाराष्ट्राने विदेशी शासनाने झपाटलेल्या अंधश्रद्धा झुगारून प्राचीन महाराष्ट्राचा ज्ञान-विज्ञानाचा वारसा जनतेने व सरकारने जोपासावा.
असे विचार धर्मसभा-विद्वत्संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी वाघोली येथील वैदिक ग्रंथागारात साजरी झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात मंगळवारी दुपारी व्यक्त केले.
(०१ मे २०२५)