
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#शिक्षणाबरोबर_शीलही_सुधारले_पाहिजे...
पूर्वी ठरल्याप्रमाणे रावली कॅप महिला मंडळाच्या विनंतीला मान देऊन, दि. ३ जून १९५३ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सौ. माईसाहेब आंबेडकर यांचेसह रावळी कैपला भेट दिली. सदर प्रसंगी स्त्री-पुरुष समुदाय अतिशय प्रचंड होता. प्रथम अनेक भगिनींनी व संस्थांनी डॉ. बाचासाहेब व सौ. माईसाहेब आंबेडकर यांस हार अर्पण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण
"भगिनींनो व बंधूंनो,
आपण शिक्षणाचीच गोष्ट घेऊ. माझ्यावेळी मला शाळेत घ्यावे याचा खल करण्यासाठी ३ दिवस मास्तरांची सभा भरली होती. मला त्यावेळी सरकारकडून ३ रु. स्कॉलरशीप मिळत होती. या मुलाला शाळेत घेतले नाही तर सरकारचा कोप होण्याचा संभव आहे, या सबबीवर मला सरकारी हायस्कूलमध्ये घ्यावयाचे ठरले. त्यावेळी मी निव्वळ गावठी पोर होतो. पहिल्या दिवशी मी हायस्कूलमध्ये गेलो तर माझ्या ४० वर्षे वयाच्या भावाचे शर्ट घालून गेलो. पायापर्यंत घातलेले शर्ट असा त्यावेळी माझा अवतार होता. त्यावेळी एल्फिन्सटन हायस्कूलमध्ये असंख्य मुले शिकावयास होती तर महाराचा मी एकटाच पोर त्या शाळेत होतो. आज सिद्धार्थ कॉलेजात पाहा, इतरापेक्षाही आपल्या मुलांचा पोषाख चांगला असतो. पहिल्या वर्षी सिद्धार्थ कॉलेजात १५-२० मुलेच होती. परंतु आज पाहा, अस्पृश्यांची ३०० मुले सिद्धार्थ कॉलेजात शिकत आहेत.
दुसरी गोष्ट धर्माची. मनुष्याने स्वार्थच करीत न राहता थोडाफार परार्थही केला पाहिजे. यासाठीच धर्माची जरुरी आहे. तुमच्यासाठी हे सर्व मी करीत आहे. मला हे धर्माने शिकविले. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. पोट काय रांडरळीसुद्धा भरते. "कबीर कहे कुच उद्दम कीजे! आप खाये, और औरन को दीजे।" या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा, घर प्रथम सांभाळा. मात्र समाजकार्यालाही मदत करा. लोहित नावाच्या ब्राह्मणाने बुद्धाला दोन प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न हा की विद्या ही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्गांनाच शिकविली पाहिजे शूद्र या चौथ्या वर्गाला विद्या शिकविता कामा नये, हे तत्त्व तू का मान्य करीत नाहीत? याला उत्तर मिळाले ते असे चार वर्ग हे धंद्याकरिता पडलेले आहेत परंतु ज्ञान हा काही रोजगारीचा प्रश्न होऊ शकत नाही. ज्ञान हे जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान नसल्यामुळे आपले नुकसान होते. उदा. नाशिकला एका शेतकऱ्याकडे एक खतपत्र होते. सर्व काही व्यवस्थित होते. केस त्यांच्या बाजूची व्हावयास पाहिजे होती. परंतु त्याच्या वकिलाने त्याला दगा दिल्यामुळे विरुद्ध निकाल लागला. हे झाले ते त्या शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे झाले. हिंदुस्थानात जातीभेद राहिला, याला मुख्य दोन कारणे आहेत, एकतर सर्वांना शस्त्रे वापरण्याची परवानगी नव्हती व दुसरी गोष्ट अज्ञान. मी पूर्वजांना पुष्कळ शिव्या देतो की त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार का केला नाही. परंतु त्याला वर वर्णन केलेली परिस्थितीच कारणीभूत होती.
'तव्याया जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा' या न्यायाने आता आपण स्वतःच आपल्यातील कमीपणा घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांनी मदत केली नाही तरी आपली सुधारणा आपणच केली पाहिजे आणि आपण अशा रीतीने सुधारली तर इतरांना आपणाला दोषी ठरविता येणार नाही. आपला कलंक आपणच काढला पाहिजे. समजा आपल्यातले लोक शिकले, ऑफिसर झाले तर इतरांना त्यांच्या हाताखाली काम करावेच लागणार व त्यांना मान घावाच लागणार, आमची व त्याची स्थिती एक झाल्यावर आपल्याला ते कमी लेखणारच नाहीत. प्रत्येक माणसाची काया, वाचा व मन अशी त्रिशुद्धी झाली पाहिजे. अशारीतीने पवित्र झालेल्या माणसाला अपवित्र कोण म्हणणार? त्यांच्यापेक्षा तुमचे कपडे डौलदार असल्यावर तुम्हाला कोण कमी लेखणार? आमच्या उत्रतीचा प्रयत्न आता आम्हालाच करावयास पाहिजे.
आपण धर्मासाठी सत्याग्रह केला. धर्मांतराचा ठराव केला, सर्वकाही केले. आता आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्गुणांकडे ओवा असला पाहिजे. अशारीतीने आपण धार्मिक बनावयास पाहिजे, आपण शिकलो म्हणजे सर्वकाही इथले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे, शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. ज्ञान हे तरवारीसारखे आहे. समजा एखाद्या माणसाच्या हाती तरवार आहे. तिचा सदुपयोग की दुरुपयोग करावयाचा हे त्या माणसाच्या शौलावर अवलंबून राहील. तो त्या तरवारीने एखाद्याचा खूनही करील किंवा एखाद्याचा बचावही करील. ज्ञानाचेही तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस त्याचे शील चांगले असेल तर आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करील परंतु त्याचे शील चांगले नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे अकल्याण करण्याकडेही खर्च करील, शील हे धर्माचे मोठे अंग आहे. शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. ज्यांना स्वार्थापलीकडे काही दिसत नाही, ज्यांना थोडाही परार्थ करता येत नाही ती माणसे नुसती शिकली म्हणून काय झाले? त्यांचा दुसऱ्याला उपयोग काय? 'तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा' शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे.
ज्योतिबा फुले त्यांना मी आपला गुरु मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला व पुष्कळ मराठेही त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झाली आहे. ज्योतिबाचे नाव आज कोणीच घेत नाही. आज मांग चांभार हे निव्वळ उष्ठ्याचे धनी
झाले आहेत. प्रगतीचे खरे मालक आम्ही आहोत. आज आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीप्रमाणे पाहात आहेत. परंतु आमची चळवळ निष्काम बुद्धीने व फळाची आसक्ती न धरता चालू आहे. आम्हाला आशा आहे की एक दिवस असा येईल की या वृक्षाचे धनी आम्हीही होऊ. आज जे काही एक न करता चैन करतात, आपण कमविलेले खात आहेत त्यांनाच पुढे शरम वाटेल.
प्रत्येकाने बुद्धाचा फोटो आपल्या घरात लावावा एवढे सांगून मी माझे भाषण संपवितो...
मुक्तीदाता विशेषांक
संदर्भ जनता, दि. १३ जून १९५३. #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
अप्पमादवग्गो (अप्रमाद वर्ग)
उद्वानेन'प्पमादेन संयमेन दमेन च ।
दीपं कपिराध मेधावी पं ओपो नाभिकीरति ।।
बुद्धिमान पुरुषाने उद्योग, अप्रमाद, संयम आणि (इंद्रिय) दमन करून (स्वतःसाठी असे) द्वीप बनवावे (की), ज्याला (विविध प्रकारच्या क्लेशांचा) पूर बाहून नेऊ शकणार नाही...
पमादमनुयुञ्जन्ति बाला दुम्मेधिनो जना ।
अप्पमादञ्च मेधावी धनं सेड्डूं'व रक्खति ।।
मुर्ख, दुर्बुद्धी लोक प्रमादात गुरफटलेले असतात. बुद्धिमान पुरूष श्रेष्ठ संपत्तीप्रमाणे अप्रमादाचे रक्षण करतात.
मा पमादमनुयुजेब मा कामरतिसन्थवं ।
अप्पमत्तो हि झायन्तो पप्पोति विपुलं सुखं ।।
प्रमाद करू नका. कामभोगांमध्ये गुरफटू नका. (कारण की) प्रमाद न करता ध्यान केल्यामुळे विपुल सुख प्राप्त होते.
पमादं अप्पमादेन यदा नुदति पण्डितो ।
पपासादमारुय्ह असोको सोकिनि पर्ज ।
पब्बतट्ठो व भूमड्डो धीरो बाले अवेक्खति ।।
जेव्हा कुणी बुद्धिमान मनुष्य प्रमादाला अप्रमादाने जिंकतो, तेव्हा प्रज्ञारूपी प्रासादावर चढलेला असा तो शोकरहित धैर्यवान (मनुष्य) शोकग्रस्त (मूढ) लोकांकडे अशा प्रकारे (करूण भावाने) पाहतो की जसा पर्वतशिखरावर उभा असलेला कुणी जमिनीवर उभ्या असलेल्या लोकांकडे पाहतो.
अप्पमत्तो पमत्तेसु सुत्तेसु बहुजागरो ।
अबलस्सं'व सीघस्सो हित्वा याति सुमेधसो ।।
प्रमाद करणाऱ्यांमध्ये अप्रमादी, (अज्ञानाच्या निद्रेत) झोपलेल्या लोकांमध्ये जागृत (असा) बुद्धिमान मनुष्य (दुसऱ्यांना मागे टाकून) अशा प्रकारे पुढे जातो की जसा वेगवान घोडा दुबळ्या घोड्याला (मागे टाकून पुढे जातो).
अप्पमादेन मघवा देवानं सेठ्ठतं गतो ।
अप्पमादं पसंसन्ति पमादो गरहितो सदा ।।
अप्रमादामुळे इंद्राला देवांमध्ये श्रेष्ठत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच अप्रमादाची सदैव प्रशंसा करतात आणि प्रमादाची निंदा.
अप्पमादरतो भिक्खु पमादे भयदस्सि वा ।
संयोजनं अणुं थूलं डहं अग्गीव गच्छति ।।
जो भिक्षु अप्रमादामध्ये मग्न रहातो, किंवा प्रमादाला भयकारी समजतो, तो अग्नीप्रमाणे (आपल्या) लहानमोठ्या बंधनांना जाळांत जातो.
अप्पमादरतो भिक्खु पमादे भयदस्सि वा ।
अभब्यो परिहाणाय निब्बाणस्सेव सन्तिके ।।
जो भिक्षु अप्रमादामध्ये मग्न रहातो, किंवा प्रमादाला भयावह समजतो, त्याचे पतन होऊ शकत नाही, तो (तर) निर्वाणाच्या जवळ आहे...
मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
शरीर में कोई सुंदरता नहीं होती, सुंदर होते हैं इंसान के अच्छे कर्म, अच्छे विचार, अच्छी वाणी, अच्छा व्यवहार और अच्छे संस्कार #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
यमकवग्गो ( यमक वर्ग )
सारञ्च सारतो अत्वा असारञ्च असारतो।
ते सारं अधिगच्छन्ति सम्मासङ्गप्पगोचरा ।।
सार हे सार आणि निःसार हे निःसार (असे) जाणून शुद्ध संकल्प (वा चिंतन) करणाऱ्या व्यक्ती सार प्राप्त करून घेतात.
यथागारं दुच्छन्नं वुड्डी समतिविज्झति।
एवं अभावितं चित्तं रागो समतिविज्झति ।।
जर घराचे छत चांगले नसेल तर ज्याप्रकारे घरात पावसाचे पाणी घुसते, त्याचप्रमाणे संयमाची साधना केली नसेल तर चित्तात आसक्ती घुसते...
यथागारं सुच्छन्नं वुड्डी न समतिविज्झति।
एवं सुभावितं चित्तं रागो समतिविज्झति ।।
जलए घराचे छप्पर चांगले असेल तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी घुसू शकत नाही, त्याचप्रमाणे जर संयमाचा चांगला अभ्यास असेल तर मनात आसक्ती शिरत नाही...
इथ सोचति पेच्च सोचति, पापकारी उभयत्थ सोचति ।
सो सोचति सो विहअति, दिस्वा कम्मकिलिट्ठमत्तनो।।
पाया मनुष्य दोन्ही ठिकाणी शोक करतो, या जगात पण आणि परलोकात पण. आले दुष्ट कर्म पाहून तो शोकाकुल होतो, पिडीत होतो...
इध मोदति पेच्च मोदति कतपुओ उभयत्थ मोदति।
सो मोदति सो पमोदति दिस्वा कम्मविसुद्धमत्तनो ।।
शुभ कर्म करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी प्रसन्न राहतो. या जगातही आणि लोकातही शुभ पुण्यकर्माना पाहून तो आनंदीत होतो, प्रमुदीत होतो...
इथ तप्पति पेच्च तप्पति पापकारी उभयत्थ तप्पति।
पापं मे कतन्ति तप्पति भिव्यो तप्पति दुग्गतिङ्ङ्गतो ।।
पाप करणारा दोन्ही ठिकाणी संतप्त होतो, या जगात पण आणि परलोकात पण. 'भी पाप केले आहे' या विचाराने संतप्त होतो (आणि) अधोगती (दुर्गती) प्राप्त होऊन अधिकच संतप्त होतो...
इथ नन्दति पेच्च नन्दति कतपुओ उभयत्थ नन्दति ।
पुत्रं मे कतन्ति नन्दति भिव्यो नन्दति सुग्गतिं गतो ।।
शुभ कर्म (पुण्य) करणारा दोन्ही ठिकाणी आनंदीत होतो. इथे पण, आणि परलोकात पण, मी पुण्य केले आहे' या विचाराने आनंदीत होतो (आणि) चांगली गती प्राप्त होऊन अधिकच आनंदीत होतो...
बहुम्पि चे संहितं भासमानो न तक्करो होति नरो पमत्तो।
गोपो व गावो गणयं परेसं न भागवा सामञ्जस्स होति ।।
धर्मग्रंचाचे कितीही पठण केले, तरीसुद्धा जर प्रमादामुळे माणसाने त्या धर्मग्रंथानुसार आचरण केले नाही तर, तो दुसऱ्यांच्या गाई मोजणाऱ्या गवळ्याप्रमाणे श्रमणत्वाचा भागीदार होत नाही..
अप्पम्पि चे संहितं भासमानो धम्मस्स होति अनुधम्मचारी रागञ्च दोसञ्च पहाय मोहं सम्मप्पजानो सुविमुत्तचित्तो। अनुपादियानो इघ वा हुरे वा स भागवा सामञ्जस्स होति ।।
एखाद्याने जरी धर्मग्रंथाचे बोडेसेच पठण केले असले तरी पण जर तो आसक्ती, द्वेष आणि मोह रहीत असेल तर असा बुद्धिमान, अनासक्त, इथे व परलोकात (दोन्ही ठिकाणी) उपभोगाच्या मागे न लागणारा मनुष्यच श्रमणत्वाचा भागीदार होतो...
संदेश तुपसुंदरे कार्यसंपादक
मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक
संदर्भ धम्मपद #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
ज्याप्रमाणे खराब छप्पर असलेल्या घरात पाऊस शिरतो, त्याचप्रमाणे अविकसित मनात इच्छा शिरते.
धम्मपदाचा १३ वा श्लोक शिकवतो की, ज्याप्रमाणे कमकुवत घरात पाऊस शिरू शकतो, त्याचप्रमाणे अप्रशिक्षित मनात इच्छा आणि नकारात्मक विचार शिरू शकतात.
जेव्हा मनात शिस्त आणि सजगतेचा अभाव असतो, तेव्हा लोभ, क्रोध, मत्सर आणि संभ्रम यांसारख्या भावना सहजपणे आंतरिक शांती भंग करतात. बुद्ध आपल्याला आठवण करून देतात की सजगता, सुज्ञ विचार आणि ध्यानाच्या माध्यमातून मनाचे रक्षण करून ते सशक्त केले पाहिजे. ज्याप्रमाणे एक भक्कम घर पावसात सुरक्षित राहते, त्याचप्रमाणे स्थिर आणि सुप्रशिक्षित मन अडचणी आल्यावरही शांत राहते. #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜
"बाहर कुछ भी बदलो, जब तक मन नहीं बदलेगा, कुछ नहीं बदलेगा।". #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत
रविवार, ता. २८-७-४० रोजी सकाळी १० वाजता दामोदर ठाकरसी हॉल, परेल बेचे, ठाणे अस्पृश्य विद्यार्थी वसतीगृह सहाय्यक मंडळाच्या विद्यमानाने अस्पृश्य समाजाची जंगी जाहीर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब अबिडकरांनी पुढीलप्रमाणे भाषण केले,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण
"आजच्या प्रसंगी विशेष भाषण करण्याची जरुरी नाही. ठाणे बोर्डिंग १९२६ साली काहण्यात आले. १४-१५ वर्षे समाजावर कोणत्याही प्रकारचा भार न टाकता ते चालविले. ह्या बोर्डिंगच्या बाबत मुंबई सरकारशी मी काही अटी ठरविल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक मुलामागे १० रु. देण्याचे ठरले होते. पण काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांनी माझ्याशी वाटाघाटी न करता दरमहा मुलामागे १० रुपयांऐवजी ४ रुपये मंजूर केले. प्रत्येक मुलाचा खर्च ४ रुपयात भागवून बोर्डिंग चालविणे अतिशय कठीण काम आहे.
आता ठाणे बोर्डिंगची सारी जबाबदारी तुमच्यावर आहे. हिंदूंच्या दारी जाणे स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे. आपण स्वतःच्या शिरावर जबाबदारी घेऊन बोर्डिंग अव्याहत चालविले पाहिजे. बोर्डिंग सतत चालविण्याच्या दृष्टीने आज मिळालेली मदत अपुरी आहे. कार्यकर्त्यांना काम करण्यास उत्साह येईल इतकी मदत करा. ती मदत कशी करावयाची ते तुम्ही ठरवा. पण मला वाटते आपल्यात सुशिक्षित शिक्षक, कारकून इत्यादी मंडळी प्रामुख्याने दिसत आहे. त्यांना दरमहा बोर्डिंगला मदत करणे शक्य आहे. म्यु. युनियनच्या सभासदाकडून वर्षाच्या काठी काही मदत मिळवून द्यावी. लग्नादिविधी होतात त्यावेळी बोर्डिंगला मदत करावी. समाजात १०० च्या वर संस्था आहेत. त्यांनी वर्षाखेर २०-२५ रु. दिल्यास वावगे होणार नाही. पण मला वाटते पैशाच्या अभावी बोर्डिंग बंद पडणार नाही. आपल्या समाजात एकात्र चित्ताने काम करणारा एकही मनुष्य आज वीस वर्षात मला दिसून आला नाही. कौन्सिलच्या किंवा म्युनिसिपालिटीच्या सभासदाच्या जागेकरिता १०० अर्ज तयार असतात पण एकेक काम एका मागनि, एकाच ध्येयाने करणारा एकही मनुष्य अजून माझ्यापुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजे, जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्न सुटत नाहीत. त्याकरिता अहोरात्र झटले पाहिजे. आंह्मण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे, हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की त्यांनी मिळविलेली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहतात. ध्येयवादी कार्यकर्ते त्यांच्यात निपजतात. आपल्या कार्यकर्त्या मंडळींनी अजून निश्चयात्मक निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करावयास सुरुवात केल्यास आपली चळवळ पसरल्याशिवाय राहणार नाही...
मुक्तीदाता विशेषांक
संदर्भ जनता, दि. ३ ऑगस्ट १९४०० #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
सब कुछ नश्वर है.. सब कुछ लगातार बदल रहा है, सब कुछ खत्म हो रहा है...
आपल्या इंद्रियांवर आणि हृदयावर विजय मिळवणे हे हजारो युद्धे जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
#buddhadharma #buddhistwisdom
#buddhaquotes #buddhateachings
#buddha #buddhism #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या कर्तव्यावरच बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून...
बहिष्कृत विद्यार्थ्यांचे चतुर्थ वार्षिक सामाजिक संमेलन पुणे येथे बहिष्कृतांचे सुप्रसिद्ध पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार ता. २ ऑक्टोबर १९२७ रोजी उत्साहाने पार पडले. समारंभासाठी डी. सी. मिशनचा अहिल्याश्रम हॉल सुशोभित केला होता. संमेलनाचा कार्यक्रम शनिवार व रविवार असे दोन दिवस ठेवण्यात आला होता. शनिवारी विद्यार्थ्यांच्या संभाषणाचे व खेळांचे सामने झाले. या सामन्यात महार मांग व चांभार या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हे नमूद करण्यास आनंद वाटतो. संभाषणात व खेळात बक्षीसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी ५ वाजता होणार होता. त्यासाठी नियोजित अध्यक्ष व बहिष्कृतांचे पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. सोळंकी, कदम वगैरे मंडळीसमवेत ५ वाजता येऊन दाखल झाले.
पाहुणे मंडळीत डॉ. सोळंकी, प्रि. तायडे, रा. श्रीधरपंत टिळक, रा. संगमनेरकर, कदम, ऐदाळे, बाराथ, भंडारे, राजभोज, लांडगे, वायदंडे, डी. सी. मिशनचे रा. पाताडे, सुभेदार घाटगे बंधु, गायकवाड तसेच सेवासदनातील प्रौढ विद्यार्थिनी ट्रेनिंग कॉलेजचे प्रौढ विद्यार्थी वगैरे मंडळी प्रामुख्याने दिसत होती. नंतर जॉ. सेक्रेटरी रा. रणपिसे यांनी निरनिराळ्या सामन्यातील बाबींचे मार्मिक विवेचन केले आणि अध्यक्षांनी स्वहस्ताने यशस्वी उमेदवारास बक्षीसे वाटली. नंतर अध्यक्षांनी आपले भाषण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण
त्यात त्यांनी बहिष्कृत वर्गाच्या सध्याच्या भयानक व चिंताजनक परिस्थितीचे वर्णन करून अशा विषम, हिरमोड करणाऱ्या परिस्थितीत बहिष्कृत विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यावर बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे बहिष्कृतातील सुशिक्षित स्त्रियांनीही आपले शील व कर्तव्य सांभाळून समाजाच्या प्रगतीस हातभार लावण्याचा उपदेश केला. सुशिक्षित असूनही केवळ अस्पृश्य मानले गेल्यामुळे बहिष्कृतातील लायक माणसांची कशी कुचंबणा होते हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन जेव्हा पटविले त्यावेळी सभागृहात भीषण गांभीर्य पसरले. डॉक्टरसाहेब मनापासून बोलत होते. त्यावेळी त्यांच्या जीवाची तळमळ व मनाची खळबळ त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रतिबिंबित होत होती. एकंदरीत अध्यक्षांचे भाषण अस्खलित, जोरदार व चित्ताकर्षक झाले...
मुक्तीदाता विशेषांक
संदर्भ बहिष्कृत भारत, दि. ४ नोव्हेंबर १९२७. #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
आज आपण करत असलेल्या काही गोष्टींचे फळ खूप नंतर मिळते. त्यामुळे, अनेक लोक चुकून असे मानतात की कार्यकारणभाव अस्तित्वात नाही. पण वास्तविक पाहता, ही केवळ 'अजून योग्य वेळ आलेली नाही' एवढीच बाब असते.
जमिनीत बी पेरल्याप्रमाणे, ते दुसऱ्याच दिवशी उमलेल अशी अपेक्षा करता येत नाही. त्याला वेळ, पाणी, सूर्यप्रकाश – आणि योग्य परिस्थितीची गरज असते.
म्हणून, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली गेली नाही म्हणून निराश होऊ नका. आयुष्याने तुमच्यावर कृपा केली नाही म्हणून दुःखी होऊ नका. चांगली कृत्ये करत राहा, कारण प्रत्येक बी शांतपणे वाढत असते.
एक दिवस, योग्य वेळ आल्यावर फळ पिकेल. आणि तेव्हा आपल्याला समजेल: या जीवनात काहीही निरर्थक नाही. #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर








![🙂Positive Thought - Everything is impermanent. everything is constantly changing evervthing iS ceasing to exist] Everything is impermanent. everything is constantly changing evervthing iS ceasing to exist] - ShareChat 🙂Positive Thought - Everything is impermanent. everything is constantly changing evervthing iS ceasing to exist] Everything is impermanent. everything is constantly changing evervthing iS ceasing to exist] - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_460808_2dd05e38_1776745459378_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=378_sc.jpg)

