Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
ShareChat
click to see wallet page
@63559539
63559539
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
बुद्ध कहते हैं #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर शांत रहना सीख लो क्योंकि शांति ही हर तूफान का अंत है
🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ - ShareChat
00:14
*डॉ. आंबेडकरांची संस्मरणे...* *सेंट्रल रेल्वेस्थानकावर जे हजारो लोक त्यावेळी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्टस् फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या माझ्या पतीसोबत भारतातील लाखो किंवा करोडो बहिष्कृतांच्या नायकाची समर्थ* *नेत्याची-प्रतीक्षा करीत उभे होते त्यांच्यापैकी मी एक होते. त्यांना हार घालण्याचा पहिला मान मला मिळाला. स्टेशनवर उसळलेल्या गर्दीतून त्यांना बाहेर काढायला तासभरापेक्षा जास्त वेळ लागला. हा प्रसंग १९४४ चा असला तरी तो दिवस मी अजिबात विसरू शकलेले नाही आणि आजही तो माझ्या मनात अगदी ताजा आहे. ऑल इंडिया शे.का. फेडरेशनच्या मध्यवर्ती समितीची बैठक मद्रासेत रॉयपेट्टाह येथील अध्यक्षांच्या घरी झाली होती. शे.का.फे. चे देशाच्या सर्व भागांतील अध्यक्ष आणि सचिव परिषदेला हजर होते. त्या परिषदेत बहिष्कृत वर्गाचे भवितव्य ठरले होते. अनेक ठराव मंजूर केले गेले. परिषद दोन दिवस चालली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वुडलैंडस् हॉटेलात मी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती. अनुसूचित जातीतील सुविद्य महिलांची ती पार्टी बहिष्कृतांच्या माननीय नेत्याचा गौरव करण्यासाठी होती दरवाजावर महिलांनी त्यांचे स्वागत केले, हसतमुखाने त्यांनी प्रवेश केला. सुविद्य स्त्रियांना भेटल्याने आणि त्यांच्याशी संभाषण केल्याने त्यांना आनंद वाटला. दक्षिण भारतातील अनुसूचित जातींच्या स्त्रियांमध्ये काही पदवीधर आणि विदूषी असल्याचे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. बायकांशी इंग्रजीतून संभाषण करीत त्यांनी पार्टीचा आनंद घेतला. बायकांचा त्यांच्याशी परिचय करून दिला जात असताना त्यांनी उच्चारलेले शब्द मला अजून आठवतात. "अरे वा! दक्षिण भारतातील आपल्या समाजातील स्त्रियांनी जेवढी प्रगती केली आणि उत्तम शिक्षण घेतले तेवढे देशात अन्यत्र कोठेही दिसत नाही." त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर सभा ठेवलेली होती. पण ते स्त्रियांच्या मंडळातून तिकडे साडेसहाला गेले. या नेत्यांनी मद्रास सोडले तेव्हा त्यांना निरोप देण्याचा जंगी कार्यक्रम केला होता.* *त्यानंतर पुन्हा मी डॉ. आंबेडकरांना मुंबईत आयोजित केलेल्या एका परिषदेत भेटले. ती परिषद तीन दिवस चालली. अखेरच्या दिवशी झालेल्या स्त्रियांच्या सत्राची मी अध्यक्ष होते. समाजाचे मुकुटमणी डॉ. आंबेडकर, अध्यक्ष रावबहादूर एन. शिवराज आणि सरचिटणीस श्री. पां. न. राजभोज तेथे होते. त्या दिवंगत नेत्याने दिलेले प्रभावी भाषण मला अजून आठवते. मी आणि माझे पती त्यांच्या राजगृह नामक बंगल्यावर गेलो होतो. तेथे आम्ही त्यांच्यासोबत चहापान केले. त्यांच्या खासगी ग्रंथालयातील विलक्षण ग्रंथसंभार मी पाहिला. त्यात मला चारित्र्य, कौटुंबिक जीवन आणि राजकारण या विषयांवरील "थिरुक्कुरल" या तामिळ भाषेतील पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर आढळले. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी थिरू वल्लूवर नामक लेखकाने ते लिहिले होते. तो एक अनुसूचित जातीचा कवी होता. ते पुस्तक म्हणजे मी माझ्या नेत्याला ते मद्रासेत आले असता दिलेली नम्र भेट होती.* *तिसऱ्यांदा मी या श्रमिकांच्या उद्धारकर्त्याला ते श्रममंत्री असताना त्यांच्या दिल्ली येथील बंगल्यावर भेटले होते. त्या रात्री नेते, अध्यक्ष रा.ब. एन. शिवराज आणि मी आपल्या समाजाबद्दल आणि त्याच्या भवितव्याबद्दल बोलत बसलो होतो. नेतेसाहेब माझ्या पतीला सूचना देत होते, "पॅसिफिक रिलेशन्स कॉन्फरन्स" ला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी त्यांना भारत सोडून अमेरिकेला जावे लागणार होते. दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. डॉ. आंबेडकर माझ्याकडे वळून म्हणाले, "हे पाहा मिसेस शिवराज, या पेचप्रसंगाच्या क्षणी तुमच्या पतीला शे.का. फेडरेशनचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी म्हणून अमेरिकेला जावेच लागणार आहे. कोट्यवधी अस्पृश्यांची कैफियत मांडायला आणि जागतिक परिषदेपुढे आपल्या अडचणी ठेवायला त्यांनी तेथे गेलेच पाहिजे. तेथून ते सुखरूप परत येतीलच अशी हमी मी तुम्हाला देऊ शकणार नाही. तुमचं म्हणणं काय आहे? त्यांनी जाऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तसे सांगा. मी त्यांना थांबवीन आणि त्यांच्याऐवजी मी स्वतः नंतरच्या विमानानं जाईन." मी त्यांना म्हणाले, "माझ्या पतीला जाऊ द्या. माझी त्यांना पाठवण्यास मुळीच हरकत नाही. त्यांना वाटेत काही झाले तरी त्याचा दोष मी खचितच तुमच्यावर टाकणार नाही. उलट माझे पती एका चांगल्या कारणासाठीच आपल्याला सोडून गेले असे समाधान मी मानीन." माझ्याकडे पाहून ते हसले आणि म्हणाले, "छान मी तुमच्या धाडसाला दाद देतो." दुसऱ्या दिवशी माझे पती विमानाने अमेरिकेला रवाना झाले आणि डॉ. आंबेडकरांचा निरोप घेऊन मी माझ्या मुलासोबत मद्रासला परतले. ते नेहमी मला पत्र पाठवून माझ्या पतीचे कुशल कळवत असत.* *चौथ्यांदा मी त्यांना पुन्हा मद्रासलाच भेटले. श्रममंत्री म्हणून ते दक्षिण भारताच्या दौऱ्यावर होते. श्री. पां. न. राजभोज त्यांच्यासोबत आले होते. मदुराई, कोईम्बतूर आणि आंध्रप्रदेश भागांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांच्याबरोबर प्रवास करण्याची आणि त्यांच्या भाषणांचे तमिळ तर्जुमे करण्याची संधी मला लाभली.* *कायदामंत्री असताना ते जेव्हा आजारी पडले तेव्हा दिल्लीला जाऊन त्यांची शुश्रूषा करावी असे मला खूपच वाटले होते. पण दुर्दैवाने काही कारणांमुळे मी जाऊ शकले नाही. त्यानंतर कधीच त्या कोट्यवधी जनतेच्या निर्भय आणि सामर्थ्यशाली नेत्याला आणि भारतमातेच्या धोर सुपुत्राला भेटण्याची संधी मला मिळाली नाही.* *गाडा विद्वान, प्रामाणिक राजकारणी, निर्भय आणि सचोटीचा नेता आणि संविधानकर्ता अशा विविध स्वरूपांत जगाच्या मानवमात्रासमोर ते एक जिताजागता आदर्शच ठरले आहेत.* *कार्यसंपादक मुक्तीदाता विशेषांक* *लेखक श्रीमती मीनाम्बल शिवराज* *डॉ. आंबेडकरांचे निकटचे सहकारी आणि अ.भा.शे.का. फेडरेशनचे अध्यक्ष रावबहादूर एन. शिवराज यांच्या पत्नी,* *मिलिंद कॉलेज ऑफ आर्टस् कॉलिज मॅगझिन, विशेषांक-* *एप्रिल १९६६, पृष्ठ-४०* *संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अनुभव आणि आठवणी* #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
🙏 प्रेरणादायक बॅनर - <;&3? <;&3? - ShareChat
*आसक्तीचा त्याग* *हे म्हणाले-* *भिक्षूंनो! आसक्ती चांगल्या प्रकारे जाणून घेतल्याशिवाय, मनाला त्यातून काढून टाकल्याशिवाय, त्याचा त्याग केल्याशिवाय, [कोणताही मनुष्य] दुःख दूर करण्यास सक्षम नाही. भिक्षूंनो! केवळ आसक्ती चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यावर, मनाला त्यातून काढून टाकल्याशिवाय, त्याचा त्याग केल्याशिवाय, [कोणताही मनुष्य] दुःख दूर करण्यास सक्षम असू शकतो. भगवानांनी हे सांगितले आहे. तेथे असे म्हटले आहे: जी आसक्ती प्राण्यांना मूर्ख बनवते आणि त्यांना दुःखाकडे घेऊन जाते, ती योगी, ती चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यानंतर, ती सोडून देतात. ती सोडून दिल्यानंतर, ते पुन्हा कधीही या जगात येत नाहीत."* #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
💪बुद्धांची तत्वे📜 - ShareChat
*राजगृह आणि पोतराज* *दुपारची वेळ होती डॉ. बाबासाहेब राजगृहामध्ये आराम खुर्चीत बसून वाचन करीत होते रखरखत्या उन्हामुळे शांत वातावरण होते बाबासाहेब आपल्या वाचनात मग्न होते.* *या स्मशान शांततेचा भंग करणारा डूमडूम आणि चाबकाच्या फटक्याचा आवाज घरातील इतरांच्या कानावर पडत होता.* *हळूहळू हा आवाज वाढत होता. एक पोतराज उघडाबम कमरेपासून खाली नेसलेली विविध वस्त्रे, पायात घुंगराचे चाळ, हातात मोठा आसूड, त्याच्या बायकोच्या डोक्यावर मरिआईचा देव्हारा, पाठीवर कापडात बांधलेले लहानसे मूल, व तिच्या गळ्यात असलेले ढोलके ती जोराजोराने वाजवित होती.* *त्या तालावर पोतराज नाचत होता व आपल्या हातातील चाबकाचे स्वताच्या अंगावर फटकारे मारुन पैशासाठी हात पसरत होता आता मात्र पोतराज व त्याची बायको बंगल्यासमोर आल्यामुळे आवाज मोठा झाला होता बाबासाहेब वाचत असतांना त्यांचे लक्ष्य विचलित झाले. त्यांना वाटले एक दोन मिनिटांत हे थांबेल म्हणून ते तसेच बसून राहिले. पण आवाज काही बंद होईना.* *त्यांनी पुस्तक बाजूला ठेवून नोकराला बाहेर कोण आहे ते बघायला सांगितले. नोकराने पोतराज व त्याच्या बायको विषयी सांगितले. बाबासाहेब शांत बसून राहिले परंतु आवाज काही कमी होत नव्हता म्हणून बाबासाहेबानी त्यांना वर बोलावन्यास सांगितले. नोकराने हाक मारुन पोतराज व त्याच्या बायकोला वर येण्यास सांगीतले.* *बाबासाहेबानी वर येण्यास सांगीतले हे ऐकून त्यांची घाबरगुंडी उडाली. ते वाजविने-नाचने बंद करुन प्रचंड भीतीने निस्तेज होवून राजगृहाच्या जिन्याच्या पायऱ्या चढू लागले.* *त्यांच्या मनात भिती होती, आपल्यामुळे साहेबाना त्रास झाला असावा. वरच्या मजल्यावर त्यांनी दुरूनच बाबासाहेब आराम खुर्चीत बसलेले पाहिले आणि माना खाली घालून ते त्यांच्या समोर काही अंतरावर उभे राहिले.* *बाबासाहेबानी त्यांचे निस्तेज चेहरे, उन्हाने काळवंडलेले व घामाने भिजलेले शरीरे, त्यांच्या अंगावरील जीर्ण वस्त्रे व त्या बाईंच्या पाठीवरील मूल पाहून पोतराजला त्याचे नाव काय ते विचारले.* *एखादी नोकरी-धंदा का करीत नाहीस असे विचारले.* *हा भिक मागण्याचा धंदा तुम्हाला बरा वाटतो काय? त्यावर पोतराज बाबासाहेबाकडे न पाहता खाली मान घालुनच म्हणाला, मायबाप माझ नाव शिवराम पोतराज हाय. अन म्या शिकलो न्हाय म्हणून कुणी नोकरी देत व्हय अन धंद्यासाठी पैका न्हाय.* *मायबाप दोन पोर, आयबाप हाय त्यांच पोट कस भरू म्हणून शान हाच धंदा पत्कारला. त्या महामानवाचे हृदय पोतराजची परिस्तिती ऐकुन पाझरले. काही क्षण ते स्तब्ध झाले व त्याला म्हणाले, ठीक आहे. तुला जर धंद्यासाठी कुणी पैसे दिले, तर तू कोणता धंदा करशील? मायबाप माझ्या गावाकडे जावून चाय पाण्याची नाय तर वीडी पान सुपारीची टपरी टाकिन. पण मायबाप आम्हासनी पैका देतो कोण? बाबासाहेब पुन्हा स्तब्ध झाले आणि खुर्चीतून उठून कपटाकडे गेले. एक हजार रुपये आणले व विचार न करता त्या पोतराजच्या हातात ठेवले व म्हणाले, हे बघ शिवराम एक हजार रुपये आहेत. तू म्हणालास त्याप्रमाणे तुझ्या गावाकड़े जा, काहीतरी धंदा करुन तुझ्या कुटुंबाचे पालन कर आणि हा धंदा सोडून दे.* *एक महापुरुष आपल्या हातावर एक हजार रुपये ठेवत आहे, हे आपण एक दिव्य स्वप्न तर पाहत नाही ना? त्याने क्षणात स्वतःला सावरले, ही वस्तुस्तिति आहे हे त्याच्या लक्षात आले.* *त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा भरभरुन दान देणारा मायबाप महापुरुष आहे तरी कोण हे बघावे या उद्देशाने शिवरामने अश्रू भरलेल्या नयनांनी बाबासाहेबकडे एक दृष्टीक्षेप टाकला.* *शिवराम पोतराजसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कितीतरी महान होते. या गोष्टीला आज 75 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. त्यावेळचे एक हजार रुपये आज एक लाखापेक्षाही जास्त आहेत. दोघांनीही हात जोडून वाकून बाबासाहेबाना वंदन केले.* *येतो मायबाप म्हणून भराभरा जीना उतरून निघून गेले.* *शिवराम पोतराजने त्याच दिवशी मुंबई सोडली व आपल्या बिरहाडसह तो अहमदनगर जिल्ह्यातील गावाकडे गेला.त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण एक हजार रुपये त्याने आजपर्यंत कधीही पाहिले नव्हते.* *त्याने थोड़े पैसे घराच्या डागडुगीसाठी वापरले व बाकी पैशात पान सुपारी, वीडी,तम्बाखू वगैरेची टपरी लावली.* *दिवस जात होते, महीने जात होते. धंदा बऱ्यापैकी चालत होता.* *रोजच्या पैश्यातुन शिवराम आपले घर चालवून थोडे शिल्लक पैसे टाकत होता. त्याने दुसरीही टपरी सुरु केली. आता तो सुखाने जीवन जगत होता. अधुनमधुन त्याला बाबासाहेब यांची आठवण व्हायची. तो आपल्या मनातून त्यांना धन्यवाद द्यायचा.* *त्यांचे लाख आभार मानायचा. असे गरीबांचे वाली जन्माला यावेत इतराना सांगायचा. तो व्यथित होवून आपण बाबासाहेबाना हजार रूपये जावून दिले पाहिजेत म्हणायचा.त्यांच्यामुळे आज आपण खूप चांगले दिवस पाहत आहोत. असे त्याला मनोमन वाटायचे.* *अशी वर्षामागून वर्षे जात असतांना दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले.* *ही काळीज चिरणारी दुःखद बातमी जगभरात पसरली.* *विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडयात पोहचली.* *जेंव्हा ही बातमी शिवराम पोतराज पर्यंत पोहचलि, तेंव्हा त्याने हंबरडाच फोडला. तो धाय मोकलून रडू लागला. तो रडताना म्हणत होता,* *बाबासाहेब तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व होतात* *तुम्ही आम्हाला जगायला शिकविलेत, एका पोतराजला माणूस बनवले. तुमचे पैसे कोणाला परत करू? डॉ.बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी अहमदनगरहून जी मंडळी मुंबईत दाखल झाली त्यात शिवराम पोतराजही आला.* *दादर स्टेशनला उतरून इतरासोबत राजगृहाकडे जात असताना राजगृह दृष्टीस पडताच, तो हंबरडा फोडून म्हणत होता, बाबासाहेब याच रस्त्यावरच्या पोतराज।ला तुम्ही माणूस बनविलेत.* *हाच तो राजगृह ज्याच्यामुळे आज मी सुखी झालो. आता तुमचे एक हजार रूपये कोणाला देवू? सांगा बाबासाहेब सांगा...* *हे त्याच्या रडन्यातील बोल ऐकूण त्या ठीकानी उपस्थित असलेल्या पत्रकारानी शिवराम पोतराजला घेरले व विचारले तुझ्या जीवनात बाबासाहेब कसे आले?* *तेव्हा शिवरामने आपल्या बाबतीत राजगृहावर घडलेला सर्व प्रसंग सांगितला व शेवट करताना म्हणाला,* *गरीबांचा वाली गेला व पुन्हा धाय मोकलुन रडू लागला.* *असे करुणेचे महासागर,* *मानवतेचे कैवारी होते बाबासाहेब.* *पुन्हा होणे शक्य नाही....* #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜
💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 - 1~ ১৯৫ 1~ ১৯৫ - ShareChat
*काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. वर्षानुवर्षे अस्पृश्यतेचे चटके सहन करत जगणाऱ्या समाजाला माणूस म्हणून आपले हक्क, अधिकार मिळावेत, यासाठीचा हा सत्याग्रह होता.* *हा लढा हक्काचा होता, माणूस बनण्याच्या प्रक्रियेचा होता आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे साध्य होऊ शकले. त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन.* *तुम्ही दगडाला देव मानता परंतु जिवंत माणसाला माणूस मानत नाहीत... हा सत्याग्रह कुठल्याही देवा साठी किंव्हा धार्मिकते साठी नसून मानव समानतेसाठी आहे..!* *मंदिरात जाऊन काय आमचं कल्याण होणार नव्हता, प्रश्न हक्काचा होता, जर माझा भीम मंदिराची पायरी चढला नसता तर नाशिकचा काळा राम ऐतिहासिक झाला नसता* *2 मार्च 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह* *हा सत्याग्रह देवासाठी नसून, तो समानतेसाठी आहे...!!! माणसाला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी केलेला सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च इ.स. 1930 रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता* #☸️जय भीम #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
☸️जय भीम - 0 GROUPI ०२ मार्च HIURHIT माणुसकीची जाणीवॅ करून देण्यासाठी কললাসমাসম काळाराम मंदिर सत्याग्रह दिन निमित्त सर्वांना हादिक शुभच्छा.! 0 GROUPI ०२ मार्च HIURHIT माणुसकीची जाणीवॅ करून देण्यासाठी কললাসমাসম काळाराम मंदिर सत्याग्रह दिन निमित्त सर्वांना हादिक शुभच्छा.! - ShareChat
*काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. वर्षानुवर्षे अस्पृश्यतेचे चटके सहन करत जगणाऱ्या समाजाला माणूस म्हणून आपले हक्क, अधिकार मिळावेत, यासाठीचा हा सत्याग्रह होता.* *हा लढा हक्काचा होता, माणूस बनण्याच्या प्रक्रियेचा होता आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे साध्य होऊ शकले. त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन.* *तुम्ही दगडाला देव मानता परंतु जिवंत माणसाला माणूस मानत नाहीत... हा सत्याग्रह कुठल्याही देवा साठी किंव्हा धार्मिकते साठी नसून मानव समानतेसाठी आहे..!* *मंदिरात जाऊन काय आमचं कल्याण होणार नव्हता, प्रश्न हक्काचा होता, जर माझा भीम मंदिराची पायरी चढला नसता तर नाशिकचा काळा राम ऐतिहासिक झाला नसता* *2 मार्च 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह* *हा सत्याग्रह देवासाठी नसून, तो समानतेसाठी आहे...!!! माणसाला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी केलेला सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च इ.स. 1930 रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता* #☸️जय भीम #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
☸️जय भीम - 0) २ मार्च १९३० ٥٥٥٥ काळाशम मंदि२ शषत्याग्रह् दिन मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी लढलेला हा आधुनिक भारतातील सर्वात मोठा 0 सत्याग्रह हाता. 0) २ मार्च १९३० ٥٥٥٥ काळाशम मंदि२ शषत्याग्रह् दिन मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी लढलेला हा आधुनिक भारतातील सर्वात मोठा 0 सत्याग्रह हाता. - ShareChat
*नश्वरतेचे सौंदर्य हा जीवनाचा एक भाग आहे."* *सर्व काही येते - नंतर जाते.* *आनंद जातो.* *वेदनाही निघून जातात.* *आज तुमच्या शेजारी कोणीतरी आहे... उद्या वेगळे असू शकते.* *बौद्ध धर्म आपल्याला चिकटून राहायला शिकवत नाही.* *ते आपल्याला स्पष्टपणे पाहण्यास शिकवते:* *सर्व काही बदलते* *तुमचे मन ही अशी जागा आहे जिथे तुम्ही कधीही परत येऊ शकता.* *जेव्हा तुम्हाला नश्वरता समजते, तेव्हा तुम्हाला नुकसानाची भीती कमी होते, तुम्ही कमी आकलन करता आणि तुम्ही वर्तमानात अधिक खोलवर जगू लागता.* *आज, आयुष्याला हळूवारपणे धरा. आणि स्वतःलाही हळूवारपणे धरा.* *#अस्थायीत #बौद्धधर्म* *#बुद्धशिकवन #आंतरिकशांती* *#करुणा* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #☸️जय भीम
🙏 प्रेरणादायक बॅनर - beauty of impermanence The part 0f life is 0 Thuybiz beauty of impermanence The part 0f life is 0 Thuybiz - ShareChat
रुतबे को पहचान बनाकर रखा है हमने, लोग हैसियत से नहीं नाम से जानते है। #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #☸️जय भीम
🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ - ShareChat
00:20
या विश्वाला या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाच्या शांतीच्या धम्माची गरज आहे तुझेच धम्म चक्र फिरे जगावर #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
🙂Positive Thought - ShareChat
00:20
जहाँ स्वार्थ की धूल हो, वहाँ विश्वास का वृक्ष नहीं उगता।" #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
00:05