Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
ShareChat
click to see wallet page
@63559539
63559539
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
"बाहर कुछ भी बदलो, जब तक मन नहीं बदलेगा, कुछ नहीं बदलेगा।". #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - ShareChat
00:14
प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत रविवार, ता. २८-७-४० रोजी सकाळी १० वाजता दामोदर ठाकरसी हॉल, परेल बेचे, ठाणे अस्पृश्य विद्यार्थी वसतीगृह सहाय्यक मंडळाच्या विद्यमानाने अस्पृश्य समाजाची जंगी जाहीर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब अबिडकरांनी पुढीलप्रमाणे भाषण केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण "आजच्या प्रसंगी विशेष भाषण करण्याची जरुरी नाही. ठाणे बोर्डिंग १९२६ साली काहण्यात आले. १४-१५ वर्षे समाजावर कोणत्याही प्रकारचा भार न टाकता ते चालविले. ह्या बोर्डिंगच्या बाबत मुंबई सरकारशी मी काही अटी ठरविल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक मुलामागे १० रु. देण्याचे ठरले होते. पण काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांनी माझ्याशी वाटाघाटी न करता दरमहा मुलामागे १० रुपयांऐवजी ४ रुपये मंजूर केले. प्रत्येक मुलाचा खर्च ४ रुपयात भागवून बोर्डिंग चालविणे अतिशय कठीण काम आहे. आता ठाणे बोर्डिंगची सारी जबाबदारी तुमच्यावर आहे. हिंदूंच्या दारी जाणे स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे. आपण स्वतःच्या शिरावर जबाबदारी घेऊन बोर्डिंग अव्याहत चालविले पाहिजे. बोर्डिंग सतत चालविण्याच्या दृष्टीने आज मिळालेली मदत अपुरी आहे. कार्यकर्त्यांना काम करण्यास उत्साह येईल इतकी मदत करा. ती मदत कशी करावयाची ते तुम्ही ठरवा. पण मला वाटते आपल्यात सुशिक्षित शिक्षक, कारकून इत्यादी मंडळी प्रामुख्याने दिसत आहे. त्यांना दरमहा बोर्डिंगला मदत करणे शक्य आहे. म्यु. युनियनच्या सभासदाकडून वर्षाच्या काठी काही मदत मिळवून द्यावी. लग्नादिविधी होतात त्यावेळी बोर्डिंगला मदत करावी. समाजात १०० च्या वर संस्था आहेत. त्यांनी वर्षाखेर २०-२५ रु. दिल्यास वावगे होणार नाही. पण मला वाटते पैशाच्या अभावी बोर्डिंग बंद पडणार नाही. आपल्या समाजात एकात्र चित्ताने काम करणारा एकही मनुष्य आज वीस वर्षात मला दिसून आला नाही. कौन्सिलच्या किंवा म्युनिसिपालिटीच्या सभासदाच्या जागेकरिता १०० अर्ज तयार असतात पण एकेक काम एका मागनि, एकाच ध्येयाने करणारा एकही मनुष्य अजून माझ्यापुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजे, जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्न सुटत नाहीत. त्याकरिता अहोरात्र झटले पाहिजे. आंह्मण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे, हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की त्यांनी मिळविलेली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहतात. ध्येयवादी कार्यकर्ते त्यांच्यात निपजतात. आपल्या कार्यकर्त्या मंडळींनी अजून निश्चयात्मक निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करावयास सुरुवात केल्यास आपली चळवळ पसरल्याशिवाय राहणार नाही... मुक्तीदाता विशेषांक संदर्भ जनता, दि. ३ ऑगस्ट १९४०० #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - ১@  ১@ - ShareChat
सब कुछ नश्वर है.. सब कुछ लगातार बदल रहा है, सब कुछ खत्म हो रहा है... आपल्या इंद्रियांवर आणि हृदयावर विजय मिळवणे हे हजारो युद्धे जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. #buddhadharma #buddhistwisdom #buddhaquotes #buddhateachings #buddha #buddhism #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - Everything is impermanent. everything is constantly changing evervthing iS ceasing to exist] Everything is impermanent. everything is constantly changing evervthing iS ceasing to exist] - ShareChat
बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या कर्तव्यावरच बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून... बहिष्कृत विद्यार्थ्यांचे चतुर्थ वार्षिक सामाजिक संमेलन पुणे येथे बहिष्कृतांचे सुप्रसिद्ध पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार ता. २ ऑक्टोबर १९२७ रोजी उत्साहाने पार पडले. समारंभासाठी डी. सी. मिशनचा अहिल्याश्रम हॉल सुशोभित केला होता. संमेलनाचा कार्यक्रम शनिवार व रविवार असे दोन दिवस ठेवण्यात आला होता. शनिवारी विद्यार्थ्यांच्या संभाषणाचे व खेळांचे सामने झाले. या सामन्यात महार मांग व चांभार या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हे नमूद करण्यास आनंद वाटतो. संभाषणात व खेळात बक्षीसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी ५ वाजता होणार होता. त्यासाठी नियोजित अध्यक्ष व बहिष्कृतांचे पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. सोळंकी, कदम वगैरे मंडळीसमवेत ५ वाजता येऊन दाखल झाले. पाहुणे मंडळीत डॉ. सोळंकी, प्रि. तायडे, रा. श्रीधरपंत टिळक, रा. संगमनेरकर, कदम, ऐदाळे, बाराथ, भंडारे, राजभोज, लांडगे, वायदंडे, डी. सी. मिशनचे रा. पाताडे, सुभेदार घाटगे बंधु, गायकवाड तसेच सेवासदनातील प्रौढ विद्यार्थिनी ट्रेनिंग कॉलेजचे प्रौढ विद्यार्थी वगैरे मंडळी प्रामुख्याने दिसत होती. नंतर जॉ. सेक्रेटरी रा. रणपिसे यांनी निरनिराळ्या सामन्यातील बाबींचे मार्मिक विवेचन केले आणि अध्यक्षांनी स्वहस्ताने यशस्वी उमेदवारास बक्षीसे वाटली. नंतर अध्यक्षांनी आपले भाषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण त्यात त्यांनी बहिष्कृत वर्गाच्या सध्याच्या भयानक व चिंताजनक परिस्थितीचे वर्णन करून अशा विषम, हिरमोड करणाऱ्या परिस्थितीत बहिष्कृत विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यावर बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे बहिष्कृतातील सुशिक्षित स्त्रियांनीही आपले शील व कर्तव्य सांभाळून समाजाच्या प्रगतीस हातभार लावण्याचा उपदेश केला. सुशिक्षित असूनही केवळ अस्पृश्य मानले गेल्यामुळे बहिष्कृतातील लायक माणसांची कशी कुचंबणा होते हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन जेव्हा पटविले त्यावेळी सभागृहात भीषण गांभीर्य पसरले. डॉक्टरसाहेब मनापासून बोलत होते. त्यावेळी त्यांच्या जीवाची तळमळ व मनाची खळबळ त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रतिबिंबित होत होती. एकंदरीत अध्यक्षांचे भाषण अस्खलित, जोरदार व चित्ताकर्षक झाले... मुक्तीदाता विशेषांक संदर्भ बहिष्कृत भारत, दि. ४ नोव्हेंबर १९२७. #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - ARAS< ARAS< - ShareChat
आज आपण करत असलेल्या काही गोष्टींचे फळ खूप नंतर मिळते. त्यामुळे, अनेक लोक चुकून असे मानतात की कार्यकारणभाव अस्तित्वात नाही. पण वास्तविक पाहता, ही केवळ 'अजून योग्य वेळ आलेली नाही' एवढीच बाब असते. जमिनीत बी पेरल्याप्रमाणे, ते दुसऱ्याच दिवशी उमलेल अशी अपेक्षा करता येत नाही. त्याला वेळ, पाणी, सूर्यप्रकाश – आणि योग्य परिस्थितीची गरज असते. म्हणून, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली गेली नाही म्हणून निराश होऊ नका. आयुष्याने तुमच्यावर कृपा केली नाही म्हणून दुःखी होऊ नका. चांगली कृत्ये करत राहा, कारण प्रत्येक बी शांतपणे वाढत असते. एक दिवस, योग्य वेळ आल्यावर फळ पिकेल. आणि तेव्हा आपल्याला समजेल: या जीवनात काहीही निरर्थक नाही. #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - ShareChat
!! एकांत !! अंत ही आरंभ है, वासना ही मोह है, इच्छा ही लालच है, समझ ही ज्ञान है अपेक्षाएं दुख है, एकांत ही सुख है ।। #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
00:14
*क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!* *समाजात असलेली जाती भेदाची दरी मिटवण्यासाठी त्यांनी बंधुत्वाचे विचार रुजवले.. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे..* *समतावादी विचारांचा प्रसार करुन क्रांती घडविणारे थोर संत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.* *#महात्मा #बसवेश्वर #जयंती* #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - ShareChat
माणसांमध्ये जात नसते. माणूस स्वतःच एक जात आहे. माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या गुणांमुळे असते, जन्माने नव्हे. जो खोटा अहंकारी माणूस मानवनिर्मित जात, वंश, जमात किंवा वंशाच्या आधारावर स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ समजतो, ती त्याची ओळख असते, जे त्याच्या अज्ञानाचे आणि विकृत मानसिकतेचे द्योतक आहे. #बुद्ध #धम्म #संघ 💐💌 🚩 #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat
आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो. गोष्टींचाही आणि आयुष्याचा ही #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #💪बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - ShareChat
00:14
समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणे - हेच आयुष्याचे सार "वैयक्तिक सौख्याचे ध्येय नजरेसमोर न ठेविता स्वतःच्या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणे यातच आपल्या आयुष्याचे सार आहे." डॉ. बाबासाहेब अबिडकरांनी नागपूर येथे दि. २५, २६, २७ जाने, १९४७ रोजी भरलेल्या ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट विद्यार्थी परिषदेस खालील पत्र पाठवून ओजस्वी संदेश दिला आहे. ते पत्र जसेच्या तसे येथे छापले आहे; वेस्टर्न कोर्ट, नवी दिल्ली. श्री. गेडाम यांस - माझ्याकडे आगाऊ आलेल्या कामाच्या गर्दीमुळे आपणांस शक्य तितक्या लवकर पत्र पाठविता न आल्यामुळे मला अत्यंत दुःख होत आहे. आपण ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन परिषदेहून स्वतंत्र अशी ऑल इंडिया शेडयुल्ड कास्ट विद्यार्थी परिषद भरवित असल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत असून आपण आखलेल्या या योजनेला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. (आपल्या सूज्ञ मतप्रणालीला) कायदेमंत्री नामदार जे. एन. मंडल यांना मी तसे कळविले असून ते परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी निश्चितपणे येत आहेत. माझी तिकडे येण्याची इच्छा होती. परंतु कार्य बाहुल्यामुळे मला ते शक्य होणार नाही याबद्दल अत्यंत दिलगिरी वाटते. तरीपण ही परिषद यशस्वी होवो असे मी सुयश चिंतितो. अस्पृश्य विद्यार्थ्यांनी मुख्य दोन गोष्टी शिकावयास पाहिजेत. पहिली म्हणजे (१) अस्पृश्य विद्यार्थ्यांस संधी मिळाली असता बौद्धिक बाबतीत दुसऱ्या कोणापेक्षाही आपण बुद्धीने निकस आहोत असे होता कामा नये आणि (२) दुसरी म्हणजे त्यांनी वैयक्तिक सौख्याचे ध्येय आपल्या नजरेसमोर न ठेवता आपला समाज स्वतंत्र, सामर्थ्यवान व स्वाभिमानी (मानास पात्र) कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. या दोन गोष्टी या परिषदेद्वारा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसल्यास या परिषदेने पुष्कळच कार्य केले असे म्हणावयास कोणताच प्रत्यवाय नाही. आपण अंगिकारीलेले कार्य चांगल्यात-हेने पार पाडाल अशी माझी पूर्ण खात्री आहे. आपला भीमराव आंबेडकर संदर्भ जनता, दि. १ फेब्रु. १९४७. मुक्तीदाता विशेषांक #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - ShareChat