
कैलास किसन बोंबले
@884574
अध्यक्ष श्री शिव सिध्देश्वर जनासेवा प्रतिष्ठान
*#छत्रपती_शिवाजी_महाराज* एक आख्यायिका का झाले...
शिवाजी महाराजांचे ७ घोडे -
१- मोती
२- विश्वास
३- तुरंगी
४- इंद्रायणी
५- गाजर
६- रणभीर
७- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.
शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत.
छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता.
संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी.
मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले.
जगातील १११ देशात १९ फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. १३०० पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला.
छत्रपती शिवाजी महाराज एक
भूगर्भ शाश्रज्ञ-
आज आपण शेतीत ३०० फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज ४०० वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर ४००० फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना.
छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले.
जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही, स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत.
छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर –
प्रत्येक किल्ल्यावर २ प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात
किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे.
याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा.
पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेल्या आहेत. एक स्टेप/टप्पा साधारण २५ फुट व जास्त लांब आहे.
रायगड-
राज्यभिषेक दिन ६ जून.
महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी १०००० असे.
६५ किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला.
२००० फुटावर पहिली तटबंदी
४००० फुटावर दुसरी तटबंदी
किल्याची वाट एकदम छोटी.
किल्यावर ३०० इमारती होत्या.
१०००० लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी ९ टाके.
रायगडाला ३ बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे.
किल्याचे एकूण क्षेत्र १२०० एकर.
रायगडावर ४२ दुकाने होती. पैकी २१ दुकाने देशी माल विक्री व २१ दुकाने परदेशी माल विक्रीसाठी.
आजच काम आजच झालं पाहिजे, उद्या नाही त्यांचं नाव शिवाजी महाराज.
मराठ्यांचे घोडे एकदा निघाल्यावर एक दमात १००/१२५ किमी सहज जात कारण मावळे स्वराज्यासाठी लढत होते.
मुघलांचे घोडे ३०/३५ किमीवर थांबत कारण मुघल सैन्य पगारसाठी काम करत होते.
महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळात
८ मंत्री
३० विभाग (१२ महाल व १८ कारखाने)
३० विभागात ६०० कर्मचारी
महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल.
रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.
छत्रपती शिवाजी महाराज -
महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये त्या काळात मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रच, डच, पोर्तुगीज यांनी तिथली शेती मोडीत काढण्यासाठी त्यावेळच्या गोवा प्रांतातून मीठ आणून स्वस्तात विक्री सुरु केली. महाराज्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली.
म्हणून छत्रपतींना जानता राजा म्हणतात.
वयाच्या १७ व्या शिवरायांच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून झाली. त्यांनी स्वतः डिजाईन करून राजगड किल्ला बांधला. एक इंग्रज लिहितो “ शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन- इंजिनिअरचा गुरु” होते. बांधकाम खर्च २२००० कोटी.
या गडावर महाराज २७ वर्ष राहिले.
१९८२ साली पोर्तुगालची राजधानी लिसबेन येथे गडकोट/किल्ल्यांचे जागतिक प्रदर्शन भरले होते.
त्या प्रदर्शनाच्या निवड समितीने जगातील किल्ले बघितल्यावर “राजगड” किल्यास प्रथम पारितोषिक दिले.
महाराज्यांच्या मृत्यूनंतर ३०२ वर्षांनीही महाराज्यांच्या सन्मान होतो.
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #शिवजयंती
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
#श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का?
आत्ता दुपारी मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात काही निष्पाप नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही?
फक्त इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटिंग करायचं पण मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, त्याच काय?
मेट्रोचे काम सुरू असताना
सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का?
वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती?
मेट्रोची कामं वेगाने होत आहेत, हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का?
जबाबदारी कोणाची?
दरवेळी अशा घटना घडल्यानंतर फक्त 'चौकशी'चं नाटक होतं. याची जबाबदारी कोण घेणार?
विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेत णारा नको!
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
दीड वर्षात बाजी पूर्णतः पलटली आहे. सतत वीस वर्ष ठरवून केलेल्या सुनियोजित छळातून अक्षरशः आगीतून सोनं उजळून निघावं तसा राहूल गांधी नावाचा मनुष्य तावून-सुलाखून बाहेर पडला आहे. आता तो पोलाद बनून नकली छप्पन्न इंची छातीतलं भय दररोज उघडं पाडत आहे. मोदी शहांना राहूल गांधीच्या भाषणाला गैरहजर रहावं लागावं एवढं भय त्यानं निर्माण केलं आहे. जोशी-वैष्णव सारख्या मोदींच्या कट्टर माणसांच्या हाताला धरून ओढतो आणि 'चला आपण एकत्र बोलू पत्रकारांशी' असं हसतहसत म्हणू शकतो आणि ते चक्क पळून जातात एवढा पोलादी झाला आहे. Authentication दिजीये असं किरण रिजीजू उठून उभा राहून म्हणतो आणि विलक्षण भेदक डोळ्यांनी त्याच्याकडे पहात राहूल गांधी 'yes i am giving it' म्हणतो आणि राहूल गांधींनी authentication दिलं तर सरकारची उरलीसुरली इज्जत जाईल हा विचार करून लोकसभा अध्यक्षाची पाचावर धारणा बसते आणि ते हस्तक्षेप करत 'आप को मिनिस्टर authentication मांग रहे है, चेअर ने आप को नही मांगा है, आप मत दिजिये' अशी व्याकुळता दाखवतात इतका तो पोलादी झाला आहे. देश हे सगळं रोज पहातोय. मोदी शहा राहूलचं भाषण समोरासमोर ऐकूही शकत नाहीत हेही देश दररोज पहातोय.
संघ आणि भाजपानं त्याला पप्पू ठरवण्यासाठी केलेली अक्षरशः करोडो रुपयांची आणि कैक मनुष्य-तासांची 'गुंतवणूक' म्हणजे आता डबघाईला आलेले समभाग झालेले आहेत.
राहूल गांधी आज एका अशा वळणावर उभे आहेत ज्यात किमान पाच पिढ्यांच्या निंदानालस्तीची परतफेड ते करत आहेत. मोतीलाल नेहरू ते राहूल अशा पाच पिढ्यांचा संघ परिवार आणि त्यांच्या पिलावळीनं दीर्घ द्वेष केला. हा द्वेषही संघाच्या आजच्या वयाइतकाच म्हातारा झालेला आहे आणि आता त्या द्वेषाचे मरून जाण्याचे दिवस लांब नाहीत.
कोणाला हे जरा जास्तच झालं असं वाटत असेल तर त्यांनी गेल्या पाच वर्षातला राहूल गांधींचा आलेख पहावा. 44 ते 100 एवढ्या खासदार वाढीत तो आलेख वाचता येत नाही. त्यासाठी अजून पलिकडे पहावं लागतं.
या देशापायी आज्जीचा खून आणि बापाच्या शरीराच्या चिंध्या झालेल्या पाहिलेल्या एका वीस वर्षाच्या तरूण मुलाची मनोवस्था काय असू शकेल? अशा मुलाचं राजकारण जन्मण्याआधी गर्भातच मारून टाकण्यासाठी एक सुसज्ज यंत्रणा निलाजरेपणे पंचवीस वर्ष एक सुनियोजित यंत्रणा राबवते. आयटीसेल नामक माकडावर करोडोचा खर्च करून लाखो पानांचा एक असा कन्टेन्ट तयार करते ज्यात मोतीलाल नेहरू मुसलमान होते पासून राहूल गांधी ड्रग्ज घेतात अशा हजारो कथा प्रसारित होतात. त्याही त्या काळात ज्या काळात सोशल मिडीया हा हनुमान नसून फक्त एक माकड आहे असा शोध अजून लागायचा होता. निर्बुद्ध पदवीधारकांच्या या देशात 'खरं कशावरून'? असं विचारलं तर 'व्हाट्सअपवर आलंय ना' असं शिकलेले लोक सांगत होते त्या काळात.
कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आलं, त्यानं भ्रष्टाचारी जनता पक्षाच्या मिडीया सेलवर छापा टाकला तेव्हा त्यांना राहूल, नेहरू यांचे अक्षरशः हजारो बनावट फोटो, अत्यंत घाणेरड्या मजकुराचा लाखांनी कंटेंट सापडला होता. कर्नाटक सरकारनं अमित मालवियवर एफआयआर नोंदवला होता. एका राज्यात एवढं सापडत असेल तर देशभरात केवढा कंटेंट तयार होत असेल कल्पना करा म्हणजे राहूल गांधींनी किती विष पचवलंय याची कल्पना येईल.
विषाला विषानंच उत्तर देण्याइतके काँग्रेसचे कार्यकर्ते आजही देशात आहेत पण त्यांच्या नेत्यानं विषाचा नव्हे तर गांधींचा मार्ग निवडला.
पदयात्रा. दोन पदयात्रा ही त्या गांधी मार्गाची सुरूवात होती. पदयात्रेनं काय झालं? अचानक लोकांनी स्वतः होऊन काँग्रेसचा सोशल मिडीया सुरू केला. पदयात्रेतले सामान्य लोक राहूल गांधींबरोबरचे फोटो पोस्ट करायला लागले. किती सहज आणि हसत हा माणूस सामान्य लोकांना मिठी मारतोय हेच या देशाला सवयीचं झालेल्या 'फक्त मी'वादी राजकारणाला पहिला छेद देणारं ठरलं. माध्यमं आणि सामान्य माणसांसोबतची सहजता मोदींना आयुष्यात जमली नाही ती बिनधास्त राहूल दररोज दाखवत होता. सामान्य माणसांसोबतची पदयात्रा म्हणजे काँग्रेस ही संघटना नसून चळवळ आहे हे सिद्ध करणारी मोठी घटना होती.
राहूल गांधी गांजा ओढतो, राहूल गांधी ड्रग्ज घेतो या कुजबूज मोहिमेला राहूलनी हजारो मैल चालत जाऊन उत्तर दिलं. उभा आडवा देश झपाझप चालत सर केला. संघ भाजपाच्या कोणत्याही शेठला जिथं दिवसाला दोन तीन किलोमीटर एवढाही देह हलवणं अशक्य तिथं हा माणूस दिवसाला पस्तीस चाळीस किलोमीटर झपाझप आणि न थकता चालला. गांजा आणि ड्रग्जनी ग्रस्त झालेला माणूस हे करू शकत नाही हे देशातल्या लहान मुलालाही कळतं. वीस वर्षांचा नीच अपप्रचार दोन पदयात्रांमध्येच त्यानं धुवून काढला. संघ आणि भाजपाचा खोटारडेपणा लोकांना दाखवून देण्याचा यापेक्षा अधिक चांगला मार्ग कोणता असू शकतो?
या दोन पदयात्रांनी 44 पासून 100 पर्यंत नेलं आणि विरोधी पक्षनेता बनवलं. लोकांनी कोणताही पैसा, दारू, लाडकी बहिण योजना असं काहीही न घेता हे केलं.
संसदेत पप्पू बघता बघता पप्पा झाला. कधी मोदींची गळाभेट तर कधी 'सर, बाहर वह नही बेचारे मिडीयावाले इंतजार कर रहे है' अशी ओम बिर्लांची घेतलेली अहिंसक फिरकी, कधी 'सर आप ही बताईये की मै क्या बोलू' असा सणसणीत टोमणा ते काल विलक्षण भेदक डोळ्यांनी किरण रिजीजूला आवंढा गिळायला लावणे इथपर्यंत राहूल गांधी येऊन पोचला आहे.
आता राहूल गांधींना थांबवणं अशक्य आहे. याची जाणीव गेल्या दीड वर्षात मोदी शहांना झालेली आहे. तीच तीच जुनी खोटी रट लावण्याशिवाय दोघांच्या हाती आज काहीच लागत नाही. भाषणाच्या वेळी गैरहजर रहाणे एवढाच एक डिफेन्स उरला आहे.
राहूल गांधी आता थांबणार नाहीत. जेलला न घाबरणारा मनुष्य ही हुकूमशहाच्या मनातली सगळ्यात मोठी भीती असते. 'शरम नही आती देश को बेच दिया' यावर काही थातूरमातूर उत्तर येईलही पण केवळ एप्स्टिन फाईल आणि अदानीची अटक या दोन कारणापायी मोदींनी अमेरिकेसमोर संपूर्ण शरणागती पत्करली हे लोकांपर्यंत पोचायचं ते पोचलं. अमेरिकेशी एकतर्फी व्यापार करारानंतर मोदींनीच स्वतःची प्रतिमा "नामधारी पंतप्रधान" अशी करून घेतली यात शंका नाही. आज अमेरिकेकडे भारताची पत बांग्लादेशपेक्षाही कमी आहे. बांग्लादेशला शून्य तर भारताला अठरा टक्के निर्यातशुल्क ही बाब लोकांना खटकत आहे.एप्स्टिन आत्ता आत्ता जिवंत झालेलं भूत आहे. अजून तीन लाख फायली उजेडात यायच्या आहेत.
आता राहूल गांधी थांबणं अशक्य आहे. राहूल गांधी न थांबणे म्हणजे गांधी भारी ठरणे. आंबेडकर भारी ठरणे. आम्हाला गांधी आंबेडकर भारी ठरलेलेच पहायचं आहे. दुसरं काय पाहिजे?
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा.
गुणवंत, यशवंत, किर्तीवंत व्हा !
१२ वी (HSC) बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
सर्वांना भरपूर यश मिळो हीच सदिच्छा! #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
#शहीद_दिवस
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन
सत्य, अहिंसा आणि न्याय हे त्यांचे विचार हिंदुस्थानची ची आत्मा आहे . 🇮🇳
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🤩खरी मैत्री #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते #अजित_दादा_पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.
महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक दुखःद बातमी...
#भावपूर्ण_श्रद्धांजली_दादा...💐
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🤩खरी मैत्री
स्वातंत्र्य. समता. न्याय. बंधुता. सार्वभौमत्व. समाजवाद. धर्मनिरपेक्षता. लोकशाही. गणराज्य.
#प्रजासत्ताक_दिन 🇮🇳
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा.
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🤩खरी मैत्री #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान











