
कैलास किसन बोंबले
@884574
अध्यक्ष श्री शिव सिध्देश्वर जनासेवा प्रतिष्ठान
दीड वर्षात बाजी पूर्णतः पलटली आहे. सतत वीस वर्ष ठरवून केलेल्या सुनियोजित छळातून अक्षरशः आगीतून सोनं उजळून निघावं तसा राहूल गांधी नावाचा मनुष्य तावून-सुलाखून बाहेर पडला आहे. आता तो पोलाद बनून नकली छप्पन्न इंची छातीतलं भय दररोज उघडं पाडत आहे. मोदी शहांना राहूल गांधीच्या भाषणाला गैरहजर रहावं लागावं एवढं भय त्यानं निर्माण केलं आहे. जोशी-वैष्णव सारख्या मोदींच्या कट्टर माणसांच्या हाताला धरून ओढतो आणि 'चला आपण एकत्र बोलू पत्रकारांशी' असं हसतहसत म्हणू शकतो आणि ते चक्क पळून जातात एवढा पोलादी झाला आहे. Authentication दिजीये असं किरण रिजीजू उठून उभा राहून म्हणतो आणि विलक्षण भेदक डोळ्यांनी त्याच्याकडे पहात राहूल गांधी 'yes i am giving it' म्हणतो आणि राहूल गांधींनी authentication दिलं तर सरकारची उरलीसुरली इज्जत जाईल हा विचार करून लोकसभा अध्यक्षाची पाचावर धारणा बसते आणि ते हस्तक्षेप करत 'आप को मिनिस्टर authentication मांग रहे है, चेअर ने आप को नही मांगा है, आप मत दिजिये' अशी व्याकुळता दाखवतात इतका तो पोलादी झाला आहे. देश हे सगळं रोज पहातोय. मोदी शहा राहूलचं भाषण समोरासमोर ऐकूही शकत नाहीत हेही देश दररोज पहातोय.
संघ आणि भाजपानं त्याला पप्पू ठरवण्यासाठी केलेली अक्षरशः करोडो रुपयांची आणि कैक मनुष्य-तासांची 'गुंतवणूक' म्हणजे आता डबघाईला आलेले समभाग झालेले आहेत.
राहूल गांधी आज एका अशा वळणावर उभे आहेत ज्यात किमान पाच पिढ्यांच्या निंदानालस्तीची परतफेड ते करत आहेत. मोतीलाल नेहरू ते राहूल अशा पाच पिढ्यांचा संघ परिवार आणि त्यांच्या पिलावळीनं दीर्घ द्वेष केला. हा द्वेषही संघाच्या आजच्या वयाइतकाच म्हातारा झालेला आहे आणि आता त्या द्वेषाचे मरून जाण्याचे दिवस लांब नाहीत.
कोणाला हे जरा जास्तच झालं असं वाटत असेल तर त्यांनी गेल्या पाच वर्षातला राहूल गांधींचा आलेख पहावा. 44 ते 100 एवढ्या खासदार वाढीत तो आलेख वाचता येत नाही. त्यासाठी अजून पलिकडे पहावं लागतं.
या देशापायी आज्जीचा खून आणि बापाच्या शरीराच्या चिंध्या झालेल्या पाहिलेल्या एका वीस वर्षाच्या तरूण मुलाची मनोवस्था काय असू शकेल? अशा मुलाचं राजकारण जन्मण्याआधी गर्भातच मारून टाकण्यासाठी एक सुसज्ज यंत्रणा निलाजरेपणे पंचवीस वर्ष एक सुनियोजित यंत्रणा राबवते. आयटीसेल नामक माकडावर करोडोचा खर्च करून लाखो पानांचा एक असा कन्टेन्ट तयार करते ज्यात मोतीलाल नेहरू मुसलमान होते पासून राहूल गांधी ड्रग्ज घेतात अशा हजारो कथा प्रसारित होतात. त्याही त्या काळात ज्या काळात सोशल मिडीया हा हनुमान नसून फक्त एक माकड आहे असा शोध अजून लागायचा होता. निर्बुद्ध पदवीधारकांच्या या देशात 'खरं कशावरून'? असं विचारलं तर 'व्हाट्सअपवर आलंय ना' असं शिकलेले लोक सांगत होते त्या काळात.
कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आलं, त्यानं भ्रष्टाचारी जनता पक्षाच्या मिडीया सेलवर छापा टाकला तेव्हा त्यांना राहूल, नेहरू यांचे अक्षरशः हजारो बनावट फोटो, अत्यंत घाणेरड्या मजकुराचा लाखांनी कंटेंट सापडला होता. कर्नाटक सरकारनं अमित मालवियवर एफआयआर नोंदवला होता. एका राज्यात एवढं सापडत असेल तर देशभरात केवढा कंटेंट तयार होत असेल कल्पना करा म्हणजे राहूल गांधींनी किती विष पचवलंय याची कल्पना येईल.
विषाला विषानंच उत्तर देण्याइतके काँग्रेसचे कार्यकर्ते आजही देशात आहेत पण त्यांच्या नेत्यानं विषाचा नव्हे तर गांधींचा मार्ग निवडला.
पदयात्रा. दोन पदयात्रा ही त्या गांधी मार्गाची सुरूवात होती. पदयात्रेनं काय झालं? अचानक लोकांनी स्वतः होऊन काँग्रेसचा सोशल मिडीया सुरू केला. पदयात्रेतले सामान्य लोक राहूल गांधींबरोबरचे फोटो पोस्ट करायला लागले. किती सहज आणि हसत हा माणूस सामान्य लोकांना मिठी मारतोय हेच या देशाला सवयीचं झालेल्या 'फक्त मी'वादी राजकारणाला पहिला छेद देणारं ठरलं. माध्यमं आणि सामान्य माणसांसोबतची सहजता मोदींना आयुष्यात जमली नाही ती बिनधास्त राहूल दररोज दाखवत होता. सामान्य माणसांसोबतची पदयात्रा म्हणजे काँग्रेस ही संघटना नसून चळवळ आहे हे सिद्ध करणारी मोठी घटना होती.
राहूल गांधी गांजा ओढतो, राहूल गांधी ड्रग्ज घेतो या कुजबूज मोहिमेला राहूलनी हजारो मैल चालत जाऊन उत्तर दिलं. उभा आडवा देश झपाझप चालत सर केला. संघ भाजपाच्या कोणत्याही शेठला जिथं दिवसाला दोन तीन किलोमीटर एवढाही देह हलवणं अशक्य तिथं हा माणूस दिवसाला पस्तीस चाळीस किलोमीटर झपाझप आणि न थकता चालला. गांजा आणि ड्रग्जनी ग्रस्त झालेला माणूस हे करू शकत नाही हे देशातल्या लहान मुलालाही कळतं. वीस वर्षांचा नीच अपप्रचार दोन पदयात्रांमध्येच त्यानं धुवून काढला. संघ आणि भाजपाचा खोटारडेपणा लोकांना दाखवून देण्याचा यापेक्षा अधिक चांगला मार्ग कोणता असू शकतो?
या दोन पदयात्रांनी 44 पासून 100 पर्यंत नेलं आणि विरोधी पक्षनेता बनवलं. लोकांनी कोणताही पैसा, दारू, लाडकी बहिण योजना असं काहीही न घेता हे केलं.
संसदेत पप्पू बघता बघता पप्पा झाला. कधी मोदींची गळाभेट तर कधी 'सर, बाहर वह नही बेचारे मिडीयावाले इंतजार कर रहे है' अशी ओम बिर्लांची घेतलेली अहिंसक फिरकी, कधी 'सर आप ही बताईये की मै क्या बोलू' असा सणसणीत टोमणा ते काल विलक्षण भेदक डोळ्यांनी किरण रिजीजूला आवंढा गिळायला लावणे इथपर्यंत राहूल गांधी येऊन पोचला आहे.
आता राहूल गांधींना थांबवणं अशक्य आहे. याची जाणीव गेल्या दीड वर्षात मोदी शहांना झालेली आहे. तीच तीच जुनी खोटी रट लावण्याशिवाय दोघांच्या हाती आज काहीच लागत नाही. भाषणाच्या वेळी गैरहजर रहाणे एवढाच एक डिफेन्स उरला आहे.
राहूल गांधी आता थांबणार नाहीत. जेलला न घाबरणारा मनुष्य ही हुकूमशहाच्या मनातली सगळ्यात मोठी भीती असते. 'शरम नही आती देश को बेच दिया' यावर काही थातूरमातूर उत्तर येईलही पण केवळ एप्स्टिन फाईल आणि अदानीची अटक या दोन कारणापायी मोदींनी अमेरिकेसमोर संपूर्ण शरणागती पत्करली हे लोकांपर्यंत पोचायचं ते पोचलं. अमेरिकेशी एकतर्फी व्यापार करारानंतर मोदींनीच स्वतःची प्रतिमा "नामधारी पंतप्रधान" अशी करून घेतली यात शंका नाही. आज अमेरिकेकडे भारताची पत बांग्लादेशपेक्षाही कमी आहे. बांग्लादेशला शून्य तर भारताला अठरा टक्के निर्यातशुल्क ही बाब लोकांना खटकत आहे.एप्स्टिन आत्ता आत्ता जिवंत झालेलं भूत आहे. अजून तीन लाख फायली उजेडात यायच्या आहेत.
आता राहूल गांधी थांबणं अशक्य आहे. राहूल गांधी न थांबणे म्हणजे गांधी भारी ठरणे. आंबेडकर भारी ठरणे. आम्हाला गांधी आंबेडकर भारी ठरलेलेच पहायचं आहे. दुसरं काय पाहिजे?
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा.
गुणवंत, यशवंत, किर्तीवंत व्हा !
१२ वी (HSC) बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
सर्वांना भरपूर यश मिळो हीच सदिच्छा! #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
#शहीद_दिवस
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन
सत्य, अहिंसा आणि न्याय हे त्यांचे विचार हिंदुस्थानची ची आत्मा आहे . 🇮🇳
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🤩खरी मैत्री #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते #अजित_दादा_पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.
महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक दुखःद बातमी...
#भावपूर्ण_श्रद्धांजली_दादा...💐
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🤩खरी मैत्री
स्वातंत्र्य. समता. न्याय. बंधुता. सार्वभौमत्व. समाजवाद. धर्मनिरपेक्षता. लोकशाही. गणराज्य.
#प्रजासत्ताक_दिन 🇮🇳
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा.
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🤩खरी मैत्री #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
भारतात राष्ट्रीय मतदार दिवस
National Voters' Day
दरवर्षी २५ जानेवारीला साजरा केला जातो.
महत्त्वाची माहिती:
उद्देश: तरुणांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे आणि मतदार जागृती करणे.
सुरुवात: हा दिवस २०११ पासून साजरा केला जात आहे.
कारण: २५ जानेवारी १९५० रोजी 'भारतीय निवडणूक आयोगा'ची (Election Commission of India) स्थापना झाली होती.
'वोट जैसा कुछ नहीं, वोट जरूर डालेंगे हम'
(Nothing Like Voting, I Vote for Sure).
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #🤩खरी मैत्री #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
#श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #🙏 प्रेरणादायक बॅनर
तिच्या चिमुकल्या पंखांना बळ देऊया,
तिचा आत्मसन्मान जागवूया…
#🙏 प्रेरणादायक बॅनर #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा.










![🙏 प्रेरणादायक बॅनर - राष्ट्रीय दिवस| GGG@[ अध्यक्षा छिवा स्िद्वेशचर जनसेवा प्रातिष्ठान कैलास भामाबाईँ उपाध्यक्षा गुँबई काँग्रेवा निवाडणुक व्यवव्थापना प्रकोस्ट किसन बोंबले ಕ್ಠಷಕಿ] उपाध्याक्षा ईछान्या 7 जिल्ह्या काँग्रोव्सा ढा. ९३२२८०१४६१ राष्ट्रीय दिवस| GGG@[ अध्यक्षा छिवा स्िद्वेशचर जनसेवा प्रातिष्ठान कैलास भामाबाईँ उपाध्यक्षा गुँबई काँग्रेवा निवाडणुक व्यवव्थापना प्रकोस्ट किसन बोंबले ಕ್ಠಷಕಿ] उपाध्याक्षा ईछान्या 7 जिल्ह्या काँग्रोव्सा ढा. ९३२२८०१४६१ - ShareChat 🙏 प्रेरणादायक बॅनर - राष्ट्रीय दिवस| GGG@[ अध्यक्षा छिवा स्िद्वेशचर जनसेवा प्रातिष्ठान कैलास भामाबाईँ उपाध्यक्षा गुँबई काँग्रेवा निवाडणुक व्यवव्थापना प्रकोस्ट किसन बोंबले ಕ್ಠಷಕಿ] उपाध्याक्षा ईछान्या 7 जिल्ह्या काँग्रोव्सा ढा. ९३२२८०१४६१ राष्ट्रीय दिवस| GGG@[ अध्यक्षा छिवा स्िद्वेशचर जनसेवा प्रातिष्ठान कैलास भामाबाईँ उपाध्यक्षा गुँबई काँग्रेवा निवाडणुक व्यवव्थापना प्रकोस्ट किसन बोंबले ಕ್ಠಷಕಿ] उपाध्याक्षा ईछान्या 7 जिल्ह्या काँग्रोव्सा ढा. ९३२२८०१४६१ - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_60340_1e91b8ea_1769332058809_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=809_sc.jpg)

