विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
#एकदा_तरी ...... ••••••••••••••••••• एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे, सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे, आणि सरतांनाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे.... •••••★ एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे, चालता चालता दूरवर खूप खूप थकावे, पण थकल्यावरही आधारासाठी त्याच्याकडेच पहावे.... •••••★ एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, दुःख त्याचे आणि अश्रू माझे असावेत, सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे, आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे..... •••••★ एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, आनंद त्याचा आणि हसू माझे असावे, त्याच्यासाठी मी जगतच रहावे, जगतच रहावे, आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे..... •••••★ एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे, उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे, आणि मायेच्या थेंबांनी मी चिंब भिजून जावे.....! ••••••• ....😊 🥰 #😘Good Night शायरी🌛
#😴शुभ रात्री😴 #😘Good Night शायरी🌛
😴शुभ रात्री😴 - जे आपलं आहे ते आपणच जपलं पाहिजे , मग ती एखादी व्यक्ती असो वा तिचं मनः प्रेम असं दयावं. की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी.. मैत्री अशी असावी. की स्वार्थाच् भान नसावं. आयुष्य असं जगावं मृत्युनेही म्हणावं.. की तू जंग अजुन ,मी येईन नंतर.. जे आपलं आहे ते आपणच जपलं पाहिजे , मग ती एखादी व्यक्ती असो वा तिचं मनः प्रेम असं दयावं. की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी.. मैत्री अशी असावी. की स्वार्थाच् भान नसावं. आयुष्य असं जगावं मृत्युनेही म्हणावं.. की तू जंग अजुन ,मी येईन नंतर.. - ShareChat
#😴शुभ रात्री😴 #😘Good Night शायरी🌛
😴शुभ रात्री😴 - *सुख हा निव्वळ आभास आहे, # *पण तेच शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे॰ X धम्म सकाळ *सुख हा निव्वळ आभास आहे, # *पण तेच शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे॰ X धम्म सकाळ - ShareChat
🤞💯“दुर्योधनाला कृष्ण समजला नाही कारण अहंकारला सत्य कधीच दिसत नाही ज्याच्या मनात स्वतःचा आवाज मोठा असतो त्याला कधीच गीता दिसत नाही...!!”🤞💯 अहंकार हा माणसाच्या विचारांवर पडलेला असा पडदा असतो, जो सत्य आणि योग्य मार्ग दिसू देत नाही. महाभारतातील दुर्योधनाकडे सामर्थ्य, सत्ता आणि बुद्धी सर्व काही होते, पण त्याच्यात नम्रता नव्हती. त्यामुळे श्रीकृष्णांनी कितीही समजावले तरी त्याला सत्य स्वीकारता आले नाही. ज्याच्या मनात “मीच बरोबर” हा हट्ट भरलेला असतो, त्याला इतरांचे चांगले विचार किंवा अनुभव कधीच समजत नाहीत. गीता ही फक्त पुस्तक नाही, तर जीवन जगण्याची दिशा आहे. पण ती समजण्यासाठी मन शांत, नम्र आणि स्वीकारण्याची वृत्ती असावी लागते. अहंकार माणसाला स्वतःपासून आणि सत्यापासून दूर नेतो, तर नम्रता त्याला ज्ञान आणि योग्य मार्गाकडे घेऊन जाते. म्हणूनच जीवनात मोठं होण्यासाठी ज्ञानापेक्षा नम्रता अधिक महत्त्वाची असते. #☀️गुड मॉर्निंग☀️