विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
#☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️
☕good morning Friends🌞 - वैचारिक मतभेद कितने भी हो जाय फ़िरभी उम्र का लिहाज और वाणी की मर्यादा कभी भी न टुटे वैचारिक मतभेद कितने भी हो जाय फ़िरभी उम्र का लिहाज और वाणी की मर्यादा कभी भी न टुटे - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #सुप्रभात #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
☀️गुड मॉर्निंग☀️ - सुकून मिलता है तुम्हें देखकर यूं ही नही तरसते हम एक झलक के fag; सुकून मिलता है तुम्हें देखकर यूं ही नही तरसते हम एक झलक के fag; - ShareChat
#☕good morning Friends🌞 #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️
☕good morning Friends🌞 - व समृद्ध जीवनाचे *चांगले पेरले तर चांगले उगवते हेच सुखी सूत्र आहे* *অয সীযাম* *शुभ सकाळ* व समृद्ध जीवनाचे *चांगले पेरले तर चांगले उगवते हेच सुखी सूत्र आहे* *অয সীযাম* *शुभ सकाळ* - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☕good morning Friends🌞 #सुप्रभात
☀️गुड मॉर्निंग☀️ - वपुधारा >IIIIIIIIII *आपलं कांहीही, केंव्हाही , कुणावाचून न आडणं ह्याचंच नांव सुख..!* *शुभ सकाळ* वपुधारा >IIIIIIIIII *आपलं कांहीही, केंव्हाही , कुणावाचून न आडणं ह्याचंच नांव सुख..!* *शुभ सकाळ* - ShareChat
*💜🍁🪷"परस्परांत प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. एक, 🔹"बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी; म्हणजे द्वेष वाटणार नाही."🔹 दुसरी, 🌹"सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी."🌹 तिसरी, 🌸"कोणतीही सूचना सांगायची झाली, तर त्या व्यक्तीविषयक न बोलता, नम्रतेने आणि गोड शब्दांत सांगावी."🌸 चौथी, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जीमध्ये या सर्वांचा बर्‍याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब, म्हणजे 🩷"स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते, त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसर्‍याकरिता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे."🩷🍁🪷* *🔸"मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो, तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसर्‍याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच, जे दुसर्‍याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही, ते आपण दुसर्‍याच्या बाबतीत न करणे; आणि त्याच्याच उलट, जे दुसर्‍याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसर्‍याच्या बाबतीत करावे. हेच सर्वाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. 🩷"आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही."🩷 आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे."🔸* *(👆सार , श्रीमहाराज , श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर यांचे नित्य अमृत प्रवचन, 6 मे, प्रवचनाचे शीर्षक स्वार्थ आवरल्याने परस्परप्रेम वाढते.)* #सुप्रभात #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️
*पंचमहाभूते .....* भारतीय दर्शनांतील एक संकल्पना. भौतिक सृष्टीच्या वा विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारी ही मूलतत्त्वे होत. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पाच तत्त्वांना पंचमहाभूते म्हणतात. भौतिक सृष्टीच्या घटक द्रव्यांचे वर्गीकरण करून सृष्टीस कारणभूत असलेली मूलभूत घटक द्रव्ये सांगण्याचा प्रयत्न जगातील सर्वच दर्शनांनी कमीअधिक प्रमाणात केलेला आहे. ग्रीक तत्त्वज्ञानात सृष्टीला कारणभूत असलेली विविध मूलभूत तत्त्वे सांगितली आहेत. त्यांना महाभूते म्हणता येईल. अनेक पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वज्ञानांनी मूलभूत अशी चारच तत्त्वे मानली आहेत. आकाश हे इंद्रियगम्य नसल्यामुले ते स्वतंत्र तत्त्व मानण्याची जरूरी नाही, असे मत याबाबत त्यांनी मांडले आहे. बौद्ध व चार्वाक वा लोकायत दर्शनांनीही हीच चार तत्त्वे मानली. ही पंचमहाभूते कशी निर्माण झाली याची चर्चा न्याय, वैशेषिक, वेदान्त इ. दर्शनांनी केली आहे. ही तत्त्वे आत्म्यापासून निर्माण झाली, असे उपनिषदांनी म्हटले आहे. छांदोग्य उपनिषदाने अग्‍नी (तेज), आप (जल) व पृथ्वी या तीनच तत्त्वांचा उल्लेख केला असून त्यांच्या संयोगातून सृष्टीची उत्पत्ती होते, असे म्हटले. तैत्तिरीय उपनिषदात आकाश, वायू, अग्‍नी, आप व पृथ्वी अशी पाच तत्त्वे उत्पन्न झाली, असे म्हटले आहे. सांख्यदर्शनाने मूलतः पुरुष व त्रिगुणात्मक प्रकृती ही दोन तत्त्वे मानली आहेत. प्रकृतीपासून बुद्धी आणि अहंकार ही तत्त्वे निर्माण होतात. अहंकारातील रजोगुणाचा प्रकर्ष होऊन त्यातून मन व पाच ज्ञानेंद्रिये उत्पन्न होतात. अहंकारातील तमोगुणाचा प्रकर्ष होऊन त्यातून शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध ही पाच तन्मात्रे निर्माण होतात आणि यांपासून पंचमहाभूते निर्माण होतात. तन्मात्रांपासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होत असल्यामुळे हे सर्व गुण थोड्याफार प्रमाणात प्रत्येक महाभूतात आढळतात. सांख्यदर्शनात याबाबत विस्ताराने चर्चा केली आहे. न्याय-वैशेषिकांच्या मते, ही आकाशव्यतिरिक्त महाभूते परमाणुरूपाने नित्य आहेत आणि कार्यरूपाने अनित्य आहेत. या पाचही तत्त्वांचा परस्परसंसर्ग येत असला, तरी त्यांच्यात कार्यकारणभाव नाही. वेदान्तशास्त्राने मात्र यांच्यात कार्यकारणभाव मानला आहे. सृष्टीची उत्पत्ती साक्षात या भूतांच्या परस्परसंसर्गाने होत असते. अशा प्रकारच्या मिश्रणाला ‘पंचीकरण’ म्हणतात. प्रत्येक महाभूतात स्वतःचा १/२ अंश व इतर चार महाभूतांचा प्रत्येकी १/८ अंश असतो. काही उपनिषदांनी तीनच तत्त्वे मानली असल्याने त्यांच्या संसर्गास ‘त्रिवृत्‌करण’ असे म्हटले आहे. प्रत्येक महाभूतात तन्मात्रे म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे गुण असतातच. पंचीकरण कसे सिद्ध होते, ते पुढील कोष्टकावरून समजून येईल : . आकाश वायू अग्नी आप पृथ्वी आकाश १/२ १/८ १/८ १/८ १/८ वायू १/८ १/२ १/८ १/८ १/८ अग्नी १/८ १/८ १/२ १/८ १/८ आप १/८ १/८ १/८ १/२ १/८ पृथ्वी १/८ १/८ १/८ १/८ १/२ ही पंचमहाभूते सृष्टीच्या उत्पत्तीला कारण आहेतच पण त्यांची शक्ती अचाट आहे. कित्येक वेळा ती मानवाच्या संहारालाही कारण होते. या महाभूतांना वश करून घेऊन त्यांच्या शक्तीचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करून घेण्याचा आधुनिक शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. प्राचीन काळीही या महाभूतांना संतुष्ट करण्यासाठी अनेक प्रकारे प्रार्थना केली जाई. #✡️कुंडली दोष #🔯दैनिक राशी भविष्य🔯 #📜कुंडली शास्त्र #⏳ज्योतिष शास्त्र #📜आजचे पंचांग ✡️