विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
*✍️दि.09/05/2026* *कशात तरी* *रमून गेल्याशिवाय* *माणूस सुखी होऊ* *शकत नाही...........* 🙂 🌈🍁 *🌹🙏सुप्रभात🙏🌹* #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - ShareChat
*जय जय राम कृष्ण हरि..!!* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ !! विचार पुष्प !! *मनाची खोली लिहावी* तर शब्द रुसतात... आणि *सत्य लिहावे* तर आपलेच रुसतात... *आयुष्य समजणे* खूप कठीण आहे... येथे *सत्य बोललो* तर आपलेच परके होतात.!! आपण सगळे प्रवासी आहोत... आपला अंतिम मुक्काम ठरलेला आहे. म्हणून हे जीवन सहल म्हणून जगा.. मनमुराद आनंदी जगा. संपूर्ण जगात भारतच हा असा एक देश आहे जिथे... कांदा, लसूण, अंडी, मटण,मासे खाल्ल्याने कांही ठराविक दिवशी किंवा ठराविक कालखंडात लोकांना पाप लागते... परंतु.... *लोकांचे पैसे बुडवल्याने, गरिबांना छळल्याने, लोकांची प्रॉपर्टी हडपल्याने, हरामाची कमाई केल्याने, दुसऱ्यांना विनाकारण त्रास दिल्याने पाप लागत नाही.!!* जो व्यक्ती चांगले विचार आणि योग्य संस्कार जीवनात बाळगते त्याला मग हातात माळा घेऊन जप करण्याची गरज नाही...! कारण संस्कारापेक्षा या जगात कांहीच श्रेष्ठ नाही आणि इमानदारीपेक्षा मोठी श्रीमंती नाही. कोणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मन मोठं असावं लागतं... आपल्याजवळ काय आणि किती आहे याने काहीही फरक पडत नाही, आपली विचार करण्याची पद्धत आणि नियत शुद्ध असायला हवी... वयानं वाढलं की समज वाढते असं म्हणतात. पण खरं तर धक्के पचवले की समज वाढते. एकेकाळी आपण ज्या प्रश्नांची उत्तर शोधायला धडपडायचो आज त्याच प्रश्नाचे अर्थच बदलून गेलेत. वेळ माणसाला निष्ठुर बनवत नाही... पण पण स्थितप्रज्ञ बनवते, म्हणजे (आनंदात . हुरळुन न जाणारा आणि दुःखात कोलमडून न पडणारा)... आयुष्याने काय दिले यापेक्षा आयुष्याने काय काढून घेतलं आणि तरीही आपण कसे उभे राहिलो यातच आपला खरा विजय असतो. स्वतःला न हरवू देता, परिस्थितीला शरण न जाता जगणं हेच खरं आयुष्य होय...!! ज्या दिवशी लोक एखाद्या समस्येचं उत्तर म्हणून तुमचं नाव घेतील तोच खरा यशाचा क्षण.!! जगाच्या बाजारात सगळं काही मिळेल पण... तू काळजी करू नकोस, मी आहे ना? असं म्हणणारी आपुलकी फक्त नशिबाने मिळेल. राम कृष्ण हरि... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 किसन महाराज जगताप वलांडीकर #🎭Whatsapp status
*चक्कर येणे.....* *साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात...* *1. पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. *2. रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. *3. मानसिक क्षोभामुळे, अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस चार चमचे व चमचाभर खडीसाखर असे मिश्रण घेता येते. *4. ऊन लागल्यामुळे चक्कर येत असली तर नाकात दुर्वांच्या रसाचे २-३ थेंब टाकण्याचे तसेच टाळूवर आवळकाठीच्या चूर्णात पाणी मिसळून तयार केलेला लेप लावून ठेवण्याने बरे वाटते. *5. फार अशक्‍तपणा जाणवत असला व चक्कर येत असली, बरोबरीने तोंडाला चव नसली तर मनुका खाण्याचा उपयोग होतो. मनुका थोडेसे सैंधव लावून थोड्याशा तुपावर परतून घेतल्या व काही दिवस रोज खाल्ल्या तर गुण येतो. *6. कोणत्याही कारणाने शुक्रक्षय झाला असला (हस्तमैथुन, अतिमैथुन, स्वप्नदोष वगैरेमुळे) व त्यामुळे अशक्‍तपणा येऊन चक्कर येत असली तर रोज अर्ध्या नारळाचे ओले खोबरे वाटून त्यातून निघालेले दूध चवीनुसार साखर टाकून पिण्याचा उपयोग होतो. *7. ताप चढल्यामुळे चक्कर येत असली तर कपाळावर रिठ्याच्या पाण्याच्या घड्या ठेवण्याने बरे वाटते. यामुळे ताप उतरण्यासही मदत मिळते. बरोबरीने तापावर योग्य उपचार करणे आवश्‍यक होय. *8. डोक्‍यात सर्दी साठून म्हणजे डोके जड होऊन चक्कर येत असली तर सुंठीचे बारीक चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्याने बरे वाटते. *9. रक्‍तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली असता पटकन साखर-पाणी देण्याचा उपयोग होतो. *10. भूक लागली असूनही बराच वेळ काही खाणे झाले नाही तरी चक्कर येऊ शकते. असा वेळी साळीच्या लाह्या, दूध, साखर असे मिश्रण खाण्याने लगेच बरे वाटते. *11. गाडी लागल्यामुळे चक्कर येण्याची सवय असणाऱ्यांना प्रवासाच्या आधी व प्रवासात थोड्या थोड्या वेळाने साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग होताना दिसतो. *12. विरळ हवेच्या उंच ठिकाणी जाताना सुती कापडात कापूर, वेलची, ओवा, वेखंड यांच्या पुरचुंडीचा अधूनमधून वास घेण्याने चक्कर येण्यास प्रतिबंध होऊ शकतो. *©®सुनील इनामदार, ९८२३०३४४३४.* #🌿आयुर्वेदा #⚕️आरोग्य #💪शारीरिक व्यायामाचे फायदे 🏋️‍♀️ #🩸आयुर्वेद टिप्स 🍃 #🥱खोकल्यावर घरगुती उपाय💊