विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
#☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात
☕good morning Friends🌞 - शुभ सकाळ # *स्वामी सांगतात. जेव्हा पलटते तेव्हा सर्व काही पलटत त्यामुळे चांगल्या *वेळ वेळी गर्व नाही करायचा आणि वाईट वेळी धीर नाही सोडायचा. 1* * l! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.. 1 आपला   दिवस आनंदात जावो!* # शुभ सकाळ # *स्वामी सांगतात. जेव्हा पलटते तेव्हा सर्व काही पलटत त्यामुळे चांगल्या *वेळ वेळी गर्व नाही करायचा आणि वाईट वेळी धीर नाही सोडायचा. 1* * l! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.. 1 आपला   दिवस आनंदात जावो!* # - ShareChat
#☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात
☕good morning Friends🌞 - श्री स्वामी समर्थ *তীক্কা भावना व्यक्त करण्यासाठी कागदाची गरज पडते, तेव्हा रद्दीमध्ये असलेल्या पानालाही खूप महत्त्व असते. * शुभ स्वामीमय सकाळ श्री स्वामी समर्थ *তীক্কা भावना व्यक्त करण्यासाठी कागदाची गरज पडते, तेव्हा रद्दीमध्ये असलेल्या पानालाही खूप महत्त्व असते. * शुभ स्वामीमय सकाळ - ShareChat
*_"आपण आयुष्यात मागे पडत आहोत" असे का वाटते?_* *_सोशल मीडियाच्या युगातील comparison culture_* ©डॉ सचिन साळवे Psychologist रात्रीची वेळ.. आपण मोबाईल हातात घेऊन “थोडंसं scroll” करायला सुरुवात करतो. व्हॉट्सअँप स्टेटस, इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर कोणी तरी परदेशात फिरतंय, कोणी तरी नवीन गाडी घेतलीय, कोणाच तरी promotion झालंय, कोणाच्या तरी मुलीने खूप मोठे यश मिळवलं, कोणाचे तरी आनंदी फॅमिली फोटो बघून त्याचं “ life perfect ” दिसतं… आणि नकळत आपण थांबतो... मनात एक छोटासा विचार येतो, " सगळ्यांच लाईफ एकदम set आहे" “मी कुठे आहे?” हळूहळू तो विचार वाढतो… “मी काहीच achieve केलं नाही का?” “सगळे पुढे गेले… मीच मागे पडलोय का?” आणि त्या एका क्षणात, आपलं शांत मन अस्वस्थ होतं. ही कहाणी फक्त आपलीच नाही. आज हजारो लोक रात्री असंच reel scroll करतात, sad feel करतात आणि झोपतात. बाहेरून सगळं ठीक वाटतं, पण आतून एक कमीपणाची भावना सुरू होते. कारण आपण रोज इतरांच्या आयुष्याचा फक्त “best part” पाहतो… आणि स्वतःच्या आयुष्याचा “real part” जगतो. तुलना इथेच सुरू होते. आजच्या काळात आपण आपल्या आयुष्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात जास्त डोकावण्याची संधी मिळते ती social media मुळे… आणि डोकावत असताना,आपण नकळत तुलना करायला सुरुवात करतो. पूर्वी तुलना व्हायची पण ती मर्यादित होती शेजारी, नातेवाईक, मित्र. आता तुलना होते संपूर्ण जगाशी आणि कोणाशीही.. एक तर सध्या सोशल मीडिया मुळे लोकांना हे show off करणे खूप सोपे झाले आहे. तिथे आपल्याला दिसतं ते highlighted reel असतं. पण वास्तव जे आपल्याला विसरायला होतं ते म्हणजे त्या reel किंवा फोटोमागे काय आहे, हे आपल्याला माहीत नसतं. त्या हसऱ्या चेहऱ्यामागचा stress/दुःख, त्या success मागचे failures, त्या “perfect life” मागचं एकटेपण. पण ते दिसत नाही… लोक त्यांचे best moments च दाखवतात struggles,stress नाही. पण आपलं मन काय करतं? त्यांच्या best ला आपल्या normal life शी compare करतं. याचा मानसिक परिणाम असा होतो की,आपल्याला स्वतःबद्दल कमीपणा वाटायला लागतो, सतत असंतोष (dissatisfaction) Anxiety आणि restlessness. “मी पुरेसा नाही” "मी कमी आहे"अशी धारणा व्हायला लागते स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जे आहे ते अपुरं वाटायला लागतं, जे नाही त्यांच्या अपेक्षांचं ओझं वाढतं आणि मग *आपल्याकडे असलेलं सुखही कमी वाटायला लागतं.* हळूहळू आपण स्वतःचं आयुष्य जगणं सोडून, इतरांच्या आयुष्याशी स्पर्धा करायला लागतो. पण वास्तवात, प्रत्येकाचं आयुष्य वेगळ्या timeline वर चालतं.प्रत्येकाचा start आणि end point वेगवेगळा असतो. कोणाला 25 व्या वर्षी यश मिळते तर कोणाला 35 व्या वर्षी. तुलना म्हणजे चुकीचा मापदंड (wrong measuring scale). कारण: आपली परिस्थिती वेगळी आपले struggles वेगळे आपला प्रवास unique आहे मग काय करावं? (Practical mindset shift) 1. Awareness ठेवा जेव्हा आपण scroll करतो, स्वतःला विचारा “मी inspiration घेतोय की comparison करतोय?” 2. Digital boundaries ठेवा- सतत scrolling केल्याने नकळत comparison होते, म्हणून थोडा break घ्या. 3. Gratitude practice करा दररोज 3 गोष्टी लिहा ज्या आपल्याकडे आहेत. इतरांचं आयुष्य पाहून आपलं आयुष्य कमी वाटणं हे साहजिक आहे… पण खरं समाधान तेव्हाच मिळतं, जेव्हा आपण स्वतःच्या journey ला स्वीकारतो. *तुलना आपल्याला पुढे नेत नाही…. ती फक्त स्वतःपासून दूर नेत असते.* -------------------------------------- #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
*‼️जग मोठे लबाड आणि स्वार्थी आहे. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी म्हणजे असे कामासाठी म्हणून जे लोक तुमची कधीतरीच आठवण करतात, अशा लोकांवर वेळ खर्च करू नये.*‼️🙏🌹💐❇️🌺🌻🌷🤦‍♂️ *टाळी कधी एका हाताने वाजत नाही. रथ, गाड्या एकाच चाकावर चालत नाहीत. त्यामुळे हे लक्षात घ्या की, कुठलेही एकतर्फी नाते कधी यशस्वी होत नाही आणि म्हणूनच या एकतर्फी नात्यांवर आपला वेळ व ऊर्जा वाया घालवू नये.* *जग मोठे लबाड आणि स्वार्थी आहे. कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी म्हणजे असे कामासाठी म्हणून जे लोक तुमची कधीतरीच आठवण करतात, अशा लोकांवर वेळ खर्च करू नये.* *माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल, या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. उंच उंच वाढत राहावं.* *"माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत रहावे. कारण रिकामे पोते कधीच सरळ उभे राहू शकत नाही. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसं सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही."* *दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे.* *लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य, नात्यांचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं झालंय ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवतात. जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिघे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात.* *माणसाची ओळख ही त्याच्या संपत्तीवरून किंवा हुद्द्यावरून होत नाही, तर ती त्याच्या स्वभावावरून आणि त्याने कमावलेल्या माणसांवरून होते. रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ अशी काही नाती असतात, जी केवळ विश्वासाच्या आणि आदराच्या धाग्याने विणलेली असतात. अशी माणसं आयुष्यात असणं हेच सर्वात मोठं भाग्य आहे.* *स्वार्थ संपला की नाती संपतात असे म्हणणारे खूप भेटतील, पण निस्वार्थपणे साथ देणारा एखादाच असतो. जो तुमच्या यशात आनंदी होतो आणि तुमच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो, तोच खरा आपला असतो. अशाच जीवलग माणसांची साथ तुम्हाला लाभो.* *प्रार्थनेमुळे देव बदलत नाही, तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे, कधीही चांगले. जीवनातील वास्तव समजणे अवघड नाही, फक्त ज्या तराजुमध्ये दुसऱ्यांना 'तोलता' त्याच तराजुमध्ये 'स्वतः' बसुन बघा.* *कोसळण्यातही एक लय असते, हे पावसाच्या थेंबांकडून शिकावं. आपटण्यातही किती मजा असते, हे समुद्राच्या लाटांकडून शिकावं. संपण्यातही मोठं समाधान असतं, हे अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं. कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो, हे मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं.* *स्वतः ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतः चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.* *दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात...! कावळा कोकिळेचा आवाज दाबून टाकू शकतो, पण स्वतःचा आवाज मधुर करू शकत नाही. त्याचप्रमाणे, एक टीकाकार सज्जन व्यक्तीची बदनामी करू शकतो, पण स्वतः सज्जन बनू शकत नाही.* *कठोर वास्तव हेच आहे की, शेवटी तुम्ही एकटे असता. तुमच्या भूतकाळासोबत, सावलीसोबत विचारांसोबत, स्वप्नांसोबत, अपेक्षांसोबत आणि तुमच्या सुख-दुःखांसोबतही म्हणूनच... स्वतःचे सोबती बना आणि खंबीरपणे जगायला शिका...!* *"विहरीत जाणारी बादली झुकते तेंव्हा पाणी भरून येते, तसे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच नम्र, लिन असावे लागते" "विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष विहीरीतील दगडांकडे नसतं तर, त्या दगडांमध्येही कुठं तरी पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.* *आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचं निरीक्षण करतानाही त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा. नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील.* *!! सर्वप्रथम ज्या लोकांनी आपल्यावर मनःपासून खूप जीवापार प्रेम, खूप माया केली व आपल्यावर चांगले संस्कार केलेत त्यांना कधीच कधीही विसरू नका,!! तसेच आपल्यावर कठीणप्रसंगी ज्यांनी अनेक प्रकारची मदत व उपकार केलेले आहेत, त्यांची जाणीव ठेवा व त्यांनी तुमच्यावर जेवढा विश्वास ठेवला आहे, त्यां विश्वासास कधीही तडा जाऊ देऊ नका, व त्यांचा कधीही विस्वासघात करू नका l, जर तुम्ही करीत असाल तर तुमच्या सारखा पापीचांडाळ ह्या जगात कुणीही नसेल, तसेच सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. आपल्या भारतीय आदर्श संविधानाचे रक्षण करा* *एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा जमेल तेव्हढीच मदत करा, आणी नसेलच जमत तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवावर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, समाजातील प्रामाणिक माणसे, समाजसेवक, यांच्यावर प्रेम करा, पण विश्वासघातकी, दगाबाज, खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अश्या लोकांपासुन नेहमीच खूप सावध व खूप दूर रहा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध, सुरक्षित व सतर्क रहा.* *🌻🌞 राम राम मंडळी 🌞🌻* *‼️जय शिवराय जय श्रीराम‼️* *!!जय हनुमान, जय बजरंगबली!!* *Il श्रीराम जयराम जय जय राम ll* *!!ॐ नमःशिवाय!!* *!!सर्वांना राम कृष्ण हरी!!* *!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!* *🙏श्री स्वामी समर्थ🙏* 🌻☘🌺🙏🌻🙏🌺☘🌻 #☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☀️गुड मॉर्निंग☀️ #सुप्रभात