#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_एप्रिल_१६६३
पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्त्याचा बिमोड करण्यासाठी योजना आखली गेली व स्वतः शिवाजीराजे या योजनेत सहभागी होते.
३ वर्ष पुण्यातील जनतेला त्रस्त करून सोडणाऱ्या औरंग्याच्या मामाचा , त्या शाहिस्त्याचा काटा काढण्याची वेळ आली होती.
राजांनी शाहिस्तेखानाची शिकस्त कशी करायची याबद्दल योजना आखल्या गेल्या, झाली तयारी, आता फक्त प्रतीक्षा होती उद्याच्या मध्य रात्रीची........⚔️
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_एप्रिल_१६७०
मराठे नगरमध्ये घुसलेले पाहून ‘दाऊदखान कुरेशी’ हा खानदेशातून ७००० स्वारांसह नगरला आलेला होता.
नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात माघारी परतले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते निघून गेले, मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_एप्रिल_१६७९
छत्रपती शिवाजी महाराजांची विजापुरजवळील शहापूर येथे स्वारी
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_एप्रिल_१६८३
शिवाजीराजांच्या पासून स्वराज्यात असलेला मुन्शी काझी हैदर फितूर झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#३१_मार्च_१६५९ ( ५८-५९ )
राजे शिवरायांनी इ.स.१६५९ मध्ये किल्ले खेळणा जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड🚩
विशाळगड हा मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे छत्रपती महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका !
आणि यासाठी अवघे मूठभर मावळे घेऊन कित्येक तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु आणि बांदल देशमुखांच्या अद्वितीय पराक्रमाचा !
नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला.
त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले म्हणूनच आज आपल्याला विशाळगड हा किल्ला दिसत आहे.
(पण आजची विशाळगडाची दुर्दशा पाहवत नाही. किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामे पाहून मनात अतीव वेदना होतात व संताप सहन होत नाही 🙇)
🚩🏇🚩 #३१_मार्च_१६६५
मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी येऊन दाखल.
इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु.
मिर्झाराजे जयसिंह या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना आणि अफाट दारूगोळाही बरोबर दिला.
जयसिंह आणि दिलेरखान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही, हे दिलेरखान जाणून होता.
त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला.
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी आपले वयोवृद्ध पण अनुभवी सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्यांस ८० हजाराची फौज आणि दिलेरखान पठाणास पाच हजार पठाणांची फौज देऊन महाराष्ट्रात पाठविले आणि मिर्झाराजांनी ३१ मार्च १६६५ रोजी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
🚩🏇🚩 #३१_मार्च_१६८४
१६८४ च्या सुरुवातीस मोगल सरदार मामूरखान याने सुपे, बारामती आणि इंदापूर येथे मुघली ठाणी स्थापन केली. १३ फेब्रुवारी १६८४ रोजी शहाजादा आलम आणि त्याचा मुलगा बेदारबख्त यांना बादशहाने बहादूरगडाकडे रवाना केले.
३१ मार्च रोजी शहाबुद्दीन ऊर्फ गाजिउद्दीन हा पुणे आणि करडे निमोणे या प्रदेशाकडे रवाना झाला.
🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_मार्च_१६६३
सरसेनापती नेतोजी पालकर जखमी.
मोघली मुलुखात छापा टाकण्यासाठी नेतोजी पालकर गेले होते पण दैव प्रतिकूल होते,
परंतु मोगली मूलखातच मुघल फौजेन त्यांना गाठले व चकमक झाली, त्यांनी पराक्रमाची शर्थ केली परंतु बळ कमी पडल्याने मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच नेतोजींना दुखापत होऊन ते जायबंदी झाले.
परंतु मराठी सैन्याचा पाठलाग करत मुघल सैनिक विजापुरात दाखल झाले यावेळी रुस्तुम ए जमान याने मोगलांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले व पूढे दर्याखोऱ्यांचा अनवट मुलुख आणि जंगले असल्याने नेतोजींचा पाठलाग करू नये असू सांगून मुघल सैन्य माघारी वळवले, रुस्तुम ए जमान आणि शिवरायांचा अंतस्थ स्नेह अशा प्रकारे उपयोगास आला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_मार्च_१७२९
थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतापुर इथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
नर्मदेच्या उत्तरेकडच्या प्रदेशाला हिंदुस्थान म्हणत.
त्या सुमारास रोहिलखंडाच्या महमद बंगश याने बुंदेलखंडावर आक्रमण केले.
बुंदेल राजे महाराज छत्रसाल आक्रमणाने त्रस्त झाले.
त्यांनी राऊंना आपल्या भाषेत दोन चरणांत आपली स्थिती लिहून कळवली, त्याचा मथितार्थ
✍️
जो गती गजेंद्र की, सोही गत पावत आज
बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज ।।
✍️
सुसरीच्या तोंडात पाय अडकलेल्या लक्ष्मीच्या गजेंद्र-हत्तीची जी गत, त्या अवस्थेत मी आहे.
अशा प्रकारचा छत्रसाल यांचा याचनास्पद निरोप येताच, राऊंनी महाराज छत्रसाल बुंदेल्यांना त्यांच्यावर झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_मार्च_१६५७
विजापूर काबीज करून दिल्लीचे तख्तत्त जिंकायचे व नंतर सम्राट म्हणहून मिरवायचे असे मनात धरून औरंगजेबाने बिदर हा कल्याणी भाग त्याने जिंकला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_मार्च_१६६७
सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्णत्वास आला.
मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘कुरटे‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी आज्ञा केली "या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्यांशी बंदरी ऐशी जागा नाही"!
आणि ‘सिंधुदुर्ग‘ नावाचा जलदुर्ग साकार झाला.
सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_मार्च_१७३७
मराठ्यांचा जरीपटका साष्टीवर डौलाने फडकला
मराठे पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले. मराठ्यांची फौजा साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले.
चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची, प्रबळगड, खिडकाळी, शिळ मार्गे कळव्यात आले.
लढणारी तुकडी साष्टीकडे (ठाण्याकडे) रवाना झाली. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले.
२९ मार्च १७३७ ला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकला. पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_मार्च_१७५५
इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी आंग्रेंचा सुवर्णदुर्ग घेतला. तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला, सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला.
सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व, प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते.
त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली, इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते. इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला.अश्या प्रकारे हे संयुक्त आरमार २९ मार्च १७५५ ला सुवर्णदुर्ग ला येऊन थडकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_मार्च_१८४९
ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_मार्च_१८५७
क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_मार्च_१६७०
आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले.
आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_मार्च_१६७०
छत्रपती शिवरायांनी कल्याण भिवंडी घेतली तसेच मराठा फौजेचा माहुली गडावर ताबा.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_मार्च_१७३७
बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला. मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण
तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #🙏शिवदिनविशेष📜
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_मार्च_१६७०
आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले.
आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_मार्च_१६७०
छत्रपती शिवरायांनी कल्याण भिवंडी घेतली तसेच मराठा फौजेचा माहुली गडावर ताबा.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_मार्च_१७३७
बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला. मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण
तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२७_मार्च_१६६३
पुण्यातील शाहिस्तेखानाच्या वाढत्या अत्याचाराने शिवरायांच्या जीवाची घाळमेळ वाढत होती, शाहिस्त्याचा बिमोड करण्याच्या उद्धेशाने शिवरायांच्या नेतृत्वात लाल महालावर आकस्मित छापा टाकण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या.
दस्तुरखुदद आलमगीराचा 'मामा' व मुघल सेनेतील
मातब्बर सरदार असलेल्या शाईस्तेखानाची छत्रपती शिवरायांनी "गनिमी कावा" या रणनीतीने पुण्यात तळ ठोकुन बसलेल्या अंदाजे दिड लाखाच्या सैन्यात घुसण्याची तयारी चालू झाली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२७_मार्च_१६६७
मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.
अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली.
मार्च १६६७ ला नेताजींना मुस्लिम धर्माची दीक्षा दिली गेली.
जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी नेताजी पालकर मोगली छावणीतून रायगडावर महाराजांकडे आले.
जून १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२७_मार्च_१७३७
चिमाजीअप्पांनी ठाणे जिंकले.
२६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले.
२७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला. जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२६_मार्च_१६६७
छत्रपती शिवाजी महाराज श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा रोजी #सिंधुदुर्गावर पोहोचले...🏇
याचवेळी हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडी व जस्त मिश्रणावर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते.
तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर #सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता.
सिंधुदुर्गाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या हिरोजींनी महाराजांकडे एक इच्छा मागितली, ते म्हणाले, "महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते.
आमची एक इच्छा आहे, तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत.
"छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले.
दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले.
महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात.
स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे,
चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे!
हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला.
त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता.
तुतारी निनादली📯
तोफांचे बार उडाले📯
पुन्हा चौघडा वाजू लागला📯
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२६_मार्च_१६६७
औरंगजेब बादशहाने 'मिर्झाराजा जयसिंग'
यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली आणि 'शहजादा मुअज्जम' ला दक्षिणेचा नविन सुभेदार नेमले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२६_मार्च_१६७५
छत्रपती शिवराय किल्ले रायगडहून कुडाळकडे रवाना.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_मार्च_१३०७
देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_मार्च_१६७४
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती.
इंग्रजांच्या वतीने तहाची बोलणी करायला नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुभाषा मुंबईहून रायगडाकडे निघाला.
२४ मार्च १६७४ रोजी तो न्यायाधीश निराजीपंतांची भेट घेण्यासाठी पाचाडला आला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_मार्च_१६७५
छत्रपती शिवाजी महाराज वेलवड्यास मुक्कामी.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_मार्च_१६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
२४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७ या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्रप्रदेश येथील 'श्री शैल्यम मल्लिकार्जुन' येथे मुक्काम.
शिवाजी महाराजांचीही श्री शैल्यम मल्लिकार्जुनावर आत्यंतिक श्रद्धा होती.
या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या देवालयाच्या विशाल गोपुरांचे बांधकाम करून दिले आणि येथील नित्य पूजेसाठी व्यवस्था केली.
तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी रक्षक पथकाचीही नियुक्ती केली..!
भाग्यनगरपासून काही अंतरावर असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपूर' असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहे.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#२३_मार्च_१६६०
संकटाची मालिका...!
स्वराज्याचा फास आवळत चालला होता आदिलशाहीने सर्व देशमुख, वतनदारांना केदारजी खोपड्याच्या मदतीने कौलनामे पाठवून मदत करण्याची विनंती पत्रे लिहली.
मोघलांकडून शाहिस्तेखान फास आवळत चालला होता.
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले असताना लोभाने आपलेच लोक फुटून शिवरायांना साथ न देता यावनाना जाऊन मिळत होते.
राजमाता जिजाऊ साहेब स्वतः स्वराज्याचा डोलारा सांभाळत होत्या, यातून सुटनेही अवघड होऊन बसले.
🚩🏇🚩 #२३_मार्च_१६७४
आनंदराव काकांचे बेहलोलला सडेतोड उत्तर!
सरनौबत प्रतापराव गुजर काका आणि ६ शूर मावळे शिवरायांच्या शब्दाखातर स्वराज्यासाठी प्राण गमावून बसले.
ही बातमी आनंदरावांनी महाराजांना कळवली आणि दिलासा दिला की " सेनापती पडले तरी राग न धरणे, त्यांच्या जागी मी आहे "
महाराजांना आता प्रश्न पडला की, सरनौबत कोण करावा?
आलेल्या पत्रांस महाराजांनी आनंदरावांना उत्तर दिले की, " आपण तूर्त त्यांच्या वेतनावर काम करावे. मात्र शत्रूची याद राखावी "
महाराजांच्या आज्ञेने आनंदराव काकांची हुरूप वाढली. हेरांकरवी माहिती काढत काकांनी गनिमी कावा वापरून बेहलोलच्या मुलखात घुसून त्राही माजवली.
आनंदराव काका सरळ कानडी मुलखात घुसले. बांकापूरपासून २५ मैलांवर पेंच गाव खणत्या लावून लुटले. त्यानंतर संपगावची संपन्न पेठही लुटली. ३००० बैल लागले ही लूट स्वराज्यात आणायला.
🚩🏇🚩 #२३_मार्च_१६७८
ऑक्टोबर १६७६ मध्ये महाराजांनी दक्षिण स्वारीसाठी प्रस्थान केले.
महाराजांनी छत्रपती शंभूराजांवर प्रभावळीचा कारभार सोपवला.
आजच्या दिवशी शंभूराजांनी स्वत:स शृंगारपुर येथे कलशाभिषेक करवून घेतला. एवढे मोठे पाऊल उचलताना कवी कलश हे शंभूराजांसोबत होते.
🚩🏇🏻🚩 #२३_मार्च_१६८२
औरंगजेबासोबत त्याचे ३ पुत्र, नातू व सर्व मोठे सेनाध्यक्ष दक्षिणेत गोळा झाले होते, बुर्हाणपुरास त्यांची पुढची व्यवस्था करून २३ मार्च रोजी औरंगजेब (औरंगाबादेत) सध्याच्या छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचला.
🚩🏇🏻🚩 #२३_मार्च_१९३१
भगतसिंग , राजगुरु , सुखदेव लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले . 🙏🇮🇳
तरुण वयात देशाकारिता फांसावर लटकुन या वीरांनी देशातील तरुणांच्या हृदयात क्रांतीज्योती पेटविली, भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हौतात्म्य पत्करले.
भगतसिंग_राजगुरु_सुखदेव या विरांना विनम्र अभिवादन . 🙇🇮🇳
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩







![🙏शिवदिनविशेष📜 - ~-a* @ इस्टाग्राम @history. maharashtra] आजचे ऐतिहासिक दिनविशेष २९ मार्च १६६७ किल्ले सिंधुदुर्ग बांधून पूर्णत्वास आला आणि मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. ~-a* @ इस्टाग्राम @history. maharashtra] आजचे ऐतिहासिक दिनविशेष २९ मार्च १६६७ किल्ले सिंधुदुर्ग बांधून पूर्णत्वास आला आणि मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. - ShareChat 🙏शिवदिनविशेष📜 - ~-a* @ इस्टाग्राम @history. maharashtra] आजचे ऐतिहासिक दिनविशेष २९ मार्च १६६७ किल्ले सिंधुदुर्ग बांधून पूर्णत्वास आला आणि मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. ~-a* @ इस्टाग्राम @history. maharashtra] आजचे ऐतिहासिक दिनविशेष २९ मार्च १६६७ किल्ले सिंधुदुर्ग बांधून पूर्णत्वास आला आणि मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_431636_1533da0a_1774744429983_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=983_sc.jpg)





