#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#१८_फेब्रुवारी_१५७६
महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध:-
महाराणा प्रताप यांच्या सैन्याचे नेतृत्व हकीम खान सुरी
(हा दिल्ली चा एकेकाळ चा बादशाह शेरशाह सुरी चा वंशज) या अफगाणी मुस्लिम सेनानी कडे होते, तर बादशहा अकबराकडून मोगलांच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह
(जयपूर चा राजा, मिर्झाराजा जयसिंह चे आजोबा) हे हिंदू राजा करत होते.
१८ फेब्रुवारी १५७६ साली लढल्या गेलेल्या या लढाईचे वैशिष्ठ्य म्हणजे महाराणा प्रताप हे मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराविरुद्ध लढत होते.
🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१६५३
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाल भटास वर्षासन दिले.
( फाल्गुन शुद्ध प्रतिपदा, शके १५७४, संवत्सर नंदन, शुक्रवार )
महाराजांनी गोपाळ भटांना वर्षासन नेमून दिले!
श्री क्षेत्र महाबळेश्वराचे वेदमूर्ती गोपाळभट बिन श्रीधर भट हे ' सुर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते ' होते.
आजच्या दिवशी महाराजांनी गोपाळ भटांना पत्र लिहून " स्वामींनी सुर्यानुष्ठाण करावे " ही विनंती केली आणि वर्षासन नेमून दिले.
🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१६६६
मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले.
🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१७५५
तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशव्यांनी करवीरकरांशीहि कारस्थान आरंभिले तेव्हां करवीरकर यांनी तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारात दिला.
🚩🏇🚩 #१८_फेब्रुवारी_१७५६
दिनांक १८ फेब्रुवारी १७५६ रोजी समशेर बहाद्दर यांनी रत्नागिरीचा किल्ला जिंकून घेतला.
उत्तर हिंदुस्थानातील राघोबादादांच्या मोहीमेत समशेर बहाद्दर सामील होते मात्र कोकणातील मोहीमेवर जाण्याकरीता उत्तरेकडील मोहीम सोडून समशेर बहाद्दर सन १७५५ च्या मे महिन्यात कोकण मोहीमेवर रवाना झाले.
कोकणातील मोहीमेनंतर समशेर बहाद्दर यांना पून्हा उत्तरेत राजपुताना मोहीमेवर पाठविण्यात आले.
🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
१७ फेब्रुवारी इ.स.१६७९
छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ पुत्र शंभूराजे बादशाही सरदार दिलेरखानच्या गोटात गेले.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#१७_फेब्रुवारी_१६६३
छत्रपती श्री शिवरायांनी "केळशी" जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१६८९
छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले.
इश्वरदास म्हणतो की, बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलासखान व हमीदुद्दीनखान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहा समोर यत्किंचितही मान झुकविली नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहीले. "आपल्याला गेली ८ वर्षे भुंड्या डोक्याने, किमाँश न घालता रानोमाळ, सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा "संभाजी" कशासच बधत नाहीत, हे पाहून किमान शंभूराजे पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनूसार शंभूराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले गेले.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३
कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई" यांचे "किल्ले पन्हाळा" येथे निधन झाले.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३८
पोर्तुगीजांनी धारावी जिंकला. १५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीक कडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले.
तुफान रणकंदन झाले.
मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली.
"यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली.
पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३
नारायणराव पेशव्यांच्या नंतर "रघुनाथराव" पेशवे झाले.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३९
मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला.
मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८१
सामाजिक क्रान्तिचे प्रणेते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा मृत्यू. (वाकडेवाडी, संगमपूल, पुणे)
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८३
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू.
🚩
#संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड
#सहयाद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र_राज्य
@history_maharashtra🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#१७_फेब्रुवारी_१६६३
छत्रपती श्री शिवरायांनी "केळशी" जिंकून स्वराज्यात सामील करून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१६८९
छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले.
इश्वरदास म्हणतो की, बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलासखान व हमीदुद्दीनखान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहा समोर यत्किंचितही मान झुकविली नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहीले. "आपल्याला गेली ८ वर्षे भुंड्या डोक्याने, किमाँश न घालता रानोमाळ, सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा "संभाजी" कशासच बधत नाहीत, हे पाहून किमान शंभूराजे पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनूसार शंभूराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले गेले.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३
कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई" यांचे "किल्ले पन्हाळा" येथे निधन झाले.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३८
पोर्तुगीजांनी धारावी जिंकला. १५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीक कडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले.
तुफान रणकंदन झाले.
मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली.
"यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली.
पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७७३
नारायणराव पेशव्यांच्या नंतर "रघुनाथराव" पेशवे झाले.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१७३९
मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला.
मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८१
सामाजिक क्रान्तिचे प्रणेते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा मृत्यू. (वाकडेवाडी, संगमपूल, पुणे)
🚩🏇🚩 #१७_फेब्रुवारी_१८८३
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू.
🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१६_फेब्रुवारी_१६३५
मुघल सरदार शाहिस्तेखान हा वीस हजाराची फौज घेऊन जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निःघाला
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१६_फेब्रुवारी_१६५९
छत्रपती शिवाजी महाराजांनी चाफळ जिंकून स्वराज्यात सामील केले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१६_फेब्रुवारी_१६८१
राजाभिषेक सोहळ्याच्या अवघ्या एका महिन्या नंतर
१६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे
विधिपूर्वक राज्यारोहण झाले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१६_फेब्रुवारी_१७०४
औरंगजेबने राजगड़ जिंकून त्याचे नाव नबिशाहगड़ ठेवले.
येथून तो पुढे किल्ले तोरण्याकडे निघाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१६_फेब्रुवारी_१७१९
मराठ्यांची दिल्लीला धडक
फर्रुखसियर आणि सय्यद अब्दुल्लाखान यांच्यातील तणाव वाढत गेला. सय्यद अब्दुल्लाने आपल्या बंधूला ताबडतोब ससैन्य बोलावले. त्याच्याकडे ५० हजार फौज होती.
शाहूंनी मोठ्या हुशारीने पेशवे बाळाजीपंतांना ५० हजार फौजेनिशी त्याच्या मदतीला दिले.
बदल्यात सय्यद बंधूंनी रोजचे ५० हजार रुपये याप्रमाणे दरमहा १५ लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले इतकेच नव्हे तर दख्खनच्या विजापूर, बिदर, वऱ्हाड, खानदेश, औरंगाबाद आणि हैद्राबाद अश्या ६ प्रांतांची चौथाई-सरदेशमुखी देण्याचेही आश्वासन दिले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मोहीमेच्या यशानंतर साक्षात येसूबाईसाहेबांची सुटका होण्याचेही वचन देण्यात आले.
सर्व बाजूंनी लाभदायी अश्या या मोहीमेत बाळाजींनी आपले थोरले पुत्र बाजीरावांनाही सोबत ठेवले होते.
त्यांचे वय त्यावेळी अगदीच १८-१९ वर्षांचे असेल परंतु त्यांना शाहूंनी सरदारकी बहाल केलेली होती.
अश्या या सय्यद आणि मराठा संयुक्त फौजांनी १६ फेब्रुवारी १७१९ ला दिल्लीदरवाजावर धडक दिली.
सय्यद बंधू आणि बाळाजीपंत यांनी मोठ्या हुशारीने एक तोतया उभा करुन त्याच्या जोरावर बादशाहकडून मराठ्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या.
२८ फेब्रुवारीला जराश्या वादाचे निमित्त होऊन हुसैनअलीने बादशाहचे डोळे काढले आणि त्याला तुरुंगात कोंबला व त्याच्याजागी रफ़िउद्दरजत नावाच्या एका पोराला गादीवर बसवले. जवळजवळ ३० वर्षांनंतर शंभूराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाईसाहेबांनी स्वतंत्र श्वास घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
१६ फेब्रुवारी इ.स.१६८९
छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेब समोर आणले गेले तेव्हा शंभूराजांनी औरंगजेब बादशाहासंबंधी काही अनुद्दार काढले.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_फेब्रुवारी_१६५८
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबला पाठवलेल्या पत्राचे उत्तर औरंगजेबकडून आले.
१६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही जिंकल्यावर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले.
“मोगल मुलुखावर आपण हल्ला करीत नाही; पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत, म्हणून मी हे करीत आहे”,
असे त्यास कळविले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_फेब्रुवारी_१६६५
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_फेब्रुवारी_१६७१
( फाल्गुन वद्य प्रतिपदा, शके १५९२, संवत्सर साधारण, मंगळवार )
दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली!
होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवूनच साजरा करीत असत. या वेळेची शिकार होती मेहेरूफ - ए - जंजिरा!
याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते.
मात्र मन जंजिऱ्यातच गुंतले होते.
जंजिऱ्याच्या आजूबाजूचा दंडाराजापुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम, सिद्धी याकूत व सिद्धी खैरियत यांनीसुद्धा दंडाराजापुरी मराठ्यांकडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्रमार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली. या दिवशी दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_फेब्रुवारी_१७५५
रघूजी भोसले यांचा मृत्यू (जन्म १६९८)
नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी व्यक्ती.
इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_फेब्रुवारी_१७५७
इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पत्र पाठवले
मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले याला आणखी एक कारण आहे.
यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता.
पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता.
१४ फेब्रुवारी इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र:-
“आज इंदूरस पोचलो.
होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_फेब्रुवारी_१६३०
मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_फेब्रुवारी_१६५९
छत्रपती शिवरायांसमोर भास्कर गोसावी भिक्षेसाठी हजर
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_फेब्रुवारी_१६६०
राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी
"हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे, त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.....☝️
" शिवाजी हिंदुसेनाधिपति " 🚩
म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपतिआहेत.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_फेब्रुवारी_१६६०
शिवाजी राजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे इंग्रजांकडून जंजिर्याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली व या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा सर्व माल सोडून दिला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_फेब्रुवारी_१७१२
कान्होजी आणि इंग्रजांत तह:-
कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले.
४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला.
त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले.
कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले.
या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_फेब्रुवारी_१७२३
श्रीमंत पेशवा बाजीराव यांची निजामाशी माळव्यात बोलशा येथे दुसरी भेट झाली. मोगली सुभेदार दयाबहादूर मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्यास विरोध करू लागला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी त्याच्याकडे वकीलही पाठवीला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_फेब्रुवारी_१७३९
कर्नालची लढाई:-
पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला, या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
१२ फेब्रुवारी इ.स. १६८९
राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने वजीर झुल्फिकारखान यांस फौज देऊन रायगड ताब्यात घेण्यास सांगितले.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_फेब्रुवारी_१६८५
सावंताने छत्रपती संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली.
हे वर्तमान संभाजीराजांना समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_फेब्रुवारी_१६८९
औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा एतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले.
शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु ३,
१२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_फेब्रुवारी_१७३२
कुलाब्यास सेखोजी आंग्रे-बाजीराव भेट होऊन जंजिरा मोहीमेला सुरुवात.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_फेब्रुवारी_१७४२
नाना फडणीसांचा जन्म सातारा येथे झाला.
(मृत्यू: १३ मार्च १८००)
बहुदा फुटक्या तळ्याजवळील नातू वाड्यात त्यांचा जन्म झाला असावा. तसे पाहीलेतर नारायणराव याचे खून झाल्या पासून २५ वर्ष अनभिषिक्त सत्तास्थानी ते होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_फेब्रुवारी_१७९४
#महादजी_शिंदे_स्मृतीदिन.......🙏
महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते.
इंग्रजांकडून मानाने यांना ''द् ग्रेट मराठा'' असे म्हटले होते.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले.
पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले.
त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
१२ फेब्रुवारी महादजी शिंदे यांचा स्मृतीदिन....
महादजी शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.🙏
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_फेब्रुवारी_१६५८
शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला.
मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता. १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहाजांची निर्मिति सुरु झाली.
सीद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि डच यांच्यापासून स्वराज्याचे रक्षण करने हे मराठा आरमाराच मुख्य काम पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर.
आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखि बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती व अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_फेब्रुवारी_१६६०
औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_फेब्रुवारी_१७५६
तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती.
त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता.
याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला.
नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते.
इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही.
१७५६ साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला.
तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला.
या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_फेब्रुवारी_१७६०
सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने उदगीर येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू निजामाचा दारूण पराभव केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩










