#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_जून_१६६५
संपूर्णपणे पराभूत होऊन सुद्धा दुष्मानाशी तडजोड करणे म्हणजे जगातील कुठल्याही राजकारणी खेळीचा कळसचं आणि ती खेळी म्हणजे पुरंदरचा तह.
दि. १३ जून १६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता.
त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले..
दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार :
१. महाराजांकडे लहान-मोठे १२ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. .
२. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी..
३. शिवाजीपुत्र संभाजी राजांना मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल.
त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.)
प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल..
४. विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशहाला द्यावी..
५. तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा.
हाच तो पुरंदरचा इतिहासप्रसिध्द तह...✍️
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१३_जून_१७००
औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_जून_१६६५
संपूर्णपणे पराभूत होऊन सुद्धा दुष्मानाशी तडजोड करणे म्हणजे जगातील कुठल्याही राजकारणी खेळीचा कळसचं आणि ती खेळी म्हणजे पुरंदरचा तह.
दि. १३ जून १६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता.
त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले..
दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार :
१. महाराजांकडे लहान-मोठे १२ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. .
२. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी..
३. शिवाजीपुत्र संभाजी राजांना मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल.
त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.)
प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल..
४. विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशहाला द्यावी..
५. तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा.
हाच तो पुरंदरचा इतिहासप्रसिध्द तह...✍️
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१३_जून_१७००
औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_जून_१६६५
"छत्रपती शिवाजी महाराज" आणि "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या बोलनीतून इतिहास प्रसिद्ध "पुरंदरचा तह" झाला.
१६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ ते १३ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.
या तहान्वये महाराजांनी आग्राला भेट देण्याचे तसेच दक्षिणेकडील मुघलांना मदत करण्याचे मान्य केले व २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.
१. लोहगड
२. तुंग – कठीणगड
३. तिकोना – वितंडगड
४. कोंढाणा – सिंहगड
५. स्वरूपगड – कर्नाळा
६. टंका – माणिकगड
७. किल्ले अत्रा – मृगगड
८. खेडटक्का – खेडदुर्ग – सागरगड
९. मानगड
१०. सोनगड
११. किल्ले कुर्ड – कुर्डूचा किल्ला – विश्रामगड
१२. मुरंजन – प्रबळगड
१३. नरटक्का – सिद्धगड
१४. पळसखोल – पळसगड
१५. गड माहुली
१६. भांडारटक्का – भंडारगड
१७. विसागड – विसापूर – संबळगड
१८. किल्ले कोह-अज – कोहोजचा किल्ला – रूपगड
१९. खडकाला – पुरंदरचा उपदुर्ग
२०. पेब – बिकटगड
२१. किल्ले येकोला – एकोल्याचा किल्ला – घनगड
२२. किल्ले रोहिडा – विचित्रगड
२३. किल्ले पुरंदर
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_जून_१६७४
छत्रपति शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर
५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडनला भेटण्याची परवानगी दिली.
मुंबईकरांची तहाची बोलणी इ. स. १६७४ मध्ये चालू राहिली.
शिवाजीराजांच्या कोकणच्या प्रदेशात व्यापार वाढवणे, राजापूरचे झालेले नुकसान भरून काढणे व नव्या सवलती मिळवणे, पूर्वी झालेल्या तहावर शिवरायांनी शिक्कामोर्तब करून तो कायम केला नव्हता, त्यास कराराचे स्वरूप आणणे, हें इंग्रजांचे उद्दिष्ठ होते.
इ. स. १६७४ च्या मार्चमध्ये मुंबईच्या सल्लागार मंडळाने एक ठराव केला, कि पूर्वी शिवाजीराजांबरोबर झालेला तह पुरा करण्यासाठी नारायण शेणवी यास पाठवावे व त्याचेबरोबर
मुखत्यार वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडन यास रायगडावर धाडावे. राज्याभिषेक झाल्यावर ऑक्झेंडनने निराजीपंतांच्या पाठीशी लकडा लावला की तहासाठी राजाची संमतीदर्शक सही घ्या. तहाच्या कलामांचे कागद त्याने सतत आपल्याजवळ बाळगले होते. ता. ११ जून रोजी शिवाजीराजे यांनी तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१०_जून_१६६४
विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले.
पण त्याने एकदम आल्लाघरीच स्वारी केली.
या मोहिमेत तो एकाएकी मरण पावला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१०_जून_१६७६
शिवछत्रपतींच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखनी योजनेस प्रारंभ.
राज्याभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमे मागचे सूत्र होते. प्रत्यक्षात मोहिमेस ऑक्टोबर मध्ये सुरवात झाली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१०_जून_१६८१
औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला.
त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१०_जुन_१६८३
फिरंग्यांनी बिघाड केला व रेवदांडास वेढा घातला म्हणून संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#१०_जून_१७६८
पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_जून_१६५९
शिवरायांनी सिद्दीवर स्वारी करून विजय मिळविला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_जुन_१६८०
दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान खानजहान बहाद्दूर औरंगाबादला पोहचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास ( अहिवंतगड ) वेढा घातला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_जून_१६८२
छत्रपती संभाजी महाराजांनी गुजरात सीमेवरील "खंबायत" व "रामनगर" जिंकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_जून_१६९६
छत्रपति राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले.
मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले.
ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या.
९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी पुत्ररत्न झाले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_जून_१७००
दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_जुन_१७००
परळी किल्ला मोगलांना प्राप्त.
२ महिने निकराचा संग्राम होऊन बादशहाचे पुष्कळ लोक जाया झाले.
इकडे गडावर राजाराम मरण पावल्याची खबर आली तेव्हा गडावर ‘परशुराम त्रिंबक’ कारभार पाहत होते.
राजारामांच्या मृत्यूची वार्ता ऐकून परळीच्या किल्लेदारास न विचारता परशुराम त्रिंबकने बादशहास शरणचिट्ठी लिहिली त्यामुळे धान्यसामग्री संपल्यामुळे आजच्या दिवशी ९ जुन रोजी परळीचा किल्ला मोगलांना प्राप्त झाला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_जून_१७१८
पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले.
बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते.
तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दिवस प्रयत्न करून पराभूत होउन मुंबईला परत गेले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#८_जून_१६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी सोबत असलेला काही अनावश्यक फौजफाटा औरंगजेबाचे परवाने घेऊन स्वराज्याकडे पाठवण्याची तयारी केली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#८_जून_१६७४
राज्याभिषेक समारंभाच्या अवघ्या दोन दिवसांत
जिजाऊसाहेब माँसाहेब यांच्या अस्वस्थ
तब्येतीमुळे रायगड पायथ्याशी पाचाड गावातील वाड्यात त्यांचा मुक्काम हलवण्यात आला
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#८_जून_१७०७
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तसाठी युद्ध झाले.
ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#८_जून_१७१३
पंत प्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला.
१६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी
जिंकला होता.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#८_जून_१६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी सोबत असलेला काही अनावश्यक फौजफाटा औरंगजेबाचे परवाने घेऊन स्वराज्याकडे पाठवण्याची तयारी केली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#८_जून_१६७४
राज्याभिषेक समारंभाच्या अवघ्या दोन दिवसांत
जिजाऊसाहेब माँसाहेब यांच्या अस्वस्थ
तब्येतीमुळे रायगड पायथ्याशी पाचाड गावातील वाड्यात त्यांचा मुक्काम हलवण्यात आला
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#८_जून_१७०७
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तसाठी युद्ध झाले.
ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#८_जून_१७१३
पंत प्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला.
१६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी
जिंकला होता.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#६_जून_१६६०
व्याघ्रगड उर्फ वासोटा मराठ्यांनी जिंकला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#६_जून_१६७४
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६
माँसाहेब जिजाऊ पुत्र, हिंदूराष्ट्र संस्थापक "छत्रपति शिवाजीराजे शहाजीराजे भोसले" यांचा राज्याभिषेकदिन रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला.
श्री शिवराय या शुभदिवशी हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपति झाले.
रंजल्यागांजल्यांचे आक्रोश त्यांच्या दबलेल्या कंठातून न फुटतांज्यासाठी इतकी वर्ष घुसमटले होतेज्यासाठी व्रतं -वैकल्यं -तीर्थाटनं -तपश्चर्या -किंबहुना अवघ्या उत्सुकता ज्यासाठी ताणल्या गेल्या होत्या.
अवघे सत्यसंकल्प ज्यासाठी उच्चारिले गेले होते.
अवघी पुण्यं ज्यासाठी समर्पित केली गेली होती.
तो शुभमुहुर्ताचा मुकुटमणितो स्वातंत्र्यसूर्याचा उदयकालस्वर्गीच्या देवतांच्या अन् यक्षगंधर्वांच्या साक्षीनंतो दैदीप्यमान क्षणार्ध उलटला आणि कृतज्ञतेच्या भारानं भारावलेली पावलं टाकीत तो मराठ्यांचा अतिशय आवडता राजा सिंहासनाजवळ पोचला, त्याक्षणी त्याच्या मनी लक्ष लक्ष वादळं उठली आणि विझली.
त्या सर्व जिवलगांचे स्मरण केलं की जे या पवित्र क्षणी उपस्थित नव्हते.
त्यासर्व स्वातंत्र्ययोद्धयांना वंदन केलं,
की ज्यांच्या बलिदानामुळं ही अमृतवेल स्वप्नांतून प्रत्यक्षांत अवतरली होती आणि मग जिथून आवडता राजगड स्पष्ट दिसत होता,
त्या सिंहासनास पाय न लावता त्यावर तो
आरूढ झाला !
गागाभट्टांनी वैदिक मंत्र म्हणायास प्रारंभ केला_
हातींचं रत्नजडित, रेशमी छत्र त्यांनी राजाच्या मस्तकी धरलंआणि घनगंभीर स्वरात ते गर्जले,
क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वरराजा शिवछत्रपति की जय हो !
तत्क्षणीं शिंगं, कर्णे, तूतबंबाळ, चौघडे यांचा एकच गर्दघोष झाला.
ठासून ठेवलेल्या तोफांचे दुडुम दुडुम बार झाले. बरकंदाजांच्या बंदुका सुटल्या.
जणूं धरणीकंप व्हावा, ती गत झाली.
न कळत हेन्रीचं मस्तक शिवछत्रपतींसमोर झुकलं.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#६_जुन_१६९६
कासिमखानाच्या जागी बादशाहने पुढे झुल्फिकारखानाची निवड कर्नाटकच्या
सुभेदारीवर केली.
चित्रदुर्गाच्या ब्रम्हप्पा नायकाने संताजी घोरपडेची मदत केल्याबद्दल बादशहाने त्याची जहागिरी खालसा करून नायकाची खोड मोडली.
नायकाने अपराधाची क्षमा मागून मोठा दंड भरून आपला जीव मात्र वाचवला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जून_१६५७
शिवरायांनी अहमदनगरवर हल्ला केला.
नसीरखाना सोबत झालेल्या या हल्ल्यात महाराजांनी ७०० घोडे व काही हत्ती काबीज केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जून_१६७४
राज्याभिषेकापूर्वी शिवाजीराजांचे वैदिकविधीवत रायगडावर तुलादान झाले.
ज्येष्ठ शुध्द एकादशीस महाराजांची सुवर्णतुला व इतर अनेक प्रकारच्या तुला करण्याचें ठरलें होतें.
सोळा महादानांपैकी तुळादान हें एक आहे.
या दिवशीं महाराजांची सुवर्णतुळा करण्यांत आली. तराजूच्या एका पारडयांत महाराज बसले तर दुसऱ्यात सोन्याचे होन घालण्यांत येत होते.
ब्राम्हण मंत्र म्हणत होते, पारडीं समभार झाली.
महाराजांची तुळा झाली.
एकूण सतरा हजार होन लागले म्हणजे महाराजांचें वजन पक्के दोन मण (१६० पौंड) होतें.
या पारडयांत महाराजांनी होनांची बरीच मोठी जादा रक्कम ओतली व या सर्व धनाचा दानधर्म केला.
सोन्याशिवाय चांदी, तांबें, कापूर, साखर, लोणी, फळें, मसाले वगैरे अनेक पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यांत आली व ते सर्व पदार्थ दान करण्यांत आले.
सुवर्ण ओंजळ स्वातंत्र्याने हृदयाची केली,
अतुलनीय शिवछत्रपतींची अतुल तुला झाली
सुवर्ण लक्ष्मी तोलूनी भारिते,
पराक्रमाचा भार, अगणित कंठातून घुमतो राजांचा जयजयकार..🚩.🚩
एका तराजूत सोन्याचे होन(शिवकालीन चलन) आणि दुसऱ्या तराजू मध्ये शौर्य, पराक्रम, राष्ट्रभक्ती, चे वजन तोलले जात होते.
त्याबरोबर ४ जून रोजी महाराजांची चांदी, तांबे, जस्त,
कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्याही तुला झाल्या.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जून_१६८१
गोव्याचा विजरई याने अण्णाजी दत्तोला
पत्र लिहून पोर्तुगीज व हिंदू राजे यांच्यातील
तहाचे फायदे काय आहेत हे स्पष्ट केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जून_१६५७
शिवरायांनी अहमदनगरवर हल्ला केला.
नसीरखाना सोबत झालेल्या या हल्ल्यात महाराजांनी ७०० घोडे व काही हत्ती काबीज केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जून_१६७४
राज्याभिषेकापूर्वी शिवाजीराजांचे वैदिकविधीवत रायगडावर तुलादान झाले.
ज्येष्ठ शुध्द एकादशीस महाराजांची सुवर्णतुला व इतर अनेक प्रकारच्या तुला करण्याचें ठरलें होतें.
सोळा महादानांपैकी तुळादान हें एक आहे.
या दिवशीं महाराजांची सुवर्णतुळा करण्यांत आली. तराजूच्या एका पारडयांत महाराज बसले तर दुसऱ्यात सोन्याचे होन घालण्यांत येत होते.
ब्राम्हण मंत्र म्हणत होते, पारडीं समभार झाली.
महाराजांची तुळा झाली.
एकूण सतरा हजार होन लागले म्हणजे महाराजांचें वजन पक्के दोन मण (१६० पौंड) होतें.
या पारडयांत महाराजांनी होनांची बरीच मोठी जादा रक्कम ओतली व या सर्व धनाचा दानधर्म केला.
सोन्याशिवाय चांदी, तांबें, कापूर, साखर, लोणी, फळें, मसाले वगैरे अनेक पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यांत आली व ते सर्व पदार्थ दान करण्यांत आले.
सुवर्ण ओंजळ स्वातंत्र्याने हृदयाची केली,
अतुलनीय शिवछत्रपतींची अतुल तुला झाली
सुवर्ण लक्ष्मी तोलूनी भारिते,
पराक्रमाचा भार, अगणित कंठातून घुमतो राजांचा जयजयकार..🚩.🚩
एका तराजूत सोन्याचे होन(शिवकालीन चलन) आणि दुसऱ्या तराजू मध्ये शौर्य, पराक्रम, राष्ट्रभक्ती, चे वजन तोलले जात होते.
त्याबरोबर ४ जून रोजी महाराजांची चांदी, तांबे, जस्त,
कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्याही तुला झाल्या.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जून_१६८१
गोव्याचा विजरई याने अण्णाजी दत्तोला
पत्र लिहून पोर्तुगीज व हिंदू राजे यांच्यातील
तहाचे फायदे काय आहेत हे स्पष्ट केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩










