#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#४_जानेवारी_१६६४
शिवाजीराजे ससैन्य सुरतेजवळील घणदेवी येथे येऊन धडकले.
पुढे ते उधण्यास येऊन पोचले.
उधण्यावरून शिवाजीराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला.
वकिलाने फार्मावले की इनायतखान सुभेदाराने व सुरतेवरील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी, अन्यथा सुरत बदसुरत झाल्यास त्याची जवाबदारी आमची नाही.
सुरत मध्ये एकच धावपळ सुरू झाली.
इनायतखान सुभेदाराने महाराजांची मागणी उडवून लावली आणि उलट जबाब वकिलामार्फत पाठवला.
महाराजांनी या वकिलालाच कैद केले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#४_जानेवारी_१६८३
इंग्रजांच्या प्रेसिडेंट जहाजावर मराठ्यांचा हल्ला.
तसेच किल्ले राजगड, पुरंदर व शिवापूर येथे मुघल सरदार शहाबुद्दीन सोबत लढाई.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#४_जानेवारी_१६७५
कल्याण - भिवंडी परत स्वराज्यात दाखल.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जानेवारी_१६८४
बापाच्या सांगण्यानुसार छत्रपती संभाजीराजांवर चाल करण्यासाठी शहजादा मुअज्जम कोकणात उतरला.
डोंगर दर्यांची कधीच सवय नसलेली, आयुष्यातील बराचकाळ आईषोआरामात घालवलेल्या शाही फौजेला सह्याद्री सोबत मिळते जुळते घेता आलेच नाही, मराठ्यांकडून सपाटून मार खाऊन परतताना त्यांच्यावर उपासमारीची भयानक वेळ ओढवली, जीवाचीच धास्ती अशी काही बसली कि अंगावरील कपड्याची गत ती काय
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जानेवारी_१७२१
थोरले बाजीराव आणि निजाम यांची चिखलठाण यथे
पहिल्यांदाच भेट.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_जानेवारी_१७७९
कार्ल्याच्या ऐतिहासिक तळ्याकाठी इंग्रज आणि मराठे यांची घनघोर लढाई झाली.
इंग्रजांना पुण्याकडे आगेकुच करायची होती तर मराठ्यांना इंग्रजाची सगळी रसद नष्ट करायची होती.
इंग्रज सैन्यांना पुण्यापर्यंत पोहचू द्यायचे नव्हते, त्यामुळे इंग्रज सैन्यांना कार्ला येथे अडविण्यात आले, यावेळी इंग्रज व मराठ्यांमध्ये घनघोर लढाई झाली, या लढाईत इंग्रज सेनापती स्टुअर्ट फाक्कडा मारला गेला व मराठ्यांचा मोठा विजय झाला,
या विजयाचे प्रतिक म्हणून येथील ऐतिहासिक तळ्याकाठी दरवर्षी विजयोत्सव साजरा करण्यात येतो.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
३ जानेवारी इ.स.१६७१
छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या तहात गमावलेले किल्ले आणि प्रदेश पुन्हा स्वराज्यात घेण्यास सुरुवात केली.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_जानेवारी_१६७०
सिद्दी संबुल, सिद्दी याकूत व सिद्दी खैरीयत ह्या तिघांनी फतेहखानचा विचार अमान्य करून फतेहखानास कैद केले.
सिद्दी संबुल हा दंडराजपुरीचा मुख्य झाला व दंडराजपुरी नव्याने महाराजांशी लढू लागला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_जानेवारी_१६७१
सरदार जसवंतसिंग व महाबतखान यास औरंगजेबाने दख्खनवर स्वारी करण्याविषयी आदेश दिला
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_जानेवारी_१६८२
छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवाज्ञा नंतर जंजिऱ्याच्या सिद्दीने स्वराज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली.
डिसेंबर १६८१ मध्ये छत्रपती संभाजीराजे रायगडावरून २०,००० सैन्य आणि तोफखाना घेऊन जंजिऱ्याच्या दिशेने निघाले.
एक पूर्ण पंधरवडा तोफांनी जंजिऱ्यावर मारा करून पूर्वेकडील तट फोडून काढला.
३ जानेवारी १६८२ पर्यंत सिद्दीची अशी अवस्था झाली की त्याला किल्ल्यावरील टेकडीमागे लपून बसावे लागले.
संभाजीराजांनी जंजिऱ्यापर्यंत सेतू बांधण्याचा निश्चय केला पण त्याचवेळी, मोगलांनी उत्तर कोंकणात एक दुसरी मोहीम सुरु केली त्यांना तोंड देण्यासाठी छत्रपती संभाजी जातीने गेले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_जानेवारी_१६८४
छत्रपती संभाजी महाराजांनी वसईच्या देशमुखास पत्र लिहिले:-
सुलतान माजम व शाबदिखान गनीम दोहिकडून कोकणात उतरला, या प्रसंगी हशामांचे बहुतच प्रयोजन आहे.
याकरिता संताजी, येसाजी यास नौसंचनी हशमाचा जमाव वरघाटे पाठविले असे हे सांगतील तिहेप्रमाणे हशमांची नौसंचनी करून पाठवून देणे, तुम्हासंगी हशामाचा पोख्ता जमाव झाला तरी गनिमाचा काय गुमान लागला बुडविलाच जातो.
आजवरी स्वामीने तुमचे चालविले ते सार्थक या दिवसात करून आपला मजुरा करून घेणे म्हणजे स्वामी तुम्हावरी संतोषी होतील, आपले समाधान असो देणे.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_जानेवारी_१८३१
भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या 'शिक्षिका', 'मुख्याध्यापिका' आणि पहिल्या 'शेतकरी शाळेच्या' संस्थापक "महानायिका क्राँतीज्योती सावित्रीबीई फुले यांची जयंती (मृत्यू : मार्च १०, इ.स. १८९७ पुणे)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
२ जानेवारी इ.स.१६६१
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना मुजुमदारी बहाल केली.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_जानेवारी_१६६१
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजीराजांनी मुजुमदारी बहाल केली. मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व अफजलस्वारीच्या प्रसंगांवरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली तो दिवस म्हणजे २ जानेवारी १६६१.
मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहाणे.
अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे पद.
हे पूढील वर्षभरातच ‘पेशवे’ झाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_जानेवारी_१६७१
शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली, साल्हेर जिंकून घेण्यासाठीच्या आखणीप्रमाणे एकीकडून सरनौबत प्रतापराव सरदार सुर्याराव काकडे तर दुसरीकडून पेशवे यांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला आणि साल्हेरच्या युद्धात जय मिळाला पण आनंदाच्या बरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडते शूर जिवलग सूर्याजी काकडे मारले गेले महाराजांना अपार दु:ख झाले त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले...✍️
'माझा सूर्याराऊ पडिला, तो जैसा महाभारतातील कर्ण होता".
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_जानेवारी_१६८४
किल्ले फोंड्याच्या बचावासाठी सुरवातीला मराठ्यांना आपला फिरंगी दारुगोळ्यासमोर निभाव लागणार नाही असे वाटले होते. मोहीम फत्ते झाल्यावर कवी कलशानी धर्माजी नागनाथला लिहून पिरास दरवर्षी ५० होणं उदफुल दिवाबत्तीसाठी दिले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_जानेवारी_१७५८
मराठी सैन्याने नळदुर्ग किल्ला जिंकला
नळ राजाने हा किल्ला बांधला व त्यावरूनच ह्याला नळदुर्ग नाव प्राप्त झाले असे म्हटले जाते.
सहाव्या शतकात हा चालुक्यांकडे होता. त्यानंतर सन १३५१ पासून ते सन १४८० पर्यंत तो बहमनी राजवटीखाली होता.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_जानेवारी_१७६६
राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होत्या.
शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला.
मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग ताब्यात घेतला.
त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले ‘फोर्ट ऑगस्टस‘ .
कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_जानेवारी_१६३७
बाल शिवराय व राजमाता जिजाऊ खेडेबारे मावळ (खेड शिवापूर-शिवगंगा खोरे) येथे वास्तव्यास आले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_जानेवारी_१६६२
पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म.
(मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_जानेवारी_१६७५
शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली खान्देशातील धरणगावातील इंग्रजांची वखार मराठ्यांनी छापा मारून लुटली.
आंग्ल नवीन वर्ष साजरे करत होते अन शिवछत्रपती त्यांचा काळ बनुन उपस्थित राहिले ते आजच्याच दिवशी.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_जानेवारी_१७५६
निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_जानेवारी_१८१८
कोरेगाव भिमाची लढाई
ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे.
ही लढाई १ जानेवारी इ.स.१८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती.
ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता.
इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता.
पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने लढले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_जानेवारी_१८४८
महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
समाजाच्या विरोधात जाऊन एखादं चांगलं काम करायचं झालेतरी अंगावर दगडी पडतात.
सगळ्यात या दगडी खाण्याची हिम्मत असतेच असे नाही, मनात खूप असते ओ पण समाज काय म्हणेल या विचारातून उठणाऱ्या मनातल्या लाटा पुन्हा मनातचं विरून जातात पण क्रांतीज्योती कधीच डगमगली नाही, नावाप्रमाणेचं महात्मा जोतीबा फूलेंनी अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी सुरवात केली होती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
३१ डिसेंबर इ.स.१६६३
महाराज नाशिक शहरात त्र्यंबकेश्वरला पोहोचले. वास्तविक पुण्यापासूनच पुढील सर्व भाग मोगलांच्या त्यामुळे एवढ्या सैन्यानिशी सुरतेपर्यंत ३०० मैलांचा धाडशी प्रवास शत्रू ताब्यात होता
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३१_डिसेंबर_१६००
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर १५९९ मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली.
देशातील भागधारकांकडून ३,००,००० पौंडांचे भांडवल जमविले.
३१ डिसेंबर १६०० ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३१_डिसेंबर_१६६३
शिवराय सुरत मारायला राजगडावरून निघाले आणि वाटेत ३१ डिसेंबर रोजी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे महापूजा व दान धर्म केला. हा त्यांच्या आचारशिल-विचारशिल-दानशिल-धर्मशिल अशा स्वभावाचा व दिनचर्येचा भाग होता.
त्र्यंबकेश्वराच्या शिविलंगास अभिषेक घालून पौष शुद्ध व्दितीया अर्थात ३१ डिसेंबर १६६३ या दिवशी शिवाजी राजे त्र्यंबकेश्वराच्या उत्तररांगांची खिंड आणि घाट उतरून कोळवणात म्हणजेच जव्हार मुलुखात उतरले.
त्यावेळी जव्हार नरेश पहिले विक्रमशहा यांनी आनंदाने शिवरायांचे जव्हारच्या सीमेवर असणाऱ्या उंच टेकडीवर दरबार भरवून जंगी स्वागत केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३१_डिसेंबर_१७७८
इंग्रज फौजा खंडाळ्यात मुक्कामला
पावसाळा संपल्या नंतर इंगजांनी मुंबई हून साधारण ४००० फोज घेत प्रयाण केले. रघुनाथ रावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथ रावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येउन मिळतील. इंग्रजांचा पणवेल मार्गे , कर्जत - खंडाळा - पुणे असा मार्ग होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३१_डिसेंबर_१८०२
पेशवे बाजीराव दुसरे आणि इंग्रज यांच्यात तह झाला.
या तहानुसार मराठ्यांचा बराचसा भूभाग इंग्रजांच्या अमलाखाली आला
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३१_डिसेंबर_१८१७
#कोरेगाव_भीमा
रात्री ८ वाजता बॉम्बे नेटीव्ह आर्मीची एक बटालियन (सुमारे हजार सैनिक), मद्रास आर्टिलरीच्या दोन ६ पाउंडर तोफा व त्यावरील अधिकारी, आणि २५० घोडेस्वार घेऊन कॅप्टन स्टॉन्टन शिरूरकडून पुण्याकडे निघाला होता. रात्रभर प्रवास करून १ जानेवारी १८१८ रोजी हे सगळे कोरेगावपासून दोन मैलांवर पोहोचले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
३० डिसेंबर इ.स. १६८०
छत्रपती संभाजी महाराजांची किल्ले रायगडावर सुवर्णतुला विधी करण्यात आली..!
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_डिसेंबर_१६७५
दक्षिणेतील त्रिचनापल्लीचा विजय राघव आणि तंजावरचा रघुनाथ नायक यांच्यातील यादवीचा फायदा घेत आदिलशहाचा सरदार म्हणून इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजांनी तंजावर जिंकले व सन १६७६ मध्ये व्यंकोजीराजे तंजावरचे अधिपती बनले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_डिसेंबर_१६८०
दिनांक २० जुलै सन १६८० रोजी संभाजी राजांचे राजधानी रायगडावर मंचकारोहण झाले.
३० डिसेंबर सन १६८० रोजी शिवपुत्र संभाजी राजांची सुवर्ण तुला करण्यात येऊन १६ जानेवारी सन १६८१ रोजी संभाजी राजे स्वराज्याचे दुसरे सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती झाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_डिसेंबर_१७२५
छत्रपती संभाजी आणि छत्रपती शाहू यांच्यात करार.
छत्रपती संभाजींनी निजामाशी प्रथम मैत्री संपादिली, तसेच गोव्याचे पोर्तुगीज यांच्याबरोबर १७१६ साली दारुगोळा, तोफा, बंदुका वगैरे सामान विकत घेण्याचा करार केला.
शाहू महाराजांनी संभाजींच्या सरदारांविरुद्घ जशी मोहीम आखली, तशीच संभाजींनी सातारापक्षीय सरदारांविरुद्घ आघाडी उघडली.
त्यांपैकीच १७१८ मधील सावंतवाडीची मोहीम होती. यासंदर्भात दोघांमधील वडगावच्या लढाईत शाहूंची सरशी झाली; तथापि मिरज, कराड ठाणी घेण्यासाठी त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.
३० डिसेंबर १७२५ मध्ये उभयतांतील करारानुसार दक्षिणेकडील सर्व ठाणी व किल्ले संभाजींकडे आणि मिरज व विजापूर प्रांत हे शाहूंकडे असे ठरले आणि एकविचारे राज्याभिवृद्धी करावी, असे ठरले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_डिसेंबर_१७६०
उत्तरेतला अजून एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे, दहा हजाराचे अनअनुभवी सैन्य घेऊन शूजाच्या मुलुखात घुसला. गोपाळरावांच्या मराठी शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या आश्रयास गेले. मराठ्यांनी आता या गढीला वेढा घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पूर्ण बिमोड झाला, त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्ध बंदी झाले. मराठ्यांनी शूजाच्या मुलुखाची वाताहात केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३०_डिसेंबर_१८१७
३० डिसेंबर रोजी बाजीराव संगमनेरकडून, ब्राह्मणवाड्याचा घाट उतरून चाकणला येऊन दाखल झाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩









