Amar kokate Patil
ShareChat
click to see wallet page
@amarkokatepatil
amarkokatepatil
Amar kokate Patil
@amarkokatepatil
||રાખા શ્રી શિવછત્રપતી||🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवरायांनी राजाभिषेकाच्या दोन महिने आधी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१७३८ वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे. इ.स.१७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१८२७ जोतीराव गोविंदराव फुले जन्म. कटगुण, सातारा,महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल 8806 ११ 5CIIIH @HISTORY MAHARASHTRA छत्रपती शिवरायांनी राजाभिषेकाच्या दोन महिने आधी कोकणातील चिपळूनच्या मरठा लष्करी छावणीची पाहणी কলী आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल 8806 ११ 5CIIIH @HISTORY MAHARASHTRA छत्रपती शिवरायांनी राजाभिषेकाच्या दोन महिने आधी कोकणातील चिपळूनच्या मरठा लष्करी छावणीची पाहणी কলী - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६० राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले. आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर, सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता, परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती. माऱ्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी, तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते आणि एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा. ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे. दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६२ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६९३ १६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपती "राजाराम महाराज" जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली. याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१७५८ 🔥सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम🔥 सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष १० एप्रिल १६६० insta@ History _ Maharashtra History_Maharashtra instagram राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली, असे असूनही पन्हाळगड किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले. आजचे ऐतिहासिक दिनविशेष १० एप्रिल १६६० insta@ History _ Maharashtra History_Maharashtra instagram राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली, असे असूनही पन्हाळगड किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६० राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले. आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर, सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता, परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती. माऱ्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी, तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते आणि एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा. ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे. दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६६२ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१६९३ १६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपती "राजाराम महाराज" जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली. याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_एप्रिल_१७५८ 🔥सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम🔥 सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - fl History instagram Maharashtra @ आजचे ऐतिहासिक दिनविशेष 80 V ?882 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी आई तुळजाभवानी देवीची प्रतिष्ठापना केली॰. fl History instagram Maharashtra @ आजचे ऐतिहासिक दिनविशेष 80 V ?882 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी आई तुळजाभवानी देवीची प्रतिष्ठापना केली॰. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६३३ स्वतः शहाजी राजे यांचा सहभाग असलेल्या लढाईत मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला. ९ एप्रिल ला मुघलांना किल्ल्याच्या तटबंदीच्या एका भागात स्फोट करून भगदाड पाडता आले पण त्यातून किल्ल्यात प्रवेश करता आला नाही, १७ एप्रिलला रणदुल्लाखान व शहाजी राजांनी किल्ल्याजवळ रसद पोहोचवायचा प्रयत्न केला पण मुघलांनी त्यांना अडविले व परतवून लावले. मुघलांच्या वाढत्या प्रभावाने व घटणाऱ्या रसदेमुळे किल्ल्यातले आदिलशाही सैन्य विवश झाले. त्यांनी मुघलांकडे अभयवचन मागितले व किल्ला देऊ केला. मालोजी भोसलेनी हा निरोप महाबतखानकडे नेला व त्यानी लगेच अभयदान दिले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६६९ उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात. सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला, या पाशवी हुकुमाने जणू निसर्ग थरारला होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६६० पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तेशामखान हा मेला; यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६७० औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा हीचे ९ एप्रिल १६७० ला निधन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_एप्रिल_१६८२ मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज' ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार "रामजी" व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - History Maharashtra instagram आजचे ऐतिहासिक दिनविशेष ९ एप्रिल १६६९ हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज 37 तैनात. सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या काशी विश्वेश्वराचे मुहूर्तावर देवालय जमीन दोस्त करण्याचा हुकुम बादशहाने सोडला. History Maharashtra instagram आजचे ऐतिहासिक दिनविशेष ९ एप्रिल १६६९ हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज 37 तैनात. सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या काशी विश्वेश्वराचे मुहूर्तावर देवालय जमीन दोस्त करण्याचा हुकुम बादशहाने सोडला. - ShareChat
🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६५७ २७ वर्षीय शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला. शिवाजीराजांनी मातब्बर घराण्यांबरोबर तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली. जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाईसाहेब यांचा महाराजांच्या बरोबर विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६६३ छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून (औरंगाबादला ) सध्याच्या छत्रपती संभाजी नगर येथे जाण्याच्या तयारीस लागला. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवाजी राजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण आल्यानंतर थोड्याच दिवसात दिनांक ८ एप्रिल १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांकडून हंसाजी मोहिते तळबीडकर यांना "हंबीरराव” या किताबतीसह "सरनौबतकीची” वस्त्रे दिली गेली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७५ छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७८ दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन, पुढील प्रवास किल्ले रायगड. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६८३ मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #🙏शिवदिनविशेष📜
🙏शिवदिनविशेष📜 - History_Maharashtra instagram @ आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६७४ C सरसेनापती प्रतापराव गुजर यांना फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडून हंसाजी मोहिते या किताबतीसह " सरनौबतकीची ' हंबीरराव तळबीडकर यांना वस्त्रे दिली गेली. History_Maharashtra instagram @ आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६७४ C सरसेनापती प्रतापराव गुजर यांना फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडून हंसाजी मोहिते या किताबतीसह " सरनौबतकीची ' हंबीरराव तळबीडकर यांना वस्त्रे दिली गेली. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_एप्रिल_१६६३ सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा. चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी ची घटना. घरात घुसुन मारणं कशाला म्हणतात माहीतीये का..? दिनांक ५ एप्रिल १६६३🔥 मध्यरात्र 🔥 लाख फौजेच्या मधोमध केवळ मुठभर जिगरबाज जीवलग घेऊन शिवराय लाल महालात घुसले आणि शहिस्तेखानाची बोटे छाटुन, एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले..!.. जास्तित जास्त सैन्याचा कमीत कमी सैन्याने..कमीत कमी वेळेत केलेला जगातला एकमात्र पराभव......🚩 हो पुर्ण पराभव......⚔️ 👉आज बोटं गेलीयेत, उद्या मुंडकं जाईल या भितीनं शहिस्ताखान याने पुण्यातुन अक्षरशः पळाला..🏇 ☝याला म्हणतात घरात घुसुन मारणं..!. खान कसाबसा पसार मात्र खानाची बोटे महाराजांनी कापली. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद ) जाउन थांबला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_एप्रिल_१७१८ मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला. पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही." 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - insta@ History_Manarashtra History_Maharashtra instagram आजचे ऐतिहासिक दिनविशेष ५ एप्रिल १६६३ पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्तेखानावर शिवरायांनी आकस्मिक छापा टाकला, राजे लाख फौजेच्या मधोमध गनिमी काव्याने मुठभर जीवलग घेऊन आणि शाहिस्तेखानाची बोटे ga छाटुन, एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले. % insta@ History_Manarashtra History_Maharashtra instagram आजचे ऐतिहासिक दिनविशेष ५ एप्रिल १६६३ पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्तेखानावर शिवरायांनी आकस्मिक छापा टाकला, राजे लाख फौजेच्या मधोमध गनिमी काव्याने मुठभर जीवलग घेऊन आणि शाहिस्तेखानाची बोटे ga छाटुन, एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले. % - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_एप्रिल_१६६३ पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्त्याचा बिमोड करण्यासाठी योजना आखली गेली व स्वतः शिवाजीराजे या योजनेत सहभागी होते. ३ वर्ष पुण्यातील जनतेला त्रस्त करून सोडणाऱ्या औरंग्याच्या मामाचा , त्या शाहिस्त्याचा काटा काढण्याची वेळ आली होती. राजांनी शाहिस्तेखानाची शिकस्त कशी करायची याबद्दल योजना आखल्या गेल्या, झाली तयारी, आता फक्त प्रतीक्षा होती उद्याच्या मध्य रात्रीची........⚔️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_एप्रिल_१६७० मराठे नगरमध्ये घुसलेले पाहून ‘दाऊदखान कुरेशी’ हा खानदेशातून ७००० स्वारांसह नगरला आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात माघारी परतले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते निघून गेले, मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_एप्रिल_१६७९ छत्रपती शिवाजी महाराजांची विजापुरजवळील शहापूर येथे स्वारी 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_एप्रिल_१६८३ शिवाजीराजांच्या पासून स्वराज्यात असलेला मुन्शी काझी हैदर फितूर झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - 1 कसबे पुणे History Maharashtra insta @@ आजचे ऐतिदासिक दितविशेष ४ एप्रिल २६६३ पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्त्याचा बिमोड करण्यासाठी योजना आखली गेली व स्वतः शिवाजीराजे या योजनेत सहभागी होते़. शाहिस्त्याचा काटा काढण्याची वेळ आली होती. 1 कसबे पुणे History Maharashtra insta @@ आजचे ऐतिदासिक दितविशेष ४ एप्रिल २६६३ पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्त्याचा बिमोड करण्यासाठी योजना आखली गेली व स्वतः शिवाजीराजे या योजनेत सहभागी होते़. शाहिस्त्याचा काटा काढण्याची वेळ आली होती. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #३१_मार्च_१६५९ ( ५८-५९ ) राजे शिवरायांनी इ.स.१६५९ मध्ये किल्ले खेळणा जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड🚩 विशाळगड हा मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे छत्रपती महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! आणि यासाठी अवघे मूठभर मावळे घेऊन कित्येक तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु आणि बांदल देशमुखांच्या अद्वितीय पराक्रमाचा ! नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले म्हणूनच आज आपल्याला विशाळगड हा किल्ला दिसत आहे. (पण आजची विशाळगडाची दुर्दशा पाहवत नाही. किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामे पाहून मनात अतीव वेदना होतात व संताप सहन होत नाही 🙇) 🚩🏇🚩 #३१_मार्च_१६६५ मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी येऊन दाखल. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु. मिर्झाराजे जयसिंह या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना आणि अफाट दारूगोळाही बरोबर दिला. जयसिंह आणि दिलेरखान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही, हे दिलेरखान जाणून होता. त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी आपले वयोवृद्ध पण अनुभवी सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्यांस ८० हजाराची फौज आणि दिलेरखान पठाणास पाच हजार पठाणांची फौज देऊन महाराष्ट्रात पाठविले आणि मिर्झाराजांनी ३१ मार्च १६६५ रोजी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. 🚩🏇🚩 #३१_मार्च_१६८४ १६८४ च्या सुरुवातीस मोगल सरदार मामूरखान याने सुपे, बारामती आणि इंदापूर येथे मुघली ठाणी स्थापन केली. १३ फेब्रुवारी १६८४ रोजी शहाजादा आलम आणि त्याचा मुलगा बेदारबख्त यांना बादशहाने बहादूरगडाकडे रवाना केले. ३१ मार्च रोजी शहाबुद्दीन ऊर्फ गाजिउद्दीन हा पुणे आणि करडे निमोणे या प्रदेशाकडे रवाना झाला. 🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - Maharashtral insta @History आजचे ऐतिहासिक दिनविशेष 9739 সার্ব 9898 |Tarashtra इस्टाथ्राम 39 मराठा फौजेने इ.स. १६५९ मध्ये किल्ले खेळणा जिंकला व त्याचे नामकरण केले विशाळगड आणि हा गड म्हणजेच मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार Maharashtral insta @History आजचे ऐतिहासिक दिनविशेष 9739 সার্ব 9898 |Tarashtra इस्टाथ्राम 39 मराठा फौजेने इ.स. १६५९ मध्ये किल्ले खेळणा जिंकला व त्याचे नामकरण केले विशाळगड आणि हा गड म्हणजेच मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_मार्च_१६६३ सरसेनापती नेतोजी पालकर जखमी. मोघली मुलुखात छापा टाकण्यासाठी नेतोजी पालकर गेले होते पण दैव प्रतिकूल होते, परंतु मोगली मूलखातच मुघल फौजेन त्यांना गाठले व चकमक झाली, त्यांनी पराक्रमाची शर्थ केली परंतु बळ कमी पडल्याने मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच नेतोजींना दुखापत होऊन ते जायबंदी झाले. परंतु मराठी सैन्याचा पाठलाग करत मुघल सैनिक विजापुरात दाखल झाले यावेळी रुस्तुम ए जमान याने मोगलांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले व पूढे दर्याखोऱ्यांचा अनवट मुलुख आणि जंगले असल्याने नेतोजींचा पाठलाग करू नये असू सांगून मुघल सैन्य माघारी वळवले, रुस्तुम ए जमान आणि शिवरायांचा अंतस्थ स्नेह अशा प्रकारे उपयोगास आला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_मार्च_१७२९ थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतापुर इथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. नर्मदेच्या उत्तरेकडच्या प्रदेशाला हिंदुस्थान म्हणत. त्या सुमारास रोहिलखंडाच्या महमद बंगश याने बुंदेलखंडावर आक्रमण केले. बुंदेल राजे महाराज छत्रसाल आक्रमणाने त्रस्त झाले. त्यांनी राऊंना आपल्या भाषेत दोन चरणांत आपली स्थिती लिहून कळवली, त्याचा मथितार्थ ✍️ जो गती गजेंद्र की, सोही गत पावत आज बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज ।। ✍️ सुसरीच्या तोंडात पाय अडकलेल्या लक्ष्मीच्या गजेंद्र-हत्तीची जी गत, त्या अवस्थेत मी आहे. अशा प्रकारचा छत्रसाल यांचा याचनास्पद निरोप येताच, राऊंनी महाराज छत्रसाल बुंदेल्यांना त्यांच्यावर झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - insta @History Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष ३० पतार्च २७२९ जेतापुर थोरले बाजीराव पेशवे यांनी इथे महंगदशहा बंगश याचा पराभव केला. बुंदेल्यांना त्यांच्यावर राऊंनी गहाराज छत्रसाल झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले. insta @History Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष ३० पतार्च २७२९ जेतापुर थोरले बाजीराव पेशवे यांनी इथे महंगदशहा बंगश याचा पराभव केला. बुंदेल्यांना त्यांच्यावर राऊंनी गहाराज छत्रसाल झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२९_मार्च_१६५७ विजापूर काबीज करून दिल्लीचे तख्तत्त जिंकायचे व नंतर सम्राट म्हणहून मिरवायचे असे मनात धरून औरंगजेबाने बिदर हा कल्याणी भाग त्याने जिंकला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२९_मार्च_१६६७ सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्णत्वास आला. मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘कुरटे‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी आज्ञा केली "या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्‍यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि ‘सिंधुदुर्ग‘ नावाचा जलदुर्ग साकार झाला. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२९_मार्च_१७३७ मराठ्यांचा जरीपटका साष्टीवर डौलाने फडकला मराठे पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले. मराठ्यांची फौजा साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची, प्रबळगड, खिडकाळी, शिळ मार्गे कळव्यात आले. लढणारी तुकडी साष्टीकडे (ठाण्याकडे) रवाना झाली. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २९ मार्च १७३७ ला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकला. पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२९_मार्च_१७५५ इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी आंग्रेंचा सुवर्णदुर्ग घेतला. तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला, सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला. सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व, प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली, इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते. इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला.अश्या प्रकारे हे संयुक्त आरमार २९ मार्च १७५५ ला सुवर्णदुर्ग ला येऊन थडकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२९_मार्च_१८४९ ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२९_मार्च_१८५७ क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - ~-a* @ इस्टाग्राम @history. maharashtra] आजचे ऐतिहासिक दिनविशेष २९ मार्च १६६७ किल्ले सिंधुदुर्ग बांधून पूर्णत्वास आला आणि मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. ~-a* @ इस्टाग्राम @history. maharashtra] आजचे ऐतिहासिक दिनविशेष २९ मार्च १६६७ किल्ले सिंधुदुर्ग बांधून पूर्णत्वास आला आणि मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. - ShareChat