#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#२२_ऑक्टोबर_१६७९
( अश्विन शुद्ध त्रयोदशी, शके १६०१, संवत्सर सिद्धर्ती, बुधवार )
मराठ्यांचा खांदेरीला रसद पुरविण्याचा मार्ग मोकळा!।
राजापूरहून आलेल्या ३७ मराठी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुरवली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला.
आता खांदेरीवर रसद पोहोचल्याने खांदेरी सुरक्षित होती
मराठे सैन्य वाढवीत होते त्या अर्थी ते लवकरच निकाली लढाई करतील असे केग्विनला वाटत होते.
पुढील दहा दिवस मात्र मराठ्यांचा एक वेगळाच बेत चालला होता. इंग्रज रिव्हेंज आणि फोर्च्युन घेवून मराठ्यांच्या भीतीने खांदेरीच्या आसमंतापासून दूर रहात होते. याचा फायदा घेवून मराठे आपल्या लहान नौकांच्या आधारे रोज खांदेरीला रसद पुरवीत होते.
🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१७६४
मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई.
🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१९००
महान भारतीय क्रांतिकारी अशफाक उल्ला खान जयंती. अशफाक उल्ला खान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक प्रमुख क्रांतिकारक होते. काकोरी घटनेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर खटला चालविला आणि १९ डिसेंबर १९२६ रोजी त्याला फैजाबाद तुरूंगात फाशी देण्यात आली.
🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१९४३
राणी झांशी रेजिमेंटची स्थापना
२१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे नेताजींनी 'आझाद हिंद सरकार' या नावाने स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. नेताजी स्वत: या सरकारचे अध्यक्ष आणि पंतप्रधान होते. या सरकारला नऊ देशांनी मान्यता दिली. २२ ऑक्टोबर १९४३ रोजी राणी झांशी रेजिमेंटची स्थापना करण्यात आली.
आझाद हिंद सैन्याला संघटित करुन त्यांना शस्त्रास्त्र आणि इतर मदत मिळायला सुरुवात झाली. ब्रह्मदेशामधून सरकार काम करत होते. नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे नेताजींकडे सुपूर्द केली. अंदमान आणि निकोबार या बेटावरुन नव्या सरकारचे कामकाज सुरु झाले.
🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
२१ ऑक्टोबर इ.स.१६७९
मराठ्यांचे खांदेरी बेटावर कोट बांधण्याचे काम चालू असताना इंग्रजांनी काही जहाजे सैन्यासह मुंबईहून खांदेरीकडे रवाना केले.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑक्टोंबर_१६५९
अफजलखान भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी!
या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाचे भेट जवळपास नक्की होणार होती.
वाटाघाटी अंतिम टप्यात आल्या .
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑक्टोबर_१६६०
पावनखिंडीतील संघर्षातुन बाजीप्रभू धारातीर्थ पडले.
महाराज विशाळगडानंतर राजगडावर परतले. परंतु सिद्दी जौहरचा वेढा आणखी पन्हाळगडावर चालुच होता.
महाराज पन्हाळगडावर आले व त्यांनी पन्हाळा सिद्दी
जौहर यास देऊन टाकला पण पुन्हा काबीज करण्याच्या
युक्तीनेच☝️
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑक्टोबर_१६६१
मुघलांच्या ताब्यातील किल्ले शिवनेरी व पायथ्याच्या
जुन्नर भागावर छत्रपती शिवाजी महाराजांनी
हल्ला केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑक्टोबर_१६७९
मुंबई बेटाजवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर आपली माणसे उतरवून कोटाचे बांधकाम सुरू केले होते.
मुंबई जवळ शिवाजीराजांचे आरमार असणे इंग्रजांना धोकादायक असल्याने त्यांनी या बांधकामाला विरोध करत खांदेरीची नाकेबंदी केली. पण मराठ्यांचे चपळ आरमार त्यांना मात देत खांदेरीवर रसद पोहोचवत असे.
त्यामुळे इंग्रजानी मुंबईहून ८ तोफा, १४ इंग्रज सैन्याच्या ५ फायली आणि ३० खलाशी देऊन फोर्टून नावाचे जहाज कॅप्टन स्टीफन अंडरटन याच्या नेतृत्वाखाली खान्देरीच्या नाकेबंदीला पाठवले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#२१_ऑक्टोबर_१६८३
मुघल आरमाराला पोर्तुगीज मदत करत असल्याच्या कारणावरून संभाजीराजेंनी त्यांच्या उत्तर कोकणातील प्रांतावर स्वारी केली होती. या हल्ल्याने पोर्तुगीजांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे गोव्याचा पोर्तुगीज विजरईने मराठ्यांच्या ताब्यातील दक्षिण कोकणातील प्रांतावर हल्ला करण्याची योजना आखली होती. फोंडा किल्ला हा मराठी पोर्तुगीज सरहद्दीवर होता. त्यामुळे मुलखाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तो महत्वाचा होता.
या किल्ल्यावर पोर्तुगीज विजरई हल्ला करणार असल्याची बातमी समजताच छत्रपती संभाजी महाराज आपले सैन्य घेऊन ते फोंडयाच्या मदतीसाठी गेले होते.
याबाबत इंग्रजांची नोंद अशी, आम्हाला असे वाटते की संभाजीराजेंचे सैन्य काही काळ तरी तुमच्या भागाला त्रास देणार नाही.
कारण आम्हाला खात्री आहे की, संभाजीराजे स्वतः जातीने पंधरा हजार लोकांसह गोव्याजवळील फोंडा घाटाकडे गेले आहेत.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#🙏शिवदिनविशेष📜
२० ऑक्टोबर इ.स.१६८२
जंजिरा हाती येण्याची शक्यता निर्माण झाली तेवढ्यात मुघलांच्या संभाव्य आक्रमणाची चाहूल छत्रपती संभाजीराजेंना लागली त्यामुळे संभाजीराजे माघारी रायगडाकडे वळले.
#🙏शिवदिनविशेष📜
१९ ऑक्टोबर इ.स. १६५९
छत्रपती शिवाजी महाराजांचे वकिल पंताजी गोपीनाथ पुन्हा एकदा अफझलखाना कडे गेले..!
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#१९_ऑक्टोबर_१६५९
( कार्तिक शुद्ध चतुर्दशी, शके १५८१, संवत्सर विकारी, बुधवार )
पंताजी काका गोपीनाथ पुन्हा अफझल खानाकडे!
महाराज प्रचंड सावध पावले टाकत होते.
उघड्या मैदानापेक्षा संपत्तीला लालचावलेला खान कसाही करून जावळीत यायला हवा हे गोपीनाथ काकांच्या वकिलीवर अवलंबून होते.
पंतांना जे हवे होते ते सर्व देऊन व खानासाठी भारी नजराणा देऊन पुन्हा एकदा पंत काका खानाच्या छावणीत बोलणी करण्यासाठी आले.
संदर्भ: शिव दिग्विजय पृ १६२
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१९_ऑक्टोबर_१६८०
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी पुणे व वाई प्रांताचे देशाधिकारी "वासुदेव गोसावी" आणि "येसाजी मल्हारी" यांस हुकुम केला की "स्वराज्यातील काही रूके जमीन ही शेतकरी कुणब्यास करावयास द्यावी."
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#१९_ऑक्टोबर_१६७९
१९ व २० ऑक्टोबर इ.स.१६७९
इंग्रज नौका दल आता खांदेरी आणि मराठे यांच्या मार्गात उभे राहिले.
१९-२० ऑक्टोबरच्या रात्री मराठे वारा पडला की रिव्हेंजच्या आजूबाजूला घुटमळत असत.
या हालचालींमुळे केग्वीन चिंतीत झाला व जहाजावरील इतरही लोक घाबरले.
केग्वीन ने मुंबईला कळवले की अश्या परिस्थितीत जर मराठ्यांनी रिव्हेंजचे नांगर कापले तर ते आपण जहाज गमावू.
पुढील काही दिवस वारा अनुकूल नसल्याने काही मचव्यांनी रिव्हेंजला ओढून खांदेरी पासून जरा अंतरावर आणून ठेवले.
मराठ्यांना रसद पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी पुन्हा खांदेरीला रसद पुरवठा सुरु केला.
या दरम्यान मुंबईहून ’Fortune‘ नावाचे ३ डोलकाठ्यांचे जहाज आणि २ आणखी शिबाडे नौका दलात सामील झाली.
फोर्च्युनचा कॅप्टन होता स्टीफन अडरटन.
ही जहाजे इंग्रजांनी गोव्याला भाड्याने दिली होती व ती परत येताच त्यांना खांदेरीच्या मोहिमेकरिता रवाना करण्यात आले होते. मुंबईला मराठ्यांचा धोका होताच आणि मराठ्यांचे प्रयत्न पोर्तुगीज मुलुखातून मुंबईत शिरण्याचे असे सुरूच होते.
मुंबईत या वेळी बंदुकीची ५३२ पिंप भरून दारू होती व यातील ३०० पिंप पोर्तुगीझाना विकून टाकावी असे पूर्वी सुरतेने मुंबईला कळवले होते.
परंतु मराठ्यांचा संभाव्य धोका लक्षात ठेवून जर पोर्तुगीजांनी त्यांना मार्ग दिला तर आपली तयारी असावी म्हणून इंग्रज दारू विकण्याचे टाळत होते. तसेच नौका दलातून शक्य असल्यास २ शिबाडे मुंबईला पाठवावी अशीही त्यांनी केग्वीनकडे मागणी केली परंतु केग्विनला ते शक्य नव्हते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
आजचे ऐतिहासिक दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१६_ऑक्टोबर_१६७०
१६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी मराठा फौजेने पुन्हा एकदा मुघलांवर जबर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या खजान्यासहित पुढे सरकले.
मराठ्यांची पिछाडीची फौज मुघलांना गुंगारा देत, मध्येच लढत लुटी पासून दूर घेऊन जात होती.
मराठे - मुघल तह मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोरा-समोरच्या लढाईत मराठ्यांनी मुघली फौजेला पराभूत केले होते.
खुद्द शिवराय जातीने ह्या लढाईमध्ये सामील होते. स्वतःची भूमी गानिमापासून मुक्त करण्यासाठी ते आसुसलेले होते. सुरत लुट सुरक्षितरित्या राजगडाच्या वाटेवर नेण्यात मराठ्यांना यश आलेच. पण इतक्यावर ते थांबले नाहीत. शिवरायांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्रिंबक, औंढा, पट्टा, रवळ्या-जावळ्या हा नाशिक आसपासचा संपूर्ण भाग काबीज करण्याच्या कामगिरीवर पाठवले आणि शिवराय खुद्द करंजा, बेरर ह्या खानदेश भागात शिरले. मुघली भागात त्यांनी प्रचंड लुट चालवली.
थोडक्यात शिवरायांनी मुघलांना पूर्णपणे जमीनदोस्त करण्याच्या दिशेने एक मजबूत पाउल उचलले होते.
आता ते मागे हटणार नव्हते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१६_ऑक्टोबर_१६७४
६ ऑक्टोबर रोजी रामनगरचा आसपासचा परिसर स्वराज्यात दाखल करुन घेतल्या नंतर छत्रपती शिवराय रायगडावर मुक्कामास आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१६_ऑक्टोबर_१६८०
छत्रपती संभाजीराजे यांनी कोकणातील "चाफळ" येथील रामनवमी उत्सवासाठी वार्षिक इनाम चालवण्याचा हुकूम आजच्या दिवशी दिला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
१५ ऑक्टोबर इ.स.१६५९
छत्रपती शिवाजी महाराज आणि पंताजी गोपीनाथ यांची एकांतात भेट झाली..!
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_ऑक्टोबर_१६४३
बहादुरशाह (पहिला) मोगल सम्राटचा जन्म
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_ऑक्टोबर_१६७३
छत्रपती शिवाजी महाराज सातारा येथे मुक्कामी.
मराठ्यांनी वाई जवळचा "पांडवगड" जिंकल्यानंतर, पांडवगडाची पाहणी झाली,
या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या "बाळाजी आवजी" यांचा सातारा छत्रपती शिवरायांनी पालखी देऊन गौरव केला.
पछत्रपती शिवरायांनी इसवी सन १६७३ हा गड स्वराज्यात आणला.
त्यानंतर औरंगजेबाच्या वावटळीत १७०१ मध्ये तो मुघलांकडे गेला, यातून त्याची सुटका केली ती छत्रपती शाहूंनी. मराठ्यांकडील हा वारसा अखेर एप्रिल १८१८ मध्ये मेजर थॅचरने हिसकावून घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_ऑक्टोबर_१७४०
पोर्तुगीज व्हाईसरॉय व पेशवे यांच्यात तह झाला
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_ऑक्टोबर_१८०४
दिल्लीवर यशवंतरावानी बरेच लहान मोठे हल्ले करून पाहिले.
दिनांक १४ ऑक्टोबरला सर्व
फौजेनिशी मोठा हल्ला चढविला.
हे सारे हल्ले वाया गेले आणि नवे हल्ले करावे तर इंग्रज सेनापती लांब लांब मजला मारून दिल्लीनजीक आल्याची खबर यशवंतरावांच्या कानी आली.
तेव्हा त्यांनी दिल्लीचा नाद सोडला, ते यमुना ओलांडून दुआबांत घुसले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_ऑक्टोबर_१८४७
महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होते. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले.
पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले.(जन्म: १८ जानेवारी १७९३)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_ऑक्टोबर_१२४०
रझिया सुलतान – दिल्ली तख्तावर राज्य करणारी पहिली महिला रजिया सुलतान हिचा मृत्यू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१३_ऑक्टोबर_१६७३
मराठ्यांनी वाई नजिकचा पांडवगड जिंकला.
नंतर बंकापूर मोहीम आटोपून बाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला.
बाळाजींचा अशाप्रकारे झालेला परामर्ष व तारीफ सहन न होऊन त्याच्यावर ग्रामण्य उभारून त्याला अक्षत्रिय बनविण्याचा जोराचा प्रयत्न झाला परंतु बाळाजीने त्या सर्वांचे निवारण करून शिवाजी राजांचा सहि राज्यभिषेक करविला.
बाळाजीस शिवरायांनी मुख्यप्रधानपद देण्याचे ठरविले परंतु बाळाजीनी प्रधानपद स्वीकारून एखाद्या भागाचा कारभार पाहून स्वामिसेवा करण्यापेक्षा चिटणविशीच करून मुख्य व सर्वच राज्यसूत्रे आपल्या हाती ठेवून निरभिमानी व निस्वार्थी स्वामिसेवा व देशसेवा करण्याचा हट्ट धरिला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩