Amar kokate Patil
ShareChat
click to see wallet page
@amarkokatepatil
amarkokatepatil
Amar kokate Patil
@amarkokatepatil
||રાખા શ્રી શિવછત્રપતી||🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१६५८ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबला पाठवलेल्या पत्राचे उत्तर औरंगजेबकडून आले. १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही जिंकल्यावर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले. “मोगल मुलुखावर आपण हल्ला करीत नाही; पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत, म्हणून मी हे करीत आहे”, असे त्यास कळविले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१६६५ दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१६७१ ( फाल्गुन वद्य प्रतिपदा, शके १५९२, संवत्सर साधारण, मंगळवार ) दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली! होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवूनच साजरा करीत असत. या वेळेची शिकार होती मेहेरूफ - ए - जंजिरा! याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिऱ्यातच गुंतले होते. जंजिऱ्याच्या आजूबाजूचा दंडाराजापुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम, सिद्धी याकूत व सिद्धी खैरियत यांनीसुद्धा दंडाराजापुरी मराठ्यांकडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्रमार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली. या दिवशी दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१७५५ रघूजी भोसले यांचा मृत्यू (जन्म १६९८) नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी व्यक्ती. इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_फेब्रुवारी_१७५७ इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पत्र पाठवले मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता. १४ फेब्रुवारी इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र:- “आज इंदूरस पोचलो. होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - Htd - इंस्टाग्राम @History. Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६६५ 98 सिंधूत सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले.   Htd - इंस्टाग्राम @History. Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६६५ 98 सिंधूत सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१६३० मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१६५९ छत्रपती शिवरायांसमोर भास्कर गोसावी भिक्षेसाठी हजर 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१६६० राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी "हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे, त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.....☝️ " शिवाजी हिंदुसेनाधिपति " 🚩 म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपतिआहेत. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१६६० शिवाजी राजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली व या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा सर्व माल सोडून दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१७१२ कान्होजी आणि इंग्रजांत तह:- कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१७२३ श्रीमंत पेशवा बाजीराव यांची निजामाशी माळव्यात बोलशा येथे दुसरी भेट झाली. मोगली सुभेदार दयाबहादूर मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्यास विरोध करू लागला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी त्याच्याकडे वकीलही पाठवीला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_फेब्रुवारी_१७३९ कर्नालची लढाई:- पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला, या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - instag Histort_Maharashtra इंस्टाग्राम @History. Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष १३ फेब्रुवारी १६६० राजापूर वखारीचा इंग्रज अधिकारी " हेत्री रेव्हिंगटन " याने शिवरायांना पत्र पाठवले, त्यात तो राजांना उद्देशून लिहितो , शिवाजी हिंदूसेनाधिपति M इंग्रजांचीही धारणा होती की राजे हे हिंदूंचे अधिपति आहेत. instag Histort_Maharashtra इंस्टाग्राम @History. Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष १३ फेब्रुवारी १६६० राजापूर वखारीचा इंग्रज अधिकारी " हेत्री रेव्हिंगटन " याने शिवरायांना पत्र पाठवले, त्यात तो राजांना उद्देशून लिहितो , शिवाजी हिंदूसेनाधिपति M इंग्रजांचीही धारणा होती की राजे हे हिंदूंचे अधिपति आहेत. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 १२ फेब्रुवारी इ.स. १६८९ राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने वजीर झुल्फिकारखान यांस फौज देऊन रायगड ताब्यात घेण्यास सांगितले.
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:31
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_फेब्रुवारी_१६८५ सावंताने छत्रपती संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान संभाजीराजांना समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_फेब्रुवारी_१६८९ औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा एतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_फेब्रुवारी_१७३२ कुलाब्यास सेखोजी आंग्रे-बाजीराव भेट होऊन जंजिरा मोहीमेला सुरुवात. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_फेब्रुवारी_१७४२ नाना फडणीसांचा जन्म सातारा येथे झाला. (मृत्यू: १३ मार्च १८००) बहुदा फुटक्या तळ्याजवळील नातू वाड्यात त्यांचा जन्म झाला असावा. तसे पाहीलेतर नारायणराव याचे खून झाल्या पासून २५ वर्ष अनभिषिक्त सत्तास्थानी ते होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_फेब्रुवारी_१७९४ #महादजी_शिंदे_स्मृतीदिन.......🙏 महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना ''द् ग्रेट मराठा'' असे म्हटले होते. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले. १२ फेब्रुवारी महादजी शिंदे यांचा स्मृतीदिन.... महादजी शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.🙏 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष १२ फेब्रुवारी १६८९ insta@ History Maharashtra फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम राजांची कारकीर्द सुरू झाली आणि १२ अशातच छत्रपती संभाजी राजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा एतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. आजचे ऐतिहासिक दिनविशेष १२ फेब्रुवारी १६८९ insta@ History Maharashtra फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम राजांची कारकीर्द सुरू झाली आणि १२ अशातच छत्रपती संभाजी राजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा एतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_फेब्रुवारी_१६५८ शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता. १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहाजांची निर्मिति सुरु झाली. सीद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि डच यांच्यापासून स्वराज्याचे रक्षण करने हे मराठा आरमाराच मुख्य काम पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर. आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखि बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती व अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_फेब्रुवारी_१६६० औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_फेब्रुवारी_१७५६ तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. १७५६ साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_फेब्रुवारी_१७६० सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने उदगीर येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू निजामाचा दारूण पराभव केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - @ इस्टाग्राम @History  Maharashira इंस्टाग्राम @History. Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६५८ ११ शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला , राजांनी जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना घेऊन जहाजांची निर्मिति सुरु ' झाली. @ इस्टाग्राम @History  Maharashira इंस्टाग्राम @History. Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६५८ ११ शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला , राजांनी जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना घेऊन जहाजांची निर्मिति सुरु ' झाली. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_फेब्रुवारी_१६५९ शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर नव्‍हते, पोर्तुगीजांनी फक्‍त व्‍यापार-उदीम करावा. राज्‍यशकट चालविण्‍यासाठी त्‍याची आवश्‍यकता आहेच पण त्‍यांनी स्‍थानिकांच्‍या राजकारणात लुडबूड करू नये, एवढीच त्‍यांची रास्‍त अपेक्षा होती. शिवाजीराजांच्‍या वाढत्‍या प्रभावाचा पोर्तुगीजांनी धसका घेतला आणि शिवाजी महाराजांशी तह करून त्‍यांनी मैत्रीचा हात पुढे केला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_फेब्रुवारी_१६६५ सिद्दी कासीम व सिद्दी खैरात यांनी दंडाराजपुरी मराठ्यांकडून जिंकली, या दिवशी होळी पौर्णिमा होती. १६५९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण शिवरायांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडाराजपुरी आरमारी गलबतांचा काफ़िला सज्ज ठेवला होता. १६७१ च्या सुमारास राजांनी पुढे पुन्हा मोहीम हातात घेतली. मराठी फौज किल्ल्यावर तैनात होती, सिद्दी कासीम समुद्रमार्गे तर सिद्दी खैरात जमिनीमार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीमची योजना होती. होळी असल्याने गस्तीच्या सैनिकांशिवाय किल्ल्यातील फौज बेसावध होती व कासीमच्या नावा किल्ल्याच्या किनारी लागताच क्षणी खैरात ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हल्ला थोपवण्यातच गेली व समुद्रमार्गे होणाऱ्या हल्ल्याकडे दुर्लक्ष झाले, तटावर शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्यावर आली आणि एकच कल्लोळ माजला दरम्यान किल्ल्यावरील दारुगोळा कोठारात स्फोट झाला व प्रचंड धूर उसळला. ललकारी गुंजली परत लढाईला तोंड फुटले मराठे सैनिक कमी पडू लागले आणि शेवटी दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून गेली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_फेब्रुवारी_१६७० महाराजांच्या आरमारी प्रभावामुळे पोर्तुगीज झुकले! महाराज फार धोरणी होते. 'ज्याचा समुद्र त्याचे आरमार ' हे त्यांनी फार आधीच ओळखले होते, म्हणून आरमार वाढीसाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, उंदेरी असे किल्ले आरमारी युद्धासाठी सुसज्ज केले. मात्र पश्चिम किनारपट्टीत पोर्तुगीज आणि सिद्धी अडथळे आणत होते, तहामुळे पोर्तुगीज झुकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_फेब्रुवारी_१७७१ महादजी शिंदे यांचा दिल्लीवर कब्जा. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_फेब्रुवारी_१७८२ पुण्यात सवाई माधवराव पेशवे यांचा विवाहसोहळा सम्पन्न 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_फेब्रुवारी_१८१८ किल्ले अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६५९ 0 शिवराय आणि पोर्तुगीज यांचे विळ्या -भोपळ्याचे वैर नव्हते , पोर्तुगीजांनी फक्त व्यापार उदीम करावा. مر وك  W INSTAGRAM @HISTORY MAHARASHTRA पण पोर्तुगिजानी स्थानिकांच्या राजकारणात लुडबूड करू नये, एवढीच त्यांची रास्त अपेक्षा होती. राजांच्या वाढत्या प्रभावाचा पोर्तुगीजांनी धसका घेतला आणि राजांशी तह करून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. आजचे ऐतिहासिक दिनविशेष फेब्रुवारी १६५९ 0 शिवराय आणि पोर्तुगीज यांचे विळ्या -भोपळ्याचे वैर नव्हते , पोर्तुगीजांनी फक्त व्यापार उदीम करावा. مر وك  W INSTAGRAM @HISTORY MAHARASHTRA पण पोर्तुगिजानी स्थानिकांच्या राजकारणात लुडबूड करू नये, एवढीच त्यांची रास्त अपेक्षा होती. राजांच्या वाढत्या प्रभावाचा पोर्तुगीजांनी धसका घेतला आणि राजांशी तह करून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९ फेब्रुवारी_१६५८ तुंग-तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत आला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला, नंतर त्याने आपले सैन्य तुंग व तिकोना गडांकडे वळविला. इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. नंतर अखंड प्रयत्नांतून इ.स. १६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी तुंग - तिकोना किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_फेब्रुवारी_१६८० मुंबईकर इंग्रज यांनी त्रस्त होऊन सुरतेला पत्र पाठवले ज्यात सिद्दी त्यांना खूप त्रास देतोय व त्यांचा लोकांना पगाराची लालूच दाखवून फोडण्याचा प्रयत्न करतोय. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_फेब्रुवारी_१६८८ छत्रपती संभाजी महाराजांच्या ३०० घोडदळ,७०० पायदळ ह्याने पुल्लीमल्ली घेण्याचा प्रयत्न. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_फेब्रुवारी_१६८९ मुघल सरदार "मुकर्रबखान" याने "छत्रपती संभाजी महाराज" यांना कैद केले. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी रायगडावर पोहोचताच अवघ्या ८ दिवसाताच राजाराम महाराजांना नजरकैदेतून सोडून किल्ले रायगडावर "महाराणी येसूबाई" व किल्ल्यावरील मराठी सरदारांच्या सल्ल्याने राजाराम महाराजांचे "मंचकारोहण" झाले, स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांचा राज्याभिषेक दिन. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_फेब्रुवारी_१७५७ प्लासीचा तह प्लासीच्या लढाईपासून इंग्रजांच्या राज्याचा पाया हिंदूस्थानात रोवला गेला असे म्हणतात. सिराजउदौला अनेक गोष्टींमुळे पेचात सापडलेला होता. याचा फायदा घेऊन क्लाईव्ह ने त्याच्याशी ९ फेब्रुवारी १७५७ रोजी तह करून घेतला. या तहानुसार सिराजउदौला ने मागील युद्धातले इंग्रजांचे नुकसान भरून दिले.तसेच तहात यानंतर सर्वांनी तटस्थ रहावे असे ठरले.परंतू इंग्रजांनी प्रामाणिकपणा न दाखविता फ्रेंचांविरोधात आघाडी उघडली व सिराजलाच मदत मागितली. क्लाईव्हने चंद्रनगरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - History_ Maharashtra @ आजचे ऐतिदासिक दितविशेष ०९ फेब्रुवारी २६५८ मावळ प्रांतातील तुंग आणि तिकोना गड अखंड प्रयत्नांतून इःस. १६५८ मध्ये शिवाजीराजांनी ` जिंकुन परत स्वराज्यात आणले. History_ Maharashtra @ आजचे ऐतिदासिक दितविशेष ०९ फेब्रुवारी २६५८ मावळ प्रांतातील तुंग आणि तिकोना गड अखंड प्रयत्नांतून इःस. १६५८ मध्ये शिवाजीराजांनी ` जिंकुन परत स्वराज्यात आणले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 ८ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वातील पहिली सागर मोहीम सिंधुसागर ते कारवारच्या दक्षिणेला असणाऱ्या बसनुर या शहराच्या दिशेने निघाली.
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:34
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष #८_फेब्रुवारी_१६६५ 🌊छत्रपती शिवाजी महाराजांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम🌊 शिवाजी महाराजांनी पहिली आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असणाऱ्या बसरूर (बसनूर) या श्रीमंत शहराच्या दिशेने काढली. भारताच्या हजारो वर्षांच्या आरमारी परंपरेस खंड पडलेला असताना, अनेक धार्मिक चालीरितींचा ऊत आलेला असताना आणि लढाऊ आरमार बाळगण्याची पोर्तुगीज-इंग्रज-फ्रेंच-डच-सिद्दी यांच्याशिवाय अन्य कोणासही परवानगी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दि.२४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याण-भिवंडी काबीज करून तेथे मराठा आरमाराची (भारतीय आरमाराची) मुहूर्तमेढ रोवली. या विलक्षण घटनेनंतर अवघ्या ८ वर्षांमध्ये समुद्रावरील प्रबळ अशा पोर्तुगीज व डचांच्या विरोधात तसेच कर्नाटक प्रांतातील प्रबळ आदिलशाही सत्तेविरोधात शिवरायांनी आरमारी मोहीम काढली. आपल्या आरमारी अधिकाऱ्यांना व सेनेला पाठवून त्यांनी हि मोहीम पूर्ण केली असती. मात्र एवढी मोठी जोखीम पत्करून शिवरायांनी हि मोहीम काढली व शत्रूने कोणतीही हालचाल करायच्या आत ती पूर्ण देखील केली. या बसरूर मोहिमेचे फार मोठे पडसाद मराठा व भारतीय समुद्री इतिहासावर पडले. त्यामुळे समुद्रावर मराठ्यांची सत्ता निर्माण होऊ शकते हा दृढ आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाला. आणि भविष्यात मराठा आरमाराने आपल्या यशाची पताका हिंदी महासागरावर फडकवत ठेवली. स्वतःचे आरमार उभारल्या नंतर या मोहिमेसाठी मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बसरूरकडे निघाली आणि स्वातंग छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची ही पहिली सागरी मोहीम होती. " अशा श्रीशिवछत्रपतींच्या बसरूर मोहिमेची आठवण आपण सर्व शिवप्रेमींनी सतत मनाशी ठेवली पाहिजे. " #जय_शिवराय #मराठा_आरमार #बसरूर_मोहीम 🚩#८_फेब्रुवारी_१७१४ "सरखेल कान्होजी आंग्रे" आणि "छत्रपती शाहू महाराज" यांच्यात वळवंड, लोणावळा येथे तह. १७०७ मध्ये मराठेशाहित (कोल्हापूर-सातारा गादी) फूट पडल्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्र कारभार चालू केला. पुढे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादीसोबत तह केला. 🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - 1 @History Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष ०८ फेब्रुवारी २६६५ राजे शिवाजी महाराजांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम अर्थातच शिवाजीराजांनी पहिली आरगारी स्वारी गो्मंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असणाऱ्या बसरूर (बसनूर ) या श्री्मंत शहराच्या दिशेने काढली. 1 @History Maharashtra आजचे ऐतिदासिक दितविशेष ०८ फेब्रुवारी २६६५ राजे शिवाजी महाराजांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम अर्थातच शिवाजीराजांनी पहिली आरगारी स्वारी गो्मंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असणाऱ्या बसरूर (बसनूर ) या श्री्मंत शहराच्या दिशेने काढली. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 ७ फेब्रुवारी इ.स.१६५८ तळकोकणातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य असलेला विजापुरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरप मराठा फौजेने हल्ला करून स्वराज्यात दाखल केला.
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:31