Amar kokate Patil
ShareChat
click to see wallet page
@amarkokatepatil
amarkokatepatil
Amar kokate Patil
@amarkokatepatil
||રાખા શ્રી શિવછત્રપતી||🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_मार्च_१६४९ शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली, मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_मार्च_१७२३ खानदेशात लांबकानी येथे निजामाच्या फौजांशी युद्ध करून मराठ्यांच्या फौजासह बाजीराव माळव्यात गेले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_मार्च_१७६० पानिपत मोहीमेत अब्दालीच्या सैन्यापेक्षाही पेक्षाही मराठ्यांचा खरा पराभव हा "पाण्याने" केला. दिनांक १४ मार्च सन १७६० रोजी पडदुर येथून निघून सदाशिवराव भाऊसाहेब अत्यंत वेगाने उत्तरेत सरकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_मार्च_१८१८ घणगड आणि कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला. ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - f Ο insta @History_Maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष X २४ मार्च १६४ ९ | X शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले . ह्या पत्रानेच विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर फर्जंद शहाजीराजांची सुटका झाली . - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_मार्च_१६६५ (चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू , सोमवार) स्वराज्य संकटात, मोगली फौजांचा स्वराज्यात धुमाकुळ. संकटाची मालिका सुरू झाली होती.. कोटीचंडी यज्ञ करून आलेल्या मिर्झाराजे जयसिंग यांच्या परवानगीनंतर मिर्झाराजाच्या फौजानी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली पुरंदरला वेढा टाकला ! आणि सुरू झाला मऱ्हाठयांचा एल्गार ! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_मार्च_१७६० #अब्दालीशी_तह सुभेदार मल्हारराव होळकर कर्तबगारीने शुन्यातून झंजावात उभे करणारा पुरुष. ज्या काळात स्त्रीयांना गोशाशिवाय शिवाय घराबाहेर पडणे मुश्किल त्या काळात अहिल्यादेवींना शिक्षण-राजनीति-युद्धनीतिचे संस्कार करत त्यांना घडवणारा द्रष्टा पुरुष. संपुर्ण आयुष्य लढाया करण्यात गेले. राजकीय मुत्सद्देगिरी कोणालाही चकीत करणारी. वयाच्या पासष्ठाव्या वर्षीही इंग्रजांशीही विजयी झुंज दिली असा हा योद्धा. पानिपत ही एक शोकांतिका. पण १३ मार्च १७६० साली अब्दालीशी तह करुन त्याला परत वाटेला लावण्याचे मुत्सद्दी कार्य त्यांनी केले होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_मार्च_१८०० नाना फडणवीस यांचा मृत्यू (जन्म १२ फेब्रुवारी १७४२) पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिहासिक दिनविशेष १३ मार्च १६६५ स्वराज्य संकटात, मोगली फौजांचा स्वराज्यात धुमाकुळ History Maharashtra insta कोटीचंडी यज्ञ करून आलेल्या मिर्झाराजे जयसिंग यांच्या फौजानी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली पुरंदरला वेढा टाकला आणि सुरू झाला मऱ्हाठयांचा एल्गार आजचे ऐतिहासिक दिनविशेष १३ मार्च १६६५ स्वराज्य संकटात, मोगली फौजांचा स्वराज्यात धुमाकुळ History Maharashtra insta कोटीचंडी यज्ञ करून आलेल्या मिर्झाराजे जयसिंग यांच्या फौजानी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली पुरंदरला वेढा टाकला आणि सुरू झाला मऱ्हाठयांचा एल्गार - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 ⚔️ #११_मार्च_१६८९ #छत्रपति_संभाजी_महाराज_बलिदान_दिवस🙏 शिवपुत्र शंभूराजे म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपति, संभाजी महाराजांची वढु - तूळापूर संगमावर औरंगजेबाकरवी अमानुष हत्या करण्यात आली. फेब्रुवारी १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कलश यांना संगमेश्वर येथे कैद केले गेले. बहादुर गड़ येथे त्यांच्यावर भयानक आणि असंख्य हाल केले. ....आणि अखेरीस ४० दिवसांच्या अन्वित अत्याचारानंतर भिमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमानजिक औरंगजेबाच्या जल्लादांनी शंभुराजांचे मस्तक निर्ममपणे कलम केले, घात झाला 😔 आता मराठे घाबरतील, शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं...पण घडलं भलतचं....☝ शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला...☝ राजारामराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरंग्यास टक्कर देवू लागले...🏇 दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले...🏇 या काळात राजारामराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत कारभाऱ्यांची साथ लाभली...🔥 ⚔️ साम्राज्य विस्तारले ⚔️ शिवपुत्र छत्रपती शंभूराजे यांना विनम्र अभिवादन 🚩 #जगदंब 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_मार्च_१७९५ मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी निजामाच्या बलाढ्य सैन्य शक्तीचा पराभव केला. सवाई माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झालेला ही लढाई झाली. येथील युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने ८० हजार सैन्य होते तर निजामाचे १,३०,००० सैन्य रणभूमीमध्ये होते. या रणसंग्राममध्ये जवळपास ४००० सैनिक मारले गेले. गावच्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या समरणार्थ घडवलेल्या वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात. एवढा मोठा विजय यानंतर झाला नाही म्हणूनच या युद्धाला मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय असे संबोधले गेले. #११_मार्च_१८१८ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला. ४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - insta @History] Maharashtra आजचे ऐतिदासिक दिनविशेष 22 Ha 2800 शिवपुत्र शंभूराजे म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे  छत्रपति, ढुसरे ` संभाजी महाराजांची वढु  तूळापूर येथे अनेक दिवसांच्या अत्याचारानंतर भिमा-्भामा ईंद्रायणीच्या त्रिवेणी संगमानजिक औरंगजेबाच्या जल्लादांकडून अमानुष हत्या কনযান 3ালী insta @History] Maharashtra आजचे ऐतिदासिक दिनविशेष 22 Ha 2800 शिवपुत्र शंभूराजे म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे  छत्रपति, ढुसरे ` संभाजी महाराजांची वढु  तूळापूर येथे अनेक दिवसांच्या अत्याचारानंतर भिमा-्भामा ईंद्रायणीच्या त्रिवेणी संगमानजिक औरंगजेबाच्या जल्लादांकडून अमानुष हत्या কনযান 3ালী - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_मार्च_१६४९ ( चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५७१, संवत्सर विरोधी, शनिवार ) थोरले महाराज शहाजीराजे अटकेत असताना त्यांचा बंदोबस्त आता विजापुरी! २५ जुलै १६४८ रोजी शहाजीराजांना अटक करण्यात आली होती. आजच्या दिवशी अफझल, शहाजी राजांसोबत कारांजची लूट घेऊन विजपुरात प्रवेश करत होता. शहाजीराजांना घेऊन अफजलखान विजापुरात प्रवेशला, यावेळी जिंजीची अप्पार लूट एकूण ८६ हत्तींवर लादून त्याने विजापुरात नेली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_मार्च_१६५९ ( फाल्गुन वद्य त्रयोदशी, शके १५८०, संवत्सर विकारी नाम, गुरुवार ) सिवापट्टण गाव वसवले! आजच्या दिवशी महाराज राजगडावरून सिवापट्टण येथे आल्याची नोंद आहे. याच दिवशी हे गाव वसविण्याचे कार्य पूर्ण झाले. तसेच वर्ष प्रतिपदा येथेच साजरी करण्याचे महाराजांनी ठरविले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_मार्च_१६७३ कोंडाजी फर्जंद यांनी जिंकलेला पन्हाळगड पाहण्यासाठी श्रीमान रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना वाटेत शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास भवानी देवीची शोडषोपचारे पूजा. महाराज किल्ले प्रतापगडावर मुक्कामी...!!! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_मार्च_१६७७ ( फाल्गुन वद्य प्रतिपदा, शके १५९८, संवत्सर नल, शनिवार ) ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिण दिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_मार्च_१६७९ शिवाजी महाराजांचे सरदार थोरले आनंदराव यांनी विजापूरकरांकडून बाळापूर जिंकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_मार्च_१६८९ स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र शंभूराजे यांच्या घातपाताची बातमी रायगडावर आधीच येऊन पोचली, अशुभ संकेत मिळण्याचे अंदाज बांधले जात होते, तुळापूरच्या इंद्रायणी भीमा संगमावरून मुघली गोटातून काहीतरी अशुभ वार्ता येण्याचे संकेत दक्खन भूमीला सतावून सोडत होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१०_मार्च_१७०४ औरंगजेबाने तोरणा उर्फ प्रचंडगड जिंकला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - 1 History Maharashtra आजचे ऐतिदासिक दिनविशेष 20 Ha 2803 कोंडाजी फर्जंदानी जिंकलेला पन्हाळगड पाहण्यासाठी रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना शिवाजीराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास आई भवानी देवीची पूजा करण्यात आली 1 History Maharashtra आजचे ऐतिदासिक दिनविशेष 20 Ha 2803 कोंडाजी फर्जंदानी जिंकलेला पन्हाळगड पाहण्यासाठी रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना शिवाजीराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास आई भवानी देवीची पूजा करण्यात आली - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मार्च_१६६८ छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे औरंगजेबाने शिवरायांना नाईलाजाने "राजा" ही पदवी बहाल केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मार्च_१६७३ "कोंडाजी फर्जद" यांनी जिंकलेला "किल्ले पन्हाळा" पाहण्यासाठी "शिवराय" किल्ले रायगडावरून सरनोबत प्रतापराव गुजर यांच्या समवेत निघाले. पन्हाळगड कोंडाजीनी काबीज केल्याची खबर शिवाजी महाराजांना दि.९ मार्च १६७३ चैत्र पौर्णिमेदिवशी रायगडावर समजली. ज्या घोडेस्वाराने दौडत येऊन रायगडावर महाराजांना ही खबर दिली, त्या घोडेस्वाराला महाराजांनी स्वत:च्या हाताने साखरेची चिमूट देऊन कौतुक केले. महाराज ताबडतोब रायगडावरून पन्हाळगडाकडे निघाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मार्च_१७४७ छत्रपती शाहूमहाराजांनी ( राजमंडळातील काही सदस्य व काही सरदार यांच्या ) विरोधामुळे ९ मार्च १७४७ रोजी बाळाजी बाजीराव ( नानासाहेब ) यांना पेशवा पदावरून दूर केले. त्यामुळे ९ मार्च १७४७ ते १३ एप्रिल १७४७ पेशवेपद रिक्त. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - insta @History Maharashtra fl इंस्टाग्राम @history. maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष मार्च १६७३ 0 पन्हाळगड कोंडाजीनी काबीज केल्याची खबर राजांना चैत्र पौर्णिमेदिवशी रायगडावर समजली. पन्हाळगडासाठी शिवराय किल्ले रायगडावरून निघाले. insta @History Maharashtra fl इंस्टाग्राम @history. maharashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष मार्च १६७३ 0 पन्हाळगड कोंडाजीनी काबीज केल्याची खबर राजांना चैत्र पौर्णिमेदिवशी रायगडावर समजली. पन्हाळगडासाठी शिवराय किल्ले रायगडावरून निघाले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 ७ मार्च इ.स.१६८० छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या भेटीनंतर महाराज रायगडावर परतले आणि राजाराम महाराजांची मुंज करून घेतली.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #६_मार्च_१६७३ कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली. कोंडाजी फर्जंद यांनी साठ मावळ्यांसह पन्हाळा घेतला. महाराज निहायत खूश झाले कोंडाजी फर्जंदांची अस्मानी फत्ते झाली. मोहिमेसाठी २००० तरी याने मागणं अपेक्षित होतं पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे! किती सैन्य मागावं याने? कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं राजे, ३०० गडी द्या फक्त...!! राजे अचंबित झाले! कोंडाजी फक्त ३००? पुरतील ? कोंडाजी म्हणला, राजे, ६० च पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३००. राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं, कोंडाजी खुश झाले😀 किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत आणि नेमकी माहिती कळली. दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके१५९५, ६ मार्च १६७३....!!!!!! कोंडाजी ६० जण घेऊन पुढं गेले आणि बोलले गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या🔥 त्यानं सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते तो नियोजनाचा भाग होता. सर्वजण गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले. तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले, पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते. इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. कील्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं. किल्लेदार पडला?!!! सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला. पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती तो किल्ला अवघ्या ६० जणांनी घेतला☝ गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले🚩 तोफांना बत्त्या दिल्या🔥 एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला🏇 तो किल्ल्यावर गेला तो दिवस☀️ चैत्र शु.प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा😀 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - # skenm @HisToRY MAHARASHTRA आजचे ऐतिहासिक दिनविशेष &#|&9&03|iusiu insudgan कोंडाजी फर्जंद यांनी साठ मावळ्यांसह पन्हाळा घेतला. महाराज निहायत खूश झाले, फर्जंदांची आस्मानी फत्ते झाली, गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले. # skenm @HisToRY MAHARASHTRA आजचे ऐतिहासिक दिनविशेष &#|&9&03|iusiu insudgan कोंडाजी फर्जंद यांनी साठ मावळ्यांसह पन्हाळा घेतला. महाराज निहायत खूश झाले, फर्जंदांची आस्मानी फत्ते झाली, गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_मार्च_१६५९ कोकणामध्ये शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी राजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_मार्च_१६६६ औरंगजेबाच्या भेटीसाठी महाराज शिवाजीराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत. आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! आपल्या नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना बरोबर घेऊन दि. ५ मार्च १६६६ या दिवशी शिवाजीराजांनी राजगडावरून आग्ऱ्यास जाण्यासाठी गडाबाहेर पाऊल टाकले. त्यांचेबरोबर फक्त तीनशे सैनिक होते. मिर्झाराजांनी आपला एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर दिला. त्याचे नाव तेजसिंह कछवा. औरंगजेबाचाही एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर देण्यात आलेला होता. त्याचे नाव गाझीबेग तवझुक. महाराजांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने एक लाख रुपये मंजूर केले होते. शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजासह !!! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_मार्च_१६७३ कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली, ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता☝️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - आजचे ऐतिदासिक दितविशेष ५मार्च२६६६ Instagram @HictoryMaharashtra औरंगजेबाच्या भेटीसाठी महाराज शिवाजीराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे , सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत. आजचे ऐतिदासिक दितविशेष ५मार्च२६६६ Instagram @HictoryMaharashtra औरंगजेबाच्या भेटीसाठी महाराज शिवाजीराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे , सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #४_मार्च_१६६० सिद्दी जौहरने पन्हाळा गराडला, शिवराय वेढ्याच्या पेचात सापडले. स्वतः शिवाजीराजे पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते. जोवर शिवराय पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती महाराज आखणार होते. कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते. अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा जौहरने घट्ट आवळला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_मार्च_१६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी कलबरगा परगण्यातील हिरापूर वर छापा टाकला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #४_मार्च_१६७७ दक्षिण दिग्विजय मोहीम🏇 छत्रपती शिवाजी महाराज हैद्राबाद शहरातील गोवळकोंडा किल्ल्याजवळ दाखल. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #४_मार्च_१८१८ दक्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी बहुतेक सर्व किल्यांची तोडफोड केली, त्यात विसापूरचा किल्ला कर्नल पर्थारणे तोफा डागून उध्वस्त केला. आज किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे . 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - [ पन History Maharashtral इस्टाग्राम आजचे ऐतिहासिक दिनविशेष ४ मार्च १६६० सिद्दी जौहरने पन्हाळा गराडला , शिवराय वेढ्याच्या पेचात अडकले. अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवराय अडकले आणि गडाचा वेढा जौहरने घट्ट आवळला. [ पन History Maharashtral इस्टाग्राम आजचे ऐतिहासिक दिनविशेष ४ मार्च १६६० सिद्दी जौहरने पन्हाळा गराडला , शिवराय वेढ्याच्या पेचात अडकले. अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवराय अडकले आणि गडाचा वेढा जौहरने घट्ट आवळला. - ShareChat
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२_मार्च_१६६० अफझल वधानंतर राजांनी कोल्हापूर, सांगली , कराड ताब्यात घेऊन मिरजेच्या वेढ्यावर चालून गेले पण सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा तसाच ठेवून किल्ले पन्हाळगडावर स्थीर झाले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२_मार्च_१६८७ औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता, तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२_मार्च_१७९५ खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड,तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२_मार्च_१८१८ दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी सिंहग़डावर तोफा डागायला सुरवात केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🙏शिवदिनविशेष📜 - इंस्टाग्राम @HISTORY MAHARASHTRA आजचे ऐतिहासिक दिनविशेष २ मार्च १६६० अफझल वधानंतर राजांनी कोल्हापूर, सांगली कराड ताब्यात घेऊन मिरजेच्या वेढ्यावर चालून गेले पण सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा तसाच ठेवून किल्ले पन्हाळगडावर स्थीर झाले. इंस्टाग्राम @HISTORY MAHARASHTRA आजचे ऐतिहासिक दिनविशेष २ मार्च १६६० अफझल वधानंतर राजांनी कोल्हापूर, सांगली कराड ताब्यात घेऊन मिरजेच्या वेढ्यावर चालून गेले पण सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा तसाच ठेवून किल्ले पन्हाळगडावर स्थीर झाले. - ShareChat