#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_मे_१६६६
#शिवशाहीतील_एक_कलाटणी_देणारे_प्रकरण☝
#शिवाजी_महाराजांची_आग्रा_भेट☝
शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते.
पुरंदरच्या तहानुसार १६६६ रोजी औरंगजेबाच्या
५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत.
पुरंदरच्या तहानुसार महाराजांना औरंगजेबाची आग्रा येथे जाऊन भेट घ्यावयाची होती.
औरंगजेबाची भेट घेणे म्हणजे साक्षात मृत्युच्या दाढेत जाण्यासारखे होते ते देखील नर्मदे पलीकडे स्वराज्यापासून कित्येक मैल दूर पर मुलखात.
तिथे आपले असे कोणीच नाही.
आप्त स्वकीयांपेक्षा शत्रुंचाच भरणा जास्त.
पावलो पावली घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यात महाराजांना सोबत फौजफाटा नेण्याची अनुमती नाही.
सोबत जातील तर ९ वर्षाचे संभाजी राजे आणी
ठराविक मंडळी.
महाराजांसाठी हा प्रवास जीवावर बेतणाराच होता.
नियतीने दिलेले हे आव्हान देखील महाराजांनी
समर्थपणे पेलले.
छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा औरंग्या भेटीस
आग्ऱ्यास गेले होते त्यावेळी औरंग्या हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने, धाडसाने, शौर्याने, गनिमी काव्याने आणि राजकीय दुरदृष्टीने इतका भयभीत झाला होता की औरंग्याने आपल्या तख्ताच्या आजूबाजुला काही सरदारांना तलवारीनिशी सज्ज केले होते.
औरंगजेब इतका दहशितीखाली होता की शिवरायांना भितभीत त्याने आपल्या तख्ताची उंची सुध्दा वाढवून घेतली होती कहर तो काय औरंग्या स्वतःच्या दरबारात सुध्दा चिलखत घालून बसला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम आणि युध्दनितीच अशी होती की शत्रू स्वतःच्या भागात सुध्दा भयभीत असत.
त्याच दिवशी हा दख्खनचा ढाण्यावाघ विजेसारखा कडाडला सर्व दरबार गप्पगार झाला तो प्रसंग
पुढील प्रमाणे
"खामोश.. कुंवर रामसिंह..
खामोश......!!!!
सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना..
या उपरी आमच्या रक्ताने न्हाऊ
घातलेल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजी राजा तसूभर
हि कसूर करणार नाही....☝"
साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे
राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या
इतिहासाने या आधी कधी पाहिला नव्हता
आणि या पुढे हि पाहणार नाही.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#१०_मे_१६३५
थोरले महाराज साहेब "शहाजीराजे भोसले" यांचं वार्षिक उत्पन्न २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र.
🚩🏇🚩 #१०_मे_१६५५
जावळीमधील फितुरी संपविण्यासाठी शिवराय स्वतः जावळीमध्ये दाखल.
🚩🏇🚩 #१०_मे_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली.
#रायगडावरचा_शेवटचा_रणसंग्राम.
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला.
कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता.
या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान.
आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता.
मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते, पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला.
वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग.
रायगड होरपळून गेला.
शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला.
भयंकर अवस्था झाली होती रायगडाची.
प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती.
ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी.
तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे.
कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला.
त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले.
ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली.
रायगडावर सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं.
सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज.
राजधानी ची अवस्था पाहून काळीज हालून गेलं.
४-१० मे असे ६ दिवस ही कारवाई सुरु होती.
अखेर १० मे रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१५४०
#महाराणा_प्रताप_यांचा_जन्म
कोटि कोटि नमन " हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह " यांच्या जयंतीनिमित्त,
देशाचा अभिमान, सन्मान आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्या भारतमातेचा वीर पुत्र 🙏
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा.
उदयसिंहाचा पुत्र.
उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १५७२ रोजी महाराणा केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१६६०
शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला.
शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते, तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती आणि ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१६७४
"राज्याभिषेक" होण्याआगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१६७४
महाराजांनी आपल्या लष्कराच्या लोकांस एक अतिशय उत्तम पत्र लिहले✍️
रयतेशी किती जबाबदारी ने वागा अन एकूण शिस्त पाळा ते महाराज लिहितात✍️
"जर रयतेस उपद्रव होईल असे वागाल तर लोक बोलतील, या पेक्षा मोगल बरे !
मग मराठ्यांची इज्जत राहणार नाही..!
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१६८१
दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#९_मे_१६८२
एप्रिल महिन्यात मुंबईकरांनी सिद्दीला येऊ दिले नाही परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे ९ मे रोजी सिद्दीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडल. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी मुंबईकरांना कळवले कि,
'तुमच्या मदतीला आता सिद्दी ठेवला असल्याने छत्रपती संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही'.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१५४०
#महाराणा_प्रताप_यांचा_जन्म
कोटि कोटि नमन " हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह " यांच्या जयंतीनिमित्त,
देशाचा अभिमान, सन्मान आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्या भारतमातेचा वीर पुत्र 🙏
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा.
उदयसिंहाचा पुत्र.
उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १५७२ रोजी महाराणा केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१६६०
शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला.
शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते, तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती आणि ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१६७४
"राज्याभिषेक" होण्याआगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१६७४
महाराजांनी आपल्या लष्कराच्या लोकांस एक अतिशय उत्तम पत्र लिहले✍️
रयतेशी किती जबाबदारी ने वागा अन एकूण शिस्त पाळा ते महाराज लिहितात✍️
"जर रयतेस उपद्रव होईल असे वागाल तर लोक बोलतील, या पेक्षा मोगल बरे !
मग मराठ्यांची इज्जत राहणार नाही..!
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१६८१
दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#९_मे_१६८२
एप्रिल महिन्यात मुंबईकरांनी सिद्दीला येऊ दिले नाही परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे ९ मे रोजी सिद्दीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडल. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी मुंबईकरांना कळवले कि,
'तुमच्या मदतीला आता सिद्दी ठेवला असल्याने छत्रपती संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही'.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #🙏शिवदिनविशेष📜
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#७_मे_१६६०
शाहिस्तेखान पुण्याच्या दिशेने सरकत असल्याची बातमी हेरांनी दिली होती.
खानाला त्रास देण्यासाठी एक तुकडी रवाना होती.
पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली.
यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं
शिवराय या वेळेस जौहरच्या वेढ्यात अडकले असताना हे घडत होते हे विशेष.
🚩🏇🚩 #७_मे_१६७२
विलायती वकीलांशी इंग्रजीत चर्चा-
इ.स.१६७२ मध्ये शिवाजीराजांनी संभाजीराजांना जाणीवपूर्वक परकीय वकीलांशी चर्चा करण्याचे अधिकार दिले.
वयाच्या सोळाव्या वर्षापासून संभाजीराजांना दरबारातील शिष्टाचाराचा व परकीय दूतांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला.
🚩🏇🚩 #७_मे_१६८०
बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.
🚩🏇🚩 #७_मे_१६८०
छत्रपती संभाजीराजेंच्या राजाभिषेकपूर्वी म्हणजेच इ.स. १६८० वैशाख वद्य ४ शके १६०२ च्या मुरगुडच्या रूद्राप्पा देसाईला पाठविलेल्या पत्रावर शंभूराजांची शोडशावली राजमुद्रा प्रथम आढळली.
भोसले घराण्यातील हि शंभूराजांची राजमुद्रा छत्रपती शिवरायांच्या मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे.
उभी पिंपळपाणी आकाराची सात ओळींची षोडशबुरजी दुव्सयती अशी हि राजमुद्रा स्वताची अस्मिता व रूबाब व्यक्त करते.
राजमुद्रेप्रमाणे त्यांची मर्यादा पण शिवरायांच्या मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे.
🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#५_मे_१६५८
विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड शिवाजी राजांनी जिंकली.
🚩🏇🏻🚩 #५_मे_१६६३
गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.
१६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती.
१६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते.
तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.
🚩🏇🏻🚩 #५_मे_१६८२
छत्रपती संभाजी महाराजांनी सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली.
त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल १६८२ रोजी कळवीले की ✍️
कारवार जवळील अंजदीव बेटावर छत्रपती संभाजी राजे किल्ला बांधणार यामुळे गोव्यास धोका उत्पन्न होणार त्यामुळे अंजदीव बेट छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात जाण्याची भीती विजरईला वाटू लागली व आजच्या दिवशी त्याने अंजदीव बेटाचा ताबा घेतला.
🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मे_१६४९
#राजा_छत्रसाल_बुंदेला_यांच्या_जयंतीनिमित्त
#त्यांना_त्रिवार_सलाम.
🔥
"||शिवाजीराजे पिछे हुआ,बुंदेला बलवान||
||प्राणनाथ का शिष्य यह, छत्रसाल महान||"
🔥
आजही बुंदेलखंडात महाराज छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीवर ही गुरू शिष्याची महत्त्व दुगोच्चार करणारं कवन पूर्ण जगाला प्रेरणा देत विराजमान आहे.
"शिवराय पाठीशी होते म्हणून मी आज एवढा बलवान झालो"
असा या कवनाचा अर्थ.
आजही बुंदेलखंडात छत्रपती शिवाजी महाराज
यांचं नाव आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं☝
किती अभिमानाची गोष्ट ही आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी. शिवरायांना छत्रसाल यांनी आपल्या गुरुस्थानी
मानले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मे_१६७७
दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी 'तिरुपती' येथे भेट.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मे_१७३९
#वसई_विजयोत्सव_दिन..
वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला.
खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु
असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसई किल्ला
जिंकून संपवला. मराठ्यांतर्फे" किल्ल्याचा पूर्ण ताबा "सरसुभेदार शंकराजी केशव" यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मे_१७५८
'बाजीराव' आणी 'चिमाजीनी'
मराठी सत्तेचा दबदबा "दख्खन" पासुन "रुमशेपावतो" पसरवला.
मराठ्यांची "विजयी घोडी" नर्मदा ओलांडून गेली,
"थोरले बाजीराव" हे एकमेव अपराजीत होते.
अटकेच्या मोहिमेत "तुकाजी होळकर" आणी
त्यासोबत असणारे "राणोजी शिंदे" यांनी अप्रतिम पराक्रम केला होता तर रघुनाथरावाने वयाच्या २३ व्या वर्षी अटकेवर "भगवा फडकवला.
याच काळात ४ मे रोजी "राघोबादादांचे" नानासाहेबांना लिहलेले १ पत्र मराठ्यांनी घेतलेल्या आत्मविश्वासाचे एक बोलके उदाहरण आहे. "मराठी साम्राज्य" उत्तरेत
'सिंधु नदी' आणी 'काश्मीरपर्यंत पुर्वेला उत्तरेत 'ओरिसापर्यंत' पश्चिमेस 'गोव्यापर्यंत' व दक्षिणेला 'म्हैसुरपर्यंत' पसरले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मे_१६४९
#राजा_छत्रसाल_बुंदेला_यांच्या_जयंतीनिमित्त
#त्यांना_त्रिवार_सलाम.
🔥
"||शिवाजीराजे पिछे हुआ,बुंदेला बलवान||
||प्राणनाथ का शिष्य यह, छत्रसाल महान||"
🔥
आजही बुंदेलखंडात महाराज छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीवर ही गुरू शिष्याची महत्त्व दुगोच्चार करणारं कवन पूर्ण जगाला प्रेरणा देत विराजमान आहे.
"शिवराय पाठीशी होते म्हणून मी आज एवढा बलवान झालो"
असा या कवनाचा अर्थ.
आजही बुंदेलखंडात छत्रपती शिवाजी महाराज
यांचं नाव आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं☝
किती अभिमानाची गोष्ट ही आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी. शिवरायांना छत्रसाल यांनी आपल्या गुरुस्थानी
मानले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मे_१६७७
दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी 'तिरुपती' येथे भेट.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मे_१७३९
#वसई_विजयोत्सव_दिन..
वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला.
खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु
असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसई किल्ला
जिंकून संपवला. मराठ्यांतर्फे" किल्ल्याचा पूर्ण ताबा "सरसुभेदार शंकराजी केशव" यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_मे_१७५८
'बाजीराव' आणी 'चिमाजीनी'
मराठी सत्तेचा दबदबा "दख्खन" पासुन "रुमशेपावतो" पसरवला.
मराठ्यांची "विजयी घोडी" नर्मदा ओलांडून गेली,
"थोरले बाजीराव" हे एकमेव अपराजीत होते.
अटकेच्या मोहिमेत "तुकाजी होळकर" आणी
त्यासोबत असणारे "राणोजी शिंदे" यांनी अप्रतिम पराक्रम केला होता तर रघुनाथरावाने वयाच्या २३ व्या वर्षी अटकेवर "भगवा फडकवला.
याच काळात ४ मे रोजी "राघोबादादांचे" नानासाहेबांना लिहलेले १ पत्र मराठ्यांनी घेतलेल्या आत्मविश्वासाचे एक बोलके उदाहरण आहे. "मराठी साम्राज्य" उत्तरेत
'सिंधु नदी' आणी 'काश्मीरपर्यंत पुर्वेला उत्तरेत 'ओरिसापर्यंत' पश्चिमेस 'गोव्यापर्यंत' व दक्षिणेला 'म्हैसुरपर्यंत' पसरले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मे_१६५६
शिवरायांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.
शिवाजी राजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मे_१६६५
दाऊद खान कोंढाण्याच्या (सिंहगड) दिशेने.
राजगडावरून प्रचंड मार खाऊन निघालेला दाऊद खान मराठ्यांच्या रेट्यासमोर टिकेनासा झाला.
राजगड पासून २ कोस मागे हटून आपला तळ गुंजण घेेऱ्याजवळ देऊन खेड शिवापूरच्या दिशेने नासधूस करत तो कोंढण्याच्या दिशेने निघाला
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_मे_१६८३
शिवरायांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहार कोष तयार करणारे मुत्सद्दी कारभारी "रघुनाथ नारायण हणमंते" यांचे निधन.
शिवरायांच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश,
रचिला आणि आपल्या सर्वाना शब्दाचा रास
उघड झाला.
आजही मराठीतील प्रचिलित असलेले
शब्द शिवराज्यकोशात असल्याचे पाहून
आनंद होतो . .🙏
सचिव , मंत्री , सभासद , न्यायधीश ,
दुर्ग , कोशागार , शस्त्रागार , चषक ,
सभा , लेखा , आय - व्यय (जमाखर्च ) , वेतन , ऋण , पतिभु (जामिन ) , कारागृह , आयपत्र , सहकारी , अनुक्रमणिका , सवांद , गणना.
असे अनेक असंख्य शब्द आजही आपल्या वापरात आहे.
राज्यव्यवहारकोश विविध आठ
नावांनी ओळखला जातो .
१) राज्यव्यवहारकोश
२) राजकोश
३) शिवचरित्रप्रतीप
४) राजकोश नीघुन्तु (#ट)
५) व्यवहारकोश
६) शिवराजकोश
७) श्री छत्रपती राजकोश
८) श्री छत्रपती राज्यव्यवहारकोश
#संदर्भ:-''शिवराजकोश''
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१६६०
स्वराज्यावर चालून आलेला मुघल सरदार शाहीस्तेखान सासवडहून राजेवाडीला आला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१६६५
पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला.
वज्रगडापाठोपाठ माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात
गेल्याने आता मराठे पुरंदरच्या बालेकिल्ला कसोशीने लढवू लागले.
दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एकच एल्गार सुरू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१६७०
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोणावळ्यानजीकचा किल्ले लोहगड मुघलांकडून ताब्यात घेतला तसेच मराठा फौजानी १ मे ते ८ मे या कालावधीतच करमाळा नजीक परांडा, तसेच नगर, जुन्नर, आणि इतर
५१ मुघल महाल व ठाण्यावर हल्ले केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१७३९
मराठ्यांनी चिमाजी अप्पा यांसह वसईवर हल्ला केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१८१८
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला.
कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता.
या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान.
आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा
झेंडा सांभाळत होता.
मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली.
त्यात १ मे १८१८ रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📯 #१_मे_१९६० 📯
हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला.
या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.🚩
या दिवशी द्वैभाषिक सौराष्ट्राला विभागून महाराष्ट्र
(मराठी) व गुजरात (गुजराती) ही राज्ये बनवली गेली.
एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी प्राण गमावले.
#जय_महाराष्ट्र 🚩
#महाराष्ट्र_दिन_चिरायू_होवो 🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩













