#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१६६०
स्वराज्यावर चालून आलेला मुघल सरदार शाहीस्तेखान सासवडहून राजेवाडीला आला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१६६५
पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला.
वज्रगडापाठोपाठ माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात
गेल्याने आता मराठे पुरंदरच्या बालेकिल्ला कसोशीने लढवू लागले.
दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एकच एल्गार सुरू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१६७०
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोणावळ्यानजीकचा किल्ले लोहगड मुघलांकडून ताब्यात घेतला तसेच मराठा फौजानी १ मे ते ८ मे या कालावधीतच करमाळा नजीक परांडा, तसेच नगर, जुन्नर, आणि इतर
५१ मुघल महाल व ठाण्यावर हल्ले केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१७३९
मराठ्यांनी चिमाजी अप्पा यांसह वसईवर हल्ला केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१८१८
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला.
कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता.
या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान.
आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा
झेंडा सांभाळत होता.
मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१_मे_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली.
त्यात १ मे १८१८ रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
📯 #१_मे_१९६० 📯
हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला.
या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.🚩
या दिवशी द्वैभाषिक सौराष्ट्राला विभागून महाराष्ट्र
(मराठी) व गुजरात (गुजराती) ही राज्ये बनवली गेली.
एकभाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी प्राण गमावले.
#जय_महाराष्ट्र 🚩
#महाराष्ट्र_दिन_चिरायू_होवो 🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#३०_एप्रिल_१६५७
छत्रपती श्री शिवरायांनी जुन्नर या मोगली ठाण्यावर छापा टाकला.
काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवरायांनी औरंजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते.
औरंगजेबाने ही शिवरायांना आपला "प्रेमाचा" खलिता पाठविलेला होता.
त्या खलित्यात शिवरायांनी "मोगलांचे अधिकारी" या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे त्याला संमती दिलेली होती.
या संमती पत्राची तारीख आहे:- २३ एप्रिल इ.स.१६५७.
जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी शिवराय नक्की दिल्ली दरबाराचे निष्ठावान झाले.
पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयांची संपत्ती गोळा केली. दात कोरायला काडीही शिल्लक ठेवली नाही. त्यामध्ये महाराजांनी साडे दहा लाख रुपये, हिरे, मोती, सातशे घोडे हस्तगत केले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#३०_एप्रिल_१६६५
( वैशाख वद्य एकादशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, रविवार )
दाऊदखानचा राजगडावर हल्ला!
मिरझाजयसिंगच्या नेतृत्वाखाली सुमारे ७००० स्वार, स्वराज्य बेचिराख करण्यास पाठवून दिले. महाराज याच सुमारास राजगडावर असताना राजगडला मोगली वेढा पडल्यावर मराठ्यांचा प्रतिकार कसा होईल???
मराठयांनी असा काय तिखट प्रतिकार केला की, मोगल सैन्य जेवढे पुढे आले होते तेवढेच मागे सरकले. राजगडावरून पद्मावती, संजीवनी माचीवरून आग ओकणाऱ्या तोफा, बाणांचा अचूक वेध, बंदुकीच्या माऱ्यांचा पाऊस अश्या मराठी रेट्यासमोर मोगली सैन्य टिकेनासे झाले.
निरुपाय होऊन दाऊदखान २ कोस मागे हटला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#३०_एप्रिल_१६७०
( वैशाख वद्य पंचमी, शके १५९२, संवत्सर साधारण, शनिवार )
महाराजांनी पुन्हा हुल उठवली!
शिवाजीराजांनी पुन्हा हुल उठवली की राजे सुरतेवर स्वारी करणार आहेत. सुरतेचा सुभेदार बहादुरशहा ५००० फौजेसह तळ ठोकून सुमारे ४ महिने बसला व नंतर हात हलवत परत गेला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_एप्रिल_१६६१
( वैशाख शुद्ध एकादशी, शके १५८३)
शृंगारपूरचे सिंहासन खालसा केले!
शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे जास्तच शेफरला होता.
आदिलशहाच्या हुकूमानुसार महाराजां सोबत अकारण वैर धारण केले होते.
शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापुर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपुरकडे वळवला.
तिथे सूर्यराव सुर्वे आपल्या दहा हजार लोकांसह शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव देत असे.
हा उपद्रव नाहिसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपुरावर अचानक छापा टाकला, पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला.
चकमक चांगली झाली, सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठयांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगड देखील स्वराज्यात दाखल केला.
संगमेश्वर येथे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करीत असताना सुर्यरावणे विनाकारण तानाजी काकांच्या छावणीवर हल्ला केला.
पण तो हल्ला तानाजी काकांनी क्षणात सावरून उधळून लावला व सुर्वेला पळून जाण्यास भाग पाडले.
महाराजांना हे कळताच तानाजी काकांचा सत्कार केला आणि सुर्वेला अजून एक संधी द्यायची ठरविले व ते पत्राद्वारे महाराजांनी सुर्वेला कळविले आणि भेटीसाठी बोलावले.
होकार देऊन ही सुर्वे काय भेटीला येईना.
मग, महाराजांनी शृंगारपुरीकडे १५००० खड्या स्वारांसह मोहरा वळविला.
घाबरून स्वतःच्या रक्षणासाठी सुर्वे पळून गेला.
महाराज शृंगारपुरीत पोहोचले आणि सुर्वे पळून गेल्याचे समजताच महाराज संतापले आणि सुर्वेचे सिंहासन लाथेने उडवून लाविले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_एप्रिल_१६८२
छत्रपती संभाजी महाराजांनी सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे.
या योजनेनुसार दगड, चुना व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली.
त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल १६८२ रोजी कळवीले की.
"आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_एप्रिल_१६६१
छत्रपती शिवरायांनी कोकणातील म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील किल्ले “ प्रचितगड " जिंकून घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_एप्रिल_१६८०
राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोलावले आहे.
कित्येकास कैदखान्यात घालून कित्येकास बडतर्फ केले आहे.
महाराजांच्या मृत्युनंतर २४ - २५ दिवसातला हा प्रकार आहे.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_एप्रिल_१७३१
बेलापूरची लढाई🔥
मराठ्यांनी नारायण जोशी या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली.
३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत मराठ्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार
२८ एप्रिल रोजी कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि मराठ्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_एप्रिल_१७४०
(वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२)
मराठा साम्राज्याचे पंतप्रधान श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या रणधुरंदर योद्ध्याचा नर्मदेच्या तिरावर रावेरखेडीत श्वास थांबला.
मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने पेशवे बाजीराव बल्लाळ यांनी अखेर चा श्वास घेतला.
मराठी दौलतीचा काळा दिवस.
हिंदुस्तानभर मराठ्यांचा दरारा निर्माण करणारं हे झंझावाती वादळ आजच्या दिवशीं शांत झाल.🚩
छत्रपतींच्या सेवकाला पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२७_एप्रिल_१६४५ -४६
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते.
छत्रपती शिवरांयांनी रक्ताच्या थेंबानी अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ...!!!
✍️
हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वर सह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक , तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।
✍️
गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता.
सध्या येथे जंगम लोकांची ४० कुटुंबे रहातात.
सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती.
सिंहाची छाती असणार्या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले.
मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली.
हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🚩🏇🚩🏇🚩
#२७_एप्रिल_१६८०
राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोलावले आहे. कित्येकास कैदखान्यात घालून कित्येकास बडतर्फ केले आहे. महाराजांच्या मृत्युनंतर २४ दिवसातला हा प्रकार आहे.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#२६_एप्रिल_१६७५
छत्रपती शिवाजी राजांची कर्नाटकातील कारवारवर स्वारी.
🚩🏇🚩 #२६_एप्रिल_१६८४
छत्रपती संभाजी महाराज बिरवाडीच्या किल्ल्यावर मुक्कामी.
१६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.
छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी ;-
केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा.
त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांकडे पाठवले.
✍️
"वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्यता पाठवली.
तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच, तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे.
आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे, दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.
कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे.
तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत.
तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो, अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते✍️
➡️वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."
➡️मराठ्यांच्या अधीपत्या खाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी.
करार / तहातील प्रमुख अटी:
१) वखारीची उंची, लांबी आणि रुंदी हि नियोजित प्रमाणानुसारच असावी
२) गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी.
३) बालकामगार
४) आयात व निर्यात यावर जकात.
५) धर्मांतर बंदी.
🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#२५_एप्रिल_१६६५
सुमारे ७००० घोडदळ घेऊन मुघल सरदार दाऊदखान किल्ले पुरंदरच्या पायथ्यापासून निघाला ते थेट स्वराज्याच्या नासाडीकरता.
त्याने रोहिड खोरे, हिरडस मावळ आणि गुंजन मावळ मध्ये धुमाकूळ घालण्यास सुरवात केली.
पुरंदरावर कुमक पोहोचल्याची बातमी मुघलांना कळली व दाऊदखान भयंकर चिडला, दिलेरखानने संतापून दाऊदखानला बोलावून घेतले. दाऊदखानला त्याने चांगलेच हासडले व त्याने शिवाजी राज्यांकडून लाच घेतल्याचे बोलू लागला.
जयसिंहने त्याचा मुत्सद्दीपणा दाखवत दाऊदखानला तिथून हलविले व मराठ्यांच्या प्रदेशातील गावे बेचिराख करायला पाठवले.
🚩🏇🚩 #२५_एप्रिल_१६७४
६ जून १६७४ रोजी होणाऱ्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ३२ मण सोन वापरून सुवर्ण सिंहासन रामजी दत्तो चित्रे यांनी तयार केले
🔶राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांसाठी खास ३२ मण वजनाचे सोन्याचे तयारसिंहासन करण्यात आले होते.
हे सिंहासन पोलादपुर (जि. रायगढ) येथील रामजी चित्रे यांनी घडवले होते.
🔷सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जड्वलेली होती.
🔶आज सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.
🔶त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.
🔷२४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोला सध्याच्या ११.७५ ग्रामचा होता)
१६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते.
🔶१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.
असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो)
🚩🏇🚩 #२५_एप्रिल_१६९०
साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सर्जाखान संताजींकडून पराभूत.
🚩🏇🚩 #२५_एप्रिल_१८१८
इंग्रजांनी रायगडाच्या पश्चिमेस पोटल्याच्या डोंगरावरून वाघ दरवाजाच्या बाजूला तोफगोळे डागले यात प्रमुख हात होता तो कर्नल प्रॉथर, मर्जर हॉल आणि मेजर बॉण्ड यांचा.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_एप्रिल_१६६७
#व्यंकोजीराजे व #दीपाराजे सर्व लवाजम्यासह #जिजाऊमाता #शिवराय व #शंभूराजे यांचे भेटीसाठी रायगडावर आले.
सुमारे दोन महीने महाराष्ट्रात राहून, स्वराज्याचा अभ्यास करून राजनीतीचे अनेक दाखले ऐकून व्यंकोजी राजे परत निघाले.
शिवाजीराजांनी त्यांना थोरल्या महाराजांनी घालून दिलेल्या वाटेचाच अवलंब करावा हे सांगितले.
आम्ही उत्तरेपर्यंत जाऊन आलो तुम्ही दक्षिण पुर्ण सांभाळावे, स्वतंत्र राजे व्हा. आपण दोघे मिळून भारताला समतेचे शिवराज्य देऊ. जिजाऊ व शिवरायांचे दर्शन घेऊन व्यंकोजी राजे मार्गस्थ झाले होते.
आदिलशहा व कुतुबशहा यांना मोगलांपासून दूर ठेवण्यात
व्यंकोजी राजांनी दाखविलेले राजनैतिक कौशल्याबाबत महाराजांनी त्यांचा विशेष गौरव केला....🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_एप्रिल_१६७४
भोर-वाई प्रांतामधला जिंकायचा बाकी राहिलेला एकमेव असा केंजळगड शिवरायांनी राज्याभिषेकाच्या ४२ दिवस आधी स्वराज्यात दाखल करून घेतला.
राज्याभिषेकासारखा मंगल विधी जवळ येऊन ठेपला तरी महाराजांची कार्यव्यग्रता व मानसीक ताण जराही कमी झालेला नव्हता. राजे लष्कर पाहणीसाठी व सरनोबत नियुक्तीसाठी चिपळूणला आले लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकास खजीना फोडून महाराजांनी वाटणी केली याचं वेळी चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्या नव्या नेमणुका करून टाकल्या सरनोबताची वस्त्रे हंसाजी मोहिते यांना दिली..
चिपळूनला राजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता याचं काळात मराठ्यांनी सुलतानढावा करून वाईजवळील केंजळगड किल्ला जिंकून घेतला. किल्ल्यावर गंगाजी विश्वासराऊ नाईकवाडी कीरदत हा नाईक होता.
मराठ्यांच्या अकस्मात आलेल्या हल्ल्याला त्याने हिमतीने तोंड दिले.
चार मराठ्यांना त्याने ठार केले पण पण अखेर गंगाजीही पडला. केंजळा म्हणजे केंजळगड स्वराज्यात दाखल झाला ती तिथी होती चैत्र वद्य १४ शके १५९६ म्हणजे दि २४ एप्रिल १६७४ शुक्रवार...
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_एप्रिल_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली, त्यात २४ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_एप्रिल_१६५७
शिवरायांची स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवात🚩 आदिलशाहाच्या ताब्यातील एकेक प्रदेश अतिशय झापाट्याने काबिज करून घेतला पण शिवरायांनी आणखी एक डाव टाकला तो म्हणजे,
आदिलशाहीच्या जिंकलेल्या मुलुखाला मान्यता मिळवण्यासाठी आपल्या वकीलाला, सोनोपंत डबीर या शहाजीराजांच्या विश्वासातल्या अत्यंत मुत्सद्दी आणि अनुभवी व्यक्तीला औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले.
औरंगजेबालाही आश्चर्यच वाटले, कारण शिवरायांनी मुलुख तर जिंकला होता आदिलशाहाचा, आणि ते परवानगी मात्र मागत होते औरंगजेबाची !
बिचार्याच औरंगजेबाला वाटले, शिवाजीराजे आपल्याशी लढण्याआधीच आपल्याला वचकून राहतायेत, त्याने सोनोपंतांसोबत महाराजांना एक पत्र पाठवून दिले,
“… सांप्रत विजापूरकरांकडील जे किल्ले, जो मुलुख तुम्हांकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे. तूमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे…”
हे पत्र होते दि. २३ एप्रिल १६५७ चे..
पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की, आपल्याकडे जो माणूस वकील म्हणून आला आहे तो किती उचापती आहे.
सोनोपंतांनी औरंगजेबाला गोड बोलून झाडावर चढवून ठेवले आणि हळूच त्याच्या सैन्यात फेरफटका मारून त्याच्या सैनिकांकरवी मोंगलांच्या ‘आतल्या’ बातम्या काढून आणल्या
आणि बरोबर एका आठवड्यानंतर दि. ३० एप्रिल १६५७ रोजी,
शिवरायांनी आपल्यासोबत पाच-सहाशे मावळ्यांना घेऊन मोंगलांचे एक अतिशय महत्त्वाचे ठाणे, पेठ जुन्नर इथे छापा टाकला व लाखो रुपयांनी भरलेल्या जुन्नरच्या तिजोऱ्या
रिकाम्या झाल्या !
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_एप्रिल_१६५७
मराठ्यांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे समवेत दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_एप्रिल_१६५७
अहमदनगरचा मुघल सुभेदार "मुलफत खान"
यास छ्त्रपती शिवरायांनी पत्र रवाना केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_एप्रिल_१६६७
मराठ्यांनी कोकणातील दाभोळ व आसपासची
ठाणी जिंकली
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२३_एप्रिल_१८१८
दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह
इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩 #२२_एप्रिल_१६६७
आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवरायांनी औरंगजेबास पत्र पाठवले,
या पत्राद्वारे शिवरायांनी पुढची रणनीती आखण्यासाठी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट केले.
महाराज आग्र्याहून अकस्मातपणे सुटून गेल्यामुळे औरंजेबाची नाच्चकी झाली, संशयापोटी त्याने मिर्झाराजांना दक्षिणेतून परत बोलवण्याचा हुकुम सोडला आणि औरंगाबादेस शहजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले, याच संधीचा फायदा घायचे शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून मुअज्जम सोबत बोलणी सुरु केली.
शिवाजीराजांनी औरंगजेबास अक्कल हुशारीने २२ एप्रिल १६६७ रोजी एक पत्र लिहिले:-
“हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकुम पाळण्यात मोठे भूषण मनात आहे हिंदुस्तानच्या बादशहाची फौज मजवर चालून येत आहे त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य कोणात तरी आहे काय ? म्हणून माझी विनंती आहे कि माझा मुलगा संभाजी यास ४ हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाहाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे” (शि.प.सा.सं.ले – ११५८)
हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलास बोलावले आणि म्हणाला –
“तुझ्या मालकास जाऊन त्यास कळव कि तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत,
आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलुख तू काबीज करशील तो तुला देऊ, स्वताच्या मुलखातच कायम रहावे, तुझ्याकडे असलेला प्रत्येक महाल शहजाद्याकडे रुजू कर” (ए.फा.सा.खं-६-ले-५०)
अश्या प्रकारे संभाजी राजे पुन्हा मुगली मनसबदार झाले.
औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर संभाजी राजे कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले.
🚩🏇🚩 #२२_एप्रिल_१६६८
"गुंजन मावळ" स्वराज्यात दाखल.
🚩🏇🚩 #२२_एप्रिल_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली.
त्यात २२ एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश.
🚩🏇🚩













