#🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६६५ ( कार्तिक वद्य सप्तमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, रविवार ) छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे यांच्या छावणीत दाखल! राजे शिवराय तहानंतर विजापूरच्या मोहिमेसाठी सुमारे ९-१० हजाराच्या फौजेसह मिर्झाराजांच्या छावणीत दाखल झाले.. संदर्भ: शि.च.वृ.स ३ पृ ४२ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६६७ गोव्यातील पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींबद्दल छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज व्हाइसरॉयला सावधानतेचे पत्र पाठवले. पोर्तुगीज स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन त्यांचे आरमार उभे करत होते तसे झाले तर तो स्वराज्यासाठी एक धोका होता. त्यांना शह देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज व्हाइसराॅयला वकीलामार्फत पत्र पाठविले व तसे न करण्याचा इशारा दीला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६८१ संगमनेरचा ठाणेदार "नारोजी" याने मराठ्यांना अडविण्यासाठी "औंढा" पट्ट्यात वाटा रोखून धरल्या. पण मराठे हुशारीने तिकडे फिरकलेच नाहीत. उलटच्या दिशेने संगमनेरपासून २० कोसावर पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत भोजपुऱ्यात चौथरा वसूल करत निघून गेले व तिथे चकमकही झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१७७२ श्रीमंत थोरले माधवराव यांचे निधन. वयाच्या २७ व्या वर्षीच त्यांनि इहलोकची यात्रा संपली. तसेच रमाबाई पण त्यांचे बरोबर सती गेल्या. श्रीमंत माधवराव पेशवे यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मध्ये क्षयरोगाने अकाली मृत्यू झाल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे यांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
#🙏शिवदिनविशेष📜 ⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६७ (मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, शके १५८१, संवत्सर प्लवंग, वार बुधवार) महाराजांचा डिचोलीस मुक्काम! बारदेशचा सोक्षमोक्ष लावायचाच हा एकमेव विचार करून महाराज डिचोली येथे मुक्कामास राहीले. कारण पोर्तुगीज रामाजी शेणवी कोठारी हा वकील तहाची याचिका घेऊन येणार असल्याचा महाराजांना निरोप आला. 📜 १३ नोव्हेंबर इ.स.१६६८ (कार्तिक वद्य पंचमी शके १५९० संवत्सर किलक वार शुक्रवार) गोव्यात श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय बांधण्यास शुभारंभ. महाराज वेंगुर्ल्यावरून भतग्राम महालातील नारवे या गावी गेले. नारवे येथील श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय प्राचीन काळापासून विख्यात होते. कोकणच्या ६ प्रमुख दैवतांमध्ये श्रीसप्तकोटीश्वराची गणना होत होती. पंचगंगेच्या तीरावरील श्रीसप्तकोटीश्वर कदंब राजाचे कुळदैवत होते. यावनी काळात या शिवमंदिराची दुर्दशा झाली त्यावेळी, विजयनगरच्या बुक्करायाने त्याचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर पोर्तुगीज अंमलात पुन्हा हे मंदीर ऊद्धवस्त करण्यात आले. श्रीसप्तकोटीश्वराचे शिवलिंग पोर्तुगिजांनी एका विहिरीच्या काठाला बसविलेले होते. त्यावर पाय ठेवून क्रिस्ती लोक पाणी ओढीत! पुढे भतग्रामच्या देसायाने ते गुप्तपणे काढून नेले व नारवे येथे त्याची स्थापना केली. महाराज श्रीसप्तकोटीश्वराच्या दर्शनार्थ गेले आणि या देवालयाचा जीर्णोद्धार करण्याची आंतरिक प्रेरणा त्यांना झाली. लगेच त्यांनी देवालयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेत#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ११ नोव्हेंबर इ.स.१६५९ महाराज वाई येथे आले. महाराज अफझल खान वधाच्या दुसऱ्या दिवशी वाई येथे आले. नेताजी पालकरही वाईला महाराजांच्या फौजेत सामील झाले. वाईहुन महाराजांनी आक्रमक पवित्रा घेऊन खानाच्या पराभवामुळे मनोधैर्य खच्ची झालेल्या विजापुरी भागावर धडक मारली व थेट पन्हाळ्यापर्यंतचा भाग आपल्या अंमलाखाली आणण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे प्रथम चंदन वंदन हे दोन गड काबीज झाले. याच सुमारास शिरवळ, सुपे, सासवड, पुणे या भागावर खानाने रवाना केलेले पांढरे कराटे जाधवराव हे आदिलशाही सरदार सिद्दी हिलालच्या मार्फत महाराजांना शरण आले. खानाचा अपेक्षित पराभव झाल्याने ते गर्भगळीत झालेले होते. या सर्वांनी महाराजांची चाकरी पत्करली. या सर्वासह महाराजांनी तुफानी घोडेदौड सुरू केली. व पाहता पाहता खटाव, मायनी, रामपुर, कोलढोण, वाळवे, हलजयंतिका, अष्टी, अष्टे, वडगाव, बेलापूर, औदुंबर, मसुर, कराड, सुपे, तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापुर, साबे, उरण, काळे आणि कोल्हापूर ही गावे महाराजांच्या ताब्यात आली. ११ नोव्हेंबर इ.स.१६७९ मराठ्यांनी खांदेरी येथील इंग्रजांविरूद्धचे युद्ध जिंकले. डोव्ह नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशीविदेशी कैदी म्हणून ताब्यात. इंग्रजांना मराठ्यांच्या सागरी आरमाराचे सामर्थ्य पटले आणि पुढे २४ नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला.#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती



