🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️
भगवंत तीन अंगाने आहे, एक म्हणजे सगुण रुपाने तो सर्वत्र नटलेला आहे, झाड फळ फुल पशु पक्षी मनुष्य प्राणी संपूर्ण ब्रह्मांड याच्याने नटलेला आहे,
दुसरं त्याचे रूप प्रत्येकाच्या हृदयात गुप्तरूपाने तो बीज रुपाने आहे, व सर्व पशु पक्षी प्राणी झाड फुल फळ गुप्त रूपाने आहे, हे कधीही कुणाला समजणार नाही,
तिसरे म्हणजे त्याचं निज स्वरूप चार भुजा पिवळे पितांबर नेसलेले हातात चक्र गदा शंख असा तो सुंदर गोजीर रूप प्रेमळ हास्य शेष नागावर झोपलेला साक्षात लक्ष्मी पायाजवळ बसलेले असं सुंदर गोड रूप
असा भगवंत तीन स्वरूपात खूपच गोड आहे, आनंद वाटतो भगवंताच स्मरण जरी केलं तरी डोळ्यातून अश्रू सहज येतात कारण की त्याच्या शिवाय जीवनात काहीच नाही,
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️
॥ भाव भक्तीचा विसावा ॥
निरंतर राहू दे हृदयात तुझी भक्ती, तुझ्याच नामस्मरणाने मिळो मजला शक्ती,
हे परमेश्वरा, तूच सुखाचा सागर,
तुझ्या चरणी अर्पिते - हा जीवनाचे अत्तर.
हे नारायणा, तूच विश्वाचा नियंता, मी सदैव तुझ्या भक्तित लीन राहु तू सदैव माझ्या सोबत रहा,
हे सद्गुरुराया, तुझा हात सदा शिरावर असू दे,
अंधाऱ्या वाटेवर तुझ्या मार्गदर्शनाचा प्रकाश दिसू दे.
हेच मागणे देवा, नको कसलीही आस नको,
सदा वसो हृदयात तुझी भक्ती आणि प्रेम, हे सद्गुरुराया!
नारायण - जो सर्वांचा आधार आहे,
सद्गुरु जो अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाशाकडे नेतो.
निरंतर कधीही न संपणारे, अखंड.
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️
#🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏कर्म क्या है❓
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️
क्रोध क्षमाशक्ती
माणसाचा क्रोध हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. रागाच्या भरात आपण दुसऱ्याला घाबरवू शकतो,
त्यांच्यावर दरारा निर्माण करू शकतो, पण तिथे 'आदर' नसतो, फक्त 'भीती' असते. भीतीपोटी झुकलेली मान कधीही मनातून झुकलेली नसते,
याउलट क्षमा हे वीरांचे लक्षण आहे. जेव्हा आपण एखाद्याला मनापासून क्षमा करतो, तेव्हा आपण केवळ समोरच्या व्यक्तीचा राग सोडून देत नाही,
तर त्यांच्या मनात स्वतःबद्दल कायमचे स्थान निर्माण करतो.
हृदय जिंकणे सामर्थ्याने शरीर जिंकता येते, पण प्रेमाने आणि क्षमेने समोरच्याचे हृदय जिंकता येते. जिथे क्षमा असते, तिथे शत्रुत्वाचे रूपांतर मैत्रीत होते.
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️
#🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️
सत्संगाचे माहात्म्य
जिथे ईश्वराचा वास असतो
सत्संग म्हणजे केवळ एकत्र बसणे नव्हे, तर 'सत्याचा संग' करणे होय. जेव्हा काही सात्त्विक मने एकत्र येऊन ईश्वराचे नामस्मरण किंवा चांगल्या विचारांची देवाणघेवाण करतात,
तेव्हा तिथले वातावरण चैतन्याने भरून जाते
देवदेवतांचा निवास असतो, की जिथे शुद्ध भावनेने सत्संग चालतो, तिथे प्रत्यक्ष देवदेवता सुद्धा अदृश्य रूपाने येऊन बसतात.
कारण देवालाही भक्तांच्या प्रेमाची आणि शुद्ध विचारांची ओढ असते.
मनाची शुद्धी ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात आल्यावर लोखंडाची घाण जळून जाते, त्याचप्रमाणे सत्संगात आल्यावर माणसाच्या मनातील विकार काम, क्रोध, लोभ गळून पडतात,
आणि तिथे भक्तीचा उदय होतो,
रागाच्या शस्त्राने माणसे तोडण्यापेक्षा, क्षमेच्या मायेने माणसे जोडणे जास्त महत्त्वाचे आहे.
आणि हीच जोडलेली माणसे जेव्हा सत्संगात एकत्र येतात, तेव्हा तिथे प्रत्यक्ष वैकुंठ अवतरते.
🕉️🪷🕉️🪷🕉️🪷🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गीता ज्ञान🛕 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇
मृत्यु -1
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
.......राजा परीक्षित जो होता अभिमन्यूचा मुलगा त्याला मरण्या अगोदर सात दिवस मिळाले होते, की सात दिवसात मरणार आहे, जसे समजले म्हणून त्या सात दिवसात परीक्षेत राजाने खूप काही तयारी केली,
........की मी सात दिवसात काय केले पाहिजे, त्यांनी पहिले आपला संसाराचा त्याग करून आपल्या मुलाला राज गादीवर बसवले, ते सात दिवस सर्व संत ऋषी यांना भेटले, गंगा नदीच्या तट वर बसले,
........आणि सर्व त्यांना प्रश्न विचारले..... की मी या सात दिवसात असे काय केले पाहिजे, जेणेकरून मला मुक्ती मिळेल, विचार करा परीक्षित राजाला एवढा प्रश्न पडला, आणि सात दिवसात पूर्ण आपली तयारी करून घेतली मोक्ष प्राप्त करण्याची,
.........याच्यावर एक विचार करा की आपण कसली तयारी करतो, मृत्यूच्या अगोदर हा कधी आपल्याला प्रश्न पडला आहे का???? की आपण मृत्यूच्या अगोदर आपणही तयारी केली पाहिजे???? परीक्षीत राजाला तर सात दिवसा अगोदर त्यांचा मृत्यू समजला,
........आपल्याला तर कधीच समजत नाही, मग आपण कशी तयारी केली पाहिजे??? यावर आपण नक्कीच विचार करावा चिंतन करावे, आपण किती बेसावद पणे जीवन जगतो, आपल्याला आपली कसलेही पडलेले नाही,
........एक दिवस माझाही मृत्यू होईल आणि त्यासाठी मी काय तयारी केली पाहिजे???? सर्वांनी नक्की हा विचार करावा आपल्या भल्यासाठी आपल्याला अनमोल जीवन भेटले आहे यासाठी हे जीवन व्यर्थ जाऊ नये विनाकारण,
........सावंत सुखी विचार करा परीक्षेत राजाला साथ दिवसाच्या वेळ मिळाला आपल्याला कोणी वेळ देणार आहे विचार करा परीक्षीत राजा तर साक्षात भगवंताचा प्रसाद होते, म्हणून जन्माला आला आहात तर मृत्यू निश्चितच आहे, पण ते जीवन जगताना आपल्याला सुद्धा कुठेतरी जायचंय आपल्या गावी त्याच्या आधीच तयारी करा,
.....…..आता आपण सुद्धा परीक्षीत राजासारखी तयारी करायची की नाही करायची मृत्यु अगोदर मृत्यूच्या अगोदर हे तुम्हीच ठरवा कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇
'हरिपाठ' या शब्दचा अर्थ
ह — हरिनामाचा ध्यास लागता,
मिळतो मनाला विसावा
रि — रिकामी होते "मन"
लाभे भक्तीचा पान्हा
पा — पावन होई देह विठ्ठल
चरणी लीन
ठ — ठसुन भरला विठ्ठल
हरिपाठात जन होई तल्लीन... असा हरिपाठचा अर्थ गोड
हरिपाठ भवात म्हणुया
विठू माऊलीच्या गजरात,
दुमदुमतो हा हरिपाठ
मुक्तीची ही सोपी वाट
दावी भक्तीचा हा गजर
अभंगांच्या ओळींतून
पांडुरंग भेटतो अभंग
अमृताच्या या शब्दांनी
दु:ख सारा हा मिटतो
ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातुन
मनामनात हा रुजतो
हरिपाठाच्या या गोड अभंगातुन
माणूस देवाशी जुडतो.
🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
🕉️
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
जीवनाची वाट मोकळी करा
वाईट विचाराना सोडा
नको ते रडगाणे सारखे सारखे मन सुद्धा तुमचे खिन्न होते,
हरिपाठ केल्याणे मन तुमचे
प्रफुल्लित होईल,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
जड चित्त ग्रंथी गाठ सोडा
संसार आणि परमार्थ एक करा
धावपळीतुन त्या मनाला
थोड़ा विसावा द्या,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
सुखी जीवनाची गुरुकिल्ली ही
हरिपाठ करून जीवनाचे सार्थ होईल, जेथे नाम घोष चालतो तेथे कुटुंबाचे कल्याण होते,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
मुलांना सोबत घ्या, पूर्ण परिवार
एकत्र येऊन हरिपाठ करा,
एकत्र येऊन हरिपाठ करा, नकारात्मकता दूर होईल,
घरात सुख शांती नांदेल,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
पैसे कमवणे हा परिवार
चालवण्याचे मार्ग तर हरिपाठ करून आपले मनाला प्रसन्न करण्याचा मार्ग
करा करा हरिपाठ करा आपल्या जीवाचा कुटुंबाचा उद्धार करा,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा. #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓
🕉️
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग,
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग
जीवाची शिवाची गाठ जुड़ते
जीवंत पणी मोक्ष गाठतो
हरिपाठ मुक्तीचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
भक्तीच्या रंगात पांडुरंग येतो
चित्ताच्या त्या गाठी युक्तीने
सहज सुटून जातात
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग
अंतरी विठ्ठल नित्य तो पहतो
चित्त चैतन्यमय होवून जाते,
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
दुःखाचे रूपांतर सुखात होते
मनाचे रूपांतर उन्मनित होते
बुद्धी प्रतिभावंत होते,
विचाराचे रूपांतर शुन्यत होते
देह चे रूपांतर विदेहेत होते,
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
हरिपाठ केल्याने मन शुद्ध
पवित्र होते, अंतरंग विशाल होते,
जीवन प्रकाशमय होते,
जीवाचा उद्धार होतो,
शिवशक्तीचे मिलन होते,
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग
🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇
🕉️
किती यंत्र बाजारात आली आपल्याला सुख मिळवण्यासाठी पण यंत्र आपल्याला सुख देऊ शकत नाही??? कारण की सुख हे आपल्या मनात असते,
सुख तेच मिळवू शकतात ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, त्यांनाच सुख मिळेल, इतर मग कोणाला ही नाही.
यंत्रणे तात्पुरता व्यवस्था होईल,
क्षणिक सुख प्राप्त होईल पण अखंड सुख हे फक्त आत्मज्ञानेच प्राप्त होते,
सुख बाहेर नसून आपल्या आत आहे,
म्हणून बाहेरची कोणतीही वस्तू यंत्रणा व्यक्ति आपल्याला सुख देऊ शकत नाही, आपले सुख आपल्यालाच मिळवायचे आहे??? आणि ते आपल्यातच आहे, चला मग शोधून काढा सुख.... सुख आपल्या आतच आहे शोधायचे की नाही शोधायचे हे तुम्हीच ठरवा कारण की तुम्हीच आहेत तुमच्या जीवनाचे निर्मिते.
🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇
🕉️
सुख आणि दुख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्याला सुख हवे असेल त्याला दुःखही स्वीकारावे लागेल,
जसे की रात्र झाली की सकाळ होणारच असते, हे त्रिवार सत्य आहे तसेच दुःख गेले की सुख येणार.. हे त्रिवार सत्य आहे पण सुख गेले की दुःख येणार आणि दुःख गेले की सुख येणार, हे सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागेल, जोपर्यंत तुमचा श्वास आहे जोपर्यंत पृथ्वीमाता आहे तोपर्यंत सुख दुःख यांचा मेळ म्हणजे "संसार" आहे मग असे कधीही होणार नाही की आपल्या वाट्याला फक्त सुखच येईल किंवा आपल्या वाटेला दुःखच येईल असं कधीही होणार नाही.
असे हे सुख आणि दुःख याच्या सम कसं राहायचं यासाठी तुम्हाला सत्संगातच जावे लागेल.
मनुष्यप्राणी "सुख" आले की त्याला फार आनंद होतो, त्याला सर्व जग आनंदी वाटायला लागते, पण त्याचा धाकटा भाऊ "दुःख" आलं की त्याला म्हणतो तू नको येऊ त्याला तो कंटाळतो त्याला नको म्हणतो,
असं चालणार नाही जितकं तुम्ही सुखाचे स्वागत करतात तितकेच "दुःख" स्वीकारायला तयार राहा, कारण हे सुख आणि दुःख हे आपण केलेली निर्मिती आहे, भगवंत आपल्याला सुख व दुःख देत नाही,
हे आपले कर्माची फळ आहेत आणि आळीपाळीने आपल्याला चाखायला मिळतात,
त्यापैकी सुख फळ खूप चांगले वाटते, व दुःख हे फळ कडू लागते, पण हे तुम्हाला चाखायचेच आहेत, ते कडू जरी असलं तरीही आणि गोड असलं तरीही दोन्ही फळ तुम्हाला चाखावेच लागतील, म्हणून तोंड आपले वाकडे तिकडे न करता आपण आनंदाने चाखायला सुरुवात करा, काही काळजी करू नका, जीवनात सत्संगात संगत संगती करा तिथे सुख आणि दुःख कसं आनंदी राहायचं हे आपल्याला सहज ज्ञान प्राप्त होते, आणि आपल्याला सुख आलं तरी काही वाटत नाही आणि दुःख आलं तरी काही वाटत नाही हे दोन्ही फळ आपले जीवन घडवत असतात, म्हणून कोणाचाच नकार देऊ नका,
आनंदाने जीवन जगत चला फक्त भगवंताला नामस्मरणाला सोबत ठेवा,
आता हे दोन्ही फळ सुख दुःख हे चाखायचे की नाही चाखायचे ते तुम्हीच ठरवायचं कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते.
🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕













