
कृपासिंधु
@kurpasindu
वाहिला हा देह "श्री स्वामींच्या" सेवा-कार्यासाठी
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार मंत्रातील ताकद अनुभवायची असेल तर स्वामींच्या चरणाला स्पर्श करा.तारक मंत्रात फार ताकद आहे. ह्या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय, सर्वात पहिले लिहलेला लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला, त्यानंतर अनेक लेख लिहले परंतु हा सर्वात आवडता लेख.
सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा नावातच सर्व काही आहे, तारक म्हणजे तारणारा. तो कधी म्हणावा, चालता, बोलता, उठता बसता. या मंत्राची जादू, प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी, इतका अप्रतिम व तरूणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य, भारी, कमालच!डिप्रेस्ड वाटतंय म्हणा तारक मंत्र, कामं अडली आहेत म्हणा तारक मंत्र, एकाकी एकटं पडल्या सारखं वाटतंय म्हणा तारक मंत्र, रडू येतंय, उदास वाटतंय एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे “माझ्या स्वामींचा तारक मंत्रउदाहरणं देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे “तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे, हे नक्की कळेल.मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलयं, हे मना तू निःशंक हो, निर्भय हो, स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज स्मर्तृगामी आहेत, त्यांना अशक्य काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळ ही हात लावू शकत नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाच भितोस, हे भय पळू दे. स्वामी माऊली असतांना भय ते कसले? ”नको घाबरु तू असे बाळ त्यांचा” ! हया ओळीतच सर्व काही आहे, कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो, मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते, हे फक्त आई झाल्यावरच समजते, मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. अब्ज आईच्या कोमल ह्रदयापासून त्या माऊलीचे ह्रदय बनलयं कदाचित! मग घाबरणायाचा प्रश्न येतोच कुठे?खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविण तू स्वामी भक्त- आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे, त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करतेय त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही? असंच काहीसं महाराजांच आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रध्दा आपुलकी हे सर्व नामस्मरणा द्वारे व्यक्त करायचयं महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही.आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामीच देतील हात- आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराजांच आहे, आपण विसरु पण महाराज आपल्याला विसरणं “अशक्य”!मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे तारक मंत्रात. महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलयं ते अजिबात विसरायचं नाहीये.हे मना तू फक्त निःशंक हो, निर्भय हो- तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावेत, आणि च मत्कार अनुभवावा. स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच!आपण खरंच खूप नशिबवान आहोत, आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजले. म्हणजे खरंच काहीतरी छोटंस पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली, कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
*🛕‼️श्री स्वामी समर्थ‼️🛕*
🍃 सेवेकरी कुटुंब परिवार 🍃
*🚩एकादशी दिवशी करायची सेवा 🚩*
*१)विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र एकादशीची सेवा म्हणून अवश्य पठण करावे.*
*२) एकादशी सेवा म्हणून पितृदोष निरसन व्हावे याकरिता ७०० श्लोकी "श्रीमद् भागवत" या ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे.*
*३) पितरांना मुक्ती मिळण्यासाठी श्री सुलभ भागवत ग्रंथ पारायण करताना *“ॐ नमो भगवते वासुदेवाय”*
या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावून पारायण केल्यास जन्म-जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात तसेच पितरांचे आशीर्वाद मिळून हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळते.
*४) दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद् भागवत वाचन आणि जोडीला पंचमहायज्ञ असू द्या. तुम्हाला नारायण नागबली तथा मातृगया सारखे विधी करण्याची आवश्यकता भासणार नाही*
*स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही घराण्याचे दोष घालवण्याचे सामर्थ्य श्रीमद् भागवत ग्रंथात आहे.*
५) एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंगाचा मंत्र किमान १ माळ जप करावा
*🌺‘श्री वत्सं धारयन्। वक्षे मुक्ता माला षडाक्षरं॥*🌺
*🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*
*💯🌹कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी उपाय🌹💯*
*👉आपण जर सलग 21 दिवस #श्रीयंत्रावर कमाळगठ्ठा माळ घालून.*
*1) 1 माळ #लक्ष्मी गायत्री मंत्र.*
*2) 1 माळ #विष्णू गायत्री मंत्र.*
*3)1 माळ #कुबेर मंत्र म्हटले तर.*
*👉#तर हळू हळू आपला कर्जबाजारी पणा कमी होतो तसेच #श्रीयंत्रावर कुंकू मार्चन करत रोज 1 वेळा #श्रीसुक्त व #व्यंकटेश स्तोत्र रोज म्हटले तर आपल्या घरात नेहमी #लक्ष्मीचा वास राहतो.*
*---प.पू.गुरुमाऊली.* #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #✍️सुविचार #📝कविता / शायरी/ चारोळी
#🎭Whatsapp status #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
*आपण चांगले वागून जर लोक आपल्या गुणांची किंमत करत नसतील तर निराश होऊ नका. ती चुक आपली नाही कारण सोन्याची पारख करायला सोनारच लागतो भंगारवाला नाही...!!!🚩🤞✌️🤝💯✅* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #✍️सुविचार #🙏श्री स्वामी समर्थ📿
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
*।।श्री गणेशाय नमः।।*
*उपासना व उपासकाच्या जीवनात त्याचे महत्त्व*
*।। काही संकीर्ण मंत्र।।*
(1) *अन्नाचा दृष्टी दोष घालवण्याचा मंत्र* (एकदाच म्हणावा)
अन्नं ब्रम्ह रसो विष्णूर्भोक्ता देवो महेश्वराः।
इति संचित्यं भुंजानं दृष्टी दोषो न बाधते।।
(2) *जेवणास सुरूवात करण्या आधी म्हणावयाचा मंत्र* —
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे।
ज्ञान वैराग्य सिदध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती।।
(3) *जेवणापुर्वी म्हणण्याचा असाच एक गीतेतील श्लोक* —
ब्रम्हार्पणं ब्रम्ह हविः ब्रम्हाग्नौ ब्रम्हणाहुतम्।
ब्रम्हैव तेन गंतव्य ब्रम्ह कर्म समाधिना।।
(4) *नेत्र विकार होऊ नयेत म्हणून जेवण झाल्यावरचा मंत्र* —
स्वर्यातिंच सुकन्यांच च्यवनं शक्रमश्विनौ।
भोजनान्ते स्मरेद यस्तु तस्य चक्षुर्न हीयते।।
(हात धुतल्यावर ओल्या हाताने दोन्ही डोळ्यांवर अल्प घर्षण करून पाणी लावावे, नेत्र चांगले राहतात)
(5) *भोजन झाल्यावर योग्य रितीने अन्न पचन व्हावे म्हणून जेवणानंतर मंत्र म्हणत पोटावरून हात फिरवावा.*
अगस्त्यं कुंभकर्णं च शनिं च वडवानलं।
आहार प्रति पाकार्थम् स्मरामि च वृकोदरम्।।
अतापि भक्षितो येन वातापीच महाबलः।
अगस्तस्य प्रसादेन भोजनं मम जीर्यताम्।।
(श्रद्धा हवी तर या मंत्रांचा अनुभव येतो)
(6) *लहान मुलांना नजर, दृष्ट लागते त्यावर मंत्र*—
अंजनी गर्भ संभूतं कुमारं ब्रम्हचारिणम्।
दृष्टी दोष विनाशाय हुनुमंतं स्मराम्यहम्।।
(7) *मृत्युसमयी जे अनाथ असतात, ज्यांचे श्राद्ध कोणी करीत नाही, अशांचे सर्वत्र आत्मस्वरूप एक आहे या करूणामय भावनेने, दुर्लक्षित असा मृतांना अन्नदान करण्याचा मंत्र —*
(हा मंत्र अनंत पुण्य मिळवून देतो) श्राद्ध पक्षाच्या महिन्यात अमावास्येला, एका पत्रावळीवर अन्न घराबाहेर ठेवून हात जोडून खालील मंत्र म्हणावा—
येषां न माता न पिता न बंधुनैवान्नसिद्धिर्न यथान्नमस्ति।
तत् तृप्त यन्नं भुविदत्त मेतत् प्रयान्तु तृप्तीं मुदिता भवन्तु।।
(8) *गाढ निद्रा येण्यासाठी, झोपताना खालील मंत्र म्हणावा* —
अगस्तीर्माधवश्चैव मुचकुन्दो महाबलः।
कपिलो मुनि रास्तिकः पंचैते सुख शायिनः।
(9) *वाईट स्वप्ने पडू नयेत या साठीचा मंत्र —*
(झोपण्या अगोदर म्हणावा)
अच्युतं केशवं विष्णुं हरि सोम जनार्दनम्।
हंसं नारायणं कृष्णं जपेत् दुःस्वप्न शान्तये।।
(10) *घराबाहेर पडल्यानंतर, घरी परत येईपर्यंत रक्षण व्हावे यासाठी मंत्र —*
वनमाली गदी शारंगी शंखी चक्रीय नन्दको।
श्रीमान् नारायणो विष्णूर्वासुदेवो भिरक्षतु।।
(11) *मंत्र जप, पूजा, पारायण, नामस्मरण करताना आळस कंटाळा येतो तेंव्हा खालील मंत्र म्हणावा —*
इंद्रनीळ रंग राम शामधाम योगिया।
नामपूर्ण काम सार पार भव रोगीया।। (श्री समर्थ रामदास)
(12) *श्रीमत् वासुदेवानंद सरस्वतींनी श्री मारूतीचा स्मरणमंत्र संध्याकाळी दिवा लावताना म्हणावा असे सांगितले आहे तो मंत्र —*
अंजनी सूता रूद्रावतारा। जय रामदूता भव भय सारा नरसिंह मूर्ते। जय हतभीते।।
(या मंत्राने संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी घरात दुष्ट शक्ती येत नाहीत)
(13) *विवाहितेला किंवा कोणत्याही स्त्रीला घरी मानसिक—शारिरिक त्रास होत असेल तेंव्हा खालील मंत्रविधी करावा, कष्ट जातात —*
दुर्गाआईचा फोटो समोर ठेवून आपल्या वयाच्या दुप्पट जप करावा. उदा. 40 वय असेल तर 80 जप करावा. 108 केल्यास उत्तमच.
सृष्टीदेवी नमस्तुभ्यं अखिलानंद दायिनी।
सौख्यकर्ती दुःखहर्ती महादेवी नमोस्तुते।।
(जप झाल्यावर डोळे मिटून शक्य तितकी मनात देवीची प्रतिमा स्थिरवावी, म्हणजेच देवीचे कळकळून ध्यान करावे, सर्व कष्ट जाऊन, आनंदी वातावरण घरात निर्माण होते)
(14) कोणत्याही जपा अगोदर किंवा मंत्रोपासना नसेल तरीही नित्य म्हणजे रोजच सर्व उपासनेच्या अगोदर श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती प्रणित ‘चित्त स्थैर्यकरं स्तोत्रम्' हे सहा श्लोकाचे स्तोत्र म्हणावेच.
(15) त्रिविध ताप (त्रिविध दुःख) दूर करून मनाला सुख शांति देणारे श्रीमत् वासुदेवानंदांचे ‘शान्ति स्तोत्रम्' चे 900 पाठ अवश्य करावेत. अत्यंत अनुभव सिद्ध स्तोत्र आहे.
- श्रीधरभक्त
© श्रीधर संदेश #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐
प्रसंग परीक्षा घेत जातील,
पण तू भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे..!!!
🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार










