*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२७ मे इ.स.१६६५*
*छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी पत्राद्वारे बोलणी सुरू केली आणि दुसरीकडे विजापूरच्या आदीलशहाशी बोलणी करूण त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मे इ.स.१६७२*
*छत्रपती शिवरायांनी स्वता जातीने मे च्या शेवटच्या आठवड्यात मराठा फौजेसह हरीश्चंद्रगड, चावंडगड, किल्ले हडसर, किल्ले जीवधन आदी गड-किल्ल्यांवर हल्ले केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मे इ.स.१६७४*
*हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेले पत्र*
*राजाभिषेक समयी महाराजांची पाडलेली स्वभाषेतील (लिपीतील) नाणी तसेच प्रचलित पर्शियन / उर्दू शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत / नागरी प्रतिशब्दांचा (राज्यव्यवहार कोश) वापर या क्रांतिकारक व स्वधर्मावरील, स्वभाषेवरील असलेल्या ज्वलंत निष्ठेची उदाहरणे आहेत. राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच ग्रँट डफ तेव्हा दि. २७ मे १६७४ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो, ‘and especially against that wherein it incerted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मे इ.स.१६७६*
*(ज्येष्ठ वद्य दशमी, शके १५९८, संवत्सर नल, वार शनिवार)*
*मोरोपंत पेशवे यांची मोगली साम्राज्याला धडक !*
*मोरोपंत पेशवे यांनी रामनगरच्या राजाला त्याच्या साम्राज्यातून पूर्णपणे हाकलून लावत, मोगलांची पिडौल व पैनेका ही तत्कालीन ठाणी घेतली. या ठाण्यांपासून सुरत अवघ्या ३, तीन दिवसांच्या अंतरावर असल्याने सुरतेत पुन्हा एकदा महाराजांचे सैन्य धडक मारणार अशी अफवा पसरली. व सुरतेत पुन्हा एकदा गोंधळ माजला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मे इ.स.१७०२*
*'दख्खन स्वारीवर' असलेल्या औरंगजेबाने अखेर "किल्ले विशाळगड" ताब्यात घेतला. पन्हाळा, पावनखिंड जिंकुन विशाळगड ताब्यात घेण्यास औरंगजेबास बरोबर १ वर्ष लागले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मे इ.स.१७३९*
*तारापुरचा रणसंग्राम*
*मराठ्यांनी तारापुर किल्ला २४ जानेवारी १७३९ रोजी जिंकला. पाठोपाठ सर्व वसई प्रांत आणि साष्टि प्रांत मराठ्यांचे ताब्यात आला. दि. २७ मे १७३९ रोजी तारापूर किल्ल्याची हवालदारी मोरो नारोसिंह यांस तर फडनिशी महादजी दत्ताजी यांस सोपवण्यात आली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मे इ.स.१८१८*
*परसोजींनी इंग्रजांशी तैनाती फौजेविषयी तह*
*दुसऱ्या राघोजीराजांच्या मृत्यूनंतर (२२ मार्च १८१६) त्यांचा मुलगा परसोजी यांच्या अपंगत्वामुळे भोसले दरबारात वाद निर्माण झाला. कार्यकारी शासक (रिजंट) कोण असावा म्हणून बाकाबाईसाहेब व दुसऱ्या रघुजीराजांचा पुतण्या आप्पासाहेब यांच्यात स्पर्धा सुरू झाली. बाकाबाईसाहेब या दुसऱ्या रघुजीराज्यांच्या तिसऱ्या पत्नी होय. परसोजी यांना १४ एप्रिल १८१८ रोजी समारंभपूर्वक सिहासनावर बसवण्यात आले. परंतु, २७ मे १८१८ रोजी परसोजींनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला आणि नागपूर राज्याचे स्वतंत्र गमावले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मे इ.स.१८२५*
*'डॉ. बरनाडी पेरेस डिसोल्वा' या गोमंतकाला पोर्तुगीजांनी "गव्हर्नर" बनवले, ह्यानेच "तेरेखोलच्या किल्ल्यातुन" पोर्तुगीज सत्तेविरुध्द उठाव केला पण हा उठाव जास्त टिकला नाही. २७ मे रोजी प्रचंड "हत्याकांड" करुन पोर्तुगीजांनी हा उठाव हानून पाडला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
#🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२६ मे इ.स.१६७४*
*(ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, शके १५९६, संवत्सर आनंद, वार मंगळवार)*
*महाराजांनी हेन्री ऑक्झेंडनला भेट दिली!*
*हेन्री ऑक्झेंडनने आणलेला नजराणा महाराजांना व युवराज शंभुराजेंना दिला. नजराण्यात एक खुर्चीही ऐनवेळी हेन्री ऑक्झेंडनने महाराजांना दिली. महाराजांनी नजराण्याचा आनंदाने स्वीकार केला व इंग्रजांनी खुशाल बिनधोक व्यापार करावा असे सांगितले. आपण त्या द्रुष्टीनेच तह करण्यासाठी आलो असे सांगून हेन्री ऑक्झेंडनने इतर देशात मिळतात तशा सर्व सवलती आपल्याही देशात आम्हाला मिळाव्यात अशी महाराजांना विनंती केली. त्यावेळी या संदर्भात हेन्री ऑक्झेंडनने मोरोपंत पेशव्यांशी बोलणी करावी असे महाराजांनी सांगितले व युवराज शंभुराजेंसह ते उठून महालात परत गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मे इ.स.१७२७*
*टिपू सुलतान हा रॉकेटचा शोध लावणारा भारतातला पहिला माणूस होता वगैरे हास्यास्पद थापा आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. वास्तवामध्ये टिपूच्या जन्माच्या कितीतरी आधीपासून हिंदुस्थानात दारूचे बाण ( रॉकेट्स ) वापरात होती. याचं एक ठळक उदाहरणे म्हणजे १६५८ साली औरंगजेब आणि दारा-शुकोह यांच्यामध्ये झालेल्या युद्धात अशा दारूच्या बाणांचा वापर झाला होता. मराठेशाहीत देखील दारूच्या बाणांचा वापर होत असे आणि यातली काही उदाहरणे टिपूच्या जन्माच्या आधीची आहेत.*
*सातारच्या शाहू छत्रपतींच्या २६ मे १७२७ च्या पत्राचे. या पत्राद्वारे शाहू छत्रपतींनी नागपूरकर भोसल्यांकडून काही शस्त्र सामग्री मागवली होती, त्यात दारूच्या बाणांचा उल्लेख आहे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मे इ.स.१७३३*
*पेशवे थोरले बाजीराव यांनी आबाजीपंत पुरंदरे यांना सिद्दी संदर्भात पत्र लिहिले. पत्रात ते म्हणतात,"- सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत. एक अंजनवेल आणि दूसरा उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर उत्तम आहे.*
*सरखेल उंदेरिस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आलीयावर याची किंमत कमी होइल आणि आसराही तूटेल."*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मे इ.स.१७५४*
*मराठे आणि जाट यांच्यात तह झाला. "माधवराव पेशवे यांनी गृहकलह मिटवून विरोधक संपुष्टात आणले होते. पुण्यात राज्य कारभाराची घडी नीट बसवून आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला होता. पानिपतचा पराभव मात्र त्यांना डाचत होता. तो कलंक धुवून काढण्यासाठी त्यांनी परत एकदा उत्तरेकडे लक्ष वळविले. त्यांनी एक मोठी मराठी फौज उत्तरेत पाठविली. मराठे व जाट यांच्यात जो तह झाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मे इ.स.१८१७*
*ईस्ट इंडिया कंपनीने पेशवे दुसरे बाजीराव ह्यांच्याकडून त्रिंबकजीच्या निषेधाचा जाहीरनामा काढून घेतला. कंपनीने रायगड, सिंहगड, आणि पुरंदरचा ताबापण घेतला. (हा नावापुरताच ताबा ठरला कारण पुढे पुन्हा इंग्रजांना हे किल्ले जिंकून घ्यावे लागले!)*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩�
*२५ मे इ.स.१६५८*
*औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह याचे वारसहक्कासाठी समूगढ येथे लढाई झाला ज्यामध्ये दाराचा पराभव झाला पण दाराने तेथून पळ काढला. आणि पुढे काही दिवसांच्या पाठलागानंतर अखेर दारा औरंगजेबाच्या हाती सापडला. ३० आॅगस्ट १६५९ ला त्याची हत्या करण्यात आली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२५ मे इ.स.१६६२*
*(ज्येष्ठ वद्य द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभकृत, वार रविवार)*
*पुणे येथे सुप्या जवळ सरनौबत नेतोजी पालकर यांची नामदारखान, सर्फराजखान यांच्याशी चकमक!*
*सुपे येथे सरनौबत नेतोजी पालकर यांची सर्फराजखान आणि नामदारखान यांच्याशी चकमक उडाली. मराठी फौज काय असते याचा प्रत्यय नामदारखानाला चांगलाच आला. या लढाईत शेवटी सरनौबत नेतोजी पालकर यांना पराभव पत्करावा लागला. मोगलांना थोडी फार लुटही मिळाली. या लुटीची यादी उपलब्ध असून तीत एकूण ६५ वस्तू नोंदविलेल्या आहेत. त्यात १५३ बैल, ८ घोड्या व शिंगरे, ३४ तोळे, ३ मासे रुपे व ७ मासे सोने नमूद केलेले आहे. मोगलांनी आभिमानपुर्वक ही लुट औरंगजेब बादशहाकडे पाठवून दिली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२५ मे इ.स.१६६६*
*छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले असताना एके दिवशी एक भयंकर प्रकार घडला. महाराज आपल्या शामियान्यात आपल्या काही मराठ्यांशी सहज बोलत बसले असता शामियान्याच्या दारावरचे मावळे पहारेकरी एकदम दचकून महाराजांकडे धावले. अन् म्हणाले, ' महाराज , हे पाहा काय! ' महाराज अन् सर्वचजण उठले, दाराकडे धावले. बाहेर पाहतांत तो शेकडो मोगली सैनिक आणि त्यांचा म्होरक्या कोतवाल सिद्दी फौलादखान महाराजांच्या छावणीला सैन्यानिशी गराडा घालीत होता. सुमारे दोन हजार मोगल असावेत. मराठी चिमुकली छावणी गराडली जात होती. कैद! महाराज या गराड्यात कोंडले जात होते. औरंगजेबाने महाराजांना उघडउघड कैद केलं होतं. तुरुंग नव्हता हा. बेड्या नव्हत्या हातात. पण ही कडक कैदच होती. महाराजांना धक्काच बसला. त्यांना भविष्य दिसून आले. पहिला आवेग अनावर झाला. त्यांनी शंभूराजांना पोटाशी कवळीले. एकूणच आपण या आग्रा प्रकरणांत मृत्युच्या जबड्यात अडकलो आहोत याची खात्री झाली. महाराजांची नजर कैद सुरू झाली. तीनशे मावळ्यांच्या मराठी छावणीलाही सैनिकांचा गराडा होता. महाराज, शेजारीच असलेल्या रामसिंगच्या निवासस्थानी या कैदेतुनही जात येत होते. त्यावरही फुलादखानचा पहारा होता. म्हणजेच पळून जाणे संभवतच नव्हते. महाराज चिंतेत पिचून निघत होते. रामसिंग तर दु:खी आणि अगतिक होता. शिवाय त्याच्या डोक्यावर राजपुताचा शब्द म्हणून महाराजांच्या सुरक्षिततेची तुळशीबेलाची पाने हेलावत होती. एकेक क्षण दिवसा दिवसासारखा जड जात होता. महाराजांच्या दोन वकीलांना मात्र छावणीबाहेर कोणाच्या भेटीगाठी किंवा ( गुप्त राजकीय कामेधामे ) यासाठी जाता येत असे. वकील या नात्याने त्यांना मोकळीक होती. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे ते वकील.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२५ मे इ.स.१७३३*
*प्रतिनिधींनी रायगडाला वेढा घातला*
*सिद्धी रसूल १७३३ फेब्रुवारीत मरण पावला, त्याच्या अब्दुल्ला नामक वडील मुलाचा खून झाला. अब्दुल्लाच मुलगा म्हणजे सिद्धीचा नातू अब्दुर्ररहमान घाबरून मराठ्यांच्या आश्रयास आला. सिद्धीवर हल्ला करण्यास ह्या वेळेसारखी दुसरी वेळ पुन्हा येणार नाही हे चाणाक्ष शाहू महाराजांनी ओळखले. लष्करी मोहिमांचा हंगाम संपला होता तरी पण भर उन्हाळ्यात शाहू महाराजांनी दोनफौजा सिद्धीवर रवाना केल्या-एक बाजीराव पेशव्याच्या हाताखाली जंजीरयावर व दुसरी श्रीपतराव प्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली रायगडावर पाठवली. मध्यंतरीच्या काळात पेशव्याने रायगडच्या किल्लेदाराला लाच देऊन किल्ला हस्तगत करण्याचा प्रयत्न करून पहिला, पण बातमी फुटून पाठवलेला पैसा लुटला गेला. साताऱ्याहून पुन्हा पैसे मागवण्यापुर्वीच २५ मे ला श्रीपतराव प्रतिनिधी आपली फौज घेऊन रायगडी दाखल झाला व ८ जूनला त्याने रायगड पुन्हा स्वराज्यात आणला.*
*रायगड मोहिमेवरून बाजीराव व श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यात वादविवाद होऊन काही काळ त्यांचे संबंध बिघडले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२५ मे इ.स.१७८८*
*इस्माईल बेगने भरतपुरास वेढा दिला. दिनांक १ मे १७८८ रोजी मराठे व जाट यांची इस्माईल बेगबरोबर भरतपूरच्या ईशान्येस दोन मैलावर लढाई झाली. पण ती अनिर्णीत राहिली. पुढे इस्माईल बेग व गुलाम कादर यांनी भरतपूर सोडून कुंभेरीस वेढा दिला. तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. नंतर ते तिथून डीगला गेले. पण डीगच्या किल्ल्यातून त्याजवर मारा झाल्यामुळे तो १८ मे १७८८ रोजी पळून गेला. मराठे व जाट यांनी या दोघांचा फत्तेपूर शिक्रीपर्यंत पाठलाग केला. पुढे दिनांक २५ मे १७८८ रोजी गुलाम कादर व इस्माईल बेग यांनी आग्र्याबाहेर सैन्याचा तळ दिला. तळावरून आग्र्यास मोर्चे बसविले व तोफांची मारगिरी करु लागले. तेव्हा मराठा फौजेने त्यांची रसद बंद केली.नइस्माईल बेगचे मथुरा-वृंदावनचे ठाणे जिंकले आणि यमुना नदीपार जाऊन गुलाम कादरचे मोटमहाबन येथील ठाणे व तोफा काबीज करून, पलटण मारून काढिले. याच वेळी गुलाम कादरचे मुलुखात शिखांनी दंगा मांडला होता. यामुळे गुलाम कादरला दोन आघाडीवर लढणे प्राप्त झाले. ह्या परिस्थितीस घाबरून गुलाम कादर दिनांक १५ जून १७८८ रोजी इस्माईल बेगला सोडून फौजेसुद्धा स्वतःचे मुलुखाचे बंदोबस्तासाठी यमुनापार गेला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
#🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२४ मे इ.स. १६४८*
*वीर बाजी पासलकर स्मृतीदिन*
*छत्रपती शिवरायांना धनुर्विद्या शिकवणारे रणझुंझार बाजीकाका पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार. निगडे मोसे गावापासून ते सांगरून डावजेपासून, धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडविण्यात ते हुशार होते. इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या. पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी का सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही ब शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखानाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले. मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२४ मे इ.स. १६७३*
*इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) टॉमस निकल्स किल्ले रायगडावर युवराज शंभुराजे यांची भेट घेतली. युवराज शंभुराजे यांनी मला भेटीकरीता एका ठिकाणी बोलावले. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बसले होते. त्यांनी अनेक इकडचे तिकडचे प्रश्न विचारले. उदाहरणार्थ: इंग्लंडच्या राजाजवळील माणसांची, घोड्यांची, शिपायांची संख्याही त्यांनी विचारली. "समोरच्या झाडाला पाने किती आहेत ? असा उलट प्रश्न मी युवराजांना विचारला 'आणि त्याचप्रमाणे मलाही त्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही असे सांगितले". युवराजांनी माझे काम काय आहे ते समजून घेण्याची इच्छा दर्शवल्याने मी त्यांना क्रमाने कामे सांगितली. ती ऐकून घेतल्यावर "मला या बाबतीत काही करता येत नाही. मी फक्त तुमच्या आगमणाबद्दल वडिलांना कळवितो म्हणजे ते लवकरच येतील. तुमच्या प्रकृतीला ही उंचावरची हवा मानवणार नाही तेव्हा तुम्ही खाली जाऊन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला रहा" असे युवराजांनी सांगितले त्याप्रमाणे मी गेलो.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२४ मे इ.स. १६८५*
*(ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, शके १६०७, क्रोधन संवत्सर, वार रविवार)*
*औरंगजेब बादशहा अहमदनगरहून सोलापूरला पोहोचला. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्या दरम्यानच्या काळात आदिलशाही व कुतुबशाही तरी आपण गिळंकृत करू शकू म्हणजे किमान सांगायला होईल की, दोन्ही शाह्या औरंगजेब बादशहाने संपवल्या. हातात काही नसण्यापेक्षा हे निश्चितच बरे होते. कारण मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा कुठपर्यंत चालेल हे आता दस्तुरखुद्द औरंगजेब बादशहालाच उमजत नव्हते! छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाचे मराठी साम्राज्य गिळंकृत करण्याचे मनसुबे लावले होते. दस्तुरखुद्द औरंगजेब बादशहा अहमदनगरहून कूच करून सोलापुरात दाखल झाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२४ मे इ.स. १७०२*
*२४ मे इ.स. १७०२ च्या एका पत्रानुसार बाळाजीपंत हे सरसेनापती धनाजी जाधवरावांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख येतो. अस्सल मोडीतले देवनागरीत रूपांतर पुढीलप्रमाणे अज स्वारी राजेश्री बालाजी विश्वनाथ दिम्मत राजेश्री सेनापती ताा मोकादमानी कसबा सासवड प्राा पुणे सुरू सलास मया अलफ कसबे मजकूर पैकी घासदाणा स्वार दिले स्वारी मजकूर देणे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२३ मे इ.स.१६७३*
*थॉमस निकल्स हा इंग्रज रायगडावर आला*
*इस १६६१ मधे छत्रपती शिवाजीराजांनी स्वतः जाऊन इंग्रजांची राजापूरची वखार (Factory) यथेच्छ लुटली होती. इतकी की तिथला व्यापारच पुढे पार ठप्प झाला. याचे कारण म्हणजे त्या वखारीचा मुख्य हेन्री रेव्हिंग्टन याने महाराज पन्हाळगडावर जौहरच्या वेढ्यात अडकलेले असताना, जौहरला मदत केली होती व पन्हाळ्यावर तोफा डागल्या होत्या. त्याचीच अद्दल महाराजांनी इंग्रजांना घडवली. तसेच, रेव्हिंग्टन व काही इंग्रजांना पकडून कैदेत टाकले. तसेच त्यानंतरही एकदा सेनापती प्रतापराव गुजरांनी इंग्रजांची हुबळीची वखार लुटली होती.*
*या दोनही लुटींची भरपाई इंग्रज महाराजांकडे बरेच वर्षे मागत होते. पण महाराज त्यांना टोलवत होते. मध्यंतरी इंग्रजांनी छत्रपती शिवाजीराजांचे एक मालाने भरलेले गलबतही राजापूर बंदरात पकडून ठेवले होते. शेवटी सामोपचाराने बोलणी करण्यासाठी १९ मे १६७३ रोजी एकूण ३७ लोकांसह टॉमस निकल्स याला इंग्रजांनी मुंबईहुन रायगडवर पाठवले. २१ मे रोजी निकल्स रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला. महराज त्यावेळी रायगडावर नव्हते म्हणुन मग निकल्सने संभाजीराजांना भेटायची परवानगी मागितली, जी त्याला मिळाली. मात्र २२ मे रोजी खुप पाऊस असल्याने तो रायगडवरती जाऊ शकला नाही. २३ मे रोजी सकाळीच तो रायगड चढुन गेला. रायगडचे त्याने केलेल वर्णन त्याच्या डायरीत आहे ते अगदी वाचण्यासारखे आहे. त्यात तो म्हणतो की, रायगडच्या वाटेत पक्क्या पायर्या खोदलेल्या आहेत. काही ठिकाणी २४ फुट उंचीचा तट बांधला आहे. ४० फुटांवर दुसरी भिंत बांधून हा किल्ला इतका अभेद्य बनवला आहे की, अन्नाचा भरपूर पुरवठा झाल्यास हा किल्ला अल्प सैन्याच्या जोरावरही सर्व जगाविरूद्ध लढू शकेल. पाण्याकरिता मोठे तलाव आहेत व ते पावसाळ्यात भरल्यावर पाणी पुरून उरेल. माथ्यावर जणु मोठे शहरच वसवले आहे. तिथली घरे सामान्य प्रतीचीच व खराब आहेत. अत्युच्च भागी छत्रपती शिवाजीचा चौसोपी वाडा आहे. त्याच्यात बसुन तो कारभार पाहतो. तिथे गेल्यावर मला समजले की, संभाजी अजुन तसा लहान व अननुभवी असल्याने तो महत्त्वाच्या गोष्टी पहात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकारी निराजीने माझ्याकडून काही कापड खरेदी केले ज्याची किंमत मला अजुनही मिळाली नाही! भेटीच्या पहिल्याच दिवशी निकल्सच्या तोंडाला पाने पुसली गेली. छत्रपती महाराजांची माणसेही 'बिलंदर' होती. छत्रपती शिवाजीराजांनी इंग्रजांना पुरते ओळखले होते. एक दोन अपवाद वगळता इंग्रजांशी लढाई न करता महाराजांनी त्यांना शह दिला. छत्रपती शिवाजीराजांचेच इंग्रजांविषयीचे एक वाक्य आहे 'यांचे खाविंद तर प्रत्यक्ष राज्यकर्तेच आहेत आणि राज्य करणाऱ्यास स्थललोभ नाही ऐसे काय घडो पाहते?... राज्याचा लोभ मेलियाने सोडायचे नाहीत.'*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ मे इ.स.१६७४*
*( वैशाख वद्य त्रयोदशी, शके १५९६, संवत्सर आनंद, शनिवार )*
*महाराजांची भेट घेण्याचा हेन्री ऑक्झेंडनचा प्रयत्न!*
*हेन्री ऑक्झेंडनने निराजीपंतांच्या मार्फत महाराजांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्याभिषेकाच्या पुर्वतयारीत महाराज एवढे व्यस्त होते की, लगेचच महाराजांची भेट त्याला मिळू शकली नाही. परंतु महाराजांना भेटीची सर्व कहाणी सांगितल्यानंतर महाराजांनी दि. २६, मे इ. स. १६७४ रोजी भेट देण्याचे कबूल केले व तोपर्यंत त्याची पाहुणा म्हणून सर्व बडदास्त ठेवण्याचे आदेश निराजीपंतांना दिले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ मे इ.स.१६८१*
*मुंबई बंदरात इंग्रजांच्या आश्रयाने राहून मराठी मुलखाला त्रास देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजानी आपला वकील पत्र देऊन मुंबईला पाठवला होता आणि त्यांना असे कळवले होते की इंग्रजांनी सिद्दीला मदत करणे ताबडतोब थांबवावे अन्यथा संभाजीराजे मुंबईवर स्वारी करतील. महाराजांचे वकील आवजी पंडित मुंबईत पोहोचताच सिद्दीने भीतीने आपले आरमार मुंबई बंदराच्या बाहेर नेले. आवजी पंडित मुंबईत ५ महिने ठाण मांडून राहिल्याने इंग्रज आणि सिद्दी या दोघांनाही जरब बसली व त्यांच्या हालचाली थंडावल्या. पाच महिन्यांचा मुक्काम संपल्यानंतर संभाजी महाराजांचे वकील रायगडावर परत जायला निघताच इंग्रजांनी त्याच्याबरोबर शंभुराजेंच्या साठी १५० रुपयांचा नजराणा व वकीलासाठी ३ वार स्कारलेट देण्याचे ठरवले. वकील आवजी पंडित हे नजराणे व महाराजांच्यासाठी पत्रे घेऊन जून महिन्याच्या सुरुवातीला रायगडाकडे गेले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ मे इ.स.१६८२*
*मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी अहमदनगरला रहुल्लाखानाची नेमणूक!*
*इ.स.१६८१ व इ.स.१६८२ मध्ये सुद्धा अहमदनगरवर वरचेवर हल्ले करीतच होते. २३ मे इ.स.१६८२ रहुल्लाखानाची नेमणूक तेथे मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी झाली. मराठ्यांनी अगदी त्या सुमारासच अहमदनगरवर हल्ला चढविला. हसनअलीखानाने दिलावरखान आणि शेखजी या दोघांना पाठविले. कालव्याजवळ लढाई झाली. मराठ्यांना यश आले नाही. मराठ्यांनी पळविलेली जनावरे व सामान परत मिळविले. अहमदनगरसाठी औरंगजेब बादशहाने आधिक चांगली उपाययोजना करावयाचे ठरविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ मे इ.स.१७२९*
*पेशवे "थोरले बाजीराव" यांनी अलाहबादचा सुभेदार 'मुहम्मदखान बंगश' याचा दारुण पराभव केला.*
*खान मोठे सैन्य घेऊन 'बुंदेलखंडावर' चालून आला तेव्हा राजा "छत्रसाल" याने "थोरल्या बाजीरावांची" मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, 'जो गति ग्राह गजेंद्रकि सौ भई हे आज..... बाजी जात बुंदेलकी राखो बाजी लाज'. आपल्या २५,००० घोडदळासकट बाजीराव त्याच्या मदतीस धावून आले, सर्वप्रथम खानची संपुर्ण रसद तोडून त्याला मुघल बादशहाकडून कुठलीच मदत मिळु दिली नाही. जयपुरकडून खानाचा मुलगा "कैमखान" बापाच्या मदतीस धावून आला पण "थोरल्या बाजीरावांनी" त्याचा पराभव केला. आता 'बंगशखानने' पुर्णपणे शरणागती पत्करली व "राजा छत्रसाल" वर पुन्हा आक्रमण करणार नाही असे कबुल करुन आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी झाला. "राजा छत्रसालने" बाजीरावांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना काल्पि, झांशी, सागर, सिरोंज, हरदेनगर यांचा वार्षिक महसुल " ३३ लक्ष " बहाल केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ मे इ.स.१७९०*
*इस्माईल बेग आणि मारवाडची फौज १ होऊन मराठ्यांशी लढण्यास आली. ६ तास जोराची लढाई झाली. संध्याकाळ झाली तरी वेगाने आपली फौज माघारी नेली. द बुआन्य परत आला. महादजी शिंदे यावेळी दिल्लीत "बादशहा" कोणाला करावयाचे या गडबडीत होते. कारण गुलाम कादरच्या प्रकरणात शहाआलम आंधळा झाला होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२२ मे इ.स.१६३२*
*मुलुख मैदान तोफ विजापूरला नेहली...*
*बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर परंडा हा अहमदनगरच्या निजामाकडे आला. तेव्हा इ.स. १६२८ ते १६३० च्या दरम्यान शहाजीराजांनी मुर्तुजा निजामाला गादीवर बसवून येथूनच कारभार चालविला. त्यामुळे जिजाबार्इंच्या रूपाने छत्रपतींचे वास्तव्य परंड्यात राहिले होते. अहमदनगरच्या निजामशाहीच्या काळातच येथील २६ बुरुजांवर विविध तोफा ठेवण्यात आल्या. यापैकी मलिक- इ-मैदान, कसाब, खडक अझदहपैकर या महत्त्वाच्या तोफा असून आज भारतातील नावाजलेली विजापूरच्या सर्जा बुरुजावरील मुलुखमैदान (मलिक-इ-मैदान) तोफ १६३२ पर्यंत परंड्याच्या बुरुजावर होती. साधारणपणे २२ मे १६३२ ला विजापूरच्या आदिलशहाचा दिवाण मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची ही तोफ विजापूरला नेली. त्यापूर्वी नगरचा दिवाण मलिक अंबरने सोलापूरवर तिचा वापर केला होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२२ मे इ.स.१६७३*
*इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) टॉमस निकल्स याने युवराज शंभुराजेंना भेटण्याची परवानगी मिळाली. महाराज गडावर नसल्यामुळे टॉमस निकल्सने युवराज शंभुराजेंना भेटण्याची परवानगी मागितली. ती लगेच दिली गेली. पण खुप पाऊस पडत असल्याने टॉमस निकल्स किल्ले रायगडावर इच्छा असूनही जाऊ शकला नाही.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२२ मे इ.स.१६७४*
*( वैशाख वद्य द्वादशी, शके १५९६, संवत्सर आनंद, शुक्रवार )*
*हेंन्री आक्झेंडेन किल्ले रायगडावर दाखल !*
*कालच शिवाजीराजे महाराज प्रतापगडावरून परतल्याचे कळताच हेन्री पुन्हा शिवरायांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील झाला. गड चढून यावे असा हुकूम मिळाला. बलदंड रायगडची अभेद्यता, मजबुती, आणि खडा गड जिंकणे अशक्यप्राय का असते याची प्रचिती त्याला आली. एक प्रहरानंतर तो रायगडावर पोहोचला. हेनरी आॕक्झीडेन सांगतो कि गडफितुरीखेरीज अभेद्य असुन राजमहाल, दरबार, प्रधानांची घरे मिळून ३०० इमारती आहेत. याची नोंद घेता शिवरायांना राजधानी म्हणून निर्माण "रायगडनगर" करायचे होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२२ मे इ.स.१६८१*
*(ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार रविवार)*
*गोव्याच्या गव्हर्नरचे अधिकृत वकील पाठविण्याविषयक पत्र!*
*गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद याने डिचोलीचे हवालदार संभाजी अनंत यांस १ पत्र लिहिले असून मागे रामजी ठाकुर नावाच्या वकील म्हणवणाऱ्याबाबत जी फसवणूक झाली ती पुन्हा होऊ नये. म्हणून त्याने हे पत्र लिहिले असून त्यात तो लिहीतो की, मी गोव्याबाहेर असल्याकारणाने छत्रपती संभाजी महाराजांच्या वकीलाबाबत माझ्या हवालदाराने जे पत्र मला पाठविले त्याचे उत्तर मी तुम्हास पाठवू शकलो नाही. आपण सांगता त्याप्रमाणे आपल्या वकिलाजवळ अधिकृत कागदपत्रे नसतील तर प्रस्तुत वकिलाशी मला राजनैतिक बोलणी करता येणार नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांकडून त्याने बोलणी करण्यासंबंधी अधिकृत कागदपत्रे, दस्त आणावयास हवेत, मागे रामजी ठाकुर यांच्या बाबतीत जे घडले ते पुन्हा घडावयास नको. या सर्व गोष्टीची पुर्तता झाली की मला कळविणे त्यानंतर मी माझे अधिकृत आज्ञापत्र पाठवेन.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२२ मे इ.स.१६८४*
*औरंगजेबास सिकंदर अदिलशहाने लिहीलेल्या पत्राचा सारांश!*
*दिलेरखानाने घेतलेला ऐवज परत मिळावा. सर्जाखानाला घालविले म्हणजे तो छत्रपती संभाजी महाराजांस मिळेल. त्याऐवजी त्याला क्षमा करावी. उलट त्याला फौज देऊन मराठ्यांचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पारिपत्य करण्यास त्याला वापरू. सर्जाखानाचे जहागिरीचा मुलुख आपल्याकडे आला आहे तो सांगोला व मंगळवेढा इ. परत द्यावा. शहजादा व त्याच्या सरदारांनी केलेली ठाणी उठवावी. माझे मुलुखातील वसूल मला द्यावा म्हणजे मी मराठ्यांचे पारिपत्य करेन. पातशहांनी आपल्या फौजा आपल्या मुलुखात चाकणकडच्या बाजूकडून शत्रूवर सोडाव्यात. छत्रपती संभाजी महाराजांकडे माझा गेलेला मुलुख मला देण्यात यावा. छत्रपती संभाजी महाराजांचे पारिपत्य केल्यावर माझ्या मुलुखात कोणतीही लढाई होऊ नये. छत्रपती संभाजी महाराज शरण आल्यावर माझा त्यांच्याकडे गेलेला मुलुख मी त्यांचा घेतलेला मुलुख परत करून त्यांच्याशी सख्य ठेवता येईल".*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२२ मे इ.स.१६९४*
*'झुल्फिकारखान' याने "जिंजीचा" आजुबाजूचा प्रदेश काबिज करण्यास सुरवात केली, कित्येक लहान-मोठी स्थळे त्याने घेतली. "त्रिचनापल्लीचा नायक" व "तंजावरचा शहाजी" यांचा खानापुढे 'निरुपाय' होवून ते खानास शरण गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२२ मे इ.स.१६९९*
*छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कर्नाटक युद्धप्रसंगी वीरमरण प्राप्त झालेले मराठा सरदार विठोजी घोरपडे यांचे पुत्र उदाजी घोरपडे यांना हिम्मतबहाद्दर ही पदवी देऊन मानाची वस्त्रे देऊन सरदारकी बहाल केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२२ मे इ.स.१७३९*
*एप्रिल १७३९ मध्ये श्रीमंत बाजीराव पाटसला असतानाच उत्तरेतून खबरगीर तातडीने दाखल झाले. इराणचा नादिरशहा खैबरखिंडीतून थेट दिल्लीवर आक्रमण करण्याच्या बेतात होता. बाजीरावांनी सातारला स्वार पाठवून शाहूमहाराजांची परवानगी घेतली आणि आपल्या फौजेला तयार करण्याचा हुकूम शनिवारवाड्यावर पाठवला. फौज तयार झाली. श्रीमंत बाजीरावांनी आपल्या स्वारांना पुढे पाठवून सर्व राजपूत व बुंदेले, जाट इत्यादी सरदारांना तयार राहण्यास सांगितले. याच वेळेचा फायदा घेऊन थेट दिल्ली हस्तगत करावी असा बाजीरावांचा डाव होता. परंतु, सैन्याची जमवाजमव होऊन सैन्य बाहेर पडेपर्यंत इकडे नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केले. परंतु, दिल्लीत आल्यानंतर सगळ्या राजपूतांनी युद्धाची जय्यत तयारी ठेवलेली असून ते बाजीरावांच्या येण्याचीच वाट पाहात आहेत, हे नादिरशहाला समजले. त्याच्या तोंडचे पाणीच पळाले. घाईघाईने आपल्या मर्जीतल्या महंमदशहाला दिल्लीच्या तख्तावर बसवून नादिरशहा इराणला निघून (पळून!) गेला. बाजीरावांना फार वाईट वाटले. वास्तविक यावेळेस दिल्ली जिंकता येऊ शकली असती. आता काही करता येत नव्हतं. इथून तिथून सारे बादशहा सारखेच! बाजीरावांनी केवळ उपचार म्हणून नवीन बादशहाला अभिनंदनाचा खलिता आणि नजराणा पाठवला. बादशहानेही कृपा म्हणून मानाचा पोषाख, संपूर्ण सुवर्णालंकारांनी मढवलेला घोडा व हत्ती आणि पूर्वीचे सारे अधिकार कायम ठेवले. हे शाही फर्मान स्वीकारण्यासाठी बाजीरावांना दि. २२ मे १७३९ रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर उर्फ जैनाबाद येथे जावे लागले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२१ मे इ.स.१६७२*
*कुतुबशहाकडून खंडणी घेऊन निराजीपंत किल्ले रायगडी परतले. कुतुबशाहीत सत्तासंघर्ष सुरू होता. त्यावेळी महाराजांनी लगेच निराजीपंत यांना गोवळकोंड्यास रवाना केले. महाराजांनी निराजीपंतांमार्फत अबुल हसनला गादीवर आणण्यासाठी प्रयत्न केला असावा. त्यामुळेच नव्या कुतुबशहाने महाराजांना सालीना १ लक्ष होनांची खंडणी कबूल केली. इतकेच नाही तर ६६ हजार २ नगदी निराजीपंतांसोबत लगेच पाठवूनही दिले. कुतुबशहाकडून ६६ हजाराची खंडणी घेऊन निराजीपंत किल्ले रायगडी परतले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२१ मे इ.स.१६७४*
*महाराज किल्ले प्रतापगडावरून किल्ले रायगडी परतले. १९ मे इ.स. १६७४ महाराज श्रीभवानीस सव्वा मण सोन्याचे छत्र अर्पण करण्यास किल्ले प्रतापगडावर गेले होते महाराज किल्ले प्रतापगडावरून किल्ले रायगडी परतल्याचे वृत्त ऑक्झेडनला कळले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२१ मे इ.स.१६७५*
*(ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार शुक्रवार)*
*महाराजांनी कारवारचा फार मोठा प्रांत स्वराज्यात दाखल!*
*किल्ले फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला. तीन हजार ३००० मराठा घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले. २६ एप्रिलच्या सुमारास मराठ्यांच्या सेनापतीने कारवारवर हल्ला चढवून तेथे लुटालूट केली. अंकोला व कोंद्रा किल्ल्यांनाही मराठ्यांनी घेरले. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात २१ मे इ.स.दरम्यान अंकोला व शेवेश्वर किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. अंकोला येथे झालेल्या लढाईत बाजी सर्जेराव जेधे यांनी तरवारीची कमाल केली. कोंद्रा, कारवार हेही महाराजांनी जिंकून घेतले. व कारवारपर्यंतचे विजापुरी कोकण पावसाळ्यापुर्वीच हिंदवी स्वराज्यात दाखल झाले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२१ मे इ.स.१६९८*
*छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी कागलकर घाटगे घराण्यातील राजसबाई यांना २१ मे १६९८ रोजी पुत्रप्राप्ती झाली नाव संभाजी (दुसरा) ठेविले. संभाजी महाराजांनी कोल्हापूर राज्याची स्थापना केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२१ मे इ.स.१७४८*
*बाळाजीच्या वेळी जयपूर, उदेपूर, जोधपूर, बुंदी, कोटा इ. राजस्थानातील राज्यांत विलक्षण अंतर्गत कलहामुळे शिंदे –होळकरांविषयी तेथील राजांची मते विपरीत बनली. १७४८ पासून दक्षिणेतील घडामोडींत पेशवा गुंतला होता. आसफजाह निजाम –अल्-मुल्क २१ मे १७४८ रोजी मरण पावला. तदनंतर पेशवा-निजाम संघर्ष पुन्हा सुरू झाला. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (१५ डिसेंबर १७४९) रामराजा नानासाहेबाच्या मदतीने छत्रपतींच्या गादीवर आला. त्याने छत्रपती शाहूच्या याद्यांप्रमाणे बाळाजीच्या हाती सर्व कारभार सोपविला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२१ मे इ.स.१७८६*
*२१ मे १७८६ रोजी मराठ्यांनी टिपूचा बदामीचा किल्ला काबीज करून त्याच्यावर चांगलीच कुरघोडी केली. ह्या प्रसंगी स्वतः नाना फडणीस मोहिमेत हजर होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२० मे इ.स.१४९८*
*पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२० मे इ.स.१६६४*
*जसवंतसिंहाने किल्ले सिंहगडाच्या डोंगरावरून तोफखाना खाली उतरविला. जसवंतसिंहाचा किल्ले सिंहगड-वेढा "बादशाही थाटात" सुरूच होता. ५ महिने उलटले. मराठे अजुनही त्याला दाद देत नव्हते. अखेर जसवंतसिंहाने "सुलतानढवा" म्हणजे निर्वाणीचा हल्ला चढविण्याचा निश्चय केला. त्यानुसार जय्यत तयारी करून गुरूवार दि. १४ एप्रिल इ.स.१६६४ पुर्ण शक्तीनिशी जसवंतसिंहाने किल्ले सिंहगडाच्या तटावर तोफांसह हल्ला केला. पण मराठ्यांनी तिखट प्रतिकार करून शेकडो मोगल व राजपूत कापून काढले. त्यातच नशिबानेही जसवंतसिंहाचा घात केला. अचानक दारूचा स्फोट झाला आणि त्यात अनेक मोगल सैनिक ठार झाले. अपयशामुळे जसवंतसिंहाचे माथे पार भडकून गेले. प्रचंड नामुष्की पदरात पडली. सुलतानढवा नाकामियाब झाला. अशावेळी पराभवाचे खापर आपला श्यालक राव भावसिंह हाडा याच्या माथी फोडून जसवंतसिंह मोकळा झाला. मानी स्वभावाच्या भावसिंहाला हा आरोप सहन झाला नाही. त्यातूनच दोघांचा कडाक्याचा वाद जुंपला. अखेर तणतणत जसवंतसिंहाने किल्ले सिंहगडाच्या डोंगरावरून तोफखाना खाली उतरविला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२० मे इ.स.१६६५*
*किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२० मे इ.स.१६८१*
*शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!*
*"हिंदुस्थानातील त्या राजश्रेष्ठाने छत्रपती संभाजी महाराजांनी या माझ्या पत्रांत लिहील्याप्रमाणे वागावे म्हणजे लौकिक जगात (आणि धार्मिक द्रुष्टीने) त्यांचा सुलौकिक होईल. यापूर्वी मी तुम्हाला एक पत्र पाठविले होते. ते बहुतेक मिळाले नसावे. नाही तर तुम्ही त्याचे उत्तर पाठविले असते. आता मी येऊन पोहोचेपर्यंत तुम्ही पत्रे पाठविण्यात कसूर करू नये. त्या एकनिष्ठ छत्रपती संभाजी महाराजांची वार्ता ऐकण्यासाठी मला, दिर्घ काळापासून उत्कंठा लागली आहे. आधिक काय लिहीणे ? तुम्हाला भेटण्याची आतुरता आहे". हे पत्र शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना लिहीले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२० मे इ.स.१६८२*
*छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२० मे इ.स.१७६६*
*मल्हारराव होळकर यांचे निधन*
*( जन्म - १६ मार्च १६९३ ) पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.*
*छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२० मे इ.स.१८१८*
*इंग्रज अधिकारी "क्याप्टन स्कॉटने" 'बल्लारपुरच्या किल्ल्याला' खिंडार पाडुन प्रवेश केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२० मे इ.स.१८१८*
*यश मिळवण्याचा निश्चय करुन "मेजर एल्ड्रिजने" आपल्या फौजेनिशी "किल्ले शिवनेरी" व "जुन्नरच्या गढिवर"आक्रमण केले व 'शिवनेरी' बरोबर 'जुन्नरच्या गढिवर' ताबा मिळवला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१९ मे इ.स.१५२०*
*रायचूरची लढाई*
*विजयनगर सम्राट कृष्णदेवराय आणि विजापूरचा इस्माईल आदिलशाह यांच्यात रायचूर येथे युद्ध, यात आदिलशहाचा सपाटून पराभव. विजयनगर साम्राज्याचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि उत्कृष्ट नेतृत्व याचे प्रतीक म्हणजे रायचूरची लढाई. शत्रूचेही डोळे दिपावेत इतके प्रचंड लष्कर राजधानीतून लढाईसाठी बाहेर पडले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१९ मे इ.स.१६६६*
*(वैशाख वद्य एकादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)*
*महाराजांची सुटकेसाठी वेगळी खेळी!*
*महाराजांना आपल्या सुटकेची कुठलिही शक्यता दिसून येत नव्हती. महाराजांनी एक वेगळीच खेळी खेळायला सुरुवात केली. त्यांनी शहरातील अमीर उमराव, आधिकारी, हिंदु सरदार, मंत्री, व्यापारी यांना भेटून आपल्या विषयी जनमत तयार करण्यास सुरुवात केली. मात्र, आपल्या नजरबाजांमार्फत आग्र्याच्या दरबारात काय घडते याची चाचपणी सुद्धा सुरू केली. औरंगजेब बादशहाचा वजीर जाफरखान याने महाराजांचा अर्ज औरंगजेब बादशहाला सादर केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१९ मे इ.स.१६७३*
*शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग*
*""पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.*
*नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल!* *रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. हाली उनाळ्याला आहे. कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील. आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो.''*
*शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये. शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो. शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१९ मे इ.स.१६७३*
*इंग्रजांचा वकील टाॅमस निकल्स महाराजांना भेटण्यास किल्ले रायगडाकडे रवाना!*
*सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी हुबळीला इंग्रजांची वखार लुटली. त्यामुळे इंग्रज फार चिडले आणि त्यांनी महाराजांचे मालवाहू व्यापारी गलबत मस्कतहून राजापुरला चालले होते, ते लुटले आणि महाराजांकडे आपले हुबळीच्या लुटीची नुकसान भरपाई करण्याची मागणी करण्यासाठी, "वाघजी दलाल" हा वकील पाठविण्याचे ठरले. पण पुन्हा विचार बदलून आपलाच इंग्रज वकील निकल्स याला शामजी नावाचा एक व्यापारी व ३७, सदतीस अन्य व्यक्ती बरोबर देऊन पाठविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१९ मे इ.स.१६७४*
*छत्रपती शिवाजी महाराज रायगडहून प्रतापगडास १६ मे आले. प्रतापगड येथे ते ३ दिवस राहिले आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस सव्वा मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित करून राजाभिषेकाआधी देवीचा आशीर्वाद घेतला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१९ मे इ. स. १६७४*
*( वैशाख वद्य नवमी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार मंगळवार, ) रोजी इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री आक्झेंडन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामी!*
*विजापुरकर, जंजिरेकर, पोर्तुगीज यांना स्वपराक्रमाने महाराजांनी वठणीवर आणलेले होते. महाराजांच्या महापराक्रमाने धास्तावलेले तहाची बोलणी करण्यासाठी विजापुरकरांचे अनेक वकील महाराजांकडे येऊ लागले होते. जंजिरेकर सिद्दीही इंग्रजांच्या मध्यस्थीने तहाची याचना करीत होता. पोर्तुगीज महाराजांच्या संभाव्य आक्रमणामुळे विलक्षण धास्तावलेले होते आणि इंग्रजांनी तहासाठी हेन्री आॅक्झेडन यांस नजराणा देऊन राज्याभिषेकाच्या मुहुर्तावर किल्ले रायगडी रवाना केले होते. हेन्री आॅक्झेंडन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे पोहोचला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१८ मे इ.स.१६५९*
*छत्रपती शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकराची अफजलखानाच्या कैदेतून सुटका केली*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ मे इ.स.१६६६*
*(वैशाख वद्य दशमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)*
*काबूल मोहीम बारगळली!*
*काबूल मोहीम तर बारगळली मात्र, याचे काही श्रेय हे औरंगजेब बादशहाचा वजीर जाफरखानाला देखील जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाफरखानाची भेट स्वतः त्याच्या घरी जाऊन घेतली व त्याला मोठा नजराणा दिला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ मे इ.स.१६८२*
*(वैशाख वद्य ७, सप्तमी, शके १६०४, दुदुंभी नाम संवत्सर, वार गुरुवार)*
*स्वराज्याचे तिसरे वारसदार शाहुराजेंचा जन्म!*
*(मृत्यू १५ डिसेंबर १७४९) स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे वा स्वराज्यसंकल्पीका आऊसाहेब यांच्या प्रेरणेने स्वराज्यनिर्माते शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण करण्याचा पाया रचला, स्वराज्य निर्माण केले, ते निर्माण केलेले स्वराज्य रक्षीण्याचे शिवकार्य स्वराज्यरक्षक शिवपुत्र शंभूराजांनी, येसूबाईसाहेबांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी केले. पुढे या स्वराज्याचा विस्तार संताजी धनाजी सारख्या मातब्बर सरदारांच्या मदतीने ज्यांनी उत्तर भारत, मध्यभारत, गुजरात , माळवा पर्यंत केला ते स्वराज्यविस्तारक म्हणजे शंभुपुत्र छत्रपती शाहु महाराज. यांचा जन्म १८ मे १६८२ झाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ मे इ.स.१६८२*
*म्हैसुरच्या "चिकदेवराय" कडून मराठे पराभूत झाले पण 'मुदेरच्या नायकावर' मराठ्यांनी विजय मिळवला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
📜 *१८ मे इ.स.१६८४*
*शहजादा रामघाटाने वर येऊ लागला तेव्हा 'मरीचा रोग' उत्पन्न होऊन त्याच्या सैन्यातील बरेचसे लोक मृत्युमुखी पडले, घोडे, हत्ती, उंट इतके मेले कि त्यांची दुर्गंधीने सारा प्रदेश दुषित होऊ लागला. जनावारे मेल्याने सर्वांवर पायी चालण्याची पाळी आली. आपल्या पुत्राची बातमी ऐकून बादशहाने त्यास नवीन सरंजाम पाठवला. व आजच्या दिवशी होते नव्हते सर्व गमावून शहजादा 'अहमदनगर' येथे आपल्या पित्याजवळ पोहचला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ मे इ.स.१७२४*
*जंजिऱ्याचा सिद्दी हा मोगलांचा अंकीत होता. तेव्हा त्याने जिंकलेले किल्ले आणि मुलूख बादशहाने त्याजकडून मराठ्यास मिळवून द्यावेत अशी अट बादशहा व शाहू महारांज यामध्ये जो १८ मे १७२४ मध्ये करार ठरला त्यामध्ये होती. [बादशहातर्फे दक्षिणेतील सुभेदार मुंबीझखान व श्रीमंत बाजीराव पेशवे यांमध्ये तहाच्या वाटाघाटी झाल्या होत्या] त्या अटीनुसार जंजिऱ्याच्या सिद्दीकडे मराठ्यांनी सिद्दीच्या ताब्यात असलेल्या आपल्या किल्ल्यांची व मुलखाची मागणी केली. सिद्दीने ती मागणी झिडकारून लावली. ही मागणी पुरी करून घेण्याकरिता श्रीमंत बाजीरावांस जंजिऱ्याच्या सिद्दीवर स्वारी करावी लागली. ही सुद्धा मुलूखगिरीची स्वारी होय. या स्वारीत जंजिऱ्याच्या सिद्दीचा पराभव होऊन त्यास मराठ्यांचा मुलूख व किल्ले परत करावे लागले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*⛳जय गडकोट⛳*
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा













