⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*७ मार्च इ.स.१६४७*
*इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*७ मार्च इ.स.१६४७*
*आदिलशाहीशी आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादाजींना स्पष्ट दिसत होते. मनातून ते निराश झाले होते. राजांच्या किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण होत आले होते. रोहिडेश्वरांची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यांवरच्या तोफांनी बुरूज सजले होते. राजांची शिबंदीही आता मोठा आकार घेत होती. रोहिडेश्वरावर जमा केलेली हजार-बाराशे मावळेफौज पाच-सहा हजारावर गेली होती. व्याप वाढत होता. त्याबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. मुख्य चिंता होती दादाजींच्या आजारपणाची. दादाजींचे वय झाले होते. आणि आजारपण चालू होते. त्यांना रात्रीची झोप लागत नसे. दादाजींना आठवले की आपण पारस परगण्याचे मलठाण गावचे हिशेबनीस. शहाजीराजांनी आपल्या कारभारासाठी आपणांस उचलले. महाराज साहेबांचा विश्वास बसला, पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादाजींना आज्ञा केली. शहाजीराजांच्या ह्या विश्वासामुळे आदिलशाहीच्या दरबारचासुद्धा दादाजींच्यावर भरवसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींना आपले मरण जवळ आल्याचे समजले, त्यांनी जहागिरीच्या हिशेबांच्या वह्या शिवाजीराजांस दाखविल्या. हळूहळू ते थकत चालले. अंथरुणातून उठण्याची शक्तीसुद्धा त्यांच्यात राहिली नाही. दादोजी घाबरे झाले आणि त्यांनी प्राण सोडला. (इ. स. ७ मार्च १६४७)*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*७ मार्च इ.स.१६७३*
*वीर कोंडाजी फर्जंद यांचा महापराक्रम*
*किल्ले पन्हाळा जिंकण्यासाठी केवळ ६० मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूच्या २५०० ते ३००० फौजेविरूद्ध लढा देऊन फक्त ३ तासात ती लढाई व किल्ला जिंकणारे वीर कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा... जगाच्या इतिहासात एवढ्या कमी सैन्याने एवढ्या जास्त सैन्याचा कमीत कमी वेळेत केलेला हा एकमेव पराक्रम...*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*७ मार्च इ.स.१६८०*
*( फाल्गुन वद्य द्वितीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, रविवार )*
*राजाराममहाराजांची मुंज झाली :-*
*दिलेर खान प्रकरणानंतर शंभूराजे स्वराज्यात परतले. शंभुराजांची पन्हाळगडावर भेट घेऊन सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढे काय आणि कसे करायचे याच विचारात शिवरायांनी पन्हाळगड सोडला व समर्थांना भेटायला सज्जनगडावर गेले. भेट घेऊन महाराज रायगडावर परतले आणि आजच्या दिवशी राजाराममहाराजांची मुंज महाराजांनी उरकून घेतली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*७ मार्च इ.स.१७६०*
*मराठ्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे प्रवास*
*काबूलच्या अब्दालीचा पराभव करण्यासाठी, पेशव्यांनी (नानासाहेबांनी), एक मोहीम आखली, आणि या मोहिमेच नेतृत्व शूरवीर व राजनीतीधुरंधर श्रीमान सदाशिवरावभाऊ यांना दिलं. दि. ७ मार्च १७६० ला, सदाशिवरावभाऊ ४८ हजार फौझेसह, फ्रेंच्याच्या आधुनिक तोफखान्यासह आणि विश्वासू सरदारांसह दिल्लीच्या संरक्षणासाठी निघाले. मार्गात सैन्य जमा होत होतं.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*६ मार्च इ.स.१६६६*
*(फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार)*
*औरंगजेबाचे अभयपत्र!*
*महाराजांना जिविताची हमी देणारे अभयपत्र मिळाले. महाराजांनी बिनघोर आग्रा येथे यावे हा औरंग्याचा डाव मात्र केवळ स्वराज्याखातर आणि मिर्झाराजे जयसिंगच्या शब्दावर विसंबून महाराजांनी जिवाचा धोका पत्करला होता. स्वतःबरोबर युवराज शंभुराजेंना घेऊन जात दुहेरी धोका महाराजांनी स्विकारला होता. नियती मात्र महाराजांची परीक्षा घेत होती.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*६ मार्च इ.स.१६७२*
*१६७२ मध्ये घोडबंदरवर स्वारी करून पोर्तुगीझांची वसाहत काबीज करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसी प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईकर इंग्रज घाबरून शिवाजी महाराजांची मर्जी संपादण्याच्या उद्योगास लागले. सख्य जोडण्यासाठी मिस्टर उस्टिक यास रायगडावर पाठविण्याचे कंपनीने ठरविल. राजापूरलुटीची भरपाई करून घेणे, हा तहाचा एक हेतु होता. २२ फेब्रुवारी रोजी मुंबईकरांनी ठरविले की शिवाजी महाराजांस स नजराणा देण्यासाठी ६०० रु. व शिवाजीच्या सरकारकुनांसाठी १५० रु. खर्च करावेत. उस्टिकने आपल्याबरोबर दहा भंडारी, दोन इंग्रज, दोन घोडे, पालखीचे भोई व दोनशे रुपये रोकड घ्यावी. उस्टिक रायगडावर का जात आहे, या बाबत गुप्तपणा राखावा; जाहीर करणेच झाले, तर राजापूरच्या वखारीची व गलबतांची नुकसानभरपाई करून घेण्यासाठी त्यास पाठवीत आहोत, एवढेच सांगावे असे कंपनीने ठरविले. उस्टिकने ६ मार्च १६७२ रोजी रायगडवर जाण्यास मुंबईहून निघाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*६ मार्च इ.स.१६७३*
*विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात आहे हे कळल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाठविले. कोंडाजींनी आपल्या बरोबर मर्द मराठे ६० मावळे घेतले. दिनांक ६ मार्च १६७३ रोजी रात्री ते दोऱ्यांवरून किल्ल्यावर चढले. भेद यशस्वी होऊन ते वर जाऊन पोचले, तेव्हा किल्ल्यांतील लोक सावध होऊन त्यांजवर चालून आले. इतकी कडी गस्त ठेऊनही शत्रू आला कसा हेच कोणाला समजेना. शत्रू अफाट असावा असे त्यांस वाटले. भयंकर लढाई जुंपली. कोंडाजींनी एकदम किल्लेदारावर तलवार उगारून चाल केली. दोघांचे अटीतटीचे तुंबळ युद्ध झाले. कोंडाजींनी किल्लेदाराचे मुंडके उडविले. किल्लेदार गडावरच्या राजवाड्यापुढे ठार होऊन पडला. अवघ्या दोन-तीन तासात पन्हाळा किल्ला मराठ्यांनी जिंकला. स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या ‘पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान' या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. महाराज रायगडावर होते. त्यांजकडे जासूद पाठविला. ही आनंदाची बातमी महाराजांस २ दिवसांनी कळली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*६ मार्च इ.स.१७२८*
*निजामाचा पराभव, मराठ्यांबरोबर मुंगी-शेगावचा तह*
*निजाम-उल-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या.... निजामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येऊन निजामाच्या सैन्याने त्यांचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला.... असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निजामाचा हा डाव पूर्ण होत आला होता बाजीरावांनी त्यास भीक न घालता निजामालाच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निजामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली.... निजामास ही खेळी अनपेक्षित होती त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते आता बाजीरावांच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निजाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला....*
*बाजीरावांनी औरंगाबादचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसन होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावांनी निजामास नाशिककडे ओढत नेले अवजड तोफखाना, बोजड चिलखती घोडदळ यामुळे निजामाचा तोटाच झाला....*
*राऊंनी अगदी नियोजन बद्धतेने निजामाला पालखेडला आणले पूर्वनियोजित योजने प्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह बाजीरावांनी पालखेडला बोलून घेतले होते....*
*आता मराठ्यांकडे अंदाजे ५०००० सैन्य जमले होते नगर पासून मराठा हेरांच्या टोळ्या निजामाच्या आस-पास होत्या त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर बाजीरावांना टाकोटाक मिळत होती....*
*पालखेड वैजापुरच्या पूर्वेला १२ मैल तर औरंगाबाद पासून २८ मैलावर आहे पूर्वेला पाण्याचा साठा आहे त्याच बाजूला आपले सैन्य घेऊन राऊ होते Horse Shoe अर्थात घोड्याच्या नालेसारखी व्यूह रचना करून निजामाला खेचत आणून कोंडीत पकडले....*
*औरंगाबादकडे झेपावणारे बाजीराव (राऊ) आणि त्यांना तेथे पोहचण्या अगोदर रोखण्याच्या इराद्याने निघालेला निजाम यांची टक्कर २५ फेब्रुवारी १७२८ ला पालखेडला झाली मराठ्यांनी निजामाचे पाणी रोखले, रसद तोडली....*
*अर्जुनाच्या दिव्यास्त्रां प्रमाणे प्रभावी असलेला निजामाचा प्रसिद्ध तोफखाना नगरला गंजत पडला होता आता त्याचा ह्या आणीबाणीत निजामाला काहीच उपयोग नव्हता मराठ्यांना तोफांनी भाजण्याचे स्वप्न मनात मांडे खाणाऱ्या निजामाचे पुर्णपणे भंगले होते....*
*आणि भयानक वास्तव मृत्यू बनून पालखेडला त्याच्या समोर उभे होते पालखेडला कोंडीत सापडलेल्या निजामाचे अनन्वित हाल होऊ लागले भूक, तहान आणि समोर असलेले मराठे यांच्या कात्रीत सापडलेल्या निजामावर आणि त्याच्या फौजेवर जिवंतपणीच स्वतःचीच कबर खोदण्याचा प्रसंग आला....*
*या सर्व बिकट परिस्थितीमुळे अखेर निजामाने ईवाझखाना मार्फत तहाचे बोलणे चालवले अखेर ६ मार्च १७२८ मुंगी-शेवगावला तह झाला....*
*त्यानुसार निजामाला खालील अटींचे पालन करणे बंधनकारक होते -*
*१.छत्रपती शाहूराजे हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निजामाने व पर्यायाने मोघल सम्राटाने मान्य केले....*
*२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला....*
*३.मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या....*
*४.महसूलाची थकलेली रक्कम निजामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले....*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*६ मार्च इ.स.१७३९*
*चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इ.स १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रयामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते... १२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला....*
*वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना “धारावी किल्ला” जिंकून घेणे आवश्यक होते म्हणून ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला त्यानंतर पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८ च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला पुन्हा चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला....*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*६ मार्च इ.स.१७७५*
*रघुनाथरावांनी दि. ६ मार्च १७७५ रोजी इंग्रजांशी पेशवाई पुन्हा मिळवून देण्याबाबत तह केला. यानुसार इंग्रजांना त्यांनी वसई, साष्टी, ठाणे इ. प्रदेश देण्याच्या करारावर सह्या केल्या. हाच तो दुर्दैवी असा प्रख्यात 'सुरतेचा तह'!*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*५ मार्च इ.स.१६५९*
*छत्रपती शिवरायांच्या तलवारीचा खरा इतिहास*
*छत्रपती शिवजी महाराजांच्या हातात जी तलवार होती तीच तलवार म्हणे छत्रपती शिवरायांना आई भवानी ने दिली ??*
*तस काही नाही. शिवरायांनी हिंदूधर्म नुसार शस्त्र पुजन करून तिचे नाव ठेवले भवानी तलवार तलवारीचा खरा इतिहास असा......*
*दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार युरोपियन व्यापाऱ्याने विक्रीस ठेवली होती. या तलवारीची खासियत छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती. तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते... अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती. याशिवाय तलवारीची धार अफलातून होती. तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची. वजनाने हलकी, धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती. त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली. (३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार, तिची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते (इन्कम अॅन्ड एक्स्पेंडीचर अकौंट) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबाद गोंधळ माजू नये, भाकड कथा रचल्या जाऊ नये यासाठी प्रबंध करून ठेवला आहे. पण तरीही प्रतीक्रांतीवाद्यानी छत्रपती शिवरायांचे दैवीकरण केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*५ मार्च इ.स.१६५९*
*कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि कुडाळकर सावंतांमधील तहनामा - ता. ५ मार्च १६५९*
*श्री सन १०६८ फसली तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे. कलम १ किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे. कलम १ स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे. कलम १ प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे. कलम १ प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. कलम १ शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब."*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*५ मार्च इ.स.१६६०*
*पन्हाळ्यात सिद्दी जौहरने वेढा घातला तेव्हा इंग्रज अधिकारी हेन्रीने आपल्या बरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जौहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या स्वत: तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता. नंतर यांचाच काटा काढण्यासाठी १८५२ च्या फाल्गुन वद्यात महाराजांनी राजापुरावर स्वारी करून ते लुटले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*५ मार्च इ.स.१६७३*
*कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली. ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*५ मार्च इ.स.१६७७*
*(फाल्गुन शुद्ध एकादशी, शके १५९८, संवत्सर नल, वार सोमवार)*
*महाराजांनी मादण्णापंतांच्या मातोश्रींची भेट घेतली.*
*महाराजांना मादण्णापंतांनी आग्रहाने आपल्या घरी नेले. आकण्णापंत व मादण्णापंत यांच्या मातोश्री भागम्मादेवी यांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून महाराजांना भोजन वाढले. महाराजांच्या महत्वाच्या मुत्सद्दयांनाही भोजनार्थ निमंत्रित केले गेले होते. त्याचबरोबर साऱ्यांचा अलंकार, वस्त्रे, घोडे देऊन आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सत्कार केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*५ मार्च इ.स.१७७८*
*कोल्हापूरकरांचा तह*
*फेब्रुवारीमध्ये सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*५ मार्च इ.स.१८७९*
*१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी १८७९ मध्ये लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*४ मार्च इ.स.१६६०*
*छत्रपती शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले. स्वतः शिवाजीराजे पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते. जोवर महाराज पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती महाराज आखणार होते. कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते. अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ मार्च इ.स.१६७७*
*(फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५९८, संवत्सर नल, वार रविवार)*
*महाराजांच्या भेटीला आकण्णापंत आणि मादण्णापंत!*
*छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या भेटीस जाताना कुठल्याही प्रकारची लुट न करता शांतपणे येत असल्याचे पाहून कुतुबशहा निष्चितपणे संतोष पावला. आपले पाहुणे म्हणून त्यांच्या अर्थात महाराजांच्या सत्कारार्थ सामोरा येण्याची तयारी करू लागला. कुतुबशहा सामोरा येतोय, लागलीच महाराजांनी निरोप धाडला की, "तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ मी धाकटा भाऊ आपण पुढे न येणे". अर्थात या निरोपाने बादशहा अजून संतोष पावला. त्याने आकण्णापंत आणि मादण्णापंत यांना हुकूम केला की, "खासे आपण जाऊन महाराजांचे स्वागत करावे". त्याबरहुकूम आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सन्मानाने महाराजांना सन्मानपुर्वक शहरात नेले. या पहिल्याच भेटीत महाराजांनी कुतुबशहाचे मन जिंकून एक नवा मित्र जोडला!*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ मार्च इ.स.१६८७*
*निळोपंतांनी सर्जेराव जेधे यांस पाठविलेल्या पत्राची नोंद! सर्जेराव जेधे यांस अभय देण्याचे वचन दिले. सर्जेराव जेधे यांसाठी मोरोपंतांच्या पायाची शपथ वाहिली आणि कौल दिला. निळोपंत पेशव्यांनी जेधे घराण्यास माफ करून तुम्ही स्वराज्याची एकनिष्ठेने सेवा करावी आणि आमच्यावर पुर्ण भरवसा ठेवावा असे कैलासवासी मोरोपंत पिंगळे यांची शपथ घेऊन आश्वासन दिले. जेधे घराणे किती बहुमोलाचे होते ही गोष्ट यावरून लक्षात येते. त्यांचे स्वराज्यात राहणे किती महत्त्वाचे होते हे यावरुन लक्षात येते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ मार्च इ.स.१७०१*
*पोर्तुगालच्या राजाने एक आज्ञापत्र जाहीर केल्याची नोंद!*
*हिंदुंनी पोर्तुगालच्या राजास अर्जावर अर्ज पाठविण्याचा सपाटा सुरू केला. त्याला यश येऊन पोर्तुगालच्या राजाने एक आज्ञापत्रानुसार जाहीर केले की हिंदूंना ४ भिंतीच्या आत होम हवनाधी विधीनुसार लग्ने लावण्याची मुभा राहील. परंतु ही सवलत इंक्विझिशनच्या नियमांना बाधक हीती म्हणून गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास तसे कळविले. पोर्तुगालात इंक्विझिशनचा वरचष्मा असल्याने पोर्तुगालच्या राजास त्याचा विरोध पत्कराने अशक्य होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ मार्च इ.स.१७०६*
*छत्रपती शिवरायांचा संदेश, त्यांनी दिलेली स्पूर्ति, त्यानी तयार केलेली ही माणसं. एक मोठ नेता नाही, पण सामुदायीक नेतृत्व त्यांनी उभं केलं. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांची घोडदौड जी अशी चालली की, ४ मार्च १७०६, रोजी धनाजी जाधवांने गुजराथचे द्वार मराठ्यांना मोकळं करून दिलं.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ मार्च इ.स.१७३९*
*मराठ्यांनी कारंजा (उरण) बेट जिंकले*
*मानाजी आंग्रे ४ मार्च १७३९ रोजी आपल्या आरमारातील ४० गलबतां मधून २००० हजार शिबंदी सह फिरंगी प्रतिकार मोडून काढत कारंजा बेटावर उतरले. बेटावर अदीच आपले माणसे पेरून मराठ्यांनी जवळ जवळ ७००-८०० स्थानिक आंग्र्यांना आपल्या बाजूस वळवले होते. हा सर्व प्रकार पाहून पोर्तुगीज कप्तान जोसे लुई द सिल्वा ह्याच्या पाचावरच धारण बसली. बघता बघता पूर्ण कारंजा बेट ताब्यात घेत लगेच दुसऱ्या दिवशी मराठे द्रोणागिरी गडास बिलगले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ मार्च इ.स.१८१८*
*इंग्रजांनी विसापूर जिंकला*
*जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*३ मार्च इ.स.१६६५*
*(फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १५८६, क्रोधी संवत्सर, वार शुक्रवार)*
*मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील ३ वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहीस्तेखानाची बोटे कापली, सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दीष्ट स्पष्ट कळविले होते. त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ मार्च इ.स.१६८९*
*(फाल्गुन वद्य ७, सप्तमी, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)*
*छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मारण्याचा निर्णय पक्का!*
*औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्णय पक्का केला, कारण हे औरंगजेबाच्या राज्यारोहणाचे ३२, बत्तीसवे वर्षे होते. आजच औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. योगायोग हा की ३ मार्च इ.स.१६८९ रोजी बरोबर ३२ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा निर्णय पक्का झाला. औरंगजेबाने भिमा कोरेगाव जवळ छावणी करून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना "फतवा" काढला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ मार्च इ.स.१७००*
*छत्रपती राजाराम महाराज जिंजी च्या वेढ्यातून सुटून आल्यानंतर राजाराम महाराजांनी मोंगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोंगल अगदी हैराण होऊन गेले होते. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवरावांच्या मावळी तुकड्या मोंगलांची अक्षरशः लांडगेतोड करत होत्या. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी कोकणात उतरून आपल्या सागरी किल्ल्यांची पाहणी केली. कोकण किनारा अजूनही अजिंक्यच होता. राजाराम महाराज सिंधुदुर्गावर आले. महाराष्ट्राची ही 'शिवलंका' अभेद्य होती. महाराज आग्र्यात अडकले असतानाच हा दागिना घडवलेला होता. राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पित्याच्या, श्री शिवछत्रपतींच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावरच 'शिवराजेश्वर' मंदिराची निर्मिती केली. यानंतर दुर्दैवाने केवळ दोनच वर्षात, गेली काही वर्षे होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे आणि दगदगीमुळे दि. ३ मार्च १७०० या दिवशी या तरुण राजाचा, वयाच्या केवळ २९ व्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ मार्च इ.स.१७१९*
*दिल्लीच्या लालकिल्ल्यात शाही दरबार भरला. वजीर हसनअली सय्यदाने लहानग्या रफिउदौरजतला तख्तावर बसवले व कामकाजाला सुरुवात झाली. आधीच ठरल्याप्रमाणे सय्यद बंधूंनी शाहूमहाराजांबरोबर झालेल्या तहनाम्यावर नव्या रफिउदौरजत बादशहाची संमती सनद उमटवली होती. दरबारात चौथाईच्या सनदा जाहीरपणे शाहूमहाराजांचे विश्वासू व मराठी राज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या हाती मोठ्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या. बाळाजीपंतांनी लवून बादशहाला मुजरा केला व सनदापत्रे ताब्यात घेतली. मुजरा करताना बाळाजीपंतांच्या मनात काय आले असेल? 'हे सिंहासन हिंदूंचे आहे. इंद्रप्रस्थच्या या भूमीत महाराजा युधिष्ठिराने राज्य केले आहे. आज त्याच सिंहासनावर हे परके तुराणी बसलेत. हा मुजरा या बादशहाला नसून अजातशत्रू युधिष्ठिराला आहे, भगवान श्रीकृष्णाला आहे, प्रभू श्रीरामाला आहे. थोरल्या शिवछत्रपतींनी हे इंद्रप्रस्थचे सिंहासन आपल्या स्वराज्यात आणण्याचे स्वप्न बघितले. लवकरच त्यांचे ते स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू. मला जमले नाही तर माझा मुलगा, माझा नातू ते पूर्ण करेल.' इतर लहान-मोठ्या कारभारानंतर दरबार संपला. नंतर दि. १५ मार्च रोजी परत दरबार भरवून सरदेशमुखी व स्वराज्याच्या अधिकृत सनदा याचप्रमाणे पेशव्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आल्या. यानंतर लगेचच पाच दिवसांनी दि. २० मार्च १७१९ रोजी ५० हजार मराठी फौज राजमाता येसूबाईसाहेब व इतरांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाटेत नरवरपाशी आल्यानंतर बाळाजीपंत आपले थोरले पुत्र व अंबाजीपंतांना सोबत घेऊन काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. इतर फौज नरवरहून दक्षिणेच्या मार्गाला लागली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ मार्च इ.स.१७३९*
*सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दिनांक ३ मार्च सन १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ मार्च इ.स.१७८९*
*दिल्लीवर मराठा भगवा झेंडा गुलाम कादरने दिल्लीत जो हैदोस घातला त्यांच्या बातम्या महादजींच्या कानावर आल्या महादजींनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली राणेखान, जिवबादादा बक्षी, रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले... एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लुट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली मराठा फौजांनी गुलाम कादरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली गुलाम कादराने अहिल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून मदतीची याचना केली पण गुलामाच्या पापाचे घडे आता भरून आले होते..... गुलाम मेरठमध्ये कोंडला गेला त्याच्या घोसगडा कडील रस्त्यावर मराठा फौजा आल्या गुलाम तहाची बोलणी करावयास लागला मराठयांना तो जिवंत पाहिजे होता.... गुलाम कादर शामली जवळ मराठा सैन्याच्या हातात जिवंत सापडला पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली नाझीर खोझा, विलासराव, मणियारसिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या... अखेर गुलामाचे डोळे काढून बादशाहाकडे पाठविण्यात आले ३ मार्च रोजी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला बादशाह शाहआलम ला परत दिल्लीच्या तख्तावर बसविण्यात आले खर्च काढून इतर लुट महादजींनी दिल्लीला पाठवली.... "मराठा फौजांच्या या कामगिरीने बादशाहाने त्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किलल्यावर लावण्यास परवानगी दिली हा मराठा झेंडा पुढची पंधरा वर्ष म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता"...*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ मार्च इ.स.१७९३*
*श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब (पत्नी) रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना तीन-चार महिने ताप येत असताही कोणास निदान झाले नाही. यानंतर एक महिन्याच्या अवधीतच, दि. ३ मार्च १७९३ रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्नसमारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारण्याच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ मार्च इ.स.१८१८*
*सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात*
*गडावर २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी १८१८ असा ५ दिवस प्रिट्झलरने तुफान तोफगोळ्यांचा मारा केला. उपलब्ध कागदपत्रांनुसार, ह्या ५ दिवसात हॉवित्झर आणि मोर्टर्समधून १४१७ आणि १८ पौंडी तोफांमधून सुमारे २३०० गोळे गडावर डागले गेले. ६ पौंडी अथवा १२ पौंडी गोळ्यांच्या गणतीचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात नाहीये पण जर त्या तोफा वर चढवल्या गेल्या होत्या म्हणजे त्या वापरल्या नक्कीच गेल्या होत्या. गडावरूनही इंग्रज र्न मारा होत होताच.*
*१ मार्च १८१८ ला गडावरून तहाचे पांढरे निशाण फडकवण्यात आले. तोफांचा मारा दोन्ही बाजूने थांबवण्यात आला. गडाचा ताबा घेण्याची बोलणी करायला प्रिट्झलर काही सैन्य घेऊन गेला होता. तहाच्या अटी किल्लेदाराकडे देऊन इंग्रज खाली उतरले. त्यानंतर ३ तासांत गडावरून काही उत्तर न आल्याने इंग्रजांनी तोफांचा मारा पुन्हा सुरु केला गेला. शेवटी ३ मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला. गडावर ५० लाख रुपयांची लूट आणि एक गणेशाची सुवर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२ मार्च इ.स.१६६०*
*(चैत्र प्रतिपदा, शके १५८२, संवत्सर, शार्वरी, वार शुक्रवार)*
*महाराज पन्हाळगडास आश्रयास!*
*अफजलखानाच्या (३२, दातांच्या राक्षसी बोकडाच्या वधानंतर) महाराजांनी अफजलखान मुलखात त्राही माजविली. आदिलशहाकडून महाराजांच्यावर पुन्हा एकदा सिद्धी जौहर हा कसलेला पठाण, आक्रमणासाठी निघाला. मात्र, त्याचा धोकाओळखून महाराजांनी सिद्धी जौहर जास्त पुढे सरकता कामा नये म्हणून पन्हाळगडावर महाराज आश्रयास आले. जेणेकरून, जौहरचे आगमण थेट स्वराज्यात न येता कोल्हापुरच्या पन्हाळगडापर्यंत सीमित राहिल.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ मार्च इ.स.१६८७*
*औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता. तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ मार्च इ.स.१७५६*
*इ.स. १७५६ सुमारास , गुजरात प्रांताच्या दक्षिण सीमाभागातील 'वासदे'/'बासदा' ह्या संस्थानच्या राजपरिवारात गृहकलह होता. त्यामुळे राज्याच्या 'गादीवर' बसण्याच्या अधिकाराबाबत पेच/वाद निर्माण झाला होता. ह्या कारणास्तव राजपरिवारातील दावेदार श्री राऊल उदयसिंह यांनी पुण्याला येऊन श्रीमंत पेशव्यांच्या दरबारी ही व्यथा मांडली व त्यावर धर्मशास्त्र व न्यायशास्त्र अनुसार निर्णय देण्यास विनंती केली. त्यावेळी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे 'कारभारी' त्र्यंबकराव मामा पेठे यांनी हे प्रकरण हाताळले व स्वतः लक्ष घालून, धर्म - न्यायशास्त्र अनुसार योग्यता जाणून घेऊन, पेशव्यांच्या संमतीने , श्री राऊल उदयसिंह यांची स्थापना वासदे संस्थानच्या गादीवर केली.*
*परिणामी, राजे राऊल उदयसिंह यांनी पेच सुटल्याबद्दल व त्र्यंबकराव पेठे यांनी केलेल्या कार्याची उतराई म्हणून व पेशव्यांशी स्नेहसंबंध कायम राहावे ह्याकरिता , स्वतःच्या खुशालीने आपल्या राज्यातील मौजे 'माणकुन्या' हे गाव दरोबस्त वंशपरंपरागत इ.स. २ मार्च १७५६ रोजी त्र्यंबकरावांना इनाम करून दिले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ मार्च इ.स.१७८१*
*आपल्या इतिहासामध्ये जिजाऊमाँसाहेब आपल्याला माहीत होत्याच, त्यानंतर ताराराणीसाहेब आम्हाला माहीत आहेत. परंतु मराठा राज्याचे रूपांतर साम्राज्यात करणाऱ्या शाहू महाराजांच्या आईसाहेब आणि संभाजी महाराजांच्या पत्नी "त्यागमूर्ती येसूबाईसाहेब" आमच्या लोकांना माहीत नव्हत्या ज्या आत्ता कुठे माहीत झाल्या. अहिल्याबाई होळकर आहेत, दुसऱ्या जिजाबाई साहेब आहेत अशा अनेक पराक्रमी स्त्रिया ज्यांनी इतिहासाला कलाटणी देणारे कार्य केले. परंतु अशा अनेक स्त्रिया अजूनही आहेत ज्यांचा इतिहास आम्हा सामान्य माणसाला माहीत नाही. अशाच एक पराक्रमी स्त्रीची ओळख (इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना नक्कीच माहीत असेल )* *त्या पराक्रमी स्त्रीचे नाव म्हणजे "श्रीमंत महाराणी, बाकाबाईसाहेब भोसले" यांचा जन्मदिन. दुसरा रघुजीराजे भोसले यांची पत्नी. मराठ्यांच्या इतिहासात नागपूर हे ठिकाण खूप महत्वाचे. नागपूरचे राज्य स्थापन करणारे प्रथम रघुजीराजे भोसले. ज्यांनी स्वकर्तृत्वावर प्रचंड दौलत निर्माण केली. दुसरे रघुजी भोसले (इ.स. १७८८ ते इ.स. १८१६) यांच्या काळात १८०३ पर्यंत भोसल्यांच्या सत्तेचा सुवर्णकाळ होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ मार्च इ.स.१७९५*
*खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड,तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ मार्च इ.स.१८१८*
*इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१ मार्च इ.स.१५७२*
*प्रतापसिंह महाराणा झाला*
*प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ मार्च इ.स.१६३०*
*मुघल बादशहा "शाहजहान" हा मोठ्या फौजेसह "बुऱ्हानपूर" येथे येऊन दाखल झाला, यावेळी थोरले महाराज "शहाजीराजे" हे आदीलशाहीत सरदार होते.*
*त्यांना ही बातमी समजताच ते "राजमाता जिजाऊ" व १० दिवसाच्या बाल शिवबाला सोडून "किल्ले शिवनेरी" वरून निघाले व आदीलशाही दरबारात हजर झाले. खानजहान लोदी व निजामशाहीविरूद्ध मोहिमेसाठी शाहजहानने १४ डिसेंबर १६२९ ला आग्रा सोडले. बुऱ्हाणपूरजवळच्या असीरगढला त्याचा तळ होता. दख्खनचासुभेदार इरादतखानकडे त्याने पन्नास हजारांचे सैन्य दिले, त्याला आझमखान हाकिताब देण्यात आला. २३ फेब्रुवारी १६३० ला ह्या सैन्याने लोदी वनिजामशाहीविरूद्ध मोहिम सुरू केली. त्यानंतर १ मार्च १६३० रोजी शाहजहान बुऱ्हाणपूरला पोहोचला. इथे रावरतनच्या हाताखाली दहा हजारांचे दळ बनवले. वाशीमची बाजू धरून ठेवणे व तेलंगाण नियंत्रणाखाली आणणे ही दोन उद्दिष्टे त्यांना दिली होती.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ मार्च इ.स.१६३३*
*महाबतखानाने "दौलताबाद (किल्ले देवगिरी) ला वेढा दिला.*
*महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला. १ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला आणि १७ जून १६३३ रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले. निजाम हुसेनशहा आणि त्याचा वजीर फत्तेखान दोघेही कैदेत पडले. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाकडे सरदार होते. या लढाईत शहाजीराजांनी व निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला. मराठा सत्ता स्थापण्याची ही संधी साधुन शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवधन किल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षांचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले. शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहाला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून ३ वर्ष राज्यकारभार केला. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे ही यामागे भावना होती. पुढे मोगलांनी आदिलशाही बरोबर तह करून निजामशाहीवर चाल केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्याशी शहाजीराजानी ६ मे १६३६ ला तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली. त्यामुळे शहाजी राजांचा हा स्वराज्याचा प्रयत्न असफल ठरला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ मार्च इ.स.१६४१*
*(फाल्गुन अमावस्या शके १५६२, संवत्सर विक्रम, वार सोमवार)*
*महाराज जिजाऊ साहेबांसह बंगळूरला.*
*छत्रपती शिवरायांना व माँ साहेब जिजाऊंना स्वराज्य सकल्पक राजे शहाजीराजे यांनी बंगळूरला बोलाऊन घेतल्यामुळे महाराज आणि जिजाऊ मॉसाहेब वर्षभर बंगळूर मुक्कामी. राजे शहाजीराजे यांनी इथे मात्र, शिवरायांच्या शिक्षणाची व युद्धकलेच्या प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. राजे शहाजीराजे यांच्या तालमीत ्तयार होत होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ मार्च इ.स.१६८०*
*औरंगजेब दक्षिणेत उतरताच त्याने मराठी राज्यावर आक्रमण सुरू केले. औरंगजेब बादशहा आपला नाश करण्यासाठी दक्षिणेत येत आहे हे संभाजी महाराजांना समजले होते म्हणून त्यांनी युद्धाची तयारी केली. मोठमोठ्या गडावर साठे करून ठेविले. नाशिक जिल्ह्यातील बागलणांचा प्रदेश मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचे औरंगजेब बादशहाने ठरविले आणि आपले लक्ष बागलणांकडे वळविले. त्यासाठी औरंगजेब ने दिनांक १ मार्च १६८० रोजी खानजहान बहादूर यास छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले किल्ले ताबडतोब मोगलांच्या ताब्यात घेण्याचा हुकूम दिला. लगेच त्याने अहिवंत किल्ल्यास वेढा घातला. पण मराठ्यांनी तो वेढा मारून काढला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ मार्च इ.स.१७७९*
*बारभाई कारस्थान - पुरंदरचा तह*
*उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ उभा राहिला होता.[१] नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, "रघुनाथरावाला काढून टाकू नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले." यालाच बारभाई कारस्थान म्हणतात.[२] ह्यातच सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेचे प्रमुख म्हणून ठेवावे असे ठरले हो. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असे उघड राजकारण सुरू झा. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. या लढाईत त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला. रघुनाथराव आणि बारभाई यांच्यात बरेच वर्षे संघर्ष चालू होता. रघुनाथरावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला. रघुनाथरावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईनी इंग्रजांशी १ मार्च १७७९ रोजी पुरंदरचा तह केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१६४४*
*शहाजीराजे व आदिलशाहीतमधे तडे...*
*रणदुल्लाखानच्या मृत्यूनंतर शाहजी व आदिलशाहतील अंतर वाढत गेले १२ मार्च १६४३ ते २८ फेब्रुवारी १६४४ च्या मधे कधीतरी रणदुल्लाखानचा मृत्यू झाला ह्यानंतर आदिलशाही दरबारात मुस्तफाखानचा दबदवा वाढला मुस्तफाखान बरोबर शाहजीराजेंचे फारसे चांगले संबंध नसावेत शाहजीराजेंला ह्यामुळेच चिंता वाटू लागली...*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१६७२*
*( फाल्गुन शुद्ध एकादशी, शके १५९३, विरोधकृत, बुधवार )*
*साल्हेर मुल्हेर जिंकले :-*
*दिलेर खानाला कडवा शह प्रतापराव गुजर काकांनी दिला. उघड्या मैदानावरील मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी लढाई. साल्हेर पुन्हा स्वराज्यात दाखल, २०,००० मोगलांना कंठस्नान घालून दिलेर खानास मराठ्यांचे सणसणीत उत्तर!*
*या युद्धात मराठयांकडून, मोरोपंत पिंगळे काका प्रतापराव गुजर काका मकाजी आनंदराव काका व्यंकोजी दत्तो काका कृपाजी काका भोसले सिधोजी काका निंबाळकर खंडोजी काका जगताप गोदाजी काका जगताप संताजी काका जगताप नानाजी मोरे काका विसाजी काका बल्लाळ सूर्यराव काकडे काका सहभागी झाले होते. सूर्यराव काकांना ह्या युद्धात वीरमरण आले होते. आपल्या सैन्याची होणारी दाणादाण पाहून दिलेर खान चांदवडला पळून गेला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१७१४*
*लोहगडाच्या जवळ पेशवे व आंग्रे यांच्यात लेखी तह झाला. तो तहनामा असा - "थोरातांशी अपक्रिया करू नये. भाकर दिली आहे ती त्यांनी घ्यावी. कोकणची मसलद दसऱ्यापासून मार्गशीर्षापावेतो तुम्ही राहून प्रतिवर्षी करावी. हबशी-फिरंगी मारून गर्देस मिळवावे. राजमाची, श्रीवर्धन, मनरंजन, मृगगड, कोथळा आम्हांकडे (शाहूमहाराजांकडे) द्यावे. लोहगड, तुंग, कोरीगड सामानासहित तुम्हांकडे (आंग्र्यांकडे) घ्यावे.* *तुम्हांकडील चाकर आम्ही न ठेवावा व आम्हांकडील तुम्ही न ठेवावा. खाजगत गाव तुम्हाकडे आहेत ते चालवावे. १. पणवेली (पनवेल), १ शिरढोण, १ सोमाटणे, १ तळे घरचे किल्ले यास तुम्ही राजकारण करून घेतले तर आमचे स्वाधीन करावे. कुलाब्यास जाताच बहिरोपंत पिंगळे व चिटणिसांना कैदेतून मुक्त करावे. सातारियाहून महाराजांकडून कान्होजींना पूर्वीप्रमाणेच सरखेल किताब बहाल करावा. त्याउपर कान्होजींनी कोल्हापूरकरांचा पक्ष सोडावा. शाहूछत्रपतींनी १६ सबघड (डोंगरी किल्ले) व १० अवघड (जलदुर्ग) असे एकूण २६ किल्ले आंग्र्यांना बहाल करावेत व त्याभवतालचा एकूण २४ लक्ष होनांचा मुलुख कान्होजींना सरंजामाकरता मिळावा. या डोंगरी किल्ल्यांमध्ये कोथळीगड, बहिरवगड (ढाक बहिरी?), रायगड, व्यंकटगड, भिरागड, माणिकगड, रसाळगड, सागरगड, पालगड, खारेपाटण, राजापूर, कामते, अंबरगड, साठवली, श्रीवर्धन व मनरंजन असे १६ गिरीदुर्ग होते तर जलदुर्गांमध्ये खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अवचितगड, देवगड, फत्तेगड, जयगड, यशवंतगड आणि कनकदुर्ग यांचा समावेश होता. कान्होजींकडे हा सारा प्रदेश आल्यावर त्यांची ताकद कैक पटींनी वाढली. याच वेळेस महाराजांनी आंग्र्यांना दिलेल्या काही मुलुखापैकी सुवर्णदुर्ग, श्रीवर्धन व मनरंजन (राचमाची) हे किल्ले जंजिऱ्याच्या सिद्दी याकुतखानाच्या ताब्यात होते. पेशवे व आंग्रे यांच्या संयुक्त फौजांनी हे किल्ले अगदी थोड्या अवधीतच जिंकले. त्यामुळे सिद्दी याकुतखान पुरता घाबरला. आत्तापर्यंत हा कान्होजी एकटाच होता. पण आता साताऱ्याचा पेशवाही त्याच्या बरोबर आहे. आता आपल्याला काहीही करून त्यांना रोखायलाच हवे, या विचाराने याकुतला ग्रासले. शेवटी दि.३० जानेवारी १७१५ रोजी सिद्दीने कान्होजी आंग्र्यांशी म्हणजेच सातारा दरबाराशी तह केला. कान्होजी आंग्रे व पेशवे बाळाजी विश्वनाथ एकत्र झाले. बाळाजीपंतांनी आपल्या हुशारीने कान्होजींना पुन्हा शाहू महाराजांकडे वळते केले हे पाहून इंग्रज, पोर्तुगीज, मोंगल, सिद्दी या सर्व परकीय सत्तांची पाचावर धारण बसली. हे महत्त्वचे काम केल्याने शाहूंचा बाळाजी पंतांवरचा विश्वास कैकपटीने वाढला व परिणामी दरबारातही बाळाजी विश्वनाथांचे वजन इतर मानकऱ्यांच्या तुलनेत वाढले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१७१९*
*दि. २३ फेब्रुवारीला सैय्यद बंधू व बादशहात वाटाघाटी झाल्या. त्या नेमक्या कोणत्या ते माहीत नाही. परंतु, यानुसार मदनसिंहाला मोंगलांनी मुक्त केले. दि. २८ फेब्रुवारीला हुसेनअलीची फौज दिल्लीत घुसली. यात महम्मद अमीन खान व मराठ्यांची झटापट झाली. दुर्दैवाने या लढाईत बाळाजी महादेव फडणीस (भानू) आणि संताजी भोसले मारले गेले. फर्रुखसियरने पुन्हा आपला शब्द फिरवला. त्याने शाहू महाराजांच्या मातोश्री व इतर परिवाराची सुटका करण्यास नकार दिला. आता मात्र सय्यद बंधू भडकले. त्यांनी लालकिल्ल्यातच सैन्य घुसवले व फर्रुखसियरलाच बेड्या ठोकल्या. सय्यदबंधूंनी फर्रुखसियरचा चुलतभाऊ रफिउदौरजत याला ताबडतोब दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१७४०*
*वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या कराराची नोंद!*
*तद्नंतर सावंतांनी बार्देश महाल आणि पनाळे बेट पोर्तुगीजांना परत केले, तर पोर्तुगिजांनी खोर्जुवे बेट आणि पिर्ण हे गाव सावंतांच्या ताब्यात दिले. वरील तह छत्रपती शाहू महाराजांचे एक मंत्री नारोराम यांच्या विद्यमाने पार पडला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१७५७*
*अब्दाली गोकुळ मथुरेच्या दिशेने पुढे गेला. काही दिवसांपूर्वीच राघोबादादांनी येथील यात्रांसाठी करमाफी मिळवली होती. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान गोकुळात होळीचा उत्सव सुरू असताना पठाणांची स्वारी आली आणि होळीच्या रंगात रक्ताचे पाट वाहू लागले. यमुनेचे पात्र लालीलाल करून सोडले. रस्त्यातून प्रेताचे ढीग इतके पडले की, चालावयास वाट मिळेना. भरतपूर, दिग, कुंभेरी हे वास्तविक लुटण्याचा अब्दालीचा इरादा होता. परंतु सूरजमलने वकिली आणि युद्धाचीही तयारी दाखवून त्यास आपल्या प्रांतापासून दूर ठेवले. मथुराही प्रदेश जाटांचाच. परंतु मोकळ्यावर असल्याने आणि अपुरी शिबंदी असल्याने तो पठाणांच्या तडाख्यात सापडला. आपल्या क्रूरतेचे प्रतीकच जणू म्हणून अब्दालीने खुलेआम आदेश दिला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१७७८*
*कोल्हापूरकरांचा साताराकरांबरोबर तह*
*२८ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१८११*
*इ. स. १८०४ मध्ये एलफिन्स्टनची 'नागपूरकर भोसल्यांचा वकील' म्हणून नागपुरास बदली करण्यात आली. १८०८ पर्यंत तो नागपुरातच होता. त्यानंतर इ. स. १८०८-१० या काळात काबुल-कंदहार प्रांतात इंग्रजांचा राजदूत म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. या काळात त्याच्याकडून फारशी काही कामगिरी न होऊ शकल्याने अखेरीस इ. स. १८१० मध्ये त्याला परत बोलवण्यात आले अन् दि. २८ फेब्रुवारी १८११ या दिवशी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने पुण्यात पेशवे दरबाराच्या रेसिडेंट पदाची सूत्रे हातात घेतली. पूर्वी 'तैनाती फौजेच्या करारा'नुसार आता एलफिन्स्टनला पुणे दरबारातल्या कामाबरोबरच मराठी राज्यातल्या परिस्थितीवरही नियंत्रण ठेवण्याचे बंधन होते. मराठी राज्य म्हणजे आता एकसंध राज्य नव्हतेच. मराठा संघराज्य (Maratha Confederacy) मुळे मूळे मालक छत्रपती-पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्यात बेबनाव झाला होता. दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली होती. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन, देसाई, पवार असे अनेक सरदार छत्रपतींपासून आणि पेशव्यांपासून फारकत घेऊन आपली 'स्वतंत्र राज्ये' निर्माण करायच्या विचारात होते. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालल्याने एलफिन्स्टनने उभय पक्षांच्या दरम्यान समझोत्यासाठी एक मसुदा तयार केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ फेब्रुवारी इ.स.१९४८*
*ब्रिटिशांनी भारत सोडले*
*मुंबईचे आकर्षण असलेले गेट वे ऑफ इंडिया ९२ वर्षाचे झाले बांधकामास १९११ साली सुरवात झाली व ते १९२४ साली बांधून पूर्ण झाले ४ डिसेम्बर ९२४ रोजी त्याचे उदघाटन झाले हिंदू मुस्लिम संस्कृतीचा मिलाफ दाखवणाऱ्या या वास्तूचे संकल्प चित्र George Wittet या वास्तुविशारदाने तयार केले. भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश फौजांची तुकडी येथून रवाना झाली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२७ फेब्रुवारी इ.स.१६७६*
*(फाल्गुन वद्य ९, नवमी, शके १५९७, संवत्सर, राक्षस, वार रविवार)*
*छत्रपती महाराज विश्रांतीसाठी पन्हाळगडावर!*
*महाराज पन्हाळगडावर विश्रांतीसाठी आले. सततच्या दगदगीमुळे महाराजांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे पुढील ३/४, महीने महाराजांनी इथे विश्रांती घेतली मात्र या काळातही बंकाजी फर्जद याने अथणी भुईसपाट केली व बेळगावात अदिलशाहाची मुजोरी मोडून काढली!*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ फेब्रुवारी इ.स.१७१९*
*लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ फेब्रुवारी इ.स.१७३१*
*छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्हाड येथे एकमेकांची भेट घेतली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ फेब्रुवारी इ.स.१७४०*
*नासिरजंग हा निजाम उल्मुल्काच्या सहा पुत्रांपैकी एक पुत्र. तो सर्व मुलात हुशार व पराक्रमी होता. भोपाळवर निजामाचा कोंडमारा होत असता त्याने लढाईसाठी ज्या फौजा जमविल्या होत्या त्या जवळ औरंगाबादेस होत्या. भोपाळ येथे निजाम पेशवे तह झाल्यावर नासिरजंगाची स्वारी दिल्लीस आली. त्यावेळी निजाम दिल्लीस होता. तेवढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई काबीज केली. भोपाळच्या पराभवाचा वचका श्रीमंत बाजीरावांविरुद्ध छत्रपती शाहू महाराजांचे कान फुकून त्याने त्यांच्यात तेढ निर्माण करून काढावयाचा असे निजामाने ठरवून त्यासाठी आपला हस्तक सुमंत यास साताऱ्यास महाराजांकडे पाठविले. पण बाजीरावाविरुद्ध महाराजांचे मन कलुषित झाले नाही. एवढ्यात निजामाच्या वहाड प्रांतावर रघुजी भोसल्याने हल्ला करून तो प्रांत बळकाविला. ह्याचा सूड घेण्याचे मनात आणून नासिरजंगाने जमविलेल्या फौजेनिशी सन १७३९ च्या अखेरीस गोदावरी नदी ओलांडून मराठ्यांच्या मुलुखावर चढाई केली. थोड्या दिसांनी चिमाजी अप्पा व बाजीराव पेशवे नासिरजंगावर चालून गेले. पुढे काही काळ उभयतांची रेटारेट होऊन बाजीरावांनी नासिरजंगास औरंगाबादेपर्यंत पिटत नेले. तेव्हा तो तहास तयार झाला. निरुपाय होऊन त्याने हंड्या व खर्गोण हे दोन जिल्हे बाजीरावास देऊन त्यांच्याशी तारीख २७ फेब्रुवारी १७४० रोजी मुंगी पैठण येथे तह केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ फेब्रुवारी इ.स.१७५८*
*अहमदाबाद समझौत्याने मराठ्यांच्या ताब्यात आले. अहमदाबाद मराठ्यांच्या ताब्यात आल्यापासून मुसलमानी सत्ता नाहीशी झाली. मराठ्यांची म्हणजे हिंदुंची सत्ता गुजरातेवर सुरू झाली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ फेब्रुवारी इ.स.१८५४*
*लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २७ फेब्रुवारी १८५४ रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले. झाशीचा ब्रिटीश राजवटीत समावेश करावा अशी डलहौसीने घोषणा केली. लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ फेब्रुवारी इ.स.१९३१*
*चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली बलिदान दिन*
*(जन्म : २३ जुलै १९०६)*
*तुम्हारी फांसी तुमको मुबारक, हम तो आझाद है और आझाद ही रहेंगे...*
*- क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद.*
*भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य क्रांतीवीर, चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस
⛳स्वराज्यभूमी ⛳
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२६ फेब्रुवारी इ.स.१६४७*
*शहाजी महाराजांनी बेंगलोरमध्ये शिवाजी महाराजांना राजकीय शिक्षण देण्यासाठी काही पंडित व शास्त्री अशा अनेक ज्ञानी व हुशार मंडळीची नेमणूक केली होती. शिक्षण देण्यासाठी, मल्लविद्या व वेगवेगळी शस्त्रे चालविण्याचे कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यातील हुशार व वाकबगार लोकांची नेमणूक केली होती. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना पुणे प्रांतावर पाठवताना पूर्ण शिक्षण देऊन परिपूर्ण केले. पुणे येथे जाताना काही हत्ती ,घोडे, पायदळ, पिढीजात विश्वासू अमात्य ,त्याच प्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे ,उंच ध्वज,विपूल द्रव्य त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे सैन्य देऊन चांगला दिवस पाहून शिवाजी महाराजांना पुणे प्रांतावर पाठवले. जाताना प्रभाव, उत्साह व मंत्र या तीन शक्ती, सेनासमूह आणि स्वतःची राजलक्ष्मी हे सर्व घेऊन राजे पुण्यास निघाले होते. ' विख्यात अध्यापक' पाठविल्याचा उल्लेख या ठिकाणी मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण पुणे प्रांतात आल्यावर शिवाजी महाराजांचे विविध विद्धा आणि कला यांमधील शिक्षण याच कुशल अध्यापकांकडून झाले. श्रुती ,स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत ,राजनीतिशास्त्र ,बहुविश्विवभाषा, पद्यरचना ,सुभाषिते, काव्य-शास्त्र ,फलज्योतिष ,सांग, धनुर्वेद, अश्वपरीक्षा, गजपरिक्षा, अश्वारोहण गजारोहन तलवार, पट्टा, भाला ,चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला ,बाहूयुद्ध ,युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रूप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, रत्न परीक्षा इत्यादी सर्व कला व शास्त्रे एकच एक पंडित शिकवू शकले नसते म्हणून शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापक वर्गच शिवाजी महाराजां बरोबर कर्नाटकातून पाठिवला होता. हा सर्व निष्णात आध्यापक वर्ग पुणे जहागिरीत राजमाता जिजाऊंच्या पूर्ण देखरेखी खाली कार्यरत होता. बंगळूरहून पुण्याकडे जाताना शिवाजी महाराजां बरोबर शामराज नीळकंठ यास पेशवा म्हणून ,बाळकृष्ण हणमंते यांना मुझुमदार म्हणून, माणकोजी दहातोंडे यांना सरनौबत म्हणून, रघुनाथ बल्लाळास सबनीस म्हणून, तर सोनोपंतास डबीर म्हणून पाठवले होते. या प्रधान मंडळाचे रूपांतर पुढे अष्टप्रधान मंडळात झाले .अशा प्रकारचे प्रधानमंडळ सैन्य,खजिना, ध्वजमुद्रा अशा जय्यत तयारीनिशी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली होती.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ फेब्रुवारी इ.स.१६६८*
*किल्लेदार रायाजी गंगादास यांना गोव्याच्या व्हिसेरेईने लिहीलेल्या पत्राची नोंद!*
*देसायांचे हस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शिरून बंडाळी मारजवित असल्याचे आपण माझ्या निदर्शनास वारंवार आणले आहे. पण ह्या बंडाळीला आळा घालण्यास मी असमर्थ आहे. त्याचे कारण हे की "देसायांची माणसे आमच्या राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जात नाहीत. ती इतर ठिकाणाहून कुठून तरी जात असतील तरी पण लखम सावंत, आणि केशव प्रभू ह्या दोघा उपदव्यापी देसायांना मी आमच्या राज्यातून हाकलून देत आहे. असे जर झाले, तर आपण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रजाजन देसायांच्या उपद्रवापासून मुक्त होतील अशी आशा आहे".*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ फेब्रुवारी इ.स.१७३९*
*खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ फेब्रुवारीला इ.स.१७८४*
*पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (१७७७-१७८२) इंग्रजांनी ग्वाल्हेरचा किल्ला गोहदकर जाट राण्यांच्या हातात सुपूर्द केला होता. परंतु, नंतर गोहदकर जाट ग्वाल्हेर पुन्हा शिंद्यांकडे द्यायला राजी नव्हता. शेवटी फेब्रुवारी १७८३ मध्ये महादजी शिंद्यांनी स्वतः जाऊन ग्वाल्हेरला वेढा घातला. जवळच असणारे प्रसिद्ध ‘पन्ना' शहरही मराठी फौजांनी काबीज केले. गोहदकर जाटाची राणी आणि काही सावकार या किल्ल्यात होते. महादजींच्या प्रचंड फौजेला घाबरून किल्लेदाराने हत्यार ठेवायची तयारी दर्शवली. परंतु, गोहदकर राणीला हे समजताच ती खवळलीच. तिने आपल्याच किल्लेदाराला तोफेच्या तोंडी दिले. शेवटी पाच महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर महादजींना त्यांची 'ग्वाल्हेरी' परत मिळाली (दि. २१ जुलै १७८३). यानंतर महादजींनी गोहदच्या किल्ल्यालाही वेढा घातला आणि दि. २६ फेब्रुवारीला १७८४ रोजी गोहदचाही पाडाव झाला. आधीच इंग्रजांविरुद्धचा प्रचंड विजय अन् आता ग्वाल्हेर-गोहदची यशस्वी मोहीम यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. दिल्लीकर मोगलांनाही आता पुन्हा एकदा मराठ्यांचे 'भीती' वाटू लागली होती.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ फेब्रुवारी इ.स. १८०९*
*फाल्गुन शुद्ध एकादशी शके १७३० म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी सन १८०९ या दिवशी एक भयंकर घटना घडली. चिमाजीअप्पांच्या पत्नी सीताबाई या संध्याकाळच्या सुमारास जवळच असणाऱ्या ओंकारेश्वरला रिवाजानुसार दिवा लावण्यासाठी गेल्या. परंतु हातातील निरांजनाचे तबक निसटून अंगावर आले अन् त्या निरांजनाच्या ज्योतीने सीताबाईंच्या लुगड्याने पेट घेतला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणि आसपासच्या लोकांनी सीताबाईंना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु, काही वेळातच सीताबाई मृत्यू पावल्या.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ फेब्रुवारी इ.स.१९६६*
*महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन (जन्म: २८ मे १८८३)*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩













