*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१८ जून इ.स. १५७६*
*हळदी घाटचा रणसंग्राम*
*हळदी घाटचा हा प्रसिद्ध रणसंग्राम १८ जून १५७६ रोजी खमनोर गावानजीक झाला. ह्या युद्धात मेवाड-सेनेचे नेतृत्व स्वतः महाराणा प्रताप सिंह करत होते. ह्या युद्धात महाराणा प्रताप सिंहांच्या बाजूने लढणारे एकमात्र मुस्लीम सरदार होते हकीम खाँ सूरी. महाराणाजींचे २०००० भिल्लांचे सैन्य विरुद्ध मोगलांचे ८०००० सैन्य असे घनघोर युद्ध हळदी घाटात झाले. एक दिवस चाललेल्या ह्या युद्धात दोन्ही बाजूकडील साधारण १७००० सैनिक मारले गेले.*
*मात्र महाराणा प्रताप सिंह विजयी झालेल्या ह्या युद्धात महाराणाजींचा अत्यंत प्रिय घोडा 'चेतक' ठार झाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ जुन इ.स.१६६५*
*(आषाढ वद्य प्रतिपदा, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार रविवार)*
*युवराज शंभुराजे व सरसेनापती नेतोजी पालकर मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत दाखल!*
*कीरतसिंह, उग्रसेन कछवाह व युवराज शंभुराजे, किल्ले पुरंदरास मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत पोहोचले. यावेळी युवराज शंभुराजेंचे वय फक्त ८ वर्षाचे होते. युवराज शंभुराजेंसोबत यावेळी सरसेनापती नेतोजी पालकर होते. शिवाय काही घोडदळ व पायदळही त्यांच्यासोबत आले होते. युवराजांची व्यवस्था महाराज उतरले होते त्याच ठिकाणी दिवाणखान्याच्या शामियान्यात केली गेली. युवराज शंभुराजे मिर्झाराजे जयसिंगांच्या छावणीत पोहोचले. त्याच दिवशी सायंकाळी रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले मोगलांच्या ताब्यात आल्याची बातमी मिर्झाराजे जयसिंगांकडे पोहोचली. पुरंदर, वज्रगड व सिंहगडाचाही ताबा मिळाला होताच. लवकरच नळदुर्ग, मार्गगड उर्फ आत्रा, माहुली, भंडारदुर्ग, तुळशीखुल, कोहोज, वसंतगड, मुरंजन, नंगगड, करमाळा, खिरदुर्ग, सोनगड व माणगड यांचाही ताबा, महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगांना दिला. कोंढाण्या जवळील कंदकडा व रुद्रमाळ या किल्ल्यांच्या किल्ल्याही त्याच सुमारास औरंगजेब बादशहाकडे रवाना करण्यात आल्या. हे किल्ले ताब्यात येताच मिर्झाराजे जयसिंगांनी युवराज शंभुराजे यांची परत-पाठवणी केली. तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी युवराज शंभुराजेंना ओलीस म्हणूनच मिर्झाराजे जयसिंगांनी छावणीत आणले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ जुन इ.स.१६८०*
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वानानंतर रायगडावर शिजलेल्या कटाचा सुगावा पन्हाळगडावर असलेल्या शंभुराजेंना लागला. शंभुराजेंनी प्रथम पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे श्राद्धविधी आटोपले. राज्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी योग्य ती पावले उचलण्यास प्रारंभ केला. शंभुराजेंनी आपले सासरे पिलाजीराजे शिर्के यांना फौजेसह रायगडावर पाठवून कट वाल्यांच्या चौक्या उठवल्या व गडाचा पूर्ण बंदोबस्त केला.राजपद निर्वेध झाल्यावर शंभुराजे रायगडाकडे निघाले. १६७७ मध्ये रायगड सोडल्यापासून तब्बल तीन वर्षांनी शंभुराजे रायगडावर येत होते. पन्हाळ्यावरून रायगडाकडे जाताना वाटेत त्यांनी प्रतापगडी मुक्काम करून गडावरील तुळजाभवानी मातेची पूजा केली. वाटेत ठिकठिकाणी साधुसंतांचे दर्शन घेत राजे रायगडावर पोहोचले.यावेळी शंभुराजेंच्या दिमतीला २० हजारांची फौज होती. गडावर पोहोचताच त्यांनी आपल्या माता व बंधू राजाराम महाराज यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला व दरबार भरवून राज्यकारभार आपल्या हाती घेतला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ जून १६९७*
*सरसेनापती_संताजी_घोरपडे_स्मृतिदिन*
*संताजी हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर संताजी घोरपडे स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ जून इ. स. १६९९*
*छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडला आले.*
*विशाळ गडी काही काळ थांबून छत्रपती राजाराम महाराज एप्रिल १६९८ मध्ये महाराजांनी मागील वर्षी प्रमाणे पुन्हा एक तत्परतेने गडकोटांची व्यवस्था पाहण्याची मोहीम हाती घेऊन ते १८ जून १६९९ रोजी प्रतापगड वर आले. व पुढे पावसाळी मुक्कामास साताऱ्यास राहिले. ह्याच दरम्यान त्यांनी आगामी मोसमातील एक भव्य आशा मोहिमेची आखणी केली. पावसाळ्यातील मुक्कामात औरंजेब स्वतः जातीने स्वराज्याचे गडकोट जिंकण्याच्या मोहिमे वर निघणार असल्याची खात्रीलायक बातमीने ही त्यांचे धेर्य जराही विचलित नाही झाले.ह्या मोहिमे बद्दल त्यांनी बरेच मोठ मोठे मनसुबे आखले होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ जून इ.स.१७१८*
*छत्रपति शाहू महाराजांच्या कडून आंग्र्यांना सरखेली मिळाल्यावर मराठी राज्याच्या पश्चिम किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी आंग्र्यांकडे आली. सुरतेपासून कारवारपर्यंतचा किनारा व्यापारी दृष्टीने आंग्र्यांचे कक्षेत आला. आंग्रे याजवळ बलाढ्य आरमार की, ज्यात जवळजवळ तीस-चाळीस तोफा असलेली अनेक प्रचंड जहाजे व शूर व निष्णात दर्यावर्दी खलाशी अशा थाटात मराठी राज्याचा सरखेल म्हणून वावरताना ते त्यांच्या शत्रूंना कर्दनकाळासारखे वाटू लागले. पाश्चात्यांशी तंटा न करता सलोख्याने वागावयाचे असे धोरण कान्होजी आंग्रे यांनी ठेविले होते. त्या धोरणानुसार त्यांनी सिद्दीशी तह केल्यानंतर इंग्रजांशी समेट करण्याकरिता त्यांचे वकील कुलाब्यास बोलाविले व दोघांनाही पसंत अशा अटींवर समेट केला. पण तो समेट डळमळीत होता. सन १७१५ च्या डिसेंबर २६ रोजी चार्ल्स बून हा उपद्व्यापी व उद्धट गृहस्थ मुंबईचा गव्हर्नर झाला. त्याने आपणास समुद्र किनाऱ्यावर अनिबंध सत्ता गाजविता यावी म्हणून पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांच्या अनिर्बंध संचारास जो अडथळा करील त्याची आम्ही खोडच जिरविणार असा आपला निश्चय जाहीर केला आणि आंग्र्यांची कुरापत काढण्यास सुरुवात केली. त्यासरशी इंग्रजांची मालवाहू जहाजे आंग्र्यांनी पकडून नेली. तेव्हा त्यांनी अधिक जळफळाटास सुरुवात केली आणि आपले जंगी आरमार विजयदुर्गावर पाठविले. आंग्र्यांच्या बलाढ्य आरमाराशी मुकाबला होऊन ते इंग्रजी आरमार पराभव पावून परत आले (१८ जून १७१८).*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ जून इ.स.१७८८*
*इस्माईल बेग एकाकी पडलेला पाहून मराठ्यांनी आपली फौज एकत्र जमवून १८ जून १७८८ रोजी इस्माईल बेगशी लढाई केली. मराठ्यांबरोबर डी बॉईनची कवाईती पलटणे होती. त्यांनी शत्रूची पलटणे कापून काढिली. इस्माईलखान शिकस्त खाऊन २५ स्वारानिशी यमुनापार गुलाम कादरकडे गेला. परंतु गुलाम कादरने इस्माईल बेग यास सांगितले की तुम्ही सोय पडेल तिकडे जाणे. म्हणून तो लखनौकडे गेला या लढाईमुळे आग्र्याचा शह सुटला आणि मथुरेपर्यंतचा प्रदेश मराठ्यांना मोकळा झाला. १८ जूनच्या बागडेहराजवळील आपल्या विजयानंतर महादजी शिंदे यांनी मथुरेस जाऊन दिनांक ४ जुलै रोजी तेथे मुक्काम केला. येथे रणजीतसिंग जाट आपल्या सैन्यासह येऊन महादजीस मिळाला. महादजीबावांची बाजू त्यामुळे बळकट झाली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१८ जून इ.स.१८५८*
*मणिकर्णिका_तांबे ऊर्फ* *राणी_लक्ष्मीबाई स्मृतीदिन झाशीची राणी इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या*
*(जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१७ जून इ.स.१६३१*
*शाहजहानची पत्नी मुमताज़ हीचा वयाच्या ३८व्या वर्षी मृत्यू.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१७ जून इ.स.१६३३*
*इ. स. १६३० पासून १६३६ पर्यंत पहिली सहा वर्षे बालशिवाजी राजांसह जिजाबाई शहाजीराजांच्या हुकुमानुसार घोड्यावरून एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर फिरत होत्या. निजामाची राजधानी दौलताबाद हा किल्ला मोगलांनी १७ जून १६३३ मध्ये आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा शहाजीराजांनी संगमनेर येथील पेमगिरी उर्फ भीमगड (शहागड) येथे निजामशहाची गादी स्थापिली व स्वतः वजीर बनले. ह्यावेळी राजमाता जिजाबाई शिवाजी राजांसह जुन्नरास होत्या. आपल्याला पकडण्यासाठी मोगल सरदार येत आहे हे समजताच त्यांनी शिवरायांस शिवापुरी पाठवून दिले. त्यानंतर मोगल सरदाराने जिजाऊना पकडून नाशिक येथे कैदेत ठेवले.राजमाता जिजाबाईंचा चुलता जगदेवराव जाधव याच्या सांगण्यावरून त्यांची सुटका झाल्यावर शिवाजीराजांसह त्या शहाजीराजियांबरोबर राहण्यासाठी संगमनेर येथील पेमगिरीस गेल्या. काही दिवसांनी त्या किल्ल्यास विजापूरकरांनी वेढा दिला. तेव्हा शहाजीराजे निजामशहास घेऊन माहुलीस गेले. व बरोबर जिजाबाई व बाळराजे शिवाजी राज्यांस ठेविले. त्या किल्ल्यासही विजापूरच्या फौजेने वेढा घातला तेव्हा किल्ला लढविण्याची शिकस्त करून वेढा उठेना म्हणून सल्ल्याची बोलणी केली व माहुली किल्ला खाली करून दिला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१७ जून इ.स.१६६५*
*उग्रसेन छत्रपती संभाजी महाराजांसह किल्ले सिंहगडावर सायंकाळी दाखल झाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१७ जून इ.स.१६७४*
*राजमाता_जिजाऊ_माँसाहेब_पुण्यतिथी🙏*
*"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री"*
*"राजमाता जिजाऊ माँसाहेब" यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन. आनंदनाम संवत्सरात ज्येष्ठाच्या वद्य नवमीला आऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. थोरल्या महाराज स्वामींचे मातृछत्र उडाले.*
*राजा पोरका झाला, दिशा शुन्य झाल्या, आधार संपला, अंधार उरला, फक्त घनदाट अंधार☝️*
*आता शिवबाला "बाळ" म्हणणारे जगात*
*कोणीही उरले नाही😔*
*महाराज एकाएकी प्रौढ झाले. महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि "छत्रपती श्री शिवाजी महाराज" आणि "युवराज शंभुराजे" यांच्या आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज पेरलं, ती आई म्हणजे "जिजाऊसाहेब". त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात.*
*सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले.*
*एक स्वाभिमानाची जननी काळाआड गेली,*
*पण स्वाभिमानाच साम्राज्य बघूनच! स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१७ जून इ.स.१७५७*
*१७ जून च्या सुमारास मराठे यमुनेपलिकडे दुआंबात उतरले. अंताजी माणकेश्वरांनी सिकंदराबादचा प्रदेश कबजात घेतला. पण मुख्य उद्योग दिल्ली ताब्यात घेण्याचा होता. दिल्लीस सर्व अखत्यार नजीबखानाकडे असून अंतर्वेदचा प्रदेश त्याचे ताब्यात होता. गाजीउद्दीन नजीबखानास काढून लावण्यास उत्सूक होता त्याना दादास मी आपला दोस्त, आपण येऊन बंदोबस्त करावा असे पाचारण केले त्यावेळी सिद्ध झाले. नजीबखानास ही बातमी कळताच त्यास आपला अंतर्वेदीचा प्रदेश जाणार याची धास्ती पडून त्याने मल्हाररावातर्फे दादाची मनधरणी करण्यास सुरुवात केली व आपली ६ कलमी शांतता योजना राघोबास सादर केली. त्यापैकी मराठ्यांनी काही अटी मान्य केल्या. अंतर्वेदीत अंताजी माणकेश्वरची फौज उतरली होती. तीने सहारणपूर पासून इटाव्यापावेतोचा तमाम प्रदेश अल्पायासे व्यापला. आता दिल्लीच घेण्याचे काम बाकी राहिले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१६ जून इ.स.१६५९*
*विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी महाराजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकर्रर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदारांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येऊन मिळण्यास सांगितले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१६ जुन इ.स.१६६६*
*(ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)*
*महाराजांचा औरंगजेब बादशहास विनंती अर्ज!*
*कोंडी कशी फोडावी याचा महाराज रात्रंदिवस विचार करीत होते. महाराजांनी औरंगजेब बादशहाला पुन्हा एक अर्ज केला. त्यात म्हटले होते की, "मी फकीर होण्याचे ठरविले असून मला बनारसला जाण्याची मिळावी". औरंगजेब बादशहाने कळविले, "फारच चांगले! महाराजांनी फकीर होऊन प्रयागच्या किल्ल्यात रहावे बहादुरखान तिथला सुभेदार आहे. तो महाराजांवर लक्ष ठेवील". प्रयागचा किल्ला राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी कुख्यात होता. अर्थात महाराजांना हे मंजूर नव्हते. त्यामुळे प्रश्न कायमच राहिला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१६ जुन इ.स.१६७०*
*(आषाढ शुद्ध नवमी, शके १५९७, संवत्सर साधारण, वार गुरुवार)*
*किल्ले माहुली स्वराज्यात दाखल झाला.*
*किल्ले माहुली घेण्याचा महाराजांचा प्रयत्न पुर्वी फसला होता. जुन महिन्यात किल्ले माहुली जिंकून घेण्यासाठी पुन्हा अनुकूलता उत्पन्न झाली.पण लवकरच मोगलांची सुंदोपसुंदी सुरू झाली. दाऊदखान औरंगाबादेस निघून गेला आणि मनोहरदास पुन्हा एकाकी पडला. उद्या महाराजांनी गड वाढल्यास आपल्याला कुमक येणे यादवीमुळे अशक्य आहे हे हेरून त्याने सरळ माहुलीच्या किलालेदारीचा राजीनामा देऊन टाकला. त्याच्या जागी अलावर्दीबेग हा नवा किल्लेदार नियुक्त केला गेला. हा नवा किल्लेदार रुजू होतो न होतो तोच या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी ५० हजार सैन्यासह माहुलीवर पुन्हा हल्ला चढविला. झालेल्या झुंजीत अलावर्दीबेग ठार झाला. महाराजांचीही २०० माणसे मारली गेली. पण माहुली गड अखेर जिंकला गेला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१६ जून इ.स.१६७३*
*(आषाढ शु.१२ १५५९)*
*"छत्रपती शिवाजी राजेंची" स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणुन इंग्रजांनी "थॉमस निकल्स" या इंग्रज अधिकार्याला योग्य त्या सुचना व सोबत मोठा 'नजराणा' देवुन मुंबईहून हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड वर रवाना केले. टॉमस निकल्स नावाचा इंग्रज वकील शिवछत्रपतींशी तहाची बोलणी करण्यासाठी १९ मे १६७३ रोजी मुंबईहून रायगडाकडे आला. काही दिवसांत च छत्रपती शिवरायांशी तहाची बोलणी करून व संमती मिळवून दि. १६ जून रोजी मुंबई ला परत आला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१६ जून इ.स.१६९५*
*इज्जतबेग तोफखान्याचा दारोगा, याला उदगीर व कंधार येथे किल्लेदार म्हणून नेमण्यात आले. बादशहांनी शहाजादा बेदारबख्त याला आंब्याच्या सहा करड्या पाठविल्या. तसेच शहाजादा मुअजम, गाजिउद्दीनखान बहादुर, जुल्फिकारखान बहादुर व विजापूर कर्नाटकचा फौजदार कासिमखान यांना आंबे पाठविण्यात आले. बादशहांना कळविण्यात आले की गनिमांच्या फौजेने मानवत, अंबड व वाशिम या भागातः घुमाकुळ घातला आहे. बादशहांनी आज्ञा केली की अलीमर्दानखान (वर्हाडचा सुभेदार) याजकडे अलीकुली बेग गुर्जबर्दार याला पाठवावे आणि अलीमर्दानखानाने जागेवर जाऊन गनिमांचे पारिपत्य करावे अशा अर्थाचे हुकुम पाठवावे. बिलरसखान यास मातबरखानाच्या फौजेतून हुजुरात बोलावून घेण्यात आले. हेरकाऱ्यायांच्या तोंडून कळले की बेडरांनी गुलबर्गा भागात उच्छाद मांडला आहे आणि आसपासची खेडी लुटली आहेत. आग्राला अठरा मे १६९५ रोजी पोहोचून आपण सुभेदारीचे काम सांभाळू लागलो अशा अर्थाची मुख्तारखानाची अर्जी आली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१५ जून इ.स.१६६५*
*(आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू,वार गुरुवार)*
*महाराज जड अंतःकरणाने किल्ले राजगडी सुखरुप परत!*
*तह स्वीकारल्याचे मनोमन इतके दुःख महाराजांना वाटले की, जड अंतःकरणाने महाराजांनी ते स्वतःच स्वीकारले. मात्र ते कोणाजवळ व्यक्त करण्याचे धाडसही महाराजांना नव्हते. रयतेची, सैन्याची, प्रजेची, स्वराज्याची आधिक नासाडी होऊ नये म्हणून हा तह चाणाक्ष बुद्धीने आणि चातुर्याने स्वीकारून महाराजांनी स्वराज्य साफ बुडण्यापासून वाचविले. हा जगप्रसिद्ध तह आणि तहाचा अभ्यास मुळात संपूर्णपणे केल्यास महाराज काय होते याची खात्रीच पटते मात्र त्यानंतर महाराज किल्ले राजगडी परतले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ जून इ.स.१६७५*
*महाराजांचा बहादुरखानाचा तह !*
*किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख, व १७ किल्ले मोगलांना परत करावेत, साल्हेर व मुल्हेर । की सातारा व मावळ? महाराजांकडे रहावेत, दख्खनची सरदेसाईपणाची वृत्ती महाराजांना मिळावी, जुन्नरचा मोगली सुभेदार कल्याण-भिवंडीला यावा अशी तहाची कलमे ठरली. (युवराज शंभुराजेंच्या पंचहजारी मनसबदारीचे कलम बाद झाले.) या तहावर महाराजांच्या वकिलाने बहादुरखानाची सही घेतली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ जुन इ.स.१६८१*
*(आषाढ शुद्ध दशमी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार बुधवार)*
*शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक !*
*जुन महिण्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात आलेल्या अकबर व दुर्गादास राठोड यांनी पाली (नागोठणे) परिसरात आपला तळ दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याची त्वरित खबर दिली गेली. शहजादा अकबरास भेटावे की, न भेटावे या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याविषयी बैठक बोलावली. त्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच प्रथम प्रतिनिधी पाठवून शहजादा अकबराशी चाचपणी करावी असे ठरले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ जून इ.स.१७०४*
*सरसेनापती धनाजी जाधवांनी औरंगजेब बादशहाच्या ब्रम्हपुरी च्या छावणी वर हल्ला केला. यावेळी मोगलांच्या वर धनाजी जाधवांनी मोठा बाका आणला होता . औरंगजेब बादशहाची बायको उदेपुरी बेगम, मुलगी झिनतउन्निसा बेगम आणि बादशहाच्या अंत:पुरातील इतर स्त्रिया यांच्या सह संपूर्ण कुटुंब कबीलाच मराठ्यांच्या ताब्यात येण्याची भिती निर्माण झाली होती. परंतु ऐनवेळी एका रजपुत सरदारा मुळे ही घटना टळली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ जून इ.स.१७५७*
*अंतर्वेदेत उतरोन मराठ्यांनी सहारनपूरपासून इटाव्यापर्यंतचा प्रदेश काबीज केला. फक्त नजीबला हाकलून दिल्ली घेण्याचे बाकी राहिले होते. नजीबच्या त्रासाला दिल्लीकर आता वैतागले आणि वजीर गाजीउद्दिनने नजीबच्या हालचाली गुप्तपणे बापू हिंगणेकरवी राघोबादादाला कळवल्या. राघोबादादांनी सर्व बळ एकवटले आणि १५ जून रोजी ते दिल्लीवर निघाले. सैन्य विभागून यमुनेच्या दोन्ही काठावरून सैन्य दिल्लीच्या रोखाने निघाले. ११ ऑगस्ट रोजी मराठी सैन्याने दिल्लीला घेरले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ जून इ.स.,१७५७*
*म्हैसूरच्या दलवाईशी तह करून मराठे परत फिरले (एप्रिल १७५७) आणि विनापट्टण, सिरा, आदी स्थळे घेत-घेत पेशवे १५ जून १७५७ रोजी पुण्यास आले .*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१४ जुन इ.स.१६६५*
*(आषाढ शुद्ध द्वादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार)*
*छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंची छावणी सोडली व कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला.*
*स्वराज्यावर चालून आलेल्या मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंहानी औरंगाबादला आल्यापासून वेगवान हालचाली करत स्वराज्याची चोही बाजूनी नाकाबंदी सुरू केली.पुरंदर किल्ल्याला वेढा दिला,आणि मोगली सैन्याने स्वराज्यातील मुलखाला उपद्रव देणे सुरू केले. या संकटाची तीव्रता लक्षात येताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंशी तहाची बोलणी सुरू केली. ठरल्यानुसार महाराज मिर्झाराजेंच्या छावणीत तहाचा मसुदा ठरवण्यासाठी दाखल झाले.तह पक्का होऊन त्यानुसार महाराजांनी मुघलांना ४ लाख होनांचा मुलुख ,२३किल्ले देण्याचे ठरले. तहाच्या वाटाघाटी निश्चित झाल्यावर मिर्झाराजेंनी महाराजांना परत जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी त्यांनी महाराजाना १ हत्ती व २घोडे नजर केले. तहात ठरलेला कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज मुघल सरदार किरतसिंह कछवाह यांच्यासोबत कोंढाण्याकडे निघाले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ जुन इ.स.१६८२*
*(ज्येष्ठ वद्य चतुर्थी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार बुधवार)*
*आदिलशाही मुलुखावर आक्रमण करण्यास औरंगजेब बादशहाने शहजादा मुअज्जमला रवाना केले. आदिलशाही मुलुखावर आक्रमण करण्यासाठी शहजादा मुअज्जमला औरंगजेब बादशहाने रवाना केले. शहजादा मुअज्जम अहमदनगरहून निघाला या मोहिमेत आज्जमने धारवाड काबीज करून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात उतरला त्याने आपला तळ कायम करून तेथे लष्कर प्रमुख म्हणून आपली पत्नी जहांजेब बानू "उर्फ जानी बेगम हिला ठेवले व राव अनिरुद्ध सिंग हाडा यांस राजपूत सैन्यासह ठेवले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ जून इ.स.१६८६*
*विजापूरची आदिलशाही किल्ला बरेच दिवस वेढा घालूनही ताब्यात येत नसल्याने औरंगजेब बादशाह सोलापूरच्या किल्ल्यातून १४ जून १६८६ ला विजापूरकडे निघाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ जून इ.स.१६९४*
*अलमेलाचा बदललेला फौजदार अबुल्हसन हा येऊन बादशहाला भेटला. आबाजी वगैरे दोन मराठे खटाव परगण्यातून येऊन बादशहाला भेटले.*
*सत्रसाल बुंदेला ( राठोड) हा हमीदुद्दीनखान याजपाशी तैनात होता. त्याला तीनशे जात व पाचशे स्वार अशी मन्सब होती. तीत शंभर जात व पाचशे स्वार अशी वाढ करण्यात आली. मामूरखान याने कळविले की हजरत बदुन्निसा या इस्लामपुरीत (ब्रहापुरीत) आल्या आहेत. आज्ञा असेल तर हुजुरात पाठवितो. बादशहांनी परवानगी दिली. रायरी (रायगडचा) फौजदार अब्दुरआकखान याचा अर्ज बादशहाच्या नजरेखालून गेला. ख्वाजा जलाह अल्वली याला लष्करखानाच्या फौजेतून काढून हमीदुद्दीनखानाच्या फौजेत तैनात करण्यात आले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ जून इ.स.१७०४*
*छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई" आणि पुत्र "शाहू(थोरले)" यांना औरंगजेबने कैद करून आग्रा येथे नेले होते. तिथेच कैदेत असताना आजच्या दिवशी औरंगजेब बादशहाने "शाहूराजे(थोरले)" यांचं लग्न लावून दिले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१४ जून इ.स.१७०८*
*साताऱ्याचा योग्य बंदोबस्त लावून, फंदफितूरी होणार नाही याची नीट काळजी घेऊन छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरास निघाले. वाटेत पंचगंगा नदी ओलांडतानाच त्यांना बातमी समजली की, महाराणी ताराबाई राणीसाहेब पन्हाळा सोडून रांगणा गडावर गेल्या आहेत. ताबडतोब शाहूमहाराजांनी पन्हाळा व पावनगड काबीज केला आणि ते रांगण्याकडे निघाले. इकडे महाराणी ताराबाईंनी आपले सरखेल कान्होजी आंग्रे यांना मदतीसाठी बोलावले, पण काही कारणास्तव आंग्रे रांगण्यावर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराणी ताराबाईंनीच रांगणा सोडला व त्या घाट उतरून सिंधुदुर्गाकडे गेल्या. महाराणी ताराबाईंचे सेनापती पिराजी घोरपडे रांगणा लढवायला मागेच थांबले. शाहूमहाराजांच्या सैन्याने रांगण्याला वेढा घातला. परंतु पिराजी घोरपड्यांनी रांगणा नेटाने झुंजत ठेवला. शेवटी चार महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर रांगणा न घेताच (न मिळताच!) दि. १४ जून १७०८ रोजी छत्रपती शाहूमहाराज पन्हाळगडावर आले व तेथेच मुक्काम ठोकला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१३ जून इ.स.१६६५*
*पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता.*
*त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले..*
*दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार :*
*१. महाराजांकडे लहान-मोठे २३ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. .*
*२. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी..*
*३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल. त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.)*
*प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल..*
*४. विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशहाला द्यावी..*
*५. तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा. हाच तो पुरंदरचा इतिहासप्रसिध्द तह...*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१३ जुन इ.स.१६७४*
*इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला. १२ जुन इ.स.१६७४ इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडनच्या करारावर प्रधानांच्या सह्या होऊन शिक्कामोर्तब झाले. झालेल्या तहावर महाराजांनी ताबडतोब सही करावी असे टुमणे आक्झेडनने राज्याभिषेकाच्या आधीपासूनच निराजीमार्फत लावले होते. पण महाराजांनी त्याची मुळीच दखल घेतली नाही.* *राज्याभिषेकानंतरही ४ दिवस पर्यंत महाराजांनी आक्झेडनला ताटकळत ठेवले. अखेर दि. ११ जुन इ.स.१६७४ करारावर महाराजांची सही झाली. व दि. १२ जुन इ.स.१६७४ प्रधानांच्या सह्या होऊन करारावर शिक्कामोर्तब झाले. व दुसऱ्या दिवशी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१३ जून इ.स.१७००*
*औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१३ जुन इ.स.१७४१*
*पोर्तुगीज सैन्याने सावंतांच्या ताब्यातील बार्देश प्रांत जिंकून घेतला. बार्देश प्रांतावर सावंतांचा उणा पुरा ३, तीन महिने अंमल होता. त्यादरम्यान पोर्तुगीज सेनाधिकारी तो प्रांत घेण्याची तयारी करीत होते. त्यांनी बार्देश मध्ये सैन्य घुसवून सावंतांच्या सैन्याला पिटाळून लावले. पोर्तुगिजांना सावंतांवर सुलभपणे विजय मिळविणे शक्य झाले कारण म्हणजे गोव्याच्या नविन व्हिसेरेईने पोर्तुगालहून येताना बरोबर आणलेल्या नविन पद्धतीच्या प्रभावी तोफा त्या दर मिनिटास ३२०, गोळे टाकीत असत. त्या तोफांच्या माऱ्यासमोर सावंतांच्या जुन्या पुराण्या तोफा टिकाव धरू शकल्या नाहीत यात नवल नाही.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१३ जून इ.स.१७५७*
*राज्यपदाच्या लोभापुढे कुराणाची शपथ लटपटली. इंग्रज आपली फौज घेऊन मुर्शिदाबादेवर चाल करून गेले. सिराजउदौला आपली फौज घेऊन प्लासी येथे गेला. (१३ जून १७५७) इंग्रजांची फौज त्यावेळी १००० युरोपियन २१०० हिंदी सैनिक आणी ९ मोठ्या तोफा इतकी होती.*
*याउलट सुभेदार सिराजउदौला जवळ ५०००० पायदळ १०००० घोडेस्वार आणी ५० मोठया तोफा शिवाय फ्रेंचांचा तोफखाना सोबत होता. ठरल्याप्रमाणे लढाई सुरू झाली आणी मिरजाफर बहुतेक सर्व फौज घेऊन इंग्रजांस जाऊन मिळाला. या आकस्मित आपत्तीने सुभेदार घाबरून थोड्या इमानी लोकांसोबत राजवाड्यात पळून गेला. इंग्रजांच्या पाठलागामुळे सुभेदार फकिराच्या दिन वेशात एका खिडकीतून रात्रीत पळून एका बगिच्यात लपून बसला. हि बातमी मिरजाफरला समजली. शेवटी सुभेदाराला पकडण्यात आले.जाफरचा मुलगा सीरन याने सिराजउदौलास ठार केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१३ जून इ.स.१७६२*
*हैदराच्या या धामधुमीचा बंदोबस्त करण्यासाठी माधवराव पेशवे व त्रिंबकराव पेठे कर्नाटकात गेले . तुंगभद्रापावेतोच्या प्रदेशावर आपली हुकूमत बसवून व थोडी बहुत पैदास करून पर्जन्य सुरुवातीस १३ जून १७६२ ला ते परत पुण्यास आले .*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१३ जून इ.स.१८१७*
*पुणे करार*
*पण ८ मे १८१७ रोजी एलपीस्टन ने पुणे शहरास वेढा दिला आणि नाकेबंदी केली. मग मात्र पेशव्याने त्रिंबकजीस पकडन्यासाठी जाहीरनामे काढले आणि सिंहगड, पुरंदर, वसई हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन केले. मग एलपीस्टनने वेढा उठवला. यावेळी इंग्रजांनी रावबाजी बरोबर एक करार केला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. या कराराद्वारे इंग्रजांनी पेशव्याच्या उरल्या सुरल्या मुसक्याही आवळल्या.*
*कराराची कलमे खालील प्रमाणे .*
*पुणे तह - १३ जून १८१७*
*१. वसईचा तह कायम राहील शिवाय ,* #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा
*२. पेशव्याने त्रिंबकजीस गंगाधर शास्त्र्याचा खुनी म्हणून मान्य केले आणि त्यास इंग्रजांचे स्वाधीन करण्यास कबुली दिली .*
*३. त्रिंबकजिस अटक होईपर्यंत त्याचे कुटुंब इंग्रजांच्या ताब्यात राहील .*
*४.सरदार , दौलतदार यांच्या कडील अकाबारनीस कारकून , वकील यांस पेशव्याने दरबारी ठेऊ नये . काही सवाल जबाब करावयाचे असले तर ते इंग्रजां मार्फत करावे .*
*५.इंग्रजांशी स्नेह असलेल्या करवीर , सावंतवाडीकर पेशव्याचा काही हक्क सांगू नये .*
*६. रावबाजीने इंग्रजांचे ५००० स्वर , ३००० पायदळ , तोफखाना यांचा खर्च चालवून ते स्वतः पाशी ठेवावे . त्यासाठी तोडून दिलेल्या ३४ लक्ष मुलुखावर आणि किल्यावर हक्क चालवू नये .*
*७. अहमद नगर च्या किल्ल्या भोवतालची ४००० हात चौफेर जमीन पेशव्याने इंग्रजांस द्यावी . इंग्रजी छावणीच्या बाजूची कुरणे कही करी द्यावी .*
*८. इंग्रज तैनाती फौजेपेक्षा कितीही फौज पेशव्याच्या मुलुखात ठेवतील त्यास पेशव्याने हरकत घेऊ नये.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१२ जुन इ.स.१६४९*
*मराठ्यांनी चाकण प्रांत व किल्ले संग्रामदुर्ग स्वराज्यात दाखल करून घेतले.*
*चाकण हा भुईकोट आहे. चाकणची निर्मिती कोणी केली हे अद्यापही ठाऊक नाही. बहामनीच्या राजवटीत चाकण हे सुभ्याचं मुख्य ठिकाण होतं. पुढे चाकणच्या किल्ल्यासाठी अहमद निजाम व बहामनी सरदार आदिलखान (आदिलशाहीचा संस्थापक) यांच्यात लढाई होऊन चाकणचा सुभेदार जैनुद्दीनसह सातशे जण मारले गेले. निजामशाहीचा अस्त होईपर्यंत चाकण निजामाच्याच ताब्यात होते. शहाजीराजांनी सन १६६३ मध्ये निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी चाकण शहाजीराजांच्या ताब्यात होते. स्वराज्य स्थापनेच्या वेळी चाकण आदिलशाहीच्या ताब्यात असून त्यावर आदिलशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होता. आदिलशाहीने चाकणचं नाव इस्लामाबाद केले होतं. पुढे शिवाजी महाराजांनी चाकणचा इस्लामाबाद जिंकून घेतला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांचे मन जिंकून घेऊन त्यांना स्वराज्याच्या कामी आणलं, शिवाजी राजांनी चाकणच्या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग ठेवून फिरंगोजी नरसाळा यांनाच किल्लेदारी दिली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१२ जुन इ.स.१६६५*
*(आषाढ शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार सोमवार)*
*महाराज व इटालियन प्रवासी डॉ. निकोलाय मनुची यांची भेट!*
*महाराज व इटालियन प्रवासी डॉ निकोलाय मनुची यांची ऐतिहासिक भेट झाली. ही भेट इतकी ऐतिहासिक आणि महत्त्वाची आहे की, या भेटीला मोल नाही. कारण निकोलाय मनुची याला तत्कालीन राजे रजवाड्यांची चित्रे जमविण्याचा शौक होता. पुढे याच मनुचीने महाराज आग्रा नजरकैदेत असताना मीरहसन नावाचा चित्रकार स्वतःचे पत्र देऊन पाठविला व महाराजांचे जगातील पहिले चित्र एका मुसलमान चित्रकाराने रेखाटले. अर्थात याच चित्रामुळे संपूर्ण जगाला आणि आपल्याला आपले राजे कसे दिसत होते हे कळले. त्यामुळे ही भेट व हा दिवस फार मोलाचा आहे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१२ जून इ.स.१६७४*
*इंग्रज आणि शिवराय यांत तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले. मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी, अशा अवास्तव मागण्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारल्या.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१२ जून इ.स.१७३२*
*सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी झगडा सुरु होता. १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१२ जून इ.स.१७५३*
*बादशहा व वजीर या दोघांनी एकमेकांविरुद्ध लढाई पुकारली. राजधानीतील सरदार बादशहास मिळाले. वजिराने राजेंद्रगीर गोसावी व सुरजमल जाट यास फौजेसह मदतीस बोलावले. दोन्ही सैन्याच्या लढाया झाल्या. त्या राजेंद्रगीर गोसावी दिनांक १२ जून १७५३ रोजी मारला गेला. बादशहाने वजीरीची वस्रे गाजीउद्दीन इमादुल्मुल्क यास दिली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१२ जून इ.स.१७६०*
*तर पानिपत झालेच नसते...*
*अब्दाली दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात उत्सुक नव्हता. त्याला परत जायची घाई होती. त्याने शेवटी मल्हाररावांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अनेक चर्चा होत तहही झाला. "अब्दालीचा नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे - होळकरांनी हाफिज रहमतखानाच्या मार्फत तोड ठरवली कि, नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेऊन अब्दालीला अब्दालीस मार्गस्थ करावे. या बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा कारभारी ) व हिंगणे ( पेशव्यांचा दिल्लीतील वकील ) यांचा सहभाग होता. तहाच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा शिंदे - होळकर भरतपूर येथे होते. सुरजमल्ल जाट देखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर १३ मार्च सुमारास अब्दाली - मराठे यांच्यात तह घडून आला. पण उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्याची बातमी येतांच नजीब घाबरला. अब्दाली छावणी उठवून निघालेला असताना, नजीबने त्यास येथेच रहाण्याची गळ घातली. परिणामी वरील करार फिसकटला. असे असले तरी मराठी सरदारांनी तहाची बोलणी सुरुचं ठेवली होती. १२ जून रोजी मल्हारराव होळकर लिहितात, " गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी ( बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजीबखानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले."*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१२ जून इ.स.१७९२*
*महादजींच्या दक्षिणेतील आगमनामुळे स्वतः नाना फडणीस अस्वस्थ झाले ले होते. पुणे दरबारातील इतर मराठे सरदारही घाबरले होते. अशा भितियुक्त वातावरणात महादजी शिंदे १२ जून १७९२ रोजी पुण्याच्या आसमंतात आले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*११ जुन इ.स.१६६५*
*"छत्रपती शिवाजी महाराज" आणि "मिर्झाराजे जयसिंग" यांच्यात प्रसिद्ध "पुरंदरचा तह" इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. शिवाजीमहाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन इ.स.१६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे इ.स.१६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.*
*खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून इ.स.१६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. या तहान्वये महाराजांनी आग्राला भेट देण्याचे तसेच दक्षिणेकडील मुघलांना मदत करण्याचे मान्य केले व चार लाख होणचा प्रदेश व २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,*
*१. अंकोला २. कर्नाळा ३. कोंढाणा (सिंहगड) ४ कोहोज ५. खिरदुर्ग (सागरगड) ६. तिकोना ७. तुंग ८. नंगगड ९. नरदुर्ग १०. पळसगड ११. किल्ले पुरंदर १२. प्रबळगड - मुरंजन १३. भंडारगड १४. मनरंजन १५. मानगड १६. मार्गगड १७. माहुलीगड १८. रुद्रमाळ १९. रोहिडा २०. लोहगड २१. वसंतगड २२. विसापूर २३. सोनगड*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*११ जून इ.स.१६७४*
*छत्रपति शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर*
*५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडनला भेटण्याची परवानगी दिली.*
*मुंबईकरांची तहाची बोलणी इ. स. १६७४ मध्ये चालू राहिली.*
*शिवाजीराजांच्या कोकणच्या प्रदेशात व्यापार वाढवणे, राजापूरचे झालेले नुकसान भरून काढणे व नव्या सवलती मिळवणे, पूर्वी झालेल्या तहावर शिवरायांनी शिक्कामोर्तब करून तो कायम केला नव्हता, त्यास कराराचे स्वरूप आणणे, हें इंग्रजांचे उद्दिष्ठ होते.*
*इ. स. १६७४ च्या मार्चमध्ये मुंबईच्या सल्लागार मंडळाने एक ठराव केला, कि पूर्वी शिवाजी महाराजांबरोबर झालेला तह पुरा करण्यासाठी नारायण शेणवी यास पाठवावे व त्याचेबरोबर मुखत्यार वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडन यास रायगडावर धाडावे. राज्याभिषेक झाल्यावर ऑक्झेंडनने निराजीपंतांच्या पाठीशी लकडा लावला की तहासाठी राजाची संमतीदर्शक सही घ्या.*
*तहाच्या कलामांचे कागद त्याने सतत आपल्याजवळ बाळगले होते. ता. ११ जून रोजी शिवाजीराजे यांनी तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*११ जून इ.स.१७७५*
*सेनापती यशवंतराव शिंदे यांनी मार्च १७७५ मध्ये नाना फडणिसास पत्र लिहिले, "राजश्री पंतप्रधानांकडून धन्याचे पायाशी अमर्यादा न व्हावी यासाठी तीर्थरूप महाराज आबासाहेब (संभाजी राजे) आणि मातुश्री आईसाहेब (जिजाबाई) यांच्याशी नानासाहेब पेशवे व त्यांचे चुलत बंधू सदाशिवरावभाऊ यांनी पूर्वी शपथपूर्वक करारमदार केला. त्या कराराप्रमाणे वर्तन व्हावे.अशी अनेक पत्रे पुणे दरबारी करवीरकरांकडून जात असत. पण त्यांची बूज राखली जात नसे असे दिसते. कारण तारीख ११ जून १७७५ च्या पत्रावरून कोन्हेररावानी अर्जुनगड, धरणगुती व हेराळी येथे ७ जून १७७५ रोजी करवीरकरांशी लढाई केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*११ जून इ.स.१७८१*
*सिक्रेट कौन्सिलने ठराव करून ११ जून १७८१ च्या पत्राने गोडार्डला मराठ्यांशी सलूख घडवून आणण्यास फर्माविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*११ जून इ.स.१७९२*
*महादजी पुण्यात...*
*वकील-इ-मुतालिकीच्या सनदा आणि आताच्या मथुरा-वृंदावनच्या सनदा घेऊन महादजी पुण्याकडे निघाले. दि. १३ जानेवारी १७९२ रोजी महादजींनी प्रतापगडाहून (उज्जैनजवळील) कूच केले आणि उज्जैन, हुताशनी, बीड, नांदूर, तुळजापूर, जांबगड या मार्गाने दि. ११ जून १७९२ रोजी पुण्याच्या संगमावर पोहोचले. पुरत्या आठ वर्षांनंतर महादजी पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*११ जून इ.स.१८९७*
*क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल जयंती*
*भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक 'अनमोल रत्न' पंडित रामप्रसाद बिस्मिल ह्यांचा आज जन्मदिवस ! (११ जून १८९७)*
*"मरते 'बिस्मिल', 'रोशन', 'लाहिरी', 'अशफाक' अत्याचार से । होंगे पैदा सैंकडो इनकी रुधिर की धार से ॥" - पं. रामप्रसाद बिस्मिल.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१० जून इ.स.१६४०*
*हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे व जगदीश्वराचे मंदिर पण आहे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जुन इ.स.१६५८*
*औरंगजेबाचा पहिला दरबार आग्रा येथे भरला. आता औरंगजेब आग्रा येथे शिरला. थोड्याच दिवसांत शहाजहान कैद झाला आणि औरंगजेबाचा पहिला दरबार १० जुन इ.स.१६५८ रोजी आग्रा येथे भरला. औरंगजेबाने पहिले सिंहासनारोहण केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जुन इ.स.१६६१*
*(ज्येष्ठ वद्य अष्टमी, शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार)*
*कल्याण-भिवंडी महाराजांच्या ताब्यात!*
*महाराजांनी कल्याण-भिवंडी मोहीम करून या भागावर आधिपत्य प्रस्थापित केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जुन इ.स.१६६४*
*अजीजखान वेंगुर्ला येथे मृत्यू पावला. अजीजखान आल्याचे कळताच वाडीकर लखम सावंत त्यांच्या भेटीस गेला. भेटीत ठरल्याप्रमाणे सावंत कुडाळकर चाल करून गेला. शर्थीची झुंज मांडून त्याने मराठ्यांना पराभूत केले. कुडाळ सावंतांच्या ताब्यात गेले. अजीजखान वेंगुर्ला येथे गेला होता. या मुक्कामातच तो मरण पावला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जून इ.स.१६८०*
*(आषाढ शु.२ शुक्रवार)*
*मोरोपंत व अण्णाजी आपल्या लोकांनिशी रायगडाहून पन्हाळ्याकडे निघाल्यानंतर लवकरच रायगडावर सरनौबत व नायकवाडी यांनी १६ मे रोजी किल्ला ताब्यात घेऊन फितुरीतील लोकांना कैद केले व आपले चौकी पहारे बसविले. त्यानंतरछत्रपती संभाजीराजांचे सासरे पिलाजीराव शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांची अनुज्ञा मिळवून १५,००० स्वारांसह येऊन रायगडचा बंदोबस्त केला. पन्हाळगडावरून निघून छत्रपती संभाजी महाराज दिनांक १० जूनला रायगडला पोचले. त्याच दिवशी दरबार भरवून राज्यकारभारास प्रत्यक्ष प्रारंभ केला. परत आल्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी सोयराबाई व दुसऱ्या तीन मातांचे सांत्वन केले असे परमानंद स्पष्ट लिहितात. छत्रपती संभाजी महाराज रायगडी आल्यानंतर परत क्रियाकर्म केले व दानही दिले. त्यानंतर २७ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई राणीसाहेबांनी अग्निप्रवेश केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जून १६८०*
*राजापूरचे सुरतेला पत्र*
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीने छ.संभाजी महाराजांकडे बक्षिस चालू ठेवण्यासाठी विनंती केली होती. ह्या गोष्टीचा पाठपुरावाही ते अगदी न चुकता करताना दिसतात. ह्या बाबतीतला पहिला संदर्भ जून १६८० मध्ये, म्हणजे छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी पाहायला मिळतो.*
*In our last to your Honour, wee advised that wee had an order for the coconutts at Achara, but the suddain alteration of this state put an end to all our former proceedings, for not long after came a new Soobedarr put in by Sombagee Rajah who acquainted us that without an order from him wee could receive noe more bucksis, upon which wee wrote to the Rajah to satisfy him of the troubles wee are always at with the Soobedarr to receive the bucksis given by Sevagee Rajah, desiring him to give an order, in answere to which he advised us that at present he had other concernes in hand, but when at more leizure he would examine our account, which all signifies noe more than just a deniall.*
*आमच्या आधीच्या पत्रातून आम्ही आपल्याला कळवले होते की अचऱ्याहून आम्हाला नारळाची मागणी आली होती पण राज्यातील अकस्मिक घडामोडींमुळे सगळी गडबड झाली आहे. नुकताच संभाजी राजांचा सुभेदार इथे आला होता व त्याने सांगितले की राजांकडून बक्षिसाचे आदेश असल्या शिवाय आम्हाला अपेक्षित सवलत देता येणार नाही. त्यावर आम्ही राजाला कळवले की आम्हाला शिवाजीकडून मिळालेल्या बक्षिसासाठी सुभेदाराकडून अनेकदा अडचण निर्माण केली जाते. आम्ही राजाला विनंती केली की सुभेदाराला आवश्यक आदेश देऊन ह्या अडचणीतून आम्हाला मुक्त करावे. पण राजाने आम्हाला कळवले की सध्या तो इतर बाबींमुळे व्यस्त आहे तरी त्याला थोडी उसंत मिळताच तो ह्यात लक्ष घालेल. आमच्यासाठी हे त्याच्या नकारासमानच आहे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जून इ.स.१६८१*
*औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जुन इ.स.१६८३*
*फिरंग्यांनी बिघाड केला व रेवदांडास वेढा घातला म्हणून संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जून १६८९*
*छत्रपती राजाराम महाराजांची पहिली लढाई*
*११ मार्च १६८९ क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांची हत्या केली आणि मराठ्यांचे स्वराज्य ढवळून निघाले. शिवप्रभूंच्या हस्ते स्थापन झालेली हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगडाला इतिकादखानाचा वेढा पडायला सुरुवात झाली होती. गडावर राजमंडळी होती. येसूबाई, त्यांचा पुत्र शाहू आणि त्यांचा दीर म्हणजे शिवपुत्र राजाराम महाराज अशा खास मंडळींचे वास्तव्य होते त्यावेळी राजाराम महाराज अवघे १९ वर्षांचे होते. प्राप्त परिस्थितीत बेलाग रायगड सोडून राजधानीबाहेर पडून मुघलांशी संघर्ष चालू ठेवण्याचा सल्ला येसूबाईंनी दिला जो योग्य होता, सूत्र त्याप्रमाणे फिरली. राजाराम महाराज व त्यांच्या दोन राण्या ताराबाई व राजसबाई यांच्यासह गुप्तपणे रायगड त्यांनी सोडला.*
*शत्रूस हुलकावणी देऊन जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगड गाठला परंतु ही चाल लवकरच झुल्फिकारखानाच्या (इतिकादखान) लक्षात आली आणि त्याने लागलीच पाठलागासाठी फतेहजंगखानास पाठवले. तो पोहचेपर्यंत महाराजांनी लढाईची तयारी केली आणि इतिहासाला अपरिचित अशी मुघल व राजाराम महाराजांची पहिली लढाई दिनांक १० जून १६८९ ला प्रतापगडाच्या पायथ्याला पार ह्या गावी झाली. १९ व्या वर्षी केलेली लढाई महाराजांच्या स्वभावातील धाडस दाखवते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जून इ.स.१६९६*
*केज धारूर (मराठवाडा) येथील अधिकारी मुहंमद शरीफ याला चंदेरी कापड खरेदी करण्यासाठी पाठविण्यात आले. बुन्हाणपूरचा सुभेदार इनायतखान याला लिहून हटकरांशी झालेल्या चकमकीचा तपशील मागावा अशी बक्षीउल्मुल्क मुखलिसखान याला आज्ञा झाली. बनारसचे विणकर कापडावर कुराणाच्या ओळी काढीत. हा प्रकार बंद करण्यात यावा आणि असे कापड हुजुरात पाठविण्यात यावे अशी आज्ञा झाली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जून १६९६*
*इंग्रजांच्या पत्रातील एक नोंद...*
*"मराठ्यांचा एकूण कालखंड १५० वर्षे साधारण, या कालखंडात एकाही राजाचा खून किंवा राजाला कैद करून स्वघोषित राजा झालेल्याचे उदाहरण जवळपास नाही " .. एक वेगळीच घटना हे दर्शवते .. अशी संधी त्या नामांकित सेनापतीस चालून आलेली असून सुद्धा असे घडलेले नाही जे मुघलकाळात सय्यदबंधूंनी केले.* *सेनापती संताजी घोरपड्यांना ही संधी होती. १६९६ मेअखेर - जूनप्रारंभी जिंजी दरबारात सेनापती व छत्रपती मध्ये वितुष्ट आले, बिघाड झाला. इतका की इंग्रजांच्या १० जून १६९६ च्या पत्रातील एक वाक्य असे "मराठा सरदार संताजी व बहिर्जी घोरपड्यांच्या मागून न जाता राजाराम महाराजांशी एकनिष्ठ राहतील" संताजी जिंजीबाहेर पडले आणि त्यांच्यावर स्वतः राजाराम महाराज धनाजी, अमृतराव, हणमंतराव या मराठा सरदारांसह चालून गेले. आयेवारकुटी येथे लढाई होऊन संताजी विजयी झाले आणि छत्रपती त्यांच्या कैदेत पडले !! वास्तविक संताजींकडे २० हजाराच्यावर फौज होती. महाराष्ट्र-कर्नाटक प्रांतात त्यांचा चांगलाच दरारा होता. प्रत्यक्ष छत्रपती कैदेत सापडला होता. स्वघोषित राजा व्हायची अथवा आपल्या नियंत्रणाखाली कोणाला तरी करायची आयती संधी होती. पण या धामधुमीच्या काळात जिथे काही मराठ्यांकडून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी फितुरीसह कोणतेही पाऊल उचलले जात होते तिथे संताजी सारखा बलाढ्य सेनापती लढाईनंतर अटकेत असलेल्या छत्रपतींची हात बांधून क्षमा मागतो आणि त्यांना मुक्त करून जिंजीत व्यवस्थित पोहोचवण्याची व्यवस्था करतो.* *याचवेळी सुरतकर इंग्रज लढाईसंदर्भात लिहितायत (१८ जुलै १६९६ - ज्युलिअन दि) " Zulphikar offered him (संताजी घोरपडे) a vast reward in the King's (औरंगजेब) name to surrender him (राजाराम महाराज) up; and the King himself promised to make him (संताजी घोरपडे) a Barra Hazari Umrao".* *झुल्फिकार खानाने बादशहाच्या वतीने राजाराम महाराज यांच्या बदल्यात इनाम देऊ केले तसेच बादशहाने बारा हजारी उमराव करतो असे आश्वासन दिले असा याचा अर्थ निघतो.* *तत्कालिन परिस्थिती मध्ये अनुकलता असूनही असे काहीही घडले नाही.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१० जून इ.स.१७६८*
*पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*९ जून इ.स.१६५९*
*९ जून १६५९ रोजी औरंगजेबाने दारा शिकोह याला कैद केले. कैदी दाराला पकडल्या गेल्यानंतर पूर्ण कल्पना होती की आपण मारले जाणार आहोत. दाराला देहांताची शिक्षा देण्यापूर्वी औरंगजेबाने त्यास निरोप पाठवून असे विचारले की,*
*"दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते. आणि मला (औरंगजेबाला) तू कैद केले असतेस तर तू काय केले असते..?*
*यावर दाराने राजपुत्र या दृष्टीने आपल्या व्यक्तित्वास साजेसे उत्तर दिले..*
*"अशी परिस्थिती आली असती तर (मी) तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार दरवाजांच्या पुढे उघडे फेकून देण्यास सांगितले असते"*
*हे उत्तर कळविल्यानंतर औरंगजेबाने दारास देहांताची शिक्षा फर्मावली.*
*थोडे_अपरिचित_उद्गार..*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*९ जुन इ.स.१६६१*
*महाराजांचा महाड येथे मुक्काम !*
*महाराजांनी कुडाळकर सावंतांकडे दुर्लक्ष केले. व ते किल्ले राजगडाकडे जाण्यासाठी पुढे निघाले. महाराज महाडला पोहोचले. महाड येथे मुक्काम सुमारे २ दिवस होता. राजापुरचे सुभेदार रावजी पंडितही महाराजांच्या आज्ञेनूसार तीथे आले होते. राजापुरला जे इंग्रजेतर पर्शियन, अरबी व इतर कैदी महाराजांच्या ताब्यात होते त्यांच्या बंदोबस्ताची योग्य त्या खंडणीच्या मोबदल्यात त्यांची सुटका करण्याची जबाबदारी महाराजांनी रावजींवर सोपविली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*९ जुन इ.स.१६८०*
*दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान खानजहान बहाद्दूर औरंगाबादला पोहचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास ( अहिवंतगड ) वेढा घातला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*९ जुन इ.स.१६८२*
*छत्रपती संभाजी महाराजांनी गुजरात सीमेवरील "खंबायत" व "रामनगर" जिंकले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*९ जुन इ.स.१६९६*
*छत्रपति राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले.*
*मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*९ जून इ.स.१७१६*
*बंदा सिंह बहादूर पुण्यतिथी*
*बाबा बंदा सिंह बहादूर यांच्या विषयी आपणास खूपच कमी माहिती असेल. पण ते एक असे शूर योद्धा होते ज्यांनी मुघलांच्या विरुद्ध लढा दिला.*
*(जन्म २७ ऑक्टोबर १६७०) मुघलांशी लढा देताना फररुखशियार याने त्यांना कैद केले. त्यांना दिल्ली ला आणले गेले आणि त्यांचा अतोनात छळ करून त्यांना ९ जून १७१६ला शरीराचे तुकडे करून मारले गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*९ जून इ.स.१९००*
*बिरसा मुंडा पुण्यतिथी*
*(जन्म - १५ नोव्हेंबर १८७५)*
*आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी झाला.*
*बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला. बिरसांना जो कोणी पकडून देईल, त्यासाठी इंग्रजांकडून ५०० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाईकेला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली. ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसांना पकडण्यात आले.*
*रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. तेथेच त्यांचे निधन झाले. रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ बिरसांची समाधी असून तेथे त्यांचा पुतळा उभारला आहे. तसेच रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस













