*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*४ एप्रिल इ.स.१६६३*
*(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८५, संवत्सर शोभन, वार शनिवार)*
*महाराजांची शाहिस्तेखानाला शास्त देण्याची तयारी!*
*महाराजांची महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावर होता. तेथून ते किल्ले राजगडला परतले. सरनौबत नेतोजी राजगडी दाखल झालेले होतेच. मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार किल्ले सिंहगडावर गेलेले होते. राजगडी पोहोचताच महाराजांनी निवडक मुत्सद्यांसमवेत विचार विनिमय करून प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करण्याचा आपला धाडशी बेत त्यांना सांगितला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ एप्रिल इ.स.१६७०*
*नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ एप्रिल इ.स.१६७२*
*निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू !*
*अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी !!*
*दि. ४ एप्रिल १६७२ – चैत्र वद्य द्वितीया, शके १५९४ या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना एक ओवीबद्ध पत्र पाठवले. “निश्चयाचा माहामेरू...” अश्या शब्दांनी सुरुवात होणारी आणि शिवरायांचे गुणसंकीर्तन करणारी ही शिवप्रशस्ती अलौकिक आहे. हे काव्य मोठे आहे पण त्यातील निवडक ओव्या गानकोकिळा लताबाई मंगेशकर यांनी आपल्या गोड गळ्याने गाऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवल्या आहेत. आजवर अनेक प्रतिभावंतांनी शिवरायांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवरायांना समकालीन असलेल्या कविन्द्र परमानंद, कवि भूषण, केशवराज पंडित अश्या अनेकांनी शिवाजी महाराजांना आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या शब्दसामर्थ्याने गौरविले आहे. परंतु समर्थांनी, ‘निश्चयाचा माहामेरू’ या काव्यात शिवस्तुती करताना वापरलेल्या शब्दांची ऊंची कोणालाच गाठता आलेली नाही.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ एप्रिल इ.स.१६७४*
*प्रतापराव रणांगणात पडले त्या दिवशी महाशिवरात्री होती.*
*प्रतापराव व बहलोलखान यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन नारायण शेणवी (इंग्रजांचा दुभाशी) हा डेप्युटी गव्हर्नर, मुंबई यांना ४ एप्रिल १६७४ रोजी लिहीलेल्या पत्रात लिहीतात.*
*The Rajah Sevajee intended to proceed to currall to give a new orders to his army and to creat a New generall of his horse in the rooms of pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun in a narrow passage betwixt two hills who with six horse man more were slaine, being not succored by the rest of the army, so that Bullool ckaun remains victorius. (factory records of surat)*
*राजे शिवाजी यांनी आपल्या फौजेला आज्ञा देण्यासाठी व नविन सरनोबत नियुक्त करण्यासाठी कुडाळ येथे जाण्याचा निर्णय घेतला त्याचे कारण असे की, सरनोबत प्रतापराव हे बहलोलखानाशी झालेल्या चकमकीत मारले गेले. ही चकमक दोन टेकड्यांच्या मधे असलेल्या अरुंद ठिकाणी (खिंडीत - नेसरीची खिंड) झाली. प्रतापरावांसोबत आणखी सहा घोडेस्वार मारले गेले. प्रतापरावांना वेळेवर सैन्याची मदत न पोहोचू शकल्याने ह्या सर्वांची कत्तल झाली. लढाईमद्धे बहेलोल खान विजयी ठरला.*
*प्रतापराव बहलोलखानाशी फक्त ६ घोडेस्वारांनिशी लढताना बाकीच्या सैन्याचे अभावी मारला गेला. त्याचे जागी नविन सेनापती नेमून, सैन्याला नवे हुकूम देण्यासाठी शिवाजी कुडाळला जाणार होता. परंतु प्रतापरावाचा दुय्यम आनंदराव याने धीराचे पत्र लिहिल्यामुळे शिवाजीने त्याला सेनापती पद देऊन " शत्रूचा मोड केल्याशिवाय तोंड दाखवू नये." असा हुकूम केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ एप्रिल इ.स.१६७४*
*एप्रिल ३ रोजी दुपारी शेणवी गडावर जाऊन दरबारांत छत्रपती शिवाजीराजे यांस भेटला. निताजीपंत हजर होते. राजापूरची वखारीची लुट केल्याने इंग्रजांचे जें नुकसान झालें, त्यावर प्रामुख्याने बोलणी झाली. यावेळी निराजीपंताने इंग्रजांच्या या मुद्दयावर अपेक्षेबाहेर तरफदारी केली. छत्रपती शिवरायांच्या मनावर निराजीपंतांच्या विचारांचा परिणाम होऊन त्यांनी ताबडतोब कारकुनास हुकुम लिहिण्यास सांगितले. राजापूरच्या नुकसानीची भरपाई छत्रपती शिवाजीराजे यांनी तीन हप्त्यांनी करावयाची. नुकसानीच्या रकमेदाखल २५०० होन राजापूरच्या जकातीतून; २५०० होन १ सप्टेबरपासून सुरु होणाऱ्या १ ल्या वर्षी व उरलेले एकूण ५ हजार होन छत्रपती शिवाजीराजे यांनी पुढील दोन वर्षांत इंग्रजांस पोहोचते होण्याची व्यवस्था करावी, असें या कलमाचे स्वरूप होते. या कलमाने इंग्रजांचे झालेले नुकसान भरून दिले पाहिजे, हि गोष्ट तत्वतः व प्रत्यक्षतः छत्रपती शिवरायांनी स्पष्टपणे मान्य केली.*
*नारायण शेणव्याचा हा मोठा विजय होता. त्याने ४ एप्रिल रोजी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कळवले, ' येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजीराजे तयारी करीत आहे. सोनें, हिरे यांनी जडवलेले भव्य सिंहासन तयार होत आहे. असंख्य विद्वानांना बोलावणी जातील. रायगडावर फार मोठ्या प्रमाणात दानधर्म होईल. आता ऑक्झेंडनबरोबर छत्रपती शिवाजीकरिता चांगला नजराणा पाठवा. आरबी घोडा वगैरे न धाडता मूल्यवान रत्ने, राज्याभिषेकसमयी धारण करण्याजोगी पाठवावीत. नजराणा हजार बाराशे रुपयांचा पाठवावा.'*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ एप्रिल इ.स.१६८३*
*(चैत्र वद्य तृतीया, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार बुधवार)*
*छत्रपती संभाजी महाराजांचा तारापूर, डहाणू व अशेरी भागावर हल्ला!*
*एकीकडे पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराजांशी तह करून वरवर आपले सलोख्याचे संबंध आहेत असे दाखवत होते आणि त्याच सुमारास औरंगजेबाचा एक दुत गोव्याच्या विजरईशी वाटाघाटी करण्यासाठी आला होता. अशा स्वरूपाच्या छुप्या गोष्टी कोंट-द-अल्वारे पत्ररूपाने करत असल्याचे छत्रपती संभाजी महाराजांना समजले आणि मग या विश्वासघातकी पोर्तुगिजांना चांगलाच धडा शिकविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील डहाणू, सिरीगाव (शिरगाव), असेरी (अशेरी), सैबाण (बहुधा सायवन), तारापूर या पोर्तुगीज ठाण्यावर प्रचंड हल्ला करून अनेक खेडी जाळली. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे बदला म्हणून कोंट-द-अल्वारेने छत्रपती संभाजी महाराजांचे गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव यांना अटक करून नजरकैदेत ठेवले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ एप्रिल इ.स.१६८७*
*छत्रपती संभाजी महाराज मोगलांवर बाहेरून हल्ले चढविण्याकरिता व सर्वत्र रसद मारून मोगली सैन्य जेर करण्यासाठी आपल्या सैनिकासह गोवळकोंड्याभोवती हिंडत होते. त्यांचे कर्नाटकातील सैन्यही नाकेबंदी करून राहिले होते. मच्छलीपटणचे दिनांक ४ एप्रिल १६८७ चे फोर्ट सेंट जॉर्जला लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजे १२ हजार स्वार व ५० हजार पायदळ लोकांसह गोवळकोंडा याच्या रोखाने गोवळकोंड्यापासून ४/५ दिवसांच्या मुक्कामावर आले आहेत असा मजकूर आहे. गोवळकोंड्याचा सुलतान मोगलांच्या हल्ल्याचा जोरात प्रतिकार करीत होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*४ एप्रिल इ.स.१७०३*
*सिंहगडचा रणसंग्राम*
*४ एप्रिल१७०३ ला तर सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*३ एप्रिल इ.स.१६८०*
*(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार)*
*महाप्रतापी स्वराज्य सुर्य अंधारला. हिंदवी स्वराज्य संस्थापक (निर्माते) महाराजांना देवाज्ञा!*
*आपले स्वराज्य पोरके करून छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले. रयत पोरकी झाली. मोहरीएवढ्या बिजातून एक अंकुर उमलावा व पाहता पाहता त्याचे वटव्रृक्षांत रुपांतर व्हावे. अफाट पसारा व्हावा असे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतून साकारले होते. उण्यापुर्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत पुण्याच्या ३६ गावच्या पोटमोकासेदारीने पुणे जहागिरीतील आजुबाजूच्या सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी हिंदवी स्वराज्याची सुरूवात आपल्या रक्ताभिषेकाने केली. पाहता पाहता महाराजांच्या मागे स्वराज्य उभे राहिले. संवगडी उभे राहिले. या सवंगड्यांच्या साथीने स्वराज्याचे हिंमतीचे पायदळ उभे राहिले अन् महाराज त्या पायदळाचे नेतृत्वकर्ते ठरून "नरपती" झाले. हळूहळू पायदळाबरोबर अश्वदल उभे राहिले. पागा सजल्या. पागेत घोडी फुरफुरू लागली अन् महाराज "हयपती" झाले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, गिरीकंदरातून राजांचे विजयी अश्व दौडू लागले. गजांतलक्ष्मी दारी येऊ लागली महाराज अन् "गजपती" झाले. रोहिडा, तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणारे राजे पुढे प्रतापगड, राजगड, रायगड, पुरंदर, सिंधुदुर्ग अशा अनेक किल्ल्यांवर स्वराज्याची तोरणे बांधली गेली. अन् महाराज "गडपती" झाले. याच बुलंद गडांनी परिसराची भुमी गडाच्या बलदंड आश्रयाने मुक्त होऊ लागली. आनंदवनभुवनी असल्याचा अनुभव जनतेला आला. अन् महाराज "भुपती" झाले. खळाळल्या समुद्रावर तरांडी फिरून स्वराज्यांच्या भगव्याची पताका सागरावर डौलाने फडकू लागली. अन् महाराज "जलपती" झाले. आणि मग तमाम मराठी साम्राज्याची मान ताठ मानेने उंचावेल असे महाराज रायगडी सिंहासनाधीश्वर झाले अन् महाराज "छत्रपती" झाले. या साऱ्यांचा नुसता विचार जरी आपण केला तरी मन थक्क होऊन नतमस्तक व्हावे असा पसारा महाराजांनी मांडला. तमाम मराठी मनगटांत चैतन्य निर्माण करून ताठ मानेने हिंदु म्हणून जगण्याचा अधिकार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला. असे महाराज हे शिवयोगी जाण्याने ३ एप्रिल इ.स.१६८० रोजी स्वराज्य पोरके झाले. शिवभारत संपले अन् स्रृष्टी हिंदोळली. शककर्ते छत्रपती शिवराय यांना त्यांच्या महानिर्वाणदिनी त्रिवार मुजरा...*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ एप्रिल इ.स.१६६३*
*कोंढाणे जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांची च का निवड केली? ३ एप्रिल १६६३ ला महाराजांनी पेशवे मोरोपंत पिंगळे व सोनदेव मुजुमदार यांना लिहिलेल्या पत्रात कोंढाणा किल्यावर फितुरी आहे. त्या साठी तान्हाजी मालुसरे यांना पाठवण्यात आले. या काळात तानाजी मालुसरे यांना गडाची खडा न खडा माहिती होती.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ एप्रिल इ.स.१६६७*
*आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला. आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ एप्रिल इ.स.१६७४*
*इ.स.१६७४ मध्ये इंग्रजांची शिवाजी महाराजांसोबत तहाची बोलणी सुरू होती. यावेळी नारायण शेणवी सोबत मुख्य वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडरची नेमणूक करण्यात आली. ३ एप्रिल रोजी दुपारी शेणवी आणि इंग्रज वकील शिवाजी महाराजांनी भेटला यावेळी राजापूरच्या वखारीची लुट केल्याने इंग्रजांचे जे नुकसान झाले होते त्याची भरपाई मिळावी याबद्दलची बोलणी झाली. शिवाजी महाराजांनी भरपाई देण्याचे मान्य केले. नुकसानीच्या रकमेबद्दल २५०० होन राजापूरच्या जकातीतून , २५०० होन १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्यावर्षी व उरलेले ५००० होन पुढील दोन वर्षात द्यावे असे शिवाजी महाराजांनी मान्य केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ एप्रिल इ.स.१६७४*
*"भीमजी पारख" मुद्रणयंत्राचा (प्रिंटिंग मशीन) पहिला भारतीय मालक...*
*"भीमजी पारख" हे इस्ट इंडिया कंपनीचे दलाल म्हणून काम करत असत. त्यांना (इंग्रजांच्या भाषेत) काही "ब्राह्मणी लिखाण छापण्यासाठी" (बहुदा देवनागरी असावे) मुद्रणयंत्र, मुद्रक व कागद हवे होते त्यासाठी त्यांनी जानेवारी १६७१ रोजी कंपनीकडे यांची मागणी केली होती. तब्बल तीन वर्षांनी म्हणजेच दिनांक ३ एप्रिल सन १६७४ रोजी भीमजी पारख यांना मुंबईत मुद्रणयंत्र (प्रिंटिंग मशीन), मुद्रक (छापणारा कारागीर) व कागद पाठविण्यात आले. मुद्रकाचा पगार दरसाल पन्नास पाऊंड ठरविण्यात आला होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ एप्रिल इ.स.१६७९*
*(वैशाख शुद्ध तृतीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, गुरुवार)*
*शंभूराजे दिलेर खानासह भूपाळगडावर :-*
*दिलेरखानाने छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याकडे आल्याचा फायदा घेऊन मराठी मुलखांतील प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेल्यावर दिलेरखान व छत्रपती संभाजी महाराज यांनी ३ एप्रिल १६७९ रोजी स्वराज्यातील भूपाळगड जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर बांधून त्याचे भूपाळगड असे नाव ठेविले होते. या किल्ल्यावर सामान, सरंजाम आणि मालमत्ता ठेवण्यात येत असे. गडावर लढाऊ शिबंदी व शूर शिपायांचा पक्का बंदोबस्त केलेला होता. मोगलांची फौज येत आहे असा पुकारा होतांच किल्ल्यांच्या आसमतांतील गावचे लोक किल्ल्यांत आश्रयास जाऊन राहिले. दिलेरखानाने शंभुराजेंच्या मदतीने भूपाळगड किल्ला घेतला. या वेळा किल्ल्यांचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते. दिलेरखानाने भूपाळगडची तटबंदी पाडून टाकली. यानंतर दिलेरखान व शंभुराजे विजापूरवर चालून गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ एप्रिल इ.स.१७९१*
*धारवाड किल्ल्यावर मराठा भगवा टिपू सुलतानच्या धारवाड किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या मराठा-इंग्रज फौजेचे नेतृत्व परशुरामभाऊ पटवर्धन करीत होते. ३ एप्रिल १७९१ रोजी किल्लेदाराने किल्ला रिकामा करून मराठ्यांच्या स्वाधीन केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३ एप्रिल इ.स.१९४८*
*अजेय असा हा जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२ एप्रिल इ.स.१६६०*
*पन्हाळा च्या वेढ्यात जौहरच्या तोफांचा मारा पन्हाळागडावर पोहोचेना म्हणून राजापूरच्या इंग्रज वखारवाल्याकडे एका लांब पल्ल्याची तोफ व दारूगोळा याची मागणी केली. जौहरचे बळ सारखे वाढत होते. शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे व पालवणीकर जसवंतराव दळवी हे सैन्य घेऊन जौहरला सामील झाले. इंग्रजांच्या राजापूर वखारीचा मुख्य हेन्री रिव्हींग्टन होता, याने जौहरची मागणी मंजूर केली आणि इंग्रज गोलंदाजांची एक तुकडी, लांबपल्ल्याची मोठी तोफ व दारूगोळ्याचे पेटारे घेऊन हेन्री साथीदार फिलिप गिफर्ड आणि मिंगहॅमसह राजापुराहून २ एप्रिल १६६० रोजी निघाला, तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी १० एप्रिल १६६० च्या सुमारास दाखल झाला. त्याने आपल्या तोफांचे पन्हाळगडाला मोर्चे लाऊन थेट तोफेला बत्ती दिली, अन् नुसती बत्ती दिली नाही तर शेजारी ब्रिटिशांचे निशाणही फडकावले. याला म्हणतात स्वतःच्या शौर्याबद्दलचा 'अधिक आत्मविश्वास'! महाराजांना अर्थातच गडावरून हे सारे दिसले होतेच. महाराज भयंकर संतापले. काही दिवसांपूर्वीच या इंग्रजांना आपण सवलत दिली, तेच आपल्यावर इतक्या लवकर उलटून आले!*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ एप्रिल इ.स.१६६३*
*(चैत्र वद्य अष्टमी, शके १५८५, शोभन, वार सोमवार)*
*महाराजांचे पत्र!*
*चिंताग्रस्त करणारी बातमी याच सुमारास किल्ले सिंहगडावरून आली होती. शाहिस्तेखानाने स्वराज्यात फंदफितुरीचे सत्र अवलंबले होते. तशातच किल्ले सिंहगडावर फितुरी करून भेदाने हा मोक्याचा गड आपल्या ताब्यात घेण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू केले होते. किल्ले सिंहगड मोगलांच्या घशात जाणे म्हणजे पुणे प्रांत हातातून जाण्यासारखे होते. त्यामुळे महाराजांनी अत्यंत तातडीने मोरोपंत पेशवे आणि निळोपंत मुजुमदार यांना पत्र पाठविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ एप्रिल इ.स.१६७९*
*औरंगजेबाने जिझिया कर लादला आलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले. आता जिझिया म्हणजे काय? असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?*
*इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत. एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू. मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली. शेख हमदानीने लिहिलेल्या "जसीरात-ए-मुल्क" प्रमाणे जगण्यासाठी खलिफ़ा उमरने मुस्लिमेतरांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या.*
*१) त्यांनी नवीन मंदीर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये.*
*२) तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुर्निर्माण करू नये.*
*३) मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदीरात रहाण्यावर बंधन राहणार नाही.*
*४) कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी ३ दिवस राहू शकेल. त्या काळात त्याने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही.*
*५) जर मुस्लिमेतरांची सभा असेल त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे.*
*६) मुस्लिमेतरांनी मुस्लिमांसारखी नावे ठेऊ नयेत.*
*७) त्यांनी मुस्लिमांसारखा पोषाख वापरू नये.*
*८) लगाम, खोगीर असलेला घोडा वापरू नये.*
*९) धनुष्य बाण व तलवार वापरू नये.*
*१०) अंगठी वापरू नये.*
*११) त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये.*
*१२) त्यांनी जुना पोषाख बदलू नये.*
*१३) आपले रितीरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये.*
*१४) आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कबस्तानाजवळ आणू नयेत.*
*१५) आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये.*
*१६) त्यांनी मुस्लिम नोकर ठेऊ नये.*
*१७) त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये.*
*यातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणार्याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाई.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ एप्रिल इ. स. १६७९*
*(वैशाख शुद्ध द्वितीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार बुधवार)*
*युवराज शंभुराजेंना घेऊन दिलेरखानाचा किल्ले भुपाळगडावर हल्ला!*
*दिलेरखान आणि युवराज शंभुराजे किल्ल्याला भिडले. चाकण येथील संग्रामदुर्गावर ५६, छपन्न दिवस शाहिस्तेखाना बरोबर झुंज देणारे व त्याला आपल्या अतुल पराक्रमाने चकित करणारे फिरंगोजी नरसाळा हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून विठ्ठल भालेराव हे सबनीस होते. दिलेरखानाने मराठ्यांच्या विरुद्ध इखलासखान, राजा जसवंतसिंह बुंदेला, रशीद अली रोशनाई ऊर्फ इल्हामुल्लाहाखान यांना रवाना केले. पण मराठ्यांचे सैन्य अधिक होते म्हणून दिलेरखान हा तातडीने आपल्या सरदारांच्या मागोमाग पोहोचला आणि त्याने मराठ्यांचा मोड केला आणि तो परतला. मोगली आक्रमणात गडावरील सर्व माणसे कैद केली गेली. माणसांना सुखरूप जाऊ दिले जावे या युवराज शंभुराजेंच्या विनंतीनंतरही गडावरील ७००, सातशे माणसांना कैद करून त्यांचा एक हात कलम करून दिलेरखानाने आपल्या क्रृरतेचे दर्शन घडविले. दिलेरखानाने भुपाळगड चक्क जमीनदोस्त करून आपल्या नीच मानसिकतेचे दर्शन घडविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ एप्रिल इ.स.१७२०*
*(शार्वरी नाम संवत्सरी, चैत्र शुद्ध षष्ठी, शके १६४२)*
*बाळाजीपंत कोल्हापूरची मोहीम झाल्यानंतर सातारला शाहूमहाराजांच्या भेटीकरिता आले. तेथून ते सासवडला परतले. एक-दोन दिवस गेले असतील तेच बाळाजीपंत अतिशय आजारी पडले. गेल्या दोन वर्षांतली सततची धावपळ, दिल्ली स्वारीनंतर लगेचच कोल्हापूरस्वारीची दगदग बाळाजीपंतांना मानवली नाही आणि शेवटी दि. २ एप्रिल १७२० रोजी शार्वरी नाम संवत्सरी, चैत्र शुद्ध षष्ठी, शके १६४२ ला क-हामाईच्या तीरावरच्या काळ्या वाड्यात बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. शेवटपर्यंत शाहू छत्रपतींचे अन् स्वराज्याचे हित बघणारे अन् आता स्वराज्याने सुखाच्या गृहात पाऊल टाकताच कृतार्थ झालेले स्वराज्याचे एकनिष्ठ पाईक श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे काळाच्या पडद्याआड गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ एप्रिल इ.स.१७२६*
*पुण्यात येताच थोडी विश्रांती घेऊन श्रीमंत बाजीराव साताऱ्याला छत्रपती शाहूमहाराजांची भेट घेऊन आले. पुण्याला परत येताच बाजीरावांनी जिवाजी गणेश खासगीवाले यांना बोलावून घेतले. इ. स. १७२६ (२ एप्रिल १७२६- पेशवे दफ्तर) मध्ये शाहूमहाराजांनी पेशव्यांना पुणेगाव वंशपरंपरागत इनाम म्हणून दिला होता. परंतु, तरीही पेशव्यांचा स्वतःचा असा पुण्यात वाडा नव्हता. म्हणून बाजीरावांनी खासगीवाले यांना श्रीमंत पेशवे यांच्या इभ्रतीला अन् पराक्रमाला शोभेल असा, झोकदार आणि मजबूत वाडा (शनिवारवाडा) उभारण्याची आज्ञा केली. दोन दिवसात वाड्याचा नकाशा तयार झाला. पण वाडा नेमका कुठे बांधावा याबद्दल एकविचार होत नव्हता. शेवटी लालमहालाच्या पश्चिमेस आणि मुठेच्या दक्षिण तीरावर उत्तम जागा सापडली. बाजीरावांनी जागा पाहिली. शेजारीच श्री कसबा गणपती आणि शिवछत्रपतींचा पवित्र लालमहाल होता. बाजीरावसाहेबांनी ताबडतोब बांधकाम सुरू करण्यास सांगितलं.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२ एप्रिल इ.स.१८९४*
*राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक*
*कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१ एप्रिल इ.स.१६४७*
*(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५६९, संवत्सर सर्वजित, वार गुरुवार)*
*महाराज पुणे मुक्कामी!*
*महाराज माँसाहेब जिजाऊसाहेब यांच्यासह खेडेबारे मुक्कामी. तीथुनच सुरूवातीला महाराजांनी माँसाहेब जिजाऊसाहेब यांच्यासमवेत स्वराज्याचा कारभार चालविला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ एप्रिल इ.स.१६६५*
*दि. १ एप्रिल रोजी दिलेरखान वेगाने १५ कि. मी.वर असलेल्या सोनोरीवरुन पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला. खानाने लगेच मोचेर्बंदी सुरू केली. स्वत: खान जातीने नेतृत्त्व करीत होता. मिर्झाराजे या वेढ्यापासून दीड कि. मी. असलेल्या नारायणगावापाशी आपली छावणी ठोकून राहिले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ एप्रिल इ.स.१६६९*
*औरंगजेबाने हिंदुंचे पवित्र क्षेत्र काशी विश्वेश्वराचे देऊळ पाडण्याचा हुकूम दिला. औरंगजेबाने मुअज्जमला परत बोलावले आणि त्या जागी बहादुरखान आला. सूर्यग्रहण होते, त्या मुहूर्तावर काशीविश्वेश्वराचे देऊळ पाडण्याचा हुकूम बादशहाने दिला. हिंदुंचे पवित्र क्षेत्र काशी आणि सार्या हिंदुजनांचे विश्वेश्वर हे आराध्य दैवत, जमीनदोस्त झाले. मथुरेचे केशवराजाचे मंदिर साफ केले आणि मथुरेचे "इस्लामाबाद" हे नामांतर झाले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ एप्रिल इ.स.१६७३*
*(चैत्र वद्य दशमी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार मंगळवार)*
*मराठ्यांनी सातारा जवळचा "परळीचा किल्ला (सज्जनगड)" जिंकला.*
*सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे. पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले 'नवरसतारा' पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा 'सज्जनगड' म्हणून नामकरण विधी केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ एप्रिल इ.स.१७३१*
*छत्रपती शाहूमहाराजांनी श्रीमंत बाजीरावांना गुजराथेत उतरण्याची परवानगी दिली. (१७३१) पेशवे गुजराथेत जात आहेत ही बातमी कळल्यावर त्र्यंबकरावही आपली फौज घेऊन श्रीमंत बाजीरावांच्या पाठलागावर गेले. पण शेवटी व्हायचे तेच झाले. त्र्यंबकराव दाभाडे आपल्या पिलाजी गायकवाड या सरदारानिशी बाजीरावांवर चालून आले. बाजीराव पेशवेही हुशार होतेच. दि. १ एप्रिल १७३१ रोजी गुजराथेतील डभईनजीक भिलापूरच्या मैदानात सेनापती दाभाडे आणि बाजीराव पेशवे यांच्यात लढाई जुंपली. पेशवे स्वतः घोड्यावर बसून लढत होते. त्र्यंबकराव मात्र हत्तीवर अंबारीत बसून सैन्याला सूचना देत होते. एकाएकी कसे झाले, कोणाच्या हातून झाले ते माहीत नाही. परंतु, त्र्यंबकरावांना बंदुकीच्या गोळीचा (जंबुरियाचा) जबरदस्त फटका बसला आणि गोळी वर्मी लागून त्र्यंबकराव दाभाडे पडले. त्र्यंबकराव पडले ही बातमी ऐकताच दाभाड्यांचे सैन्य चोहोदिशांना पळत सुटले. पिलाजी गायकवाडही पसार झाले. ते थेट तळेगावच्या दिशेने. कितीही झाले तरी त्र्यंबकराव हे स्वराज्याचे सेनापती होते. त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी छत्रपतींकरिता स्वतःचे रक्त सांडले होते. युद्ध संपले, वैर सरले. बाजीरावाने मोठ्या मनाने त्र्यंबकरावांचे अंत्यसंस्कार केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१ एप्रिल इ.स.१८१७*
*पेशव्याने सुद्धा इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती. त्याने आपल्याकडील जडजवाहर व खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला. दिनांक १ एप्रिल १८१७ रोजी एल्फिन्स्टनने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजीचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीररीत्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाइटाचे धनी तुम्हीच व्हाल. दिनांक ६ एप्रिलला बाजीरावाने एल्फिन्स्टनला भेटीस बोलाविले व नेहमीच्या पद्धतीने त्याने लाचारी दाखवून लाघवी बोलून डेंगळेच्या बाबतीत आपण निरपराधी आहोत अशी बतावणी केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*३० मार्च इ.स.१६६३*
*(चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १५८५ संवत्सर शोभन वार सोमवार)*
*सरसेनापती नेतोजी पालकर जखमी!*
*मोगली मुलखात लुटालूट करण्यासाठी सरसेनापती नेतोजी पालकर गेले होते. परंतु दैव प्रतिकूल होते. त्यामुळे मोगली मुलखातच मुघल फौजेने त्यांना गाठले व चकमक झाली. सरसेनापती नेतोजी पालकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु बळ कमी पडल्यामुळे मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हाताला व पायाला जखमा होऊन ते जायबंदी झाले. मात्र मराठा फौजेचा पाठलाग करीत मुघल सैन्य विजापुर मुलखात दाखल झाले. यावेळी रस्तम ए जमान याने मुघलांची भेट घेऊन त्यांचे मन वळविले. अपरिचित मुलूख असुन अनवट वाटा व जंगल असल्यामुळे सरसेनापती नेताजी पालकर यांचा पाठलाग करु नये. असे सांगून मुघल सैन्य माघारी पाठविले. रुस्तम-ए-जमान व महाराजांचा अंतस्थ स्नेह अशा रीतीने उपयोगास आला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३० मार्च इ.स.१६६५*
*मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी ठरविल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक १५ मार्च १६६५ रोजी निघाले. बरोबर अफाट फौज, तोफखाना व सामान, सरंजाम होता. ते राजेवाडीच्या जवळपास दिनांक ३० मार्चला पोचले. तेथून जयसिंगाने दिलेरखानास सासवडला रवाना केले. सासवड मुक्कामी त्याजवर मराठी फौजेचा अचानक छापा पडला. गडबड उडाली पण खान आपली फौज घेऊन दौडत सुटला पुरंदरा कडे निघाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३० मार्च इ.स.१६८४*
*(चैत्र वद्य दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार रविवार)*
*औरंगजेबाचे विजापुरकरांना फर्मान!*
*औरंगजेबाने विजापुरकरांना एक फर्मान धाडले. त्यात विजापुरकरांना खडसावून सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांची तुमची मित्रता व सख्य करण्याचे सोडून आपण सर्वांनी एकदील होऊन छत्रपती संभाजी महाराजांचा फडशा पाडला पाहीजे. या आशयाचे हे फर्मान म्हणजे विजापुरकरांना एक प्रकारे तंबी होती.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३० मार्च इ.स.१७२९*
*थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतापुर इथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. नर्मदेच्या उत्तरेकडच्या प्रदेशाला हिंदुस्थान म्हणत. त्या सुमारास रोहिलखंडाच्या महमद बंगश याने बुंदेलखंडावर आक्रमण केले.*
*बुंदेल राजे महाराज छत्रसाल आक्रमणाने त्रस्त झाले. त्यांनी राऊंना आपल्या भाषेत दोन चरणांत आपली स्थिती लिहून कळवली, त्याचा मथितार्थ*
*जो गती गजेंद्र की, सोही गत पावत आज*
*बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज ।।*
*सुसरीच्या तोंडात पाय अडकलेल्या लक्ष्मीच्या गजेंद्र-हत्तीची जी गत, त्या अवस्थेत मी आहे.*
*अशा प्रकारचा छत्रसाल यांचा याचनास्पद निरोप येताच, राऊंनी महाराज छत्रसाल बुंदेल्यांना त्यांच्यावर झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३० मार्च इ.स.१७४०*
*फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक बाजीरावांची प्रकृती बिघडली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*३० मार्च इ.स.१७४१*
*सातारा व कोल्हापूरकर छत्रपति या एका झाडाच्या दोन फांद्या. ह्या दोन गाद्या एक कराव्या असा विचार बाळाजी बाजीरावांचा होता. त्यास चिमाजीअप्पांची संमति होती. कोल्हापूरकर संभाजी राजे शाहू महाराजांच्या भेटीस साताऱ्यास आले आणि तारीख २ जून १७४० ते ३० मार्च १७४१ पर्यंत साताऱ्यास राहिले. ह्या मुदतीत बाळाजी बाजीरावांनी कोल्हापूरच्या संभाजी राजांशी वाटाघाटी करून शाहू महाराजांच्या पश्चात राज्यव्यवस्था कशी करावी ह्या बद्दल एक गुप्त करार संभाजी राजांशी केला. हा करार शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाहेर न फुटण्याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली. करार नानासाहेब व चिमाजी अप्पा ह्या उभयतांनी संभाजी राजे यास लिहून दिला. त्यातील मुख्य बाब अशी “सातारचे राज्य स्वामींचे आणि एकछत्री शिक्का महाराजांचा (संभाजी राजांचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे तो बाह्यात्कारी आम्ही त्यांचे सेवक परंतु अंतर्यामी स्वामींचे, शाहू महाराज ह्यांनी कैलासवास केल्यावर दोन्ही राज्ये स्वामींची व आम्ही सेवक स्वामींचे, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करू”. शाहू महाराज निवर्तल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली की हा करार मागे पडला आणि दोन्ही राज्यांचा समेट घडवून आणण्याचे काम तसेच राहून दोघांच्या भांडणामुळे राष्ट्राची हानी व्हावयाचे टळले नाही.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२९ मार्च इ.स.१६५७*
*(चैत्र वद्य दशमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार रविवार)*
*औरंगजेब अडकला!*
*विजापुर काबीज करून दिल्लीचे तख्त मिळवायचे व नंतर सम्राट म्हणून मिरवायचे असे मनी धरून, औरंगजेबाने बिदर कल्याणी हा भाग जिंकला. पण याच अतिउत्साहात औरंगजेब एका मोक्याच्या क्षणी अफजलखानाच्या हातात सापडला. अफजलखान विजापुरच्या बादशहाशी एकनिष्ठ होता. त्यामुळे त्याने औरंगजेबास ठार मारायचे ठरविले व विजापुरवरील संकट कायमचे दूर करावयाचे असे मनोमन ठरविले. बिदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात आला. मात्र याच प्रयत्नात औरंगजेब अफजलखानाच्या तावडीत सापडून जिवावरच्या संकटावर सापडला होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ मार्च इ.स.१६६७*
*सिंधुदुर्ग आज रोजी बांधून पूर्णत्वास आला, म्हणून महाराजांनी गडावर मोठी पूजा घातली. मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली;" या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो.*
*मालवण किनार्यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्वत: हजर होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षाच्या काळात महाराजांनी लिहीलेली किल्ले बांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ मार्च इ.स.१६७०*
*२९ मार्चला मुंबईकर इंग्रजांनी त्यांच्या सुरतेच्या वरिष्ठाना अजून एक पत्रं लिहिलं त्या पत्रात ते म्हणत आहेत. *मुंबई - सुरत 'शिवाजीला कोणाचाही विरोध न होता तो एकसारखा जिंकत चालला आहे. त्याने मोगलांपासून पुरंदर किल्ला घेतल्याची आज बातमी आली. कर्नाळा देखील फार दिवस टिकाव धरणार नाही.'*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ मार्च इ.स.१६८५*
*विजापुरचे किल्ल्याला वेढा पडला.*
*रसलपुरच्या बाजूने (पश्चिमेकडून) बहादुरखान, शहापुरचे बाजूने राहुल्लाखान बक्षी, नागठाण विजापुरपासूनचे ८ मैलांवरील (सु.१३ कि.मी. वरील) ठिकाणी बहादुरखानाचा तळ पडला. लढाईची सर्व सुत्रे शहजादा आज्जमच्या हातात होती. मोगली वकील खाज्या अब्दुल रहीम याच्याशी लढाई सुरू झाली. त्याच्या मदतीस बहादरखानाचा मुलगा दौलतमुरा व राजमहंमद याचे तक्त्यात येऊन किल्ल्यावर हल्ला करून परत गेला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ मार्च इ.स.१७३७*
*मराठ्यांचा जरीपटका साष्टीवर डौलाने फडकला*
*मराठे पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले. मराठ्यांची फौज साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची, प्रबळगड, खिडकाळी, शिळ मार्गे कळव्यात आले. लढणारी तुकडी साष्टीकडे (ठाण्याकडे) रवाना झाली. २६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला. जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले. अपुरा दारुगोळा आणि शिबंदी यामुळे पोर्तुगीज आपल्या कुटुंबकबिल्यासह गलबतातून वसई आणि उरणकडे पळून गेले. २९ मार्च १७३७ ला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकला. पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ मार्च इ.स.१७५५*
*इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी आंग्रेंचा सुवर्णदुर्ग घेतला तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला,सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला.सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व,प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली,इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते.इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला. इंग्रजांनी या मोहिमेची कामगिरी कप्तान विलियम जेम्स यांच्याकडे सोपवली.इस्ट इंडिया कंपनीची ४१ लढाऊ गलबते मुंबईहून सुवर्णदुर्गकडे निघाली त्यांना पुढे पेशव्यांची ६० गलबते,७ तारवे आणि १ बातेला येऊन मिळाले.अश्या प्रकारे हे संयुक्त आरमार २९ मार्च १७५५ ला सुवर्णदुर्ग ला येऊन थडकले.२ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२९ मार्च इ.स.१८५७*
*क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२८ मार्च इ.स.१६७०*
*आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले. आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ मार्च इ.स.१६८३*
*(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार)*
*छत्रपती संभाजी महाराजांचे सरदार नारोजीराव यांनी धारूर किल्ल्यावर चाल केली.*
*छत्रपती संभाजी महाराजांच्या हुकुमानुसार मराठे व-हाडपर्यंत मुलुखगिरी करत होते. मराठ्यांच्या मुलुखगिरीत त्यांची अनेक ठिकाणी मोगलांशी चकमक उडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नारोजी नावाच्या एका सरदाराने धारूर किल्ल्यावर आपल्या सैन्यासह चाल केली. किलअदारखान या किल्लेदाराशी सामना झाला. १०० मराठी सैन्य मारले गेले. किल्लेदाराने त्यांची डोकी कापून मनोरा रचला. १३ लोकांना जिवंत पकडले. मोगल सैनिक बहुतेक कामी आले. मात्र मराठ्यांनी प्रचंड पराक्रम गाजवून मोगल सैन्य कापून काढले. छत्रपती संभाजी महाराजांच्या सूचनेनुसार मराठी सरदारांचा यल्गार जबरदस्त होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२८ मार्च इ.स.१७३७*
*बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला. मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२७ मार्च इ.स.१६६६*
*औरंगजेबाचे राज्यरोहन*
*१६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून घेण्याचा नैतिक अधिकार औरंगजेबाला प्राप्त झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दि. २७ मार्च १६६६ ला आग्रा येथे बादशहाचा राज्यारोहण केला. शिवराय त्यावेळी प्रवासातच होते. राज्यरोहणाच्या वेळी औरंगजेबाने आपल्या बहिणींना पुष्कळ संपत्ती दिली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मार्च इ.स.१६६७*
*मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले. नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले. जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मार्च इ.स.१६८९*
*छत्रपती शंभूराजेंच्या मृत्यूनंतर मातबरखान कोकणात (कल्याण जवळ) उतरला. तो माऊलीहून २७ मार्च १६८९ रोजी कल्याणला आला. नंतर त्याने कल्याणकडील दुर्गाडी किल्ल्याला वेढा घातला. अगदी अल्प काळातच ह्या किल्ल्याचा शासन कारभार सुरळीतपणे चालवण्याचे त्याने औरंगजेबास आश्वासन दिले. माहुलीगड म्हणजे तळकोकणचे प्रमुख ठाणे असल्याचे त्याने औरंगजेबाला कळवले. परंतु त्याच्या परिसरात मोगल साम्राज्याची कोठेही ठाणी नव्हती. किल्ल्यात दाणागोट्याचा साठा मुबलक होता आणि किल्ला अत्यंत बळकट होता. दुर्गाडीच्या किल्ल्याला वेढा घालण्याच्या दृष्टीने त्या किल्ल्याच्या सभोवतालच्या परिसरात मोगलांची सुसज्ज अशी लष्करी ठाणी बसवणे महत्त्वाचे होते. तेव्हा मातबरखानाने फितुरीच्या तंत्राने माहुली सर करण्याचे ठरविले. त्याने गडावरील किल्लेदाराशी संधान बांधले. द्वारकाजी (किल्लेदार) आणि त्यांच्या सैन्याच्या तुकडीतील काही सैनिकांनी बादशहाची चाकरी स्वीकारावी असे आवाहन मातबरने आग्रहपूर्वक केले. मोगलांना जे सामील होतील त्यांना मनसब देण्याचे, बक्षीस आणि इतरही शाही मानमरातब देण्याचे आश्वासन खानाने दिले. मोगल औरंगजेबकडून त्यांना सनदा दिल्यावर द्वारकाजी व त्याच्या अनुयायांनी माहुली आणि त्याच्या परिसरातील महेंद्रगड, पासलगड वगैरे किल्ले मोगलांच्या स्वाधीन करण्याचे मान्य केले. मातब्बरखानाने माहुलीगडाच्या किल्लेदाराला २५०० सुवर्ण मोहरा दिल्या आणि किल्ल्याचा ताबा घेतला. मातब्बरखानाने कल्याण काबीज केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मार्च इ.स.१६८६*
*छत्रपती संभाजी महाराज विजापूरचा सुलतान आणि गोवळकोंड्याचा सुलतान या तिघांनी तह करून औरंगजेबाला तोंड देण्याची तयारी केली होती. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांशी मैत्री करणाऱ्या आणि त्यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या ह्या दोन्ही सुलतानाच्या राज्यावर स्वारी केली. इ. स. १६८५ सालच्या एप्रिल महिन्यात औरंगजेबाने विजापूरचा वेढा सुरू केला. दिनांक २७ मार्च १६८६ ला त्याने विजापूरवर स्वारी केली आणि विजापूरकरांनी निकराने केलेल्या प्रतिकारास तोंड देऊन दिनांक २ सप्टेंबर १६८६ रोजी विजापूर जिंकून घेतले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मार्च इ.स.१७३७*
*चिमाजीअप्पांनी ठाणे जिंकले.*
*२६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला. जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मार्च इ.स.१७५२*
*दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा !*
*कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. २७ मार्च १७५२ होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी यादोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मार्च इ.स.१७६७*
*मालेराव होळकरांचा मृत्यू*
*मल्हाररावांचे एकुलते एक पुत्र खंडेराव कुंभेरीच्या १७५४ च्या वेढ्यात त्यांस तोफेचा गोळा लागला व त्यांत त्यांचे निधन झाले (१७ मार्च १७५४). त्यांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च १७६७ रोजी मरण पावले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२७ मार्च इ.स.१७८५*
*शिखांचा तह*
*नजीबखानाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात जो गोंधळ निर्माण झालेला होता , त्याचा फायदा घेऊन दिल्लीच्या आसपासच्या मुलखात,गुजर लोक लुटमार करीत होते. त्यामुळे त्या प्रांतातील लोकात खूप असंतोष निर्माण झाला होता.अंबूजी इंगळेंनी गुजर लोकांचा बंदोवस्त करून त्या प्रांतातील लोकांना दिलासा दिला. त्यामुळे साहजिकच तेथील लोकांना आनंद झाला. त्यानंतर अंबूजी इंगळेंनी आपले सर्व लक्ष शिखांकडे वळविले, दि .२७ मार्च १७८५ रोजी अंबूजी इंगळे ह्यांनी दिल्लीच्या उत्तरेस तेरा मैलावर असलेल्या भक्तावरपूर येथील आपल्या छावणीत काही शिख सरदाराच्या भेटी घेतल्या. ह्या शिख सरदारात बघेलसिंग, करमसिंग, दुलजासिंग, भागसिंग, दिवाणसिंग, मोहनसिंग, गोहरसिंग ह्यांचा समावेश होता. ह्या भेटीमध्ये मोहनसिंग आणि दुलजासिंग ह्या प्रमुख सरदारांनी महादजींना भेटून मैत्रीच्या करारावर सह्या करावे असे ठरले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२६ मार्च इ.स.१६६७*
*छत्रपती शिवाजी महाराज श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा रोजी सिंधुदुर्गावर पोहोचले. याचवेळी हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडी व जस्त मिश्रणावर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते. तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता. सिंधुदुर्गाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या हिरोजींनी महाराजांकडे एक इच्छा मागितली, ते म्हणाले, "महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते. आमची एक इच्छा आहे, तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत. "छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले. दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले. महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात. स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे, चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला. त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता. तुतारी निनादली तोफांचे बार उडाले पुन्हा चौघडा वाजू लागला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मार्च इ.स.१६६७*
*औरंगजेब बादशहाने 'मिर्झाराजा जयसिंग' यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली आणि 'शहजादा मुअज्जम' ला दक्षिणेचा नविन सुभेदार नेमले.*
. 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मार्च इ.स.१६८१*
*(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार शनिवार)*
*औरंगजेबाने मुसलमानी प्रजेवरही कर लावला.*
*पैशांच्या टंचाई मुळे त्याने मुसलमानी जनतेवर २.५% नजर लावून खजिना वाढीकडे जातीने लक्ष दिले. याआधीच बिगर मुसलमानी प्रजेवर साडेतीन टक्के कर लावला होता.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मार्च इ.स.१७३७*
*चिमाजी अप्पांनी साष्टी जिंकले*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मार्च इ.स.१७५५*
*तुळाजीने १७५४ मध्ये इंग्रजांची अनेक जहाजे पकडली, काही जाळली. तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिशिक्त राजात समजला जाऊ लागला. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवेच्या कारकीर्दीत बिनसले. हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्याने ते वाढविले, असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता. पेशव्यांचे इंग्रज आणि पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते. इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. त्याचा फायदा घेऊन आंग्रे बंधूचा मिळेल तितका प्रदेश जिंकण्याचा सपाटा पेशव्यांनी लावला. तुळाजीने घाबरून नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे, त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळविले; तथापि पेशव्याने २६ मार्च १७५५ रोजी तुळाजीविरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला. अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग फेब्रुवारी १७५६ ला इंग्रजांच्या हाती पडला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२६ मार्च इ.स.१७७४*
*बारभाई कारस्थान - कासेगांवची लढाई*
*उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. यात त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२५ मार्च इ.स.१६७५*
*'जाॅन चाईल्ड' या इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांची भेट घेतली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२५ मार्च इ.स.१६८९*
*मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार 'झुल्फीकारखान' याने मराठ्यांची राजधानी 'किल्ले रायगड' ला वेढा घातला. याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला. जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले. वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२५ मार्च इ.स.१७०३*
*सिंहगड किल्लेदाराच्या मृत्यू नंतर मोगलांचे मोर्चे २१ मार्च रोजी कल्याण दरवाजात पर्यंत सरकले होते. त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठयांनी २५ मार्च रोजी उजबेकखांनाच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला. व तेथे कापाकापी करून परत किल्ल्यात गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२५ मार्च इ.स.१७५७*
*प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩













