❤🚩शिवभक्त🚩❤
ShareChat
click to see wallet page
@mangesh5663
mangesh5663
❤🚩शिवभक्त🚩❤
@mangesh5663
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१९ मे इ.स.१५२०* *रायचूरची लढाई* *विजयनगर सम्राट कृष्णदेवराय आणि विजापूरचा इस्माईल आदिलशाह यांच्यात रायचूर येथे युद्ध, यात आदिलशहाचा सपाटून पराभव. विजयनगर साम्राज्याचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि उत्कृष्ट नेतृत्व याचे प्रतीक म्हणजे रायचूरची लढाई. शत्रूचेही डोळे दिपावेत इतके प्रचंड लष्कर राजधानीतून लढाईसाठी बाहेर पडले होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ मे इ.स.१६६६* *(वैशाख वद्य एकादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)* *महाराजांची सुटकेसाठी वेगळी खेळी!* *महाराजांना आपल्या सुटकेची कुठलिही शक्यता दिसून येत नव्हती. महाराजांनी एक वेगळीच खेळी खेळायला सुरुवात केली. त्यांनी शहरातील अमीर उमराव, आधिकारी, हिंदु सरदार, मंत्री, व्यापारी यांना भेटून आपल्या विषयी जनमत तयार करण्यास सुरुवात केली. मात्र, आपल्या नजरबाजांमार्फत आग्र्याच्या दरबारात काय घडते याची चाचपणी सुद्धा सुरू केली. औरंगजेब बादशहाचा वजीर जाफरखान याने महाराजांचा अर्ज औरंगजेब बादशहाला सादर केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ मे इ.स.१६७३* *शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग* *""पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.* *नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल!* *रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. हाली उनाळ्याला आहे. कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील. आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो.''* *शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये. शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो. शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ मे इ.स.१६७३* *इंग्रजांचा वकील टाॅमस निकल्स महाराजांना भेटण्यास किल्ले रायगडाकडे रवाना!* *सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी हुबळीला इंग्रजांची वखार लुटली. त्यामुळे इंग्रज फार चिडले आणि त्यांनी महाराजांचे मालवाहू व्यापारी गलबत मस्कतहून राजापुरला चालले होते, ते लुटले आणि महाराजांकडे आपले हुबळीच्या लुटीची नुकसान भरपाई करण्याची मागणी करण्यासाठी, "वाघजी दलाल" हा वकील पाठविण्याचे ठरले. पण पुन्हा विचार बदलून आपलाच इंग्रज वकील निकल्स याला शामजी नावाचा एक व्यापारी व ३७, सदतीस अन्य व्यक्ती बरोबर देऊन पाठविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ मे इ.स.१६७४* *छत्रपती शिवाजी महाराज रायगडहून प्रतापगडास १६ मे आले. प्रतापगड येथे ते ३ दिवस राहिले आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस सव्वा मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित करून राजाभिषेकाआधी देवीचा आशीर्वाद घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१९ मे इ. स. १६७४* *( वैशाख वद्य नवमी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार मंगळवार, ) रोजी इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री आक्झेंडन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामी!* *विजापुरकर, जंजिरेकर, पोर्तुगीज यांना स्वपराक्रमाने महाराजांनी वठणीवर आणलेले होते. महाराजांच्या महापराक्रमाने धास्तावलेले तहाची बोलणी करण्यासाठी विजापुरकरांचे अनेक वकील महाराजांकडे येऊ लागले होते. जंजिरेकर सिद्दीही इंग्रजांच्या मध्यस्थीने तहाची याचना करीत होता. पोर्तुगीज महाराजांच्या संभाव्य आक्रमणामुळे विलक्षण धास्तावलेले होते आणि इंग्रजांनी तहासाठी हेन्री आॅक्झेडन यांस नजराणा देऊन राज्याभिषेकाच्या मुहुर्तावर किल्ले रायगडी रवाना केले होते. हेन्री आॅक्झेंडन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे पोहोचला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - ऐतिहासिक दिनविशेष 38 = 3608 महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन शिवरार्यांनी प्रतापगडावरील तुळजा भवानीस १२५ घण् वजनाचे छ्च्रिचामर अर्पण कैले आणि ्गलकलश ध्स्थापिन करू्न रज्याभिषैकछधी दैवीचा आशीर्वाद पैतला ऐतिहासिक दिनविशेष 38 = 3608 महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन शिवरार्यांनी प्रतापगडावरील तुळजा भवानीस १२५ घण् वजनाचे छ्च्रिचामर अर्पण कैले आणि ्गलकलश ध्स्थापिन करू्न रज्याभिषैकछधी दैवीचा आशीर्वाद पैतला - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१८ मे इ.स.१६५९* *छत्रपती शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकराची अफजलखानाच्या कैदेतून सुटका केली* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१८ मे इ.स.१६६६* *(वैशाख वद्य दशमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)* *काबूल मोहीम बारगळली!* *काबूल मोहीम तर बारगळली मात्र, याचे काही श्रेय हे औरंगजेब बादशहाचा वजीर जाफरखानाला देखील जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाफरखानाची भेट स्वतः त्याच्या घरी जाऊन घेतली व त्याला मोठा नजराणा दिला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१८ मे इ.स.१६८२* *(वैशाख वद्य ७, सप्तमी, शके १६०४, दुदुंभी नाम संवत्सर, वार गुरुवार)* *स्वराज्याचे तिसरे वारसदार शाहुराजेंचा जन्म!* *(मृत्यू १५ डिसेंबर १७४९) स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे वा स्वराज्यसंकल्पीका आऊसाहेब यांच्या प्रेरणेने स्वराज्यनिर्माते शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण करण्याचा पाया रचला, स्वराज्य निर्माण केले, ते निर्माण केलेले स्वराज्य रक्षीण्याचे शिवकार्य स्वराज्यरक्षक शिवपुत्र शंभूराजांनी, येसूबाईसाहेबांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी केले. पुढे या स्वराज्याचा विस्तार संताजी धनाजी सारख्या मातब्बर सरदारांच्या मदतीने ज्यांनी उत्तर भारत, मध्यभारत, गुजरात , माळवा पर्यंत केला ते स्वराज्यविस्तारक म्हणजे शंभुपुत्र छत्रपती शाहु महाराज. यांचा जन्म १८ मे १६८२ झाला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१८ मे इ.स.१६८२* *म्हैसुरच्या "चिकदेवराय" कडून मराठे पराभूत झाले पण 'मुदेरच्या नायकावर' मराठ्यांनी विजय मिळवला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 📜 *१८ मे इ.स.१६८४* *शहजादा रामघाटाने वर येऊ लागला तेव्हा 'मरीचा रोग' उत्पन्न होऊन त्याच्या सैन्यातील बरेचसे लोक मृत्युमुखी पडले, घोडे, हत्ती, उंट इतके मेले कि त्यांची दुर्गंधीने सारा प्रदेश दुषित होऊ लागला. जनावारे मेल्याने सर्वांवर पायी चालण्याची पाळी आली. आपल्या पुत्राची बातमी ऐकून बादशहाने त्यास नवीन सरंजाम पाठवला. व आजच्या दिवशी होते नव्हते सर्व गमावून शहजादा 'अहमदनगर' येथे आपल्या पित्याजवळ पोहचला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१८ मे इ.स.१७२४* *जंजिऱ्याचा सिद्दी हा मोगलांचा अंकीत होता. तेव्हा त्याने जिंकलेले किल्ले आणि मुलूख बादशहाने त्याजकडून मराठ्यास मिळवून द्यावेत अशी अट बादशहा व शाहू महारांज यामध्ये जो १८ मे १७२४ मध्ये करार ठरला त्यामध्ये होती. [बादशहातर्फे दक्षिणेतील सुभेदार मुंबीझखान व श्रीमंत बाजीराव पेशवे यांमध्ये तहाच्या वाटाघाटी झाल्या होत्या] त्या अटीनुसार जंजिऱ्याच्या सिद्दीकडे मराठ्यांनी सिद्दीच्या ताब्यात असलेल्या आपल्या किल्ल्यांची व मुलखाची मागणी केली. सिद्दीने ती मागणी झिडकारून लावली. ही मागणी पुरी करून घेण्याकरिता श्रीमंत बाजीरावांस जंजिऱ्याच्या सिद्दीवर स्वारी करावी लागली. ही सुद्धा मुलूखगिरीची स्वारी होय. या स्वारीत जंजिऱ्याच्या सिद्दीचा पराभव होऊन त्यास मराठ्यांचा मुलूख व किल्ले परत करावे लागले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *⛳जय गडकोट⛳* *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - शिवदिनविशेष मे इ.स.१६५९ १८ शिवरायांनी बजाजी निंबाळकराची अफजलखानाच्या कैदेतून " सुटका केली हाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेन  शिवदिनविशेष मे इ.स.१६५९ १८ शिवरायांनी बजाजी निंबाळकराची अफजलखानाच्या कैदेतून " सुटका केली हाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेन - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१७ मे इ.स.१६५६* *छत्रपती शिवाजी महाराज उत्तर कोकणातील मोहिमेसाठी रवाना.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१७ मे इ.स.१६६६* *१६ मे या दिवशी बादशाहाने आग्र्याच्या कैदेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला! त्याचे असे झाले की, औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले. त्यांचा मुद्दा एकच. या सीवाला ठार मारा. त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण. तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की, या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली. ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरत शहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की, 'होय. मी सीवाला ठार मारणार आहे!' हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते. पण आश्चर्य असे की, ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला. त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने मीरबक्षीला कळवळून विनंती केली की, माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊन सादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी अर्ज लगेच तयार केला. तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही! त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.* *मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की,' आपण शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात. आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजी राजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे, तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा. मग शिवाजीराजांना मारा. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की, सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्या संबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ? दुसरी गोष्टी अशी की, रामसिंग म्हणतो की, ' मला प्रथम ठार मारा. मग सीवाला ठार मारा ' याचा अर्थ असाही उघडउघड दिसतोय की, मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्या संबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की, रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा. छत्रपती शिवाजीराजांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. बादशाह रामसिंगला म्हणाला, तुझा अर्ज मिळाला, मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगी शिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? तू या गोष्टीला जामीन राहतोस का ? प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंगने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशाहाचा आपल्या बाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंग बरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ' भाईजी, तुम्ही बादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 https://www.facebook.com/ #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज स्वराज्यभुमी-प्रतिष्ठान-102032741585347/ 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१७ मे इ.स.१७१५* *मराठ्यांनी निरनिराळ्या युद्धात वापरलेले घोडदळ* *इ.स. १७१५ मध्ये कान्होजी भोसले या मराठा सरदाराने चंद्रपूरच्या युद्धात वापरलेल्या घोडदळाचा उल्लेख मिळतो तो याप्रमाणे, " १७ मे, १७१५ रोजी, जयपूरचा राजा जयसिंगाने पिलसूदच्या लढाईमध्ये कान्होजी भोसल्यांचा पराभव केला. त्यामुळे कान्होजींनी आपला उत्तरेतील मार्ग आडलेला पाहून चंद्रपूर प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून सहा हजार घोडेस्वारांनिशी चंद्रपूरवर आक्रमण केले. चंद्रपूरचा पराभव करून अर्धे राज्य हस्तगत केले. छत्रपती शाहू महाराजांना एक हत्ती नजराणा म्हणून पाठवून कान्होजी उत्तरेकडे वळले."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१७ मे इ.स.१७८२* *सालबाईचा तह* *हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - मे इःस १६५६ १७ महाराष्टर प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेत छत्रपतीशिवराय उत्तरकोकणातील मोहिमेसाठी खवानाझाले मे इःस १६५६ १७ महाराष्टर प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेत छत्रपतीशिवराय उत्तरकोकणातील मोहिमेसाठी खवानाझाले - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१६ मे इ.स.१६४०* *(ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, शके १५६२, संवत्सर विक्रम, वार गुरुवार)* *छत्रपती शिवाजी महाराज व सईबाईसाहेब यांचा विवाह !* *सईबाईसाहेब व महाराजांचा पुणे येथे लालमहाली समंत्रक विवाह संपन्न. महाराजांच्या आयुष्यात सईबाईसाहेब यांना फार वेगळे स्थान होते. सईबाईसाहेब व महाराजांचा विवाह संपन्न झाला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ मे इ.स.१६४९* *( जेष्ठ पौर्णिमा, शके १५७१, संवत्सर विरोधी, गुरुवार )* *शहाजीराजांची सुटका :-* *घोरपडे, अफझल आणि इतर सरदारांनी शहाजीराजांचे दरबारातील महत्व कमी व्हावे म्हणून खोटेनाटे आरोप करून आबासाहेब शहाजीराजेंना झोपेत अटक करवली. मात्र आजच्या दिवशी आदिल शहाने सन्मानपूर्वक आबासाहेबांची सुटका केली. शिवरायांनी १९व्या वर्षी प्रचंड मुत्सद्देगिरी दाखवत सिंहगड किल्ला देऊन व थोरले बंधू संभाजीराजांनी बंगळूर जहागिरीच्या किल्ल्याचा ताबा आदिल शहाला देऊन सुटका करून घेतली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ मे इ.स.१६६५* *मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण दिलेरखानाने पुरंदरच्या* *बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला,* *“अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !” पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले. आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ?तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले. या लढाईत मुरारबाजींसह ३०० मराठे धारातिर्थी पडले. हे सर्व मावळे चिव्हेवाडी या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या एकाच गावातील होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ मे इ.स.१६६६* *(वैशाख वद्य अष्टमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार बुधवार)* *छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रामसिंह जामीन राहीला.* *औरंगजेबाने रामसिंगास छत्रपती शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा १३ मे रविवारी रामसिंग शंभूराजांसह बादशहाच्या दरबारी गेला व शिवाजी महाराजांना ताप आल्यामुळे ते आज दरबारी हजार राहू शकत नसल्याचे बादशहास निवेदन केले. बादशाहने शंभूराजांस सरोप्याची वस्त्रे , रत्नजडीत खंजीर व मोत्यांचा हार दिला. महाराजांच्या या वागण्यामुळे राजा जसवंतसिंह, बेगम जहांआरा, जाफरखान व दरबारातील इतर उमराव यांनी शिवाजी महाराजांच्या या उद्धट व अपमानकारक वर्तणुकीबद्दल बादशाहाकडे नाराजी व्यक्त केली. महाराजांच्या या अरेरावी व उन्मत वागणुकीबद्दल शिक्षेची मागणी केली. औरंगजेबाने शिवाजीला काय शिक्षा करावी मृत्यूदंड कि कैद हे ठरवण्यासाठी सिद्धी फौलादखानाला महाराजांना राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जाण्याची आज्ञा केली. रामसिंगास हि बातमी कळताच त्याने औरंगजेबास कळवले कि “बादशाहने महाराजांस मारण्याचा विचार केला आहे परंतु महाराजांना माझे वडिल मिर्झाराजांनी त्यांच्या जीविताची हमी दिली आहे व त्या वचनाच्या कौलावर महाराज येथे आले आहेत. बादशाहने पहिले मला व माझ्या मुलाला ठार मारावे नंतर महाराजांना जीवे मारावे." शिवाजी महाराजांना तत्काळ शिक्षा केल्यास मिर्झा राजे व कुंवर रामसिंग यांचा विरोध सहन करावे लागेल हे ओळखून औरंगजेबाने रामसिंगास महाराजांसाठी जमीन राहण्यास सांगितले. १५ मे मंगळवारी महाराज रामसिंगाकडे आले व त्यांनी शपथपूर्वक आपल्या चांगल्या वर्तणुकीची हमी रामसिंगास दिली. रामसिंगाने निश्चिंत होऊन जामीनपात्र औरंजेबास दिले. १६ मे बुधवार रोजी औरंगजेबाने रामसिंगास शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा दिली. औरंगजेब आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याची जाणीव महाराजांना झाली व त्यांनी काबुल मोहिमेवर जाण्यास नकार दिला. महाराजांनी वजीर जाफरखान व अन्य बादशाही सरदार व उमराव यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी नजराणे व काही द्रव्य व रक्कम देण्यास सुरवात केली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ मे इ.स.१६८२* *(वैशाख वद्य पंचमी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार मंगळवार)* *छत्रपती संभाजी महाराजांची आरमारी शक्ती!* *महाराजांनी इ.स.१६५६ पासूनच मराठ्यांच्या आरमाराचा पाया रचला आणि आपले बळकट आरमार समुद्रावर उभे केले. जे महाराजांचे धोरण तेच धोरण पुढे छत्रपती शंभुराजेंनी सुरू ठेवले. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहीलेले एक पत्र इतिहासात उपलब्ध असून त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमारी शक्तीचा उल्लेख आढळतो. तो असा छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ ८५‌ गलबते, ५ माणसे, मायनाक भंडारीचा व सिद्दी संबळचा मुलगा हाताखाली आहेत. छोट्या होड्या वगळून ५८ मोठ्या युद्धनौका, ५०००‌हजार सैनिकांचे तळ, ३० ते १५० टनांची मोठी गलबते, ३ शिडांची गुराबे इतकी आरमारी ताकद उपलब्ध आहे. यावरून छत्रपती संभाजी महाराजांनीही राज्य कारभाराच्या सुरूवातीपासून आरमारी शक्ती सदृढ करण्याकडे भर दिला होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ मे इ.स.१७३९* *वसई मोहिम* *पोर्तुगीच गव्हर्नर नो. द. कुन्या याने २० जानेवारी १५३३ ला गुजरातच्या बहादुरशहाचा सरदार मलिक तुग़लक याचा पराभव करुन वसई जिंकले. बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिचानकड़े आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारन मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिचानी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त कर, हिन्दू पूजा व उत्सवाना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली. आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यानी मोहिम सुरू केली. ३० मे १७३७ वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला. चिमाजी आप्पानी १९३९ च्या फेब्रुवारी ला वसईत तल ठोकला व ख-या अर्थाने लढाई सूरू झाली. अप्पांच्या कुशल नेतृत्वखाली मराठयानी जोरदार हल्ले केल्यानंतर ३० एप्रिलपासून वसईच्या शेवटास सुरवात झाली. मराठे किल्ल्यात घुसले. आखेर ४ मे १७९३ मधे फिरंग्यानी तहाचे निशान फडकावले आणि १६ मे १७३९ रोजी किल्ला मराठयांन कड़े सुपूर्द केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ मे इ.स.१७५१* *दाभाडे घराणे नजरकैदेत* *सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढे ही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ मे इ.स.१८१८* *इंग्रजांचा मालेगावच्या किल्ल्याला वेढा* *नारोशंकर यांनी अठराव्या शतकात मालेगावचा भुईकोट बांधला. सातारा छत्रपती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे याने त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता होती. १६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी मालेगावच्या किल्ल्याला वेढा घातला. जवळजवळ एक महिना ३००-३५० अरबांनी मालेगावच्या किल्ल्याच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. १०जुम १८१८ ला इंग्रजांच्या तोफ़ांच्या मार्‍य़ात किल्ल्यातील दारुकोठाराचा स्फ़ोट झाल्याने १३ जून रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
🙏शिवदिनविशेष📜 - 86=358686 महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेत  छत्रपती शिवरायांनी पहिली राजधांनी राजगड बांधकामास सुरुवात केली. १६४५ ४६ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला. 86=358686 महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेत  छत्रपती शिवरायांनी पहिली राजधांनी राजगड बांधकामास सुरुवात केली. १६४५ ४६ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१५ मे इ.स.१६५८* *गोव्याचे हंगामी गव्हर्नर फ्रांसिश्कू द काश्त्रू व आंतोनियू द सौझ कौंतिन्यू यांनी पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्राची नोंद !* *महाराजांनी उत्तर कोकणवर इ.स.१६५८ स्वारी केली तेव्हा पोर्तुगिजांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला. त्यांच्या सैन्याकडून पोर्तुगिजांच्या ताब्यातील दमण आणि चौल ह्या ठाण्यात अतिक्रमण झाल्याबद्दल त्यांनी महाराजांकडे निषेध नोंदविला होता. परंतु महाराजांनी या निषेधाची दखल घेतली असल्याचा उपलब्ध नाही. पण गोव्याचे हंगामी गव्हर्नर फ्रांसिस्कू द काश्त्रू व आंतोनियू द सौझ कौंतिन्यू या दोघांनी हिंदुस्थानातील राजकीय घडामोडीचा आढावा घेऊन, पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्रात महाराजांच्या लष्करी हालचालीचा उल्लेख केला आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१५ मे इ.स.१६६५* *( जेष्ठ शुद्ध एकादशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, सोमवार )* *मुरारबाजी काका दिलेर खानाशी भिडले :-* *पुरंदरच्या मदतीसाठी रसद घेऊन आलेले मुरारबाजी काका व दिलेर खानाची मोठी चकमक झाली. मुरारबाजीकाका भिडले ते थेट दिलेर खानाशी!* *काकांचा पराक्रम पाहून दिलेरखान बोलला, "या खुदा तुमने ये कैसा मर्द सिपाई पैदा किया". खानाने कौल देऊन मुरारबाजी काकांना स्वतःकडे येण्यास सांगितले. पण काका म्हणाले,* *"कोण रे तू, काय तुझा कौल, मी शिवाजीराजांचा मर्द मावळा,तुझा कौल घेतो की काय?".* *त्यानंतर कडोविकडीची चकमक झाली. काका काही केल्या मैदानात आवरत न्हवते. शेवटी अंबारीत बसलेल्या खानाने बाणाने टिपून मुरारबाजींचा कंठछेद केला. त्यात मुरारबाजीकाका धारातीर्थी पडले. त्याचबरोबर चिव्हेवाडी येथील पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या गावातील ३०० मावळे एकाच वेळी लढून धारातीर्थी पडले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१५ मे इ.स.१६७९* *गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद याने राज्य सल्लागार मंडळाची बैठक बोलावली. "वसई किल्ल्याचे कॅप्टन फ्रांसिश्कू सिमाइंश द लैताव यांनी पत्र पाठवून कळविले की, बाल्लीच्या हवालदाराने असोळणे नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर एक किल्ला बांधावयास घेतला आहे. तो बांधून पूर्ण झाला तर आमच्या राजास त्या किल्ल्यापासून उपद्रव पोहोचणार आहे. आदिलशाही अमदानीत त्या ठिकाणी किल्ला बांधण्याचा प्रयत्न कोणी केला नव्हता. तरी सन्माननीय सभासदांनी या बाबतीत आपले मत प्रकट करावे"."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१५ मे इ.स.१६८२* *मोगलांचा आधिकारी रसद घेऊन किल्ले रामसेजला!* *शरीफखान मोगली सैन्याची रसद घेऊन चालला असता मराठ्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. शहाबुद्दीनच्या सैन्याला, शरीफखानला मराठ्यांनी घेरले. घनघोर युद्ध झाले. ७ हजार मराठे सैन्य शरीफखानावर तुटून पडले. जाहीरखान, फैजुल्लाखान आणि अनेक सरदार प्राणास मुकले. मुहंमद शरीफ जखमी‌ झाला. त्यावर औरंगजेब बादशहा म्हणाला, "मी तुम्हाला सांगतच होतो की, मराठे थांबून थांबून हल्ला करतित". तरी सावधगिरीने रहावे. मराठ्यांचे ५०० ते ६०० लोक मेले. २००० लोक जखमी झाले. शरीफने मोगलांना जय मिळाल्याचे कळविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१५ मे इ.स.१६८४* *(ज्येष्ठ शुद्ध एकादशी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार गुरुवार)* *कर्णाटक वखारीसंदर्भात इंग्रजांचा वकील छत्रपती शंभुराजेंकडे!* *मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड केजवीन याने कॅप्टन हेन्री गेटी व थॉमस बिल्किन्स यांस वकील म्हणून तर राम शेणवी यांस दुभाषा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे पाठविले. कर्णाटकात इंग्रजांच्या व्यापारी वखारी असाव्यात याबद्दल विनंती करण्यासाठी हे वकील व दुभाषाचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजी महाराजांना भेटण्यास गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१५ मे इ.स.१७३७* *मनोर (अशेरीगड) किल्ल्याला वेढा* *मराठ्यांनी तांदुळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घोडदौड मनोरच्या दिशेने निघाली, बरबाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी, १५ मे १७३७ मध्ये मनोर किल्ल्याला वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी, होनाजी बलकवडे या सरदारास पाठविले, आणि २९ मे १७३७ विजय मिळवला, पण पोर्तुगीजांची शिबाडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाच्या धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला...* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१५ मे इ.स.१८६९* *कोल्हापूरच्या चिमाजी महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे. १८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला होता त्या उठावाचे हिरो होते कोल्हापुरचे महाराज चिमासाहेब !!!* *२६ डिसेंबर १८३० साली बुवासाहेब महाराज आणि आनंदीबाई यांच्या पोटी शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांचा जन्म झाला. तर बुवासाहेब महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी नर्मदाबाई यांच्या पोटी शाहू उर्फ चिमासाहेब महाराजांचा जन्म झाला. १५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांच निधन झालं. लिहारी नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वर्षांनी स्थानिक लोकांनी तिथे महाराजांची समाधी बांधली. आजही कराचीमध्ये ती समाधी आहे. कोल्हापूरच्या रक्तात ज्यांनी क्रांतीची बीजे पेरली त्या महाराजांनी ती समाधी !!!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - 35=]5~385$ महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेत  मुरारबाजी देशपांडे दिलेरखानाशी भिडले. व दिलेरखानाची मोठी चकमक झाली॰ किल्ले पुरंदरावर मुरारबाजी देशपांडे भिडले ते थेट दिलेरखानाशीच मुरारबाजीचा पराक्रम मुरारबाजी पाहून दिलेरखान बोलला. "या खुदा तुमने ये कैसा मर्द सिपाई पैदा किया" . खानाने कौल देऊन मुरारबाजीस स्वतःकडे येण्यास सांगितले पण  मुरारबाजींनी दिलेरचा कौल घेतला नाही उलट ते म्हणाले ' कोण रे तू॰॰ काय तुझा कौल... मी॰ महाराजांचा मावळा... तुझा कौल घेतो की काय?' 35=]5~385$ महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेत  मुरारबाजी देशपांडे दिलेरखानाशी भिडले. व दिलेरखानाची मोठी चकमक झाली॰ किल्ले पुरंदरावर मुरारबाजी देशपांडे भिडले ते थेट दिलेरखानाशीच मुरारबाजीचा पराक्रम मुरारबाजी पाहून दिलेरखान बोलला. "या खुदा तुमने ये कैसा मर्द सिपाई पैदा किया" . खानाने कौल देऊन मुरारबाजीस स्वतःकडे येण्यास सांगितले पण  मुरारबाजींनी दिलेरचा कौल घेतला नाही उलट ते म्हणाले ' कोण रे तू॰॰ काय तुझा कौल... मी॰ महाराजांचा मावळा... तुझा कौल घेतो की काय?' - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१४ मे इ.स.१६५६* *( वैशाख अमावस्या, शके १५७८, संवत्सर दुर्मुख, बुधवार )* *चांद्रराव मोरेची शरणागती :-* *जावळी शिवरायांच्या ताब्यात आली होती, पण चांद्रराव मोरे रायरी उर्फ रायगडावरून पळून गेला होता. रायगड महाराजांच्या ताब्यात येताच चांद्ररावने शरणागती पत्करली. मोरेचा खास सरदार मुरारबाजी देशपांडे काका हे स्वराज्यसेवेत दाखल झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ मे इ.स.१६५७* *(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)* *ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराज जन्म!* *छत्रपती संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली....* *सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शिवशुभेच्छा...🚩🚩जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩🚩* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ मे इ.स.१६६६* *( वैशाख वद्य षष्टी, शके १५८८, संवत्सर पराभव, सोमवार )* *सह्याद्रीचा सिंह नजरकैदेत :-* *दरबारातला शिवरायांचा मराठी बाणेदारपणा, धुडकावलेली खिल्लत, सुरत लुटीचा परिणाम या सर्व कारणास्तव औरंग्याच्या नातेवाईकांनी शिवरायांचा वध करण्यासाठी सांगितले. पण मिरझा जयसिंगच्या शब्दात अडकल्यामुळे फक्त नजरकैदेत ठेवता आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ मे इ.स.१६७४* *छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्यावरील अधिकाऱ्यास सक्त सूचना दिल्या व एकदा लष्कराची नीट पहाणीही केली. नंतर परशुरामक्षेत्री जाऊन पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज १४ मे रोजी रायगडावर आले. राज्यभिषेका पूर्वीची ही कोंकण मोहीम होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ मे इ.स.१६८२* *(वैशाख वद्य तृतीया, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार सोमवार)* *किल्ले रामसेज परिसरात मराठ्यांचा एल्गार!* *अगदी दोनच दिवसांपूर्वीच्या हल्ल्यातून सावरले नसतानाच शहाबुद्दीन फिरोजजंगाच्या सैन्यावर मराठ्यांनी पुन्हा हल्ला केला. शहाबुद्दीनच्या सैन्यातील महंमद आरीफ यांच्या सैन्य दलाशी मराठा सैन्य दलाने प्रखर झुंज मांडली. मोगल सैन्याला व्यवस्थित झोडपून काढून मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाला त्रस्त करून सोडले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ मे इ.स.१७५२* *छत्रपती शिवाजी राजांनी जसा अफझलखानाचा कायमचा काटा काढला किंवा कोणत्याही शत्रूला दयामाया दाखवली नाही तास प्रकार पेशवाईत घडला नाही. निजाम हा थोरल्या बाजीरावांनी सोडून दिलेला सरदार कायम पिढ्यानपिढ्या पेशव्याने डोकेदुखी तर ठरलाच पण पेशवाई बुडल्यावरही त्याच्या वंशजांनी हिंदूंची ससेहोलपट केली. अहमदिया कराराप्रमाणे बादशहा मराठ्यांना ५० लाख देणे लागत होता. मात्र करार नुसता कागदावर राहीला पैसे महीनाभर न मिळाल्याने मराठ्यांनी दिल्लीच्या आजूबाजूचा परीसर फोडून काढायला सुरुवात केली. आता ही ब्याद कशी घालववी हा प्रश्न बादशहास पडला. मात्र त्याच दरम्यान निजामाच्या गादीवरती गाझीउद्दिनला बसवण्याचा घाट नानासाहेब पेशवे घालत होते. नानांनी तशी पत्रे शिंदे - होळकरांना लिहुन गाझीउद्दीन यांस बरोबर आणावे असा निरोप दिला. त्यावरुन पंजाब प्रांतात आत्ता जायचे नसेल तर ५० ऐवजी ३० लाख द्या आम्ही दख्खनला परततो अशी मागणी शिंदे - होळकरांनी केली. मग निमाजीबद्दल गाझीउद्दीनने ३० लाख बादशहास द्यावेत बादशहाने तेच मराठ्यांस द्यावेत असे ठरले. गाझीउद्दीनला निजाम बनवून आपल्या उपकाराखाली ठेवावे असा पेशव्यांचा सरळ हिशेब होता. जावेदखानने लगोलग १४ मे १७५२ रोजी गाजीउद्दिनच्या नावे निजामीचे फर्मान काढले. बादशाही खजिन्यातून रोख पैसे मल्हाररावांन दिले. मराठे दक्षिणेत परत गेले. पण हा गाझीउद्दीन १६ ऑक्टोबर १७५२ मध्ये विषप्रयोगाने मेला. पेशव्यांचे एक राजकारण उधळले गेले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१४ मे इ.स.१७९२* *किल्ले सदाशिवगड तहान्वये मराठ्यांकडे!* *उपरिनिर्दिष्ट करार होण्यापूर्वी पोर्तुगीज सैन्याने सदाशिवगड व्यापलेला होता. २४ जानेवारी इ.स.१७९१ पेशव्यांच्या काळी नदीतून येऊन सैन्य उतरून किल्ले सदाशिवगड घेतला. ३० जानेवारी इ.स. १७९१, रोजी पोर्तुगीज आरमाराने किल्ले सदाशिवगड मराठ्यांकडून परत घेतला. तो वर्षभर त्यांच्याकडे होता. परंतु एक वर्षानंतर दि. १४, मे इ. स. १७९२, रोजी मराठे आणि टीपू सुलतान यांच्यामध्ये झालेल्या तहान्वये सोंधे संस्थान टीपू सुलतानाकडे गेल्याने किल्ले सदाशिवगडही कायद्याने त्यांच्याकडे गेला. टीपूने पोर्तुगिजांना तो खाली करण्यास सांगितले. त्यांच्याशी युद्ध करण्याची कुवत पोर्तुगिजांमध्ये नसल्याने त्यांनी तो मुकाट्याने टीपूच्या हवाली करून आपली शिबंदी तेथून काढून घेतली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
📜इतिहास शिवरायांचा - १४ मे इःस.१६५७ प्रदेश गड किल्ले संवर्धन सेत  ப6/E` छत्रपती संभाजी महाराज यांचा किल्ले पुरंदर वर स्वराज्याचे दुसरे जन्म.यांनी आपल्या कर्तुत्वाने व पराक्रमाने अशी काही दहशत निर्माण केली की मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही इंग्रज, पोर्तुगीज डच यांसारख्या बलाढ्य पातशाहींना नामोहरम करून सोडलेः जगातील प्रत्येक माता पित्याला हेवा वाटेल, असा पुत्र माता महाराणी सईबाई व पिता छत्रपती शिवरायांना लाभला. १४ मे इःस.१६५७ प्रदेश गड किल्ले संवर्धन सेत  ப6/E` छत्रपती संभाजी महाराज यांचा किल्ले पुरंदर वर स्वराज्याचे दुसरे जन्म.यांनी आपल्या कर्तुत्वाने व पराक्रमाने अशी काही दहशत निर्माण केली की मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही इंग्रज, पोर्तुगीज डच यांसारख्या बलाढ्य पातशाहींना नामोहरम करून सोडलेः जगातील प्रत्येक माता पित्याला हेवा वाटेल, असा पुत्र माता महाराणी सईबाई व पिता छत्रपती शिवरायांना लाभला. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१३ मे इ.स.१६५९* *छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे यांना "हिरडस मावळ" मधील किल्ले मोहनगडची दुरुस्ती करण्याचे काम दिले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६६६* *(वैशाख वद्य पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)* *रामसिंह महाराज व युवराज शंभुराजेंच्या डेऱ्यात!* *कुंवर रामसिंहाकडे औरंगजेब बादशहाने महाराजांच्या तब्बेतिची विचारपूस केली. महाराजांचा राग निवळावा म्हणून सायंकाळी दरबारात युवराज शंभुराजेंना बोलावून त्यांना भरजरी वस्त्रे, मोत्याची माळ व रत्नजडित कट्यार देऊन सत्कार केला. एक विचित्र नियतीची भेट होत होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६७०* *मराठ्यांनी मावळ प्रांतातील "लोहगड" व "विसापुर" हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६७४* *इंग्रजांचा वकिल "हेन्री अॉक्झिंडेन" मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राज्याभिषेकासाठी" रायगडास येण्यास निघाला व तो दि. १३ मे रोजी कैरलई जवळच्या "आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला तेव्हा त्याच्यासोबत एकुण ८ माणसे होती व त्यात एक श्यामजी नावाचा "गुजराथी व्यापारी" होता. आगरकोट हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील "रेवदांडा" येथे आहे. "राज्याभिषेकाचा" मुहूर्त होता दि. ६ जुन १६७४ मग "हेन्री अॉक्झिंडेन" लवकर निघाला होता का ? नाही तर त्याला "ईस्ट इंडिया कंपनीच्या" व्यापार हिताच्या काही कामांची मंजुरी "महाराजांकडून" करवुन घ्यायची होती. "हेन्री" आगरकोटला आला तेव्हा दिवस मावळला होता व 'प्रवेशद्वार' बंद झाले होते. त्याने 'पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला' सहज विचारले कि, "अजुन दिवस पूर्ण मावळला नाही तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ?" त्यावर गव्हर्नरने उत्तर दिले "अहो तशी काळजी आम्हाला घ्यावी लागते कारण ते "छत्रपती शिवाजी" केव्हा आमच्यावर झडप घालील अन आमच्या आगरकोटात शिरेल याचा नेम नाही म्हणून हि दक्षता घेत आहोत". यातच "छत्रपती शिवाजी महाराजांचा" दरारा आणी दहशत केवढी होती हे दिसून येते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६७७* *(वैशाख वद्य सप्तमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, वार रविवार)* *मराठ्यांनी जिंजी काबीज केली.* *किल्ले जिंजीचे शिवकालीन नाव चंदी तत्कालीन जिंजीचा सरदार नासीर मुहंमद याने महाराजांच्या हल्ल्यानंतर फारसा प्रतिकार न करता हा किल्ला महाराजांनी जिंकला. महाराजांना या किल्ल्यामुळे दक्षिणेत एक सुरक्षित आणि बळकट ठाणे निर्माण झाले. रायाजी नलगे याला किल्ल्याची हवालदारी तर तिमाजी केशव यांना किल्ल्याची सबनिशी दिली. काही फेरफार व इमारती बांधण्यासाठी रुद्राजी साळवी यांना या कामी नेमले. महाराजांना जिंजी काबीज झाल्याची बातमी मिळाली आणि पुढील काही दिवसातच महाराज जिंजीस रवाना झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६८१* *(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार शुक्रवार)* *किल्ले औरंगजेब बादशहाकडे अनेक सरदारांचे खोटे अर्ज!* *खान बहादुराचा अर्ज डाक चौकीने दरबारात आला. त्यात त्याने लिहिले होते की, "गनिमांची फौज औरंगाबादच्या भोवतालचा प्रदेश लुटण्यासाठी आली होती म्हणून खानजान, मुजफ्फरखान, रणमस्तखान, दाऊदखान वगैरे बादशाही सरदार स्वार होऊन तेथे पोहोचले. तर्फेची लढाई झाली. बादशाही सुदैवाने त्यांनी शत्रूंचे १५०० लोक मारले व अनेकांना जखमी केले. शत्रूने पळ काढला. बादशाही फत्ते झाली". ."औरंगजेब बादशहाचा दुसरा सरदार अनुपसिंग हाडा याने अब्दुल रहिमखान यास कळविले की, "मी छत्रपती संभाजी महाराजांशी औरंगाबादेस झालेल्या लढाईत अत्यंत कष्ट घेतले आहेत. हुजूरास त्याचा पुर्ण अर्ज देत आहे, कृपेची आशा करतो. खान जहानबहादूर याने त्याचे ५०० जात ५००, पाचशे स्वार कमी केले होते. त्याच्या वाढीबाबत तजवीज केली आहे. असा अब्दुल रहिमखानाने बादशहाकडे अर्ज केला व त्याप्रमाणे त्यास वाढ देण्यात आली. आशा आशयाची बढाई मारणारी पत्रे, खोटा आशय असणारी पत्रे लिहून, पाठवून बादशाही कृपा होण्यास लाळघोटेपणा करणारे हे सरदार औरंगजेबाच्या पदरी होते, म्हणूनच औरंगजेब मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवू शकला नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६९९* *१३ मे १६९९ ला हेरकाऱ्याकडून बादशहास समजले की धनाजी जाधव यांनी पिठूरच्या गढीला वेढा घातला. तेथील देशमुखाने ७ दिवस गढी लढविली. शेवटी धनाजीन जाधव यांनी देशमुखास कैद केले आणि त्याजकडून ४० हजार रुपये चौथ म्हणून घेतले. हे बादशहास कळताच त्याने चीनकुलीजखान बहादूर यांस धनाजी जाधवांचे पारिपत्य करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे तो जाधवाच्या पारिपत्यासाठी परंडा भागात पोहोचला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१८०३* *१३ मे १८०३ रोजी सर ऑर्थर वेलस्ली याने बाजीराव पेशव्यांना (दुसरे) 'हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहाद्दर' अशी उपाधी बहाल करून पुन्हा पेशव्यांच्या मसनदीवर बसवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१८१८* *दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
📜इतिहास शिवरायांचा - आज्चे ऐनिहासिक दिनविशेष 33 353568| महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल बाजीप्रभू  छत्रपती शिवरायांनी देशपांडे यांना "हिरडस मावळ" मधील किल्ले मोहनगडची करण्याचे काम दिले॰ 3 आज्चे ऐनिहासिक दिनविशेष 33 353568| महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल बाजीप्रभू  छत्रपती शिवरायांनी देशपांडे यांना "हिरडस मावळ" मधील किल्ले मोहनगडची करण्याचे काम दिले॰ 3 - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१२ मे इ.स.१६६६* *(वैशाख वद्य चतुर्थी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)* *छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट* *स्वतः रामसिंग महाराजांकडे गेला व स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी 'दिवाण-ए-आम' या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज पोहोचण्या अगोदर 'दिवाण-ए-आम' मधील औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस संपला होता.* *छत्रपती शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोहोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, होते. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेतोड उत्तर देऊन त्याची खिल्लत उडवून देऊन त्याचाच जबरदस्त पानउतारा केला.* *औरंगजेबसमोर येताना चेहर्‍यावर फडके (रुमाल) धरून येण्याची आणि जाताना तसेच मागे फिरत पाठ न दाखवता जाण्याची प्रथा होती... अशा वेळी क्रूर औरंगजेबच्या दरबारात त्याचाच अपमान करून हिंदुस्थानचे दोन छत्रपती कडाडले...* *खामोश.. कुंवर रामसिंह.. खामोश... सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना... या उपरी आमच्या रक्ताने न्हाऊ घातलेल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजी राजे तसूभर हि कसूर करणार नाहीत.. साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या इतिहासाने या आधी कधी पाहिला नव्हता आणि या पुढे ही पाहणार नाही..* *शेरास_सव्वा_शेर_छत्रपती_नडले औरंगजेब स्वत:ला आलमगीर आणि शेर म्हणवून घेत असे.* *त्याला त्याच्याच दरबारात सव्वाशेरानी मात दिली तो सुवर्ण दिन...* *छत्रपती शिवाजी महाराजांच वय त्यावेळी ३६ वर्ष होतं आणि शंभूराजे त्यावेळी ९ वर्षाचे होते ... म्हणजे १ पूर्णशेर ३६ वर्षे.. व् दूसरा शेर १/४ म्हणजेच ९ वर्षे.. अशा प्रकारे स्वत:ला हिन्दुस्तान चा शेर म्हणवून घेणाऱ्या औरंगजेबाला महाराष्ट्राचे सव्वा शेर नडले..* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ मे इ.स.१६८२* *(वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार शुक्रवार)* *किल्ले रामसेजच्या मदतीसाठी रुपाजी भोसले यांची कुमक!* *किल्ले रामसेजच्या किल्लेदारांच्या मदतीसाठी (बहुतेक किल्लेदाराचे नाव रंभाजी पवार असावे) रुपाजी भोसले नाशिकच्या आसमंतात उतरला. रुपाजी भोसलेंबरोबर मानाजी मोरेही होते. रुपाजी भोसले व मानाजी मोरेची खबर लागताच नाशिकच्या पश्चिमेस असलेल्या गणेश गावाजवळ शहाबुद्दीन फिरोजजंग अटकाव करण्यासाठी पुढे सरसावला. मात्र हर हर महादेवाच्या घोषणा देत मराठ्यांनी शहाबुद्दीन फिरोजजंगाच्या मोगली सेनेवर इतक्या प्रखरपणे हल्ला चढवला की, मराठ्यांच्या घणाघाती हल्ल्यापुढे शहाबुद्दीन फिरोजजंगाची डाळ शिजली नाही. फिरोजजंग या जंगात पराभूत झाला. ५०० घोड्यांचा पाडाव करून मराठ्यांनी विद्युत वेगाने माघार घेतली. मराठ्यांचा हेतू साध्य झाला होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ मे इ.स.१७३९* *दोन वर्षे चाललेली वसईची मोहीम मराठ्यांना दणकेबाज विजय मिळवून देऊन संपली. मराठ्यांनी वसईचा ताबा १२ मे १७३९ रोजी घेतला आणि वसई किल्ल्याच्या तटावरून भगवा झेंडा मोठ्या समारंभपूर्वक सुमुहूर्त पाहून तारीख २३ मे रोजी फडकाविला. पोर्तुगीज सत्ता लयास जाऊन मराठ्यांची राजसत्ता आसमंतात आल्याची जाणीव ह्या फडफडणाऱ्या झेंड्याने परिसरांतील जनमानसात रूजविली. पश्चिम किनारा व्यापार उद्योगासाठी पोर्तुगिजांच्या ताब्यात दोन शतके होता. या तहाने पोर्तुगिजांचा समुद्र काठचा अंमल नाहीसा झाला. फक्त गोवा, दीव व दमण एवढीच ठिकाणे पोर्तुगिजांच्या ताब्यात राहिली. मराठ्यांच्या या विजयाने मुंबईकर इंग्रजांच्या छातीत धडकी भरली. मराठ्यांशी दोस्ती न राखल्यास मुंबईची वसई व्हावयाची अशी शंका त्यास जाचू लागली. म्हणून त्यांनी कॅ. इंचबर्ड यास जून १७३९ त चिमाजी अप्पांच्या भेटीस पाठविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१२ मे इ.स.१७४१* *श्रीमंत वबाजीराव पेशव्यानी छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणानुसार माळवा प्रांताचे सुभेदारीची व काशी, प्रयाग, गया आणि मथुरा या हिंदूंच्या पवित्र क्षेत्रांची मागणी मोगल बादशहाकडे केली होती. निजामाने या मागणीस बादशहाची मान्यता मिळवून देण्याचे कबूल केले होते. पण ही मागणी पूर्ण होण्यापूर्वीच बाजीराव पेशवे तारीख २८ एप्रिल १७४० रोजी मरण पावले. तेव्हा ही अपुरी कामगिरी पार पाडण्याची कामगिरी श्रीमंत बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांस करावी लागली. पेशवे बाळाजी बाजीरावानी तारीख २१ ऑक्टोबर १७४० रोजी पुण्याहून उत्तरेस जाण्याकरिता निघून माळवा प्रांतावर चढाई केली. बादशहाने प्रयागचा सुभेदार व अयोध्येचा सुभेदार ह्यांना सवाई जयसिंगास मराठ्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी हुकूम सोडिले. वरील दोन्ही सुभेदारांनी सवाई जयसिंगाच्या मदतीस जाण्यास कुचराई केली. सबब मराठ्यांचा पराभव आपल्या एकट्याच्याने होणे नाही हे सवाई जयसिंगास कळून चुकल्यामुळे त्यानी मराठ्यांशी धोलपूर मुक्कामी तह केला. पेशवे व सवाई जयसिंग ह्यांच्या भेटी तारीख १२ मे १७४१ रोजी झाल्या. त्या समयी सवाई जयसिंगानी मराठ्यांना माळवा प्रांताच्या सुभेदारीची सनद बादशहाकडून सहा महिन्यात मिळवून द्यावी असे ठरले. ही स्वारी तारीख ११ जून १७४१ रोजी संपली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
🚩छत्रपति शिवाजी महाराज - महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल शिवदिनविशेष १२ मे इस १६६६ छत्रपती शिवाजी महाराजांची व युवराज शंभूराजेंसोबत औरंगजेब दरबारात ऐतिहासिक 3াI ৪৫. महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल शिवदिनविशेष १२ मे इस १६६६ छत्रपती शिवाजी महाराजांची व युवराज शंभूराजेंसोबत औरंगजेब दरबारात ऐतिहासिक 3াI ৪৫. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *११ मे इ.स.१६६१* *इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालचा राजा चौथा जॉन ह्याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रीगान्झा ह्यांचे लग्न झाले. ह्या समारंभात पोर्तुगालच्या राजाने त्याच्या जावयाला - दुसऱ्या चार्ल्सला 'मुंबई' आंदण म्हणून दिली. पोर्तुगीझांनी त्यावेळी साल्सेट, माझगाव, परळ, वरळी, सायन, धारावी, आणि वडाळा स्वतःकडे ठेवून उरलीसुरली मुंबई इंग्रजांना देऊन टाकली होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ मे इ.स.१६६६* *(वैशाख वद्य तृतीया, शके १५८८, पराभव संवत्सर, वार शुक्रवार)* *महाराज शंभुराजेंसह आग्रा येथील सीमेवर!* *५ मार्च इ.स.१६६६ महाराज अन् युवराज शंभुराजे यांनी (श्रीनृप शालिवाहन शके १५८७, फाल्गुन शुद्ध ९, नवमी, वार सोमवार) स्वराज्य माँसाहेब जिजाऊसाहेब यांच्या स्वाधीन करून, माँ साहेब जिजाऊंचे शुभाशिर्वाद घेऊन किल्ले राजगड सोडला आणि आग्र्याकडे कूच केले. महाराजांचे वय त्यावेळी ३६, छत्तीस वर्षाचे होते तर युवराज शंभुराजे यांचे ९, नऊ वर्षे. शेरास सव्वाशेर म्हणजे काय हे पुढे औरंगजेब बादशहास नक्की समजले. मात्र पिता-पुत्र आयुष्यात प्रथमच नर्मदापार करून शाही राजधानीचे वैभव प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणार होते. युवराज शंभुराजे यांच्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणजे उभ्या आयुष्यात त्यांना महनीय पित्याच्या सलग व प्रदीर्घ सहवास घडला तो फक्त याच प्रवासात महाराजांच्या महनीय व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे, कठिण परिस्थितीतून मार्ग कसा काढावा इथपासून ते कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन ढळू न देता राजकारणाचे डावपेच याच काळात शिकता आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सेनापती जिवावरच्या संकटांनी घेतला असतानाही मृत्यूला वाकवून कसा ताठ मानेने जगतो हे प्रत्यक्ष डोळ्यांनी युवराज शंभुराजे यांना पहाता आले. महाराज युवराज शंभुराजे आग्र्याच्या सीमेवर पोहोचले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ मे इ.स.१६७८* *छत्रपती शिवाजी महाराज किल्ले रायगडी परतले.* *छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्रीभवानीच्या दर्शनार्थ आले. श्रीभवानीची पुजा बांधून महाराज किल्ले रायगडी परतले. सुमारे १६ ते १७ महिने किल्ले रायगडापासून तसेच स्वराज्यापासून ते दूर होते..* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ मे इ.स.१६८१* *(ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार बुधवार)* *शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!* *औरंगजेब बादशहाच्या कपट कारस्थानामुळे शहजादा अकबराचा पुरता बिमोड झाला होता. त्याच्या बरोबर आता फक्त ३०० ते ४०० स्वार आणि चाणाक्ष दुर्गादास राठोड होता. औरंगजेब बादशहाने त्याच्या सर्व वाटा बंद केल्याने दुर्गादास राठोडच्या सल्ल्याने शहजादा अकबराने शेवटी दक्षिणेची वाट धरली. ९ मे इ.स.१६८१ त्याने अकबरपुर येथे नर्मदा नदी ओलांडली अन् शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना पत्र पाठविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ मे इ.स.१७०१* *गदगचा फौजदार शेरखान हा रसद आणित होता , राणोजी घोरपडे हे मोठे सैन्य घेऊन शेरखान वर चालून गेला . ही बातमी ऐकताच शहजादा बेदरबख्त हा त्वरीत निघाला . त्याने २५ कोसाची दौड केली , त्या मुळे एक हत्ती व काही घोडी वाटेत मागे राहिले . विजापूर प्रांतात लक्ष्मेश्वर जवळ युद्ध झाले . या युद्धात संताजी घोरपडे यांचा पुतण्या व बहिर्जीचा मुलगा भुजंगराव घोरपडे मारले गेले. मोगलांच्या कडील बरीच माणसे ठार झाली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *११ मे इ.स.१७३९* *मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले. ४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज
📜इतिहास शिवरायांचा - महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल  I 61 SHUNSHEHVDEOCREAaI27 Ie ntntMumtnn Wunoms; शिवदिनविशेष ११ मे इ.स.१६६६ औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज व युवराज शंभूराजे अखंड प्रवासानंतर ससैन्य आग्र्याच्या सीमेवर पोहोचले .! महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल  I 61 SHUNSHEHVDEOCREAaI27 Ie ntntMumtnn Wunoms; शिवदिनविशेष ११ मे इ.स.१६६६ औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज व युवराज शंभूराजे अखंड प्रवासानंतर ससैन्य आग्र्याच्या सीमेवर पोहोचले .! - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१० मे इ.स.१६३४* *(वैशाख वद्य अष्टमी, शके १५५६, संवत्सर भाव, वार शुक्रवार)* *थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र. यावरून राजे शहाजीराजे यांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची ऊंची काय असेल याची कल्पना येते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१६३५* *दक्षिणेच्या सुभ्यावर औरंगजेबाची नेमणूक केली. शहाजहान दक्षिणेतील यशस्वी मोहीम संपवून इ.स.१६३५ पावसाळ्यात परत उत्तरेकडे गेला. तेव्हा त्याने दक्षिणचा सुभा औरंगजेबाच्या ताब्यात दिला. त्या सुभ्याचा विस्तार बादशहानाम्यात दिला आहे. दक्षिणेच्या सुभ्यावर औरंगजेबाची नेमणूक केली. या सुभ्याखाली ६४ किल्ले असून त्यातील सत्तावन्न गड व बाकीचे कोट होते. अहमदनगर, इतर प्रांत व दौलताबाद याला दख्खन सुभा म्हणत. या सुभ्याची राजधानी पुर्वी अहमदनगर व प्रांत व्यापतो व याची राजधानी नांदेड व कंधार येथे होती. तिसरा सुभा खानदेशाचा. या सुभ्यात आसिरगड हा एक महत्त्वाचा किल्ला असून राजधानीचे ठिकाण बऱ्हानपुर आहे. हे आसिरगडापासून ४, चार कोसांवर आहे. चवथा सुभा वऱ्हाडचा. राजधानीचे शहर म्हणजे एलिचपुर असून महत्वाचा गड म्हणजे गोविलचा किल्ला होता. तिसरा सुभा व चवथ्याचा काही भाग पाइनघाटाखाली येतो. या चारही सुभ्यांचा एकंदर वसूल २ अरब दाम किंवा ५ कोटी रुपयांचा आहे".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१६६५* *(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार)* *दाऊदखान किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी!* *दाऊदखान राजा रायसिंगसह पुन्हा किल्ले पुरंदराच्या मुख्य तळावर दाखल झाला. दाऊदखानाचा सहकारी कुतुबूद्दीनखान याने पुण्यातच तळ ठोकला होता. मोगली सरदारांकडून स्वराज्याच्या नासाडीचे सत्र सुरूच होते. मात्र तरीही किल्ले पुरंदरचा वेढाही सुरू होता. किल्ले वज्रगड पडल्यावर पुरंदर लगेचच ताब्यात येईल ही मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखानाची अटकळ होती. मात्र दाऊदखानाचा जागोजागी झालेला पराभव व चिवट मराठी सैनिकांची झुंजार वृत्ती मिर्झाराजे जयसिंग यांची चिंता वाढवत होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१७८५* *शिखांचा बंदोबस्त-श्रीमंत महादजी शिंदे* *इ.स.१७८५ च्या जानेवारी महिन्यात अंबुजी इंगळे यांना दिल्ली आणि उत्तरेकडील प्रातांच्या बंदोबस्ताकरिता महादजींनी रवाना केले,शिखांचा दिल्ली प्रातांत नेहमी उपद्रव होत असे . शिवाय बादशहाच्या गैरहजेरीत शिखांची धाड येण्याची शक्यता होती ,अफ्रासियाबखानाच्या वेळेपासून दिल्ली शहराचा बंदोबस्त नजीबखानाकडे होता,अंबूजी इंगळे ह्यांनी दि. ११ फेवारी १७८५ रोजी त्याच्याकडून ताबा काढून आपले सैन्य दिल्लीच्या बंदोबस्ताकरिता उभे केले, नजीबखानाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात जो गोंधळ निर्माण झालेला होता, त्याचा फायदा घेऊन दिल्लीच्या आसपासच्या मुलखात,गुजर लोक लुटमार करीत होते. त्यामुळे त्या प्रांतातील लोकात खूप असंतोष निर्माण झाला होता.अंबूजी इंगळेंनी गुजर लोकांचा बंदोवस्त करून त्या प्रांतातील लोकांना दिलासा दिला. त्यामुळे साहजिकच तेथील लोकांना आनंद झाला. त्यानंतर अंबूजी इंगळेंनी आपले सर्व लक्ष शिखांकडे वळविले, मार्च १७८५ रोजी अंबूजी इंगळे ह्यांनी दिल्लीच्या उत्तरेस तेरा मैलावर असलेल्या भक्तावरपूर येथील आपल्या छावणीत काही शिख सरदाराच्या भेटी घेतल्या . ह्या शिख सरदारात बघेलसिंग, करमसिंग, दुलजासिंग, भागसिंग, दिवाणसिंग, मोहनसिंग, गोहरसिंग, ह्यांचा समावेश होता. ह्या भेटीमध्ये मोहनसिंग आणि दुलजासिंग ह्या प्रमुख सरदारांनी महादजींना भेटून मैत्रीच्या करारावर सह्या करावे असे ठरले. ह्यानंतर अंबूजी इंगळेनी मथुरेला येऊन एप्रिल १७८५ मध्ये महादजींची भेट घेतली, दि.१० मे १७८५ रोजी शिख प्रामुख्य सरदार मोहनसिंग, दुलजासिंग आणि महादजी शिंदे ह्यांच्यात मैत्रीच्या करारावर मथुरा मुक्कामी सह्या झाल्या,* *ह्या कराराच्या काही अटी अशा होत्या -* *१) शिखांनी बादशहाच्या प्रदेशात लुटमार करू नये.* *२) कोणत्याही प्रदेशातून राखी(महसूल) वसूल करू नये.* *३) जयपूरच्या प्रदेशात आपण दिलेल्या ठिकाणीच जहागिरी घ्याव्या, आणि पाच हजार सैन्यासह महादजींची चाकरी करावी.* *४) दिल्ली किंवा महादजींच्या प्रदेशात तसेच इंग्रजांच्या व नवाब वजीर ह्यांच्या प्रदेशातही बंडाळी करू नये.* *ह्या करारानंतर महादजींना शिखांकडून कधीही त्रास झाला नाही. महादजींनी शिखांच्या केलेल्या बंदोबस्तातून त्यांचे बुद्धिकौशल्य आणि शत्रुवरप्रेमाने मात करण्याची त्यांची विलक्षण चातुर्याचा प्रत्यय येतो.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१८१८* *रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !* *रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली. रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१८५७* *स्वातंत्र्यसमराची सुरुवात* *१० मे १८५७, रविवारचा दिवस होता. उत्तर भारतातील मीरतच्या छावणीतले काही इंग्रज अधिकारी चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जाण्याच्या तयारीत होते आणि काही इंग्रज शिपाई सुट्टीवर होते. भारतीय शियाई आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात उठाव करण्याची संधीच शोधत होते आणि हा १० मे चा मुहूर्त त्यांनी साधला. जवळजवळ पन्नास पुरुष, स्त्रिया आणि मुलांची भारतीय शिपाई आणि त्यांच्यात सामील झालेल्या संतप्त स्थानिकांनी तिथे कत्तल केली. हा उठाव काही अचानक घडलेली घटना नसून अनेक वर्षांपासून हिंदुस्थानच्या भूमीवर असलेला परसत्तेचा डाग कायमचा पुसून काढण्यासाठी केलेला एक पूर्वनिश्चित प्रयत्न होता. गाय आणि डुक्कर यांच्या चरबीचे वंगण असलेल्या कडातुसंचा भाग सर्वांना ज्ञातच आहे, पण उठावाचे केवळ काडतूस हेच एकमेव कारण नवते. केवळ धार्मिक भावना दुखावल्याबद्दल केलेला विरोध नसून, इंग्रजांनी ज्या पारतंत्र्याच्या बेड्या लादल्या होत्या आणि त्यायोगे जे अनन्वित आत्यचार केले होते त्या विरुद्ध एक महाभयंकर विस्फोट होता. भारतीयांच्या मनामध्ये इंग्रज सत्तेविरुद्ध जो निखारा धगधगत होता तो धडधडून पेटवण्यासाठी काडतूस ही केवळ एक ठिणगी होती. १९ मार्च १८५७ ला बंगालच्या बराकपूरमध्ये मंगल पांडेला अधिकाऱ्यांविरुद्ध उठाव केल्याबद्दल फाशी देण्यात आली. २४ एप्रिल ला भारतीय शिपायांनी नवीन काडतुसंचा विरोध केला आणि ८५ शिपायांना ९ मे रोजी नोकरीवरून काढून १० वर्षांची कोठडी सुनावली. हे निमित्त साधून भारतीय शिपायांनी १० मे रोजी उठाव केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜
🚩छत्रपति शिवाजी महाराज - प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल | <( २्कल्पक 40 (3e       शिवदिनविशेष मे इस १६२४ 0 स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या विजापूरच्या आदीलशहाचं वार्षिक उत्पन्न बाबत अधिकृत 1 0>[. प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल | <( २्कल्पक 40 (3e       शिवदिनविशेष मे इस १६२४ 0 स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या विजापूरच्या आदीलशहाचं वार्षिक उत्पन्न बाबत अधिकृत 1 0>[. - ShareChat