❤🚩शिवभक्त🚩❤
ShareChat
click to see wallet page
@mangesh5663
mangesh5663
❤🚩शिवभक्त🚩❤
@mangesh5663
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१० मे इ.स.१६३४* *(वैशाख वद्य अष्टमी, शके १५५६, संवत्सर भाव, वार शुक्रवार)* *थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र. यावरून राजे शहाजीराजे यांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची ऊंची काय असेल याची कल्पना येते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१६३५* *दक्षिणेच्या सुभ्यावर औरंगजेबाची नेमणूक केली. शहाजहान दक्षिणेतील यशस्वी मोहीम संपवून इ.स.१६३५ पावसाळ्यात परत उत्तरेकडे गेला. तेव्हा त्याने दक्षिणचा सुभा औरंगजेबाच्या ताब्यात दिला. त्या सुभ्याचा विस्तार बादशहानाम्यात दिला आहे. दक्षिणेच्या सुभ्यावर औरंगजेबाची नेमणूक केली. या सुभ्याखाली ६४ किल्ले असून त्यातील सत्तावन्न गड व बाकीचे कोट होते. अहमदनगर, इतर प्रांत व दौलताबाद याला दख्खन सुभा म्हणत. या सुभ्याची राजधानी पुर्वी अहमदनगर व प्रांत व्यापतो व याची राजधानी नांदेड व कंधार येथे होती. तिसरा सुभा खानदेशाचा. या सुभ्यात आसिरगड हा एक महत्त्वाचा किल्ला असून राजधानीचे ठिकाण बऱ्हानपुर आहे. हे आसिरगडापासून ४, चार कोसांवर आहे. चवथा सुभा वऱ्हाडचा. राजधानीचे शहर म्हणजे एलिचपुर असून महत्वाचा गड म्हणजे गोविलचा किल्ला होता. तिसरा सुभा व चवथ्याचा काही भाग पाइनघाटाखाली येतो. या चारही सुभ्यांचा एकंदर वसूल २ अरब दाम किंवा ५ कोटी रुपयांचा आहे".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१६६५* *(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६८७, संवत्सर विश्वावसू, वार बुधवार)* *दाऊदखान किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी!* *दाऊदखान राजा रायसिंगसह पुन्हा किल्ले पुरंदराच्या मुख्य तळावर दाखल झाला. दाऊदखानाचा सहकारी कुतुबूद्दीनखान याने पुण्यातच तळ ठोकला होता. मोगली सरदारांकडून स्वराज्याच्या नासाडीचे सत्र सुरूच होते. मात्र तरीही किल्ले पुरंदरचा वेढाही सुरू होता. किल्ले वज्रगड पडल्यावर पुरंदर लगेचच ताब्यात येईल ही मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखानाची अटकळ होती. मात्र दाऊदखानाचा जागोजागी झालेला पराभव व चिवट मराठी सैनिकांची झुंजार वृत्ती मिर्झाराजे जयसिंग यांची चिंता वाढवत होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१७८५* *शिखांचा बंदोबस्त-श्रीमंत महादजी शिंदे* *इ.स.१७८५ च्या जानेवारी महिन्यात अंबुजी इंगळे यांना दिल्ली आणि उत्तरेकडील प्रातांच्या बंदोबस्ताकरिता महादजींनी रवाना केले,शिखांचा दिल्ली प्रातांत नेहमी उपद्रव होत असे . शिवाय बादशहाच्या गैरहजेरीत शिखांची धाड येण्याची शक्यता होती ,अफ्रासियाबखानाच्या वेळेपासून दिल्ली शहराचा बंदोबस्त नजीबखानाकडे होता,अंबूजी इंगळे ह्यांनी दि. ११ फेवारी १७८५ रोजी त्याच्याकडून ताबा काढून आपले सैन्य दिल्लीच्या बंदोबस्ताकरिता उभे केले, नजीबखानाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात जो गोंधळ निर्माण झालेला होता, त्याचा फायदा घेऊन दिल्लीच्या आसपासच्या मुलखात,गुजर लोक लुटमार करीत होते. त्यामुळे त्या प्रांतातील लोकात खूप असंतोष निर्माण झाला होता.अंबूजी इंगळेंनी गुजर लोकांचा बंदोवस्त करून त्या प्रांतातील लोकांना दिलासा दिला. त्यामुळे साहजिकच तेथील लोकांना आनंद झाला. त्यानंतर अंबूजी इंगळेंनी आपले सर्व लक्ष शिखांकडे वळविले, मार्च १७८५ रोजी अंबूजी इंगळे ह्यांनी दिल्लीच्या उत्तरेस तेरा मैलावर असलेल्या भक्तावरपूर येथील आपल्या छावणीत काही शिख सरदाराच्या भेटी घेतल्या . ह्या शिख सरदारात बघेलसिंग, करमसिंग, दुलजासिंग, भागसिंग, दिवाणसिंग, मोहनसिंग, गोहरसिंग, ह्यांचा समावेश होता. ह्या भेटीमध्ये मोहनसिंग आणि दुलजासिंग ह्या प्रमुख सरदारांनी महादजींना भेटून मैत्रीच्या करारावर सह्या करावे असे ठरले. ह्यानंतर अंबूजी इंगळेनी मथुरेला येऊन एप्रिल १७८५ मध्ये महादजींची भेट घेतली, दि.१० मे १७८५ रोजी शिख प्रामुख्य सरदार मोहनसिंग, दुलजासिंग आणि महादजी शिंदे ह्यांच्यात मैत्रीच्या करारावर मथुरा मुक्कामी सह्या झाल्या,* *ह्या कराराच्या काही अटी अशा होत्या -* *१) शिखांनी बादशहाच्या प्रदेशात लुटमार करू नये.* *२) कोणत्याही प्रदेशातून राखी(महसूल) वसूल करू नये.* *३) जयपूरच्या प्रदेशात आपण दिलेल्या ठिकाणीच जहागिरी घ्याव्या, आणि पाच हजार सैन्यासह महादजींची चाकरी करावी.* *४) दिल्ली किंवा महादजींच्या प्रदेशात तसेच इंग्रजांच्या व नवाब वजीर ह्यांच्या प्रदेशातही बंडाळी करू नये.* *ह्या करारानंतर महादजींना शिखांकडून कधीही त्रास झाला नाही. महादजींनी शिखांच्या केलेल्या बंदोबस्तातून त्यांचे बुद्धिकौशल्य आणि शत्रुवरप्रेमाने मात करण्याची त्यांची विलक्षण चातुर्याचा प्रत्यय येतो.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१८१८* *रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !* *रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली. रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१० मे इ.स.१८५७* *स्वातंत्र्यसमराची सुरुवात* *१० मे १८५७, रविवारचा दिवस होता. उत्तर भारतातील मीरतच्या छावणीतले काही इंग्रज अधिकारी चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जाण्याच्या तयारीत होते आणि काही इंग्रज शिपाई सुट्टीवर होते. भारतीय शियाई आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात उठाव करण्याची संधीच शोधत होते आणि हा १० मे चा मुहूर्त त्यांनी साधला. जवळजवळ पन्नास पुरुष, स्त्रिया आणि मुलांची भारतीय शिपाई आणि त्यांच्यात सामील झालेल्या संतप्त स्थानिकांनी तिथे कत्तल केली. हा उठाव काही अचानक घडलेली घटना नसून अनेक वर्षांपासून हिंदुस्थानच्या भूमीवर असलेला परसत्तेचा डाग कायमचा पुसून काढण्यासाठी केलेला एक पूर्वनिश्चित प्रयत्न होता. गाय आणि डुक्कर यांच्या चरबीचे वंगण असलेल्या कडातुसंचा भाग सर्वांना ज्ञातच आहे, पण उठावाचे केवळ काडतूस हेच एकमेव कारण नवते. केवळ धार्मिक भावना दुखावल्याबद्दल केलेला विरोध नसून, इंग्रजांनी ज्या पारतंत्र्याच्या बेड्या लादल्या होत्या आणि त्यायोगे जे अनन्वित आत्यचार केले होते त्या विरुद्ध एक महाभयंकर विस्फोट होता. भारतीयांच्या मनामध्ये इंग्रज सत्तेविरुद्ध जो निखारा धगधगत होता तो धडधडून पेटवण्यासाठी काडतूस ही केवळ एक ठिणगी होती. १९ मार्च १८५७ ला बंगालच्या बराकपूरमध्ये मंगल पांडेला अधिकाऱ्यांविरुद्ध उठाव केल्याबद्दल फाशी देण्यात आली. २४ एप्रिल ला भारतीय शिपायांनी नवीन काडतुसंचा विरोध केला आणि ८५ शिपायांना ९ मे रोजी नोकरीवरून काढून १० वर्षांची कोठडी सुनावली. हे निमित्त साधून भारतीय शिपायांनी १० मे रोजी उठाव केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜
🚩छत्रपति शिवाजी महाराज - प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल | <( २्कल्पक 40 (3e       शिवदिनविशेष मे इस १६२४ 0 स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या विजापूरच्या आदीलशहाचं वार्षिक उत्पन्न बाबत अधिकृत 1 0>[. प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल | <( २्कल्पक 40 (3e       शिवदिनविशेष मे इस १६२४ 0 स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या विजापूरच्या आदीलशहाचं वार्षिक उत्पन्न बाबत अधिकृत 1 0>[. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *९ मे इ.स.१५४०* *महाराणा प्रताप यांचा जन्म* *(मृत्यू – १९ जानेवारी १५९७)* *गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ मे इ.स.१६६०* *शाहिस्तेखान पुण्यास पोहोचला!* *शाहिस्तेखानाने औरंगाबाद ते पुणे हा प्रवास सर्व लवाजम्यासह सव्वातीन महिण्यात मुंगीच्या वेगाने पुर्ण केला. पुणे एकाच तडाख्यात शाहिस्तेखानाच्या हाती आले. मुठेच्या किनाऱ्यावर शाहिस्तेखानाची औरस चौरस छावणी पडली. खासा खान महाराजांच्या लाल महाली डेरा देऊन राहीला. पुणे प्रदेश उद्ध्वस्त होऊ लागला. व्यापारी पळून गेले. लोक प्राणभयाने परांगदा झाले. गावे बेचिराख होऊ लागली. माँसाहेब जिजाऊसाहेबांची तगमग सारखी सुरू होती. त्यांचे अर्धे लक्ष होते स्वराज्यातील गांजल्या जाणाऱ्या निष्पाप प्रजेकडे तर, अर्धे लक्ष लागले होते पन्हाळ्यात वेढल्या गेलेल्या शिवबा राजेंकडे !* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ मे इ.स.१६६६* *आग्रा प्रकरण - महाराज नरवरला पोहचले* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवासातील बातम्यांनी औरंगजेबास सतत कळत होते की , शिवाजीराजे कसे कसे आपल्या जवळ येत आहेत ! या वर्षी त्याचा पन्नासावा वाढदिवस आग्ऱ्याच्या दिवाणे आममधल्या शाही दरबारात साजरा होणार होता. त्याच दरबारात शिवाजीराजे हजर व्हावेत अशी त्याची इच्छा होती. हजारो दरबारी उपस्थितांच्या देखत तो आजपर्यंत बेलगाम बंडखोरासारखा वागलेला सीवा मरहट्टा कसा आदबीने मुजरे करीत येतो ते त्याला जनतेला दाखवायचे होते आणि महाराजांनाही मोगल साम्राज्याचा तळपता दिमाख दाखवायचा होता. क्षणाक्षणाने तो क्षण जवळ येत होता. महाराजांनी चंबळ नदी ओलांडली होती. नरवर या ठिकाणी महाराज पोहोचले दि. ९ मे १६६६ या दिवशी. दि. १२ मे १६६६ या दिवशी बादशाहाची पन्नासावी सालगिरा होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ मे इ.स.१६७४* *छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकार्‍यांना आदेश* *"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन "रायगडाकडे" रवाना. शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैन्यविषयक धोरण हा अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय. सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल सविस्तर सूचना आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना दिल्या. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क असत हे ह्या पत्रावरून दिसून येते. आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असणार.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ मे इ.स.१६८१* *(ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार सोमवार)* *शहजादा अकबराने नर्मदा नदी ओलांडली!* ‌ *शहजादा अकबराने आपल्या जन्मदात्या बापाविरुद्ध बंड केले. औरंगजेब बादशहाच्या सामर्थ्याला हा फार मोठा धक्का नव्हता तर आव्हानच होते. दुर्गादास राठोड व शहजादा अकबर आपल्या ३०० ते ४०० सैन्यदलासह रानोमाळ भटकत असतानाच महाराष्ट्रात यायचा निर्णय घेतला व अकबरपुर येथे त्याने नर्मदा नदी ओलांडली. दुर्गादास राठोडच्या सल्ल्यानुसार शहजादा अकबर पळून जाण्यात यशस्वी झाला. जर शहजादा अकबर यावेळेस औरंगजेब बादशहाच्या हाती लागला तर शहाजहान, दारा शुकोह मुराद आधीप्रमाणे त्याचीही हत्या नक्कीच झाली असती यात शंका नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ मे इ.स.१६८२* *(वैशाख शुद्ध त्रयोदशी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार मंगळवार)* *इंग्रजांचे दुटप्पी धोरण!* *१९ एप्रिल इ.स.१६८२ पत्रातून मुंबईकर इंग्रज, सुरतकर इंग्रजांना कळवतात की, सिद्दीसारख्या दुष्ट आणि माजोरी, खुनशी वृत्तीच्या लोकांना आपण जवळ राहू दिल्यास छत्रपती संभाजी महाराज आपणास विचारणा केल्यावाचून राहणार नाहीत. आपल्या जवळ मुंबईत पुरेसे सैन्य साधनसामुग्रीही नाही. शिवाय छत्रपती संभाजी महाराज आपल्यावर हल्ला करतील ते वेगळेच त्यामुळे सिद्दीला पावसाळ्यापुर्वी मुंबई बंदरातून हलवणे योग्य होईल तशी तजवीज करावी असे मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना कळवितात. मात्र सुरतेच्या इंग्रजांची इतकी दंडेली की, त्यांनी मुंबईकरांना पत्रात सिद्दीला मुंबई बंदरात घेण्याची सक्ती केली. पुढे जाऊन मराठी आरमाराने योग्य ती कारवाई केलीच. मात्र इंग्रज कसे दुटप्पी वागत होते, याचा हा ढळढळीत पुरावा आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ मे इ.स.१७०३* *छत्रपती शाहू महाराजांच्या धर्मांतराचे प्रयत्न* *९ मे १७०३ या तारखेची नोंद पुढीलप्रमाणे आहे: बादशहाने हमीदोद्दीनखान यास म्हटले, “तुम्ही शाहुकडे जा, त्याला म्हणावे--तू मुसलमान हो. त्याप्रमाणे हमीदोद्दीनखान शाहूकडे गेला. त्याने शाहूला बादशहाचा निरोप सांगितला. शाहूने त्या सूचनेला निर्धाराने नकार दिला परत येऊन हमीदोद्दीनखानाने शाहूचा नकार बादशहाला कळविला. हे ऐकून बादशहा इतकेच म्हणाला "शाहूवर कडक नजर ठेवा." ही बातमी मोगल दरबाराच्या अखबारामध्ये सहजपणे नोंदली गेली आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ मे इ.स.१८२३* *दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांनी १८१८ मध्ये पकडले. १८१९ मध्ये कलकत्त्यात चौकशी पूर्ण होऊन त्यांना उत्तरेत वाराणसीजवळ चुनारच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवलेले होते. ९ मे १८२३ ला बंगालला पाठवलेल्या ह्या वृत्तांतात (बनारसमधल्या एजंटने) लिहिलेले आहे की "...१४ एप्रिलला आम्ही तुमच्याकडे त्रिंबकजी डेंगळ्यांनी लिहिलेला सुटकेचा अर्ज पाठवला होता, जो स्पष्ट कारणांमुळे नाकारला गेला. बंदी (त्रिंबकजी) तुरुंगावरच्या पहारेकऱ्यांशी संगनमत करून काहीतरी संधान साधायच्या तयारीत आहे.एजंटाला ह्या बाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी त्याच वेळी बोलावणे पाठविलेले आहे. ..."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *९ मे इ.स.१९५९* *रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतीदिन...* *"एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेल,पण कॉलेजला दिलेले छत्रपती शिवरायांचे नाव कदापीही बदलणार नाही"* *कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतीदिनी कर्मवीरांस विनम्र अभिवादन...* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
🙏शिवदिनविशेष📜 - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल  G R E A T' "HD M RIIVRA SHuVSHEH CಕEATEDBY Nohul Dorze Potll f1afeoifaeiy ९ मे झस १६६० छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले असताना शाहिस्तेखान पुण्याला पोहचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल  G R E A T' "HD M RIIVRA SHuVSHEH CಕEATEDBY Nohul Dorze Potll f1afeoifaeiy ९ मे झस १६६० छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले असताना शाहिस्तेखान पुण्याला पोहचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *८ मे इ.स.१६६३* *( वैशाख शुद्ध द्वादशी, शके १५८५, संवत्सर शोभन, शुक्रवार )* *शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६३. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६३ या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की , ‘ तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे ‘ त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की , मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की , ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला. याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे ; असे दिसते. ‘ बडफुकन ‘ या शब्दाचा अर्थ ‘ बडा सेनापती ‘ मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद , ‘ शाहिस्तेखानकी बुरंजी ‘ या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे.* *‘ अरे , तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे! आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा ?* *छत्रपती शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती याचे हे उदाहरण आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मे इ.स.१६६४* *अजीजखान यांनी बालाघाट उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेला. आदिलशहाने पुन्हा महाराजांविरुद्ध हालचाल सुरू केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विजापुराहून सेनापती अजीजखान ४ हजार घोडदळ व पायदळ घेऊन चौलपर्यंतचा मुलूख परत घेण्यासाठी कुडाळकडे निघाला. दि. ८ मे इ.स.१६६४ रोजी त्याचे सैन्य बालाघाटातून उतरून सुभेदार राहुजी पंडीतांवर चालून गेले. परंतु विजापुरी सैन्याच्या आगमनाची वार्ता कळताच राहुजी कुडाळ सोडून राजापुरला परतले व तेथे त्यांनी स्वसंरक्षणाची तयारी आरंभिली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मे इ.स.१६७५* *छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंड्याचा किल्ला घेतला. फोंडा किल्ला घेतल्यामुळे फोंड्याच्या अंकीत असलेले तिसवाडी, चंद्रमहल, केले, बाल्ली आणि काणकोण हे आदिलशाही महाल महाराजांच्या अंमलाखाली आले. त्यानंतर महाराजांनी दक्षिणेकडे चाल करून, सांप्रतच्या कारवार प्रांतातील सिवेश्वर, कडवा, कद्रा, आणि अंकोला हा गंगावळी अथवा गंगावती नदीपर्यंतचा आदिलशाही प्रदेश काबीज केला. महाराजांनी फोंडे येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मे इ.स.१६८०* *(वैशाख वद्य पंचमी, शके १६०२, रौद्र नाम संवत्सर, वार शनिवार)* *गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद यांनी कोकण प्राताचे सरसुभेदार रायाजी पंडीत यांस लिहीलेल्या पत्राची नोंद!* *छत्रपती संभाजी महाराजांनी कोकणचे सरसुभेदार म्हणून आपली निवड केल्याचे पाहून खूप समाधान झाले. "महाराजांच्या महानिर्वाणाची बातमी कळताच मी आमच्या साष्टी प्रांताचा कॅप्टन जनरलला युद्ध बंद करण्याची आज्ञा दिली. हाच प्रकार फोंड्याच्या सरहद्दीवर सुद्धा आहे. युद्ध बंदीचा एकतर्फी निर्णय आम्ही घेत असून जो राजा आता सिंहासनावर येईल त्याने आमच्याशी युद्ध चालू ठेवावे की बंद करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. भूतकाळाच्या गोष्टी विसरून जाऊन नवीन राजाशी, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मे इ.स.१६८२* *(वैशाख शुद्ध द्वादशी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार सोमवार)* *सिद्दीची लुटालूट सुरूच!* *छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांबरोबर केवळ बोलणीच केली नाही. तर इंग्रजांशी जरबेचे बोलणे करून इंग्रजांची कोंडी करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून इंग्रजांनी सिद्दीशी बोलणे केले आणि एकंदर परिस्थितीचा आढावा इंग्रजांनी घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मे इ.स.१६९९* *मराठ्यांनी ८ मे १६९९ रोजी सिद्धगड काबिज केला व एक हजार पायदळ सैनिक व किल्ला चढून जाण्याची सामग्री (दोराच्या शिड्या वगैरे) माहुलीकडे पाठविली. बादशहाला हे कळताच त्याने माहुली किल्ला लढविण्याची कामगिरी कल्याण-भिवंडीचा ठाणेदार मातबरखान याजवर सोपविली. याच सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शेगांव परगण्यांतील खेडी मराठा सरदार हणमंतराव यांनी लुटली. त्याचे पारिपत्य तेथील मोगली फौजदार इल्तिफातखान याजकडे पथके नसल्यामुळे झाले नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मे इ.स.१७०७* *शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज मुगल कैदेतून स्वराज्यात परतले* *छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने जुल्फिकार खानास रायगड लढवण्यास पाठवून दिले.महाराणी येसूबाई राणीसाहेब यांनी तब्बल दहा महिने रायगड लढवला . रायगड वाचवण्यासाठी व स्वराज्यासाठी येसूबाई राणीसाहेबांनी वैधव्याचे दुःख सहन करत आटोकाट प्रयत्न करत केला. परंतु प्रचंड मोगली सैन्यापुढे येसूबाई राणीसाहेब यांना हार पत्करावी लागली व त्या आपल्या पुत्रासह मोगलांच्या स्वाधीन झाल्या. औरंगजेबाच्या मृत्यू पूर्वी त्यांच्या मुलांना आपल्या भवितव्याचे वेध लागले होते.औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील 27 वर्षाच्या प्रदिर्घ वास्तव्यानंतर अहमदनगर येथे निधन झाले. शहाजादा आजम याला आपल्या पित्याच्या मृत्युची बातमी समजताच तो अहमदनगरला आला व स्वतःस बादशहा घोषित करून तो दिल्लीकडे जाण्यास तयार झाला. जाताना बरोबर येसूबाई राणीसाहेब व शाहुराजांना बरोबर घेण्यास तो विसरला नाही.झुल्फिकारखानाला बरोबर घेऊन त्याला संपूर्ण दक्षिणेचा मुख्य अधिकारी नेमले. येसूबाई व शाहू राजांची काळजी घेणारी झीनतबेगमही बरोबर होती.* *पुढे बुर्हाणपुरजवळ मुक्काम पडला असता शाहूराजे व आझम यांची भेट झाली. आजमने पोषाख देऊन त्यांचा गौरव केला.छत्रपती शाहूला सोडण्याचे त्याच्या विचारात नव्हते. कारण मराठ्याचा राजा सोडून तो परत डोईजड होईल याची आजमला भिती होती. परंतु रजपूत सरदार ,काही मनसबदार, या सर्वांच्या मध्यस्थीने शाहुराजांना दोहरा येथून17 वर्षे 7 महिन्यानंतर कैद मुक्त केले गेले. यावेळी शाहूराजांची सुटका केल्यास मराठी राज्यात वारसासाठी भांडणे सुरू होतील ,हा सुज्ञ विचार करून आजमने छत्रपती शाहूंमहाराजांची सुटका केली होती. शाहूमहाराजांवर काही अटी घालण्यात आल्या. तुम्ही दिल्लीच्या बादशहाच्या अंकीत म्हणून राज्य करावे.तुमची आई ,भाऊ, व बायका यास आम्हापाशी ठेवावे. तसेच तुम्ही राज्यात बंदोबस्त करावा .बखेडा करणाऱ्या लोकांचे पारिपत्य करावे आणि बादशाही लक्षात ठेवून वागावे. इकडील मुलखास उपद्रव देऊ नये.तुम्ही याप्रमाणे वागता अशी खातरजमा झाली म्हणजे आम्ही दिल्लीस गेल्यावर व तेथे सिंहासनारूढ झाल्यावर तुमची माणसे तुम्हाकडे पाठवून देऊ. वरील ठरावाने शाहूराजे मोगलांचे मांडलिक होऊन मोगली मनसबदार म्हणून कैदेतून निसटले व 8 मे 1707 मधे ते महाराष्ट्राकडे वळले .परंतु येसूबाई राणीसाहेब मात्र यावेळी महाराष्ट्रापासून हजारो मैल महाराष्ट्रापासून दूर दिल्लीकडे गेल्या. कैदेत का होईना परंतु आत्तापर्यंत येसूबाईराणी मराठी राज्यात होत्या. आता मात्र दिल्लीसारख्या अत्यंत दूर परकीय राज्यात त्यांना पुढील काळ घालवायचा होता.छत्रपती शिवाजीराजांच्या वेळेपासून ते छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना त्यातील येसूबाई राणी यांचा सहभाग, त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार यांचे एक महत्त्वाचे पर्व येथे संपले.* *इकडे शाहूमहाराज महाराष्ट्रात परत आले .छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस, त्यांचा नातू, छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांचा पुत्र असूनही शाहू महाराजांनी मोगलांच्या छावणीत कैदी म्हणून जीवन व्यतीत केले. औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे मराठ्यांचे वारस म्हणून किंवा छत्रपती शिवाजीराजांच्या गादीचा वारस म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय शिक्षण मिळाले नव्हते.जोत्याजी केसरकर व येसूबाईराणीसाहेब यांच्या सहवासामुळे थोडेफार शिक्षण मिळाले तेवढेच काय ते. बाहेरच्या जगाचा कोणताही आणि कसलाही संबंध शाहुराजांना आला नाही. तरीही शाहू महाराजांनी मोठ्या हुशारीने मराठी सरदारांशी, मनसबदारांशी गुप्तपणे नाते जोडून संपर्क ठेवला होता .तब्बल 17 वर्षे 6 महिन्यांनी स्वराज्याचा खरा वारसदार मोगली कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले.याच शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी तब्बल 42 वर्षे अत्यंत हुशारीने राज्यकारभारून करून आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांची 29 वर्षांनी मुगल कैदेतून सुटका करून घेतली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मे इ.स.१८१७* *इंग्रजांच्या फौजांनी ८ मे १८१७ रोजी सकाळी पुण्यास वेढा घातला. हे कळताच बाजीरावाने (दुसरे) इंग्रजाशी युद्ध पुकारण्याचा निश्चय केला. परंतु लागलीच इग्रजांकडे शरणागतीची याचना केली व त्रिंबकजी डेंगळेस पकडून देण्याबद्दल २ लाखाचे बक्षिस व गाव इनाम देण्याचे जाहीरनामे लावले. त्यावरच काम निभावले नाही. एलफिस्टनने बाजीरावाची भेट घेऊन नवीन तहाच्या कलमाची वाटाघाट केली. हा तह गव्हर्नर जनरलच्या हुकुमावरून पेशव्यांवर लादला गेला. त्यातील मुख्य मतलब म्हणजे महाराष्ट्राबाहेरील पेशव्यांचे ३४ लाख वसुलाचे सर्व प्रदेश इंग्रजांनी आपल्या कबजात घेतले आणि इतर मराठे सरदारांशी त्यांचा सबंध कायमचा तोडून लावला. तदनुसार बाजीरावाजवळ असलेले शिंदे, होळकर आदींचे वकिल पुण्यातून काढून बाहेर असलेले त्यांचे वकिल यास परत बोलवावे लागले. शेवटी हो ना करता दिनांक १३ जून १८१७ रोजी पेशव्यांने ह्या तहावर मोठ्या नाखुशीने सही केली. नंतर तो गव्हर्नर जनरलकडे पाठविण्यात येऊन दिनांक ५ जुलै १८१७ रोजी मंजूर होऊन आला. ह्या तहाने बाजीरावाचे राज्य जाऊन तो एक लहानसा संस्थानिक बनला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेत  50 Rohn Borse Pofl ` शिवदिनविशे 055?409 छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला. महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेत  50 Rohn Borse Pofl ` शिवदिनविशे 055?409 छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडा येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *⛳स्वराज्यभुमी प्रतिष्ठान⛳* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *७ मे इ.स.१४९८* *पोर्तुगीज गोव्यात आले. पाल्बाव हा पाद्री गोव्यात आला आणि त्याने बाटवाबाटवीच्या छळाचा अतिरेक केला. व त्यांनी इ.स.१९६१ रोजी पर्यंत हिंदुस्थानात चाचेगिरी निर्भयपणे केली. अल्फान्सो अल्बुकर्क याने सप्तकोटेश्वराचे देऊळ पाडून तेथे चर्च उभे केले. अनेक अन्यायकारक गोष्टी घडत गेल्या. गोव्यातील हिंदू बांधवांनी त्याला फार सोशिकपणाने तोंड दिले. पुढे पोर्तुगिजांनी वसई, ठाणे, तारापूर, वांद्रे, माहीम, मुंबई येथे सत्ता स्थापन केली. दीव घेतले. दमण घेतले. गोवा, दीव, दमण यांवर त्यांची सत्ता आली. इक्विझिशनचा छळवाद संपूर्ण जगात चालू होता.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ मे इ.स.१६६०* *पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ मे इ.स.१६८०* *राज्यभिषेकापुर्वी म्हणजेच इ.स. १६८० 'वैशाख वद्य ४ शके १६०२' च्या मुरगुडच्या 'रुद्राप्पा देसाईला' पाठवलेल्या पत्रावर ही "शोडशावली" राजमुद्रा प्रथम अाढळली.* *'भोसले' घराण्यातील हि "शंभुराजांची राजमुद्रा" छत्रपती "शिवरायांच्या" मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी असुन उभी 'पिंपळपानी' ७ ओळींची हि "राजमुद्रा" स्वतःची 'अस्मिता' व 'रुबाब' व्यक्त करते.* *राजमुद्रे प्रमाणे त्यांची 'मर्यादा' सुध्दा "शिवाजीराजेंच्या" मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे.* *बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे असे हे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *७ मे इ.स.१८१८* *पेशव्यांची शरणागती आणि प्रतापसिंह महाराजांस चिमुकले राज्य देऊन त्यांची मांडलीक राजे म्हणून स्थापना या दोन गोष्टी इंग्रजांनी १८१८ च्या युद्धाने झालेल्या मराठ्यांच्या ताब्यात असलेले मजबूत किल्ले सिंहगड, पुरंदर, वासोटा हे एप्रिल १८१८ च्या आरंभीच इंग्रजांनी जिंकले. हिंदवी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड प्रिटल्झरच्या स्वाधीन करण्यात आला. (दिनांक ७ मे १८१८) त्याचवेळी इ. स. १६८९ च्या मोगलाने घातलेल्या वेढ्यांतून जे काही कागदपत्रे शिल्लक होते ते इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यामुळे नष्ट झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
🙏 शिवराय स्टेटस - आजचे ऐतिहासिक दिनविशेष ७ मे १६६० महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल स्वराज्यभुमी प्रतिष्ठान  पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद फस्त केली शिवराय या वेळेस पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले असताना हे घडत हे विशेष. होते ' आजचे ऐतिहासिक दिनविशेष ७ मे १६६० महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्धन सेल स्वराज्यभुमी प्रतिष्ठान  पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद फस्त केली शिवराय या वेळेस पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले असताना हे घडत हे विशेष. होते ' - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *६ मे इ.स.१४५२* *सेंट झेविअर गोव्यात आला!* *व त्याने इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. येशू ख्रिस्ताच्या निर्वाणानंतर त्यांच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोप मध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. 'ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. हे करताना ज्यू लोक जे नवख्रिश्चन झाले ते त्या धर्माचे आचरण व्यवस्थित करतात की नाही. याचा शोध घेण्यासाठी ते न करणारांस शिक्षा देण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरू ९ वा ग्रेगरी पोप याने इ.स.१२३९ मध्ये इक्विझिशन (पवित्र न्यायसभा) स्थापन केले आणि त्यांच्या द्वारे लोकांचा अनन्वित छळ सुरू झाला. त्यातील काही नवख्रिश्चन ज्यू गोव्यात आले. गोव्यातही बाटवाबाटवीने नवख्रिश्चन झाले होते. त्या नवख्रिश्चनांना शिकविण्यासाठी सेंट झेविअर गोव्यात आला, ती तारीख होती, ६ मे इ.स.१४५२. आणि त्याने गोव्यात इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. "पेतरोज" हा इतिहासकार म्हणतो. ६ मे इ.स.१४५२ हा दिवस गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस. या दिवशी सेंट झेविअरचे पाय गोव्यास लागले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ मे इ.स.१६३२* *शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजी राजांना पराभूत करण्याबद्दल तह झाला शहाजहान व अदिलशहा यांच्यामध्ये १ महत्त्वाचा तह झाला, हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते. एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला. दुसर्‍या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ मे इ.स.१६३६* *आदिलशहा व मोगल बादशहा यांच्यामध्ये तह ठरला. त्यानुसार विजापुरकरांनी दिल्लीपतीचे प्रभुत्व मान्य करावे, निजामशाहीचा मुलुख दोघांनी वाटून घ्यावा, आदिलशहाने मोगल बादशहाची सरहद्द ओलांडू नये, या तहानुसार प्राप्त झालेल्या मुलूखाचा ताबा मोगलांना बिनतक्रार घेऊ द्यावा. निजामशाहीतील पश्चिमेकडील भीमा व सीना या दोन नद्यांमधील सोलापूर परिंडा किल्ल्यासह सोलापूर व वांगणी महाल, निजामशाही कोकण, पुणे व चाकण परतणे ईशान्येकडील भालकी व चिडगुपा हे परगणे हा सर्व मुलूख मिळून (दरसाल २०, वीस लक्ष होण वसुलीचा) "विजापुरकरांकडे तर उर्वरित मोगलांकडे जोडला जावा असे ठरले. + याशिवाय राजे शहाजीराजे यांच्या निजामशाहीस मान्यता न देता त्यांनी बळकावलेले जुन्नर, त्रिंबक, भीमगड इत्यादी किल्ले ते मोगलांना जोपर्यंत परत करीत नाहीत तोपर्यंत आदिलशहाने त्यांना थारा देऊ नये. अथवा आपल्या नोकरीत ठेऊ नये. आल्यास कैद करावे असेही एक कलम तहात होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ मे इ.स.१६६५* *पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ मे इ.स.१६८८* *(वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)* *शहजादा अकबरासंदर्भात इंग्रजांचे पत्र !* *शहजादा अकबराने इराणला जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जहाजांची वगैरे सर्व तयारी होऊन, राजापुराहून ती येईपर्यंत व इराणच्या शहाचे फर्मान मिळेपर्यंत तो भडोचला सुरक्षित राहीला. पुढे राजापुरच्या फ्रेंच व व वेंगुर्ल्याच्या डच व्यापाऱ्यांकडून जहाजाची योजना करून दिल्यानंतर शहजादा अकबर इराणला गेला. शहजादा अकबराचा उद्देश सफल झाल्यासारखा होता कारण इराणच्या शहाने त्याला मदत केली. त्या संदर्भात एक पत्र उपलब्ध असून त्या पत्रानुसार जर सुलतान अकबराला ६० हजार स्वारांची केलेली मदत पुरली नाही, तर इराणच्या शहा त्याच्या पाठोपाठ मोठे सैन्य घेऊन निघणार आहे. इराणच्या शहाने शहजादा अकबराला दिल्ली तख्तावर स्थापन करण्याचे दाढीची शपथ घेऊन वचन दिले आहे. या आशयाचे हे पत्र आहे. अशा पत्रातून शहजादा अकबराच्या इ.स.१६८८ रोजी नंतरच्या हालचालींवर प्रकाश पडतो.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ मे इ.स.१८१८* *राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *६ मे इ.स.१९२२* *राजातील माणुस आणी माणसातील राजा लोकराजा "राजश्री छत्रपती शाहू महाराज" यांचे निधन झाले. महाराजांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास भर दिला, कोल्हापुर संस्थानात "प्राथमिक शिक्षण" सक्तीचे व मोफत केले, "स्त्री शिक्षणाचा" प्रसार व्हावा म्हणुन "राजज्ञा काढली व बहूजनंना "राजकिय निर्णय प्रक्रियेत" सामावुन घेण्यासाठी 'डेक्कन रयत असोशियन' संस्था स्थापन केली. इ.स.१९१७ मध्ये विधवांसाठी 'पुर्नविवाहाचा' कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशाप्रकारे "शाहूंनी" समाजात महत्वाचे अनेक बदल घडवून आणले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्पन सेत T H E 6 1 SHlvnNvsHH CREAIED R  Aಫ + शिवदिनविशेष 6013218696 यांच्याकडुन छत्रपती रायरी हया किल्ला जावळीच्या मोरे शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आलेः महाराष्ट्र प्रदेश गढ किल्ले संवर्पन सेत T H E 6 1 SHlvnNvsHH CREAIED R  Aಫ + शिवदिनविशेष 6013218696 यांच्याकडुन छत्रपती रायरी हया किल्ला जावळीच्या मोरे शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आलेः - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *५ मे इ.स.१६५७* *( जेष्ठ शुद्ध द्वितीया, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, मंगळवार )* *छत्रपती शिवरायांची किर्ती सातासमुद्रा पार :-* *पोर्तुगालच्या गव्हर्नरने पोर्तुगालच्या राजाला लिहिलेले एक सुंदर पत्र उपलब्ध असून, त्यात त्याने लिहिले आहे की, "शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी उत्तरेकडील मूलखास उपद्रव दिला आहे. त्यामुळे अधिकचे ८० शिपाई चौल येथे बंदोबस्तासाठी पाठवावे लागत आहे." सिंधुसागराच्या पाठीवर लाटांची टिपरी वाजवून सातासमुद्रा पलीकडील पोर्तुगालच्या राजाला गव्हर्नरने छत्रपती शिवाजी महाराजांची महती ऐकवली. पाश्चात्य श्रीशिवचरित्रात हा बहुदा पहिलाच उल्लेख असावा.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ मे इ.स.१६६१* *एका वलंदेजी पत्रात राजांच्या चपळ हलचालींमुळे आदिलशाही अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ दिसून येते राजांनी कोकणात कुडाळपर्यंत सर्व भाग जिंकून घेतला असेही त्यात म्हटले आहे. फेब्रुवारी १६६० ला दाभोळही राजांच्याकडे आले व त्याच सुमारास कुडाळचा किल्लाही त्यांनी जिंकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ मे इ.स.१६६३* *गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला छत्रपती शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. १६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गाडी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ मे इ.स.१६८०* *छत्रपती संभाजी महाराजांनी रामजी नाईक ठाकूर या वकीलाबरोबर गोव्याचा विजरई यास 'सलोख्याचे' पत्र पाठवले. या पत्रात छत्रपती शंभूराजांनी आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी देऊन आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले आणि पोर्तुगीज व मराठे यांच्यात मैत्रीचा तह करण्यास सुचवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ मे इ.स.१६८२* *कारवार जवळील अंजदीव बेटावर छत्रपती संभाजी राजे किल्ला बांधणार यामुळे गोव्यास धोका उत्पन्न होणार कारण अरब व छत्रपती संभाजीराजे यांची मैत्री दिवसेदिवस वाढत होती व अरब हे पोर्तुगीझांचे शत्रू. त्यामुळे अंजदीव बेट छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात जाण्याची भीती विजरईला वाटू लागली व आजच्या दिवशी त्याने अंजदीव बेटाचा ताबा घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ मे इ.स.१७४६* *पोर्तुगिजांनी सावंतांचा "हलणे" किल्ला घेतला. ह्या लढाईत सदई किल्ल्याचा किल्लेदार गोमा सावंत याने मोठा पराक्रम गाजविला. हलणेहून पोर्तुगीज सैन्याने डिचोलीच्या किल्ल्यावर चाल केली. तो किल्ला पोर्तुगीज घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे जाणून सावंतांनी त्याची मोडतोड करून तो निकामी करून टाकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *५ मे इ.स.१९११* *शहीद प्रीतीलता वड्डेदार यांचा जन्म* *(मृत्यू - २३ सप्टेंबर १९३२)* *भारतीय स्वतंत्र लढ्यात शहीद होणारी पहिली महिला…* *२१ वर्ष वयाच्या मुलीने इंग्रजांविरुद्ध लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली तिचं नाव आहे “प्रीतीलता वड्डेदार.” प्रीतीलता वड्डेदार चा जन्म बंगाल मधील चिटगाव येथे ५ मे १९११ रोजी झाला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
🙏 शिवराय स्टेटस - 025u' WA 1 SHDINSHESHCEAIED NY शिवदिनविशे Wamul Bore Poul ५ मे इःस. १६५७ छत्रपती शिवाजी महयराजांची महती पोर्तुगालच्या राजाला पोर्तुगालच्या गव्हर्नरने ऐकवली.. 025u' WA 1 SHDINSHESHCEAIED NY शिवदिनविशे Wamul Bore Poul ५ मे इःस. १६५७ छत्रपती शिवाजी महयराजांची महती पोर्तुगालच्या राजाला पोर्तुगालच्या गव्हर्नरने ऐकवली.. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *३ मे इ.स.१६७३* *महाराजांनी राहुजी सोमनाथ यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले. स्वराज्याचे "पहीले प्रतिनिधी" राहुजीपंत झाले. राहुजी म्हणजे रावजी सोमनाथ ही व्यक्ती काय दर्जाची होती याचा विचार केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तबगार आणि विश्वासू माणसांच्या कर्तृत्वाचे चीज करण्याची पद्धत किती अचूक होती हे ध्यानात येते. आग्रा येथे जाताना माँसाहेब जिजाऊसाहेबांच्या मदतीस त्यांनी ज्या महत्वाच्या व्यक्ती ठेवल्या होत्या, त्यात मोरोपंत पेशवे, निळोजीपंत मुजुमदार, दर्यासारंग आणि राहुजी सोमनाथ हे होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे गेल्यावर फोंड्यावर पहिल्या वेढ्याच्या वेळी राहुजीपंत तळकोकणात खंबीरपणे उभे होते. अदिलशहाकडून रांगणा किल्ला त्यांनी मिळविला. इ.स.१६६७ मध्ये युवराज शंभुराजे शहजाद्याकडे मोगली मनसबदार म्हणून गेले. त्यांच्याबरोबर निराजीपंत व राहुजीपंत होते. वऱ्हाडच्या लुटीच्या वेळी राहुजीपंत होतेच, बाजी घोरपड्यांवर केलेल्या चालीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ते होते. राहुजीपंत हे कुडाळच्या सुभ्याचे सुभेदार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ मे इ.स.१६८०* *मुंबईकर इंग्रजांच्या पत्राची नोंद!* ‌‌ *"मुंबईकर इंग्रजांच्या पत्रात छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या नावाची ग्वाही फिरवून ते वडिलांच्या गादीवर बसले असे लिहीले आहे मोरोपंत, अण्णाजीपंत वगैरे, महाराजांचे हुकूम घेण्याकरिता पन्हाळ्यास गेले आहेत. युवराज राजाराम किल्ले रायरीला आहते. ते तेथेच राहणार असून तो किल्ला त्यांच्याच ताब्यात आहे. सर्व सुभेदार व हवालदारांना छत्रपती संभाजी महाराजांनी तसेच ठेविले. काही बदल केला नाही".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ मे इ.स.१६८०* *(वैशाख शुद्ध पौर्णिमा, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)* *छत्रपती संभाजी महाराजांची इंग्रजांना दहशत!* *इंग्रजांनी महाराजांशी केलेला. तह पाळला नव्हता आणि महाराज जंजिरा किल्ला घेऊ शकले नव्हते. आणि महीनाभरापुर्वीच महाराजांचे महानिर्वाण झाल्याने इंग्रजांनी आता स्वैर वागायला सुरुवात केली होती. सिद्दी मुंबई भागात लुटमार करीतच होता. लुटीच्या जहाजांचा उघडपणे लिलाव करून त्यांनी इंग्रजांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे इंग्रजांचे आता धाबे चांगलेच दणाणले होते. जर छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजांचे हे कारनामे आणि सिद्दीला आतून फूस असल्याचे कळले तर छत्रपती संभाजी महाराज सिद्दी व इंग्रज दोघांनाही त्रास देणार हे निश्चितच होते. त्यात कुठलीही शंकाच नव्हती कारण नुकतेच कुठे छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या महानिर्वाणाच्या धक्यातून सावरत असताना जर छत्रपती संभाजी महाराजांनी आरमारी युद्ध केले तर स्वराज्याचे वारसदार म्हणून तडफेची लढाई होणार यात शंका नव्हती. त्यामुळे मुंबईकर इंग्रजांनी घाबरून सिद्दीचा दाणागोटा बंद केला व सर्व मदत थांबविली. या वागण्याचा परिणाम मात्र लगेच दिसून आला अन् सिद्दीने नागोठणे पेण, आपटे, बट्टी इथे लुटालूट थांबविली. मुंबईकरांनी छत्रपती संभाजी महाराजांची अगदी सुरुवातीपासूनच किती धास्ती घेतली होती याचा निर्वाळा मिळतो.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ मे इ.स.१७२०* *छत्रपती शाहू महाराजांना नाराजीचे पत्र* *बाजीरावांच्या सुरुवातीच्या काळात, इ.स.१७२० मध्ये कर्नाटकच्या रायबाग परगण्यात असलेल्या संदूत्ती नावाच्या गावात बाजीरावांच्या सैन्याने लुटालूट केली. इथे एक हिंदू मठ होता तोही लुटला गेला. इथल्या मठाधिपती तरागिर गोसाव्याने दि. ३ मे १७२०ला शाहूछत्रपतींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली तेव्हा शाहू महाराजांनी गोसाव्यालाच म्हटलं, "राऊ आले होते तेव्हाच आधीच भेट घेऊन तुम्ही स्वतःला सुरक्षित करायला हवं होतं. लष्कर अनिवार असतं, धामधुमीच्या काळात प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवता नाही येत तेव्हा लष्कराने लुटलं ती गोष्ट झाली. आता मी अभयपत्र देतो त्यावरून पुन्हा गावाला इजा लागणार नाही".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ मे इ.स.१७६४* *माधवराव पेशवे व हैदरअली यांच्यात लढाईला प्रारंभ!* *माधवराव पेशवे यांनी हैदरचा बंदोबस्त करायचे ठरविले. मुरारराव घोरपडे यांना घेऊन मराठी फौज इ.स. १७६२ मध्ये कर्णाटकात उतरली. बाळापुरच्या लढाईत हैदरअलीचा पराभव झाला. त्रिंबकराव पेठ्याने धारवाडपासून तुंगभद्रेपर्यंत खंडण्या वसूल केल्या. मात्र पेशवा फिरताच हैदरने मुराररावांच्या सैन्यावर हल्ला केला. सुत्ती सोडून घोरपडे यांचा इतर प्रदेश हैदरअलीने कबज्यात घेतला. खंडेराव घोरपडे वगैरे बऱ्याच जणांना कैदेत घातले. पुढच्याच वर्षी त्याने बिदनूर घेतले. ते संस्थान हस्तगत करून त्याचे नाव हैदरनगर ठेवले. तेथे टांकसाळ करून त्याने स्वतःची नाणी पाडली. होणावर बंदरात आरमार सिद्ध केले. सोंधे घेतले. सावनूर, हुबळी, धारवाड ही सारी स्थाने हैदरअलीने ताब्यात घेतली. जवळजवळ ५० लाखांचा मुलूख हैदरच्या ताब्यात गेला आणि त्याच्या राज्याच्या सीमा जवळजवळ कृष्णेस येऊन मिळाल्या. माधवराव पेशवे यांचा या बातम्या ऐकून तीळपापड होत असे. हैदरचा बंदोबस्त करावा म्हणून त्यांनी फौज कर्णाटकात उतरली. धुळपाचे मराठी आरमारही मदतीस बोलावले गेले. हैदरचे बळ या मराठी फौजेपुढे कमी होते. समोरासमोर हैदर लढाई करतच नव्हता. गणिमी काव्यानेच लढावयास सुरुवात केली. तो बिदनूरच्या जवळच्या जंगलात लपून बसला होता. रात्री अपरात्री त्याची फौज मराठी फौजेवर तुटून पडे. त्याची मुख्य फौज रट्टेहळळीस होती. मराठी फौज हैदरच्या रट्टेहळळीवरील फौजेवर तुटून पडली. आणि लढाईला प्रारंभ झाला. तुफान संग्राम झाला. हैदरही स्वतः या लढाईत सामील झाला. मात्र मराठी फौज हिरीरीने लढली. मोठा पराक्रम करून मराठी फौजेने हैदरचा पराभव केला. बंकापुर, सावनूर येथेही चकमकी झाल्या. शेवटी सारी मराठी फौज धारवडच्या किल्ल्याच्या समोर आली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३ मे इ.स.१८१८* *दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली!* *मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला. घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
🙏 शिवराय स्टेटस - A T ధ A  महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल SHNDINVSHESHLEVED B7 Rohu BorePat ` शिवदिनविशेष 3 552.?&03 छत्रपती शिवाजी महाराजांनी राहुजी सोमनाथ यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले A T ధ A  महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल SHNDINVSHESHLEVED B7 Rohu BorePat ` शिवदिनविशेष 3 552.?&03 छत्रपती शिवाजी महाराजांनी राहुजी सोमनाथ यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२ मे इ.स.१६५६* *छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. छत्रपती शिवाजी राजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२ मे इ.स.१६६५* *(वैशाख वद्य त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, मंगळवार)* *दाऊद खान किल्ले कोंढाण्याच्या दिशेने :-* *राजगडावरून प्रचंड मार खाऊन निघालेला दाऊद खान मराठ्यांच्या रेट्यासमोर टिकेनासा झाला. राजगड परिसरातून २ कोस मागे हटल्यानंतर त्याने आपला तळ गुंजन घेऱ्याजवळ दिला व तिथून एक दिवस विश्रांती घेऊन खेड शिवापुरच्या दिशेने स्वराज्याची नासधूस करत कोंढण्याच्या दिशेने सरकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२ मे इ.स.१६८३* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहार कोष तयार करणारे मुत्सद्दी कारभारी "रघुनाथ नारायण हणमंते" यांचे निधन. शिवरायांच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश, रचिला आणि आपल्या सर्वाना शब्दाचा रास उघड झाला. आजही मराठीतील प्रचिलित असलेले शब्द शिवराज्यकोशात असल्याचे पाहून आनंद होतो ...* *सचिव , मंत्री , सभासद , न्यायधीश , दुर्ग , कोशागार , शस्त्रागार , चषक , सभा , लेखा , आय - व्यय (जमाखर्च ) , वेतन , ऋण , पतिभु (जामिन ) , कारागृह , आयपत्र , सहकारी , अनुक्रमणिका , सवांद , गणना. असे अनेक असंख्य शब्द आजही आपल्या वापरात आहे. राज्यव्यवहारकोश विविध आठ नावांनी ओळखला जातो.* *१) राज्यव्यवहारकोश* *२) राजकोश* *३) शिवचरित्रप्रतीप* *४) राजकोश नीघुन्तु (#ट)* *५) व्यवहारकोश* *६) शिवराजकोश* *७) श्री छत्रपती राजकोश* *८) श्री छत्रपती राज्यव्यवहारकोश* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२ मे इ.स.१७३९* *गोव्याचे पोर्तुगीज आणि व्यंकटराव घोरपडे यांच्यात तह!* *या तहात खोर्जुवे बेट आणि पनाळे बेट ही पोर्तुगिजांनी घेतलेली सावंतांची दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु मी दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु ती दोन्ही बेटे पोर्तुगिजांनी सावंतांना परत केली नाहीत. तत्पूर्वी पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते. कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने त्यांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२ मे इ.स.१७३९* *छत्रपती शाहू महाराजांचे सरदार व्यंकटराव घोरपडे व दादाजी भावे नरगुंदकर या दोघांनी गोव्याच्या पोर्तुगिजांच्या तहाच्या करारावर सह्या केल्याची नोंद!* *दादाजी भावे यांस पोर्तुगिजांकडून भरपूर लाच मिळाल्याने त्याने रायतूरच्या किल्ल्यावर हल्ला करण्यास चालढकल केली. नंतर मराठा सरदारांच्या डोळ्यास पाणी लावण्यासाठी लुटूपुटूचा हल्ला केला. पण त्यात दम नव्हता. दादाजी भावे व्यंकटराव घोरपडे आणि पोर्तुगीज आधिकारी यांच्यामधील तहाच्या वाटाघाटीचे एरंडाचे गुऱ्हाळ पुष्कळ दिवस चालले. व्यंकटराव यांचा दिवाण गोविंदपंत ठाकूर याने एक अट घातली की, पोर्तुगिजांनी त्यांच्या अमलाखालच्या हिंदुंकडून शेंडी कर वसूल करू नये व त्यांना त्यांनी संपूर्ण धर्मस्वातंत्र्य द्यावे. भावे यांचा दिवाण महादजी शेणवी याने "इंक्विझिशनच्या अधिकाऱ्यांनी हिंदूंच्या वाटेस जाऊ नये". अशी शर्त घातली. परंतू त्या दोन्हीही अटी पोर्तुगिजांनी मान्य केल्या नाहीत. त्यांनी सबब सांगितली की हा प्रश्न धार्मिक असल्याने त्यात ढवळाढवळ करण्याचा आपणास आधिकार नाही. व्यंकटराव घोरपडे आणि दादाजी भावे या दोघांनी पोर्तुगिजांकडून लाच घेतल्याने "ते त्यांचे मिंघे बनले होते. त्या दोघांनी तहाच्या करारावर दि. २ मे इ.स.१७३९ या दिवशी मुकाट्याने सह्या केल्या. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या लांछणास्पद करारावर छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्कामोर्तब केले नाही. पोर्तुगिजांनी युद्ध नुकसानी म्हणून मराठ्यांना ७ लक्ष रुपये द्यावे अशी अट तहाच्या कलमात होती. ह्या रकमेपैकी एक लक्ष रुपये आपणा स्वतःला मिळण्याची व्यवस्था दादाजीने अगोदरच करून ठेवली होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२ मे इ.स.१८१८* *त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा* *दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे त्यांनी पसंत केले. १८१८ ला पेशवाईचा अस्थ झाला. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घ्यायला व त्यांचे खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिग्जला नाशिकच्या संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. त्याने २ मे १८१८ च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. ही लूट डेक्कन प्राईज मनी अॅक्शन नुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र, सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नास्सक हिराही इंग्लंडला गेला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२ मे इ.स.१८४८* *क्रांतीविर राघोजी भांगरेना ठाणे कारागृहात फाशी.* *या महान आदिवासी क्रांतिकारकाच्या १७३ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२ मे इ.स.१९२१* *स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानच्या अंधार कोठडीतून दि.२ मे १९२१ रोजी सुटका झाली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
📜इतिहास शिवरायांचा - गड किल्ले संवर्धन सेत  महारष्ट प्रदश T H  0 A R A T 8-0 R $ 5HvnlNyushFsh CRFAVED शिवदिनविशेष Aunul Lorse Fuuil २ मे इःस. १६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला गड किल्ले संवर्धन सेत  महारष्ट प्रदश T H  0 A R A T 8-0 R $ 5HvnlNyushFsh CRFAVED शिवदिनविशेष Aunul Lorse Fuuil २ मे इःस. १६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६६१* *(वैशाख शुद्ध ११, एकादशी, श्रीनृपशालिवाहन शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार)* *शृंगारपुर स्वराज्यात दाखल!* *शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे जास्तच शेफरला होता. आदिलशहाच्या हुकूमानुसार महाराजां सोबत अकारण वैर धारण केले होते. शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापुर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपुरकडे वळवला. तिथे सूर्यराव सुर्वे आपल्या दहा हजार लोकांसह शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव देत असे. हा उपद्रव नाहिसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपुरावर अचानक छापा टाकला, पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला. चकमक चांगली झाली, सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठयांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगड देखील स्वराज्यात दाखल केला. संगमेश्वर येथे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करीत असताना सुर्यरावणे विनाकारण तानाजी काकांच्या छावणीवर हल्ला केला. पण तो हल्ला तानाजी काकांनी क्षणात सावरून उधळून लावला व सुर्वेला पळून जाण्यास भाग पाडले. महाराजांना हे कळताच तानाजी काकांचा सत्कार केला आणि सुर्वेला अजून एक संधी द्यायची ठरविले व ते पत्राद्वारे महाराजांनी सुर्वेला कळविले आणि भेटीसाठी बोलावले. होकार देऊन ही सुर्वे काय भेटीला येईना. मग, महाराजांनी शृंगारपुरीकडे १५००० खड्या स्वारांसह मोहरा वळविला. घाबरून स्वतःच्या रक्षणासाठी सुर्वे पळून गेला. महाराज शृंगारपुरीत पोहोचले आणि सुर्वे पळून गेल्याचे समजताच महाराज संतापले आणि सुर्वेचे सिंहासन लाथेने उडवून लाविले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६७५* *उत्तर कोकणात पोर्तुगीजांकडून दरवर्षी चौथ वसूली करून आता शिवाजी महाराज पोर्तुगीजांकडे आदिलशाही कोकणचा भाग म्हणून साष्टी, बार्देसचीही मागणी करू होते. फोंडा मोहिमेच्या वेळी स्वत: शिवाजी महाराज २९ एप्रिल १६७५ रोजी दुपारी सैन्य घेऊन साष्टी प्रांतातील काही देसायांच्या आणि आदिलशहा सरदार रणमस्त खानाचा पाठलाग करत चांदर गावात शिरले. पुढे कुंकळी गावातील बाजारात सैन्य घेऊन दाखल झाले. कुंकळीत काही घरांची लुटालूट केल्यानंतर या सैन्याचा तळ कुंकळीतील चांभारभाटात मुक्कामास राहिला. यावेळी कुंकळीतील पोर्तुगीज कॅप्टन मानुएल डी मोता हा होता. या कॅप्टनकडे दारूगोळ्याची मागणी केली. तेव्हा कॅप्टनने गव्हर्नरला कळविले तेव्हा गव्हर्नरने सल्लागारांच्या बैठकीत हा विषय मांडला. तेव्हा सल्लागारांनी मत मांडले की, शिवाजीचे सैन्य कुंकळी गावात हेतूपरस्पर शिरले की वाट चुकून शिरले त्याची अगोदर चौकशी करण्यात यावी व त्याचा पुढचा पावित्रा काय आहे याचा तपास करावा. त्या दरम्यान शिवाजीचा जो वकील या शहरी (ओल्ड गोव्यात) सध्या आहे त्यास स्थानबद्ध करून ठेवावे. म्हणजे पुढे जो काय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्या संबंधाने हा वकील आपल्या हाती असला तर त्याचा उपयोग होईल.’ पुढे लवकरच फोंडा जिंकल्यावर मात्र पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांशी मवाळ धोरण स्वीकारले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६८०* *महाराजांच्या महानिर्वाणाबाबतची माहिती!* *पाँडेचरीचा संस्थापक आणि राजापुरचा मुख्य अधिकारी फ्रेंच मार्टिन लिहीतो की "छत्रपती शिवाजी महाराज काही दिवसांपूर्वीच वारले. उघड्या मैदानावरील लढाईतील यशापेक्षा आपल्या कुशाग्र बुद्धीने मुत्सद्देगिरीतील क्षमतेमुळे हिंदुस्थानातील उच्चतम व्यक्तींच्या पंक्तीत महाराज विराजमान होते महाराजांचा उत्तराधिकारी ठरविण्यास महाराजांच्या अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराजांचा ज्येष्ठ मुलगा हा महाराजांचा कायदेशीर वारस आहे".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६८२* *छत्रपती संभाजी महाराजांची सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार दगड, चुना व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली. त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल सन १६८२ रोजी कळवीले की...* *"आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१६८५* *फरह बख्श बागेजवळ औरंगजेब बादशहाने मुक्काम केला. दि. २६ एप्रिल इ.स.१६८५ रोजी औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले. फरह बख्श बागेजवळ डेरे देण्यात आले. जमादिलावल महिन्याच्या ५ तारखेसच म्हणजेच, आजच्या दिवशी, २९ एप्रिल इ.स.१६८५ रोजी औरंगजेब बादशहाने त्या ठिकाणी मुक्काम केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१७०५* *१७०५ एप्रिल महिन्यात त्र्यंबक शिवदेव, पंताजी शिवदेव आणि रामजी फाटक यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि तेथील मोगल शिबंदीचा पराभव करून तो किल्ला आपल्या ताब्यात आणला. गडाचा मोगल किल्लेदार देवीसिंग यास कैद केले. हे महाराणी ताराबाईंना समजताच त्यांनी २९ एप्रिल १७०५ रोजी रामजी फाटक यांस पत्र लिहिले, “तुमच्या सेवेचा मुजरा जाहला. तुम्ही मर्दानी सेवक आहात या उपरीही आपण स्वामी कार्य करीत जाणे म्हणजे कुलास उर्जीत होईल.”* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२९ एप्रिल इ.स.१८५८* *बाबुराव सेडमाकेंनी ब्रिटिश फौजांचा एप्रिल १८५८ मधे सगणपूर व बामनपेट येथे पराभव केला. या यशाने अत्याधिक आनंदित झालेल्या बाबुरावने २९ एप्रिल १८५८ रोजी प्राणहितेच्या तीरावरील अहेरी जमीनदारीमधील चिंचगुडी येथे ब्रिटिशांच्या टेलीग्राफ कॅम्पवर हल्ला केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🙏 शिवराय स्टेटस - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल ا 14 H 10 SENED37` " হিলিলনিহীস Bor-rarಧ {e  ২৪ তসিল ব্ম ং&8ং छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड पाठोपाठ शृंगारपुरही स्वराज्यात दाखल करून घेतले. महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल ا 14 H 10 SENED37` হিলিলনিহীস Bor-rarಧ {e  ২৪ তসিল ব্ম ং&8ং छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड पाठोपाठ शृंगारपुरही स्वराज्यात दाखल करून घेतले. - ShareChat
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६५७* *औरंगजेब बादशहा बीदर काबीज करून कल्याणीकडे!* *२९ मार्च इ.स.१६५७ रोजी बीदरच्या किल्ल्याला वेढा दिला.२३ एप्रिल इ.स.१६५७ रोजीच्या पुर्वी तो त्याच्या ताब्यातही आला. बीदर काबीज करून औरंगजेब बादशहा २८ एप्रिल इ.स.१६५७ रोजी कल्याणीकडे निघाला. कल्याणीचा किल्ला मीर जुमल्याने वेढला होता. औरंगजेब बादशहा व मीर जुमला पुन्हा एकत्र आले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६६१* *छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६६५* *मोगलांनी रोहिडा ते राजगड भागात ठाण मांडले. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ एकवीस तारखेस, म्हणजेच दि. २७ एप्रिल इ.स.१६६५ रोजी दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद झालीत.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६७९* *छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे धोरण व त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत ते गड, कोट बांधणारे म्हणून.. पण स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी देसाई, देशमुख यांना तटबंदी असलेले वाडे बांधून द्यायचे नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते. या धोरणाची स्वराज्यात किती काटेकोर अंमलबजावणी केली जात होती त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बंकापूरचा देशाधिकारी बाबाजी शिवदेव याला धाडलेले खालील आज्ञापत्र. या आज्ञापत्रात "सांउसीचा कोट देखील पाया पाडून टाकणे" असे फर्माविले आहे. कर्नाटकातील तत्कालीन कुंदगोळ परगण्यात मौजे सांउशी हा गाव येत होता. हा गाव केंचणगौडा देसाई यास इनाम होता. महाराजांनी त्याचे इनाम चालू ठेवले मात्र गाव त्याच्या ताब्यात देण्याअगोदर सांउसी गावची तटबंदी पायासकट पाडावी अशी आज्ञा केली. सदर पत्राची आताच्या कालगणनेप्रमाणे तारीख २८ एप्रिल सन १६७९ येते. पत्रावर राज्याभिषेक शक ५, सिध्दार्थी नाम संवत्सर, वैशाख बहुल त्रयोदशी, सोमवार अशा तारखेची नोंद करण्यात आली आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१६८०* *(वैशाख शुद्ध दशमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार बुधवार)* *महाराजांच्या महानिर्वाणाबाबतची माहिती!* *मराठे व पोर्तुगीज यांची युद्धाची तयारी सुरू असताना अकस्मात महाराजांचे निधन झालेले आहे. यासंदर्भात आपला दुखवटा व्यक्त करताना पत्रातून गोव्याचे पोर्तुगीज आधिकारी महाराजांच्या मृत्यूबाबत दुखवटा व्यक्त करून दोन्ही राज्यांत सलोखा व स्नेह संबंध आधी होते तसेच ठेवण्याची इच्छा व्यक्त करतात.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१७०५* *किल्ले सिंहगड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात!* *किल्ले सिंहगड हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. यावेळी गड घेण्याची कामगिरी शंकराजी नारायण सचिव याने पंताजी शिवदेवांच्या आधिपत्याखाली त्र्यंबक शिवदेव व रामजी फाटक यांजवर सोपविली होती. त्याप्रमाणे त्यांनी मेहनत घेऊन किल्ला तर हस्तगत केलाच पण तीथला मोगली किल्लेदार देवीसिंह यांसही कैद केले. याबद्दल पंताजी शिवदेव यांस पुण्याच्या पश्चिमेस असलेल्या पौंड खोऱ्यातील शिरवली गावांपैकी काही जमीन इनाम मिळाली व इतरांस प्रोत्साहनपर पत्रे आली. ही हकिकत खरी असेल तर गंगाधर प्रल्हाद शकावलीतील, "आषाढ मासी कोंढाणा माला लाऊन मराठीयांनी घेतला ही नोंद चुक ठरते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१७३१* *बेलापूरची लढाई* *मराठ्यांनी नारायण जोशी या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत मराठ्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल रोजी कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि मराठ्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१७२८* *रोजी पोर्तुगालच्या राजाने व्हिसेरेईस लिहीलेल्या पत्राची नोंद!* *"तुम्ही फोंड सावंत याला धडा शिकविण्याच्या हेतूने त्याच्याशी युद्ध सुरू केलेत ते चांगले केलेत. परंतु डिचोलीचा किल्ला फोंड सावंतांच्या मुलाच्या ताब्यात देण्याऐवजी तो पाडून टाकलेला बरा. कारण, फोंड सावंतांचा मुलगा आपल्या बापासारखा निघाला तर डिचोलीच्या किल्ल्याचा उपयोग त्याला या राज्याशी लढताना चांगला होऊ शकेल".* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८ एप्रिल इ.स.१७४०* *श्रीमंत बाजीराव पेशवे नर्मदेच्या काठी मिळालेले परगणे ताब्यात घेण्यासाठी ते तिकडे गेले. तारीख १३ मार्च बाजीराव बऱ्हाणपुरास होते. तद्नंतर ते खर्गोण परगण्यात गेले. त्यावेळी पुण्यातील कुटुबियांनी बाजीरावांच्या मनाविरुद्ध त्याची आवडती मस्तानीबाई कैदेत ठेवली होती. हे त्यांस न आवडून त्या मनःस्तापातच ते नासिरजंगावरील स्वारीस गेले होते. नासिरजंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत ते खर्गोण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहाण्यास गेले. तेथे त्यांस ज्वर होऊन रावरेखेडी येथे तारीख २८ एप्रिल १७४० सोमवारी पहाटे श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी हे जग कायमचे सोडले. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात बेचाळीस लढाया खेळून कायमच अजिंक्य राहिलेले हे 'ईश्वरदत्त सेनानी' शेवटच्या काळात मात्र आयुष्याची लढाई हरले होते. अखिल हिंदुस्थानात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून देऊन दबदबा निर्माण करणारे शिवछत्रपतींच्या स्वप्नातल्या 'स्वराज्याला' 'साम्राज्य' बनवणारे धीरोदात्त पेशवा हे पुन्हा न परतण्याकरता स्वर्गाच्या मोहिमेवर गेले....* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *२८, एप्रिल इ.स.१७५१* *मराठ्यांचा किल्ले फतहगडास वेढा !* *मराठ्यांची एक चपळ फौज दुआबात आली. २० ते २५ हजार एवढी संख्या त्यात असावी, बंगशाचा सरदार शाहदिलखान त्यांना आडवा आला. कडव्या मराठी फौजेने कादिरजंग जवळ त्याचा धुव्वा उडविला. ते ऐकताच अहमदखान बंगश अलाबादेचा वेढा उठवून गंगाकाठ हसनपुरा जवळ आला. हसनपुरास एक किल्ला होता. त्याचे नाव "फतहगड" जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना घेऊन वजीर पठाणावर चालून गेला. मराठी फौजेने फतहगड वेढला. गंगेवर पुल बांधून त्यांनी पलीकडे जाऊन बंगशाची रसद बंद केली. बंगशाच्या सहायार्थ सादुल्लाखान आणि बहादुरखान हे येत असताना त्यांच्यावर गंगाधर यशवंत आणि जवाहरसिंग जाट हे चालून गेले. या दोन्ही फौजात मोठा संग्राम होऊन बहादरखान आणि १० हजार रोहीले कापले गेले. सादुल्लाखान जीव वाचवून पळून गेला. प्रचंड लूट मराठ्यांना मिळाली, अंतर्वेद रोहिल्यांच्या रक्ताने लाल झाली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 शिवराय स्टेटस
🚩छत्रपति शिवाजी महाराज - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल V R R TOR S EA T 411 5oW D शिवदिनविशेष Ranul Borse Potil २८ एप्रिल इःस १६६१ छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रलागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील प्रचीतगड उर्फ उचीतगड নিবধলা महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल V R R TOR S EA T 411 5oW D शिवदिनविशेष Ranul Borse Potil २८ एप्रिल इःस १६६१ छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रलागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील प्रचीतगड उर्फ उचीतगड নিবধলা - ShareChat