नारायणी 𓏧🪐
ShareChat
click to see wallet page
@mujramaharajjagdamb
mujramaharajjagdamb
नारायणी 𓏧🪐
@mujramaharajjagdamb
!! धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः !!
#✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास चार्ली चॅप्लिन 88 वर्षे जगले त्यांनी आपल्याला 4 विधाने दिली: (१) या जगात काहीही कायमचे नाही, अगदी आपल्या समस्याही नाहीत. (२) मला पावसात फिरायला आवडते कारण माझे अश्रू कोणी पाहू शकत नाही. (३) आयुष्यातील सर्वात हरवलेला दिवस म्हणजे आपण हसत नाही तो दिवस. (४) जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर...: 1. सूर्य 2. विश्रांती 3. व्यायाम 4. आहार 5. स्वाभिमान 6. मित्र तुमच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर त्यांना चिकटून राहा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या... चंद्र दिसला तर देवाचे सौंदर्य दिसेल... जर तुम्ही सूर्य पाहिला तर तुम्हाला देवाची शक्ती दिसेल... जर तुम्ही आरसा पाहिला तर तुम्हाला देवाची सर्वोत्तम निर्मिती दिसेल. त्यामुळे विश्वास ठेवा. आम्ही सर्व पर्यटक आहोत, देव आमचा ट्रॅव्हल एजंट आहे ज्याने आमचे मार्ग, बुकिंग आणि गंतव्यस्थाने आधीच ओळखली आहेत... त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या. आयुष्य म्हणजे फक्त एक प्रवास! म्हणून, आज जगा ! उद्या कदाचित नसेल.
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍 awww... 🥰😘❤️ #💗प्रेम #😍फक्त प्रेम वेडे #💑तुझी माझी जोडी
🌹फक्त तुझ्यासाठी.. - ShareChat
00:14
#😊Feeling happy #🤘 Singles स्टेटस #👧Girls status #📹Video स्टेट्स
😊Feeling happy - ShareChat
00:10
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ShareChat
00:15
#👍लाईफ कोट्स #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास वाचाल तर वाचाल दिल्लीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा एक तरुण पर्यटक आपल्या कुटुंबासह एक आठवड्याच्या सुट्टीसाठी लडाखला आला होता. तिथे त्याला जो ड्रायव्हर मिळाला तो साधारण अठ्ठावीस वर्षांचा असावा. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुली होत्या. प्रवासात बोलणं सुरू झालं. पर्यटक: या आठवड्याच्या शेवटी पर्यटन हंगाम संपेल. मग तुम्ही काय करता? गोवा, दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरांत हॉटेलमध्ये काम करायला जाता का? तरुण: नाही, मी इथेच राहतो. लडाख सोडून कुठेही जात नाही. पर्यटक: इथे तर हिवाळ्यात गोठवणारी थंडी असते. तेव्हा काय करता? तरुण: फारसं काही नाही, फक्त सियाचिनला जातो. पर्यटक (आश्चर्याने): सियाचिन? तिथे तर इथल्यापेक्षा जास्त थंडी असते! तरुण: मी तिथे भारतीय लष्करासाठी लोडर म्हणून काम करतो. हे कंत्राटी काम असतं. मी आणि माझ्यासारखे काही लोक इथून सुमारे अडीचशे किलोमीटर पायी चालत सियाचिन बेस कॅम्पपर्यंत जातो. त्यासाठी पंधरा दिवस लागतात. तिथे वैद्यकीय तपासणी होते. फिट असलो तर गणवेश, बूट, गरम कपडे, हेल्मेट मिळतं. मग तीन-चार महिने तिथेच राहून काम करतो. पर्यटक: तिथे काम काय करावं लागतं? तरुण: सामान वाहून नेणं. जे काही आवश्यक असतं ते आर्मी एअरड्रॉप करते. आम्ही ते पाठीवर उचलून एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर पोहोचवतो. तो संपूर्ण भाग हिमनद्यांचा आहे. तिथे ट्रक चालत नाहीत. बर्फावर चालणाऱ्या स्कूटर्सचा आवाज होतो, त्यामुळे शत्रू गोळीबार करू शकतो. म्हणून आम्ही रात्री साधारण दोन वाजता निघतो. टॉर्चही लावता येत नाही. पूर्ण शांतपणे, अंधारात चालावं लागतं. तिथे ना घोडे असतात ना खच्चर. मायनस पन्नास अंश तापमानात आणि अठरा हजार फूट उंचीवर कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही. पर्यटक (गंभीर आवाजात): तिथे ऑक्सिजनही कमी असतो. इतकं ओझं कसं उचलता? तरुण: म्हणूनच पंधरा किलोहून जास्त वजन नसतं आणि दिवसाला फक्त दोन तास काम. उरलेला वेळ फक्त शरीर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न. पर्यटक: हे तर जीवघेणं आहे… तरुण काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला— अनेक मित्र परत आलेच नाहीत. कोणी दरीत कोसळलं, कोणी शत्रूच्या गोळीने मारलं गेलं, आणि सर्वात मोठा धोका म्हणजे फ्रॉस्टबाईट… एकप्रकारे मृत्यू अटळच. पर्यटक: मग तुम्हाला चांगला पगार तरी मिळत असेल? तरुण: अठरा हजार रुपये महिन्याला. सगळा खर्च लष्कर उचलतं, त्यामुळे तीन महिन्यांत साधारण पन्नास हजार रुपये वाचतात. ते भरपूर आहेत. घर चालतं आणि सर्वात महत्त्वाचं—देश आणि लष्करासाठी काहीतरी करण्याचं समाधान मिळतं. दिल्लीचा तो पर्यटक गप्प झाला. पन्नास लाखांच्या पॅकेजमध्ये, एसी ऑफिस आणि ऐषआरामाच्या आयुष्यात जगणारा तो माणूस, पहिल्यांदाच स्वतःला लहान वाटू लागला. इथे—मायनस पन्नास अंश तापमान, अठरा हजार आठशे पंचाहत्तर फूट उंची, सकाळचे दोन वाजता, मृत्यूची सावली सोबत—दिवसाला सहाशे रुपयांची कमाई “फार” वाटते आणि देशासाठी काहीतरी केल्याची भावना आयुष्याला अर्थ देते. शहरांत बसून ज्ञान पाजळणारे, सोशल मीडियावर विष ओकणारे—त्यांच्यातील कुणातही इतकं धैर्य नाही की त्या अंधाऱ्या, बर्फाळ शांततेत दहा मिनिटं तरी उभं राहावं. तुम्ही तुमच्या मुलाला मॉलमध्ये शॉपिंग करायला घ्या, पिझ्झा खाऊ घाला; पण कधीतरी ही गोष्टही त्याला नक्की सांगा, जेणेकरून त्याला कळेल—या देशाची खरी रीढ कुठे आहे. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना हे समजावून सांगावं की देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं किंवा चर्चा करणं नाही, तर त्याग, शिस्त आणि कर्तव्य यांतून ती जन्माला येते. पुढच्या वेळी आपण आरामदायी खोलीत बसलेलो असू, तेव्हा एक क्षण थांबून त्या लोकांना आठवूया—जे रात्री दोन वाजता, अंधार आणि बर्फाच्या सान्निध्यात, आपल्या शांततेचं ओझं पाठीवर उचलून उभे असतात. कारण ते आहेत म्हणूनच आपण आहोत. सदैव प्रसन्न रहा!! जे मिळालं आहे—तेच पुरेसं आहे!!
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स वाचाल तर वाचाल भय इथले.. ©️®️ ज्योती रानडे अरविंदराव लेले किर्ती हॅास्पिटलच्या रूम नंबर १० मधे ॲडमिट झाले होते. त्यांचा मुलगा सागर जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आला तेव्हा फक्त एकच रूम मोकळी होती. रूम नंबर १०!! अटेंन्डींग डॅाक्टर राजू कुलकर्णी अरविंदरावांचे जिगरी दोस्त होते. डॅाक्टर कुलकर्णींनी पर्याय नाही म्हणून त्यांना १० नंबरच्या खोलीत ठेवले पण दुसरी एखादी रूम केव्हा मोकळी होणार आहे याची त्यांनी लगेच चौकशी सुरू केली. दहा नंबरच्या खोलीत ॲडमिट झालेला पेशंट कधीही बरा होऊन घरी जात नाही ही “अफवा” त्यांच्या कानावर होतीच. ही केवळ अफवा आहे हे नेहमी सांगणारे डॅाक्टर कुलकर्णी आता मात्र विषाची परीक्षा कशाला घ्या म्हणत दुसरी खोली बघत होते पण त्या आठवड्यात दुसरी एकही रूम मोकळी होणार नव्हती. दोन आठवड्यापूर्वी गणू शिंदे दहा नंबरच्या खोलीत ॲडमिट केला तेव्हा सिरिअस नव्हता. परंतु दोनच दिवसात त्याची तब्येत ढासळली होती. “काळी आकृती दिसते” म्हणत गणू बेशुद्ध झाला तो कधीच शुध्दीवर आला नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रचार करणारे डॅा कुलकर्णी देखील अवाक् झाले होते. आता त्यांचा जिगरी दोस्तच तिथे ॲडमिट झाला होता. बोलाफुलाला गाठ पडून त्याचं काही बरंवाईट होऊ नये या विचारात ते घरी चालले होते.. तेवढ्यात फोन आला… “अरविंदराव रेस्टलेस झालेत. लगेच या.” डॅा कुलकर्णी तातडीने दहा नंबरला गेले. अरविंदरावांना धाप लागली होती. डॅाक्टरनी योग्य औषधोपचार करून त्यांचा श्वासोच्छवास नॅार्मलला आणला व ते त्या खोलीतच शांत बसून राहिले. रुग्णांना बरं करण्यास ही खोली खरचं मदत करत नाही? काळी आकृती दिसते इथे? त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. दहा नंबर मधून किती रूग्ण बरे होऊन गेले आहेत त्याची चौकशी सुरू केली. दहा पेशंट गेले आणि दोन बरे झाले. त्यांनी दहा नंबरला नेहमी काम करणाऱ्या सर्व नर्सेस व कर्मचाऱ्यांना बोलावले. वेस्ट इंडीज हून मुंबईत येऊन राहिलेला रिचर्ड तसा नवा होता पण त्याचे काम उत्तम होते. मुंबईतच लहानाचा मोठा झाल्याने तो मराठी उत्तम बोलत असे. “सर, काळी आकृती येती व माणसाला घेऊन जाती बघा” शंकर म्हणाला. तो खोलीची साफसफाई करत असे. “काय हो सिस्टर? सिरिअस पेशंटच इथे ॲडमिट केले जातात का?” कुलकर्णी सिस्टर गायकवाड कडे बघत होते. “सर, सगळे सिरिअस नव्हते पण इथं ॲडमिट केलं ना की ते सिरिअस होतात.” सिस्टरच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. “ठीक आहे. जा तुम्ही.” कुलकर्णी म्हणाले. अरविंदरावांना न्युमोनिया झाला होता. ॲंटीबॅायोटिक्स चांगलं काम करतील अशी आशा होती. सर्व ट्रिटमेंट अगदी व्यवस्थित सुरू होती. कुलकर्णी त्या खोलीत बसून राहिले. सागर व त्याची आठ वर्षाची मुलगी राणी भेटायला आले होते. “शी! किती घाणेरड्या रूम मध्ये आजो ला ठेवलय? अंधारी आहे ही रूम..भीती वाटते मला इथं” राणीचे शब्द कुलकर्णी ऐकत होते. आजूबाजूला बघताना कुलकर्ण्यांना जाणवलं की दहा नंबरची खोली इतर खोल्यांपासून तशी लांब आहे. एक लहान खिडकी आहे पण त्यातून फारसा सुर्यप्रकाश येत नाही त्यामुळे खोली अंधारी वाटते. खिडकीचे गडद तपकिरी रंगाचे पडदे कातरवेळ अधिकच गडद करतात. त्या खोली जवळ माणसांची वर्दळ फारशी जाणवत नाही त्यामुळे पेशंटला फार एकटं वाटू शकेल.. बाकी काही नाही तर निदान खोली तरी प्रसन्न वाटायला हवी. त्यांनी काही गोष्टी बदलायचं ठरवलं. आपल्या पत्नीस, मेधास, सांगून झुळझुळीत क्रिम कलरचे पडदे लावले. त्या पडद्यावर बरेच छोटे सुर्य व बॅार्डरला सुर्यफुलं अशी नक्षी होती. मेधाने एक सुंदर वॅालपेपर छतावर लावला. निळ्या आकाशात दिसणारं इंद्रधनुष्य व प्रकाशाच्या दिशेनं उडणारे पक्षी डोळे उघडताच पेशंटला दिसतील असा! त्यानं पेशंटचं मन प्रसन्न होईल याची तिला खात्री होती. कोणताही जीवाची जगण्याची उमेद एकटेपणाने कमी कमी होऊ लागते. त्यातच आजारानं विकलं झालेलं शरीर उरलं सुरलं मनोधैर्य खच्ची करतं..डॅा कुलकर्णी मुळचे पंढरपूरचे. विठ्ठलाच्या दारी अभंग ऐकत, टाळ मृदुंगाच्या गजरात कित्येक एकाकी वृद्ध लोक कसे देहभान हरपून रमून जातात हे त्यांनी लहानपणापासून बघितले होते. त्यांनी उत्तम अभंग गाणाऱ्या नारायण कर्णिक यांना बोलावून दहा नंबरच्या खोलीच्या बाहेरील कॅारिडॅारमध्ये संध्याकाळच्या कातरवेळी अभंग गायन ठेवले.. “आता कोठे धावे मन… तुझे चरण देखलिया..” नारायणाच्या सुरेल अभंगाच्या गजरात सारं हॅास्पिटल विठ्ठलमय होऊन गेलं. कर्णिकांच्या भक्तीरसानं ओथंबलेल्या आवाजाने कित्येक जीवांना वेदनेचाही काही अंशी विसर पडला. विठू माऊली समोर दिसू लागली.. कुलकर्ण्यांनी स्टाफला एकत्र केलं व सांगितलं, “अभंग सुरू होताच माझ्या डोळ्यादेखत दहा नंबरच्या खोलीतील काळी आकृती वितळत गेली व तिथे विठोबा दिसू लागला.. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तुम्हीही दर्शन घेऊन या!” सगळा स्टाफ आश्चर्याने ऐकत होता.. अचानक दहा नंबरकडची रहदारी वाढली होती. बरेच जणांना तिथे विठोबा दिसू लागला होता. दहा नंबरची खोली, तिथले नवे पडदे, छतावरचं जीवनाची ओढ लावणारं इंद्रधनुष्य, मंद जळणारे नवे दिवे, अभंगातून पोचणारे तुकाराम नामदेवांचे अर्थपूर्ण शब्द आणि मेधाने उत्साहाने आणून ठेवलेला ताज्या निशिगंधाच्या फुलांचा वास मन प्रसन्न करत होता. अरविंदराव बरे होऊन घरी चालले होते. “राजू, किती आणि काय काय केलंस माझ्यासाठी! तुझे फार उपकार आहेत!” अरविंदरावांनी कुलकर्ण्यांचे दोन्ही हात हातात घेतले होते.. “अरे राजू, ती काळी आकृती पहिल्या दिवशी दिसली ती नंतर कधी दिसली नाही बरका. काय केलंस नक्की?”अरविंदरावांना राहवेना. “काही नाही रे. रिचर्ड ब्लडवर्क साठी येतो ना..आता त्याचं काळेपण हा त्याचा दोष नाही..कदाचित अर्धवट जाग्या अवस्थेत पेशंट त्याला काळी आकृती म्हणत असला तर म्हणून मी त्याची ड्यूटी बदलून नवीन माणूस नेमला एवढचं! आणि एकदा असं काही कानावर आलं की लोकच अशा अफवा पसरवतात म्हणून मी पण पसरवलं की तिथे आता विठ्ठल दिसतो आहे! खरंतर पेशंटना अनेक प्रकारचे भास, भ्रम होत असतात. पण या खोलीतून माणसं बरी होऊन घरी जात नाहीत हे ऐकून मी पण खरतर हादरलो होतो.. कारण माणसाला जे दिसतं.. जे उमगतं.. त्या पलिकडे असं बरंच काही आहे ज्याचा अर्थ आपल्या लिमिटेड कपॅसिटीला कळत नाही.. पण मी अत्यंत प्रयत्नाने ही अफवा दूर करणार आहे. मन एकदा अंधश्रद्धेला बळी पडलं तर मग भय इथले संपत नाही.. अशी अवस्था होते. हे भय मला संपवायचं आहे.. आपल्या हातात जे आहे ते सगळं मी केलं आणि माझ्या विठ्ठलाने मला साथ दिली!” कुलकर्णी प्रसन्न हसले. अरविंदरावांचा डिस्चार्ज होताच लगेचच एक कॅन्सर पेशंट दहा नंबरला ॲडमिट झाला होता. सत्य संकल्पाचा दाता विठ्ठल असतो या विश्वासाने डॅा. कुलकर्णी नवे आव्हान स्वीकारत कामाला लागले.. दहा नंबरच्या खोलीचे भय संपवण्यासाठी व तेथील पेशंट वाचवण्यासाठी!! ©️®️ ज्योती रानडे
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 वाचाल तर वाचाल *सदगुरुभेट*: सद्गुरू भेटणे हा कधीच योगायोग नसतो… तो पूर्वजन्मी केलेल्या सत्कर्मांचा, प्रार्थनांचा आणि अंतःकरणातून उमटलेल्या प्रांजळ हाकेचा परिणाम असतो. कित्येक जन्मांची पुण्याई एकत्र आली की , सदगुरू सोबत अशी दिव्य भेट घडते. म्हणूनच गुरू भेटले की मनात एक वेगळीच ओळख निर्माण होते… जणू आपण त्यांना आधीपासूनच कुठेतरी ओळखत होतो. किती भावस्पर्शी आहेत या निर्मळ भावना.. मनातील चलबिचल, वाढणारा गोंधळ हे सगळं माझ्या सोबत नेहमीच घडतं हे जाणणारे आपण सर्वच ; पण एकदा का गुरूंच्या सान्निध्यात आलो की मनातले वादळ शांत होतं . मनाच्या कोपऱ्यात दडलेले गुंते आपण कुणालाच सांगू शकत नाही, ते , ते क्षणात ओळखतात. आपण कधीच न बोललेल्या वेदना ते नजरेतूनच वाचतात आणि कधी कधी एका शब्दाने, किंवा अगदी शांततेनेही हृदयाला दिलासा देतात. खरं सांगू का, त्यांच्या नुसत्या उपस्थितीत एक सुरक्षितता जाणवते . जणू काही आपण योग्य हातात आहोत. अनेकजण आयुष्यात खूप शोध घेतात, पण सद्गुरू सापडत नाहीत. होत कां असं कधी? बहुदा तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल ना?.. कारण गुरूंची भेट ही प्रयत्नाने नाही, तर पात्रतेने मिळते. ही पात्रता एखाद्या जन्माची नसते तर ती अनेक जन्मांच्या जपातून, आवडीने केलेल्या भक्तीतून तयार होते. म्हणूनच गुरू मिळणे म्हणजे “भाग्य”, “कृपा”, आणि “पुण्याई” या तिन्हीचा एकत्रित आशीर्वाद. आणि एकदा का सद्गुरू लाभले, तर जीवन खरंच बदलतं. रस्ता पूर्वीचाच असतो, पण चालायची शक्ती वेगळी असते.अडचणी पूर्वीच्याच असतात, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वेगळ्या रूपात असते. आणि "जे काही होईल… माझे गुरू माझ्यासोबत आहेत."हे मात्र आपण मनाशी घट्ट करून ठेवतो. बरोबर ना ! खरं तर गुरू भेटतात तेव्हा कळतं की नियतीने आपल्याला योग्य ठिकाण शोधून दिलय आणि देवाने आपल्या जीवनात सत्कार्य करण्यासाठी सद्गुरूंचा हात ठेवला आहे. 🙏आपले सदगुरु त्यांनी दिलेल्या नामात आहेत. ( जेथे नाम , तेथे माझे प्राण-सांगे सकळांना सांभाळावी खूण.. आर्त हाक देता आज ये प्रचीती ऊध्दरीले लोक कोट्यानुकोटी) 👏🏻 ........................................ संकलन :- डॉ . डी. डी . देशमुख कामठेकर , पुणे . धन्यवाद . श्रीराम जय राम जय जय राम . श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय . ........................................
#✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 वाचाल तर वाचाल सकाळच्या थंडीत सायकल दामटत तो पोरगा रोज नेमाने येतो. यांत्रिक सफाईनं तुमच्या दरवाजाच्या फटीतून वर्तमानपत्र आत टाकतो. तेव्हा, याच फटीतून नवा भविष्यकाळ जन्माला येणार आहे, याची त्याला कल्पना नसते. आपल्याला तरी कुठे असते? पण, असे घडते. घडू शकते. कोणाच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीने काय बदल घडेल, हे तुम्ही सांगू शकत नाही. एखाद्या महान तत्त्ववेत्त्याच्या प्रवचनाने जो बदल होणार नाही, तो कोणाच्या चार ओळींच्या पत्राने होऊ शकतो. नाही तर, हीच गंमत बघा. मिलिंद एंगडे नावाचा एक साधा, अल्पशिक्षित चपराशी. मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये कुठल्यातरी खासगी बॅंकेत काम करणारा. कशीबशी आपली कच्चीबच्ची सांभाळत पोट भरणारा. कामगारवर्गीय दलित वस्तीतल्या त्याच्या त्या घरात सगळाच अभाव. रोज दूध घेण्याची पंचाईत. तिथं बाकी चैन कुठं? पण, या मिलिंदला वाचनाचा नाद. घरी एकवेळ दूध येणार नाही. पण, चार-पाच वर्तमानपत्रं मात्र घरात येणार. स्थानिक बातम्या कळाव्यात म्हणून एक. राज्य समजावं म्हणून एक. अग्रलेख आवडतात, म्हणून एक. आंतरराष्ट्रीय आकलन वाढावं म्हणून एक. अशी पाचेक वर्तमानपत्रं घरात येऊन पडायची. 'लोकमत' किंवा 'मराठवाडा' वगैरे त्यात असतीलच. तेव्हा मुंबईहून येणारे 'लोकसत्ता' आणि 'महाराष्ट्र टाइम्स'ही असायचे. एक दिवस उशीर झाला, तरी हरकत नाही. पण, ते पेपर रोज वाचायचेच. शिवाय इतर दैनिकं, नियतकालिकंही घरात येऊन पडायची. पण, फक्त पडायची नाहीत. मिलिंद अवघ्या कुटुंबाला घेऊन पेपर वाचायचा. त्यातले अग्रलेख, लेख यावर चर्चा करायचा. खरे तर, आजारपणामुळे नोकरीही गेलेल्या एका चपराशाला असले नाद परवडणारे नव्हते. पण, एकवेळ जेवण नसेल तरी चालेल. मात्र, वर्तमानपत्र, त्यातले लेख, संपादकीय, एकूणच वाचन आणि त्यावरच्या चर्चा याशिवाय मिलिंद जगू शकत नव्हता. आजारपणामुळे घर नावाच्या खुराड्यात बंद असलेल्या मिलिंदचं जग त्या खुराड्याएवढं नव्हतं. त्याला शब्दशः जग खुणावत होतं. 'जग केवढं, ज्याच्या-त्याच्या डोक्याएवढं', हे केशवसुत म्हणाले, ते तर खरंच. त्यामुळं मिलिंदचं खोपटं केवढं आणि त्याचा पगार किती, याच्याशी त्याच्या या जगाचा संबंध नव्हता. त्याचं ते जग फारच विस्तीर्ण होतं. मिलिंदच्या या महागड्या व्यसनांवर सगळेच हसत असताना, घरातला त्याचा पोरगा मात्र त्याच वर्तमानपत्रावर रेघोट्या मारत होता. हळूहळू वाचू लागला होता. बापाच्या गप्पा ऐकू लागला होता आणि हळूहळू बोलूही लागला होता. मिलिंदच्या अंधार्‍या खोलीत हा 'सूरज' उगवत होता. सूरज मोठा झाला. वकील झाला. कायद्याचा अभ्यासक झाला. पुढं आणखी झेपावला. ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉक्टरेट करू लागला. हॉर्वर्ड विद्यापीठात संशोधक म्हणून काम करू लागला. 'कास्ट मॅटर्स' या बहुचर्चित इंग्रजी पुस्तकाचा लेखक झाला. जगातला दखलपात्र विचारवंत आणि अभ्यासक म्हणून तळपू लागला. हो. जागतिक ख्यातीचे तरूण विचारवंत, स्कॉलर, आंबेडकरवादाचे अभ्यासक डॉ. सूरज एंगडे यांच्याविषयी मी बोलतोय. त्यांच्या मांडणीविषयी मी इथे भाष्य करत नाही. आज मुद्दा एवढाच की, दरवाजाच्या फटीतून आत आलेलं वर्तमानपत्र, भविष्याचे एवढे दरवाजे उघडू शकतं. हे वर्तमानपत्र मिलिंदनं त्या चिमुकल्या सूरजच्या हातात ठेवलं नसतं, तर कदाचित त्या वस्तीतल्या इतर मुलांचं जे झालं, तेच सूरजचंही होऊ शकलं असतं. तुमच्या मुलांच्या हातात बाकी काही द्या न द्या, पण कागदाचे हे कपटे त्यांच्या चिमुकल्या मुठीत येऊ द्या. येऊ द्या कानावर त्यांच्या कोणी भीमसेन, किशोरी आमोणकर, जगजितसिंग अथवा राहत इंदोरी, आनंद शिंदे. दिसू द्या त्यांना आपली आई काही तरी चितारताना. किंवा, रांगताना बाळाच्या हातात येऊ द्या तुटलेलं एखादं घुंगरू. डोळे किलकिले करून मूल जगाकडं पाहात असेल, तेव्हा मोबाइलमध्ये बुडालेला बाप आणि सिरियल्स बघणारी आई एवढंच साठवू नये त्यानं. पै पै जमवून घरात एकेक वस्तू गोळा करणा-या आईचं रूप आठवेलच तो, पण आपल्याला मांडीवर बसवून काहीतरी वाचणारी-लिहिणारी आई त्याला अधिक आवडेल. अंधार्‍या गुहेचे दरवाजे किलकिले होऊ शकतात. पण, त्यासाठी आपणही काही हालचाली कराव्या लागतात. घर किती स्क्वेअर फूटचं आहे, यावर तुम्हाला मिळणारी 'स्पेस' थोडीच अवलंबून असते! सूरजला त्या चाळवजा घरात विश्वभान देणारा अवकाश मिळालाच की. असे अनेक सूरज असतील, ज्यांना ही स्पेस मिळाली नाही, म्हणून ते उगवलेच नाहीत. कोणी सांगावं? डॉ. सूरज एंगडे यांचा एक लेख काही वर्षांपूर्वी वाचला. आणि, कधी न भेटताही हा 'सूरज मिलिंद एंगडे' एकदम जवळचा वाटायला लागला. - संजय आवटे #स्वामी_संजयानंद (आठवणीतून)
#✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स *पु.ल. - ' व्हता ' बरोबर की 'होता '?* *श्रोता - अर्थात 'होता', 'व्हता' चूक.* *पु.ल. - 'व्हता' चूक तर 'नव्हता' कुठून आलं?* 🤔 😂😅🤣           *असो, एवढं सोपं नाही ते...* 😅 😄 ----------------------------------------------------------- काका बँकेत खाते उघडायला गेले. व्यवस्थापकांनी त्याना एक अर्ज भरायला दिला. त्यावर लिहिले होते " नमुन्याची सही". काका भडकले आणि त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी व्यवस्थापकांना विचारले की मी नमुना आहे का? व्यवस्थापकांनी माफी मागितली आणि अर्जावर लिहीले " सहीचा नमुना ". मातृभाषे मध्ये फक्त शब्दांना नव्हे तर क्रमाला सुद्धा महत्त्व असते. 😄 ----------------------------------------------------------- मराठी भाषेची कमाल आणि धमाल...."पण" हा एकच शब्द वाक्यातली जागा बदलली, तर अर्थ किती बदलतो बघा....... *पण* तो तिच्यावर प्रेम करतो.. तो *पण* तिच्यावर प्रेम करतो तो तिच्यावर  *पण* प्रेम करतो तो तिच्यावर प्रेम *पण* करतो तो तिच्यावर प्रेम करतो *पण*.... 😄 ----------------------------------------------------------- लग्नापूर्वी, ती त्याला म्हणाली *"ते बघ...ते झाड"*....!! आणि त्याच्या मनात अनेक रोमॅन्टिक आठवणी जाग्या झाल्या लग्नानंतर, ती त्याला म्हणाली, *"ते बघ....... ते झाड "* आणि, मुकाट्याने त्याने कोपर्‍यातला झाडू उचलला. *शब्द तेच पण वेळेनुसार परिणामात बदल !* *मराठी भाषेची कमाल, अजून काय* 🤣😂🤣😂😊
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स 🧿 अडगळ – वास्तुशास्त्र – राहू……. घरातील न दिसणारा शत्रू…. भारतीय वास्तुशास्त्रात “अडगळ” म्हणजे केवळ जुनी वस्तू नसून ती थांबलेली, कुजलेली आणि अडकलेली ऊर्जा मानली जाते…. हीच ऊर्जा पुढे जाऊन राहूच्या कंपनांशी जोडली जाते… 👹 राहू म्हणजे — भ्रम, अडथळे, व्यसन, अचानक संकटे, मानसिक अंधार. घरात अडगळ वाढली की राहू शक्ती सक्रिय होते. ⸻ 🔴 अडगळ म्हणजे नेमकं काय? फक्त कचरा नाही — • न वापरलेले कपडे • फुटलेले फर्निचर • मोडलेली भांडी • बंद खराब इलेक्ट्रॉनिक्स सामान • जुने कागद, फाईल्स, रद्दी • कोपऱ्यात ठेवलेली वस्तू • बेसमेंट / स्टोअर रूम मधील गोंधळ • बंद वाहन ही सर्व राहूला आकर्षित करणारी क्षेत्रे बनतात…. ⸻ 🐍 राहू व अडगळ यांचा गूढ संबंध… ज्योतिषशास्त्रात राहूला “छाया ग्रह” “काळी ऊर्जा” “भ्रम निर्माण करणारा ग्रह” म्हणतात. 👺 राहूची शक्ती: • अंधार • ओलावा • कोंडलेपण • गुप्तता • दुर्गंधी • न वापरलेली जागा याठिकाणी सर्वात जास्त वाढते. म्हणून ज्या घरात अडगळ असते ते घर राहूचे अड्डे बनते…. ⸻ ⚠️ अडगळ + राहू = आयुष्यातील संकटे घरात अडगळ वाढली की पुढील त्रास दिसू लागतात — 🧠 मानसिक परिणाम • सतत चिंता • डिप्रेशन • निर्णय घेण्यात गोंधळ • भीती • वाईट स्वप्ने • एकाग्रतेचा अभाव 💰 आर्थिक त्रास • पैसा येतो पण टिकत नाही • अचानक खर्च • कर्ज वाढते • फसवणूक • व्यवसायात फसवणूक • काम असूनही यश नाही 🧑‍🤝‍🧑 नातेसंबंध • संशय • गैरसमज • दुरावा • व्यभिचार • लपवाछपवी • घरात कलह 🧬 आरोग्य • त्वचा रोग • ऍलर्जी • हार्मोनल समस्या • गुप्त रोग • व्यसन लागणे • विचित्र आजार ⸻ 🧭 घरातील सर्वात धोकादायक अडगळ जागा… विशेषतः या दिशांमध्ये अडगळ अत्यंत विनाशकारी ठरते… 🔥 शास्त्रोक्त उपाय… अडगळ हटवा – हेच सर्वात मोठे पूजन… घरातून • मोडलेले • न वापरलेले • आठवणींनी जड • खराब वस्तू बाहेर काढा. 👉 आठवण जपायची असेल तर फोटो ठेवा, वस्तू नाही. ⸻ 2️⃣ मीठाने राहू शुद्धी आठवड्यातून एकदा घर पुसताना पाण्यात खडे मीठ टाका. हे राहू कंपन नष्ट करते… ⸻ 3️⃣ कपूर / धूप दर मंगळवार व शनिवार घरात कपूर किंवा धूप पेटवा. राहूची नकारात्मक ऊर्जा जळते…. ⸻ 4️⃣ स्टोअर रूम नियम जर स्टोअर ठेवायचीच असेल तर — • प्रकाश • वायुवीजन • सुवास • नीट मांडणी असली पाहिजे. अंधारात भरलेली स्टोअर = राहू मंदिर. ⸻ 5️⃣ राहू शक्ती तोडणारी वस्तू घरात • स्फटिक • पिरॅमिड • गोमेद ( योग्य वास्तू पदात ) कूठे ही अंदाजे ठेवू नये • लॅव्हेंडर सुगंध ठेवल्यास राहू शांत होतो. ⸻ 🌿 थोडक्यात … “ज्या घरात अडगळ असते, त्या घरात भविष्य अडकते.” अडगळ काढली की — • पैसा वाहू लागतो • मन हलकं होतं • संधी दिसू लागतात • नशीब उघडतं राहू निघून जातो….. #VastuScience #VastuWisdom #Nikeeshvispute #Shubhvastusolution