
Sharad Pawar
@pawarspeaks
Official Page of Sharad Pawar, President of NCP
महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथील जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबाचे वारस श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, ज्यांचे विचार तुम्ही ऐकले ते शेजारच्या कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार, श्री. प्रविण गायकवाड, ज्यांचे आताच विचार आपण ऐकले, ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या बरोबर काम करण्याचा निर्धार केला ते नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख अभिजीत पाटील, अभयसिंह जगताप, सुभाष गुळवे, संतोष वारे, सौ. सविताराजे भोसले, सुधाकर रावल, संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे, वैभवराजे जगताप, उत्तम कांबळे, शिवराज जगताप, देवानंद बागल, आप्पासाहेब, अतुल पाटील असे अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख मी याठिकाणी करतोय. जर काही राहिले तर त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो.
उपस्थित बंधु भगिनींनो, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळेजण मोठ्या संख्येने याठिकाणी जमला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या वतीने माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि धैर्यशील मोहिते पाटील या तरूणाला ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला. मला आनंद आहे की, या कामाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळ्याचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी पाठिंबा दिला, संभाजी ब्रिगेडच्या वतीने सचिन जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब सुपनवर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. एका तरूण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला, त्यामुळे तुम्हा लोकांचा पाठिंबा मिळतोय.
हा तालुका महाराष्ट्रातला एकेकाळचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. एक काळ असा होता की, माझा इथे अधिक संबंध होता. १९७२ साली मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मला आठवतंय की, करमाळ्यात आल्यानंतर इथले ज्येष्ठ नेते, सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते नामदेवराव जगताप आणि माळशिरस तालुक्याचे नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील या सगळ्यांशी आम्हा लोकांचा सुसंवाद असायचा. मी अनेकदा याठिकाणी त्या काळात आलो आहे. इथे कृषी बाजार समिती आहे, त्यामध्ये एक लहानसं गेस्ट हाऊस होतं, नामदेवराव तिथे असायचे. त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो. जिल्ह्याच्या प्रश्नासंबंधी चर्चा केली. आणि दुष्काळाच्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं, याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केला होता. तो दुष्काळ एवढा मोठा होता की, ५ लाख लोकांना रोजगार हमीचं काम देण्याचा संकल्प होता. पण या जिल्ह्यातील नेत्यांच्या मदतीने नामदेवरावजी जगताप, शंकरराव मोहिते पाटील, विठ्ठलराव शिंदे, औदुंबर आण्णा पाटील, अनेकांची नावं घेता येतील, या लोकांच्या सहकार्याने या दुष्काळाला तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी याठिकाणी केलं होतं. मला आठवतंय की, जनावराला चारा नव्हता. जनावराचा चारा म्हणजे फक्त ऊसाचं वाढं, ऊसाचं वाढं जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला लागला होता. जनावरं हा चारा खात नव्हते. शेवटी आम्ही लोकांनी गुजरातमधून अमूल नावाची कृषी संस्था आहे, त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही निमंत्रण दिलं. इथली स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधून इथं आम्ही चारा आणला. जनावरांच्या कॅम्पमध्ये या चाऱ्याची व्यवस्था केली. आणि त्याचवेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मी त्याची आठवण यासाठी करून देतो, गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावरांना चारा देण्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली. आम्ही त्यांचे आभारी होतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेचे जे अध्यक्ष होते, त्यांच्यावर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. काय गुन्हा केला त्यांनी…? इथल्या दुष्काळग्रस्त लोकांच्या जनावरांना चारा द्यायचं काम त्यांनी केलं. आणि ते करणाऱ्यांवर खटला भरणारे त्यावेळचे मुख्यमंत्री हे आजचे प्रधानमंत्री आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील, त्या आम्ही करू देणार नाही हेच त्यांनी दाखवली.
जिरायत भागामध्ये अनेक पिकं आहेत. कांदा एक अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. तुम्ही आजच्या वर्तमानपत्रातली माहिती वाचा, ज्या कांद्याला दोन पैसे बाहेर मिळत होते, परदेशात कांदा निर्यात करत होते, त्याला बंदी घातली आणि दोन पैसे कांदा उत्पादकांना जे मिळत होते, ते थांबवण्याचे पाप मोदीच्या सरकारने या ठिकाणी केले. लोकांनी अनेकांनी याबद्दलच्या तक्रारी केल्या टीका टिप्पणी केली, काही ठिकाणी मोर्चे काढले आणि काल त्यांनी नवीन निकाल घेतला. काय निकाल घेतला? कांदा निर्यात करायला परवानगी आहे, पण जो लाल कांदा आहे, त्याला नाही. फक्त पांढऱ्या कांद्याला घेतली आहे. तुम्ही सगळेजण शेतीच्या धंद्यातले लोक आहात, शंभरातले किती टक्के लोक पांढऱ्या कांद्याचे पीक घेतात? १० टक्के लोकसुद्धा पांढऱ्या कांद्याचे पीक घेत नाहीत. आपल्या सगळ्या भागांमध्ये तांबडा कांदा हा पिकवला जातो, त्या तांबड्या कांद्याची निर्यात आधी थांबवली आणि फक्त जो कांदा गुजरातमध्ये पिकतो, त्याची निर्यात करण्याबद्दलची संमती दिली.
आज शेतीमालाच्या किंमती हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एकच गोष्ट सांगतो की, उत्पादन खर्चाचा विचार करून जी काही किंमत शेतकऱ्याला द्यायला हवी. ती देण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला पाहिजे. पण तो घेतला जात नाही. त्याचा परिणाम आज कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दुखणं झालंय. माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं. शेती खात्याचं काम हातामध्ये घेतलं आणि वर्तमानपत्रात बातमी आली की, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मनमोहन सिंह प्रधानमंत्री होते. ती बातमी वाचली. मी अस्वस्थ झालो. मनमोहन सिंहांना सांगितलं की, बळीराजा या देशातला आत्महत्या करायला लागला, तर कुठंतरी आपलं चुकतंय, कुठंतरी धोरणात बदल केला पाहिजे. त्यांना विनंती केली की, ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी आपण जाऊया. प्रधानमंत्री येतो म्हणाले. दिल्लीवरून आम्ही स्पेशल विमानाने नागपूरला आलो आणि तिथून यवतमाळला गेलो. आणि ज्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या घरी गेलो. माऊली होती, दोन लहान मुलं होती, एक लग्न ठरलेली मुलगी होती. त्या माऊलीला विचारलं. तुझ्या मालकाने आत्महत्या का केली ? तिने सांगितलं, बँकेचं कर्ज होतं. जो नियमित व्याज देतो, कर्ज फेडतो त्याचा व्याजाचा दर त्यावेळी १२ टक्क्यावरून ६ टक्क्यांवर आणला. आणि शेतकऱ्याला मदत करण्याचा निकाल हा त्याठिकाणी घेतला होता. पण आजच्या प्रधानमंत्र्यांना त्यासंबंधीची आस्था नाही. ते टिका टिपण्णी करतात, अनेक चुकीच्या गोष्टी करतात.
आज मोदींचं राज्य आहे, एखाद्या हुकूमशाहाचं राज्य असावं असाच ते राज्यकारभार करतात. दोनच उदाहरणं तुम्हाला देतो. झारखंड नावाचं राज्य आहे. आदिवासींचं राज्य आहे. आदिवासी मुख्यमंत्री आहेत आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले. आणि भारत सरकार ते सोडवत नाही म्हटल्यावर त्यांनी मोदींवर टिका केली. आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांचे नाव. देशातलं एक चांगलं राज्य चालवणारा एक मुख्यंमत्री. आज जेलमध्ये आहेत. कशासाठी तर मोदींच्यावर टिका केली म्हणून… लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही तर ती योग्य नाही हे सांगण्याचा तुमचा अधिकार आहे. त्यासाठी टिका टिपण्णी करण्याचाही तुमचा अधिकार आहे. पण टिका टिपण्णी केली म्हणून मुख्यमंत्र्यांनाही तुरुंगात टाकण्याचा निकाल हा जर त्याठिकाणी घेतला जात असेल, तर माझ्या मते या प्रकारची हुकूमशाही वेळीच आवरली नाही, तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही, स्वातंत्र्यावर गदा येईल, तुमचा अधिकार नष्ट होईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांचा पराभव केला पाहिजे. आज मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीने धैर्यशील मोहितेंची उमेदवारी आम्ही सर्व लोकांनी दिली. त्यांना विजयी करणं याचा अर्थ मोदींचा पराभव करणं आहे. आणि मोदींचा पराभव करणं ही राष्ट्रीय गरज आहे. त्या गरजेच्या पूर्ततेसाठी आपण एकत्र राहून निकाल घेतला पाहिजे.
या जिल्ह्यात कारखाने वाढले, पाण्याचे काही प्रश्न असून त्यावर चर्चा करायची गरज आहे. माझ्याकडे एक निवेदन आलं, ते निवेदन रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती, तालुका करमाळा यांच्या वतीने आलेलं आहे. ३०-४० गावांचा हा प्रश्न आहे, त्या गावांना पाणी मिळत नाही. रेटेवाडीतील लोकांवर अजूनही हे दुष्काळाचं संकट आहे आणि त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आचारसंहिता सुरु झाल्याने आज निकाल घेतला जाणार नाही. आणि म्हणून रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती याचे जे कुणी सहकारी असतील, त्यांनी या सभेनंतर मला भेटावं, मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल याची आपण काळजी घेऊ. हा विश्वास मी याठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. मला याचा आनंद आहे की, नारायण पाटलांनी आपल्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. मी बघतोय की, ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं. आपण संधी दिली म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो, जय हिंद, जय महाराष्ट्र !
#sharadpawar #pawarspeaks #शरद पवार
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आजचे आपले लोकसभेच्या निवडणुकीला निवडणूक लढवणारे आघाडीचे उमेदवार श्री. खैरे, दुसऱ्या मतदारसंघाचे उमेदवार कल्याण काळे, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे, ज्येष्ठ नेते केशवराव, शैक्षणिक क्षेत्रामध्ये औरंगाबादचे नाव किंवा मराठवाड्याचे नाव देशात आणि देशाच्या बाहेर ज्यांनी केलं ते बाबुरावजी कदम, उत्तमसिंह राजपूत, जयसिंहराव गायकवाड, रघुनाथराव सुधाकर सोनवणे, किशोर पाटील, सूर्यकांता ताई गाडे, विजय अण्णा बोराडे, अनिल पटेल, कमाल फारुकी, छायाताई जंगले, मीनाताई खरे, नामदेव पवार, संजय वाकचौरे, रंगनाथ काळे, द्वारका भाऊ पाटेकर, जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग तांगडे, शहराचे अध्यक्ष ख्वाजाभाई, व्यासपीठावरील सर्व आघाडीच्या विविध पक्षांचे नेते आणि गेले दोन अडीच तास ११ वाजल्यापासून या उन्हामध्ये, गरमीमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही बंधू-भगिनींनो..!
लोकसभेची निवडणूक आली. आपल्याला निकाल घ्यायचा आहे की या देशाचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? तो कारभार कशा पद्धतीने चालवायचा? देशासमोर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद ही कोणामध्ये आहे, याचा विचार करून निर्णय घ्यायचा. तुम्ही मी सगळेजण एका विचाराने काम करणारी लोक आहोत आणि म्हणून आपली जबाबदारी ही आहे की देशाचे राजकारण हे योग्य रस्त्यावर आणायचं असेल, तर आम्ही सगळ्यांनी बसून एक देश पातळीवर आघाडी केली, त्या आघाडीला साथ देण्यासाठी देशाच्या अनेक राज्यातील अनेक मंत्री, अनेक मुख्यमंत्री, अनेक खासदार, अनेक पक्षाचे नेते हे सगळे एकत्र आले आहेत आणि आज या निवडणुकीला सामोरे जात आहेत. माझी खात्री आहे, की अनेक ठिकाणी मी पाहिलं, महाराष्ट्राच्या बाहेरची माहिती घेतली, लोकांना बदल पाहिजे आहे. लोक या आघाडीला पाठिंबा द्यायला मनापासून तयार आहेत आणि त्या आघाडीचे दोन खंदे उमेदवार श्री. खैरे आणि श्री. काळे आज आपल्या सगळ्यांच्या वतीने या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तुमची माझी जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या मतांनी विजयी करायचं आणि देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर न्यायचं.
मी इथे यायच्या आधी मोदी साहेबांचे भाषण ऐकत होतो, ते आज मराठवाड्यात आहेत. सबंध भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय? हे भाषण असो, याच्या आधीचं भाषण असो, अन्य राज्यातील भाषणं असोत अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा सबंध देशाचा असतो. त्यांची भाषणे ऐकली, त्यांचे विचार समजून घेतले, तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे सबंध देशाचे प्रधानमंत्री नाहीत तर भाजपचे प्रधानमंत्री आहेत. देशाचे नेतृत्व ही करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी राजकीय दृष्टिकोन ठेवावा लागतो. मतभिन्नता असू शकते, पण राजकीय दृष्टिकोन याची राष्ट्रीय गरज असते. आज मोदी कुठेही गेल्यानंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत, राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याचे विस्मरण त्यांना होते आणि ते सातत्याने कधी नेहरूंवर टीका करतात, कधी राहुल गांधी यांच्यावर टीका करतात, कधी माझ्यावर टीका करतात, कधी आघाडीवर टीका करतात. या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही काय करणार? हे देशाला सांगा. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्यातील १० वर्षांपैकी जास्त वर्ष ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढायला घालवली, तुरुंगामध्ये गेले, स्वतःच्या घरादाराचा विचार केला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे यासाठी प्रयत्न केले, विज्ञानाला प्रोत्साहित केले आणि जगातली महत्त्वाची सत्ता भारत व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. अशा देशासाठी प्रचंड योगदान देणारे जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे नेतृत्व त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे याचा अर्थ आज या देशाचे प्रधानमंत्री यांची मानसिकता काय आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट होते.
त्यांनी सांगितलं, माझ्या हातात सत्ता द्या, ५० दिवसांच्या आत मी महागाईचे प्रश्न सोडवतो. महागाईचा प्रश्न सोडवला? पेट्रोलच्या किंमती कमी केल्या? आज त्यांनी सांगितलं ५० दिवसांच्या आत मी पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्यांच्या किंमती ५० टक्क्यांनी कमी करीन. नाही करता आली, उलट त्या किंमती वाढल्या. इथे आमच्या आया-बहिणी बसल्या आहेत त्यांनी सांगितलं होतं की गॅसच्या किंमती मी कमी करणार, त्या दुप्पट केल्या. आज संसार चालवणं, हे भगिनींना अवघड झालं आणि त्याचे महत्त्वाचे कारण जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारनी काहीही पाऊले टाकलेली नाहीत. आपल्याला संकटामध्ये टाकण्याचं काम केलं.
आज हिंदुस्थानामध्ये बेकारांची संख्या जास्त आहे. मध्यंतरी जगातली एक संघटना आहे तिचं नाव आयएलओ (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशन) या ऑर्गनायजेशनने जगामध्ये बेकारी किती आहे? आणि कुठे आहे? याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक अहवाल सादर केला. त्यांचा अहवाल असं म्हणतो की भारतामध्ये जे १०० मुलं शाळा कॉलेजमधून बाहेर पडतात त्यातील ८७ मुलं ही बेकार आहेत. ८७ टक्के तरुण पिढी या देशात आज बेकार आहे, त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भविष्याचा विचार करत नसेल तर सत्तेवर बसण्याचा त्यांचा अधिकार किती आहे? हा जर एखाद्या तरुणाने प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे.
म्हणून शेतकरी असो, आज शेतीची अवस्था काय आहे? आज मराठवाड्याची काय अवस्था आहे? आज मराठवाड्यामध्ये पाणी नाही, जनावरांना चारा नाही, दुष्काळाचे संकट आहे. ते इथं आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे अनेक ठिकाणी आहे. जबाबदारी असते सरकारची की दुष्काळासारखे संकट आल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कष्ट घ्यायचे. काही लोकांनी मला सांगितलं फळबागा केल्या, फळबागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळबागा केल्या आज त्या फळबागांना पाणी नाही आणि त्यामुळे ही फळबाग आज जळून जायला लागली आहेत आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नांकडे ढुंकवूनही बघत नाहीत.
मला आठवतंय, दुष्काळ पडला, त्यावेळी देशाचा शेती मंत्री होतो, औरंगाबादला आलो होतो. फुलंब्री आणि आजूबाजूला मोसंबीची पिकं जळत होती. आम्ही लोकांनी २५ हजार रुपये एका जणाला पाणी घालण्यासाठी दिले आणि बागा वाचवल्या. कष्टाने बाग केली आणि ती बाग पाणी नाही म्हणून जळून गेली, तेव्हा शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी आपल्या हातातली सत्ता ही वापरायची हे सूत्र राज्यकर्त्यांनी करायचं असतं, पण राज्यकर्त्यांना त्या संबंधित यतकिंचितही खात्री नाही, त्यांना चिंता नाही आणि म्हणून शेतकरी असेल, बेकार तरुण असेल, महागाईचा प्रश्न असेल यांसारख्या प्रत्येक प्रश्नावर आजच्या राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. मग सत्ता वापरतात कशासाठी? ते सत्ता वापरतात, त्याचा गैरवापर करण्यासाठी. आज हा देश स्वतंत्र देश आहे, माणसाला अधिकार आहेत, आज आम्ही बघतो की या अधिकारांवर गदा यायला लागली, मूलभूत अधिकार संकटात आले. याचा अर्थ, आज ना उद्या संसदीय लोकशाही संकटात येईल.
लोकशाहीवरचं संकट, घटनेवरचं संकट आणि सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावे लागेल, आणि ते उत्तर द्यायचे असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा १०० टक्के पराभव करणे आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे हेच काम तुम्ही करावं, त्याला आमची साथ राहील, ही खात्री या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.
#sharadpawar #pawarspeaks #शरद पवार
अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार श्री. निलेश लंके यांच्या आहिल्यानगर येथील स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या समारोप सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या सगळ्यांचे नेते बाळासाहेब थोरात, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी इंदोरहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले, अहिल्यादेवी आणि मल्हारराव होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार, ज्यांच्या निवडीसाठी आपण सर्वजण अतिशय उत्सुक आहात ते आपल्या सगळ्यांचे अत्यंत लोकप्रिय उमेदवार निलेश लंके, व्यासपीठावरील शिवसेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे उजवे कम्युनिस्ट पक्ष, या सगळ्या पक्षांचे या ठिकाणी उपस्थित असलेले नेते व हजारोंच्या संख्येने बराच वेळ या ठिकाणी आहात ते आपण सगळे बंधू-भगिनींनो..!
बऱ्याच दिवसांतून आज मी गांधी मैदानावर बोलत आहे. एक काळ असा होता, की माझी सभा म्हटल्यानंतर ती गांधी मैदानावरच व्हायची आणि या मैदानाला इतिहास आहे. अनेक प्रश्नांसाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी सभा घेतल्या आणि आज गेले काही दिवस निलेश लंके यांनी जी यात्रा काढली होती, गावोगावी गेले, लोकांना भेटले, त्यांची सुखदुःख समजून घेतली, आणि आपल्या सगळ्यांची आपल्या खांद्यावरची जबाबदारी पडणार आहे, ती सोडवण्यासाठी, पेलवण्यासाठी स्वतःची तयारी त्यांनी या ठिकाणी केली. त्या यात्रेचा आजचा सांगता दिवस आहे. तुम्हा सर्वांच्या वतीने निलेश लंके यांना मी अंतकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो, की जे काम हातात घेतले आणि ज्यांच्यासाठी घेतले त्यांच्याशी त्यांनी पहिल्यांदा संवाद साधला. माझ्या वाचनामध्ये आलं की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की पार्लमेंट मध्ये कोणत्या भाषेत बोलाल, हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते पार्लमेंटचे सभासद होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांना हे समजायला हवं होतं, पार्लमेंट मध्ये कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो, आणि कधी शुद्ध मराठी मध्ये सुद्धा बोललो. मराठीत बोलण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी आहे, आणि तुमच्या भाषणाचं शब्दश: हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिथे भाषांतर होतं. त्यामुळे निलेश लंके या जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील.
आज या ठिकाणी एका गोष्टीचा मला आनंद आहे. मला असं समजलं की निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके इथे खाली बसल्या आहेत. त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे मी इथे फुलं आणून ठेवली होती, त्यांनी दुसऱ्याला दिली त्यांचा स्वभाव असाच आहे स्वतःसाठी काही ठेवायचंच नाही. या दोघांचंही मी अंत: करणापासून अभिनंदन करतो. राणी लंके यांचे मी अभिनंदन करतो आपला नवरा त्यांनी सांभाळावा. अखंड लोकांच्यात असतो, घरात राहत नाही. त्यांचे काम त्यांनी अखंड पणाने केले आणि हे महाराष्ट्राने बघितले आहे. शाळेत जाणाऱ्या मुली तीन-तीन चार-चार मैल चालत जायच्या त्याच्यात लक्ष घातलं आणि आज हजार मुलींना सायकली मोफत दिल्या. अशी अनेक काम आपल्या आयुष्यामध्ये केली.
टीका करणाऱ्या लोकांबद्दल मला आज काही जास्त बोलायचे नाही. ते माझ्यावरही टीका करतात. बाळासाहेबांवरही टीका करतात. मला हे आठवतं नाही की त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळासाहेब असो किंवा माझ्या जीवनामध्ये असो काही ना काहीतरी मदत त्यांना झालेली आहे. बाळासाहेब यांना आठवत असेल किंवा नसेल. बाळासाहेब विखे यांना निवडणुकीला उभे राहायचं होतं, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, त्यांची निवडणूक सोपी नव्हती, त्यांना यश संपादन करायचं असेल तर भाऊसाहेब थोरात यांची त्यांना मदत हवी होती आणि ती मदत मिळेल याची खात्री त्यांना नव्हती. माझ्यासमोर हा प्रश्न मांडला, मी जिल्ह्यात दौऱ्याला होतो, रात्री एक वाजेपर्यंत माझ्या बैठका चालू होत्या आणि त्यानंतर हा प्रश्न माझ्यापुढे मांडला. मी बाळासाहेबांना म्हटलं, की चला गाडीत बसूया, आपण भाऊसाहेब थोरात यांच्या गावी जाऊया, भाऊसाहेबांना भेटू या. त्यांची काही तक्रार असेल, आपली काही चूकभूल असेल तर माफी मागूया, दुरुस्त करूया आणि पहाटे रात्री ३ वाजता बाळासाहेबांना मी घेऊन गेलो, भाऊ साहेबांना झोपेतून उठवलं, त्यांच्याशी विचार विनिमय केला, झालं गेलं विसरून जा अशी विनंती केली, त्यांनी मोठ्या अंतकरणांनी सगळ्या गोष्टी माफ केल्या आणि शब्द दिला की आम्ही तुम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करू आणि तो विजय त्यांनी संपादित करून दाखवला. त्यामुळे ज्या लोकांना त्यांची राजकारणातली, संसदेतली, त्याआधी जिल्हा परिषद, सहकारी संस्था हे होते. पण लोकसभेमध्ये जाण्याचा रस्ता, ज्यांनी खुला केला आज त्यांच्या कुटुंबावर टीकाटिपणी करायची त्याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की माणुसकी नाही. अनेकांवर टीका केली जाते. आता या लोकांबद्दल काय सांगायचं, जे लोक किती पक्ष बदललेले आहेत. कधी शिवसेनेत होते, शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले विरोधी पक्षनेता झाले, विरोधी पक्षनेते पद उपभोगलं, ते सोडून दिलं भाजपमध्ये गेले आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसलेत आणि ते आज टीकाटिपणी करत असतात.
मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, या लोकांना आत्मविश्वास नाहीये. निवडणुकीला उभे राहतात, त्यांना निलेश लंकेची चिंता नक्की वाटत असेल. मी जाहीर पणाने सांगतो, जबाबदारीने सांगतो. मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं तीन आठवड्यांपूर्वी. ते उद्योगपती माझ्याकडे आले म्हटले, "महसूल मंत्र्यांची विनंती आहे." मी म्हटलं, "महसूल मंत्र्यांची विनंती आणि तुमचा काय संबंध?" "नाही, थोडे आमचे संबंध त्यांच्याशी असतात, त्यांनी एक मला विनंती केली, की काहीही करून पवार साहेबांकडे जा, आणि पवार साहेबांना सांगा, की निलेश लंके सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या." ही विनंती मला स्वतःला केली गेली. त्यांना निलेश लंके यांचं नाव आलं त्यावेळेला ज्यांची झोप उडाली ज्यांनी भाजपच्या दारात कधीही पाऊल टाकलेलं नाही, त्यांनी एका मोठ्या माणसाला माझ्याकडे पाठवलं. याचा अर्थ हा आहे की तुमच्याकडे सत्ता असेल, तुमच्याकडे साधनं असतील तर इथं माणुसकी आणि सामान्य माणसाचा प्रेम हा खजिना ज्यांच्याकडे आहे, त्या निलेश लंकेचा पराजय करणं त्यांना शक्य नाही.
कुठे शेतीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, तरुणांना रोजगाराच्या संबंधित प्रश्न आहेत, उपेक्षित समाज महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रश्न आहेत. हे सगळं बदलायचं असेल तर एक भक्कम सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे. आज ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे, त्यांना लोकांच्या प्रश्नांसंबंधी यतकिंचितही आस्था नाही. अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांच्याबद्दल टीका सबंध देशामध्ये केली गेली. लोक त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करतात यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा लोकशाही आणि संविधान हे शिल्लक राहणार की नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कष्टाने घटना आपल्याला दिली. त्यामुळे हा देश एकसंघ राहिला. भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये अशी घटना नव्हती, त्यामुळे अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं. पाकिस्तानचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. बांगलादेशचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. श्रीलंकेचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. नेपाळचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. भारतामध्ये कधी हुकूमशाही नव्हती, त्याचे महत्त्वाचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना आपल्याला दिली, की त्या घटनेच्या जोरावर हा देश एकसंघ राहिलेला आहे. पण चिंता ही आहे की त्या घटनेच्या संबंधी काहीतरी चुकीचा विचार हा राज्यकर्त्यांच्या डोक्यात येतो की काय अशी शंका आमच्या मनात आहे. यांनी पुन्हा सत्ता हातात घेतली तर सत्तेचा गैरवापर करतील. ते जर पुन्हा होऊ द्यायचं नसेल तर लंके यांना विजयी केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपाचा पराभव करणे तुमच्या माझ्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
अजून सुरुवात आहे. सुरुवात झाल्यानंतर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, ज्या गावात तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही राहता आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला लंके यांची निवडणूक त्या व्यक्तीच्या भवितव्याच्या दृष्टीने किती महत्त्वाची निवडणूक आहे, हे त्यांना समजावून सांगा. त्यासाठी त्यांना बोलावून घ्या. जे काही तुमचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांतून मार्ग काढू. आज मला इथले उद्योजक भेटले, त्यांनी दोन प्रश्न सांगितले. व्यापाऱ्यांमध्ये इथे दहशत आहे. नगरसारख्या शहरात दहशत आणि याची व्यापाऱ्यांना चिंता वाटावी अशी स्थिती? त्या उद्योजकांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी नगरच्या औद्योगिक एमआयडीसीमध्ये काही नवीन कारखाने यावेत. त्या एमआयडीसीचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावे. याच्याकडे त्यांचे लक्ष नाही. मी निलेश लंके यांना एवढेच सांगतो की तुम्ही या मतदारसंघातले प्रश्न सोडवा. जे काही करायचे असेल ते खासदार म्हणून करा. हे जे दोन प्रश्न आहेत, एमआयडीसीचे आणि व्यापाऱ्यांचे हे दोन प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर मला आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब थोरात आम्हा दोघांना कधीही बोलवा हे प्रश्न कसे सुटत नाहीत, ते आम्ही बघतो. त्या सर्वांची जबाबदारी मी स्वतः घेतो. एवढेच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो.
#pawarspeaks #शरद पवार #sharadpawar
जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
#🚩शिवराय #pawarspeaks #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #शरद पवार #sharadpawar
जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
#शरद पवार #sharadpawar #pawarspeaks #🚩शिवराय #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏
‘नॅशलिस्ट महिला काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’पक्षाच्या वतीने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘ज्योत निष्ठेची, सावित्रीच्या लेकींची..!’ या महिला मेळाव्यातून उपस्थितांना संबोधित केले.
पक्षाचे अध्यक्ष आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते श्री. जयंतराव पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदनाताई चव्हाण, श्री. अनिल देशमुख, श्री. राजेश टोपे, श्री. शशिकांत शिंदे, राखीताई जाधव, श्री. नसीम सिद्दिकी, श्री. महेबूब शेख, सक्षणा सलगर आणि आजचा हा पूर्ण सोहळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या राज्याच्या राष्ट्रवादीच्या महिलांचे नेतृत्व करणाऱ्या ऍड. रोहिणीताई आणि उपस्थित बंधू भगिनींनो..!
पक्षाची उभारणी मजबुतीने करण्याची आवश्यकता आहे, या भावनेने तुम्ही सर्व महिला भगिनी या ठिकाणी आलात. मला आठवतंय की, २५ वर्षांपूर्वी या सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या निर्मिती करण्यासाठी ठराव आम्ही केला. या ठिकाणी आम्ही पक्ष स्थापन केला. संध्याकाळी शिवाजी पार्कवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १ लाखांहून अधिक कार्यकर्ते आले होते. त्या सर्वांनी या पक्षाची धुरा खांद्यावर घेण्याची शपथ घेतली आणि पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकली.
आपला पक्ष हा असा पक्ष आहे की, ज्याची स्थापना झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेवर जाण्याची जबाबदारी आपल्यावर सोपावली. अनेक लोक एकत्रित आले. ज्यांनी कधी विचार केला नव्हता, सामान्य कुटुंबातल्या तरुणांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ५ ते १० वर्षांमध्ये महाराष्ट्राला हे दाखवून दिले की, सामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करतो आणि त्याचे कारण, तुम्हा सर्वांचे सामुदायिक कष्ट घेण्याची जी भूमिका आहे त्यामुळे हे सर्व शक्य झाले.
काही विचारधारा आपण स्वीकारली. महात्मा फुले, ज्योतिराव फुले, शाहू राजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या सर्वांसमोर आहे. आदर्श याचा अर्थ काय? फक्त फोटो लावणे, भाषणांमध्ये उल्लेख करणे या गोष्टी पुरेशा नाहीत. या महान व्यक्तींनी काय करून दाखवले, आपल्यापुढे आदर्श काय ठेवला आणि त्यामधून आपण समाजाची उभारणी ही कशी करणार आहोत या सर्व गोष्टींकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी समाजाचा अशिक्षित वर्ग, ज्यांना सन्मानाने जगण्यासाठी शिक्षित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. सावित्रीबाईंनी पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये मुलींची शाळा काढल्यानंतर विरोध होत असताना सुद्धा त्याची चिंता न करता स्त्री शिक्षणाचा पाया घातला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आधुनिकता, विज्ञान याचे महत्त्व आणि समाजाची गरिबी घालवण्यासाठी जी काही धोरणे राबवण्याची आवश्यकता आहे, त्यासंबंधीचा आग्रह त्यांनी इंग्रज सरकार समोर ठेवला.
देशात इंग्रजांचे राज्य होते आणि ते राज्यकर्ते भारतात यायला निघाले, त्यांच्या स्वागतासाठी इथल्या घटकांनी एक कमान बांधली, ज्याला आपण ‘गेटवे ऑफ इंडिया’ असे संबोधतो. त्या गेटवे ऑफ इंडियाकडे इंग्रज राजाची तुकडी आली आणि ते उतरले. तिथे एक फेटा बांधलेला आणि हातात कागद असलेला एक ग्रामीण भागाचा गृहस्थ उभा होता. राज्यकर्ते बोटीतून उतरले आणि गाडीत बसायला जात असताना त्यांच्या लक्षात आले की, हा कोण माणूस आहे ? हा का उभा आहे आणि म्हणून त्यांनी त्याची चौकशी केली. ती चौकशी केल्यानंतर सांगण्यात आले की, त्यांना एक निवेदन द्यायचे आहे आणि ते निवेदन इंग्रज राजाने स्वीकारले आणि त्यात ३-४ गोष्टींची मागणी होती.
एक मागणी होती मुलींच्या शिक्षणाची, दुसरी मागणी होती शेतीवाडी सुधारायची असेल तर पाऊस जो पडतो आणि त्याचे पाणी वाहून जाते त्यातील थेंब ना थेंब कसे साठवता येईल आणि त्यामुळे शेती बागायत कशी होईल आणि उत्पादन वाढेल या प्रकारची, तिसरी मागणी होती की, शेतकऱ्याला जो धंदा हवाय त्यासाठी दुधाचा धंदा वाढायला चांगल्या जातीच्या गाई या अमेरिकेतून इथे आणाव्यात आणि अधिक उत्पादन देण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी आपण कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करावी या सर्व मागण्या ज्योतिबा फुले यांनी केल्या.
१०० वर्षांपूर्वी उत्तम जातीची गाय आणा त्यातून जोडधंदा वाढेल हे सांगणे, मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरणे ही सर्व दृष्टी एक वेगळा समाज उभा करण्याबद्दल विचार करणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाची होती आणि त्यामुळे, सहाजिकच त्याचा आदर्श हा आज आपण केलाच पाहिजे.
दुसरे म्हणजे शाहू राजे ते फारच गमतीशीर होते. त्यांना खोटेपणा, ढोंगीपणा हा कधी पटायचा नाही. एक दिवशी त्यांच्या दरबारात एक सरदार आला आणि त्यांनी विनंती केली की, कर्नाटकमधून एक विद्वान व्यक्ती इथे येणार आहे आणि त्या व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे की, त्याला उद्या काय होणार आहे ते कळते. शाहू महाराजांनी सांगितलं, ‘उद्या काय होणार आहे हे कळते, असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. ही भोंदूगिरी आहे आणि अशा भोंदूगिरीला मी प्रोत्साहन देऊ इच्छित नाही.’ सरदार लोकांनी फार हट्ट केला आणि सांगितलं की, काहीही करा पण, त्याला एकदा ऐकून घ्या. शेवटी त्यांना दुखवायचे नाही म्हणून शाहू राजांनी त्यांना वेळ द्यायला सांगितला. ३-४ दिवसांनी कर्नाटकातून आलेले ते गृहस्थ शाहू महाराजांच्या राजवाड्यात पोहोचले आणि शाहू महाराजांच्या पुढे उभे राहून रडायला लागले. महाराजांनी विचारले, की तुम्हाला रडायला झाले काय? ते बोलले की, ‘तुमच्या अधिकाऱ्यांनी ४ दिवसांपूर्वी तुमच्या राज्यात आम्ही आल्यावर मला अटक केली, तुरुंगात टाकले, मारले, जेवण दिले नाही. शाहू महाराज बोलले, फार वाईट झाले. त्याचं मी समर्थन करणार नाही. पण, तुम्ही उद्या माझं काय घडणार आहे हे भविष्य सांगायला इथे आलात, तर तुम्हाला हे कळलं नाही का, की तुमचे भविष्य काय आहे. याचा अर्थ असा आहे की, हा ढोंगीपणा अशा गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. विज्ञानावर आधारित काही विषय असतील तर त्याचे समर्थन मी करतो. असल्या भोंदू आणि खोटं लोक मला आवडत नाही.
तिसरे गृहस्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर; आपण नेहमीच सांगतो की, बाबासाहेबांनी घटना लिहिली पण, त्याहीपेक्षा खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या. या देशांमध्ये स्वातंत्र्यापूर्वी धरणे नव्हती, पाण्याची कमतरता होती, या देशातले सर्वात मोठे धरण ‘भाक्रा नांगल’ याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या आधीच्या मंत्रिमंडळात जल आणि विद्युत खात्यावर त्यांची नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी घेतला. शेती कशी सुधारेल, यावर दूरदृष्टी ठेवून या अशा अनेक लोकांनी काम केले.
आज आपण इथे सर्व एकत्र आहोत. संघटनेमध्ये काम करण्याची तयारी केली. याचा अर्थ असा आहे की, समाजाचा चेहरा, सामान्य माणसाचे जीवन हे आपल्याला बदलायचे आहे. स्त्री आणि पुरुष यामध्ये कोणत्याही प्रकारचे अंतर ठेवायचे नाही. कर्तृत्व दाखवण्याचा मक्ता हा फक्त पुरुषाकडे असतो हे खरे नाही. स्त्रीला जर संधी मिळाली तर ती देखील कर्तुत्व दाखवू शकते. हे इंदिरा गांधींच्या हातात देश दिल्यानंतर सगळ्या जगाने पाहिलेले आहे. या देशाची प्रतिष्ठा त्या भगिनीने वाचवली आणि त्यामुळे, या कामाला प्रोत्साहन दिले पाहिजे. मला स्वतःला असे वाटते की, संधीही द्यायला हवी.
मी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि संरक्षण मंत्री असताना २६ जानेवारीची परेड होती, त्या परेड नंतर जगामध्ये मी पाहिले की, अनेक देशांमध्ये लष्करामध्ये महिला महत्त्वाचे काम करतात. आपल्या देशात ही पद्धत नव्हती. आपल्या देशाचे लष्कर प्रमुख, हवाई जहाज प्रमुख, नौसेनांचे प्रमुख या तिघांनाही मी बोलावले आणि त्यांना सांगितलं की, आपल्या लष्करामध्ये मुलींना का घेतलं नाही ? त्या तिघांनी मला सांगितलं की, अजिबात घेणे शक्य नाही. योग्य नाही. या देशाची रक्षण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे हे शक्य नाही. एक बैठक झाली, दुसरी बैठक झाली, तिसरी बैठक झाली, तिन्ही बैठकांमध्ये तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी दरवेळी हेच उत्तर मला दिले. चौथ्या बैठकीमध्ये मी सांगितलं की, ‘या देशातल्या जनतेने संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे, निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे’ आणि माझा हा निर्णय आहे की, ‘पुढच्या महिन्यापासून या देशाच्या लष्करामध्ये सुरुवातीला ११% मुलींना जागा देण्यात येईल आणि हा निर्णय घेतला’ आणि आज आपण बघतो आहोत की, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या दिवशी आपल्या देशातील मुली परेड करतात. सीमेवरच्या अतिशय महत्त्वाच्या भागांचे रक्षण मुली करतात. अनेक ठिकाणी वैमानिक म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी मुली पार पाडतात आणि एक आणखीन गोष्ट गंमत म्हणून सांगतो, एक दिवशी मी मुंबईवरून दिल्लीला गेलो होतो आणि माझ्या शेजारी जे गृहस्थ होते त्यांनी त्यांची ओळख करून दिली की, मी असा-असा आहे आणि लष्करामध्ये माझी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी एक गोष्ट मला सांगितली की, तुमचा एक निर्णय आम्हाला पटला नाही. तुम्ही मुलींना यामध्ये घेतलं हे काही बरं केलं नाही. मी विचारलं काय चुकलं माझं, त्यावर ते बोललेत, ‘मुलं जेवढ्या बारकाईने काम करतात, तेवढ्या मुली करत नाही. त्याच्यावर मला शंका आहे.’ मी त्यांना २-३ गोष्टी सांगितल्या की, तुमच्या घरामध्ये घर चालवण्याची जबाबदारी, स्वयंपाक करण्याची जबाबदारी, भाजी कापण्याची जबाबदारी महिला करतात. मी त्यांना विचारलं महिलाच का ? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘महिलांचा एक स्वभाव आहे की, कोणतेही काम त्यांच्यावर सोपवले तर ते अत्यंत बारकाईने त्या करतात.’ त्याउलट मुले त्यांच्यावर असलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडायला जेवढं लक्ष देतात त्यापेक्षा कितीतरी अधिक लक्ष मुली या देत असतात.
आपण संघटनेमध्ये सहभागी झालेलो आहोत. हा पक्ष सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. या पक्षावर आघातही खूप होतात, पण त्या आघाताची फिकीर ही तुम्ही आणि आपण करणे सोडून देऊया. आपण एकसंघ राहू. जे काही पक्षाचे कार्यक्रम असतील ते करू. तुमच्या हिताची जी जी धोरणे तयार करायची असतील, त्यामध्ये लक्ष देऊ आणि एकजुटीने आपण या महाराष्ट्राचे चित्र आणखीन चांगले कसे होईल याची खबरदारी घेऊ आणि ते करण्यामध्ये स्त्री शक्ती ही अत्यंत मोलाची शक्ती आहे. मला आनंद आहे की, रोहिणी ताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या आजूबाजूच्या ३-४ जिल्ह्यांतून तुम्हा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले. आपण सर्व आता जाताना आपल्या गावात, आपल्या आजूबाजूच्या घरात हा राष्ट्रवादीचा विचार पोहोचवण्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही करा. त्याचा लाभ तुमच्या कुटुंबाला तर होईल, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला होईल. तो महाराष्ट्राचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे आणि ते तुम्ही करू शकाल याची खात्री या ठिकाणी मी बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. #sharadpawar #pawarspeaks #ncp #शरद पवार
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कापसेवाडी या गावी आयोजित शेतकरी मेळावा या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन केले.
आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आणि द्राक्षाच्या पिकामध्ये ज्यांनी अतिशय कष्टाने फार मोठे काम केले ते नितिन बापू कापसे, संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष बदाम काका साठे, शहराचे अध्यक्ष भरत जाधव, विधानसभेचे आमचे जुने सहकारी विनायकराव पाटील, धनाजीराव साठे, पंढरपूरच्या कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश बारसकर, माढाच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, नागेश काकड, रवींद्र पाटील, त्यांचे विचार आपण ऐकले ते संजय घाटणेकर, रणजित शिंदे, कैलास पाटील अन्य सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..!
मला आनंद आहे, आज या ठिकाणी मला येता आले. कापसेवाडीचे वैशिष्ट्य अतिशय कष्टाने कापसाचे पीक घेणे आणि तो माल देशात व परदेशात पाठवणे, पीक वेगाने तयार करून दोन पैसे अधिक कसे येतील यासाठी प्रयत्न करणे आणि गेले २५ वर्षे नितीन कापसे यांनी कापसाची शेती आणि पीक या सर्व क्षेत्रात भरीव आणि अतिशय कष्टाने काम केलेले आहे. त्यांनी एकदा १ एकर डाळिंब लावले, पण ते पीक काही नीट आले नाही. डाळिंब काढून टाकावे लागले आणि नंतर १ एकर द्राक्षाची बाग लावली, द्राक्षाचा अभ्यास केला, जे उत्तम शेतकरी आहेत त्यांच्याशी सुसंवाद करून द्राक्षाची शेती यशस्वी केली, ज्यांनी १ एकरपासून सुरुवात केली ते आज ४० एकरावर जाऊन पोहोचले, त्यांचे आज यानिमित्त अभिनंदन केले पाहिजे. ते स्वतःच मोठे झाले असं नाही त्यांनी आपल्या भागातील अनेक तरुण आणि शेतकरी ज्यांना द्राक्षाच्या पिकात ज्ञान हवे असेल त्यांना मदत, मार्गदर्शन करून मोठे केले ही कामगिरी नितीनने गेली अनेक वर्ष केली. हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे लोक सांगतात हा नुसता शेतकरी नाही तर द्राक्षाचा डॉक्टर आहे आणि हा डॉक्टर बनून अनेकांना दुखण्यातून बाहेर काढण्यात यशस्वी देखील झाला, म्हणून आज आनंदाने आपण त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत.
सोलापूर जिल्हा हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळी पाहणी करायला इंदिरा गांधी याठिकाणी आल्या होत्या आणि कधीही न पाहिलेले एवढे मोठे संकट तेव्हा आम्ही पाहिले. ५ लाख लोक दुष्काळी भागात काम करण्यासाठी जात होते त्यांचा पगार आणि बाकीची व्यवस्था करण्यासाठी अधिकाऱ्यांना रात्रीच्या ३-३ वाजेपर्यंत बसावे लागत असत या सर्वांचा आठवड्याचा पगार काढणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यावेळी अनेक सहकारी मदतीला होते त्यात, नामदेवराव जगताप, विठ्ठलराव शिंदे भाजपचे त्या काळातले आमदार होते. शिवराजे म्हणून दक्षिण सोलापूरचे एक आमदार होते असे अनेक सहकारी होते, ज्यांनी त्या काळात मदत केली आणि दुष्काळातून बाहेर काढायला लोकांसाठी मदत केली. हे सर्व यश मिळाल्यानंतर या जिल्ह्यातील लोकांना शेतीसाठी अधिक पाणी कसे देता येईल यावर आम्ही अभ्यास केला. उजनीच्या धरणाचा सुदैवाने त्यात लाभ झाला आणि शेतीचे संबंध तंत्रज्ञान बदलण्याचा आम्ही विचार केला आणि हा जिल्हा फळ बागांच्या शेतीला अतिशय उत्तम जिल्हा झाला. डाळिंब, द्राक्ष अन्य भागात अन्य पिकं ही सगळी फळांची शेती या ठिकाणी व्हायला लागली आणि याचा परिणाम लोकांच्या आयुष्यात दिसायला लागला आणि त्यानंतर ऊसात लक्ष घातले.
महाराष्ट्रात ऊसाच्या शेतीला सर्वात जास्त महत्त्व अहमदनगर मध्ये होते आणि त्यानंतर कोल्हापूर, आज सोलापूर त्यात एक नंबरला असून साखर कारखाने आणि उसाच्या निर्मितीला महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत, शेत तलाव, काळ्या आईची इमान राखायची ही भूमिका सर्वांनी घेऊन कष्ट, मेहनत करून हा निर्णय अनेकांनी या जिल्ह्यात घेतला आणि त्याचा परिणाम आज या जिल्ह्याचे चित्र बदलत आहे.
राज्य, केंद्र सरकारच्या संबंधित इथे अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण यापैकी मी कुठेच नाही परंतु काळजी नसावी मी कुठेच नसलो तरी सर्व ठिकाणी आहे, जी काही दुखणे असतील त्या सर्वांची नोंद मी घेतली आहे आणि यानंतर प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्यातील जे-जे काही शेतीसंबंधी प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या सोडवणुकीला राज्य व केंद्र सरकार यांच्याशी काय बोलावे आणि त्यातून तुमची सुटका कशी होईल यासंबंधी चर्चा करेल.
देशाचे प्रधानमंत्री यांनी असा उल्लेख केला की, मला शेतीतलं काय समजतं पण हे काही नवीन नाही त्यामुळे ते जाऊ देत. काही दिवसांपूर्वी निवडणुकीआधी अमित शहा नावाचे गृहस्थ या जिल्ह्यात आले होते तेव्हा त्यांनी असेच सांगितले की, शरद पवार को क्या समझता है ? लोकांनी त्यांच्या उमेदवारांचा पराभव केला आणि सांगितलं की, त्यांना हे समजतं व नीटनेटकं समजतं. राजकारण या ठिकाणी काढायचं नाही, पण दोन-तीन गोष्टींवर मला अधिक लक्ष द्यायचं आहे. आज शेतकरी कर्जबाजारी होत आहे हे दुखणे आहे. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळेला शेतीवर काम देण्यासाठी एक कार्यक्रम होता. त्या काळामध्ये दुसरं काही काम देता यायचं नाही, काम काय द्यायचं ? सबंध जिल्ह्यात बल्डिंग केलं, त्यावर कर्ज झालं आणि ७८ साली माझ्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र आल्यावर पहिला निर्णय आम्ही हा घेतला की, बल्डिंगचे कर्ज माफ करायचे.
अलीकडच्या काळामध्ये देशाच्या शेतीची जबाबदारी माझ्याकडे असताना काही ठिकाणी आत्महत्या झाल्या. त्यानंतर विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सांगितलं की, या देशातला शेतकरी आत्महत्या करतोय ही आपल्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट आहे, म्हणून आपण जाऊन तिथे चौकशी करू, तुम्ही माझ्याबरोबर चला. मी त्यांना नागपूरला घेऊन आलो. नागपूरवरून यवतमाळला गेलो. ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरामध्ये जाऊन सविस्तर चर्चा केली, कारण एकच होतं की, शेतीमालाच्या किमती घसरल्या, कर्जाचे व्याज वाढले आणि कधीतरी घरातल्या भांड्या-कुंड्याचे लिलाव निघेल ही स्थिती निर्माण झाली, म्हणून घरातल्या प्रमुख माणसाने सगळ्यांसमोर आपल्या अब्रूचा पंचनामा नको म्हणून शेवटी हा निर्णय घेतला आणि जीव दिला. आम्ही दोघेही परत गेलो आणि प्रधानमंत्री यांना सांगितलं की, काहीही झालं तरी या देशामध्ये मोठ-मोठे उद्योजक आहेत. या उद्योगपतींनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज थकवलेले आहेत काहींना बँकांनी सूट दिली. कोट्यवधी रुपये जो थकवतो त्याला बँक सूट देते आणि हजारोंमध्ये कर्ज घेतो व नाईलाजाने ते कर्ज थकते त्यांची मात्र आपण भांडीकुंडी बाहेर काढून अब्रूचा पंचनामा त्या ठिकाणी करतो हे सूत्र बदलले पाहिजे ते बदलायचे असेल तर शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि एका निर्णयाने ६७ हजार कोटी एवढे या देशाचे कर्ज माफ केले, मला त्याचा आनंद आहे.
आमचे सहकारी संजय घाटणेकर यांनी सांगितलं की, भलत्याच्या नावावर कर्ज काढलं आणि ते पैसे तिसऱ्यानेच उचलले त्याचा परिणाम आज अनेक शेतकरी कर्जमाफी पासून बाजूला राहिलेले आहेत. आता हे काम कोणी केलं असेल? हे मला माहिती नाही, पण माझी माहिती तुम्हाला एकच आहे, हे जर कोणी केलं असेल तर, तुम्ही संजय यांच्याकडे ती माहिती द्या. ती सगळी माहिती एकत्रित करून माझ्याकडे द्या, मी त्यांचा काय बंदोबस्त करायचा ते बघतो. तुम्ही त्याची काही चिंता करू नका. शेतकऱ्यांची फसवणूक करणे हे काम जर नेत्यांकडून होत असेल तर त्याला नेता म्हणवून घ्यायचा अधिकार नाही. त्याबद्दलचा निकाल हा आपल्या सर्वांना घ्यावा लागेल. दुधाचा धंदा, द्राक्ष, डाळिंबाचा व्यवसाय असेल या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अतिशय कष्ट करत आहात त्यामुळे चित्र बदलत आहे. आपण सर्वजण या कामात अधिक लक्ष घालू. ज्या काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या त्याला पर्याय आहेत, त्याला उत्तरं आहेत, पण त्या उत्तरासाठी आपण बसून चर्चा केली पाहिजे आणि केंद्र व राज्य सरकारला त्यात लक्ष द्यावे लागेल, ते काम आम्हा लोकांकडून केले जाईल. या जिल्ह्याचा १९७२ पासून माझा घनिष्ठ संबंध आहे. अनेक माणसे जिवाभावाची आहेत. राजकारणात काहीही असेल पण त्यांनी आमच्याशी माणुसकी कधी सोडलेली नाही. अलीकडेच एक गोष्ट ऐकायला मिळाली की, काही ठिकाणी राजकारणामध्ये त्यांच्या मनासारखं काम केलं नाही तर दबाव आणतात. दबावाने आज चांगलं काम करणाऱ्याला त्याच्या कामापासून बाजूला करायचं काम करतात. मी एवढेच सांगू इच्छितो की, जसं कर्जमाफीत कुणाला फसवणूक केली असेल किंवा प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत म्हणून दबावाचे राजकारण या ठिकाणी कुणी करत असेल तर तो दबाव सुद्धा संपवायचा कसा ? याचा विचार आम्ही करू. तुम्ही त्याची काळजी करू नका. परदेशात माल पाठवायला मुंबईचे बंदर. देशात अनेक ठिकाणी बंदरे आहेत ही समुद्रातील बंदरं, समुद्राच्या बाहेरची. माळरानावर सुद्धा बंदर करता येतात त्यांना फोर्ट असं म्हणतात. आज महाराष्ट्रामध्ये आपण विदर्भामध्ये एक बंदर करत आहोत त्यासोबतच जालन्यात देखील करत आहोत. आज सोलापूरचा माल कंटेनरने इतक्या मोठ्या प्रमाणावर परदेशात जात असेल, तर इथे सुद्धा फोर्ट करावा ही जी मागणी आहे त्यातून सुद्धा काही मार्ग काढणे शक्य आहे. त्याचे जे मंत्री आहेत ते जाणकार आहेत त्यांचं नाव नितीनजी. त्यांना मी स्वतः सांगेन आणि त्यांना हे पटवून देईन तुम्ही त्याबद्दलची काही काळजी करू नका. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही एकत्रित रित्या पुन्हा एकदा माझ्याकडे द्या. आपण या कामांना गती कशी देता येईल ? ते या ठिकाणी पाहूया. मी येताना आता हेलिकॉप्टरने आलो, पलीकडे ऊस दिसत होता. नंतर ऊस संपला आणि सगळीकडे द्राक्ष दिसायला लागली. कुठेही नजर टाकली तर द्राक्षच. मला खात्री आहे की, हा जो निकाल कापसेवाडी व या भागातील तुम्ही लोकांनी केला आणि उत्तम द्राक्ष पिकवून एक प्रकारचा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो. आता आपली ही पिकांबद्दल व शेतीबद्दल जी दोस्ती झालेली आहे ती आता सुटायची नाय..!
#pawarspeaks #sharadpawar #शरद पवार #ncp
विद्या प्रतिष्ठानचे 'अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल', या नूतन वास्तूचे उद्घाटन व नामकरण समारंभाला उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अगस्त्याने उपस्थित राहिलेले हर्षवर्धन पाटील, भरणे मामा, अशोक पवार, कोकण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मगर, विद्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पवार कुटुंबातील सर्व घटक, संस्थेबद्दल अस्था असणारे सर्व नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, बंधू-भगिनी, आध्यापक वर्ग व मित्रहो..!
आज एका चांगल्या वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व एकत्र आलोत. ही संस्था १९७२ साली आम्ही सुरू केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ६७ साली जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि नंतरच्या काळात काही ना काहीतरी विधायक काम केले पाहिजे तेव्हा लक्ष घालायला सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा निवडून आल्यावर आमचे काही सहकारी विनोद कुमार गुजर, तुषारभाऊ, हरी भाऊ देशपांडे, डॉ. उम्रा शहा, श्रेयस उंडे, शरद वाडकर असा एक संच आम्हा सर्वांचा होता. आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला की, एक शिक्षण संस्था आपण या ठिकाणी सुरू करायची. आणि त्यासाठी मार्गदर्शन बारामती मधील जुने हायस्कुल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे तिथे एक मुख्याध्यापक होते त्यांचे नाव मी. जी. घारे त्यांचा सल्ला घेवून आम्ही या संस्थेची स्थापना केली.
मला आठवतं त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः मुंबईत जिजिरभाईं हे नाव फार मोठे होते. त्यांना मी सांगितलं की, आम्ही संस्था उभी करत आहोत आणि त्यासाठी तुम्ही यायला हवे आणि ते उपस्थित राहून त्यांनी उद्घाटन केले. आज संस्थेला पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालखंड झाला आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतो, देशाच्या बाहेर देखील जातो आणि अनेक वेळा परदेश दौरे देखील करतो तेव्हा काही लोक भेटायला येतात आणि ते हक्काने सांगतात की, आम्ही वी.पी चे विद्यार्थी आहोत.
आमच्यातीलच एक विद्यार्थिनी अनुपमा हेंगडे वियना मध्ये शास्त्रज्ञ म्हणून तिची नेमणूक त्या ठिकाणी झाली आणि ती याच संस्थेची विद्यार्थिनी होती. कधीकाळी ती हैदराबादला देखील असायची, तेव्हा मी देशाचा कृषि खात्याचा मंत्री होतो. तेव्हा हैदराबादला जगातल्या २८ देशांनी मिळून शेतीवर संशोधन करणारी एक संस्था काढली. आणि एक दिवशी त्या संस्थेत मी गेलो त्या संस्थेच्या संचालक मंडळात मी होतो. तेव्हा त्या संस्थेत अनुपमा आणि माझी भेट झाली तेव्हा तेथील लोकांनी मला सांगितले की, ही मुलगी तुमच्या भागातील आहे. ती शेतीवर उत्तम प्रकारे संशोधन करते आणि ती याच संस्थेची विद्यार्थिनी आहे. असे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेत उच्च पदावर काम करत आहेत.
७२ साली ही संस्था सुरू झाली. आज येथे ३२ हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. आणि त्यात प्रामुख्याने १५ हजार मुली आहेत. १ हजार ८०० हून अधिक शिक्षक, २९८ एकराचा कॅम्पस विविध भागात आहे. आज जी एक नवीन जिसूसीन सुरु केली त्यात विद्या प्रतिष्ठान आणि कृषी विकास प्रतिष्ठान तेथील कृषिका महाविद्यालय यांचे योगदान त्यात अधिक आहे. आणि त्यातील विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट आणि याचा अर्थ म्हणजे जगात आता प्रचंड बदल व्हायला लागलेले आहेत. उद्या तुमच्या उसामध्ये साखर किती आहे आणि त्याची तोडणी कधी केली पाहिजे हे या AI च्या मार्फत सहज शक्य आज झाले आहे किंवा अनेक क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील बदल हे या बदलत्या तंत्रज्ञान प्रणालीमुळे शक्य होणार आहे. आणि या तंत्रज्ञानाचे संशोधन मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात सुरू आहे त्याचाच एक भाग आज आपण आपल्या संस्थेत सुरू केला. माझी खात्री आहे या दोन्ही संस्था ज्या पद्धतीने काम करायचे त्याची काळजी घेऊन काम करतील. आणि या भागातल्या शेतीचे जेवढे क्षेत्र असो, दुग्ध व्यवसाय असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम येथे केले जाईल.
रयत शिक्षण संस्थेमध्ये ४ लाख विद्यार्थी आहेत त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे तेथे अनेक कामे केली जातात. मुंबईत मराठा मंदिर नावाची एक संस्था आहे. त्यांच्या अनेक शाखा आहेत जसं की कोकण, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आहेत त्याचा मी अध्यक्ष आहे तेथेही अनेक विद्यार्थी शिकतात. उरळी कांचन येथे महात्मा गांधी शिक्षण संस्था नावाची एक अतिशय उत्तम संस्था आहे तेथे ही हजारो विद्यार्थी शिकतात त्याचाही मी अध्यक्ष आहे. अशा अनेक वेगवेगळ्या संस्थेमध्ये शिक्षणाच्या पद्धतीचं बदल होत आहेत त्या बदलाची नोंद या संस्थेने घेतली पाहिजे आणि गुणवत्ता वाढीचे काम यात करायला हवे हे मी आवर्जून सांगू इच्छितो.
अजितच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण संस्था ही एक अतिशय उत्तम संस्था आहे, जिथे १ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात. आज अनेक वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत त्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर कसे भर देता येईल याचे काम सर्वांनी करायला हवे.
आज अनंतराव पवार म्हणजे माझे वडील बंधू ते अतिशय कर्तुत्ववान असे त्यांचे नेतृत्व होते. त्यांचे हस्ताक्षर अतिशय मोत्यासारखे होते. अतिशय सुवाच्च हस्ताक्षर हे त्यांचे वैशिष्ट्ये होते. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळी काही कारणास्तव त्यांना कॉलेज सोडावे लागले आणि ते सोडल्यानंतर आमच्या मातोश्री अतिशय कडक होत्या. शिक्षण अर्धवट सोडलेले त्यांना आवडत नसत हे तात्या साहेबांना माहीत असल्यामुळे त्यांनी कॉलेज सोडल्यानंतर लगेचच मुंबई गाठली. त्यांचे कोणतेही मित्र नव्हते ते राजकमल सूर्य मध्ये त्यांनी व्ही. शांताराम सोबत काम करत ते तिथेच जॉईन झाले आणि अनेक छोट्या मोठ्या कामात त्यांना सहकार्य करणे यात त्यांनी लक्ष घातले. काही काळानंतर आम्हीच सर्व भावडांनी आईकडे आग्रह केला की, त्यांना परत बोलवायला हवे आणि त्यांना बोलावले गेले आणि सबंध शेतीचा व्यवसाय त्यांनी सांभाळला. हे करत असताना माझी राजकारणात नुकतीच सुरुवात होती. मी नुकताच विधानसभेला उभ्या राहण्याच्या परिस्थितीत होतो. माझे वय तेव्हा २६ होते आणि आमदारकीची निवडणूक लढवायची ठरवली तर मोठे लोक विरोधक होते. तेथील एक साखर कारखाना पूर्ण ताकदीने माझ्या विरोधात उभा होता आणि त्यामुळे निवडणूक काही सोपी नव्हती. अनेकांनी ती निवडणूक हातात घेतली आणि त्यामुळे ते यश आले पण दुसऱ्या बाजूने तात्या साहेबांनी आणि आप्पा साहेबांनी माझ्या निवडणुकीची मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि घरोघर जाऊन लोकांना मला निवडून कसे आणता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निवडणुकांना एवढा खर्च होत नसेल परंतु जे काही व्हायचं ते संपूर्ण जबाबदारी तात्या साहेबांनी अर्थकारण हातात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने गाजावाजा न करता पार पाडली आणि मोठ्या मतांनी मला महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आणि त्यात अनेकांनी हातभार लावले परंतु तात्या साहेबांचे योगदान मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्यांचा स्वभाव हा माणसं जोडण्याचा स्वभाव होता ते सहकारी चळवळीत देखील काम करायचे. छत्रपती साखर कारखान्यात ते संचालक होते. कारखान्याच्या कामात त्यांचे अत्यंत बारकाईने लक्ष असायचे. शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक कशी करता येईल त्यात ते बारकाईने लक्ष द्यायचे आणि या पद्धतीने गावची ग्रामपंचायत असेल, गावातील अन्य संस्था असतील, गावातील साखर कारखाना असतील किंवा निवडणुकीतील माझ्यासारखे सहकारी असतील या सर्वांमागे प्रकर्षाने पाठिंबा देत उभे राहण्याचे कर्तव्य तात्या साहेबांनी उभ्या आयुष्यावर केली आणि हे करत असताना त्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही त्यांनी सतत आमचा विचार केला. माझ्यापेक्षा सुप्रियाचा अधिक विचार ते सतत करायचे आणि अशा प्रकारचे एकावेळी वेगळे स्वभावाचे ते व्यक्तिमत्व होते.
तात्या साहेबांचा मृत्यू ज्यावेळी झाला अक्षरशः त्याच मिनिटाला सुप्रियाच्या मुलाचा जन्म झाला त्याचे नाव विजय. विजयचा जन्म आणि तात्या साहेबांचा मृत्यू यांची वेळ एकच होती आणि त्यामुळे तात्यासाहेब गेले आणि विजयला पाहून असे वाटले की, तात्यासाहेब पुन्हा आमच्यातच आहेत. अशाप्रकारेची भावना आमच्या मनात सतत येते.
शारदा निकेतन ही संस्था मुलींसाठी मोठ्या प्रमाणात एक वेगळे काम करत आहे. जसे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने काम केले जाते तसे अतिशय चांगले काम शारदा निकेतन आणि कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये केले जाते. आज सुप्रिया जी संस्था चालवते त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी २५० मुला- मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांचे शिक्षण सबंध केले जाते याची जाहिरात कुठे केली जात नाही. आणि अशाच अनेक संस्था अजित आणि मी किंवा पवार कुटुंबीय चालवतात. उद्दिष्ट हेच आहे की, शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आणि व्यक्तिगत जीवनातील त्यांचे संकटे ज्ञानाच्या मार्फत दूर व्हावेत आणि त्यासाठीच अशा संस्था या काम करत आहेत. येणारी नवीन पिढी या संस्थेमुळे अनेक उत्तम कामे करू शकेल याची खात्री आज मला या ठिकाणी वाटत आहे.
ही शाखा काढण्याची एक पार्श्वभूमी आहे येथे एक सीनियर बझ नावाचा कारखाना होता या ठिकाणी तो येणार नव्हता. माझे एक मित्र होते ते आता हयात नाहीत त्यांचे नाव ललित थापर. ही त्यांचीच कंपनी होती. कागद तयार करण्याच्या क्षेत्रातील ते एक मोठे उद्योजक होते. मी त्यांना सांगितले, तुमचे कारखाने चंद्रपूरला, चंदिगड, मध्यप्रदेश, अशा मोठमोठ्या भागात आहेत तर माझ्या भागात देखील तुम्ही कारखाना काढला पाहिजे. हो-नाही म्हणत म्हणत आम्ही बैठका घेतल्या आणि विचार विनिमय करून ही कंपनी आम्ही येथे स्थापित केली आणि मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यात. पण त्यांच्या स्टाफने असे सांगितले की, येथे शिक्षणाची सोय नाही तर मग आमच्या मुला-मुलींनी करायचे काय ? तेव्हा आम्ही सांगितले की, सुरुवातीला बारामतीला विद्या प्रतिष्ठान येथे जाण्या येण्याची सोय आम्ही करू एवढेच नव्हे तर तुमची फी देखील भरू, तेव्हा त्यांनी सांगितले की, येथे देखील शिक्षण संस्था उभी करायला हवी तेव्हा या शिक्षण संस्थेचा येथे जन्म झाला. तेव्हा मी त्यांना शब्द दिला की, अशी शिक्षण संस्था काढून अशी भव्य इमारत उभारू की, लोक तेथे त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतील आणि मुलांची शैक्षणिक दृष्ट्या वाढ होईल. आम्ही त्याची खात्री दिल्यानंतर आज त्याची पूर्तता होत आहे याचा मला आनंद आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या इमारतीचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो आणि यातून उत्तम विद्यार्थी-विद्यार्थिनी तयार होतील, जीवनाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतील. आणि पुनःश्च तुमच्या सर्वांच्या साक्षीने शाळेचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो.
#pawarspeaks #sharadpawar #शरद पवार
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पदाधिकारी जाहीर सभेत उपस्थितांना मी संबोधित केले.
कधीकाळी आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या वेगळ्या अध्यक्षाची निवड केली आहे. फरक एवढाच आहे की तुम्ही ज्यांची निवड केली आहे ते तुरुंगात कधी गेले नव्हते. दुसऱ्या बाजूचे कुठे गेले होते हे मला माहित नाही तुम्हाला तो सगळा इतिहास माहिती आहे. आज पक्षाची ही बैठक आत्मविश्वास वाढवणारी आहे. आज आपल्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांनी आणला. मला खात्री आहे की सामान्य माणसाच्या अंत:करणात वसलेल्या खऱ्या राष्ट्रवादीचा विजय होईल. आपलं म्हणणं हे सत्यावर आधारित आहे हे लोकांच्या समोर येईल याची मला खात्री आहे. आज आपल्याला काम करताना एका बाजूला संघर्ष व दुसऱ्या बाजूला आपली सामान्य लोकांशी बांधिलकी आहे.
आज सबंध देशामध्ये कुणी काही म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जे जाऊ इच्छितात लोक त्यांच्या बरोबर नाही हे चित्र आहे. दिवसेंदिवस देशामध्ये भाजप कमी होत आहे हे चित्र दिसतंय त्याचं कारण असं की सत्तेचा गैरवापर. सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते. आज जे निर्णय घेतले जातात ते सगळे निर्णय सामान्य माणसाला शक्ती देणारी नाही. कायमस्वरूपी नोकरीची सामान्य माणसाची अपेक्षा असते मात्र कंत्राटी भरतीचा शासनाने निर्णय घेतला आहे. पोलीस देखील कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहेत, मी माझ्या राजकीय कारकिर्दीत कधीही असं ऐकलेलं नाही. पोलिसांना कंत्राटी पद्धतीने घेणं याइतकं चुकीचं काम कोणत्याही सरकारने आजवर केलेलं नाही ते भाजपा सरकारने केलं आहे. हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आज आपल्याला असे निर्णय घेणारे सरकार बदलण्याचा निर्णय घेतला पाहिजे. घातक निर्णय घेणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता ठेवणे हे योग्य नाही.
आज पोलिसांचा वापर पत्रकारांच्या घरांवर धाडी टाकण्यासाठी होतं. दिल्लीत केजरीवालांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर सुरू आहे. एखादा पक्ष जर असं काम करत असेल तर त्याच्याविरुद्ध एक सामूहिक शक्ती उभी केली पाहिजे. ती शक्ती उभी करण्याचं काम आपल्या पक्षाने आणि आमच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. आम्ही 'इंडिया' संघटन उभी केली आहे. या इंडियामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो आहोत म्हणजेच तुम्हीदेखील त्यात सहभागी आहात. आपण सर्वजण मिळून सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांविरुद्ध जागृती करून त्यांच्या हातून सत्ता काढून घेऊ आणि सामान्य माणसाच्या हातात सत्ता देऊ आणि देशाचे समाजकारण, राजकारण सुधरेल कसं? याची काळजी आपण घेऊ. हे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अखंडपणाने काम करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद !
#pawarspeaks #sharadpawar #ncp #राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष #राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
आज औरंगाबाद येथील जैन इरिगेशन समुदायास भेट दिली, त्यावेळी तेथील कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेण्याचा योग आला.
याप्रसंगी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जैन उद्योग समूहाचे अशोक भाऊ जैन, जळगाव जिल्हा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, संजय गरुड, श्रीमती वंदना चौधरी, दिगंबर पाटील, रंगनाथ काळे व इतर पदाधिकारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
#SharadPawar #PawarSpeaks









![pawarspeaks - 4] 4] - ShareChat pawarspeaks - 4] 4] - ShareChat](https://cdn4.sharechat.com/compressed_gm_40_img_510685_2e01784f_1700145507736_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=736_sc.jpg)


