
Dr Ramdas Athawale
@rathawale
MOS S&J GOI
REPUBLICAN PARTY OF INDIA ATHAWALE
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*रहिमतपुर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
*रहिमतपुर परिषदेच्या शताब्दी वर्ष सोहळयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आश्वासन*
सातारा दि. 05 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा जिल्हयातील रहिमतपुर येथे 5 मे 1926 रोजी तत्कालीन महार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रहिमतपुर येथे आले होते. रहिमतपूर मध्ये ते ज्या ठिकाणी थांबले होते तेथे भव्य समता स्तंभ उभारण्यात आलेला आहे. तेथे आज ना. रामदास आठवले यांनी भेट दिली.
5 मे 1926 रोजी रहिमतपुर येथे ही परिषद महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी जनजागृतीचा मानवमुक्तीचा लढा सुरु केला, त्याचा भाग म्हणून महार परिषद रहिमतपुर येथे 5 मे 1926 रोजी घेण्यात आली होती. त्यास 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दीपूर्ती महोत्सव आज रहिमतपुर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रहिमतपुरच्या या समता स्तंभाजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज दिले. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापु गायकवाड, भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रलेखा माने, रहिमतपुरच्या नगराध्यक्ष वैशाली माने ; मयुर बनसोडे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची आहे. त्यानुसार रहिमतपुरमधील महार परिषदेच्या शताब्दी वर्षानिमीत्त रहिमतपुरच्या समता स्तंभाजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडुन मदत मिळवून देऊ. याठिकाणी भव्य भिम स्मारक उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले दिले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारताचे संविधान जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. सर्व जाती धर्मियांचे संविधान आहे. सर्वाना न्याय देणारे संविधान आहे. या संविधानाला ज्यांनी कोणी बदलण्याचा विचार करू शकत नाही. जर बदलण्याचा कोणी विचार केला तर त्यांना आमची आंबेडकरी जनता फाडुन टाकल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष हा देशभर मी पोहचवला आहे, नागालॅन्ड आणि मणिपुरमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यांमध्ये 6 टक्के मते मिळाली तर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेचा दर्जा मिळेल. सध्या देशात भाजप, कॉग्रेस, बसपा आणि आम आदमी पार्टी हे प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत. पाचवा राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला अधिकृत मान्यता मिळेल. असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
सता-यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री भिमाई यांचे स्मारक सातारा येथे आहे.. सातारा जिल्हा आंबेडकरी चळवळीसाठी ऐतिहासिक आहे.
5 मे 1926 ला रहिमतपूर येथे आयोजित केलेल्या महार पषिदेला आज शंभर वर्ष होत आहेत. या शताब्दी वर्षानिमीत्त रहिमतपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीची चळवळ उभी केली, त्यांना दलित सवर्ण हा जातीभेद मिटवायचा होता. जातीभेद मिटवुन सामाजिक ऐक्य साधणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्दीष्ट होते. जातीभेद निर्मुलन करुन समाजात समता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता. तीच प्रेरणा घेऊन आपणही काम करीत आहोत, समाजात जातीभेद नष्ट करुन सामाजिक समता, दलित सवर्ण हा भेद मिटवुन सामाजिक एकजुट उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE #Politics.... ###Politics ##Breakingnews #follow
#Politics.... ###Politics #follow ##Breakingnews #RAMDASATHAWALE
संस्कृति मानव सेवा संस्थान और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष अशोक कुमार भाटी गुजरात अध्यक्ष साथ ही महिला अध्यक्ष लीलावती बहन वाघेला उपाध्यक्ष धीरूभाई भाटिया सहयोगी हितेश भाई कश्यप अन्य आरपीआई के सहयोगी की उपस्थिति में 14 अप्रैल बाबा साहब के जन्म तिथि पर एक कार्यक्रम रखा गया. हमारी संस्था संस्कृति मानव सेवा संस्थान 2013 से सभी दिव्यांगों के लिए कार्यरत है रोजगार के लिए प्रशिक्षण देना शिक्षा के लिए सहयोग करना जरूरतमंद महिलाओं को जरूरी वस्तुएं उपलब्ध कराना तथा हाइजीनिक किट जो कोरोना कल से महीने में एक या दो बार निरंतर यह वितरण चालू है इसमें संस्था का उद्देश्य यह है की सभी लोग साफ सफाई का ध्यान रखें, सुरक्षित रहें और अपने स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए सहयोग करें संस्था का उद्देश्य हमेशा से यह रहा है कि दिव्यांग कोई भी भाई-बहन भीख ना मांगे किसी पर निर्भर ना रहे वह खुद अपने पैरों पर खड़ा होकर स्वरोजगार के लिए प्रेरित होकर स्वाभिमान के साथ समाज में जिए 1200 मेंबर संस्था के जो की अलग-अलग शारीरिक तकलीफ के साथ जीवन यापन कर रहे हैं संस्था हर महीने किसी न किसी तरह का उनके लिए सहयोग करती है वर्कशॉप ट्रेनिंग सेंटर तथा रोजगार के साधन उपलब्ध कराती है खुशखबरी यह है संस्था की संस्थापक डॉ रितु सिंह जिन्होंने अभी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को काउंसलर के रूप में पद संभाला है और एक आरपीआई की नई शाखा थलतेज विस्तार में अशोक जी के हाथों से उद्घाटन कराई गई है जिससे सभी दिव्यांगजन जरूरतमंद ऑफिस में आकर अपनी समस्या के लिए वक्त वक्त पर आरबीआई के अध्यक्ष के साथ वार्तालाप करके अपनी समस्या को रख सकते हैं आरबीआई के अध्यक्ष श्री रामदास आठवले जी सोशल वेलफेयर के मिनिस्टर हैं इसलिए हमारे दिव्यांग जनों को उनसे उम्मीद है कि उनकी समस्याओं को आरपी आई के द्वारा सुना जाएगा और कोई रास्ता निकलेगा बाबा साहब की जन्मदिवस की स्मृति में यह उद्घाटन अशोक जी के हाथों कराया गया है जिसके फोटो संलग्न है ###Politics #RAMDASATHAWALE ##Breakingnews #☸️जय भीम #follow
*काश्मीर मध्ये रिपब्लिकन पक्षाची नदीपात्रात सभा*
केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी जम्मू काश्मीर दौऱ्यात काश्मीर मधील श्रीनगर; कुलगाम; अनंतनाग या जिल्ह्यांत तीन मोठ्या सभांना संबोधित केले.या भागात अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे; रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय भीम चे निळे मफलर घालून काश्मीर मध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण दिसत होते.कुलगाम मधील येशो नदीपात्रात रिपब्लिकन पक्षाच्या सभेला मोठी गर्दी जमली होती.नदीच्या दुतर्फा गाव असून रहदारी साठी नदीवर पूल नाही.नदीवर पूल बांधावा.जम्मू काश्मीर च्या राज्य सरकार पेक्षा आमचा केंद्र सरकार वर अधिक विश्वास असल्याचे सांगत येथील स्थानिकांनी नदीवर पूल बांधण्याचे निवेदन ना. रामदास आठवले यांना दिले.यावेळी रिपब्लिक पक्षाचे जम्मू काश्मीरचे प्रमुख नेते मन्सूर खान आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ##Breakingnews #RAMDASATHAWALE #☸️जय भीम #follow #Politics....
#☸️जय भीम ##Breakingnews #RAMDASATHAWALE #follow
#RAMDASATHAWALE ###Politics #follow ##Breakingnews #Politics....
##Breakingnews #follow ###Politics #RAMDASATHAWALE #Politics....
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*द्रमुक सरकार उलथवुन टाका - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
*तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*
कोईमतुर/मुंबई दि. 09 - तामिळनाडु विधानसभेच्या एकुण 234 जागांपैकी 18 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असून उर्वरित 216 जागांवर एनडीएला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाचा दृष्टीकोन दक्षिणेतील जनतेलाही पटलेला आहे. एनडीए सरकारने देशाचा वेगाने केलेला विकास पाहुन दक्षिणेतही एनडीएचा महाविजय होणार आहे. अभिनेते विजय यांनी तामिळनाडुत सर्व जागांवर उमेदवार उतरविल्याने मतविभागणीचा लाभ भाजप आणि एनडीएला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तामिळनाडुतील स्टॅलिन यांचे द्रमुक सरकार उलथवुन टाका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
कोईमतुर जिल्हयातील त्रिपुर नॉर्थ विधानसभा मतदारसंघाच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला उमेदवार के. कार्तिकादेवी यांच्या निवडणुक प्रचार रॅलीला संबोधीत करतांना ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तामिळनाडु प्रदेशाध्यक्ष फादर एन सुसाईआणि अनेक रिपब्लिक पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे दोन दिवसांच्या तामिळनाडु दौ-यांवर आले असून आज त्यांनी कोईमतुर आणि नामक्कल जिल्हयातील विविध मतदार संघात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा तसेच भाजप प्रणित एनडीए उमेदवारांचा प्रचार केला. रिपब्लिकन पक्षाच्या तामिळनाडुमध्ये 18 उमेदवारांमध्ये 5 उमेदवार हे अनुसुचित जातीचे 11 उमेदवार हे इतर मागास वर्गातील असुन 2 उमेदवार हे मुस्लिम आहेत.
तामिळनाडु हे दक्षिणेतील महत्वाचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए यंदा तामिळनाडु, पाँडेचेरी आणि केरळ या सर्व राज्यांवर विजय मिळवुन एनडीएचा दक्षिण विजय निश्चत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 57 कोटी लोकांचे बँक खाते खोललेले आहे. 50 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा लाभ दिला आहे. 6 कोटी लोकांना उज्वला योजनेद्वारे सिलेंडर गॅस दिलेला आहे. 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेला आहे. देशभरातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेली आहे. देशभरातील अनेक रस्ते चांगले करण्यात आलेले असून देशाची आर्थिक व्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आलेली आहे. देशात विकास झपाटयाने होत आहे. भारताचे उपराष्ट्रपती असणारे सी.पी. राधाकृष्णन हे तामिळनाडुचे सुपुत्र आहेत. तामिळनाडुच्या जनतेला तामिळनाडुचे सुपुत्र उपराष्ट्रपती झाल्याचा अभिमान आहे. तामिळनाडुच्या यंदाच्या निवडणुकीत विजय या सुपरस्टार अभिनेत्याने आपल्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे केले आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात मताची विभागणी होणार आहे. याचा लाभ एनडीए ला होणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
मोदींनी अनेक चांगल्या योजना राबविल्यामुळे देशाचा विकास होत आहे. देशाच्या विकासाचे राजकारण जनतेला आवडणारे असल्याने तामिळनाडुत जनता यंदा एनडीएला महाविजय मिळवुन देईल. असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
महिलांना संसदेत राजकीय आरक्षण देणारे महिला विधेयक संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंजुर करणार असून महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे हे विधेयक आहे. त्यामुळे देशभरातील महिला या विधेयकावर खुष आहेत. तामिळनाडुतील महिला सुध्दा या विधेयकामुळे आपल्या मतांचे दान एनडीए उमेदवारांना देतील. त्यामुळे तामिळनाडुमध्ये एनडीएचा महाविजय होईल.यंदाच्या निवडणुकीत द्रमुक चा निश्चित पराभव होईल असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #follow #RAMDASATHAWALE ##Breakingnews #☸️जय भीम #Politics....
#RAMDASATHAWALE ##Breakingnews #☸️जय भीम #Politics.... #follow








