🚩🌹🌹🚩
सार्थ तुकाराम महाराज गाथा
अभंग क्र.३६४८
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥
लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥
औदार्याची सीमा । काय वर्णु रघुरामा ॥२॥
तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥३॥
अर्थ
प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करुन त्याचा भवसागरातील सर्व उपाधींचा संबंधच तोडून टाकला. लंकेच्या राज्यावर बिभिषणाला बसविले व त्याची तेथे चिरकाल स्थापना केली. हे रघुरामा तुझ्या औदार्याची सीमा काय वर्णन करावी. तुकाराम महाराज म्हणतात, “माझा दाता प्रभू श्रीरामचंद्र याने सीतामातेला लंकेतून सोडविले.”
संत तुकाराम महाराज
🚩🙏🚩 #🌻आध्यात्म 🙏