Sachin
ShareChat
click to see wallet page
@schn30
schn30
Sachin
@schn30
जय भवानी जय शिवाजी
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१० फेब्रुवारी इ.स.१६६५* सिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडुन जिंकली व या दिवशी होळी पोर्णिमा होती. *शिवरायांनी* 1659 मध्ये *शामरावपंत पेशवे* यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सिद्दीला नामशेष करण्यासाठी मोठी फौज पाठविली मात्र या मोहिमेत मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. १६६१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली. *१० फेब्रुवारी इ.स.१७६१* पानिपत युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला जातो. पानिपतावर प्रत्यक्षात झालेल्या युध्दानंतर विजयी ठरलेल्या अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला होता ते पहा.. तह करण्यास अहमदशाह अब्दाली आतुर होता. त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्याच्या आत म्हणजेच नानासाहेबांस वकीला मार्फत पोषाख पाठवून दिला होता. सदरचे दिनांक १० फेब्रुवारी सन १७६१ रोजीचे पत्र छायाचित्रात दिले आहे. आता यातूनच लक्षात येते की पानिपतावरील पराभावानंतरही मराठ्यांचा उत्तरेत किती प्रभाव होता ते... अनेकदा दिल्ली लुटणारा, बादशहास पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्याने डगमगला हे निश्चितच. सरदारक्या आणि जहागीरी वाचविण्यासाठी बायका - मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठे नाहीत. उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणाक्ष अब्दालीस चांगलेच उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तात्काळ हालचाल केली. १० फेब्रुवारी इ.स.१७७१ हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहण्यासारखा दिवस आहे या दिवशी महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे ) यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला आणि छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले. १० फेब्रुवारी इ.स.१८१८ अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - CNilc NETqIT प्रतिष्ठान Swanard[9594440978  CNilc NETqIT प्रतिष्ठान Swanard[9594440978 - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *९ फेब्रुवारी इ.स.१६६५* छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदीलशहाचे "बिदनूर" शहरावर छापा टाकला महाराजांनी बिदनूरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली होती. राजांनी नौकानयन करून सागर उल्लंघू नये ही हिंदू धर्माची खुळचट रूढी उधळून लावली. शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मान करत होते पण धर्मातील खुळचट रूढी परंपरांना आपल्या चरीत्रात मुळीच थारा दिला नाही. *९ फेब्रुवारी इ.स.१६७०* "छत्रपती शिवराय" व "पोर्तुगीज" याच्यात तह झाला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - TUIIF प्रतिष्ठान @shiv vichar pratistham TUIIF प्रतिष्ठान @shiv vichar pratistham - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *८ फेब्रुवारी इ.स.१६६५* छत्रपती शिवरायांची मालवण बंदराची पहिली सागरी मोहीम.       छत्रपती शिवरायांची पहिली आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बिदनूर या श्रीमंत शहराच्या दिशेने निघाली. स्वताचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमार स्वारी कर्नाटकमधील बिदनूरवर काढली. या मोहीमेकरता मालवण बंदरातून ८५ जहाँजे ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वता या सागरी सेनेचे नेतृत्व केले. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती. शिवचरित्रात या बसरूर च्या स्वारीचे मोठे ऐतिहासीक महत्व आहे कारण या स्वारीनंतर महाराजांनी कोणत्याही आरमारी मोहिमेचे स्वतः नेतृत्व केलेले इतिहासात नमूद नाही बसरूर ची ही मोहीम शिवचरित्र्यातील पहिली व शेवटची मोहीम ठरली प्रसिद्ध शिवचरित्राचकार शेजवलकर या मोहीमेचे महत्व सांगताना लिहितात "महाराजांच्या बसरूर च्या एकमेक आरमारी पर्यटनांनंतर पुनः कोणत्याही मराठी राजाने तरवांतून स्वारी केलेली नमूद नाही एकट्या महाराजांचेच लक्ष हिंदी राजांना अपरिचित अशा नूतन संरक्षण साधनाकडे पहिल्याने वळले व त्याचा यथाशक्य उपयोग करून घेण्याची तयारी त्यांनी चालवली यात त्यांच्या मोठेपणाचा एक पैलू दृष्टीस पडतो शिवचरित्र्यातील अफझलखान वध शाहिस्तेखानावरील छापा यांसारखे महाराजांचे प्रसिद्ध पराक्रम सर्वानाच परिचित आहेत त्या मानाने तेवढेच महत्व असणारा सागरांवरील हा पराक्रम उपेक्षित च राहिला विशेष म्हणजे आपले लोक बसरूर ची लूट केली असा इतिहास सांगतात आणि बसरूर चे लोक या दिवसाला स्वातंत्रोत्सव साजरा करतात असे बरेच पराक्रम आहेत जे अजून सामान्य लोकांना माहीत नाहीत आम्ही *#शिवविचार_प्रतिष्ठान* च्या माध्यमातून असे सर्व पराक्रम आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आपले अभिप्राय नक्की कळवा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - 9 शिवावचार प्रतिष्ठान 9 शिवावचार प्रतिष्ठान - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *७ फेब्रुवारी इ.स.१६५८* भोरप किल्लावर मराठ्यांनी हल्ला करून तो स्वराज्यात आणला. तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूर दरबाराच्या ताब्यात होता तळ  कोकणावरील घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला स्वराज्यात आणला  त्याच बरोबर भोरप किल्ल्या जवळील आसपासचा मुलूख स्वराज्याला जोडला गेला. *७ फेब्रुवारी इ.स.१६९८* झुल्फिकारखान नुसरतजंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला. धनाजी जाधव हे मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होते पण वेढा काही ढिला पडत नव्हता. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला. शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही. ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - शिवविचार  ಒrdr शिवविचार  ಒrdr - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *६ फेब्रुवारी इ.स.१६८१* छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर खान जहान बहादुरने दारूगोळा व् सैन्याची बादशहाकडे मागणी केली. *किल्ले रामसेज घेण्यासाठी.* *६ फेब्रुवारी इ.स.१९३९* सामाजिक भान असलेले भारतातील शेवटचे राजे खरा खुरा लोकराजा लोकपाळ सयाजीराजे गायकवाड यांच्या स्मृतिदिनानीमित्त अभिवादन जय शिवराय ।     जय शंभूराजे। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - খিরণতা पतिष्ठान খিরণতা पतिष्ठान - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *५ फेब्रुवारी इ.स.१६६४* *नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान.* *६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत मधून वसुली केली बाद्शःची  सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी  राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.* *लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन  मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी  महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा  मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली  नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची  त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी  मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर  कोसळले. तो दिवस होता ५ फेब्रुवारी १६६४.* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - शिचविचार प्रतिष्ठान शिचविचार प्रतिष्ठान - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *#नरवीर_तानाजी_मालुसरे* *#_गड आला पण सिंह गेला...🚩* नरवीर तानाजी मालुसरे आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर! सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना नरवीर तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली. तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, ......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव . ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले. पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्याचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे. रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे. अश्या या शूर नरविराचे अजरामर ठेवून तानाजीच्या नावे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. तसेच यांच्या कार्याची दखल सिने सृष्टीने देखील आपल्या माध्यमातून भारतभर आणि जगभर पोहचवण्याचे कार्य केले आहे ते अश्या प्रकारे.. दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील #सुभेदार मराठी चित्रपट 2023 मध्ये आला "तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, सुभरदारांच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत. यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. अश्या या शूर नरवीरास त्रिवार वंदन...🚩_ #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - ShareChat
00:12
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३ फेब्रुवारी इ.स.१६६१* छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव करून राजगडावरुन कोकणाकडे प्रस्थान केले. *३ फेब्रुवारी इ.स.१६८९* मुघल सरदार मुकर्रबखान कोकणातील संगमेश्वरला पोचला व स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे त्याच्या कैदेत आले. *३ फेब्रुवारी इ.स.१८३२* नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणा-या या आद्य क्रांतीवीराला त्रिवार मुजरा." #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - शिवविचार प्रतिष्ठान शिवविचार प्रतिष्ठान - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२ फेब्रुवारी इ.स.१६६१* मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे चौल पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहीस्तेखानाच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी छत्रपती शिवरायांनामिळाली कारतलबखान हा उंबरखिंडीतून नागोठण्याला उतरणार होता खानासोबत माहूरची प्रख्यात देशमुखीन "सावित्रीबाई उदारामउर्फ पंडीता रायबागन" ही शूर स्त्री देखील होती महाराज मावळ्यांना घेऊन आधीच उंबर खिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहीले. खान आला पण त्याने शिवरायांचा परत जायचा आदेश धुडकावून लावला मग मराठ्यांनी मुघलांवर हल्ला चढवला मुघलांची भयंकर लंगडतोड चालू झालीत्यांना त्या घोर जंगलात लढताही येईना व पळताही येईना, या अरण्याचे नाव "तुंगारण्य". अखेर खान शरण आला, त्याचा प्रचंड पराभव झाला. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलबखान कसाबसा जीव वाचवून पुण्यात परतला. *२ फेब्रुवारी इ.स.१६८२* छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदारांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला... #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - RLE प्रतिष्ठान RLE प्रतिष्ठान - ShareChat
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१ फेब्रुवारी इ.स.१६७६* छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला. *१ फेब्रुवारी इ.स.१६८९* मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा व आऊसाहेब जिजाऊंचा शंभूबाळ, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज दक्षिण कोकणातील "संगमेश्वर" येथे मुघलांकडून कैद झाले. आणि इथूनच सुरूवात झाली ती शंभूराजांवर अमानुष अत्याचाराची. औरंगजेबने अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे संभाजीराजांचे हाल केले व पुढे ११ मार्च १६८९ रोजी त्यांची हत्या केली *१ फेब्रुवारी इ.स.१६८९* धुरंदर "संताजी घोरपडे" यांचे वडील "मालोजी घोरपडे" हेछत्रपती संभाजी महाराजांना पकडताना झालेल्या वादात मुघलांकडून मारले गेले. सरसेनापती "हंबीरराव मोहीते" यांच्या निधनानंतर संभाजीराजेंनी "मालोजी घोरपडे" यांना सरसेनापतीपद दिले होते. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🚩जय भवानी जय शिवाजी🚩 - RIIr प्रतिष्ठान 4^  धप्वो रभाता HaRbC OsmPiccom RIIr प्रतिष्ठान 4^  धप्वो रभाता HaRbC OsmPiccom - ShareChat