*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ फेब्रुवारी इ.स.१६७९*
शके १६००, कालयुक्त संवछरे पौष शुद्ध १०, दशमी
युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या छावणीत! सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्यांना कळवितात, "दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा विजय मिळविला आहे. सर्वात छत्रपती शिवाजी महाराजांची मनःशांती अधिक ढवळणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचा ज्येष्ठ पुत्र युवराज शंभुराजे बादशाही सरदार दिलेरखान यांच्याकडे गेले." 'याची नोंद मल्हार रामराव चिटणीस, बुसातिनुस्सलातीन, विजापुरची अदिलशाही, इंग्रज, भीमसेन सक्सेना, जेधे शकावली, या सर्वांनी घेतली असली तरी महाराजांचा अभ्यास करताना असे निदर्शनास येते की, "युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या गोटात जाणे म्हणजे महाराजांचेच राजकारण होय". युवराज संभाजीराजे दिलेरखानापासी गेले. दिलेरखानाने त्यांसी ७,०००, हप्त (सप्त) सात हजारी मनसब दिली व सन्मान केला. (जेधे शकावली कारण देत नाही.)
*१७ फेब्रुवारी १६८९*
छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुरुवात. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ फेब्रुवारी इ.स.१६६३*
*छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले.
*१७ फेब्रुवारी इ.स.१६८९*
*छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुरुवात. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१६ फेब्रुवारी इ.स.१६३५*
*मुघल सरदार "शाहीस्तेखान" हा २०००० ची फौज घेऊन जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निघाला.
*१६ फेब्रुवारी इ.स.१६५९*
*छत्रपती शिवरायांनी कोकणातील "चाफळ" जिंकले.
*१६ फेब्रुवारी इ.स.१६८१*
*१६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. राजे सिंहासनाधीश्वर झाले. छत्रपती संभाजी महाराज रणांगनात जितके कठोर होते तितकेच ते स्वराज्यात होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधातही कठोर होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात राजधानी रायगडवरुन त्यांनी कवी कलशाकरवि काही महत्वाचे न्यायनिवाड़े केले. त्यातून त्यांच्यातील न्यायप्रिय राजगुण उठून दिसतो. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
#🔱महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🕉️ *#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#महाशिवरात्री🙇🏻♂️🚩*
शि व सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शि व अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शि व ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शि व भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.
*ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥*
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१४ फेब्रुवारी इ.स.१६६५*
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत
१३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले.
*१४ फेब्रुवारी इ.स.१६६६*
औरंगजेब आग्रा येथे पोहोचला. शहाजहानच्या म्रृत्यू मुळे जनता मात्र शोकाकूल झाली. शोक-संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती. पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही. २० साबानला औरंगजेब बादशहा आग्रा येथे पोहोचला.
*१४ फेब्रुवारी इ.स.१६७१*
दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली!
होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवून साजरा करीत असत. या वेळची शिकार होती मेहेरुफ-ए-जंजीरा याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज किल्ले रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिरा किल्ल्यातच गुंतले होते. जंजिरा किल्ल्याच्या आजुबाजूचा दंडाराजपुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम सिद्धी याकुत व सिद्धी खैरियत यांनी सुद्धा दंडाराजपुरी मराठ्यांच्या कडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्र मार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली
दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला.
*१४ फेब्रुवारी सन १६७९-८०*
चोपड्याहून सुरतेस लिहिलेल्या पत्रातील माहिती अशी " शिवाजीच्या सैन्याने हा प्रदेश लुटून व जाळून फस्त केला आहे ज्या शहराचे लोक त्यास चौथाई देण्याचे कबूल करतात त्या लोकास शिवाजी कोणत्याही प्रकारचा उपसर्ग देत नाही. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१३ फेब्रुवारी इ.स.१६६०*
राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी
"हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे..
त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.....
"शिवाजी हिंदुसेनाधीपती"
म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.
*१३ फेब्रुवारी इ.स.१६६०*
छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला
*१३ फेब्रुवारी इ.स.१६७२*
छत्रपती शिवराय विश्रांतीसाठी रायगड ला मुक्कामी आले #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१२ फेब्रुवारी इ.स.१६८९*
छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे 7 वर्षाचे होते व राजाराम महाराज हे 18-19 वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !
अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय
*१२ फेब्रुवारी इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*११ फेब्रुवारी इ.स.१६५९*
*छत्रपती शिवराय* अखंड हिंदुस्थानातील पाहिले आरमार निर्माते. *' राजपुरीचे सिद्दी घरात जैसा उंदीर तैसा शत्रू '* सिद्दीबरोबर इंग्रज पोर्तुगीज या दगलबाज शत्रूचे आव्हान स्वीकारून आजच्या दिवशी *शिवछत्रपतींनी* कल्याण भिवंडीच्या खाडीत मराठी आरमाराच्या उभारणीस शुभारंभ केला एवढा मोठा दिल्लीचा बादशहा पण तोही समुद्रावर हतबल होता तिथे एक छोट्याश्या मराठा राजाने समुद्रावर आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या दिशेने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल होते. सुरुवातीच्या काळात या कामात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या मदतीने हे काम चालू केले पोर्तुगीजांना हळूहळू याचा धोका वाटू लागला. तेव्हा त्यांनी मदत करायचे बंद केले पण तोपर्यंत मराठे या जहाँजबांधणी च्या कामात तरबेज झालेले पुढील काळात मराठा आरमार एवढे शक्तिशाली झाले त्यावर युरोपियन डग्लस म्हणतो *' It Was Great Mercy That Shivaji Was Not A Sea-Man ; Otherwise He Might Have Swept The Sea As He Did The Land With The Besom Destruction*
यातून च *#शिवछत्रपतींची* दहशत काय होती ते कळते
*११ फेब्रुवारी इ.स.१६८१*
किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना.
मराठ्यांनी "धरणगाव" मध्ये वसुली केली #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१० फेब्रुवारी इ.स.१६६५*
सिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडुन जिंकली व या दिवशी होळी पोर्णिमा होती.
*शिवरायांनी* 1659 मध्ये *शामरावपंत पेशवे* यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सिद्दीला नामशेष करण्यासाठी मोठी फौज पाठविली मात्र या मोहिमेत मराठ्यांना पराभव पत्करावा लागला.
१६६१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता.
त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.
*१० फेब्रुवारी इ.स.१७६१*
पानिपत युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला जातो. पानिपतावर प्रत्यक्षात झालेल्या युध्दानंतर विजयी ठरलेल्या अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला होता ते पहा..
तह करण्यास अहमदशाह अब्दाली आतुर होता. त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्याच्या आत म्हणजेच नानासाहेबांस वकीला मार्फत पोषाख पाठवून दिला होता. सदरचे दिनांक १० फेब्रुवारी सन १७६१ रोजीचे पत्र छायाचित्रात दिले आहे.
आता यातूनच लक्षात येते की पानिपतावरील पराभावानंतरही मराठ्यांचा उत्तरेत किती प्रभाव होता ते... अनेकदा दिल्ली लुटणारा, बादशहास पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्याने डगमगला हे निश्चितच.
सरदारक्या आणि जहागीरी वाचविण्यासाठी बायका - मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठे नाहीत. उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणाक्ष अब्दालीस चांगलेच उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तात्काळ हालचाल केली.
१० फेब्रुवारी इ.स.१७७१
हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहण्यासारखा दिवस आहे या दिवशी महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे ) यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला आणि छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले.
१० फेब्रुवारी इ.स.१८१८
अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला
सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले.
या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*९ फेब्रुवारी इ.स.१६६५*
छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदीलशहाचे "बिदनूर" शहरावर छापा टाकला महाराजांनी बिदनूरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली होती. राजांनी नौकानयन करून सागर उल्लंघू नये ही हिंदू धर्माची खुळचट रूढी उधळून लावली. शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मान करत होते पण धर्मातील खुळचट रूढी परंपरांना आपल्या चरीत्रात मुळीच थारा दिला नाही.
*९ फेब्रुवारी इ.स.१६७०*
"छत्रपती शिवराय" व "पोर्तुगीज" याच्यात तह झाला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज













