*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*७ फेब्रुवारी इ.स.१६५८*
भोरप किल्लावर मराठ्यांनी हल्ला करून तो स्वराज्यात आणला.
तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूर दरबाराच्या ताब्यात होता तळ कोकणावरील घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला स्वराज्यात आणला त्याच बरोबर भोरप किल्ल्या जवळील आसपासचा मुलूख स्वराज्याला जोडला गेला.
*७ फेब्रुवारी इ.स.१६९८*
झुल्फिकारखान नुसरतजंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला. धनाजी जाधव हे मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होते पण वेढा काही ढिला पडत नव्हता. छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला. शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही. ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*६ फेब्रुवारी इ.स.१६८१*
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर खान जहान बहादुरने दारूगोळा व् सैन्याची बादशहाकडे मागणी केली. *किल्ले रामसेज घेण्यासाठी.*
*६ फेब्रुवारी इ.स.१९३९*
सामाजिक भान असलेले भारतातील शेवटचे राजे खरा खुरा लोकराजा लोकपाळ सयाजीराजे गायकवाड यांच्या स्मृतिदिनानीमित्त अभिवादन
जय शिवराय ।
जय शंभूराजे।
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*५ फेब्रुवारी इ.स.१६६४*
*नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान.*
*६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत मधून वसुली केली बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.*
*लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. तो दिवस होता ५ फेब्रुवारी १६६४.* #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#नरवीर_तानाजी_मालुसरे*
*#_गड आला पण सिंह गेला...🚩*
नरवीर तानाजी मालुसरे
आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर!
सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.
स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना नरवीर तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.
तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.
शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,
......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .
ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत
तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्याचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.
रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.
अश्या या शूर नरविराचे अजरामर ठेवून
तानाजीच्या नावे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.
तसेच यांच्या कार्याची दखल सिने सृष्टीने देखील आपल्या माध्यमातून भारतभर आणि जगभर पोहचवण्याचे कार्य केले आहे ते अश्या प्रकारे..
दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील #सुभेदार मराठी चित्रपट 2023 मध्ये आला
"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, सुभरदारांच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.
यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता.
अश्या या शूर नरवीरास त्रिवार वंदन...🚩_ #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३ फेब्रुवारी इ.स.१६६१*
छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव करून राजगडावरुन कोकणाकडे प्रस्थान केले.
*३ फेब्रुवारी इ.स.१६८९*
मुघल सरदार मुकर्रबखान कोकणातील संगमेश्वरला पोचला व स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे त्याच्या कैदेत आले.
*३ फेब्रुवारी इ.स.१८३२*
नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.
पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणा-या या आद्य क्रांतीवीराला त्रिवार मुजरा." #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२ फेब्रुवारी इ.स.१६६१*
मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे चौल पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहीस्तेखानाच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी छत्रपती शिवरायांनामिळाली कारतलबखान हा उंबरखिंडीतून नागोठण्याला उतरणार होता खानासोबत माहूरची प्रख्यात देशमुखीन "सावित्रीबाई उदारामउर्फ पंडीता रायबागन" ही शूर स्त्री देखील होती महाराज मावळ्यांना घेऊन आधीच उंबर खिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहीले. खान आला पण त्याने शिवरायांचा परत जायचा आदेश धुडकावून लावला मग मराठ्यांनी मुघलांवर हल्ला चढवला मुघलांची भयंकर लंगडतोड चालू झालीत्यांना त्या घोर जंगलात लढताही येईना व पळताही येईना, या अरण्याचे नाव "तुंगारण्य". अखेर खान शरण आला, त्याचा प्रचंड पराभव झाला. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलबखान कसाबसा जीव वाचवून पुण्यात परतला.
*२ फेब्रुवारी इ.स.१६८२*
छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदारांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला... #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१ फेब्रुवारी इ.स.१६७६*
छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला.
*१ फेब्रुवारी इ.स.१६८९*
मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा व आऊसाहेब जिजाऊंचा शंभूबाळ, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज दक्षिण कोकणातील "संगमेश्वर" येथे मुघलांकडून कैद झाले. आणि इथूनच सुरूवात झाली ती शंभूराजांवर अमानुष अत्याचाराची. औरंगजेबने अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे संभाजीराजांचे हाल केले व पुढे ११ मार्च १६८९ रोजी त्यांची हत्या केली
*१ फेब्रुवारी इ.स.१६८९*
धुरंदर "संताजी घोरपडे" यांचे वडील "मालोजी घोरपडे" हेछत्रपती संभाजी महाराजांना पकडताना झालेल्या वादात मुघलांकडून मारले गेले. सरसेनापती "हंबीरराव मोहीते" यांच्या निधनानंतर संभाजीराजेंनी "मालोजी घोरपडे" यांना सरसेनापतीपद दिले होते. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३१ जानेवारी इ.स.१६६१*
कारतलब खानाच्या बंदोबस्तासाठी छत्रपती शिवराय रायगडावर निघाले.
*३१ जानेवारी इ.स.१६६३*
*छत्रपती श्री शिवरायांनी शामराजपंतांना पत्र पाठवले.*
स्वराज्यात असलेला बुलंद म्हणजे सिंहगड.शाहीस्तेखानाने गडावर फितुरी माजवून गड ताब्यात घेण्याची योजना आखली अशी बातमी छत्रपती शिवरायांना समजली. सिंहगड हातचा जाणे म्हणजे पुणे प्रांतच गमवून बसणे. यासाठी छत्रपती श्री शिवराय अस्वस्थ झाले व त्यांनी शामराजपंतांना गडाबाबत काळजी व धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र पाठवले. शामराजपंतांनी तातडीने हालचाल केल्यामुळे सिंहगड शाहीस्तेखानाच्या घशात जाऊ शकला नाही.
*३१ जानेवारी इ.स.१८१९*
वीर नोवसाजी मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्धसमाप्ती -
हे नोवाहचे युध्द दिनांक ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले. "१९ तारखेच्या रात्री १० वाजता नोवसाजीच्या सैन्यातील २०० घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते, लेफ्टनंट सुथरलैंड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले, आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले."निजामाच्या ५,००० सैन्याविरुद्ध हाटकरानी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अतिजखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. तसेच, हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टीकोनातुन हे युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. ३१ जानेवारी १८१९ ला हाटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*३० जानेवारी इ.स.१६४२*
महाराज शहाजी राजे कर्नाटकास जातातमाहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजी राजांना लिहीले आहे.
*३० जानेवारी इ.स.१६८०*
इंग्रज सैन्याने छत्रपती शिवरायांपुढे शरणागती पत्करली.
*३० जानेवारी इ.स.१६८१*
छत्रपती शंभूराजांनी "बुऱ्हाणपूर" शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली. यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले.
*३० जानेवारी इ.स.१७१५*
*कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह*
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली.
मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. १७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात
१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.
२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२९ जानेवारी इ.स.१६५७*
बीदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला.
*२९ जानेवारी इ.स.१६६७*
छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या.किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले.
*२९ जानेवारी इ.स.१६७०*
*मराठ्यांचा मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेर जवळील "सुलतानगड" वर हल्ला. सुलतानगड स्वराज्यात आला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज












