*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१८ एप्रिल इ.स. १६७४*
छत्रपती शिवरायांनी हंबीरराव मोहिते मामांना सरसेनापती नेमले १८ एप्रिल रोजी ते सैन्यात सरसेनापती म्हणून रुजू झाले
*१८ एप्रिल इ.स.१६७७*
त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन..
*१८ एप्रिल इ.स.१७०३*
महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिथ बराच काळ राहिला.
*१८ एप्रिल इ.स.१७७४*
गंगाबाईंच्या पोटी पेशवे सवाई माधवराव यांचा
किल्ले पुरंदरावर जन्म.
छत्रपती शाहूंनी हा किल्ला पेशव्यांकडे सोपविला होता,
काही काळ पेशव्यांचे वास्तव्य पुरंदरावर होते.
सवाई माधवराव म्हणजेच माधवराव पेशवे दुसरे,
काही काळ मराठा साम्राज्याचे पेशवा पंतप्रधान होते. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ एप्रिल इ.स.१६७५*
फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला.
*१७ एप्रिल इ.स.१६८२*
कारवारचे बंदर शिवरायांनी हस्तगत केले होते व त्याशेजारी ‘अंजदीव’ नावाचे एक लहानसे बेट भर समुद्रात नाक्यावरच होते. सिंधुदुर्गाप्रमाणेच तेथेही आपला जलदुर्ग बांधून किनार्याचा बंदोबस्त ठेवावा अशी महाराजांची इच्छा होती. पोर्तुगीझांना शह देण्यास हे ठिकाण सोयीचे आहे हे जाणून संभाजीराजांनी तेथे आपला सुभेदार पाठवून तटबंदी सुरु केली. त्याचबरोबर गोव्याहून पोर्तुगीज गव्हर्नरने लढाऊ जहाजे पाठवून अंजदीव हस्तगत केले ती तारीख १७ एप्रिल होय.
*१७ एप्रिल इ.स.१७२०*
बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला.
*१७ एप्रिल इ.स.१७३९*
छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१६ एप्रिल इ.स.१६६८*
छत्रपती शिवरायांनी ‘कानंद खोरे’ चे मरळ देशमुख यांना अभय दिले.
*१६ एप्रिल इ.स.१६७८*
छत्रपती शिवराय राजापूरमार्गे किल्ले पन्हाळा वर आले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१५ एप्रिल इ.स.१६७३*
स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.
प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणास धर्मवाट देऊन विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले. आणि इथूनच सुरूवात झाली एका नव्या वादळाची. राजांनी प्रतापराव गुजरांना चांगलेच फ़ैलावर घेतले. "सरसेनापती असूनही हा कोणता न्याय केलात ? हाती आलेल्या गनीमास धर्मवाट दिलीत ? गनीमास धुळीस मिळवल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका". होय, राजांचे शब्द म्हणजे अंगार होते. एखाद्या निखार्याप्रमाणे ते शब्द रावाच्या कानांमध्ये घुसले. प्रतापरावाचा विजयाचा उन्माद क्षणात मावळला आणि बहलोलखानाला पराभूत करण्यास नव्या जोमाने योजना आखू लागले
*१५ एप्रिल इ.स.१६८०*
कारवार बंदरातील धान्य संभाजी महाराजांनी आणविले
*१५ एप्रिल इ.स.१६८०*
महाराजांच्या मृत्युनंतर शंभूराजांनी राजापूर, कुडाळकडील ‘कामावीसदारास’ पत्रे धन घेऊन पन्हाळ्यावर बोलावले तसेच कारवारच्या बंदरात धान्य होते ते त्यांनी आपणाकडे आणले.
*१५ एप्रिल इ.स.१६८३*
छत्रपती संभाजी राजांनी स्वत: १००० घोडदळ व २००० पायदळ घेऊन ‘तारापूर’ वर हल्ला केला आणि ते शहर जाळले. याशिवाय मराठ्यांनी दमण पासून वसई पर्यंत असलेल्या डहाणू, आसेरीम, सैबाना आणि इतर काही गावावर हल्ले केले. त्यांनी काही गावे लुटली, काही जाळली, होड्या व पाडाव हस्तगत केले आणि २ पोर्तुगीज पाद्री कैद केले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१४ एप्रिल इ.स.१६६४*
जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली.
*१४ एप्रिल इ.स.१६६५*
इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान, फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या मोगलांनी ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड/वज्रमाळ जिंकला. वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता
*१४ एप्रिल इ.स.१७३६*
चिमाजीअप्पांनी मोघल बादशहाचा हस्तक जंजिरा येथील सिद्दीसाताचा पराभव करुन मराठी सत्तेचा दरारा बसविला.
*१४ एप्रिल इ.स.१८९१*
#डॉ._बाबासाहेब_आंबेडकर_जयंती
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल इ.स.१८९१ रोजी झाला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१३ एप्रिल इ.स.१६६३*
नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून, पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून कोकणांत उतरले. ते पुढे तळकोकणात कुडाळ पर्यंत गेले.
*१३ एप्रिल इ.स.१६६५*
किल्ले पुरंदर चा लहान भाऊ अशी ओळख असलेला किल्ले वज्रगड चे तट बुरूज पडले.
*१३ एप्रिल इ.स.१७००*
छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली. आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला,
तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.
*१३ एप्रिल इ.स.१७०४*
संग्रामदूर्ग उर्फ़ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड, राजगुरुनगरकड़े निघाला.
*१३ एप्रिल इ.स.१७३१*
छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१२ एप्रिल इ.स.१६६३*
छत्रपती शिवराय शाहिस्तेखानाची फजिती करून पुन्हा गोवा मोहीमेसाठी रवाना झाले.
*१२ एप्रिल इ.स.१७०३*
मुघल फौजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला , त्यात औरंगजेबाने स्वतः जातीने हजर राहून सिंहगड जिंकून घेतला. पण फक्त ३ वर्षेच किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला .. १७०६ मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिंहगड जिंकला आणि सिंहगड शेकडो वर्ष मराठ्यांकडेच राहिला.
*१२ एप्रिल इ.स.१७३७*
मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*११ एप्रिल इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांनी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली.
*११ एप्रिल इ.स.१७३८*
वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती.
*११ एप्रिल इ.स.१८२७* *#क्रांतिसूर्य_महात्मा_फुले_यांची_जयंती*
अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करू या ! #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१० एप्रिल इ.स.१६६०*
किल्ले पन्हाळगडास सिद्धि जोहरचा वेढा आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर,सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता.परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती.मार्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी,तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा, ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे... दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता.
*१० एप्रिल इ.स.१६६२*
छत्रपती शिवरायांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली.
*१० एप्रिल इ.स.१६९३*
१६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते.
तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी कोल्हापुर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली.
*१० एप्रिल इ.स.१७५८*
सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम
सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*९ एप्रिल इ.स.१६३३*
मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला.
*९ एप्रिल इ.स.१६६०*
पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तेशामखान हा मेला; यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली
*९ एप्रिल इ.स.१६८२*
मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज' ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार 'रामाजी पवार' व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏













