✍️भक्ती संदेश
28K Posts • 150M views
-Kalpana K
13K views 28 days ago
#💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश #🙏भक्ती सुविचार📝 . .ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll . *****************************. . सूर्य आहे म्हणून मानवी जीवन आहे. सूर्य जलाचे शोषण करतो आणि त्याचीच पुन्हा वृष्टी करतो. सर्व प्राण्यांचे जीवन व अमृत तो ईश्वरच आहे. ************************************************ . म्हणोनि अर्जुना मी नसे l ऐसा कवणु ठाव असे?l . परि प्राणियांचे दैव कैसे l जे न देखती माते ll *******************[ज्ञाने.९/३००]******************. . ------- अर्थ ------ . म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु प्राण्यांचे दुर्दैव काय सांगावे? ते मला पाहातसुद्धा नाहीत. . ------ विश्लेषण ----- . भगवंत पुढे म्हणतात, 'मीच उष्णता देतो, पर्जन्याचा साठा व वर्षाव मीच करतो. अमृत व मृत्यू मीच आहे व कार्यकारणही मीच आहे. मी नाही असे एकही ठिकाण नाही. मी सर्वव्यापी आहे.' . सूर्य आहे म्हणून मानवी जीवन आहे. सूर्य जलाचे शोषण करतो आणि त्याचीच पुन्हा वृष्टी करतो. सर्व प्राण्यांचे जीवन व अमृत तो ईश्वरच आहे. . भक्तांनी जर एकत्व भावाने निष्काम भक्ती केली तर ते ब्रम्हस्वरूप होतात. तीनही वेदांत विधान केलेली कर्मे करणारे व सोमरस पिणारे तसेच पापापासून पवित्र होणारे पुरुष यज्ञद्वारा माझे पूजन करून स्वर्गाच्या प्राप्तीसाठी इच्छा करतात. ते पुरुष माझ्या पुण्याचे फलरूप इंद्रलोकाला प्राप्त होऊन स्वर्गात दिव्य देवाचे भोग भोगतात.पुण्याचा साठा संपला की पुन्हा जन्म-मृत्यूचे चक्र सुरू होते. त्रैविधा म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यांचे ज्ञान असणारे लोक व जी माणसे यज्ञ करतात, जे तप करतात जे दान करतात त्या सर्वांना देवांचे भोग प्राप्त होतात. . तथापि त्रैविधेचा आश्रय घेऊन केलेले कर्म सकाम असते म्हणून अशा सकामांना मोक्ष न मिळता स्वर्गादी लोक प्राप्त होतांत पण शेवटी मात्र त्यांचा पुण्यक्षय झाला की पुन्हा पृथ्वीवर जन्म घेऊन परत यावेच लागते.म्हणजे वेदांचा अभ्यास करायचा नाही की काय? तर वेदांचा अभ्यास जरूर करावा, यज्ञयाग जरूर करावा पण हे सर्व निष्काम भावनेने केले तर मात्र आत्मज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होतो. . ll.राम कृष्ण हरी, माऊली ll
266 likes
1 comment 318 shares
-Kalpana K
1K views 3 days ago
#💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝. .ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll . ------------------------------------------ . 'श्रीकृष्ण हे साक्षात परब्रह्म आहेत. परब्रह्म म्हणजे अंतीम तत्त्व. ते परमधाम पवित्र व पावन आहे. तो परमपुरुष स्थिर आहे. ते परमधाम पवित्र व पावन आहे. ************************************************* . तरी होसी तु परब्रह्म l जे या महाभूतां विसवते धाम l . पवित्र तू परम l जगन्नाथा ll . **************[ ज्ञानेश्वरी १०/१४९]************** . ------- अर्थ ------ . .तरी हे भगवंता, आपण साक्षात परब्रह्म आहात, सर्व प्राणिमात्रांचे विश्रांतिस्थान असून अत्यंत पवित्र आहात ------ विश्लेषण -----. . भगवंतांनी भक्तियोग सांगितल्यावर अर्जुनास खूपच आनंद झाला व तो श्रीकृष्णास म्हणाला, 'भगवन्, सर्वोत्कृष्ट तेजोमय व परम पवित्र असे परब्रह्म तूच आहेस. शाश्वत, दिव्य, आदिदेव जन्मरहित व व्यापक अशा प्रकारचा पुरुषही तूच आहेस. सर्व ऋषी, देवर्षी, नारद, असित, देवल, आणि व्यास म्हणतात व तू स्वतः देखील असेच सांगतोस.'भगवान श्रीकृष्ण म्हणजेच परब्रह्म, व्यास व नारद हे ख्यातनाम आहेत. . असित देवल हे महान ऋषी होऊन गेले. वेदातील अनेक सूक्ते यांनी रचली. सोमाची प्रशंसा यांनीच केली. मानवी जीवनाचा प्रवास प्रेयसाकडून श्रेयसाकडे, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे झाला पाहिजे असा दिव्य संदेश यांनीच सूक्तातून दिला आहे. . श्रीकृष्ण हे साक्षात परब्रह्म आहेत. परब्रह्म म्हणजे अंतीम तत्त्व. ते परमधाम पवित्र व पावन आहे. तो परमपुरुष स्थिर आहे. ते परमधाम पवित्र व पावन आहे. तो परमपुरुष म्हणजे देव व क्षेत्रजांच्या पलीकडचा आहे. शाश्वत म्हणजे चिरंतन परमात्मा आहे. आदिदेव म्हणजे सर्व देव व प्राणिमात्रांच्या आधी असलेला, अज म्हणजे अजन्मा व विभु म्हणजे अनंत व सर्वव्यापी भगवंत होय. ज्याची सर्व ऋषी, मुनी, संत व साधु, आत्मज्ञानी व महापुरुषांनी तोंड भरून स्तुती केली आहे असा तो भगवंत होय. . . ll राम कृष्ण हरी, माऊली ll
30 likes
2 comments 29 shares