ज्येष्ठ नेते स्व. बाबुरावजी तिडके यांच्या श्रद्धांजली सभेत मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्यासमवेत उपस्थित राहून त्यांना विनम्र अभिवादन केले.
स्व. बाबुरावजी तिडके हे उमदे, संवेदनशील आणि जनसामान्यांप्रती कळकळ असलेले नेतृत्व होते. आयुष्यभर त्यांनी समाजहिताला प्राधान्य देत इतरांच्या जीवनात आनंद पेरण्याचे कार्य केले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री, माणुसकी आणि परस्पर विश्वास जपणे, तसेच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणे ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे विचार, मूल्ये आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
#महाराष्ट्र #अभिवादन #नागपूर