*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*२३ एप्रिल इ.स.१६५७*
*छत्रपती महाराजांची स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवात*
*आदिलशाहाच्या ताब्यातील एकेक प्रदेश अतिशय झापाट्याने काबिज करून घेतला पण महाराजांनी आणखी एक डाव टाकला तो म्हणजे, आदिलशाहीच्या जिंकलेल्या मुलुखाला मान्यता मिळवण्यासाठी आपल्या वकीलाला, सोनोपंत डबीर या शहाजीराजांच्या विश्वासातल्या अत्यंत मुत्सद्दी वकीलाला औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले. औरंगजेबालाही आश्चर्यच वाटले, कारण महाराजांनी मुलुख तर जिंकला होता आदिलशाहाचा, आणि ते परवानगी मात्र मागत होते औरंगजेबाची ! बिचार्याच औरंगजेबाला वाटले, छत्रपती शिवाजीराजे आपल्याशी लढण्याआधीच आपल्याला वचकून राहतायेत, त्याने सोनोपंतांसोबत महाराजांना एक पत्र पाठवून दिले, “… सांप्रत विजापूरकरांकडील जे किल्ले, जो मुलुख तुम्हांकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे. तूमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे…”*
*हे पत्र होते दि.२३ एप्रिल १६५७ चे पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की, आपल्याकडे जो माणूस वकील म्हणून आला आहे तो किती उचापती आहे.*
*सोनोपंतांनी औरंगजेबाला गोड बोलून झाडावर चढवून ठेवले आणि हळूच त्याच्या सैन्यात फेरफटका मारून त्याच्या सैनिकांकरवी मोंगलांच्या ‘आतल्या’ बातम्या काढून आणल्या आणि बरोबर एका आठवड्यानंतर दि. ३० एप्रिल १६५७ रोजी महाराजांनी आपल्यासोबत पाच-सहाशे मावळ्यांना घेऊन मोंगलांचे एक अतिशय महत्त्वाचे ठाणे, पेठ जुन्नर इथे छापा टाकला व लाखो रुपयांनी भरलेल्या जुन्नरच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ एप्रिल इ.स.१६५७*
*(वैशाख वद्य षष्ठी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)*
*छत्रपती महाराजांचे नगरचा मोगली सुभेदार मुल्तफखानास पत्र !*
*औरंगजेबाचे छत्रपती शिवाजीराजांना मेहेरबानीचे पत्र शिर्षक वाचुन कदाचित आश्चर्य वाटले असेल परंतु, असे खरेच झाले होते. मात्र त्यामागची पार्श्वभूमी व त्यानंतर काय घडले हे लक्षात घेणे अगत्याचे ठरेल. अगदी लहान वयातच छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्याद्रुष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली. हळुहळु काही प्रदेश तसेच किल्ले त्यांनी जिंकुन घेतले. इस १६३६ मधे मुघल व आदिलशहात एक महत्वाचा तह झाला होता. त्या तहानुसार जिंकलेल्या निजामशाहीतील बालाघाट प्रदेशातील बरेचसे किल्ले मुघलांकडे तर, कोकणातील किल्ले आदिलशहाकडे राहणार होते. मात्र मधल्या काही वर्षात छत्रपती शिवाजीराजांनी जे किल्ले कधी भेद करून तर कधी लढुन जिंकले त्यातले बरेचसे किल्ले हे त्या १६३६ च्या तहानुसार मुघलांकडे असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते आदिलशहाकडे होते व छत्रपती शिवाजीराजांनी ते स्वराज्यात आणले याचे कारण नेमके समजत नाही पण बादशहा शहाजहानचे दख्खनकडे झालेले दुर्लक्ष व आदिलशहाने तह न पाळणे या दोन गोष्टी संभवतात. इस १६५२-५३ मधे शहाजहानने शाहजादा औरंगजेबाला दुसर्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणुन पाठवले. नोव्हेंबर १६५६ मधे विजापुरचा मोहंमद आदिलशहा वारला त्यावेळी आदिलशाहीत अंतर्गत कलह चालु होता. सत्तेवर कोणाला बसवायचा यावरून मारामारी सुरु होती. औरंगजेबचे लक्ष आदिलशाहीकडे वळाले. त्यानुसार त्याने शहाजहानच्या परवानगीने युद्ध आरंभले व आदिलशहाच्या ताब्यातील बीदरचा किल्ला जिंकला. त्याच सुमारास छत्रपती शिवाजीराजांनी नगरचा मुघल अधिकारी मुल्तफतखान याला पत्र लिहिले की, 'माझ्या मागण्या मान्य होत असतील तर मी शाही फौजेत (मुघलांच्या) दाखल होयला तयार आहे' त्याच्याकडून अनुकूल उत्तर आल्यावर शिवाजीराजांनी औरंजेबाकडे आपले वकील सोनोपंत डबीर पाठवले व आपलै म्हणणे मांडले ते असे "विजापुरकरांकडील जो मुलुख व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेबाने मान्यता द्यावी"*
*या वेळेपर्यंत 'शिवाजी' म्हणजे काय पाणी आहे हे औरंगजेबाला बहुदा नीटसे माहीत नव्हते. म्हणुनच त्याने ही वरची महाराजांची 'मागणी' मान्य केली व तसे मान्यतादर्शक व मेहेरबानीचे पत्र २३ एप्रिल १६५७ रोजी महाराजांना पाठवले त्यात तो लिहितो "......सांप्रत जे किल्ले व मुलुख (आदिलशहाचा) तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याजखालील मुलुखाचा महसूल तुम्हास दिला असे." म्हणजे बघा, मुलुख कोणाचा तर आदिलशहाच्या ताब्यातील , जिंकला कोणी तर शिवाजीराजांनी आणि त्याची मान्यता घेतली औरंगजेबाकडून म्हणजेच मुघलांकडुन.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ एप्रिल इ.स.१६८३*
*(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार सोमवार)*
*सुरतकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना प पत्राची नोंद!*
*"मोगल पातशहा अजून औरंगाबादेतच आहे. सुलतान अकबर व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पाठविलेली सेनादले काढून घेतली आहेत. हा निर्णय घेतल्यामुळे लोकांमध्ये तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाची फजिती अवघ्या काही वर्षांतच कशाप्रकारे केली होती याचे दर्शन होते. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज एका सिंहाचेच छावे कसे होते याचे यथार्थ दर्शन या सुरतकर इंग्रजांच्या पत्रातून होते. वरील पत्रावरून मराठे सैन्य औरंगजेब बादशहाशी किती निकराने सामना देत होते. आणि औरंगजेब बादशहास निर्विवाद विजय कसा प्राप्त होत नव्हता हे सिद्ध होते.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ एप्रिल इ.स.१६९४*
*छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला इ.१६९४ एप्रिल २३ काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगांव या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देगांवच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ एप्रिल इ.स.१७५२*
*मोगल बादशहा आलमगीर याचे मराठ्यांस प्रथम मुखत्यारपत्र मराठे व दिल्लीकर बादशाह यांच्यात कनोज मुक्कामी बादशाहीचे अंतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण मराठ्यांनी करण्यासंबंधी अहदनामा ( करार ) झाला.*
*या "अहदनामा" नामक तहान्वये -*
*१) अब्दालीसारखा परकीय आक्रमक असो किंवा पठाण आणि रजपूत जाट असो, सर्व शत्रूपासून या डळमळीत साम्राज्याचं रक्षण करण्याच पेशव्यांनी मान्य केल आहे पेशवे बादशहाचा गेलेला मुलुख जिंकून त्याला परत करतील.*
*२) अब्दालीची हकालपट्टी करण्याकरता तीस लाख आणि इथल्या बंडखोरांच्या बदोबस्ताकरता वीस लाख असे एकूण पन्नास लाख रुपये पेशव्यांना मिळावेत.*
*३) पंजाब आणि सिंधची चौथाई (यात सियालकोट, पसरूर, गुजरात आणि अब्दालीला दिलेलं औरंगाबाद) तसंच हिसार, बदाऊं, संभळ आणि मुरादाबाद हे जिल्हे पेशव्यांना देण्याचं बादशहानं मान्य केलं आहे.*
*४) बादशहानं पेशव्यांची अजमेरची सुभेदारी (यात नारनौलची फौजदारी येते) आणिआग्र्याची सुभेदारी (यात मथुरेची फौजदारी येते) बहाल केली आहे. पेशव्यांनी तिथवसुली करून ह्या मुलुखातल्या असलेल्या हक्कांचा उपभोग घेणे आहे.*
*५) परंपरागत चालत असलेल्या चालीरीति आणि नियम सांभाळून ह्या मुलुखांचा कारभार पेशव्यांनी बघावा.*
*६) मोगल मनसबदारांप्रमाणे पेशव्यांच्या सरदारांनी दरबारात यावं आणि बादशहाच्या मोहिमांत भाग घ्यावा.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*२३ एप्रिल इ.स.१८१८*
*दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
#🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस