Failed to fetch language order
Failed to fetch language order
Failed to fetch language order
भारतीय लग्न
98 Posts • 917K views
💔 *“बायोडाटा परफेक्ट*… पण समजूत *झिरो*!” 💔 “शिक्षणानं नातं नाही टिकत… समजुतीनं टिकतं!”🔥 आजकाल लोक लग्न करताना बायोडाटा, पदवी, आणि पगार बघतात… पण “ *माणूसकी* ” नावाचा शब्द विकून खाल्ला आहे, असं वाटतं! अभिजीत आणि नेहा — दोघंही जास्त शिकलेले, चांगल्या घरचे, सर्व बाबतीत परफेक्ट. त्यांचं लग्न प्रेमाने नाही, तर एकमेकांचा बायोडाटा बघून ठरलं होतं. आई-वडिलांच्या दृष्टीने सगळं योग्य — शिक्षण, नोकरी, घर, प्रतिष्ठा. पण एक गोष्ट मात्र कोणीच बघितली नाही — “समजून घेण्याची तयारी.” लग्नाच्या काही महिन्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले. नेहाला वाटायचं — “मी शिकलेली, माझं म्हणणं नेहमी बरोबरच.” अभिजीतलाही वाटायचं — “ती इतकी शिकलेली असूनही समजून घेत नाही…” दोघंही आपापल्या अहंकारात खूपच अडकलेले. एका दिवशी वाद झाला आणि नेहा बॅग भरून माहेरी निघून गेली. आई-वडिलांना प्रत्येक गोष्ट सांगत होती — पण प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची नसते,कारण काही गोष्टी आपल्या नात्यात राहूनच सोडवायच्या असतात, बाहेर गेल्यावर त्या फक्त “बातम्या” बनतात.हे दोघं गरीब नव्हते, परिस्थिती वाईट नव्हती, संसार चालवायला सगळं होतं… पण समजूत नव्हती. आणि जेव्हा शिक्षणापेक्षा अहंकार मोठा होतो,तेव्हा कितीही शिकलेलं असलं तरी नातं तुटतंच. आजच्या काळात लग्न म्हणजे स्पर्धा झाली आहे — “त्या मुलाला एवढा पगार आहे का?”, “तो किती शिकलेला?”, “मुलगी किती स्मार्ट दिसते?”, “त्यांचं घर मोठं आहे का?” अपेक्षांच्या नावाखाली आता मुलां-मुलींमध्ये व्हरायटी आणि स्पर्धा ओझ्यासारखी लादली गेलीय. लग्न करताना फक्त पदवी नाही, माणूसकीही बघा. कारण पदवीने नातं सजतं, पण *माणूसकीने* नातं टिकतं. “आजकाल काही मुली आणि त्यांचे घरचे लग्न करताना शिक्षण, पैसा,शेती, पगार, घर याचं गणित मांडतात…आणि त्या गणितात ‘माणूसकी’ नावाचा शब्द कुठेतरी विकून खाल्ला जातो. म्हणूनच लग्नं होत आहेत, पण संसार टिकत नाहीत...आजकाल सरासरी दहा पैकी फक्त दोन लग्न (संसार)टिकतात.... #लग्न #भारतीय लग्न #लग्न #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻
22 likes
22 shares
आजकाल काही बायका लग्न झाल्यावर सतत धमक्या देत.“मी राहणार नाही.मी जाईन.मी सहन करणार नाही.”मला राहायचं नाही. मी निघून जाणार मला घटस्फोट हवा.काही पुरुष लग्न झाल्यावर सतत धमक्या देतात “मी राहणार नाही.मी घटस्फोट देईन. मला तुझ्याशी काही संबंध नाही.” अरे, जर इतकंच राहायचं नव्हतं तर लग्न कशाला केलंस? त्रास द्यायला फक्त एकमेकांना आणि बाकी लोकांना?बाकीच्या लोकांनी कायमच रागाचा, धमक्यांचा बळी का व्हायचं?तो/ती पण माणूस आहे, त्याला पण भावना आहेत.धमक्या देणं म्हणजे प्रेम नाही ती सरळसरळ छळवणूक आहे.जर इतकंच नकोसं वाटत होतं, तर लग्नच करू नका. नातं मोडायच्या धमक्या देणं हे काही परिपक्व वागणं नाही.स्वतःची बुद्धी वापरा आणि स्वतःची बुद्धी वापरली तर हे अशा धमक्या तुम्ही देणारच नाही. आणि नाही असं वाईट वागणार. तो/ती शहाण्या व्यक्तिला धमक्या द्यायची गरजच नसते,कारण स्वभाव,कदर हेच परिपक्व. तो/ती वारंवार धमक्या देणं म्हणजे अपमान करणं, आणि नात्याचा पाया हादरवणं. आणि हे पण लक्षात ठेवा, तुम्ही काही Miss World नाही आहात,की सगळे तुमच्या हट्टापायी डोकं खाली घालतील.आणि हे पण लक्षात ठेवा तुम्ही काही सुपरहिरो नाही आहात,की ती धमकीने जगेल.घर टिकवणं, नातं सांभाळणं ही खरी सुंदरता आहे.धमक्या देऊन कुणी मोठं होत नाही.महिला असो किंवा पुरुष, धमक्या देणं, वाईट वागणं, कलह करणं, हे चूकच. मुलांनी पण एकदा ठाम निर्णय घ्यायला हवा जर बायको सतत धमक्या देत असेल,जे व्यक्ती तुमच्यावर इतक्या साऱ्या केसेस लावते.कायद्याच्या धमक्या देणं किंवा खूप साऱ्या केसेस तुमच्यावर लावणं तुमच्या घरच्यांवर हे प्रेम नसतंच आणि मनात प्रेम नसतंच त्यामुळे त्या व्यक्तीला सोडून देणंच गरजेचं असतं. तर त्या व्यक्तीला तिला सोडून द्यावं.आणि हेच मुलींच्या बाबतीतही.जे नातं धमक्यांवर, cases वर, त्रासावर टिकतं ते नातं नसतं. अशा नात्यापासून दूर जाणंच खरं शहाणपण आहे.अशा वेळी त्या व्यक्तीला सोडून देणं गरजेचं असतं, सोडून द्या अशा वेळेस त्या व्यक्तीला. म्हणून सतत धमक्या देणाऱ्यांनी आधी आरशात बघावं.मला दोन तीन जणांनी प्रश्न विचारला त्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी हा लेख लिहिला आहे, त्यामुळे मला जेवढं समजतं तेवढं मी लिहिलं.आणि हा लेख सर्व लग्न झालेल्या लोकांसाठी आहे.मग ती बाई असो किंवा पुरुष यात बाकी लोकांचं काहीही नाही. आणि हा लेख ज्यांना लागेल किंवा ज्यांना वाटेल माझ्याच बाबतीत होतं. तर ते चुकीचे वागतात. मध्ये महिला असो किंवा पुरुष.इतकही चुकीचं वागू नका, वाईट वागू नका की तो लेख तुम्हाला स्वतःला तुम्ही स्वतः त्या लेखामध्ये स्वतःला पहाल किंवा स्वतःला लागेल.कृपया नोंद घ्यावी.यात बाकीच्या लोकांना ओढू नका. #घटस्फोट ##घटस्फोट.. #भारतीय लग्न #लग्न
9 likes
9 shares