Rahul Lihinar
577 views • 7 days ago
ठाणे शहरात बारवी जलवाहिनीवरील तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार दुपारपासून २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ठाणे, मुंब्रा, दिवा आणि कळवा परिसरातील अनेक भागांवर याचा परिणाम होणार असून, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.
गुरुवार २१ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार २२ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून, दिवा, कळवा, मुंब्रा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीतील काही भागांना याचा फटका बसणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
#Thane #WaterCut #BarviPipeline #WaterSupply #Mumbra #thanedistrictupdate #Thane wibhag 2 khopat #thane #ठाणे #ठाणे काँग्रेस
14 likes
13 shares