*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*१६ मार्च १५२७*
फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
*१६ मार्च १६८१*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले तेंव्हा नोव्हेंबर १६८० मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी आपला वकील इंग्रजांकडे मुंबईस पाठवला होता शिवाय सिद्दीच्या मुंबईमधील हलचालीवर ही लक्ष ठेवण्याची तरदूत छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती. इंग्रजांनी सिद्दीस मदत करायचे थांबवावे तसे न केल्यास छत्रपती संभाजी महाराज मुंबईवर स्वारी करतील असा निरोप छत्रपती संभाजी महाराजांच्या वकीलाने इंग्रजांना दिला यावेळी सिद्दी आपल्या आरमारासह सूरतेस गेला होता तेंव्हा इंग्रजांना सिद्दीच्या भानगडीतून थोडा दिलासा वाटला होता. पण १६८१ च्या सुमारास सिद्दिने मुंबईस जाणारी मराठ्यांची २ गलबते आणि ४ माणसे पकडली. चौल येथे ३००० सैन्यासह मराठा दाखल होता त्याने गलबतांची रास्त मागणी केली तेंव्हा इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भीतीने ती गलबते सिद्दीकडून घेऊन मराठ्यांकडे पाठवली..
छत्रपती संभाजी महाराजांचा आरमारातील दरारा दर्शवणारी ही घटना झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १६ मार्च १६८१
*१६ मार्च १६८६*
छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे बाटलेल्या लोकांना शुद्ध करून घेतले होते.१६ मार्च १६८६ रोजीचे हे निवाडा पत्र. यात गंगाधर रंगनाथ यांना शुद्ध करून घेतलेले आहे. यास आजच्या भाषेत "घरवापसी" म्हणतात. याहून काही समाजकंटक जाती जाती मध्ये वितुष्ट आणत असतात अश्या महाभागांसाठी या पत्रातील शेवटची ओळ पूरक आहे. सूज्ञास सांगणे न लागे.
श्रीमहालक्ष्म्यैनम: श्रीत्र्यंबकेश्वर
.ll श्रीसकलगुणालकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री देशमुख देशपाडे व ज्योतिषी व उपाध्ये व समस्त वेदमूर्ती, वस्ती कसबे हरसूल, प्रांत अवरंगाबाद व समस्त महाराष्ट्र कोकण देशस्थ विद्वद्वैदिक गृहस्थ गोसावी यांसीः-
पौष्य उपाध्ये व मोरेश्वर पडितराव आशीर्वाद अनुक्रमे नमस्कार उपरि गगाधर रगनाथ कुळकरणी कसबे हरसूल हा ब्राह्मण मोंगलापाशी सेवेसी होता कित्येक दिवस चाकरी करीत असता मोगली यावरी बलात्कार करून बाटविला भ्रष्ट करून यास तीन महिने बदखानी निर्बध ठेविला होता. तेथें यवनासी अन्नोदकससर्ग घडला त्यानंतर यास भाग्य अडीचसेहें मनसब देऊन चाकर करून ठेविला पांच वर्षे चाकरी करीत होता स्नानसंध्यादिक कर्मे करिता नयें, यास्तव राहिले पांचा वर्षांत अन्नोदकसंसर्ग केला नाही. दौलत करीत असतां भाग्याचें सुख टाकून, अत:करणी अनुताप मानून, आपले जातींत यावे यास्तव दौलत संपत्ती सर्व टाकून, अनुतापास्तव राजश्री छत्रपती स्वामीपाशीं रायगडास येऊन, एक वर्ष गंगाधर रंगनाथ दरबारीं आपणास प्रायश्चित्त द्या ह्मणऊन सरकारकून व न्यायाधीश व उपाध्ये व दानाध्यक्ष व भलेभले ब्राह्मण व समस्त आपले ज्ञातीस शरण येऊन, प्रायश्चित्त मागत होता त्याउपरि राजश्री समस्तराजकार्यधुरंधर वर्णाश्रमधर्मप्रतिपालक राजश्री छदोगामात्य स्वामी यास सर्व वर्तमान विदित जालें त्यानंतर त्यांहीं ब्राह्मणाचे कष्ट व अनुताप बहुत देखोनी राजश्री छत्रपती स्वामीस याचा वृत्तांत विदित केला. छत्रपती कृपाळू होऊन प्रायश्चित्त द्यावयासी आज्ञा दिल्ही त्याउपरि आह्मीं राजश्री छंदोगामात्य यांचे सभेसी समस्त विद्वद्वैदिक ब्राह्मणाचे संमतीनें मिताक्षरादि निबंध पाहोन, प्रायश्चित्त निर्वाह करून, गगाधर रंगनाथ यासी प्रायश्चित्त संकल्प सांगोन, श्रीयात्रेस, पाठविला. तेथें श्रीगिरिप्रदक्षिणा तीनशें साठी व यात्रा दोनी इतुके चतुर्विशत्यब्द प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित गंगाधरे केलें यथाशास्त्र प्रायश्चित्त विध्यक्त प्रकारें केलें. श्रीक्षेत्री समस्त धर्माधिकारी आदिकरून ब्राह्मणसगतीने तीर्थविधि करून, ब्राह्मणभोजन करून, अन्नप्रसादपंक्तीस गेतला. शुद्विभोजनें व प्रायश्चित्तप्रदक्षणा यथाविधि केला, ह्मणऊन श्रीक्षेत्रींच्या ब्राह्मणांचीं पत्रें व देशाधिकारी यांचीं पत्रें घेऊन आह्मापाशी आला पत्रें आह्मासी दिली. उपरि यथाविधि प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित निर्गमिले ऐसे वर्तमान राजश्री छंदोगामात्य गोसावी यांसी विदित केलें. त्याहीं पत्रें मनास आणून समस्त कारकून व न्यायाधीश यांच्या अनुमतें आह्मास आज्ञा केली जे गंगाधर रंगनाथ यास आपले पंक्तीस भोजन देऊन शुद्धिपत्र देणें ह्मणऊन. त्यावरून आह्मी आपले पंक्तीस भोजन देऊन यासी शुद्धिपत्र दिलें हा ब्राह्मण शुद्ध जाला, संव्यवहार्य जाहाला याउपरि यासी तुह्मी अन्नोदकादि व्यवहार यथापूर्व करीत जाणें जो कोण्ही याचा ब्राह्मण्याविषयी सदेह मानील तो देवब्राह्मणद्रोही महापातकी जाणिजे शके १६०८ सोळा शतें आठ, क्षय सवत्सर, चैत्र शुद्ध द्वितीया, भौमवार हे विज्ञप्ती मोर्तब.
*१६ मार्च १६८६*
औरंगजेबाने कपटाने कुतुबशाहिच्या माद्दंना व आकान्नाचा खून करवला.
*१६ मार्च १६९३*
शुर सुभेदार मल्हारराव होळकर जयंती
(मृत्यू २० मे १७६६)
हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.
*१६ मार्च १७१३*
छत्रपती शाहु महाराजांची परशुरामपंत प्रतिनिधी यांची पेशवेपदी नियुक्ती केली.
*१६ मार्च १७७२*
मराठ्यांनी पथ्थरगड जिंकला
इ सन १७६९ नंतर उत्तरेकडील जाट, रोहिले, पठाण हे वरचेवर प्रबल होत होते. त्यानी बळकावलेला प्रदेश पुन्हा मिळवण्यासाठी रामचंद्र गणेश कानडे या मराठा सरदाराच्या हाताखाली उत्तरेकडे मराठा फौज रवाना केली. त्यात विसाजी कृष्ण बिनीवाले यांची करभारी म्हणुन नेमणुक केली. तिकडे शिंदे होळकरांची प्रत्येकी १५००० ची फौज होती. कानडे यांच्या यावेळच्या फौजेत गोविंदरावांचे पथक होते.
झाबेताखान शुक्रतालच्या किल्ल्यावरून पळून पथ्थरगडावर आला, मराठा सैन्य या किल्ल्यास वेढा देऊन बसले या वेढ्यात गोविंदराव बाबर, सुलतानजी बाबर व गंगाजी बाबर यांचे पथक होते. या वेढ्यातील खास चौकी ची महत्वाची जबाबदारी गोविंदराव बाबर यांच्याकडे होती. मराठ्यांनी १६ मार्च १७७२ रोजी पथ्थरगड जिंकला. या समयी मराठा सैन्यानी या गडावरील नजिबाची संपत्ती तर घेतलीच,परंतु पानिपतावरुन शत्रुने पळवुन नेलेल्या मराठ्यांच्या काही बायकांची सुटका केली. यात बाबर घराण्याचे महत्वाचे योगदान आहे. या मराठ्यांच्या पराक्रमाच्या खबरा जेंव्हा पुण्यात माधवरावांना मिळाल्या तेंव्हा त्यांनी विसाजी पुण्यात आल्यावर त्यांचा सुवर्णपुष्पे उधळून सन्मान करण्याचा लेखी आदेश दिला.
*१६ मार्च १७७३*
इ.स. १७७३ मध्ये पेशव्यांनी रायगड आपल्याकडे घेतल्यावर त्याची व्यवस्था ठरवून टाकली. छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते. मात्र तरीही पेशव्यांनी रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. पेशवे दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळतें ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.
इ.स.१७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अश्या बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249
#☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*