Suraj Chavan
565 views
5 days ago
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* *------------☆★☆★☆-------------* *🚩२ मार्च इ.स १६६०* *सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा* *सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून छत्रपती शिवाजी महाराज मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. सिद्दी जौहरने २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळासह पन्हाळगडाला वेढा घातला.* *🚩२ मार्च इ.स.१६८७* *औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता. तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस.* *🚩२ मार्च इ.स.१७००* *स्वराज्याचे तृतीय छत्रपती राजाराम महाराजांचे निधन अन् महाराणी ताराबाईंनी राज्य कारभार हाती घेतला...* *औरंग्याने छत्रपती शंभुराजांची अमानुष हत्या केली...* *आता मराठे घाबरतील,शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं... पण घडलं भलतचं.... छत्रपती शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी* *लागला...छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरन्गजेबाला टक्कर देवू लागले...दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले...* *या काळात छत्रपती राजाराम महाराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अशा कारभारयांची साथ लाभली...मुघलांशी निर्णायक युद्ध जिंकने अशक्य होते... म्हणून छत्रपती राजारामांनी मुघलांनी मिळवलेला जो भाग मराठे जिंकतील तो भाग त्यांची जहागीर बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले... वेग-वेगळे मराठा सरदार जागो-जागी मुघल सैन्यावर आक्रमण करू लागले... संधी मिळताच त्यांचा पराभव करून रसद लुटू लागले... आपली पिछेहाट होताना दिसताच पसार होवू लागले..* *मुघलंनी जिंजीला वेढा दिला...पण छत्रपती राजाराम महाराज पसार होवून विशालगडावर गेले... तेथून सातारा,कर्नाटक पुन्हा महाराष्ट्र अशा चकमकी होवू लागल्या..महाराष्ट्रात मुघलांना धुळ चारायची हेच एकमेव लक्ष्य मराठ्यांसमोर होते. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायाला ते तयार होते.. त्यांना सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा होताच. शेतकरी दिवसा शेती करून रात्री सैनिक बनत होता..परन्तु, दुर्दैवाने महाराष्ट्राची पाठ सोडली नाही.. २ मार्च रोजी सिंहगडावर मराठ्यांचा तिसरे छत्रपति राजाराम महाराजांचा सिंहगडावर मरण पावला..निधन झाले तेंव्हा राजाराम महाराज ३० वर्षाचे होते.. त्यांच्या काळखंडातच सिन्धुदुर्गावर शिवरायांचे मंदिर उभारन्यात आले.* *🚩२ मार्च इ.स.१७९५* *खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड,तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते* *🚩२ मार्च इ.स.१८१८* *इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्र्यात आल्यवर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली.* *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 *♠️ अजय सोनवणे* https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏 *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *WhatsApp ग्रुप लिंक* *།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA *།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* *महाराष्ट्र राज्य* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*