नाशिक महानगरपालिकेने कुसुमाग्रज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज काव्य उद्यानातील वृक्षतोड करून ती जागा एसटीपी प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वृक्षतोड झाल्याने त्यांच्या स्मृतीचा व मराठी संस्कृतीचा अपमान झाल्याचे त्यांनी म्हटले. पर्यावरण संवर्धन व सांस्कृतिक वारसा जपणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करत त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला.