*🌹💞📿श्रीकृष्णा📿🌹💞*
*"विचारधन*
🙂↕️मनुष्याच्या जीवनात अनेक गुण असतात, पण काही उणिवाही असतात. अनेकदा या उणिवा स्वीकारण्याऐवजी माणूस इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या मर्यादा मान्य करण्यापेक्षा आपण वेगळे आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला की मनुष्य हळूहळू सत्यापासून दूर जातो. पण खरे ज्ञान हे केवळ बोलण्यात किंवा दिखाव्यात नसते, ते अनुभवातून जन्माला येते. अनुभव हा जीवनाचा खरा शिक्षक आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यातील घटना पाहून थोडेफार शिकता येते, पण त्या प्रसंगाचे खरे आकलन ते स्वतः अनुभवल्या नेच होते. जीवनातील आनंद, वेदना, संघर्ष आणि समाधान या सगळ्या गोष्टी माणसाला घडवत असतात. म्हणूनच पैशाने सुखसोयी विकत घेता येतात, पण अनुभव आणि शहाणपण कधीच विकत घेता येत नाही.
😌आपले जीवन चार पुरूषार्थांवर उभे आहे—कर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या चारही गोष्टींचा समतोल साधला की जीवन समृद्ध होते.
लहानपणी शिक्षकांकडून शिक्षण, तरुणपणी वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रौढपणी संत- सद्गुरू ज्ञानी जनांचा सहवास आणि वार्धक्यात समर्पणाची भावना, या प्रत्येक टप्प्यावर मिळणारे संस्कार जीवनाला परिपूर्णतेकडे नेतात. जीवनात एखादी गोष्ट टाळणे आणि ती नाकारणे यातही मोठा फरक आहे. जे समजत नाही ते टाळले जाते, पण जे चुकीचे आहे ते धैर्याने नाकारले जाते. मात्र अहंकार, लोभ आणि दिखावा यामुळे माणूस योग्य मार्गापासून दूर जातो.
🧘🏻♂️संतांचे विचार आपल्याला नेहमी सांगतात की लोभ आणि अहंकार सोडून सद्गुरूंच्या मार्गावर चाललो तरच जीवनात खरी शांतता आणि समाधान मिळते. अनुभवी वडीलधाऱ्यांचा सल्ला, संतांचा मार्ग आणि स्वतःचे प्रामाणिक कर्म—यांच्यातूनच जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो..!!✍🏻
*संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ सकाळ